23 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे
◾️2023 मध्ये भारतामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक 43% नी कमी
◾️2023 ला 28 बिलियन डॉलर एवढा FDI आला ( 2022 ला 49 बिलियन$ होता)
◾️2023 ला 15 वा रँक आहे ( 2022 ला 8 वा rank होता)
◾️2023 जगातील सर्वात जास्त FDI वाले देश
⭐️अमेरिका
⭐️चीन
⭐️सिंगापूर
⭐️15 वा क्रमांक भारत आहे

❇️ United Nations Trade and Development (UNCTAD)
◾️ही व्यापार आणि विकासाशी संबंधित UN ची आघाडीची संस्था आहे.
◾️विकसनशील देशांना, विशेषत: अल्प विकसित देशांना आणि संक्रमणाच्या स्थितीत असलेल्या देशांना जागतिक अर्थव्यवस्थेत फायदेशीरपणे समाकलित करण्यासाठी मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
◾️मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
◾️सदस्य : 195
◾️भारत याचा सदस्य देश आहे

🔖 काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा
क्रमांक

▪️ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक
▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया
▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159
▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना 
• भारत 99 वा.
▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126
▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा
▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा
▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा
▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा
▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा
▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा
▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा
▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा
▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.

❇️ 23 जून : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस

◾️थीम 2024  ' let's shake and celebrate'
◾️भारताने कुस्तीमध्ये सात ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत👇👇👇

🤼 1952 : केडी जाधव
🤼 2008: सुशील कुमार
🤼 2012 :  सुशील कुमार
🤼 2012 : योगेश्वर दत्त
🤼 2016 : साक्षी मलिक
🤼 2020 : रवी कुमार दहिया
🤼 2020 : बजरंग पुनिया
⭐️साक्षी मलिक एकमेव महिला
⭐️सुशील कुमार 2 वेळा जिंकला आहे
🧘‍♀ राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी
🤺 राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट
🤾 आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल
🏋‍♀ जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून

-------------------------------------------

22 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील
◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत
◾️नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी
◾️1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते
◾️37 वर्षे पेक्षा जास्त काळ ते सेवा करत आहेत
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️30 जून ला एनएस राजा सुब्रमणि लष्कर उपप्रमुख बनतील
◾️30 जून ला उपेंद्र द्विवेदी लष्कर प्रमुख बनतील

❇️ नागालँडमध्ये 20 वर्षांनंतर नागरी निवडणुका होणार,
◾️महिलांना 33% जगा स्थानिक स्वराज संस्था निवडणूक मध्ये राखीव असतील
◾️2004 मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक झाली होती
◾️आता त्यांनतर आता 20 वर्षांनी होणार आहे (26 जूनला होणार)

❇️ सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी गुजरातला पुरस्कार
◾️पाहिले पवनऊर्जा क्षमता जास्त असलेली राज्ये
◾️गुजरात: 11,823 मेगावॅट 
◾️तामिळनाडू : 10743 मेगावॅट
◾️कर्नाटक :6312 मेगावॅट

❇️ जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र, उत्तरप्रदेश मध्ये
◾️उत्तर प्रदेशने महाराजगंज जिल्ह्यात आशियाई  गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले आहे .
◾️2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात आले आहे.

❇️ काही महत्वाचे लक्षात ठेवा
◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि
◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर
◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क
◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ
◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क
◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु
◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद
◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली
◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड
◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP)

------------------------------------------

21 June 2024

एमपीएससी-महाराष्ट्राचा इतिहास



बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्या शालेय विषयातले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रसारखे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे विषय असतात, पण हेच विषय आपल्या पुढच्या अभ्यासाचा आणि आयुष्याचा पाया आहे. त्यात प्रामुख्याने १८८५ ते १९४७ पर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचा समावेश होतो. यात खालील घटकांचा समावेश होतो. मुख्यत्वे 'महाराष्ट्राच्या इतिहासा'चा प्रभाव जाणवतो.

० महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
० महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणा
० राजकीय पुढाऱ्यांचे कार्य/ समाजसुधारकांचे कार्य
० वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्थांचे कार्य
० महाराष्ट्रातील चळवळी

या सर्व घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

१९ व्या शतकात सामाजिक जागृतीची सुरुवात महाराष्ट्र व बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यात प्रामुख्याने प्रार्थनासमाज (न्या. रानडे), आर्य समाज (स्वामी दयानंद सरस्वती) व सत्यशोधक समाजाची (महात्मा फुले) स्थापना महाराष्ट्रात झाली. नंतरच्या काळात थिऑसॉफिकल सोसायटी (डॉ. अॅनी बेझंट), रामकृष्ण मिशन (स्वामी विवेकानंद)च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित, कष्टकरी व दलित समाजासाठी विशेष कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीसोबतच बहुजन समाजाचा विकास व्हावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.

ब्रिटिश काळात मुंबई हे कापूस व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १८८० साली नारायणराव लोखंडे यांनी कामगारांसाठी मिल हॅण्ड असोसिएशन सोसायटीची स्थापना केली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे, व्यापार व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी केल्या. १९२० मध्ये टाटांचा जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे सुरू झाला.
महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी 'डेक्कन पेपर मिल' १८८७ मध्ये सुरू झाली. २३ डिसेंबर १९४० रोजी वालचंद हिराचंद या महाराष्ट्रीय उद्योजकाने 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट' ही विमान कंपनी स्थापन केली. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र सामाजिक व आर्थिक सुधारणेत देशात आघाडीवर होता. या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या सुधारणांना कारणीभूत असणाऱ्या संघटना, त्यांची स्थापना, संघटनेशी संबंधित नेते याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.

स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असलेले महाराष्ट्रातील राजकीय पुढारी व समाजसुधारक यांच्या नेतृत्वावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसे- 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या आशयाचा 'केसरी'तून लेख लिहिणारे लोकमान्य टिळक, महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, 'मुंबईचा सिंह' म्हणून ओळखले जाणारे फिरोजशहा मेहता, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी, 'भूदान चळवळी'चे नेते विनोबा भावे, मातृभूमीसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे स्वा. सावरकर यांसारख्या नेत्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, त्यांचे जन्मवर्ष, जन्मठिकाण याबाबत प्रश्न विचारले जातात.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रवादाची भावना निर्माण करणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचे घटक म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांत सुरू झालेली वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके व समाजसुधारकांनी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक चळवळी. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतून पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले.

लोकहितवादींनी 'शतपत्रे', 'प्रभाकर' मासिकातून प्रसिद्ध करून राष्ट्रवादाला चालना दिली. टिळक-आगरकरांनी 'केसरी', 'मराठा' व 'सुधारका'तून राजकीय स्वातंत्र्याचा व समतेचा पुरस्कार केला. गांधीजींनी 'यंग इंडिया' साप्ताहिकातून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला.
या राष्ट्रवादी चळवळीसोबत १८४८ साली महात्मा फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. १८८० व १८८१ साली आगरकरांनी अनुक्रमे न्यू इंग्लिश स्कूल व फग्र्युसन कॉलेजची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी शैक्षणिक संस्था काढून मोठय़ा प्रमाणावर वैचारिक क्रांती घडवून आणली. या सर्वावर अनेक प्रश्न विचारले जातात.

यात प्रामुख्याने महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना एकत्र आणून त्यांच्या हक्काबाबत जागृतीचे केलेले कार्य, त्यांनी स्थापन केलेली 'इंडिपेंडंट लेबर पार्टी', महाड येथे केलेला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह', आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळी, १८५७ च्या उठावातील तात्या टोपे, नानासाहेब पेशवेंसारखे क्रांतिकारी नेते, १९१३ साली लाला हरदयाल यांनी केलेली 'गदर पार्टी'ची स्थापना, स्वा. सावरकरांनी स्थापन केलेली 'अभिनव भारत संघटना', चापेकर बंधूंचे कार्य, राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीतील विविध संघटना, क्रांतिकारकांनी लिहिलेली पुस्तके, आत्मचरित्रे त्यांनी

आखलेले काकोरी कट, चितगाव कटासारख्या घटना, फासावर गेलेले क्रांतिवीर यांसारख्या अनेक घटनांवर प्रश्न विचारले जातात.

भारतातील विविध कामगार संघटना, त्यांचे नेते, 'मिरज खटला', आयटक व इंटकसारख्या संघटनांची स्थापना, शेतकरी चळवळी, दुष्काळी काळात सारा वसुलीबाबत इंग्रजांनी अवलंबलेले सक्तीचे धोरण, त्यातून १८७५ मध्ये डेक्कनचे दंगे झाले.

