Ads

14 June 2024

राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-



सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.



✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..



येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


राज्यसेवा पुर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

 ✳️ राज्यसेवा Prelims मध्ये अर्थव्यवस्था या विषयावर 15 प्रश्न विचारले जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Syllabus मध्ये Mention केलेल्या घटकावरतीच ते प्रश्न विचारले जातात.


 थोडक्यात Economy मध्ये Predictability आहे. MPSC ने अर्थव्यवस्थेच्या Syllabus मध्ये 5 मुख्य घटक दिलेले आहेत.


1. लोकसंख्या

2.दारिद्र व बेरोजगारी

3. शाश्वत विकास

4. समावेशन

5. सामाजिक क्षेत्र सुधारणा

6.नियोजन व जमीनसुधारणा ( Syllbus मध्ये Mention नाही पण प्रश्न येतो.


यातील पहिल्या 3 घटकांची आपण आज सविस्तर चर्चा करू.


♦️1. Demography म्हणजेच लोकसंख्या -


या घटकवरती 1-2 प्रश्न हमखास विचारले जातात.


यामध्ये आपल्याला लोकसंख्येचा

 संख्यात्मक( लिंग गुणोत्तर, साक्षरता दर, घनता इ) आणि गुनात्मक( माता मृत्युंदर, बालक, शिशु मृत्यूदर इ). अनुषंगाने अभ्यास करावा लागतो.                 

  लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था चांगल्या करून ठेवा.

भारतातील लोकसंख्या धोरणे उदा. 1976 आणि 2000 याचा उपघटकनुसार Detailed मध्ये Study करून घ्या.      

लोकसंख्या हा घटक तुम्हाला भूगोलामध्ये पण कमी येऊ शकतो so चांगला करून घ्या.


Source - देसले सर भाग 2 हा यासाठी सर्वोत्तम source राहील.

अगदी रट्टा मारून टाका😊. 

   

♦️2. दारिद्र्य व बेरोजगारी -

 किमान 2 प्रश्न या घटकावरती विचारले जातात. यामध्ये दारिद्र्य व बेरोजगारीचा अर्थ, प्रकार,महत्वाच्या व्याख्या, दारिद्र्य निर्मूलणासाठी नेमलेल्या समित्या आणि त्यानी केलेल्या शिफारशी चांगल्या करून ठेवा.

रंगराजन, तेंडुलकर, लकडवाला या तीन समित्या आयोगाच्या लाडक्या आहेत. त्या आपल्या पण लाडक्या व्हायला पाहिजेत मथीतार्थ त्या चांगल्या करा 😊.

त्यांनी सांगितलेली आकडेवारी त्यानुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्राचे किती? या बाबी पण clear करून ठेवा.

दारिद्र्य व बेरोजगारी निर्मूलणासाठी सरकारने विविध योजना सुरु केल्या आहेत. त्यावरती आयोग हमखास प्रश्न विचारतो.

देसले सर भाग 2 मधून चांगल्या करून ठेवा.                      

 Multidimetional Poverty Index ( MPI) - MPI चे 3 आयाम, त्याचे 10 निर्देशक वव्यवस्थित करून घ्या. त्याच्या Vulnerable, Multidimetionally Poor, Severly Multidimetionally Poor याच्या Categorization वरती आयोग प्रश्न विचारत आहे. लक्षात ठेवा.

देसले सरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिल आहे.


संदर्भग्रंथ - देसले सर भाग 1 आणि कोळंबे सर.    


♦️3. शाश्वत विकास -


1972 च्या Stockholm परिषदेपासून सुरु झालेला Sustainable Developement चा प्रवास अगदी पॅरिस करारापर्यंत येऊन थांबतो. 1987 चा Montreal प्रोटोकॉल  त्याच्या Provisions,1992 ची वसुंधरा परिषद त्यामधून बाहेर आलेले वेगवेगळे करार, त्यामधील बंधनकारक असलेले, नसलेले, त्यातील तरतुदी अभ्यासाव्यात, Kyoto Protocol चा सविस्तर अभ्यास करावा.

त्यानंतर येतो यामधील सर्वात IMP घटक MDG & SDG - 2000-2015 या कालावधीसाठी आपण MDG लागू केले होते. त्याची उत्पत्ती, त्याचे उद्दिष्टे, टार्गेट्स, Indicators इ. क्रमाने लक्षात ठेवावी लागतील. हेच SDG च्या बाबतीत देखील लागू होते. इथून मागे आयोगाने MDG आणि SDG वरती जास्त Deep मध्ये प्रश्न विचारले नाहीत इथून त्यातील प्रत्येक Target वरती Detailed मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. So 1-17 या क्रमाने SDG आणि प्रत्येक SDG मध्ये सांगितलेल्या Provisions पाठ करून टाका.


✳️ 1.समावेशन (Inclusion )-


यावरती किमान 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात.


समावेशन म्हणजे समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणणे. ते वित्तीय, सामाजिक व प्रादेशिक या माध्यमातून करता येऊ शकते. Mpsc यावरती योजनाच्या Angle ने प्रश्न विचारते.

उदा. वित्तीय समावेशनाच्या योजना - प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री सुरक्षित विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी/ कर्मयोगी मानधन योजना Universal Basic Income इ. यामध्ये आयोग सामाजिक व प्रादेशिक समावेशनाच्या Angle ने जास्त प्रश्न विचारत नाही तरीही त्यासाठी कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यांच्या शिफरसी, काही विशेष तरतूद उदा. Special Catrgory Status आपण बघून घ्यायला पाहिजेत.

 या सर्व योजना आणि इतर बाबी देसले सर भाग 2 मध्ये व्यवस्थित दिल्या आहेत.                           


✳️ 2. सामाजिक क्षेत्र सुधारणा ( Social Sector Initiative )-  

        

अर्थव्यवस्थेमधील जी सामाजिक क्षेत्रे आहेत. त्यावरती किमान 2 प्रश्न हमखास विचारले जातात.

यामध्ये शिक्षण, आरोग्य, बालक, महिला, वृद्ध, अपंग, backward classess इ. घटकांवरती प्रश्न विचारले जातात.

वरील घटकंसाठी सुरु करण्यात आलेल्या योजना, राबवण्यात येणारे उपक्रम, विविध घोरणे, वरील घटकंसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतुदी इ वरती आयोग प्रश्न विचारते. यावर्षी National Child Labour Project, राष्ट्रीय युवा धोरण यावरती प्रश्न विचारण्यात आला होता.

या Topic साठी तुम्ही आयोगाने MPSC mains पेपर 3 मधील HR-HRD  या घटकावरती आयोगाने योजनावरती जे प्रश्न विचारले आहेत ते 21000 book मधून एकदा बघून घ्या. त्यातील बरेच प्रश्न repeat होत आहेत. 


या Topic साठी देसले सर भाग 2 हेच पुस्तक read करायला हवं.


✳️ 3.नियोजन व जमीनसुधारणा -


थेट Syllabus मध्ये उल्लेख नाही पण आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसत आहे. म्हणून आपल्याला पण याचा Compulsory अभ्यास करावा लागेल.यावरती  1-2 प्रश्न विचारले जातात.


पंचवार्षिक योजना कालावधी, वृद्धी दराची उद्दिष्टे, अपेक्षित व साध्य दर , प्रतिमान, विशेष भर कशावर होता, त्या योजनेमध्ये कोणते प्रकल्प, कोणत्या योजना सुरु झाल्या इ. चा बारकाईने अभ्यास करून ठेवा.देसले /कोळंबे सरांच्या पुस्तकात याचा Chart दिला आहे तो चांगला करा.               

नियोजनासाठी भारतात अस्तित्वात असलेल्या Institutions उदा. नियोजन आयोग, NITI आयोग याचा Chart स्वरूपात Study करून ठेवा.    


 जमीनसुधारणा या घटकवरती सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो त्यासाठी कोळंबे सरांच्या HR- HRD पुस्तकातील ग्रामीण विकास घटकातील जमीन सुधारणा हा Topic करा. प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. इथून पाठीमागील सर्व प्रश्न cover होतात. यावरती आलेले Pyq पण बघून घ्या. फायदा होईल.


2020 च्या Prelims मध्ये राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर Gdp/Gnp च्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न घटक पण read करावा लागेल. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये तो चांगला दिला आहे.

       

♦️नोट -


 Economy मध्ये 2-3 प्रश्न हे Out of box असतात.(उदा. Missing Women,Usa - India डॉलर मॅचिंग अनुदान प्रकल्प इ.)त्यामध्ये जास्त काही करता येत नाही आपले Logic आणि Out of box Study यावरतीच आपल्याला ते Tackle करावे लागतात. जेवढं आपल्या हातात आहे. त्यावरती 100% Command मिळवण्याचा प्रयत्न करा. मग Marks नक्कीच भेटतील.             


समाप्त..

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,


 ✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.


✳️ परत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.

 त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.

 कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.

 बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.

  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.

 जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.

 जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.


✳️ तयामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.

 माझ्या माहितीप्रमाणे,

 पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत

 जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.

 इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत

 आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.


 1. राज्यशास्त्र-

 राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे

 पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.

 राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.

 एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.

 मग काही जणांना अडचण वाटते

 त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.

 यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे

 कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात

 उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या

 राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.

 ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे

 जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल

 निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.


 2.भूगोल-

 कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.

 हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे. 

 स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत

 आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.

 ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.


 3.अर्थशास्त्र-

 यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.

 अर्थशास्त्राच्या संदर्भात  मागील एक पोस्ट शेअर केली होती

 ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.


 4.विज्ञान-

 इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते. 

 साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.

 कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.

 जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..

 बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.

 तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.

 त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.

इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..


 5. इतिहास-

 सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.

 पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.

 तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.

 इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.

 त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.


 6. चालू घडामोडी-

 यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.

 वारंवार रिव्हिजन करणे.

 आणि पाठांतर करणे.

 कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे

 दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.


अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

लोकसंख्याविषयक महत्वाचे

1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत

2. जनगणना प्रारंभ - 1872

3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881

4. जनगणना अधिनियम - 1948

5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952

6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969

7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993

8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976

9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000


🔶 लोकसंख्या विषयक सिद्धांत


1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत

- प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population


लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.


आजचे प्रश्नसंच

                                          

1)भारतातील तिसरी किसान रेल्वे कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू झाली आहे.?

1) आंध्रप्रदेश ते नवी दिल्ली ☑️

2) अनंतपुर ते नवी दिल्ली

3) महाराष्ट्र ते बिहार

4) मुंबई ते पंजाब


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 2)गुपकर ठराव हा कोणत्या राज्याशी संबधित आहे.?

1) हिमाचल प्रदेश

2) जम्मू काश्मीर ☑️

3) राजस्थान

4) गुजरात


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 3)इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र कोणत्या ठिकाणी आहे.?

1) मुंबई

2) भोपाळ

3) नवी दिल्ली ☑️

4) लखनौ


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


4)कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख वापरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे.?

1) डेन्मार्क

2) अमेरिका

3) थायलंड

4) सिंगापूर ☑️


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 5)नुकतेच निधन झालेले महेश कनोडीया हे कोणत्या भाषेतील गायक आहेत.?

1) गुजराती ☑️

2) हिंदी

3) तमिळ

4) भोजपुरी


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


6) एंडोरा हा देश आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा कितवा सदस्य देश बनला आहे.?

1) 189 वा

2) 190 वा ☑️

3) 191 वा

4) 192 वा


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


7)सुशील कुमार सिंघल यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.?

1) व्हिएन्ना

2) झेक गणराज्य

3) सोलोमन ☑️

4) ऑस्ट्रिया


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 8)2020-21 मध्ये पंतप्रधान ग्राम सडक  योजनेच्या अमंलबजावणीत कोणता जिल्हा सर्वोत्तम ठरला आहे.?

1) रायपुर

2) नर्मदा

3) वर्धा

4) मंडी 


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


9) साद हरिरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे.?

1) लेबनान ☑️

2) सायबेरिया

3) सीरिया

4) कुवेत


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


10)कोणी भारतातील प्रथम क्रमांकाचे उच्च दर्जाचे खादी वैश्विक फुटवेअर सुरू केले आहे.?

1) स्मुर्ति ईराणी

2) नितीन गडकरी ☑️

3) पियूष गोयल

4) राजनाथ सिंह


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 11)लंडन येथील रेम्बो चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या त्रिज्या या चित्रपटाच्या दिग्दर्शक कोण आहेत.?

1) अक्षय इंडीकर ☑️

2) आदित्य सरपोतदार

3) रवी जाधव

4) सुरेश संबाल


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


12)जोगिंदर युद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे.?

1) नथुला (सिक्कीम)

2) बुमला (अरुणाचल प्रदेश) ☑️

3) जोजीला (जम्मू काश्मीर)

4) रोहताग (हिमाचल प्रदेश)


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


13) दारिद्र्य रेषेखालील मुलींशी संबधित असलेली भाग्यलक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याशी संबधित आहे.?

1) ओडिसा

2) गुजरात

3) कर्नाटक ☑️

4) महाराष्ट्र


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


 14)लेऑन ल्युक मेंडीसा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.?

1) हॉकी 

2) धावपटू 

3) नेमबाजी

4) बुध्दिबळ ☑️


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅 


15) नियोजन आयोगाने शिक्षण प्रणालीतील सुधारणांचा शोध घेण्यासाठी  स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत.?

1) राजीव कुमार ☑️

2) मनोज सिन्हा

3) अजय संचेती

4) अवनिश कुमार


🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅


पंकज अडवाणी या  बिलियर्ड्सपटूने आतापर्यंत आय.बी.एस.एफ.चँम्पियनशिप किती वेळा जिंकली आहे ?

  *उत्तर*   २२ वेळा

  


महान्यायवादी यांच्याविषयी संपूर्ण माहिती


 👉कद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 76 नुसारच एक महान्यायवादयाचे पद निर्माण केलेले आहे.

👉हा महान्यायवादी भारत सरकारचा वकील म्हणून देखील काम करतो.

👉या महान्यायवादयाला अनेक वैधानिक स्वरूपाची कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे महान्यायवादयाला प्रथम कायदा अधिकारी तसेच हे पद राजकीय स्वरूपाचे म्हणून ओळखले जाते.


🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

अशा महान्यायवादयाची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते.

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸


🔸- 1 ) नेमणूक

* महान्यायवादयाची नेमणूक देशाचे राष्ट्रपती करतात.

* महान्यायवादयाला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीसमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

* राष्ट्रपतीच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महान्यायवादी पदासाठी केली जाते.


🔸- 2 ) पात्रता


* भारतीय घटना कलम 76 नुसार महान्यायवादी पदावर नियुक्ती होणार्‍या व्यक्तीच्या अंगी पुढील पात्रता आवश्यक आहे.

* ती व्यक्ति भारताचा नागरिक असावी.

* त्याचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

* त्यांनी देशाच्या उच्च न्यायालयात 5 वर्षे न्यायाधीश म्हणून/उच्च न्यायालयात 10 वर्षे वकील म्हणून काम केलेले असावे.

* संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.

* सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पात्रता त्याच्या अंगी असाव्यात.


🔸- 3 ) कार्यकाल


* भारतीय राज्यघटनेत महान्यायवादयाचा तसा कार्यकाल ठरविलेला नाही.

* परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महान्यायवादी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले रती महान्यायवादी मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.

* याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करतात.


🔸- 4 ) वेतन व भत्ते


* महान्यायवादयाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवास्थान मोफत दिले जाते.

* शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.

* एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेवह्या मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

* महान्यायवादयाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते.

* निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्ती वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.


🔸- 5 ) अधिकार व कार्ये

* राष्ट्रपतीने मागितलेल्या कायदेशीर बाबीच्या बाबतीत सल्ला देणे.

* केंद्र सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.

* संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.

* महान्यायवादयाला खाजगी वकिली देखील करता येते. परंतु एखाद्या खटल्यामध्ये एक पक्ष केंद्र सरकारचा असेल तर केंद्र सरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.

* योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.


केशवानंद भारती खटला :- संपुर्ण नक्की वाचा...

🔘 राज्यशास्त्र Imp घटक


🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला. 


🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते. 


🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले. 


🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे? 


🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले. 


🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.* 


🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले. 


🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले. 


🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की 

' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.


🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.


🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्‍लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं. 


🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं. 


🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्‍लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*

मूलभूत अधिकार/हक्क :


🔰भारतीय राज्यघटनेच्या तिसर्‍या प्रकरणात 14 ते 35 या कलमामध्ये मूलभूत हक्काविषयी माहिती आहे.


❤️घटनेनुसार नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरूवातीस 7 होते मात्र 44 व्या घटना दुरूस्ती (1978) नुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करून तो कायदेशीर अधिकार केला आहे.


🔰महणून सध्या 6 अधिकार आहेत.

❤️1. समतेचा अधिकार = कलम 14 ते 18.

🔰2. स्वातंत्र्याचा अधिकार = कलम 19 ते 22.

❤️3. शोषणाविरुद्धचा अधिकार = कलम 23 ते 24.

🔰4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार = कलम 25 ते 28.

❤️5. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार = कलम 29-30.

🔰6. न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार – कलम 32 .


राज्यसेवा प्रश्नसंच

Ques. आगराच्या जामा मस्जिदिचे निर्माण कोणी केले आहे? 

A. अकबर ने

B. शाहजांह ने

C. जहाँआरा ने ✅

D. जहांगीर ने


 Ques. कोणत्या शिख गुरुने फारसी भाषेत जफरनामा लिहला आहे? 

A. यापैकी कोणीच नाही

B. गुरू नानक

C. गुरू अंगद देव 

D. गुरु गोविंद सिंह✅



 Ques. गुरु नानक चा जीवन परिचय कोणत्या शिख गुरु ने लिहला आहे? 

A. गुरू तेग बहादुर सिंह ने

B. गुरू अंगद देव ने

C. गुरु अर्जुन देव ने ✅

D. गुरू गोविंद सिंह ने


 Ques. औरंगजेब च्या शाशन काळात बंगाल चा नवाब कोण होता? 

A. मुर्शीद कुली खाँ   ✅

B. मंसुर अली खान

C. मीर कासीम

D. अलवर्दी खान


१) भारतीय राज्यघटनेत नमुद मुलभूत कर्तव्यामध्ये नमुद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानांमधील काही शब्द विशेषत्वाने नमुद नाहीत ते जादाचे नमुद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधाने आहेत ?

अ) राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व देशातील कायद्याचा आदर करणे.

ब) स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणा-या प्रथांचा त्याग करणे

क) सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे.

ड) आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करणे.

   1) अ, क 

   2) ब    

   3) ड   

   4) सर्व 


उत्तर :- 4


२) मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मुलभूत कर्तव्ये .................... च्या अपेक्षा आहेत.

1) मंत्रीमंडळ    

2) जनता      

3) प्रतिनिधी    

4) सर्वोच्च न्यायालय


उत्तर :- 2


३) योग्य क्रम निवडा.

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे

ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे

ड) संविधानाचा सन्मान करणे


1) अ, ड, क, ब    

2) ड, अ, क, ब    

3) ड, ब, अ, क    

4) ड, अ, ब, क



उत्तर :- 2


४) खालीलपैकी भारतीय नागरिकाचे कोणते मुलभूत कर्तव्य नाही  ?


1) देशाचे संरक्षण करणे                

2) नियमित कर भरणे 

3) सहा ते 14 वर्षा दरम्यानचे अपत्य किंवा पाल्य यास शिक्षणाच्या संधी देणे

4) एकही नाही


उत्तर :- 2


५) राज्यघटनेत मुलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ?

अ) जेव्हा राज्यघटना सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.

ब) राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.

क) ही कर्तव्ये मुलभूत हक्कांना पूरक आहेत.

ड) समावेशनामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकामध्ये नागरी जाणीव विकसित होईल.

 वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?


1) अ      

2) ब, क     

3) अ, ब, क

 4) सर्व


उत्तर :- 4



६) कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला ?

1) 45 वी घटना दुरुस्ती      

2) 46 वी घटना दुरुस्ती

3) 42 वी घटना दुरुस्ती      

4) 44 वी घटना दुरुस्ती


उत्तर :- 3


७) भारतीय राज्यघटनेचे कलम ‘51अ’ कशा संबंधी आहे ?

1) मूलभूत कर्तव्ये    

2) मूलभूत हक्क    

3) मार्गदर्शक तत्त्वे    

4) राष्ट्रपती


उत्तर :- 1


८) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश ........................ च्या शिफारशीवरून करण्यात आला.

1) वल्लभभाई पटेल समिती  

2) कृपलानी समिती  

3) सरकारिया आयोग  

4) स्वर्ण सिंग समिती


उत्तर :- 4


९) भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे ?

1) फ्रान्स      

2) यु.एस.ए.    

3) यु.एस.एस.आर    

4) यु.के.


उत्तर :- 3


१०) मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.

अ) मूलभूत कर्तव्ये नागरिकांना शिक्षित करण्याची भूमिका बजावतात.

ब) हक्क कर्तव्यांसोबत निगडित असलेच पाहिजेत.

क) कर्तव्ये स्वत:हून लागू होत नाहीत.

ड) अशा प्रकारची कर्तव्ये साधारणत: पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात.

         वरीलपैकी कोणते विधान / विधाने चुकीची आहेत ?


1) अ, क      

2) ब, ड      

3) ब, क, ड    

4) ड


उत्तर :- 4


१) इन्टरनॅशनल युनियन फॉर द काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस तर्फे सादर झालेल्या वर्ल्ड काँझर्वेशन स्ट्रॅटेजीत 

     ब्रंटलँडच्या अहवालात सन 1980 मध्ये चिरंतन विकास ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली त्या अहवालाचे शीर्षक काय होते ?

 

   1) आपले उत्तम भवितव्य   

   2) आपले अंधारलेले भवितव्य

   3) आपले सामुदायिक भवितव्य   

   4) आपले असाधारण भवितव्य


उत्तर :- 3


२) आंतरराष्ट्रीय विकास संस्था ............................... करते.

   अ) ग्रामीण पायाभूत सुविधासाठी वित्तपुरवठा 

   ब) ठिबक सिंचनासाठी वित्तपुरवठा

   क) बाजारपेठ सुविधांसाठी वित्तपुरवठा    

   ड) निर्यातीकरिता वित्तपुरवठा


  1) अ, क   

  2) अ, ब आणि क     

  3) अ, ड    

  4) ब 


उत्तर :- 1


३) BPO सेवा या ....................... सेवांच्या उपघटक आहेत.


   1) व्यापारी    

    2) संगणक उत्पादन    

   3) माहिती व तंत्रज्ञान संबंधित  

   4) संशोधन व अभियांत्रिकी


उत्तर :- 3


४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यांमधील संबंध दर्शविणा-या प्रमेयाचे नाव काय ?

   1) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक 

   2) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक

   3) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक     

   4) पर्यावरणीय कुझनेट्स वक्र गृहितक


उत्तर :- 4


५) स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय ?

   1) स्त्रियांची सामाजिक – आर्थिक स्थिती सुधारणे.   

   2) स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारणे.

   3) स्त्रियांना रोजगारसंधी पुरविणे. 

   4) स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविणे.


उत्तर :- 1


६) निरंतर विकास ही संकल्पना प्रथम कुठे मांडण्यात आली ?

   1) वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रेटेजी   

   2) रियो वसुंधरा परिषद

   3) क्वेटो परिषद   

   4) वरीलपैकी  नाही


उत्तर :- 1


७) 2000 साली स्वीकारलेल्या सहस्त्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे :

   अ) दारिद्रय आणि उपासमारीचे निर्मूलन.    

   ब) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण.

   क) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल.  

  ड) पर्यावरण निरंतता


   1) अ फक्त  

  2) अ, ब, ड   

  3) क फक्त  

  4) वरील सर्व


उत्तर :- 2


८) चलन संख्यामान सिध्दांतातील समीकरण :

     MV = PT ........................... म्हणून संबोधले जाते.


   1) रॉबर्टचे समीकरण  

  2) मार्शलचे समीकरण

  3) केनेसियनचे समीकरण    

  4) फिशरचे समीकरण


उत्तर :- 3


९) प्राथमिक सहकारी पतसंस्थांना खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक असते :

   अ) त्या त्या खेडयातील रहिवासी असणारे किमान दहा किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य आवश्यक असतात.

   ब) या पतसंस्थांचे खेळते भांडवल हे सदस्यांकडून आकारलेले शुल्क किंवा ठेवींच्या स्वरूपात असावे.

   क) या पतसंस्था शेतक-यांना सवलतीच्या दरात कर्ज देतात.    

   ड) या पतसंस्था फक्त लहान शेतक-यांना कर्ज देतात.


   1) अ, ड    

  2) ब, क व ड  

  3) अ, ब व क   

  4) वरील सर्व


उत्तर :- 1


१०) भारताच्या बी.पी.ओ. सेवांचे दोन मुख्य ग्राहक ............................. आहेत.

अ) अमेरिका   ब) जपान      क) जर्मनी    ड) पश्चिम युरोप

   1) अ आणि ड  

  2) अ आणि क    

   3) ब आणि ड  

  4) क आणि ड


उत्तर :- 3


१) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?

   1) एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी : अनुच्छेद – 26 कर देण्याचे स्वातंत्र्य

   2) धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे : अनुच्छेद – 27 स्वातंत्र्य

   3) ठराविक शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक : अनुच्छेद – 28 शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य

   4) शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा : अनुच्छेद – 29 आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क


उत्तर :- 3


२) ‘कायद्यापुढील समानता’ (Equality before Law) हा नियम अनिर्बंध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद 

     आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

   अ) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

   ब) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुध्द त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

   क) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत.

   ड) अनुच्छेद 31 – C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

   1) अ, ब आणि क   

   2) ब, क आणि ड   

   3) अ, ब, क आणि ड 

   4) अ, ब आणि ड


उत्तर :- 4


१९८३) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे ?

   1) तिस-या भागात   

   2) पहिल्या भागात  

   3) चौथ्या भागात   

   4) दुस-या भागात

उत्तर :- 3


१९८४) भारत सरकार अधिनियम, 1935 मधील ‘सूचनापत्राचा’ समावेश 1950 च्या भारतीय संविधानात कसा केला आहे ?

   1) मूलभूत हक्क    

  2) मार्गदर्शक तत्त्वे  

  3) मूलभूत कर्तव्ये   

  4) केंद्र सूची

उत्तर  :- 2


५) भारतीय राज्यघटनेच्या IV थ्या विभागात 42 व्या घटनादुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणती उपकलमे समाविष्ट करण्यात आली?

   अ) कलम 39 – समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सहाय्य

   ब) कलम 43 – उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग

   क) कलम 48 – पर्यावरणात सुधारणा आणि जंगले व वन्यजीव यांचे संरक्षण

 1) फक्त अ    

2) फक्त ब आणि क   

3) फक्त अ आणि क    

4) वरील सर्व


उत्तर :- ४



६) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 23 मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.

   ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना संविधानाच्या कलम 34 खाली ते दूर करण्यास्तव हक्क असेल.

   1) अ  

    2) ब   

   3) दोन्ही    

  4) एकही नाही


उत्तर :- 4


७) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावरील मर्यादा आहेत :

   अ) देशाची सुरक्षा  

   ब) न्यायालयांचा अवमान

   क) बदनामी     

   ड) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता


   1) फक्त अ, ब, क  

   2) फक्त अ, क, ड 

   3) फक्त अ, ब, ड 

   4) वरील सर्व


उत्तर :- 4


८) कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनु. जाती / जमाती आणि इतर मागास वर्गासाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत 

1) 92 व्या   

2) 93 व्या    

3) 94 व्या  

4) 95 व्या


उत्तर :- 2


९) स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश ................. व्या घटनादुरुस्तीने  करण्यात आला.

   1) 97   

   2) 96    

  3) 95     

  4) 94

उत्तर :- 1


१०) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) ‘राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल’ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

 ब) ‘जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या आपल्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या  वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे’ हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.

   क) ‘राज्य हे बालकांचे  वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील’ हे मार्गदर्शक तत्त्व आहे.

          वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ?


   1) अ आणि ब    

  2) ब आणि क   

  3) अ आणि क  

  4) वरील सर्व


उत्तर :- 4



१) केंद्राकडून राज्यांना होणारे वाढते साधनसामग्री हस्तांतर ........................... दर्शवते.


   अ) राज्य व केंद्र यामध्ये वाढते एकत्रीकरण   

   ब) राज्याचे केंद्रावर असहाय्य अवलंबन

   क) राज्यांनी महसुल उभारणीत केलेले दुर्लक्ष

   1) अ, ब आणि क 

   2) अ आणि ब    

   3) ब आणि क   

   4) फक्त क


उत्तर :- 2


२) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक या शिखर संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली :

   1) कृषी पुनर्रचीत पतपुरवठा विकास मंडळाचा (ARDC) पतपुरवठयातील सहभाग कार्यक्षम नव्हता.

   2) राष्ट्रीय सहकारी विकास मंडळास (NRDC) निर्धारित उद्देश साध्य करता आले नाहीत.

   3) कृषी पतपुरवठा विभाग(ACD)   वाढीवर मागणीनुसार पुरवठा करण्यास असमर्थ होता.

   4) वरीलपैकी नाही.    

उत्तर :- 1


३) देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्याही समितीला करावे लागते ?


   अ) लोकलेखा समिती     

   ब) अंदाज समिती    

   क) सार्वजनिक उद्योग समिती    

   ड) वरील सर्व

   वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहे ?

   1) फक्त अ   

  2) अ आणि ब फक्त  

  3) ब आणि क फक्त   

  4) ड फक्त


उत्तर :- 4


४) मानव विकास निर्देशकांचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढीलपैकी कोणते  ?

   1) जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान प्रौढ साक्षरता दर – स्थूलशिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन

   2) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणातील खर्च

   3)दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या, दारिद्रय रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था.

   4) सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न

उत्तर :- 1


५) उच्च शक्ती पैसा म्हणजे काय ?

   अ) मध्यवर्ती बँकेकडील बँकाचा राखीव निधी    

   ब) बँकांची सर्व कर्जे आणि उचल

   क) बँकांनी धारण केलेला पैसा        

   ड) लोकांच्या हातातील पैसा आणि मध्यवर्ती बँकेकडील राखीव निधी, बँकाकडील अतिरीक्त राखीव निधी. 


   1) अ आणि ब  

  2) ब फक्त   

  3) क आणि ड    

  4) ड फक्त


उत्तर :- 4


६) सहकारी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?

   1) उद्योगांना वित्तीय मदत पुरविणे.     

   2) आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या कल्याणाचे महत्तीकरण करणे.

   3) शेतीला पतपुरवठा करणे.   

   4) ग्राहकांचे हितसंबंध जोपासणे.


उत्तर :- 2


७) खालीलपैकी कोणते सार्कचे उद्दिष्ट नाही ?

   1) दक्षिण पूर्व आशियातील लोकांच्या कल्याणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या राहणीमानाच्या गुणवत्तेत वाढ करणे.

   2) प्रदेशातील आर्थिक व सामाजिक वृध्दी आणि सांस्कृतिक विकासाला गती देणे.

   3) दक्षिण आशियातील देशांच्या एकत्रित स्वावलंबनास प्रोत्साहन देणे व आणखी मजबूत बनविणे.

   4) एकमेकांचा परस्पर विश्वास, समज आणि अधिमूल्यनात भर घालणे.


उत्तर :- 1


२०८८) जननी सुरक्षा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?

   1) प्रसुतीकाळातील मृत्यू आणि नवजात बालकांचे मृत्यू रोखणे.    

   2) जन्मदर कमी करणे.

   3) मातांची काळजी घेणे.         

   4) नवजात बालकांचे मृत्यूदर रोखणे.


उत्तर :- 1


९) 1980 च्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय होते ?

   1) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी बीज भांडवलाचा पुरवठा करणे.

   2) ग्रामीण युवकांना स्वयम रोजगारासाठी प्रशिक्षणाच्या सुविधा पुरविणे.

   3) ग्रामीण भागातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी पुरविणे.

   4) सुशिक्षित बेरोजगारांना तांत्रिक मदत करणे.


उत्तर :- 3


१०) 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीवरून साक्ष्ररतेच्या प्रमाणानुसार पुढील जिल्ह्यांचा क्रम लावा.

   अ) नागपूर  

   ब) मुंबई शहर    

  क) मुंबई उपनगर   

  ड) अकोला


  1) अ, ब, ड, क    

 2) क, अ, ब, ड   

 3) ब, क, ड, अ   

 4) ब, क, अ, ड


उत्तर :- 2


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿


इतिहास प्रश्नसंच

१. युरोपियन सत्तांनी भारतात स्थापन केलेल्या पहिल्या वाखारींसंदर्भात योग्य जोड्या जुळवा.

अ) पोर्तुगीज             १) कोची
ब) डच                      २) मछलीपट्टनम
क) ब्रिटीश                ३) सुरत
ड) डेन्स                    ४) चिंचोसा

        अ   ब   क   ड
   A.  ३   ४   २   १
   B.  ४   २   ३   १
   C.  १   २   ३   ४ ✔
   D.  २   १   ३   ४

२. १८१३ च्या सनदी कायद्यानुसार खालीलपैकी कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) कंपनीचा भारतातल्या व्यापाराचा एकाधिकार समाप्त केला.
ब) ख्रिश्चन मिशानरींना भारतात धर्मप्रसार करण्याची परवानगी देण्यात आली.
क) दरवर्षी १ लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली.
ड) भारतासाठी बिशप व कंपनीच्या इतर तीन प्रांतांसाठी आर्चबिशपची नेमणूक करण्यात आली.

   A. अ केवळ
   B. अ आणि ब
   C. अ ब आणि क
   D. वरील सर्व ✔

३. खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार नियामक मंडळाची (Board of Control) स्थापना करण्यात आली ?

   A. नियामक कायदा १८७३
   B. पिट्स इंडिया कायदा ✔
   C. सनदी कायदा १८१३
   D. सनदी कायदा १८३३

४. वॉरेन हेस्टींग्जसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या.

अ) 'कलेक्टर' या पदाची निर्मिती केली.
ब) दुहेरी शासनव्यवस्था लागू केली.
क) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.
ड) चार्ल्स विल्किंस च्या गीतेच्या इंग्रजी अनुवादाला प्रस्तावना लिहिली.

   A. ब बरोबर
   B. ब,क आणि ड बरोबर
   C. क आणि ड बरोबर
   D. अ,क आणि ड बरोबर ✔

५. १८०२ रोजी 'वसई' येथे झालेल्या तहात दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता ?

   A. वॉरेन हेस्टींग्ज
   B. वेलस्ली ✔
   C. डलहौसी
   D. कॉर्नवॉलिस

६. आपण श्रीकृष्णाचे अवतार आहोत असे जाहीर करणाऱ्या कोणत्या व्यक्तीने पंजाबमध्ये 'अहमदिया' आंदोलन सुरु केले ?

   A. सर सय्यद अहमदखान
   B. लियाकत अली
   C. खाफार खान
   D. मिर्झा गुलाम अहमद ✔

७. खालीलपैकी कोणाच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा(ब्रिटीश) व रानटीपणा यांमधील झगडा होता ?

   A. व्ही. ए. स्मिथ
   B. सर जॉन लॉरेन्स
   C. टी. आर. होल्म्स ✔
   D. सायमन फ्रेजर

८.
अ) गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म १८५६ मध्ये टेंभू(कराड) येथे झाला.
ब) १८८८ मध्ये सुधारक हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरु केले.
क) कर्वे प्रकरणामध्ये आगरकर व टिळक यांना १०१ दिवस तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

   A. फक्त अ
   B. अ आणि ब ✔
   C. वरीलपैकी एकही नाही
   D. वरील सर्व

९. खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या 'गायदिन लियू' यांना 'राणी' हि पदवी देऊन सन्मानित केले ?

   A. सुभाषचंद्र बोस
   B. महात्मा गांधी
   C. पंडित नेहरू ✔
   D. सरदार पटेल

१०) 'इंडिया डिव्हायडेड' या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?

   A. स्वातंत्र्यवीर सावरकर
   B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
   C. डॉ. राजेंद्रप्रसाद ✔
   D. सर सय्यद अहमदखान

११. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या काराघृहात ठेवले होते ?

   A. ठाणे
   B. अंदमान
   C. मंडाले
   D. एडन ✔

१२. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती ?

अ) ज्ञान प्रसारक मंडळी
ब) बॉम्बे असोशिएशन
क) लंडन इंडियन असोशिएशन
ड) ईस्ट इंडिया असोशिएशन

   A. अ,ब आणि क फक्त
   B. ब,क आणि ड फक्त
   C. अ,ब आणि ड फक्त
   D. अ,ब,क आणि ड ✔

१३.भारतात रेल्वे चे जाळे उभारण्या करिता लोर्ड डलहौसीने नियोजन केले कारण

अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी
ब) ब्रिटीश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमाविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी
क) भारतात सहज व स्वस्त वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त ✔
   C. ब आणि क फक्त
   D. अ,ब आणि क

१४. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्या साठी प्रयत्न का केला ?

अ) ते विचाराने उदारमतवादी होते
ब) त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती
क) त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवे, असे वाटत होते
ड) त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते

   A. अ आणि ब फक्त
   B. अ आणि क फक्त
   C. अ,ब आणि क
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य आहेत ✔

१५. भारतातला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रीतीशांच्या धोरणात बदल झाला कराण -

अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर
ब) भारतात राष्ट्रावादास आलेले उधाण
क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम

   A. अ आणि ब फक्त
   B. बआणि क फक्त
   C. अ आणि क फक्त
   D. अ,ब, आणि क ✔

१६. खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात ई.स. १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परम हंस’ मंडळीचा भर होता ?

अ) जातीबंधाने तोडणे
ब) विधवा पुनर्विवाह
क) स्त्री शिक्षण
ड) मूर्तीपूजा बंदी

   A. अ फक्त
   B. अ आणि ब फक्त
   C. अ,ब आणि क फक्त
   D. वरील तिन्ही पर्याय अयोग्य ✔

१७. हिंदुस्तान सरकारच्या १९३५ कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांनी तयार केली ?

अ) मुडीमन समिती आणि तिचा अहवाल
ब) सायमन कमिशन
क) नेहरू रीपोर्ट
ड) बॅरीस्टर जिन्नांचे १४ मुद्दे

   A. अ,ब आणि क
   B. ब,क आणि ड
   C. अ,ब आणि ड
   D. अ,ब,क आणि ड ✔

१८. १९०६ च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष पदावरून बोलताना दादाभाई नौरोजी यांनी ‘स्वराज्य’ शब्द उघडपणे वापरला आणि ह्या अधिवेशनात

अ) राष्ट्रगीत म्हणून ‘वंदेमातरम्’ पहिल्यांदाच गायले गेले
ब) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला
क) मवाळ मार्ग चा स्वीकार करण्यात आला
ड) बॅरीस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले

   A. अ आणि ब
   B. क आणि ड
   C. ब आणि क ✔
   D. अ आणि ड

१९. अयोग्य जोडी निवडा

   A. श्रीधरलू नायडू - वेद समाज
   B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
   C. रवींद्रनाथ टागोर – तत्वबोधिनी सभा ✔
   D. शिवनारायण अग्निहोत्री – देव समाज

२०. अस्पृश्यांना ‘लष्करात व पोलिसात’ नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवड च्या सभेत कोणी मागणी केली ?

अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बि.सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर

   A. अ फक्त ✔
   B. ब फक्त
   C. क आणि ड
   D. ड फक्त

२१. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
   A. नीळ
   B. भात फक्त
   C. गहू फक्त
   D. भात व गहू ✔

२२. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या ?

अ) पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय.
ब) भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे पर्यंत खाली आणणे.
क) लॉंर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी.

   A. अ आणि ब ✔
   B. ब आणि क
   C. अ आणि क
   D. अ,ब आणि क

२३. पुढील कोणत्या सामाजिक-धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत ?

   A. परमहंस मंडळी व रहनुमाई मझ्द्दासान सभा
   B. प्रार्थना समाज व आर्य समाज
   C. इंडियन सोशल कॉन्फरन्स व सोशल सर्विस लीग
   D. वरील तीन्हीतील कोणताही पर्याय योग्य नाही ✔

२४. ‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

   A. जगन्नाथ शंकर शेठ
   B. बाळशास्त्री जांभेकर ✔
   C. भाऊ दाजी लाड
   D. छत्रपती शाहूमहाराज

अलिगड मुस्लीम आंदोलन


🔹अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

🔸आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

🔹तयांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले

🔸सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत

🔹यथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !



📚 आन्दोलनाचेे इतर नेते 📚

🔸दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली। 

🔹कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

🔸 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

🔹सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता👇

🔺नजीर अहमद चिराग 

🔺अली अल्ताफ 

🔺हसैन मौलाना 

🔺शिबली नोमानी


अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर👇


1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता. 

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे. 

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता. 

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले. 

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला. 

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला. 

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

 8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला. 

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.


पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला. 


10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती


**बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे विषयी माहिती

सर्वपक्षीय सभेत नेहरू रिपोर्टवर एकमत झाले तरी ते दिखाऊ होते. कारण मूस्लीम लीगचा विरोध मूलभूत स्वरूपाचा व जातीय होता. लीगमधील मुस्लिमांना हा रिपोर्ट मान्य नव्हताच; म्हणून त्याचा फेरविचार करण्यासाठी आगाखानांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 1928 मध्ये मुस्लीम लीगचे दिली येथे खास अधिवेशन भरविण्यात आले.

बॅ. जीना या परिषदेला हजर राहिले. त्यांना सर्वपक्षीय सभेत मोठा विरोध झाला होता. त्यामुळे ते नाराज झाले होते.
लीगच्या अधिवेशनात त्यांनी आपले राजकीय तत्वज्ञान त्यांच्या प्रसिद्ध ‘चौदा मुद्यात’ सांगितले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बॅ. जीनांचे चौदा मुद्दे:
भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.
सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.
पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.
मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.
राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत..

मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मूलभूत अधिकाराचा विकास

जगामध्ये सर्वप्रथम इसवी सन 1215 मध्य ब्रिटेन इथे चर्च चे अधिकार सामान्य लोकांनी मागितले ज्याला मॅग्ना कार्टा असे म्हणतात. इथूनच मूलभूत अधिकारांचे विकास मानले जाते. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये


समता (Equality)

स्वातंत्र्य (Freedom)

बंधुत्व

यांचा विकास झाला.


1931 मध्ये कराचीमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभ भाई पटेल अध्यक्ष होते. यांनी सर्वप्रथम काँग्रेसच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांची मागणी केली. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक नेता एम एन रॉय यांनी मूलभूत अधिकारांची मागणी केली होती.


M. N. Roy हे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मूलभूत अधिकार भारतीय संविधानामध्ये टाकण्यात आले व मुलभूत अधिकारांसाठी संविधान परिषदेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली या विषयाची मार्गदर्शक समिती नियुक्त करण्यात आली.


व या समितीच्या शिफारशींच्या अनुसार भारतीय संविधानाच्या भाग-3 मध्ये कलम 12 ते 35 च्या दरम्यान 7 मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आला.


1) समतेचा अधिकार ( कलम 14 ते 18)


2) स्वातंत्र्याचा अधिकार ( कलम 19 ते 22)


3) शोषणाविरुद्धचा अधिकार ( कलम 23 ते 24)


4) धार्मिक स्वातंत्र्य ( कलम 25 ते 28)


5) शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार ( कलम 29 ते 30)


6) संपत्तीचा अधिकार


7) संविधानिक उपचाराचा अधिकार (कलम 32 ते 35)


असे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आले परंतु 44 वी घटना दुरुस्ती 1978 अनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला 1978 मध्ये मोरारजी देसाईंची सरकार आली होती त्यांनी निवडून येताच  संपत्तीचा अधिकार डिलीट केला.


संपत्तीच्या अधिकाराला कलम  300A अनुसार कायदेविषयक अधिकार बनवण्यात आले.


कलम 12:- यानुसार राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे कारण मूलभूत अधिकार राज्यच त्या राज्याच्या नागरिकांना देते व या अधिकारांवर नियंत्रणही राज्यच ठेवते.  इथे राज्य म्हणजे भारत.


कलम 13:-  न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार यामध्ये देण्यात आलेला आहे.


आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये

🔻- लक्षणे 


१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.


२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.

उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.


३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे  आदिवासी समुह आहेत.


४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.


५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.


६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.


७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.


८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.


९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.

=========

आदिवासी समुह वैशिष्ट्य


१) विशिष्ट भूप्रदेश

   एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते. 

उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि. 

कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात. 


२) समूहाचा आकार

   आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.


३) रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह

   आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात. 


४)  विवाहपद्धती 

   विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.


५)  कुटुंबपद्धती 

   या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.


६)  आर्थिक स्थिती 

   आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात. 

उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.


७)   धर्म व जादूचा प्रभाव 

   आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.


८)  शिक्षण व मनोरंजनाची साधने 

   दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नकला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.


९)  स्त्रियांचा दर्जा

   आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.


१०)  जीवनपद्धती

   आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.

============================================



सहकाराची तत्वे.


🅾️इ.स. 1895 मध्ये जिनिव्हा (स्वित्झरलँड) येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघाची (International Co-operative Alliance - ICA) स्थापना झाली.

 ICA ने 1937 मध्ये सहकारी तत्वांची तपासणी करून पद्धतशीर मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली.

 सहकारी संस्थांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी वापरलेले मार्गदर्शक तत्व म्हणजे सहकारी तत्व होय.

 मात्र, या समितीने ठरविलेल्या तत्वांवर एकमत न झाल्याने ICA ने 1963 मध्ये सहकार तत्वाचे मूल्यांकन व फेरतपासणी करण्यासाठी भारतातील जागतिक किर्तीचे सहकार तत्वज्ञ प्रा.डि.जी. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नियुक्त केली.


🅾️ तसेच या समितीच्या 1966 च्या अहवालात पुढील सहकाराची तत्वे देण्यात आली आहेत.


1. मूलभूत तत्वे -

🅾️ऐच्छिक सभासदत्वलोकशाही संघटनगुंतविलेल्या पुंजीवर व्याजधारण केलेल्या भागांच्या प्रमाणात लाभांश वाटपसभासद शिक्षणसहकारी संस्थातील सहकार्य


2. सामान्य तत्वे -

🅾️रोखीने व्यवहारराजकीय व धार्मिक अलिप्तता - हे तत्व मात्र अव्यवहार्य वाटल्याने वगळण्यात आले.काटकसरस्वावलंबन व परस्पर मदबसेवा भाव


🧩सहकारी संस्थांचे प्रकार -

🅾️सहकारी संस्थांचे प्रमुख चार वर्ग पडतात.


1. कृषी पतसंस्था (Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️भारतात राज्यांमधील कृषी पतसंस्था रचना त्रिस्तरीय आहे.

🅾️गरामीण स्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था.जिल्हा स्तरावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.राज्य स्तरावरील राज्य सहकारी बँक (शिखर बँक).तसेच दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यार्‍या भू-विकास बँका राज्य व जिल्हा स्तरावर कार्य करतात.


2. बिगर कृषी पतसंस्था (Non-Agricultural Credit Co-Operatives) -

🅾️नागरी सहकारी बँकापगारदार नोकरांच्या पतसंस्थाप्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्था इ.


3. कृषी बिगर पतसंस्था (Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी साखर कारखाने, खांडसरी उद्योगसहकारी सूत गिरण्यासहकारी दूध उत्पादक संस्थासहकारी तेलप्रक्रिया संस्थाकृषी खरेदी-विक्री संघकृषी सहकारी पणन संस्थाप्राथमिक मच्छिमारी सह.संस्था. इ.


4. बिगर-कृषी-बिगर-पतसंस्था (Non-Agricaltural-Non-Credit Co-Operatives) -

🅾️सहकारी ग्राहक भांडारे.सहकारी गृहनिर्माण संस्था.पावरलुम विणकर सह. संस्था.चर्मकार सह. संस्था.कुंभार सह. संस्था इ.


13 June 2024

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक


▪️ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक

▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया

▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159

▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना 
• भारत 99 वा.

▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126

▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा

▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा

▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा

▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा

▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा

▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा

▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा

▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा

▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.

महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न – आज भारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी कोणाची निवड केली ?

उत्तर– उपेंद्र द्विवेदी - ३० वे लष्करप्रमुख

🔖 प्रश्न – नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली ?

उत्तर– अनामिका राजीव

🔖 प्रश्न – अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली ?

उत्तर– ३ कोटी

🔖 प्रश्न – इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन यामध्ये १५ पैकी किती देशांनी पाठिंबा दिला ?

उत्तर– १४

🔖 प्रश्न – हेल्ब्रॉन नेकारकप 2024 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?

उत्तर– भारतीय टेनिसपटू समिट नागपाल

🔖 प्रश्न – जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ?

उत्तर– अमेरिका

🔖 प्रश्न – १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले ?

उत्तर– रायगड

🔖 प्रश्न – भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा ने सज्ज LSAM-१३ हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रॉजेक्ट pvt LTD ने तयार केले ?

उत्तर– विशाखापट्टणम

🔖 प्रश्न – FIH हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ?

उत्तर– भारत

🔖 प्रश्न – नुकतीच जपान-भारत सागरी सराव (JIMEX)-24 ची 8 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ?

उत्तर– योकोसुका, जपान

🔖 प्रश्न – लेफ्टनंट जनरल वाकर-उझ-जमान यांची कोणत्या देशाच्या लष्करप्रमुख पदी निवड करण्यात आली ?

उत्तर– बांगलादेश

🔖 प्रश्न – महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार ?

उत्तर– राजस्थान

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ सिक्कीम चे नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाग

◾️पक्ष : सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
◾️शपथ : 10 जून 2024 ला
◾️सलग 2 वेळा ते सिक्कीम चे मुख्यमंत्री बनले
◾️सिक्कीम चे गव्हर्नर : लक्ष्मण प्रसाद आचार्य ◾️यांनी त्यांना शपथ दिली
सिक्कीम विधानसभा जागा : 32
◾️त्यापैकी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 31 जिंकल्या

❇️ RBI ने पेमेंट फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी विविध पैलू तपासण्यासाठी समिती स्थापन केली
◾️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD आणि CEO श्री. AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
❇️ SEBI ला द एशियन बँकर तर्फे 'बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर' पुरस्काराने सन्मानित
◾️हाँगकाँग येथे आयोजित समारंभात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला

❇️ संयुक्त राष्ट्र ने इजराईल देशाला काळ्या यादीत ( back list ) केलं आहे
◾️इजराईल आणि गाझा युद्धामुळे खूप लहान मुलांचा मृत्यु झाला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले
◾️त्यामुळं Black List केलं आहे
◾️Black list असलेले काही देश
⭐️हमास ,ISIS, अल कायदा या संघटना
⭐️इराक , म्यानमार , येमन, सोमालिया ,रशिया हे देश

❇️ पूजा तोमर UFC (Ultimate Fighting Championship) मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय ठरली
◾️तिने महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला.
◾️ त्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या बुढाना गावातील आहेत
◾️त्यांचं टोपण नाव The Cyclone

◾️NITI - National Institution for Transforming India
⭐️1 जानेवारी 2025 ला स्थापना
⭐️नीती आयोग अध्यक्ष : पंतप्रधान
⭐️नीती आयोग उपाध्यक्ष : श्री सुमन बेरी
⭐️नीती आयोग CEO : श्री BVR सुब्रह्मण्यम

❇️ नुकतेच झालेले काही मुख्यमंत्री लक्षात ठेवा
◾️मोहन चरण माझी : ओडीसा मुख्यमंत्री
◾️लालदुहोमा : मिझोराम मुख्यमंत्री
◾️भजनलाल शर्मा : राजयस्थान मुख्यमंत्री
◾️मध्यप्रदेश मुख्यमंत्री : मोहन यादव
◾️तेलंगणा मुख्यमंत्री : रेवंत रेड्डी

❇️ 2025 चा पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे
◾️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तशी घोषणा केली आहे
◾️अध्यक्ष : तैयब इकराम
◾️डिसेंबर 2025 ला स्पर्धा होतील
◾️2013 , 2016 ,2021 ला याचे आयोजन भारतात झाले होते

❇️ संत कवी थिरुमंगाई अलवार यांची  मूर्ती ब्रिटन मधून परत आणली जाणार आहे
◾️प्राचीन धातूची मूर्ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अश्मोलियन म्युझियममध्ये आहे
◾️ही 500 वर्षे जुनी मूर्ती आहे
◾️ह्याची उंची 60 cm आहे
◾️1967 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ मध्ये ही ठेवण्यात आली

❇️ ग्लोबल Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक आहे
◾️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला
◾️146 देशांचा अहवाल प्रसिद्ध
◾️पहिल्या 3 क्रमांकावर
1)आइसलँड
2) फिनलँड
3)नॉर्वे
◾️शेवटचा देश सुदान आहे ( 146 क्रमांक)

❇️ भारताचे नवीन आर्मी प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे बनले आहे
◾️30 व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख असतील
◾️हे सध्या लष्कर उपप्रमुख आहेत
◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून ला पदभार स्वीकारतील
◾️15 डिसेंबर 1984 ला भारतीय सेनेमध्ये सामील झाले होते

❇️ भारतीय आर्मी
◾️स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️मुख्यालय : दिल्ली
◾️सेना दिवस : 15 जानेवारी ला

🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु
◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी
◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन 
◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी
◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग
◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल
◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव
◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद
◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया
◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका
◾️RAW प्रमुख : रवी सिंह
◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते
◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन

-------------------------------------------