Thursday 16 May 2024

चालू घडामोडी :- 16 मे 2024


◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो.

◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले.

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत.

◆ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे.

◆ भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो.

◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे.

◆ टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे.

◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या.

◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

◆ लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Wednesday 15 May 2024

चालू घडामोडी :- 15 मे 2024

◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे.

◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्यंतची सर्वाधिक 10 हजार पेसोची नोट चलनात आणली आहे.

◆ जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप चे चौथ्यांदा उड्डाण कऱण्यात येत असून हे रॉकेट SPACE X या कंपनीने बनवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी क्रमवारी 2024 मध्ये देशातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पहिल्या 200 मध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था 162व्या स्थानी आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये सिंगापूर या देशाच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये केरळ राज्यातील महात्मा गांधी विद्यालय यांनी 81वे स्थान पटकावले आहे.

◆ अमेरिकन कॉलेज ऑफ इंडोक्रिनोलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे "डॉ. शशांक जोशी" हे अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत.

◆ वकील हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.

◆ पुण्यातील उद्योजक रवी पंडित यांनी फोबर्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

◆ 13 ते 15 मे दरम्यान नेदरलँड या देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले जात आहे.

◆ इंडोनेशिया या देशातील माऊंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.

◆ भारतीय नौकायन संघटनेने सीनियर नॅशनल नौकानयान स्पर्धा 2024 आयोजन मुंबई येथे केले आहे.

◆ भारताचा 85 वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरलेला पी. श्याम निखिल हा तामिळनाडू राज्याचा खेळाडू आहे.

◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 15 मे रोजी साजरा करण्यात येतो.

◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 ची थीम "family and climate change" ही आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

रग्युलेटिंग ऍक्ट १७७३


🔶बरिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता.

 🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली.

🔶लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता.त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला.

🔶 इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अॅक्ट १७७३ असे म्हणतात.

🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 

🔶बगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. 

🔶मद्रास व मुंबईचे राज्यपाल  त्यांच्या अमलाखाली आले.कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली.

🔶कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत.

🔶हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता.

परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या.

🔶या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

🔶अमेंडिंग ऍक्ट १७८१ द्वारे यात काही सुधारणा करण्यात  आल्या.


पोलीस भरती प्रश्नसंच

 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1. बिहार

2. उत्तर प्रदेश

3. राजस्थान🎯

4. महाराष्ट्र


भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

1. कोयना

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा🎯


२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?

1. १६ वी

2. १५ वी🎯

3. १८ वी


आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?

1. भूज (गुजरात)🎯

2. कच्छ (गुजरात)

3. मुत्पनडल (तामिळनाडू)

4. मणिकरण (हिमाचल प्रदेश



पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?

1. तामिळनाडू🎯

2. उत्तर प्रदेश

3. महाराष्ट्र



सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?

1. बिहार

2. मध्यप्रदेश🎯

3. राजस्थान

4. महाराष्ट्र



महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

1. मुंबई प्रांत🎯

2. मराठवाडा प्रांत

3. कोकण प्रांत

4. विदर्भ प्रांत


विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?

1. २५०

2. २६७

3. २८८🎯

4. २४०


चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अमरावती🎯

2. अहमदनगर

3. नाशिक

4. सातारा


महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गोदावरी

2. गंगा

3. कोयना

4. कृष्णा🎯


माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रायगड🎯

2. पुणे

3. औरंगाबाद

4. सातारा


प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1. कोल्हापूर🎯

2. जालना

3. अकोला

4. धर्माबाद


देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सातारा

2. सांगली

3. सिंधुदुर्ग🎯

4. बीड


मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?

1. सन १८५७🎯

2. सन १९४८

3. सन १८६०

4. सन १९२५


खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.

1) वज्रेश्वरी🎯

2) राजवाडी

3) आसवली

4) उन्हेरे

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :

🎯सवरूप -

जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -

जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -

स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -

भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

अॅनी बेझंट यांची होमरुल लीग

(स्थापना सप्टेंबर १९१६)

> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,

उत्तर व दक्षिण भारत.

> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.

कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.

> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून

द्यायचे.

> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.

> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -


 मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.

> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका

भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.

बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.

> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

ससदीय प्रणाली व अध्यक्ष प्रणालीचा तुलनात्मक अभ्यास.

🔵 ससदीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️या प्रणालीमध्ये धोरणे व कृतींसाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते.

1. बहुमताच्या पक्षाची सत्ता

2. सामूहिक जबाबदारीचे तत्त्व

5. राजकीय एकजिनसीपणा : एकच राजकीय विचारसरणी

4. दुहेरी सदस्यत्व : संसद सदस्य मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळ व कायदेमंडळ दोहोंचे सदस्यत्व.