सेनापती बापट यांनी 'मुळशी सत्याग्रह' सुरू केला. आदिवासींच्या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले, भिल्ल, कोळी, सावंत यांनी इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रात उठाव केला. त्याचे क्षेत्र व कार्य याबाबत प्रश्न विचारले जातात.

यासाठी आपणास जयसिंगराव पवारलिखित 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, याशिवाय पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके, महात्मा गांधी 'माझे सत्याचे प्रयोग', स्टडी सर्कलची विविध पुस्तके यांचा आपणास सदरच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.

समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

📚 आर्य महिला समाज - 1882
       पंडिता रमाबाई

📚 सत्यशोधक समाज —1873
      महात्मा फुले

📚 सार्वजनिक समाज - 1872
      आनंदमोहन बोस

📚 नवविधान समाज —1880
      केशवचंद्र सेन

📚 भारत सेवक समाज-1905
      गोपाळ कृष्ण गोखले

📚 भारत कृषक समाज-1955
      पंजाबराव देशमुख

📚 ब्राह्मो समाज —1828
      राजाराम मोहन रॉय

📚आदी ब्राह्मो समाज — 1865
     देवेंद्रनाथ टागोर

📚 भारतीय ब्राह्मो समाज —1865    
      केशवचंद्र सेन

📚 तरुण ब्राह्मो समाज - 1923    
      वि. रा. शिंदे

📚 प्रार्थना समाज - 1867
      आत्माराम पांडुरंग तर्खडकर

📚 आर्य समाज —1875
       स्वामी दयानंद सरस्वती

📚 आर्य समाज शाखा कोल्हापूर-1918   
      शाहू महाराज

रघुनाथ धोंडो कर्वे

✅ रघुनाथ धोंडो कर्वे ✅

✅  (जानेवारी १४, इ.स. १८८२ - ऑक्टोबर १४, इ.स. १९५३)

✅ हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

✅ हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत.

✅बालपण आणि तारुण्य ✅

र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली.

 इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.. इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत.

 याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.

इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.

✅संततिनियमन: रघुनाथ धोंडो कर्वे ✅

संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले.

 वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले.

नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली.

इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले.


  •  स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृतीनिर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला

सतीबंदी कायदा (1829)


🔷 सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.

🔷 ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.

🔷 नतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्व प्राप्त झाले.

🔷 पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.

🔷 काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.

🔷 ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.

🔷 ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.

🔷 काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.

🔷 काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.

🔷 सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला.

🔷 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात

 

  • वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले.
  • त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले.
  • या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली.
  • त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
  • ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.
  • प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला.
  • र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.

युरोपियनांचे भारतात आगमन :-

  • पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे.
  • परंतु 1453 मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला.
  • आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते.
  • या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.
  • वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला.
  • या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.
  • 1615 मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना 100 टक्के फायदा मिळत होता. पुढे 1717 साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-

  • ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.
  • पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली.
  • त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.
  • त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.
  • भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.
  • याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.
  • सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.
  • दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.
  • इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
  • त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.
  • डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.
  • यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-

  • व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.
  • भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
  • 17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.
  • ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.
  • इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

पहिले कर्नाटक युध्द (1746-1748) :-

  • युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.
  • आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.
  • डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.
  • फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.
  • या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.
  • मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.
  • शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.
  • अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
  • कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.
  • मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.
  • त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.
  • या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.
  • या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.
  • परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.
  • या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754) :-

  • कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.
  • भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.
  • या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.
  • ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.
  • हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.
  • याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
  • या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.
  • एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.
  • कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली.  
  • चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
  • परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.
  • त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.
  • राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.
  • जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.
  • 1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
  • जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.
  • मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.
  • 30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.

   तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763) :-

  • 1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.
  • फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
  • त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
  • काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.
  • कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.
  • दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.
  • खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.
  • युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.
  • कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-

  • इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.
  • पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.
  • इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.
  • इ.स. 1798 मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.
  • भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.
  • टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला.
  • निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.
  • टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
  • र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.
  • एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.
  • डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
  • वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

इग्रज - फ्रेंच संघर्ष : फ्रेंच पराभूत

🔺 सन १६५० साली स्पेनने पोर्तुगालचा पराभव केल्याने हिंदुस्तानातील पोर्तुगीज व्यापाराला मोठा धक्का पोहोचला. याच सुमाराला युरोपात इंग्लंडने हॉलंडचा पराभव केल्याने हिंदुस्तानातील डच व्यापारी निष्प्रभ झाले. १६५४ साली आता हिंदुस्तानातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.


🔹* मद्रास किनाऱ्यावर पाँडेचेरी येथे फ्रेंच व्यापारी सत्तेचे प्रमुख ठिकाण होते. या ठिकाणी १७४२ साली हिंदुस्तानातील फ्रेंच हेच सत्तेचा गवर्नर म्ह्नणून डूप्ले या हुशार मुत्सद्याची नेमणूक केली. अशाच प्रकारचे पहिले इंग्रज फ्रेंच युद्ध मद्रास किनाऱ्यावर सन १७४६ - ४८ या काळात खेळले गेले. फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रास जिंकून घेऊन त्याच्यावर सरशी केली.


🔸* मोगलांचा दक्षिणेचा कर्तबगार सुभेदार निजाम उल्मुक याने बादशाहचे नाममात्र वर्चस्व स्वीकारून दक्षिणेत आपल्या हैदराबादेच्या राज्याची स्थापना केली होती. सन १७४८ साली निजाम मृत्यू पावला आणि मग त्याच्या गादीवर बसण्यासाठी त्याच्या वारसदाराकडे झगडा सुरु झाला. फ्रेंचांनी या दोन्ही राज्यांच्या हस्तक्षेप करून अवघ्या दोन वर्षाच्या आत कर्नाटकाच्या नावाबीवर व हैद्राबादच्या राज्यावर आपले स्थापन केले. १७४९ - ५० अशाप्रकारे दक्षिणेत डूप्ले व बुसी या दोन फ्रेंच अधिकाऱ्यांनी हिंदी राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.


🔹* हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात निर्माण झालेली फ्रेंचाचे वर्चस्व पूर्णपणे नष्ट झाले. व निजाम इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला. पुढे १७६३ साली परिसचा तह झाला. त्या अन्वये इंग्रजांनी फ्रेंचांनी पोंडेचेरी वगैरे ठाणी परत केली. पण येथून फ्रेंच सत्ता हिंदुस्तानात वाढू शकली नाही

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे

🔹 महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.?

Ans : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण 


🔹 पथ्वीवर गोलार्ध किती आहेत?

Ans : दोन (उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध) 


🔹 पाठीच्या मणक्याची संख्या किती?

Ans : 33 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 राज्यसभेच्या सदस्याची वयाची अट किती वर्ष?

Ans : 30 वर्ष 


🔹 GPRS->?

Ans : General packet radio service 


🔹 जागतिक बँकेचे ठिकाण कुठे आहे?

Ans : वाशिंग्टन (अमेरिका) 


🔹 मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?

Ans : दर्पण 


🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Ans : शेकरू 


➡️ पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

👉 राजस्थान


➡️ कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

👉 सिक्किम


➡️ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

👉 मध्य प्रदेश


➡️ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

👉 नदुरबार


➡️ कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

👉 करळ


➡️ महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

👉 पर्व विदर्भ


➡️ राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

👉 अहमदनगर


➡️ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

👉 नर्मदा


➡️ 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

 👉 कष्णा


 ➡️महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

 👉 ९%


 ➡️महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

 👉 उत्तर सीमेला


➡️ महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

👉 ७२० किमी


➡️ कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

👉 पचगंगा


➡️ महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

👉 ४४० कि.मी.


➡️ महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

👉 पारनेर (अहमदनगर जिल्हा)


🔹 महाराष्ट्रातील केळीच्या बागा:

Ans : जळगाव 


🔹 महाराष्ट्रातील सर्वात मोठी बंदरे कोणती?

Ans : मुंबई, न्हावा-शेवा व रत्‍नागिरी ही महाराष्ट्रातील ३ मोठी बंदरे आहेत 


🔹 भारतीय असंतोषाचे जनक:

Ans : लोकमान्य टिळक

  

🔹 सर्वात पाचीमेकडील नदी कोणती?

Ans : लुनी 


🔹 भारतात व्यापारासाठी सर्वप्रथम कोण आले?

Ans : पोर्तुगीज 


🔹 एलपीजी चा प्रमुख घटक कोणता?

Ans : ब्युटेन 


🔹 जीवाणू किती प्रकारचे असतात?

Ans : 3 प्रकारचे 


🔹 आधुनिक भारताचे शिल्पकार:

Ans : पंडित जवाहरलाल नेहरू 

  

🔹 परस्काराची सुरवात: ज्ञानपीठ पुरस्कार:

Ans : 1965 


🔹 अमेरिकेच्या नवीन राष्ट्राध्यक्षाना कोणत्या दिवशी शपथ दिली जाते?

Ans : 20 जानेवारी 

विज्ञान प्रश्न उत्तरे सामान्यज्ञान

◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढ-या पेशी

◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◼️ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◼️ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

 अतिथंड हवामानात पाण्याचे नळ ( पाईप ) का फुटतात ?
पाण्याचे बर्फ होताना ते प्रसरण पावते.

 कात्री ही कोणत्या प्रकारच्या तरफेचे उदाहरण आहे ?
तिस-या.

 नैसर्गिकरित्या सापडणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
हिरा.

वायुविरहित इलेक्ट्राॅनिक्स गॅस लायटर कोणत्या तत्वावर काम करते ?
फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट.

 'होमिओपॅथी' चा जनक कोण ?
हायेनमन.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

यकृत शरीर रचना


👉यकृत उदर पोकळीच्या उजव्या-उजव्या भागामध्ये डायाफ्रामच्या खाली आणि पोट, उजवीकडे मूत्रपिंड आणि आतड्यांच्या वर स्थित आहे.


👉शकूच्या आकाराचे, यकृत हे एक गडद लालसर तपकिरी अवयव असते ज्याचे वजन सुमारे 3 पौंड असते.


यकृतला रक्तपुरवठा करण्यासाठी 2 भिन्न स्त्रोत आहेत ज्यात पुढील गोष्टी आहेत:


🌿हिपॅटिक रक्तवाहिन्यामधून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहते


🌿हिपॅटिक पोर्टल शिरामधून पौष्टिक समृद्ध रक्त वाहते


🌷यकृत कोणत्याही क्षणी शरीराच्या जवळजवळ एक पिंट (13%) रक्तपुरवठा ठेवतो.


🌷 यकृतमध्ये 2 मुख्य लोब असतात. हे दोन्ही 8 विभागांनी बनलेले आहेत ज्यामध्ये 1000 लोब्यूल (लहान लोबल्स) आहेत. 


🌷ह लोब्यूल्स लहान नलिका (ट्यूब) शी जोडलेले आहेत जे मोठ्या नळ्यांसह जोडतात ज्यामुळे सामान्य हिपॅटिक नलिका तयार होते.


🌷 सामान्य हिपॅटिक नलिका यकृत पेशींनी बनविलेले पित्त पित्तनलिका आणि पक्वाशया (लहान आतड्याचा पहिला भाग) सामान्य पित्त नलिकामार्गे वाहतूक करते.


🌹🌹यकृत कार्य🌹🌹


👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.


खनिज संपत्ती :


१. मँगेनीज:- भारतातील मँगेनीजच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ४०% मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. तसेच मँगेनीज उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.

जिल्हे - नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग.


२. बॉक्साईट- भारतातील बॉक्साईटच्या एकूण उत्पादनापैकी २०% उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रात जवळ जवळ ८० दशलक्ष टन इतका बॉक्साईटचा साठा आहे. -

जिल्हे - कोल्हापूर, सातारा, सांगली, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.


३. कायनाईट - देशातील कायनाईटच्या एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा १५% इतका आहे. 

जिल्हा - भंडारा.


४. क्रोमाईट - देशातील एकूण क्रोमाईटच्या साठ्याच्या १०% इतका साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर.


५. डेलोमाईट - देशातील एकूण साठ्यांपैकी ९% डेलोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे.

जिल्हे - रत्नागिरी, यवतमाळ.


६. चुनखडी - देशातील एकूण चुनखडीच्या साठ्यापैकी ९% साठे महाराष्ट्रात आहेत.

जिल्हे - यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर.


७. दगडी कोळसा:- महाराष्ट्रात दगडी कोळशाचा साठा ५,००० दशलक्ष टन आहे. देशाच्या एकूण दगडी कोळशाच्या साठ्याच्या तो ४% इतका आहे.

जिल्हे - नागपूर, चंद्रपूर,


८. लोहखनिज- भारताच्या एकूण लोहखनिज साठ्यांपैकी २% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. 

जिल्हे - चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, सिंधुदुर्ग.


९. ग्रॅनाईट - गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सापडतो.


१०.तांबे - नागपूर व यवतमाळ जिल्हयात अत्यल्प प्रमाणात सापडते.


११.अधक - सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडते.


१२.टंगस्टन - नागपूर जिल्ह्यात सापडते.


१३.बेसॉल्ट खडक - दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.


महाराष्ट्रातील भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, 

डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, 

शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला 'गोंडवना खडक' असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग


1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी. 


विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र -  पितळ

धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)


उपयोग - भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - ब्राँझ

धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)  


उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता 


संमिश्र - जर्मन सिल्व्हर  

धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%) 


उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो. 


संमिश्र - बेल मेटल  

धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%) 


उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता 


संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - गनमेटल  

धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%) 


उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचे प्रकार व उपयोग :

लोखंडाचे तीन प्रकार पडतात. 


ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. 


नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो. 


पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो. 


लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र - स्टेनलेस स्टील

धातू - लोखंड, क्रोमीअम, कार्बन


उपयोग - तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता 


संमिश्र - टंगस्टन स्टील  

धातू - लोखंड, टंगस्टन व कार्बन


उपयोग - जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.


संमिश्र - मॅगनीज स्टील

धातू - लोखंड व मॅगनीज 


उपयोग - कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता. 


संमिश्र - क्रोमीअम स्टील

धातू - लोखंड व क्रोमीअम


उपयोग - बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता 


चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता 


विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता. 


रुपेरी रंग तयार करण्याकरिता. 


अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र - ड्युरालयुनिम

धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज 


उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता. 


संमिश्र - मॅग्नेलियम

धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम


उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता. 


संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.


संमिश्र - अल्किनो

धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल 


उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता. 


विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो. 


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात. 


बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात. 


आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.


उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात. 


शोभेच्या दारूमध्ये.


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता. 


धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता 


चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो. 


छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता. 


विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.



9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.  


दारूगोळा तयार करण्याकरिता.  


विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता. 


विद्युत परीपथकात वितळतार करण्यास. 


अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.    


डाग देण्याचा धातू व सहज


कृत्रिम वायू इंधने :- 


1) कोल गॅस – दगडी कोळशाच्‍या भंजक ऊर्ध्‍वपतनाने हा वायू मिळवितात. इंधन म्‍हणून व प्रकाशासाठी त्‍याचा उपयोग करतात. हा वायू विषारी आहे. यातील घटकांचे प्रमाण – हायड्रोजन (H2) (40% ते 50%) + मिथेन (CH4) (30% ते 35%) + कार्बन मोनॉक्‍साईड (CO) (5% ते 10%) + C2H + C2H2 (2% ते 4%) + नायट्रोजन N2 (6% ते 8%) + कार्बन डायॉक्साईड (1% ते 2%).


इंधन मूल्‍य – 1000 घन फूट (27 घन मीटर) वायूपासून 1000 कॅलरी उष्‍णता मिळते.


2) ऑईल गॅस – हा वायू केरोसीनचे भंजन करून मिळतो. प्रयोगशाळेत व लघुउद्योगात त्‍याचा वापर होतो.


3) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून मिळवितात. त्‍यात प्रोपेन, ब्‍युटेन, इलिथीन आणि ब्‍युटीलीन यासारखे हायड्रोकार्बन असतात. घरगुती वापरासाठी इंधन म्‍हणून व प्रयोगशाळेत वापरतात.


4) वॉटर गॅस – CO आणि H2 हे याचे प्रमुख घटक आहेत. कार्बन मोनॉक्‍साईड (45%) + हायड्रोजन (45%) + N2 + Co2 + CH4 (10%) या वायूला ‘नील वायू’ असे म्‍हणतात. इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 3560 कॅलरी उष्‍णता मिळते.


5) प्रोड्यूसर गॅस – CO + N2 यांच्‍या मिश्रणास प्रोड्यूसर गॅस म्‍हणतात. नायट्रोजन (65.3%) + कार्बन मोनॉक्‍साईड (34.7%) इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 1130 कॅलरी उष्‍णता मिळते. काचनिर्मिती भट्टयांत या गॅसचा उपयोग करतात.

बहमनी साम्राज्य 1347- 1538


 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली


◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347). 


◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण 


◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. 


◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.


◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता


◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली. 


◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.


🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही


◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.


◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.


◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.


◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.


◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.


◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या


◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.


◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे


चालू घडामोडी सराव प्रश्न 21 जून 2024

प्रश्न.1) महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा देण्यात आला ?

उत्तर – राजुरेश्वर गणपती - हे देवस्थान जालना जिल्ह्यात आहे.

प्रश्न.2) भारतीय लष्कराने नुकतीच कोणती देखरेख प्रणाली सुरू केली ?

उत्तर – विद्युत रक्षक

प्रश्न.3) भारतातील पहिला शहरी रोपवे कोणत्या शहरात सुरू होणार ?

उत्तर – वाराणसी

प्रश्न.4) IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – रींटू बॅनर्जी

प्रश्न.5) अलीकडेच बातम्यांमध्ये चर्चेत असलेले पेट्रोडॉलर डील कोणाशी संबंधित आहे ?

उत्तर– USA - Saudi Arabia

प्रश्न.6) महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर– नवल बजाज

प्रश्न.7) अलीकडेच सेंट्रल बँकिंग लंडनच्या प्रकाशनाने 'रिस्क मॅनेजर ऑफ द वर्ष पुरस्कार 2024' कोणाला दिला ?

उत्तर – RBI

प्रश्न.8) नुकतेच भारत सरकारने कोणत्या पूर्व आशियाई देशासोबत पहिली थेट विमानसेवा सुरू केली ?

उत्तर– कोलंबिया

प्रश्न.9) ICC ने जाहीर केलेल्या टी २० अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत कोणी प्रथम स्थान पटकावले ?

उत्तर – मार्कस स्टॉयनिस

प्रश्न.10) जागतिक निर्वासित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर – 20 जूनला - 2024 ची थीम - "Hope Away From Home: A World Where Refugees Are Always Included"

20 June 2024

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना


👉 1. महंमद गझनवी :-

अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता. 


👉 सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला. 


👉 तयाने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता. 


👉 तयाने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली. 


 2. महंमद घुरी 


👉 महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्‍यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले. 


👉 सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली. 


👉 तयाने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली. 


👉  अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.


 3. कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :
 
👉 सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. 

👉 याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली. 

👉 सन 1210 मध्ये तो मरण पावला. 

👉 तयाच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.


👉 4. शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :

कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली. 

👉 बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली. 

👉 अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. 

👉 अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.


👉 5. रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :

अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती. 

👉 परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते. 

👉 दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती. 

👉 सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.


 6. गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :

👉 रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला. 

👉 तयाने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली. 

👉 तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला. 

👉 उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.


👉 8. अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :


👉 अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला. 

👉 सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय. 

👉 अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-

👉 सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली. 

👉 तयानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला. 

👉 सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला. 

👉 अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला. 

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-

👉 महसूल व्यवस्थेत सुधारणा :-
अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.

👉बाजार नियंत्रण व्यवस्था :-

👉 सन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली. 

👉 या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे. 

👉 तयाकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.


👉 9. गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला. 

👉 वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.

👉 ह सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही. 

👉 तयाचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.



👉 10. महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-

👉 महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले. 

👉 दआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-
दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्‍यांवर कराची वाढ केली. 

👉 ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्‍यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले. 

👉 दवगिरी भारताची राजधानी (1326) :-
दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.

👉 सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. 

👉 परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. 

👉 या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.
चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-
महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली. 

👉 लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला. 

👉 बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.


👉 11. फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-

👉 महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता. 

👉 तयाने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले. 

👉 फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले. 

👉 सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही. 

👉 तयानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली.