स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
05 November 2020
मार्लन सॅम्यूएल्सची निवृत्ती
- वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लन सॅम्यूएल्स याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
- वेस्ट इंडिजने जिंकलेल्या दोन्ही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सॅम्यूएल्सने सर्वाधिक धावा फटकावल्या होत्या.
- सॅम्यूएल्स डिसेंबर २०१८मध्ये अखेरचा सामना खेळला असून त्याने आपला निवृत्तीचा निर्णय जून महिन्यातच वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला कळवला होता. मंडळाचे अध्यक्ष जॉनी ग्रेव्ह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
- ३९ वर्षीय सॅम्यूएल्सने ७९ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ६७ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ११ हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा काढल्या असून १५० बळीही मिळवले आहेत.
- २०१२ आणि २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या अंतिम सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या होत्या.
- २०१२मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध ५६ चेंडूंत ७८ धावा फटकावल्या होत्या. चार वर्षांनंतर त्याने ६६ चेंडूंत ८५ धावांची खेळी करत विंडीजला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून दिला होता.
5 नोव्हेंबरला जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद भरणार
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) आयोजित केली जाणार आहे.
- कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी (NIIF) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
◾️ठळक बाबी
- परिषदेमध्ये जागतिक स्तरावरचे आघाडीचे संस्थात्मक गुंतवणूकदार, भारतातले मोठे व्यावसायिक आणि भारत सरकारमध्ये असलेले निर्णय घेणारे सर्वोच्च अधिकारी मंडळी आणि वित्तीय बाजार नियामक यांच्यामध्ये विशेष संवाद साधला जाणार आहे.
- जागतिक गुंतवणूकदारांव्यतिरिक्त परिषदेमध्ये भारतामधले प्रमुख व्यावसायिक, उद्योजकही सहभागी होणार आहेत.
- परिषदेत जगामध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेले वीस ‘पेन्शन’ आणि ‘वेल्थ फंड’चे संबंधित प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
- या निधींच्यामार्फत जवळपास 6 लक्ष कोटी अमेरिकी डॉलर एवढ्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते.
- जागतिक निधी संस्थांचे कार्य आणि गुंतवणूकदार अमेरिका, युरोप, कॅनडा, कोरिया, जपान, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहेत.
- परिषदेत भारताची अर्थव्यवस्था आणि गुंतवणूकीविषयीचा दृष्टीकोन, संरचनात्मक सुधारणा आणि भारताची अर्थव्यवस्था 5 लक्ष कोटी रुपयांपर्यंत नेण्यासाठी सरकार कशा पद्धतीने कार्य करीत आहे, यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
जागतिक भूक निर्देशांक २०२०
जागतिक भूक निर्देशांक २०२० अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ क्रमांकावर होता.
याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसंच 'वेल्ट हंगर हिल्फी' ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहे. २०१८ मध्ये ११९ देशांच्या यादीत भारत १०३ क्रमांकावर होता.
कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.
जगभरातील स्थिती मध्यम असल्याचा उल्लेख जागतिक भूक निर्देशांकात करण्यात आला असून जगभरातील ६० कोटींहून अधिक लोक कुपोषित असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
देशातील भुकेच्या स्थितीवरून देशांना ० ते १०० असे गुण दिले जातात. त्यानुसार त्यांची क्रमवारी ठरवली जाते. यामध्ये ० गुण हे सर्वोत्तम समजले जातात, याचा अर्थ एकप्रकारे त्या देशात भुकेची स्थिती काळजी करण्यासारखी नाही असाच होतो. भारताला ५० पैकी २७.२ गुण देण्यात आले असून परिस्थिती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
९.९ पेक्षा कमी गुण असल्यास परिस्थिती गंभीर नाही. १० ते १९.९ मध्ये गुण असल्यास परिस्थिती मध्यम आहे. २० ते ३४.९ गुण असल्यास भुकेची परिस्थिती गंभीर आहे. ३५ ते ३९.९ गुण म्हणजे धोक्याची घंटा तर ५० हून अधिक गुण म्हणजे धोका खूप वाढला असून परिस्थिती भयावह आहे असा अर्थ होतो.
२०२० मधील भारताची कामगिरी तुलनेत सुधारली आहे. भारताला २७.२ गुण असून २००० मध्ये ३८.९, २००६ मध्ये ३७.५, २०१२ मध्ये २९.३ गुण होते.
भारतातील पाच वर्षाखाली मुलांचा मृत्यूदर २००० ते २०१८ दरम्यान कमी झाल्याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.
जागतिक भूक निर्देशांकात भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे. फक्त १३ देशांमध्ये भारतापेक्षा वाईट परिस्थिती आहे.
विख्यात पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन
📚मध्य पूर्वेतील वार्ताकनात निष्णात मानले गेलेले प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे नुकतेच डब्लिन येथे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मध्य-पूर्वेतील संघर्षग्रस्त भागात राहून त्यांनी वार्ताकन केले होते.
📚फिस्क यांच्या वार्ताकनाने नेहमीच वादाचे मुद्दे चर्चेला आले. आर्यलडची राजधानी डब्लिन येथे अल्पशा आजारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
📚 त्या काळातील नामवंत पत्रकार अशा शब्दांत दी इंडिपेंडंटने त्यांचा गौरव केला आहे. अल कायदाचा दहशतवादी ओसामा बिन लादेन याची अनेकदा मुलाखत घेणाऱ्या पत्रकारांपैकी ते एक होते.
📚११ सप्टेंबर २०११ रोजीच्या हल्लय़ानंतर ते पाकिस्तान अफगाण सीमेवर गेले होते. तेथे अफगाणी शरणार्थीनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
निर्भिडता, तडजोडी न करणे, सत्य शोधण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असणे व वास्तव मांडणे हे आदर्श पत्रकारांकडून अपेक्षित असलेले सर्व गुण त्यांच्यात होते, त्यामुळे ते यशस्वी झाले, असे मत ‘दी इंडिपेंडंट’चे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्तियन ब्राउटन यांनी व्यक्त केले.
📚फिस्क यांनी पेटवलेली पत्रकारितेची अग्निशिखा यापुढेही तशीच तेजाळत राहील, असे ते म्हणाले.
इंग्लंडमधील केंट येथे जन्मलेल्या फिस्क यांनी कारकीर्दीची सुरुवात ‘दी संडे एक्स्प्रेस’मधून केली. नंतर ते ‘दी टाइम्स’मध्ये गेले. उत्तर आर्यलड, पोर्तुगाल, मध्य पूर्व या ठिकाणी त्यांनी काम केले. १९७६ मध्ये ते बैरूतमध्ये गेले त्यावेळी तेथे यादवी माजली होती. बैरूतमध्ये असताना त्यांनी मध्य-पूर्वेत बराच प्रवास केला.
📚इराण-इराक युद्ध, अरब—इस्रायल संघर्ष, अल्जिरियातील युद्ध, अफगाणिस्तानातील संघर्ष, सद्दाम हुसेनचे कुवेतमधील आक्रमण नंतर अमेरिकेचे इराकमधील आक्रमण, अरब स्प्रिंग आंदोलन, सीरियातील यादवी युद्ध याचे वार्ताकन त्यांनी केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी निलोफर पाझिरा असून त्या चित्रपट निर्मात्या व मानवी हक्क कार्यकर्त्यां आहेत.
दुधवा राष्ट्रीय उद्यान.
🅾️उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ आणि रेनडिअरसाठी जगप्रसिद्ध आहे. दुधवाचा उत्तर किनारा नेपाळसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असून, त्याच्या दक्षिणेला सुहेली नदी वाहते. दुधवात घनदाट हिरवेगार जंगल, उंच गवत आणि अनेक प्रकारचे वृक्ष आढळून येतात.
🅾️हरणांच्या अनेक प्रजातींशिवाय वाघ, बिबट्या, रेनडीअर, हत्ती, कोल्हा, तडस आणि एकशिंगी गेंडा आदी प्राणी येथे आहेत. मोरासह पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचेही हे वस्तिस्थान आहे. दुधवा हे उत्तर प्रदेशातील जैव विविधतेने समृद्ध असे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते खिरी जिल्ह्यात आहे.
🅾️१ फेब्रुवारी १९७७ साली दुधवा जंगलाला राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले. त्यानंतर १९८७-८८ मध्ये किशनपूर वन्यजीव क्षेत्राला दुधवात सामील करून याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला गेला.
🅾️दधवात सरासरी १५०० मि.मी. पाऊस होतो. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान येथे कमाल तापमान २० ते २० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअस असते. पहाटे धुके आणि रात्री थंडी पडते.
🅾️मार्च आणि मेदरम्यान कमाल तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २० ते २५ अंश सेल्सिअससह वातावरण आल्हाददायक असते. जून ते आॅक्टोबर या काळात उन्हाळा असला तरी येथे मुसळधार पाऊस पडतो.
दशातील ४० टक्के कीटकनाशके पर्यावरणाला घातक.
🅾️कषिक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांपैकी तब्बल ४० टक्के कीटकनाशके ही सुमार दर्जाची आणि जमीन व पर्यावरणाला घटक असल्याचे आढळून आले आहे. अशा कीटकनाशकांमुळे पिकांवरील कीड, आळ्या, बुरशी आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यास अपयश येऊन कृषिउत्पादनात १५ ते २० टक्क्यांची घट होते आणि उत्पादनांची गुणवत्ता खालावते; असेही निदर्शनास आले आहे.
🅾️फडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि टाटा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने करण्यात आलेल्या शेतीविषयक अभ्यासात ही बाब निदर्शनास आली आहे.
🅾️शतकऱ्यांमधील अज्ञान, नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याबाबत कीटकनाशक उत्पादकांमध्ये असलेली उदासीनता यामुळे दर्जाहीन कीटकनाशके वापरली जातात. त्यामुळे कीटक आणि आळ्यांचा प्रतिबंध प्रभावीपणे होत नाही त्याचप्रमाणे नापिकी आणि पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते; असे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
🅾️ शतकऱ्यांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव, भारतातील भाषा वैविध्य यामुळे आघाडीच्या रसायन उद्योगांना आपल्या उत्पादनाची वैशिष्ट्य आणि त्याच्या वापराची पद्धत शेतकऱ्यांना समजावून देताना अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांचा वापर करतात.
🅾️उत्पादक आणि शेतकरी यांच्यातील सुवा असलेल्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये तांत्रिक माहितीचा अभाव असल्याने ते देखील शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशक वापरण्याचा सल्ला देण्यात अपयशी ठरतात; असेही दिसून आले आहे.
तांदूळ वाण 'IR-8' व हरितक्रांती ला 50 वर्षे पूर्ण झाली.
🅾️आतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI) ने 29 नोव्हेंबर 1966 रोजी IR-8 च्या नावाने तांदळाची एक जात शोधून काढली होती. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बियाणे हे प्रति हेक्टर फक्त दोन टन भाताचे उत्पन्न देते, तर IR-8 हे प्रति हेक्टर सात टन भाताचे उत्पन्न देते. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत.
🅾️या तांदळाची लागवड प्रथम 1966 साली फिलीपिन्स मध्ये करण्यात आली होती. IRRI ही मुळची फिलीपिन्स मधील कृषि संशोधन संस्था आहे. फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर फाउंडेशन हे संस्थापक आहेत. तर मुख्यालय लॉस बॅनोस, लागुना, फिलीपिन्स मध्ये आहे.
🧩IR-8 ची पार्श्वभूमी....
🅾️भारतासह बहुतेक आशियायी देशांमध्ये दुष्काळ चालु असताना, तांदळाची उच्च उत्पादन क्षमतेची वाण विकसित करण्यासाठी सन 1960 मध्ये संशोधनाला सुरुवात करण्यात आली. पीटर जेनिंग्स, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे प्रथम तांदूळ प्रजनक (rice breeder) (1961-67) यांनी यामध्ये नेतृत्वपूर्ण कामगिरी केली. संशोधकांनी चीन, तैवान आणि इंडोनेशिया पासून मिळालेल्या तांदूळ वाणांचे 38 अलग-अलग संकरीत वाण तयार केले.
🅾️अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, हेन्री एम. बिचेल, जेनिंग्स यांचे सहकारी, यांनी तांदळाच्या डी-जिओ-वू-गेन आणि पेटा या वाणांचे संकरीत स्वरूप म्हणून IR8-288-3 या नव्या वाणाचा विकास केला आणि फिलीपिन्स मध्ये त्याचे परीक्षण केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यावेळी 88 किलो शुद्ध बियाणांच्या पेरणीपासून 71 टन भाताचे उत्पादन झाले होते. त्यानंतर, 29 नोव्हेंबर 1966 रोजी IRRI ने या नव्या जातीला अधिकृतपणे IR-8 हे नाव दिले आणि जाहीर केले.
🧩हरित क्रांती आणि भारत...
🅾️फिलीपिन्स मध्ये मिळालेल्या परिणामानंतर, भारत हा मोठया प्रमाणात भात खाणारा देश असल्यामुळे, दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, सन 1967 मध्ये, एन. सुब्बा राव यांनी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्हा अटचंता मध्ये 2,000 हेक्टर क्षेत्रात IR-8 ची पेरणी केली. हा क्षण म्हणजे भारतामध्ये भात लागवडीमधील क्रांतीचा भाग झाला.
🅾️कमी वाढ कालावधी व उच्च उत्पन्न तसेच नायट्रोजन खताला प्रतिसाद देणारे वाण असल्यामुळे IR-8 हे शेतकर्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. कीटक प्रतिरोधक हे आणखी एक कारण होते. शिवाय, आकाराने खूपच लहान असल्याने, IR8 हे वाराधून परिस्थितीत उभे राहू शकत होते. IR-8 हे फक्त 105 दिवसांत कापणीसाठी तयार होते.
🅾️तयानंतर, भारतीय शास्त्रज्ञांनी IR-20, IR-36, आणि IR-50 असे अनेक वाण विकसित केले आहे.
🅾️भारत आणि फिलीपिन्स मधील, यशानंतर डॉ. जेनिंग्स यांनी युद्धाने ग्रासलेल्या व्हिएतनाम मध्ये याची लागवड करण्यात आली. व्हिएतनाम मध्ये याला कौतुकाने "होंडा राइस" असे म्हणतात, कारण याच्या उच्च उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना पैसे कमावता आले. ज्यामधून त्यांनी होंडा मोटारसायकल घेण्यास सुरू केले होते.
🧩हवामानातील बदलाचा उत्पन्नावर परिणाम
🅾️2010 साली, फील्ड क्रॉप्स रिसर्च जर्नल कडून प्रकाशित अभ्यासामधून हे दिसून आले आहे की, हवामान बदलामुळे, IR-8 च्या उत्पादन क्षमतेत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. गरम रात्री, वारंवार येणारे पुर आणि प्रदूषण हे यासाठी जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन.
🅾️मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.
🅾️दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प.
🅾️ मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
🅾️ शरीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
🅾️ बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.
🅾️ भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.
🅾️दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.
🅾️ फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.
🅾️ हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.
🅾️ चबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.
🅾️ उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.
🅾️ कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.
🅾️नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.
भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा.
🔰एमपीएल स्पोर्ट्स अॅपॅरल आणि अॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आहेत. परंतु ‘बीसीसीआय’ला प्रति सामन्यांसाठी नायकेच्या ८८ लाख रुपयांच्या तुलनेत एमपीएलकडून फक्त ६५ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ‘बीसीसीआय’ प्रति सामन्यास २३ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.
🔰भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्याने सोमवारी एमपीएल कंपनीशी करार झाल्याची माहिती दिली. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट साहित्याचा करार भारताच्या पुरुष, महिला, ‘अ’ संघ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांसाठी करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ला विक्रीसंदर्भातील स्वामित्व हक्कापोटी आणखी १० टक्के रक्कमसुद्धा मिळू शकेल. हा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असेल.
🔰एमपीएल हे सध्या ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांशी करारबद्ध आहेत. याचप्रमाणे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाइट रायडर्स, आर्यलड आणि संयुक्त अरब अमिरातीशी करारबद्ध आहे.
मिशन सागर-2”: INS ऐरावत सुदान बंदरामध्ये दाखल.
🔰भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-2’चा एक भाग म्हणून INS ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन 2 नोव्हेंबर 2020 रोजी सुदान बंदरामध्ये दाखल झाले.
🔰या मोहिमेमध्ये भारत सरकारच्या वतीने आपल्या मित्र देशांना नैसर्गिक आपत्ती आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. सुदानच्या जनतेसाठी भारताने दिलेल्या 100 टन अन्नधान्याची मदत INS ऐरावतमार्फत पाठविण्यात आली आहे.
🔴पार्श्वभूमी...
🔰‘मिशन सागर-2’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. त्यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. याचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या ऐरावत जहाजामार्फत सुदान, दक्षिण सुदान, जिबुती आणि इरिट्रिया देशाकडे मदत पाठविण्यात आली आहे.
🔰आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी त्या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून ‘मिशन सागर-2’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून ही मोहीम पार पाडण्यात येत आहे.
न्यूझीलंडमध्ये प्रथमच भारतीय वंशाची महिला मंत्री.
🔰न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.
🔰अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत. नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या.
🔰२०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.
मोदी सरकारने जाहिरातींसाठी रोज खर्च केले दोन कोटी रुपये; RTI मधून समोर आली माहिती.
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वत:च्या प्रचारासाठी रोज दोन कोटी रुपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मिळेल्या आकडेवारीनुसार मोदी सरकारने मागील आर्थिक वर्षामध्ये वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि होर्डींग्सच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातींवर करदात्यांचे ७१३ कोटी २० लाख रुपये खर्च केल्याचे उघड झालं आहे.
🔰सरकारने ही रक्कम जाहिरातबाजी आणि प्रचारासाठी खर्च केली आहे. मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जतिन देसाई यांनी आरटीआयअंतर्गत या संदर्भातील माहिती मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ब्यूरो ऑफ अकाटरिच अॅण्ड कम्युनिकेशनने दिलेल्या माहितीनुसार केंद्राने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये जाहिरातींवर दिवसाला सरासरी एक कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत.
🔰मागील आर्थिक वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकही पार पडली. ७१३ कोटींपैकी इलेक्ट्रॉनिक मीडियावर ३१७ कोटी ५ लाख, प्रिंट मीडियावर २९५ कोटी ५ लाख आणि आऊटडोअर म्हणजेच होर्डींग आणि जाहिरातींवर १०१ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे.
सौम्य करोनाचे सात लक्षणसमूह
- कोविड १९ संसर्गातून निर्माण होणाऱ्या लक्षणांचे सात नवीन प्रकार वैज्ञानिकांनी शोधून काढले आहेत. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतरही दहा आठवडय़ांच्या काळात प्रतिकारशक्ती प्रणालीत बदल झालेले दिसून आले आहेत. या संशोधनाचा उपयोग करोना रुग्णांनी नंतर कशी काळजी घ्यावी किंवा सक्षम लस नेमकी कशा स्वरूपाची असावी हे ठरवण्यासाठी होणार आहे.
- अॅलर्जी या नियतकालिकात प्रसिद्ध
- व्हिएन्नातील वैद्यकीय विद्यापीठातील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले असून त्यांच्या मते करोनाचे एकूण सात लक्षणसमूह निष्पन्न झाले आहे
- त्यात फ्लू सदृश ताप, थंडी, थकवा व कफ यांचा समावेश आहे.
- दुसऱ्या प्रकारात सर्दीसारखी लक्षणे म्हणजे शिंका, घसा कोरडा पडणे, नाक चोंदणे, स्नायुदुखी यांचा समावेश आहे. काही रुग्णांमध्ये डोळे व श्लेष्मल आवरणाची आग होते.
- फुफ्फुसाच्या समस्या, न्यूमोनिया,श्वास घेण्यात अडथळे, आतडय़ाच्या समस्या जसे की अतिसार, मळमळणे, डोकेदुखी, वास व चव जाणे या सारख्या लक्षणांचाही समावेश आहे.
- रुग्णांच्या एका गटात असे दिसून आले की, वास व चव गेलेल्या व ज्यांची प्रतिकारशक्ती प्रणाली ‘तरुण’ आहे त्यांच्यात टी लिंफोसाइटस जास्त असतात व त्या करोना संसर्गात थायमस ग्रंथीतून स्थलांतरित होतात असे यातील सह संशोधक विनफ्राइड एफ पिकल यांनी म्हटले आहे.
◾️नमके काय परिणाम होतात..
कोविड १९ विषाणू नेमके काय परिणाम शरीरात करतो याबाबत उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मानवी प्रतिकारशक्ती प्रणालीतील ग्रॅन्युलोसाइटस या पेशी जीवाणू तसेच विषाणूंशी लढण्याचे काम करतात.
- कोविड १९ रुग्णात त्या कमी झालेल्या दिसून आल्या. सीडी ४ व सीडी ८ टी पेशी या प्रतिकारशक्तीतील स्मृती पेशींच्या संचाचे काम करतात त्यातील सीडी ८ टी नावाच्या पेशी जास्त क्रियाशील झालेल्या दिसून आल्या.
- याचा अर्थ सुरुवातीच्या संसर्गानंतर या पेशी बराच काळ लढत राहतात. अनेक रुग्णांच्या रक्तात प्रतिपिंड निर्माण करणाऱ्या प्रतिकारशक्ती पेशींची पातळी वाढलेली दिसली.
- कमी पातळीवरच्या करोना संसर्गात जेवढा ताप जास्त तेवढे प्रतिपिंड जास्त दिसून आले. करोना १९ विषाणूशी लढताना आपली प्रतिकारशक्ती दुप्पट शक्तीने काम करीत असते असे दिसून आले आहे.
- प्रतिकारशक्ती प्रणाली व प्रतिपिंड हे दोन्ही झुंज देतात. या संशोधनाचा उपयोग प्रभावी लस तयार करण्यासाठी होऊ शकतो.
सरोजिनी नायडू
🔰 तयांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी).
🔰 वडील निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली.
🔰 निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले.
🔰 द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
🔰 सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशहोल्डनंतर द बर्ड ऑफ टाईम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला.
🔰 ‘भारतीय कोकिळा’ म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.
🔰 तयानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला.
🔰 सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले. हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना कैसर– इ– हिंद हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु – मुसलमान ऐक्य, स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले.
🔰 टिळकांच्या मृत्यूनंतर सरोजिनी नायडू पूर्णतः गांधीवादी झाल्या आणि पेहराव व राहणीमान यांत त्यांनी आमूलाग्र बदल केले. त्यांनी आपले वास्तव्य हैदराबादमधून मुंबईत हलविले. त्या मुंबई महानगरपालिकेत सभासद म्हणून निवडून आल्या आणि पुढे प्रांतिक काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या (१९२१).
🔰 पढे कानपूर येथील अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या (१९२५) व काँग्रेस कार्यकारिणीच्या सभासद झाल्या. काँग्रेसच्या सर्व धोरणांत त्या हिरिरीने भाग घेत. कलकत्ता येथे भरलेल्या १९०७ च्या बंगालच्या फाळणी विरोधी सभेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १९०८ मध्ये विधवाविवाह परिषदेत त्यांनी स्त्रियांच्या चळवळीचा पाया घातला आणि येथूनच त्यांच्या स्त्रीविषयक चळवळीस खरा प्रारंभ झाला.
वन नेशन, वन गोल्ड’ योजना लागू होण्याची शक्यता.
संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था लागू होण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेनुसार, देशातील कोणत्याही राज्यात सोन्याचा एकसारखाच भाव असेल.देशभरात ही व्यवस्था आणण्याचा विचार सरकारकडून सुरु आहे.
ज्वेलर्स असोसिएशनची मागणी आहे की, सरकारने देशात ‘वन नेशन, वन गोल्ड’ ही व्यवस्था आणावी.यामुळे ग्राहकाला देशभरात सर्व ठिकाणी एकाच किंमतीत सोनं उपलब्ध होईल.
सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की, वाढत्या दराने सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे.
त्यामुळे एकच किंमत सर्व जागी लागू झाली तर याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ते कुठल्याही राज्यातून सोन खरेदी करु शकतात.
ठिकाण – विशेष नाव
• काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
• कॅनडा – बर्फाची भूमी.
• कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
• कॅनडा – लिलींचा देश.
• कोची – अरबी समुद्राची राणी.
• कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
• क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
• जपान – उगवत्या सुर्याचा देश.
• जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
• जयपूर – गुलाबी शहर.
• जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
• झांझिबार – लवंगांचे बेट.
• तिबेट – जगाचे छप्पर.
• त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
• थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
• दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
• नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
• न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
• पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
• पामीरचे पठार – जगाचे आढे.
• पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
• प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
• फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
• बंगळूर – भारताचे उद्यान.
• बहरिन – मोत्यांचे बेट.
• बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
• बेलग्रेड – श्वेत शहर.
• बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
• मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
• मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
• म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
• रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
• शिकागो – उद्यानांचे शहर.
• श्रीलंका – पाचूंचे बेट.
• स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण
04 November 2020
जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.
करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.
आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.
आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. करोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.
“लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. करोनाचा भारतावर मोठा परिणाम झाला असून या साथीमुळे दोन देशांमधील दरी अधिक वाढली आहे,” असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
आम्ल
🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴
◾️वहॅलीन ◾️लयुसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थरीओनीन
◾️फनीलाणीन ◾️टरेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मथीओनिन
🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴
▪️गलायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️परोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
✍️वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.
पंचवार्षिक योजना
◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.
◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.
◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.
🎇 पहिली पंचवार्षिक योजना 🎇
📌 कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६
📌 अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
📌 अग्रक्रम:
कृषी पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली
🏭 परकल्प :•
🔹 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल)
🔹 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब)
🔹 ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
🔹 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा)
🔹 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना
🔹 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना.
🔹 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना.
🔹 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक
_________________________________
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
प्रश्न१) पृथ्वी 2 हे ____ क्षेपणास्त्र आहे.
उत्तर :- पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र
प्रश्न२) कोणत्या राज्यातून रुशिकुल्य नदी वाहते?
उत्तर :- ओडिशा
प्रश्न३) कोणत्या संस्थेनी “बेंडिंग द कर्व्ह: द रिस्टेरेटीव पॉवर ऑफ प्लॅनेट-बेस्ड डायट्स” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड
प्रश्न४) कोणत्या राज्यात गोलकोंडा किल्ला आहे?
उत्तर :- तेलंगणा
प्रश्न५) कोणत्या कायद्यात ‘हलक पंचायत’ची तरतूद आहे?
उत्तर :- जम्मू व काश्मीर पंचायतराज अधिनियम, 1989
प्रश्न६) SLINEX’ ही भारत आणि ____ या देशांच्या नौदलांच्या दरम्यानची सागरी कवायत आहे.
उत्तर :- श्रीलंका
प्रश्न७) कोणती व्यक्ती ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’ पुरस्काराची प्रथम भारतीय विजेता ठरली?
उत्तर :- ऐश्वर्या श्रीधर
प्रश्न८) कलेक्टिव्ह सेक्युरिटी ट्रीटी ऑर्गनाइझेशन (CSTO) ही _ या देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक युती आहे.
उत्तर :- रशिया
प्रश्न९) कोणत्या रेल्वे-नि-रस्ता पूलावरून ‘झिरो राजधानी’ रेलगाडी धावणार?
उत्तर :- बोगीबील
प्रश्न१०) कोणत्या शहरात जगातला सर्वात मोठा झिंक स्मेलटर प्रकल्प उभारला जाणार?
उत्तर :- गुजरात
प्रश्न१) ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला कोणत्या क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर :- ९४ वा
प्रश्न२) कोणता देशातला पहिला 'हर घर जल' राज्य ठरला?
उत्तर :- गोवा
प्रश्न३) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत ट्रान्स-फॅट फ्री होणार?
उत्तर :- २०२२
प्रश्न४) कोणते राज्य ‘मिशन शक्ती’ नावाने महिला सशक्तीकरण अभियान राबवित आहे?
उत्तर :- उत्तरप्रदेश
प्रश्न५) 'लँसेट मेडिकल’ अहवालानुसार, भारताचे आयुर्मान किती आहे?
उत्तर :- ७०.८ वर्ष
प्रश्न६) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘माय टाउन माय प्राइड’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
उत्तर :- जम्मू व काश्मीर
प्रश्न७) कोणाला आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाचे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?
उत्तर :- डॉ मायकेल इराणी
प्रश्न८) कोणत्या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो?
उत्तर :- 16 ऑक्टोबर
प्रश्न९) कोण ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचे लेखक आहेत?
उत्तर :- शशी थरूर
प्रश्न१०) कोणत्या देशाला भारताकडून किलो-श्रेणीची ‘INS सिंधुवीर’ पाणबुडी मिळणार आहे?
उत्तर :- म्यानमार
Q1) कोणत्या व्यक्तीची रोखे बाजारच्या आकडेवारीसाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी SEBI संस्थेनी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
------- माधबी पुरी बुच
Q2) कोणत्या संस्थेच्यावतीने 'मेरी सहेली' उपक्रम चालवला जात आहे?
------ रेल्वे सुरक्षा दल
Q3) एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यामधल्या सामर्थ्यशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
------- 4 था क्रमांक
Q4) कोणत्या व्यक्तीला वैद्यकीय संशोधनासाठी "आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
------- जाजिनी व्हर्गीस
Q5) भारतीय हवाई दलात सेवा दिलेल्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव काय आहे, ज्यांचे नुकतेच निधन झाले?
------- विजयालक्ष्मी रामानन
Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “लाइफ इन मिनीएचर” प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला आहे?
-------- सांस्कृतिक मंत्रालय
Q7) कोणत्या संस्थेनी ‘स्टेट ऑफ द ग्लोबल एअर (SOGA) 2020’ अहवाल प्रसिद्ध केला?
-------- हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट
Q8) मानवी शरीराच्या कोणत्या भागात “ट्युबरिअल सलायवरी ग्लॅंड” आहे?
--------- ग्रसनी यामध्ये
Q9) 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर’ हे कोणत्या भारतीयाचे आत्मचरित्र आहे?
-------- एन. के. सिंग (15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष )
Q10) कोणत्या कंपनीची निवड NASA संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी केली?
-------- नोकिया
Q1) चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?
------ शनदोंग
Q2) कोणत्या संस्थेनी 'रीडिंग बिटवीन द लाईन्सः व्हॉट द वर्ल्ड रियली थिंक्स ऑफ टीचर्स' या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?
------ वर्की फाउंडेशन
Q3) कोणत्या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची 19 वी बैठक आयोजित केली?
----- भारत
Q4) खालीलपैकी कोणत्या बाबीशी ‘इंडिजेन जीनोम’ प्रकल्प संबंधित आहे?
------ व्यक्तींचा जीन क्रम
Q5) कोणत्या संस्थेनी "इलेक्ट्रिसिटी अॅक्सेस इन इंडिया अँड बेंचमार्किंग डिस्ट्रीब्यूशन यूटिलिटिज" अहवाल प्रकाशित केला?
------- नीती आयोग
Q6) छत्तीसगड विधानसभेत मंजूर झालेल्या ‘कृषी उत्पन्न बाजार (दुरुस्ती) विधेयक-2020’ याच्याबाबतीतले कोणते विधान चुकीचे आहे?
------- कृषी उत्पन्न बाजारांचे नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देते
Q7) _ ही संस्था ‘स्टेट फायनान्स’ विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते.
------- भारतीय रिझर्व्ह बँक
Q8) कोणत्या देशाने "बाय, बाय कोरोना" या शीर्षकाखाली जगातले पहिले वैज्ञानिकदृष्टीचे कार्टून पुस्तक प्रकाशित केले?
------- भारत
Q9) कोणत्या संरक्षण दलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला?
------ भारतीय भुदल
Q10) भारताच्या कोणत्या शेजारी देशाने “नो मास्क नो सर्व्हिस” धोरण अंमलात आणले आहे?
------ बांग्लादेश
शाहिर अमर शेख
जन्म : २० ऑक्टोबर, १९१६
निधन : २९ ऑगस्ट, १९६९
🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.
🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.
🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला.
🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.
🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती.
🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.
🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले.
🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.
🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण 'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.
🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.
🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने.
🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला.
🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले.
🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.
🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.
🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे.
🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.
🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.
🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.
🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.
🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह
🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक.
🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.
🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला.
🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..
🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔶 सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔶 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔶 हरदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔶 शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔶 परौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)
US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम
🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ
🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? किंवा जो बायडेन यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची धुरा जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. दरम्यान, अमेरिकेत EARLY BALLOTS CAST सिस्टमदेखील कार्यान्वित आहे.
जाणून घेऊया काय आहे ही प्रक्रिया.
🔸अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेपूर्वीच जवळपास साडेसात कोटी लोकांनी आपलं मत दिलं आहे. करोना विषाणूच्या संकटादरम्यान यावेळी मेल-इन मतदानाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. दरम्यान, याद्वारे निरनिराळ्या राज्यांतील अनेकांनी आपलं मत दिलं आहे. मुख्य मतदानाच्या मतमोजणीसोबतच ही मतं मोजली जाणार आहेत. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत EBCS बद्दल सांगण्यात आलं आहे. जी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
🔸काय आहे Early ballots cast system?
एकाच दिवसात कोट्यवधी लोकांनी मत देणं ही अशक्य बाब आहे. यासाठी अमेरिकेतील संविधानात एक पर्याय सूचवण्यात आला आहे. ज्याद्वारे मतदारांना मतपत्रिकेद्वारे किवा मेलद्वारे मत देता येतं. याचा वापर अमेरिकेतील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या किंवा मतदान केंद्रांपासून दूर असलेल्या मतदारांना करता येतो. याव्यतिरिक्त वयस्क लोकांनादेखील हा पर्याय वापरता येतो. मतदानाच्या तीस दिवसांपूर्वी मतदारांना याद्वारे आपलं मत देता येतं. प्रत्येक राज्यांमध्ये स्थानिक निवडणूक आयोग याची तारीख निश्चित करत असतो. तसंच यासाठी नोंदणी करावी लागते, तेव्हाच आपलं मत मेल करता येतं. दरम्यान, या मतांची मोजणीदेखील मुख्य मतमोजणीसोबतच केली जाते. यावेळी या पर्यायानं सर्व विक्रम मोडीत काढल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्येच २.७ कोटी लोकांनी तर आतापर्यंत जवळपास सात कोटींपेक्षा अधिक लोकांची या पर्यायाद्वारे मतदान केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.
🔸भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद
अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.
02 November 2020
चालू घडामोडी प्रश्नसंच
१) भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधनाचां उल्लेख आधुनिक भारताचे चाणक्य असा केला जातो.
१. चरणसिंग
२. व्ही.पी.सिंग
३. अटलबिहारी वाजपेयी
४. पी.व्ही.नरसिंहराव🔰
२) सचिन तेंडूलकरने आपले १०० वे शतक कोणत्या मैदानवर झळ\कावले होते.
१. वानखेडे स्टेडीयम
२. ईडन गार्डन
३. लॉर्डस
४. शेर- ए - बांगला स्टेडीयम🔰
३) २०१८ च्या प्रारंभी कोणत्या राज्यात राष्ट्रीय कर्करोग संस्था स्थापन करण्यात आली.
१. राजस्थान
२. पंजाब
३. हरियाणा🔰
४. हिमाचल प्रदेश
४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आपले पहिले भाषण खालीलपैकी कोणत्या वर्षी दिले होते.
१. ऑक्टोंबर १४🔰
२. ऑक्टोंबर १५
३. ऑगस्ट १४
४. सप्टेंबर १४
५) खालीलपैकी भारताच्या कोणत्या पंतप्रधनांनी संसदेत मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा केल्यानंतर त्याला देशव्यापी विरोध झाला होता.
१. राजीव गांधी
२. व्ही.पी. सिंग🔰
३. चौथरी चरणसिंग
४. चंद्रशेखर
६) १९८३ मध्ये कन्याकुमारी ते दिल्लीतील राजघाटापर्यंत पदयात्रा काढणारे नेते खालीलपैकी कोण आहे?
१. चंद्रशेखर
२. लालकृष्ण अडवाणी🔰
३. रामविलास पासवान
४. व्ही. पी.सिंग
७) सर डॉन ब्रॅडमॅन यांच्यानंतर कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद २५ शतक झळकवणारा दुसरा फलंदाज ------------ हा आहे.
१. विराट कोहली
२. महेला जयवर्धने
३. केन विल्यम्सन
४. स्टीव्ह स्मिथ🔰
८) ------------- हा देश ऑस्ट्रेलीया समुहाचा ४३ वां सदस्य देश ठरला.
१. चीन
२. पाकिस्तान
३. भारत🔰
४. ब्राझील
९) युनेस्को द्वारा ----ते ------ पर्यंत युनेस्को वारसा सप्ताह साजरा केला जातो.
१. १४ ते २० नोव्हेंबर
२. २० ते २४ नोव्हेंबर
३. १९ ते २५ नोव्हेंबर🔰
४. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर
१०) जागतिक व्यापार संघटनेने २०१९ या वर्षापासून ------- हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून घोषित केले.
१. ७ ऑक्टोंबर🔰
२. १५ ऑक्टोंबर
३. ६ नोव्हेंबर
४. २६ नोव्हेंबर
११) अवयवदानात परिणामकारक चळवळ उभी करणाऱ्या ----------------- या राज्याला केंद्र सरकरने सर्वोत्तम राज्याचा दर्जा दिला.
१. गुजरात🔰
२. महाराष्ट्र
३. तामिळनाडू
४. आंध्र प्रदेश
१२) बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्व लक्षात घेऊन ---------- शहरामध्ये पहिलीह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.
१. पुणे
२. नागपूर
३. औरंगाबाद
४. नाशिक🔰
१३) ग्रीनपीस इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ………….हे शहर भारतातील सर्वात प्रदूषित शहर आहे
१. झरिया🔰
२. धनबाद
३. नोएडा
४. गाज़ियाबाद – उत्तर प्रदेश
१४) 6 जानेवारी 2020 रोजी किसान विज्ञान कॉंग्रेस कोठे आयोजित केली गेली होती?
१. नवी दिल्ली
२. बंगळुरू🔰
३. पुणे
४. मुंबई
१५) राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करता यावी म्हणून सर्व नदी खोऱ्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी शासनाने जल आराखडा तयार केला आहे. असा एकात्मिक जल आराखडा तयार करणारे ............ देशातील पहिले राज्य ठरले.
१. केरळ
२. तामिळनाडू
३. महाराष्ट्र
४. आंध्र प्रदेश🔰
डेली का डोज
1.वोडाफोन और आईडिया कंपनी ने हाल ही में मिलकर कंपनी को क्या नया नाम रखा है?
a. FI (एफआई)
b. VI (वीआई)✔️
c. DI (डीआई)
d. NI (एनआई)
2.विश्व साक्षरता दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 8 सितंबर✔️
b. 12 अगस्त
c. 5 मार्च
d. 10 जनवरी
3.निम्न में से कौन सा देश हाइपरसोनिक प्रौद्योगिकी निदर्शक यान (एचएसटीडीवी) तैयार करने वाला दुनिया का चौथा देश बन गया है?
a. चीन
b. रूस
c. भारत✔️
d. जापान
4.भारत के किस रेडियो खगोल विज्ञान के जनक का महाराष्ट्र के पुणे में निधन हो गया?
a. डॉ गोविंद स्वरूप✔️
b. डॉ राहुल सचदेवा
c. डॉ अनिल त्यागी
d. डॉ अनुपम स्वरूप
5.इटैलियन ग्रैंड प्रिक्स 2020 का विजेता निम्न में से कौन है?
a. वाल्टेरी बोट्टास
b. लुईस हैमिल्टन
c. पियरे गैसली✔️
d. मैक्स वेर्स्टाप्पेन
6.फिच रेटिंग्स ने चालू वित्त वर्ष 2020-21 में भारतीय अर्थव्यवस्था में कितने प्रतिशत की भारी गिरावट का अनुमान लगाया है?
a. 12.5 प्रतिशत
b. 10.5 प्रतिशत✔️
c. 15.5 प्रतिशत
d. 20.5 प्रतिशत
7.सुप्रीम कोर्ट के आदेश के मुताबिक राज्योंअ को सरकारी विज्ञापनों की विषय-वस्तुे के नियमन के बारे में कितने सदस्योंल की समिति का गठन करना है?
a. चार
b. पांच
c. सात
d. तीन✔️
8.दिल्ली उच्च न्यायालय ने केंद्र सरकार को असम राइफल्स के लिये दोहरी नियंत्रण संरचना को समाप्त करने अथवा उसे बनाए रखने को लेकर निर्णय लेने हेतु कितने सप्ताह का समय दिया है?
a. 12 सप्ताह✔️
b. 15 सप्ताह
c. 22 सप्ताह
d. 32 सप्ताह
9.किस राज्य सरकार ने हाल ही में एक पुरानी योजना SVAYEM योजना को फिर से लॉन्च किया?
a. पंजाब
b. तमिलनाडु
c. असम✔️
d. बिहार
10.निम्न में से किस राज्य में पर्यटन को बढ़ावा देने हेतु नदियों में क्रूज चलने की शुरुआत की जाएगी?
a. ओडिशा✔️
b. राजस्थान
c. पंजाब
d. तमिलनाडु
दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत-
📚आतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात हा चित्रपट कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार आहे
📚या वर्गवारीसाठी दीपा मेहता यांना दुसऱ्यांदा संधई मिळत आहे. १५ मार्चला ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत. पुरस्कारप्रदान कार्यक्रम २५ एप्रिलला होणार आहे.
📚महता यांच्या ‘वॉटर’ या चित्रपटास २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात नामांकन मिळाले होते. ‘अर्थ’, ‘फायर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर दोन चित्रपट होते.
📚‘फनी बॉय’ हा चित्रपट श्याम सेल्वादुराई यांच्या १९९४ मधील कादंबरीवर बेतलेला आहे. ही घटना १९७० ते १९८० दरम्यान श्रीलंकेत घडलेली दाखवली आहे. अरजी या तरुणाच्या लैंगिक जाणिवा वेगळ्या असतात ते यात दाखवले असून तामिळ व सिंहली यांच्यातील संघर्षांच्या काळात हा वयात आलेला मुलगा सामाजिक व कौटुंबिक र्निबध झुगारुन देतो.
📚दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा २००७ मधील ‘वॉटर’ प्रमाणेच ठोस मांडणी घेऊन आलेला आहे. त्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट गटात नामांकन मिळाले असल्याचे टेलेफिल्म कॅनडाच्या कार्यकारी संचालक ख्रिस्ता डिकेनसन यांनी सांगितले.
मेहता यांचे बालपण दिल्लीत गेले असून त्या सध्या टोरांटोत चित्रपट निर्मात्या आहेत.
📚‘फनी बॉय’ हा माझ्यासाठी मानवता व आशा यांचा संगम आहे. जगात सर्वसमावेशकतेचा ध्वज फडकवत ठेवण्याचा प्रयत्न त्यात आहे. डेव्हीड हॅमिल्टन व मी कॅनडातील परीक्षकांचे या निवडबद्दल आभारी आहोत, असे त्यांनी सांगितले.
📚हा चित्रपटाची कथा मेहता व सेल्वादुराई यांनी लिहिली आहे. हॉलिवूडच्या अवा ज्युवेर्नाय यांच्या अॅरे रिलिजींगने हा चित्रपट घेतला होता. तो काही निवडक शहरांत दाखवला जाणार असून १० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे.
आत्तापर्यंत राज्यसभेवर नियुक्त झालेले सरन्यायाधीश:
1. न्या. बहरुल इस्लाम
2. न्या. रंगनाथ मिश्रा
3. न्या. रंजन गोगोई
♦️ नया. बहरुल इस्लाम :
📌बहरुल इस्लाम हे सुप्रीम कोर्टातून नियुक्त होताच त्यांची राज्यसभेवर इंदिरा गांधी यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय न्यायव्यवस्थेतील ही अभूतपूर्व घटना होती.
📌बहरुल इस्लाम हे 1956 पासून काँग्रेसचे सदस्य होते. 1962 आणि 1968 ला दोन वेळा त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं. पण आश्चर्यकारकरित्या त्यांनी 1972 ला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि ते तत्कालीन आसाम आणि नागालैंड (सध्याचे गुवाहटी) हायकोर्टाचे न्यायमूर्ती बनले.
📌1980 मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
♦️ नया. रंगनाथ मिश्रा :
📌रगनाथ मिश्रा हे 25 सप्टेंबर 1990 ते 24 नोव्हेंबर 1991 या काळात सरन्यायाधीश राहिले.
📌राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
📌1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेत काँग्रेसचे खासदार.
📌बहरुल इस्लाम यांच्यानंतर राज्यसभेत जाणारे ते दुसरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती ठरले होते.
ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर
■ देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील ३३ निवासी शाळांचं कारभार पाहतं.
■ यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी २७ टक्के, संरक्षण विभाग १३ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ टक्के अशी विभागणी असणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजीचं हे परिपत्रक देशभरातील सैनिक शाळांच्या प्राध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.
परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी ६७ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यांमधील मुलांसाठी असतात. A आणि B अशा पद्दतीनं या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी २०२१-२२ शैक्षणिक सत्रात सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. टप्प्याटप्प्याने मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. मिझोराममधील सैनिक शाळेतील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
लस कधी मिळणार? किंमत किती? किती कोटी डोस बनवणार? सिरमच्या CEO नी दिली उत्तरं
🔶भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन करत आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे या लशीचे नाव आहे. भारतात डिसेंबरपर्यंत ही लस तयार असेल. २०२१ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत या लशीचे १० कोटी डोस बनून तयार होतील. पुणेस्थित सिरम सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते.
🔶“‘कोविशिल्ड’ लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते” असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्येही ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहेत. “यूकेने त्यांचा डाटा शेअर केला आणि लस सुरक्षित असल्याची खात्री असेल, तर आपण पुढच्या दोन ते तीन आठवडयात भारतीय नियामक यंत्रणेकडे इमर्जन्सी लायसन्ससाठी अर्ज करु शकतो. पण हे सर्व भारत सरकारची इच्छा असेल तर शक्य आहे” असे अदर पूनावाला म्हणाले.
🔶सिरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फक्त ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच नाही, तर सिरम इन्स्टिट्यूट करोना व्हायरसवर अन्य लशींच्या उत्पादनावरही काम करत आहे. संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त लशींचे उत्पादन सुरु आहे. त्यात ३८ लशी मानवी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत.
वातावरणाचे थर.
🅾️वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.
🧩वातावरणाचे मुख्य थर ...
🅾️ तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.
🅾️ तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.
🅾️ सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.
🅾️ सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.
🅾️ मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.
🅾️मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.
🅾️ दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.
🅾️ आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.
🅾️बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.
महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प.
🧩महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🅾️खोपोली - रायगड
🅾️भिरा अवजल प्रवाह - रायगड
🅾️कोयना - सातारा
🅾️तिल्लारी - कोल्हापूर
🅾️पच - नागपूर
🅾️जायकवाडी - औरंगाबाद
🧩महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🅾️तारापुर - ठाणे
🅾️जतापुर - रत्नागिरी
🅾️उमरेड - नागपूर(नियोजित)
🧩महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🅾️जमसांडे - सिंधुदुर्ग
🅾️चाळकेवाडी - सातारा
🅾️ठोसेघर - सातारा
🅾️वनकुसवडे - सातारा
🅾️बरह्मनवेल - धुळे
🅾️शाहजापूर - अहमदनगर
जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न.
१] निळी मशिद या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल
२] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते?
१] टोकियो २] ओसाका ३] शांघाई ४] नागासाकी
३] हे येशू ख्रिस्ताचे जनस्थान आहे?
१] बोगोर २] क्योटो ३] बेथलहेम ४] बीजिंग
४] महमंद यांची कबर या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] मदिना ४] मक्का
५] सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध शहर हे आहे?
१] हरारे २] कैरो ३] इस्तांबूल ४] पर्थ
६] हे शहर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
१] पर्थ २] किंबर्ली ३] हेरात ४] केप केनेडी
७] जगातील सर्वात मोठी हिऱ्याची बाजारपेठ आहे?
१] पर्थ २] आटपर्व ३] हेरात ४] केप केनेडी
८] जगातील सर्वात मोठे फुलांचे लिलाव केंद्र हे आहे?
१] बोगोटा २] ऍमस्टरडॅम ३] बोस्टन ४] पर्थ
९] जगातील सर्वात मोठे ग्रंथालय या शहरात आहे?
१] लंडन २] मॉस्को ३] पर्थ ४] मँचेस्टर
१०] विंड सिटी म्हणून या शहराला संबोधले जाते?
१] जेरुसलेम २] ऑक्सफर्ड ३] बोगोटा ४] शिकागो
उत्तरे - १] ४, २] २, ३] ३, ४] ३, ५] १, ६] २, ७] २, ८] २, ९] २, १०] ४
भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार
▪️ महाराष्ट्र - लावणी, कोळी नृत्य
▪️ तामिळनाडू - भरतनाट्यम
▪️ करळ - कथकली
▪️ आध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
▪️ पजाब - भांगडा, गिद्धा
▪️ गजरात - गरबा, रास
▪️ ओरिसा - ओडिसी
▪️ जम्मू आणी काश्मीर - रौफ
▪️ आसाम - बिहू, जुमर नाच
▪️ उत्तरखंड - गर्वाली
▪️ मध्य प्रदेश - कर्मा, चार्कुला
▪️ मघालय - लाहो
▪️ कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
▪️ मिझोरम - खान्तुंम
▪️ गोवा - मंडो
▪️ मणिपूर - मणिपुरी
▪️ अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
▪️ झारखंड - कर्मा
▪️ छत्तीसगढ - पंथी
▪️ राजस्थान - घूमर
▪️ पश्चिम बंगाल - गंभीरा
▪️ उत्तर प्रदेश - कथक
वालचंद हिराचंद
*भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला*
*जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२*
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.
ब्रिटिश जहाज कंपन्यांना झुकते माप देण्याच्या भूमिकेमुळे या व्यवसायात त्यांना अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागले होते; मात्र न डगमगता ब्रिटिश व्यवस्थेशी त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली; तसेच ब्रिटिशांच्या मर्जीतील जहाजे चालवणारी बीआय(ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगशन कंपनी) ही कंपनी विकत घेण्याची भाषा केली.
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
प्रीमिअर इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
उल्लेखनीय
डिसेंबर २३, इ.स. १९४० रोजी हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना त्यांनी, तत्कालीन म्हैसूर राज्यात बंगलोर येथे सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे इ.स. १९६४ साली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असे नामांतर झाले. या कंपनीने आजपर्यंत, भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि देखभालीचे काम केले आहे.
सराव प्रश्न
1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?
A भाई कोतवाल - आझाद दस्ता
B जनरल आवारी - लाल सेना
C उषा मेहता - आझाद रेडिओ
D इंदिरा गांधी - वानर सेना
1⃣ A B C बरोबर
2⃣ A B बरोबर
3⃣ C D बरोबर
4⃣ सर्व बरोबर
Ans - 4
2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.
1⃣ मबई
2⃣ वर्धा
3⃣ पवनार
4⃣ दांडी
Ans - 3
3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी 'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.
1⃣ एन. जी. रंगा
2⃣ दीनबंधू
3⃣ मा. गांधी
4⃣ बाबा रामचंद्र
Ans - 4
4) 1936 साली अखिल भारतीय किसान सभा एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.
1⃣ एन. माधव
2⃣ सवामी सहजानंद सरस्वती
3⃣ पडित नेहरू
4⃣ बाबा रामचंद्र
Ans - 2
5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?
1⃣ 5
2⃣ 6
3⃣ 7
4⃣ 8
Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)
6) ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.
1⃣ लगफिश
2⃣ ईल
3⃣ दवमासा
4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.
Ans- 1
7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला
"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?
1⃣ इराक
2⃣ इराण
3⃣ सौदी अरेबिया
4⃣ फरान्स
Ans - 3
8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.
1⃣ अमेरिका
2⃣ इग्लंड
3⃣ फरान्स
4⃣ जर्मनी
Ans - 2
9) ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.
1⃣ शती व्यवसाय
2⃣ कक्कुटपालन
3⃣ मत्स्यव्यवसाय
4⃣ शळीपालन
Ans - 3
परश्न व उत्तरे
(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे?
👉मध्यप्रदेश.
(2)गुलाबी क्रांती चा संबंध कशाशी आहे
👉झिंगा उत्पादन
(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे
👉भारत
(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले
👉खशवंत सिंह
(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली
👉अशोक
(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931
(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह
(8)वायू सेना अकॅडेमी
👉हद्राबाद
(9)थल सेना अकॅडेमी
👉दहरादून
(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी
👉कोचीन
(11)सापांचा देश
👉बराझील
(12)हिरे आणि सोन्या चा देश
👉दक्षिण आफ्रिका
(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे
👉आध्रप्रदेश
(14)शिवपुरी नॅशनल पार्क
👉मध्यप्रदेश
(15) फॅशन कि नगरी
👉परिस
(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली
👉1956
(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक
👉सवामी दयानंद
(18)केवलादेव नॅशनल पार्क
👉भरतपूर राजस्थान
(19)दुधवा नॅशनल पार्क
👉उत्तरप्रदेश
(20)राजाजी नॅशनल पार्क
👉उत्तराखंड
(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना
👉शिरपूर
(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या
👉महाराष्ट्र
(23)जयपूर फूट चे जनक
👉डॉ प्रमोद सेठीं
(24)एन्डोसल्फान हे काय आहे
👉किडनाशक
(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची
👉मा. गांधी
(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित
👉रत्नागिरी
(27)संत जनाबाई समाधी
👉गगाखेड
(28) पुरंदर चा किल्ला कोणी लढवला
👉मरारजी देशपांडे
(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो
👉76
(30) अर्नाळा किल्ला
👉रायगड
(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक
👉होनाजी बाळा
(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले
👉विजय तेंडुलकर
(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ
7569 चौ. किमी
(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ
👉4
(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक
👉 NH 9
NH 204
NH 211
(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर
👉 गरुशिखर
(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव
👉जानकीनाथ बोस
(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य
👉 मध्यप्रदेश
(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना
👉 कमारगुप्त
(41) CRPF ची स्थापना
👉1939 नवी दिल्ली
(42) NCC ची स्थापना
👉 1948 नवी दिल्ली
(43) NSG ची स्थापना
👉 1984 नवी दिल्ली
(44) BSF ची स्थापना
👉 1965 नवी दिल्ली
(45) ITBP ची स्थापना
👉 1962 नवी दिल्ली
प्रमुख देश व गुप्तहेर संघटना
(46) इंडीया 👉RAW
Research and analysis wing
(47) पाकिस्तान 👉 ISI
Inter service intelligence
(48) बांग्लादेश 👉NSI
National security intelligence
(49) अमेरिका 👉CIA
Central intelligence agency
(50) इराण 👉 साबाक
गोपाळ कृष्ण गोखले
1.जन्म - चिपळूण 1 मे 1866
2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे".
3.महात्मा गांधी पुण्यात आले. तेव्हा पहिले टिळक आणि नंतर लगेच गोखलेंना भेटले.गांधींचे "राजकीय गुरू" गोखले.
4.आपल्याला गोखल्यांच्या चित्रामध्ये एक 'उपरण' दिसते. ते सुद्धा त्यांना रानडेनी दिले होते.
5. गोखले 1884 ला मुंबई विध्यापिठातून बी.ए पास झाल्यावर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्यांची शिक्षा झाली. त्या साठी पुण्यातून टिळक फंड गोळा होत होता.त्या साठी गोखले शिकत असलेल्या कॉलेज मधील मुलांनी शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरोर("भ्रांतिकृत चमत्कार") नाटक बसवले. त्यात गोखलेंनी "गोसावणीची" भूमिका केली.
6.नंतर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली.(35 रु महिना पगार)
7.आगरकर यांच्या "सुधारकचे" ते इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.
8.1890 ला "सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी" झाले.
9.1895 ला त्यांनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला.
10.भारताच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या वेलबी कमिशन समोर गोखलेंनी साक्ष दिली.
(साक्ष देणारे इतर - सुरेंद्रनाथ ब्यानर्जी, सुब्रह्मामण्यम अय्यर,वाच्छा)
11.1902 ला फर्ग्युसनचे काम सोडले.
12.बंगालची फाळणी झाल्यावर इंग्लंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने त्यांना इंग्लंडला पाठवले.
13.1905 च्या "वाराणसी" काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.
14.12 जून 1905 ला पुण्यात भारतीय सेवक समाजची स्थापना केली.
( सहकारी - अनंत विनायक पटवर्धन,गोपाळ कृष्ण देवधर,नरेश अप्पा द्रविड)
15.सभासद होण्यासाठी पदवीधर अट घातली.
16.27 डिसेंबर 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये ज्या ठरवामुळे फूट पडली,त्या ठरावाचा मसुदा गोखलेंनी तयार केला होता.
गोखले बद्दल उद्गार -
"तोफखाण्यासमोर मी उभा राहील गोखलेंशी कसा सामना करावा यांची चिंता वाटते." - लॉर्ड किचनेर(ब्रिटिश लष्कर अधिकारी)