5. पंतप्रधानाचे नेतृत्व

6. कनिष्ठ गृहाचे विसर्जन करता येते

7. अधिकारांचे एकत्रीकरण.


🔵 अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये

▪️यथे घटनात्मकदृष्ट्या कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळापासून स्वतंत्र असते.

1. अध्यक्ष आणि सभासद यांची निश्चित

कालावधीसाठी निवड.

2. सामूहिक जबाबदारी नाही.

3. राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नाही.

4. एकेरी सदस्यत्व

5. अध्यक्षाचे नेतृत्त्व

6. अधिकारांची विभागणी


✅ ससदीय प्रणालीचे फायदे

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात सामंजस्य.

2. उत्तरदायी सरकार.

3. विस्तृत प्रतिनिधित्व


✅ अध्यक्षीय प्रणालीचे फायदे

1. स्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये निश्चितता.

3. अधिकार विभागणीवर आधारित.

4. तज्ज्ञांचे सरकार.


🔴 ससदीय प्रणालीमधील उणीवा

1. अस्थिर सरकार.

2. धोरणांमध्ये सातत्याचा अभाव.

3. अधिकार विभागणीच्या तत्त्वाविरोधी.

4. नवशिक्यांचे सरकार.

👉 उदा.बहुतांशी युरोपीय राष्ट्र, जपान, कॅनडा, भारत, मलेशिया, स्वीडन.


🔴 अध्यक्षीय प्रणालीमधील उणीवा

1. कार्यकारी मंडळ व कायदेमंडळ यांच्यात संघर्ष.

2. उत्तरदायी सरकार नाही.

3. एकाधिकारशाही 

4. संकुचित प्रतिनिधित्व.

👉 उदा :- अमेरिकन राष्ट्रे काही अपवादसह (उदा. कॅनडा), अफगाणिस्तान, ब्राझील, घाना, मालदीव, रशिया, फिलिपिन्स, तुर्की, बेलारुस, सायप्रस, श्रीलंका.

प्रार्थना समाज


✔️बराम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली.

✔️1867 मध्ये केशवचंद्र सेनच्या प्रेरणेने मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

✔️आत्माराम पांडुरंग 1823-1898 नावाच्या सुधारक वृत्तीवरच्या व्यक्तीने हा समाज स्थान करण्याच्या कामी पुढाकार घेतला प्रार्थना समाजपचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे होते.

✔️परार्थना समाजातील सभासद स्वत:ला प्रार्थना समाजाचे स्वरुप ब्राहो समाजापेक्षा वेगळे असे मानीत नव्हते, तर हिंदू धर्मातील एक चळवळ मानीत.

✔️थोडक्यात प्रार्थना समाजाची श्रध्दा पूर्णपणे हिंदू धर्मावर होती.

✔️एकेश्र्वरवादाच्या सिध्दान्ताव्यितिरिक्त समाज सुधारण हे उद्दिष्ट मानून प्रार्थना समाजाने विश्र्वासापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला.

✔️मानव सेवा हीच खरी ईश्र्वराची भक्ती असे प्रार्थना समाजाचे मत होते.


🔰समाज सुधारणेच्या बाबतीत प्रार्थना समाजाने आपल्या समोर चार उद्देश ठेवले

१. जातिभेद निर्मूलन

२. बालविवाह प्रतिबंध,

३. विधवा विवाह

४. स्त्री शिक्षण

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.


🧩लोकसंख्या :

1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद

🧩निवडणूक -

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

🧩कार्यकाल -

🅾5 वर्ष

🧩विसर्जन -

🅾कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

🧩आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

1857 नंतर ब्रिटिशांची राज्यपद्धती

  1. प्रशासकीय बदल   


०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल लॉर्ड कॅन्न्निंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून राणीचा जाहीरनामा वाचून दाखविला.


०२. १८५८ च्या कायद्यानुसार भारताची प्रशासनव्यवस्था इंग्लंडचा राजा कडे सोपविण्यात आली. भारताचा शासन प्रमुख गवर्नर जनरल याचे पदनाम बदलून त्यास व्हाईसरॉय असे नाव देण्यात आले.


०३. व्हाईसरॉयच्या मदतीसाठी व त्यास सल्ला देण्यासाठी ५ सदस्यांचे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल नियुक्त करण्यात आले. कौन्सिलचा सल्ला स्वीकारणे व नाकारणे यासंबंधीचा पूर्ण अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.


०४. कायदे विषयीसंबंधी इम्पिरियल लेजीस्लेटिव्ह कौन्सिल तयार केले. पुढे इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार व्हाईसरॉयला कौन्सिलमध्ये ६ ते १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. कौन्सिलने मंजूर केलेले कायदे व्हाईसरॉयच्या संमतीशिवाय मंजूर होत नसत.


०५. इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारतमंत्री या नव्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. भारतमंत्र्यावर भारताच्या प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली. भारतमंत्र्यांच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे इंडियन कौन्सिल देण्यात आले. भारतमंत्री लंडनमध्येच वास्तव्य करीत. परंतु त्याचा वेतनाचा खर्च भारत सरकारच्या खजिन्यातून करण्यात येत असे.


०६. व्हाईसरॉयने भारतमंत्र्याच्या आदेशानुसारच निर्णय घेतले पाहिजेत असे बंधन घालण्यात आले. १८७० नंतर व्हाईसरॉय व भारतमंत्री यांच्यात तात्काळ संपर्क व्हावा म्हणून भारत ते लंडन अशी थेट केबल सेवा प्रस्थापित करण्यात आली.


०७. भारतामध्ये प्रांत पाडण्यात आले. बंगाल, मद्रास, आणि मुंबई हे प्रांत प्रेसिडेन्सी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. प्रेसिडेन्सीचे प्रशासन ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कौन्सिलकडे सोपविण्यात आले. इतर प्रांताचे कारभार लेफ्टनंट गवर्नर व चीफ कमिश्नर यांच्याकडे सोपविण्यात आले. चीफ कमिश्नरची नियुक्ती व्हाईसरॉय करीत असे. इतर प्रांतांपेक्षा प्रेसिडेन्सी प्रशासनास जास्त अधिकार होते.


०८. इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे प्रांतिक एक्झिक्यूटिव्ह कौन्सिललाच लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे रूप देण्यात आले. लेजीस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये ४ ते ८ अशासकीय ब्रिटीश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. अर्थात, लेजीस्लेटिव्ह कौन्सिल हे निव्वळ सल्लागार मंडळ होते. अंतिम अधिकार केंद्राकडेच होते.


०९. इंडियन कौन्सिल एक्ट, १८९२ नुसार केंद्रीय लेजीस्लेटिव्ह कौन्सिलच्या सदस्यत्वामध्ये १२ ते १६ सदस्यांची वाढ करण्यात आली. हे सर्व शासकीय सदस्य होते.


१०. सर्व प्रांतिक सरकारे भारत सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली होती.या काळात प्राप्तीकर सुरु करण्यात आला. सर्व आयातीवर १०% आयातकर लादण्यात आला. मिठावरील कर वाढविण्यात आला. या काळात वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याची प्रथा सुरु करण्यात आली.


2. स्थानिक शासन पद्धत


०१. १८१६ व १८१९ साली स्थानिक शासनासाठी काही नियम मंजूर केले.


०२. १८५८ नंतर ब्रिटिशांनी नगर पालिका व जिल्हा लोकल बोर्ड अशा संस्था स्थापन करण्यास स्थानिक जनतेला उत्तेजन दिले.


०३. १८६४ ते १८६८ दरम्यान देशात स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या सदस्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. संस्थांच्या अध्यक्षपदी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली.


०४. लॉर्ड मेयोने १८७० साली स्थानिक स्वराज्य संस्थानच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रांतात म्युन्सिपल एक्ट मंजूर करून शासकीय व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदी शासन नियुक्त शासकीय सदस्य असेल याची दक्षता घेण्यात आली.


०५. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच स्वातंत्र्य दिले. मे, १८८२ मध्ये सरकारने लोकल बोर्डातील अशासकीय सभासदांची संख्या वाढविली. ग्रामीण व नागरी लोकल बोर्डात एक सामंजस्य निर्माण केले.


०६. कलकत्ता, मद्रास व मुंबई येथील महापालिकांचे कार्यक्षेत्र व कामकाज इतर जिल्ह्यांच्या नगरपालिकांपेक्षा सर्वस्वी वेगळे होते. १८ व्या शतकाच्या अखेरीस या महानगरांचे प्रशासन व कामकाज सुरळीत व्हावे म्हणून गवर्नर जनरलने प्रतिष्ठित व्यक्तींची जस्टीस ऑफ पीस म्हणून नियुक्ती केली. त्यांना न्यायालयीन कामकाज करता येत होते. त्याचप्रमाणे सफाई कामगार, वॉचमन यांच्या नेमणुका करण्याचे अधिकारही देण्यात आले होते.

लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५)



👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. 

कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. 

१८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. 

दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. 

१९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. 

कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. 

१८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. 

पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. 

कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. 

१९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. 

१९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. 

कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय.

 तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. 

सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. 

कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.


👉 कर्झनच्या शेती सुधारणा :

१९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. 

१९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. 

कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. 

कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. 

कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. 

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

🏈🔴अलीकडे, कोणत्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
अ) सांभर तलाव
ब) चिलका तलाव
क) पुलिकट लेक
ड) रुद्र सागर तलाव ✅✅✅✅✅

🏈🔴 २५ - २७ नोव्हेंबर, २०१९ दरम्यान  कॉमनवेल्थ यूथ पार्लियामेंट, २०१९ कोठे आयोजित करण्यात आले होते ? 
(अ) नवी दिल्ली ✅✅✅✅✅
(ब) कोलकाता
(क) जयपुर
(ड) लंदन

🏈🔴 आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो?
(अ) २५ नोव्हेंबर ✅✅✅✅✅
(ब) २२ नोव्हेंबर
(क) २० नोव्हेंबर
(ड) २२ नोव्हेंबर

🏈🔴२३ - २४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान १७२ व्या संरक्षण पेन्शन न्यायालयाचे आयोजन कोठे केले गेले? 
(अ) नवी दिल्ली
(ब) भोपाळ
(क) जयपुर
(ड) लखनऊ ✅✅✅✅✅

🏈🔴 नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने हवामान बदल आणि पर्यावरण क्षेत्रात तांत्रिक सहकार्यासाठी कोणत्या देशाशी सामंजस्य कराराला मंजुरी दिली? 
(अ) स्वित्झर्लंड ✅✅✅✅✅
(ब) ब्राझील
(क) अमेरिका
(ड) जपान

🏈🔴 २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सरकारी ई-मार्केट प्लेस (जीईएम) आणि दिल्ली सरकार यांच्यात सामंजस्य करार झाला.  यासह, जीईएमने आतापर्यंत किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी करार केले आहेत? 
(अ) ०२
(ब)  ३०✅✅✅✅✅
(क) ३५
(ड)  २९

🏈🏈द्वितीय स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल कॉन्फरन्स, ६ ते ७ डिसेंबर, २०१९ दरम्यान कोठे पार पडणार ?
(अ) नवी दिल्ली
(ब) गोवा✅✅✅✅✅
(क) मुंबई
(ड) जयपूर

🏈🔴'जागतिक मृदा दिवस' कधी साजरा केला जातो?
(अ) ०१ डिसेंबर
(ब) ०४ डिसेंबर
(क) ३० नोव्हेंबर
(ड)  ०५ डिसेंबर✅✅✅✅

🏈🔴अ) नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो (NCRB) ने अपघाती मृत्यू आणि आत्महत्या' हा अहवाल प्रसिद्ध केला.
ब) अहवालानुसार महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.
अ) फक्त
ब) फक्त बी
क) अ आणि ब दोन्ही✅✅✅✅✅
ड) ए किंवा बी नाही

🌐🌐_______ येथे ‘ह्यूमन लायब्ररी’ उघडण्याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) चेन्नई
(B) बेंगळुरू
(C) मुंबई
(D) म्हैसूर✅✅✅✅✅

🌐🌐कोणत्या व्यक्तीची फिनलँड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली?
(A) अंती रिने
(B) सॅना मारिन✅✅✅✅✅
(C) सौली निनीस्ते
(D) जुहा सिपिला

🌐🌐अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था ------- मध्ये  स्थापन करण्यात आली.
अ) 1951
ब) 1926✅✅✅
क) 1917
ड) 1971

🌐🌐‘उपपद’ किंवा ‘कृदन्त – तत्पुरुष’ समासाचे उदाहरण कोणते?
अ) नास्तिक   
ब) रक्तचंदन   
क) अहिंसा   
ड) पांथस्थ✅✅✅✅✅

🔰🔰) विरामचिन्हे किती प्रकारची आहेत ?
अ) एक     
ब) दोन ✅✅✅✅✅    
क) तीन   
ड) चार

🌐🌐‘सिध्द’ शब्द कशाला म्हणतात ?
अ) भाषेतील मूळ शब्द जो भाषा सिध्द करतात   
ब) परभाषेतून आलेले शब्द
क) भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात✅✅✅✅✅   
ड) भाषेतील मूळ शब्द जे बदलत असतात

🔰🔰 पुढील पद्य पंक्तीस कोणता रस आहे ?
     ‘जुने जाऊ द्या भरणा लागुन,
     जाळुनी किंवा पुरुनी टाका !’
अ) करुण   
ब) रौद्र✅✅✅✅✅     
क) हास्य   
ड) बीभत्स

🌐🌐‘अंबर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
अ) परमेश्वर   
ब) आकाश✅✅✅✅✅   
क) अभंग   
ड) अमर

🔰🔰‘उन्नती’ या शब्दाला विरोधार्थी शब्द ओळखा.
अ) अवनिती   
ब) विकृती   
क) प्रगती   
ड) अवनती✅✅✅✅✅

🌐🌐खालील वाक्यातील म्हणीच्या योग्य अर्थासाठी समर्पक वाक्य निवडा.
     ‘पोलिसांनी रघुला चोरीच्या आरोपाखाली अटक केली. पण कर नाही त्याला डर कशाला असे म्हणून तो शांत होता.’
अ) तो गुन्हेगार होता   
ब) तो अपराधी नव्हता✅✅✅✅✅
क) तो बेईमान होता   
ड) त्याला अपराधी वाटत होते

🔰🔰भरडले जाणे : या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
अ) संकटे येणे   
ब) पीठ दळणे   
क) लढा देणे   
ड) दु:खाचे आघात होणे✅✅✅✅✅

🌐🌐 “जो भविष्य सांगतो तो” – या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
अ) ज्योतिष   
ब) ज्योतिषी✅✅✅✅✅   
क) जादूगार   
ड) भविष्यक

🔰🔰भारताचे परराष्ट्रसचिव कोण आहेत ?
अ) निरुपमा राव
ब)  रंजन मथाई ✅✅✅
क) एस.एम.कृष्णा
ड)  सुनील मित्रा

🔰🔰नाफेड (NAFED) ........... चे कार्य करते.
१) सहकार विपणन   
२) शासकीय अभिकरण
३) विमा अभिकर्ता  
४) करारशेती प्रेरक
अ) १, २     
ब) १, २ आणि 3✅✅✅✅✅   
क) १, २, ३ आणि ४   
ड) २, ३ आणि ४

🔰🔰2013-2014 या वर्षी भारतात
........... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात दिसून येते.
अ) गहू      
ब) तांदूळ✅✅✅✅✅     
क) ज्वारी   
ड) मका

🔰🔰सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?
अ) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम   ब) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू✅✅✅✅✅
क) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 
ड) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

🔰🔰महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ??
अ) तोरणमाळ
ब) आंबोली✅✅✅✅✅
क) महाबळेश्वर
ड) चिखलदरा

 
🔰🔰महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते ?
अ) कमळ
ब) झेंडू
क) गुलाब
ड) यापैकी नाही✅✅✅✅✅

🔰🔰अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते?
अ) गुलाब
ब)  कमळ
क)  झेनिया✅✅✅✅✅
ड)  यापैकी नाही

🔰🔰रिझर्व्ह बँकेचे मुख्य गव्हर्नर कोण आहेत.
अ) रघुराम राजन  
ब) डॉ, उर्जित पटेल   
क) डॉ, डी.सुब्बाराव   
ड) शक्तीकांत दास✅✅✅✅✅

🔰🔰भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत.
अ) डॉ, सी.व्ही.रमण   
ब)  डॉ, होमी भाभा     
क)  डॉ, मेघनाद साहा   
ड)  डॉ, विक्रम साराभाई✅✅✅✅✅

🔰🔰श्रीमती प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या?
अ) मध्यप्रदेश
ब) आंध्रप्रदेश
क) जम्मू काश्मिर
ड)  राजस्थान✅✅✅✅✅

🔰🔰कोणत्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली?
अ) नेवासे✅✅✅✅✅
ब)  आपेगाव
क) आळंदी
ड) देहू

 
🔰🔰लॉर्ड्स हे क्रिकेटचे मैदान कोणत्या देशात आहे ?
अ) इंग्लंड✅✅✅✅✅
ब)  भारत
क) आस्ट्रेलिया
ड) दक्षिण आफ्रिका

ग्रामसेवक / सचिव.

🅾️निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

🅾️कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩गरामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🅾️गरामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🅾️बठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🅾️सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🅾️अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

🅾️गरामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

राज्यघटना महत्वाचे मुद्दे


1)घटनानिर्मिती:-


➡️TIMELINE पूर्ण पाठ करा.

➡️घटनेचे स्रोत 

➡️ मसुदा समिती ( सदस्य पाठ करा)

➡️ कबिनेट मिशन योजना आणि तरतुदी निवडणूक ( निवडून आलेले सदस्य).

➡️भारतीय स्वातंत्र्य चा कायदा आणि बदल 

➡️दार आयोग ,jvp समिती ,पाक आयोग तरतुदी ,अहवाल पाठ करा .

➡️ राज्यनिर्मिती क्रम आणि संबंधित घटनादुरुस्ती


⭕️मलभूत हक्क :-

➡️कलम 25-29 

➡️कलमे आणि जोड्या जुळवा

➡️कलमे अपवाद (25-29 , 15-19कलम 32 :- कोणाविरुद्ध देऊ शकतो आणि  कोणाविरुद्ध नाही . 

➡️कलम 13 आणि कायदा ह्यात समाविष्ट घटक .

➡️ कलम 19 आणि  अपवाद*(IMP)


⭕️मार्गदर्शक तत्वे :- 

➡️ कोणत्या घटनादुरुस्ती ने  कोणते टाकले गेले करा EXPECTED प्रश्न.

➡️ कलम 44,40,39 ,48,41,43 पाठ करा 

➡️ नयायप्रविष्ट नाही आणि महत्वाचे मुद्दे,काय प्रस्थापित करतात ते बघून घ्या .

➡️ मलभूत हक्क आणि DPSP फरक करून घ्या .

➡️कलम 351 हिंदी भाषा संबंधित तत्वे .


⭕️मलभूत कर्तव्ये:-

➡️ करम येऊ शकतो .

➡️ कोणत्या समिती ने टाकले आणि संबंधित घटनादुरुस्ती टाकले .

➡️ नयायप्रविष्ट आहे नाही or परकीयांना उपलब्ध की नाही करून घ्या 

➡️कर्तव्ये वाचून घ्या कोणते आहे कोणते नाही चूकओळखायला येऊ शकतो.



⭕️✔️ राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती, & राज्यपाल महत्वाचे कलमे (राष्ट्रपती अनुमोदन ,निवडणूक सहभाग ?कार्य शपथ ,कार्यकाळ ,क्षमादान )


♦️ घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग (1 प्रश्न compulsory)

➡️ राज्य निवडणूक आयोग (25 वर्ष)

➡️मानवी हक्क आयोग ,राज्य महिला आयोग 

➡️ नयायालय (SC ,HC,:- अध्यक्ष पात्रता ,इतर न्यायाधीश तरतुदी )

➡️ पचायत राज :-


♦️समिती आणि अहवाल


♦️  गरामपंचायत ,सरपंच ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती (ह्या बाहेर अजून प्रश्न नाही)

♦️ महान्यायवादी ,महाधिवक्ता (कार्यकाळ ,पदच्युत ? नेमणूक ,कलमे   मतदान?)

♦️ससद ,राज्यविधिमंडल :- विधेयक ,zero hour,  प्रस्ताव ,समित्या करा .

♦️पतप्रधान ,मुख्यमंत्री कार्य तरतुदी .

♦️घटनादुरुस्ती :- प्रकार ,संमती कधी पर्यंत करा .

♦️ CAG :- कार्यकाळ ,पदच्युत पद्धत( PYQ FOCUS )



⚠️⚠️वरील सर्व topic focus असू द्या एकदा नजर फिरवून घ्या polity हा अत्यंत सोपा वाटतो परंतु पेपर ला गेल्यावर चांगले चांगल्या लोकांची wicket पडते म्हणून आपली पडायला नको तर हे topic वाचून व्यवस्थित करूनच घ्या 7-8 मार्क्स हमखास मिळतील.


😱वरील विषयाचा मी तज्ञ नाही केवळ आयोगाच्या मागील 10 वर्षाच्या ANALYSIS वरून हे TOPIC काढलेले आहे ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी नसेल केले हे टॉपिक तर नक्की करा झाला तर 1000% टक्के फायदा आणि 0% तोटा होईल ही शाश्वती😜😜


प्रश्न मंजुषा

 1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

 A. 1/2 सदस्य संख्या

 B. 1/3 सदस्य संख्या✅

 C. 1/4 सदस्य संख्या

 D. 1/10 सदस्य संख्या.


________________________


2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

 A. 30 दिवस

 B. 60 दिवस

 C. 90 दिवस✅

 D. वरीलपैकी काहीही नाही.


________________________


3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

 A. राज्य शासन

 B. स्थायी समिती✅

 C. जिल्हा परिषद

 D. मुख्य कार्यकारी अधिकारी.


________________________


4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

 A. सहाय्यक अधिकारी

 B. सल्लागार समिती

 C. कक्ष अधिकारी✅

 D. मुख्य अधिकारी.


________________________


5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

 A. सरपंच

 B. गट विकास अधिकारी

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरील सर्वांना.✅


________________________


6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

 A. डॉ. बी.आर, आंबेडकर

 B. वल्लभभाई पटेल✅

 C. जवाहरलाल नेहरू

 D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.


________________________


7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

 A. (a) आणि (b)

 B. (b), (c) आणि (d)

 C. (a), (c) आणि (d)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✅


________________________


8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.


पर्यायी उत्तरे : 

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (c), (d)

 D. (a), (b), (c), (d). ✅


________________________


9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

 A. संसद ठराव करून

 B. संसद कायदा तयार करून✅

 C. राष्ट्रपती आदेश पारित करून

 D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.


________________________


10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते. 

 A. वित्त विधेयक

 B. विनियोजन अधिनियम ✅

 C. वित्तीय अधिनियम

 D. संचित निधी अधिनियम.





१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅




४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅




१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?

👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.



१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?

Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.

Monday 13 May 2024

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.

◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली.

◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे.

◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे.

◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे.

◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे.

◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे.

◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे.

◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.

◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे.

◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे.

◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Sunday 12 May 2024

चालू घडामोडी :- 12 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल चिरंजीवी आणि वैजयंती माला यांना 'पद्मविभूषण' हा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे.

◆ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्यात ‘पिरुल लाओ-पैसे पाओ अभियान’ सुरू केले आहे.

◆ अमूल आगामी T-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेची अधिकृत प्रायोजक बनली आहे.

◆ केकी मिस्त्री यांची एचडीएफसी लाईफ कंपनीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते 'पवन सिंधी' यांना अनुकरणीय सेवेसाठी प्रतिष्ठित ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ व्हाइस ॲडमिरल संजय भल्ला यांनी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘आर शंकर रमण’ हे L&T समूहाचे नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने ड्रोन दीदी योजनेंतर्गत दोन पायलट प्रकल्पांसाठी ‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’ सोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आणि नागालँडचे मुख्यमंत्री पुतणे यांनी 'कोहिमा पीस मेमोरियल'चे उद्घाटन केले.

◆ भारतातील लोककला आणि आदिवासी परंपरांचे दर्शन घडविणारे ‘स्वदेश’ हे प्रदर्शन दुबईत आयोजित करण्यात आले आहे.

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुनर्नियुक्ती केली आहे.

◆ भारताचा स्टार भालाफेकपटू 'नीरज चोप्रा' याने दोहा डायमंड लीगमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.

◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन' याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ श्री. व्ही. एल. कांथा राव, सचिव, खाण मंत्रालय, यांनी नवी दिल्ली येथे मिनरल विदेश इंडिया लिमिटेड (काबिल) च्या नोंदणीकृत कार्यालयाचे उद्घाटन केले.

◆ 'पंजाब नॅशनल बँक' (PNB) ने 1 जून 2024 पासून निष्क्रिय खाती बंद करण्याची घोषणा केली आहे.

◆ दिलीप संघानी यांची इफकोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘आर लक्ष्मी कांथ राव’ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.

◆ 22वी आशियाई सांघिक स्क्वॉश चॅम्पियनशिप चीनमध्ये होणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Saturday 11 May 2024

चालू घडामोडी :- 11 मे 2024


◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो.

◆ टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा  सर्वोत्तम शहरांमध्ये न्यूयॉर्क हे शहर प्रथम स्थानावर आहे.

"टाईम आऊट" सर्व्हेक्षण संस्थेने जगातील सर्वोत्तम दहा शहरांची यादी जाहीर केली आहे.

◆ ISRO ने अत्याधुनिक मिश्रित उत्पादन तंत्र वापरून तयार केलेल्या PS4 रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे.

न्यूझीलंड देशाचा क्रिकेट खेळाडू कॉलिन मुनरो याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ जगातील पहिली हायड्रोजन वर चालणारी बोट बिल गेट्स यांनी तयार करून घेतली आहे.

जगातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटेच नाव प्रोजेक्ट-821आहे.

◆ लार्बन अँड टुब्रो L & T या कंपनीच्या अध्यक्ष पदी "आर. शंकर रमन" यांची निवड झाली आहे.

Potato फेस्टिवल चे आयोजन नागालँड या राज्यात करण्यात आले होते.

◆ भारतीय नौदलाचे प्रमुख कर्मचारी म्हणून संजय भल्ला यांनी पदभार स्वीकारला आहे.

भारत आणि फ्रान्स या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ इदरीस डेबी यांची "चाड" या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

मिखाईल मिशुस्टिन यांची रशिया या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ मिखाईल मिशुस्टिन यांची दुसऱ्यांदा रशियाच्या पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे.

कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन नागालँड या राज्यात करण्यात आले आहे.

◆ नागालँड राज्यात कोहिमा युद्धाच्या स्मरणार्थ शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले असून हे युद्ध 1944 या वर्षी झाले होते.

नागालँड राज्यात जपान देशाच्या राजदुताच्या हस्ते कोहीमा स्मारकाचे उद्घाटन झाले आहे.

◆ जागतिक स्थलांतर अहवाल 2024 नुसार भारतातील नागरिकांचे सर्वाधिक स्थलांतर युएई या देशात झाले आहे.

गहू या पिकाची HD 3386 ही नवीन जात IARI या संस्थेने विकसित केली आहे.

◆ जगात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरीका या देशात आहे.


अटल सेतू - भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू


🔥 मुंबई येथे अटल सेतू आहे.


🔥 लांबी: 21.8 किमी


🔥 अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल आहे.  


🔥 हा 6 लेनचा पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.  


🔥 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच या पुलाचे उद्घाटन केले, अटल सेतूने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद कनेक्टिव्हिटी प्रदान केली आहे. 


🔥 त्यामुळे मुंबईहून दक्षिण भारत, पुणे आणि गोव्याला जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. 


🔥 शिवाय, यामुळे जवाहरलाल नेहरू बंदर आणि मुंबई बंदराची जोडणी मजबूत झाली आहे. अटल सेतू मुंबई महानगर प्रदेशासाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक चालक असेल अशी अपेक्षा आहे.  प्रवासाच्या वेळा कमी करून आणि प्रमुख क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी सुधारून, हा पूल व्यापार, वाणिज्य आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी तयार आहे.

महत्त्वाच्या संस्था

● G7 (Group of 7)

- स्थापना 1975

- अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला.

- सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, USA, कॅनडा


● BRICS

- स्थापना: 2006

- सदस्य: ब्राझिल, रशिया, भारत, चीन, द. आफ्रिका 


● Asian Development Bank (ADB)

- स्थापना: 19 डिसेंबर 1966

- मुख्यालय: Mandaluyong, Metro Manila फिलीपीन्स



● SAARC (South Asian Association for Regional Cooperation)

- स्थापना: 16 जानेवारी 1987

- मुख्यालय: काठमांडू, नेपाळ 

- सदस्य: अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, मालदीव


● ASEAN (Association of South East Asian Nation)

- स्थापना: 8 ऑगस्ट 1967

- मुख्यालय: जकार्ता, इंडोनेशिया 

- सदस्य: ब्रुनेई, फिलीपीन्स, लाओस, थायलंड, व्हियतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, म्यानमार, कंबोडिया, सिंगापूर


● BIMSTEC (Bay of Bengal Initiative for Multi Scetoral Technical & Economic Cooperation)

- स्थापना: 6 जून 1997

- मुख्यालय: ढाका, बांगलादेश

- सदस्य: बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, भूटान 


● OPEC (Organization of Petroleum Exporting Countries)

- स्थापना: 1960

- मुख्यालय: व्हियन्ना, ऑस्ट्रिया

- सदस्य संख्या: 13


● IBSA 

- स्थापना: 6 जून 2003

- मुख्यालय: Stafford ST, Abbotsford, Victoria 

- सदस्य: भारत, ब्राझिल, द. आफ्रिका

राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.


🅾️ पचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

🅾️ गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

🅾️ गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

🅾️पचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

🅾️पचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾️ पचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾️ पचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

🅾️पचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

🅾️पचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

🅾️गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

🅾️ पचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🅾️ राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.



जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.



🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समितीअधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🅾️रचना - प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🅾️सभासद संख्या - प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🅾️सभासदांची निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🅾️पात्रता (सभासदांची) - जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🅾️आरक्षण : 1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾️तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🅾️कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🅾️अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड : जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🅾️कार्यकाल : अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे

2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-

🅾️अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

🅾️सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🅾️बठक : जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🧩मख्य कार्यकारी अधिकारी (CEO) :

🅾️ परत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - बुध्दीमत्ता


१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?

अ. ६४ चौ. से. मी.  

ब.  ५१२ घ. से. मी.  

क.  ६४  घ. से. मी.  

ड.  ४८ घ. से. मी.  


२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?

अ. पूरक कोन  

ब. विरुद्ध कोन 

क. सरळ कोन 

ड. कोटीकोन 


३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ? 

अ. ११२ चौ. से. मी.  

ब. १०० चौ. से. मी.   

क. १२१ चौ. से. मी.    

ड. १११ चौ. से. मी.  


४)    AZ, BY, CX, ?

अ. DW

ब. EV

क. EF

ड. JO 


५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?

अ. निळा, हिरवा, लाल 

ब. निळा, पिवळा, पांढरा   

क. पांढरा, काळा, लाल  

ड. हिरवा, पांढरा, केशरी 


६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ? 

१ Internet २) Income ३) India ४) Import ..... 

अ. २३१४

ब.  ४२३१

क.  १२३४

ड.  ४३२१

 

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?

अ. ८९

ब.  १०९

क.  ९९

ड.  ७९


८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ? 

अ. सहा वाजता   

ब. बारा वाजता  

क. साडेतीन वाजता   

ड. नऊ वाजता 


९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?   

अ. इंद्रकुमार गुजराल 

ब. लालबहादूर शास्त्री  

क. एच. डी. देवेगौडा  

ड. डॉ. राजेंद्र प्रसाद 


१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ? 

अ. उप जिल्हाधिकारी 

ब.  पोलीस उपअधीक्षक 

क. विक्रीकर अधिकारी  

ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष 


--------------------------------


उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड. 

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.


Latest post

चालू घडामोडी :- 16 मे 2024

◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज ...