Tuesday 9 August 2022

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी शेवटच्या आठवड्यात नियोजन काय असावे?


 राज्यसेवा पूर्वसाठी इतिहासामध्ये विचारल्या जाणाऱ्या एकूण 15 प्रश्नांपैकी आठ ते नऊ प्रश्न हे प्राचीन व मध्ययुगीन भारतावर विचारले जातात.त्यामध्ये देखील 5 ते 6 प्रश्न प्राचीन व दोन-तीन प्रश्न मध्ययुगीन भारतावरती विचारले जातात.


 ♦️आता आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतासाठी नक्की काय Strategy असायला पाहिजे याविषयी बघूयात.


1.राहिलेल्या 7 दिवसातील कमीत कमी आठ ते दहा तासांचा वेळ तुम्ही प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला द्यायला हवा.


त्यामध्ये देखील शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये हा टॉपिक वाचला तर जास्त फायदा होईल.कारण प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या facts खूप लवकर विसरून जातात.कोणी जर हा घटक Skip केला असेल तर अजूनही वेळ आहे हा टॉपिक करून घ्या.कारण Basic reading वरती देखील 4-5 प्रश्न बरोबर येऊ शकतात.


2. प्राचीन  भारतातील काही महत्त्वाच्या घटकांवर आयोग हमखास प्रश्न विचारत आहे. उदा.सिंधू खोरे संस्कृती,महाजनपदे, मौर्य कालखंड,गुप्त कालखंड,गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, वैदिक कालखंड etc.


या सर्व कालखंडातील आयोग व्यक्तीवर जास्त प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे व्यक्तींचा अंदाज घेऊन चांगला अभ्यास करा.या कालखंडातील संस्कृती,भाषा,लोकांची जीवन जगण्याची पद्धती,कला-संस्कृती याचा अंदाज घ्या.


3. मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2-3 प्रश्न विचारले जातात.यामध्ये मुघलांचे आगमन आणि भारतातील मुघल घराण्याची स्थापना, मुघलकालीन कला,साहित्य,संस्कृती इ अनुषंगाने अभ्यास करा.त्यानंतर दिल्ली सलतनत,भक्ती चळवळ, सुफी चळवळ, सीख धर्मीयातील विविध चळवळ या वरती आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारतो.


♦️Booklist-


तुम्ही आतापर्यत ज्या booklist मधून read केलं आहे त्यामधून revise करा.


आणखी कोणी जास्त केलं नसेल तर फक्त 6,7 आणि 11 th चे Stateboard मधून Cover करून घ्या. एक optimum Level चे marks नक्कीच भेटतील.


♦️आता आता तुम्ही दोन जानेवारी साठी  प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे प्रश्न सोडवताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहुयात.


1. इतिहासाचे बरेच प्रश्न हे व्यक्तीविशेष म्हणजेच Personality based विचारले जातात. त्यामुळे शेवटचं revision घेताना व्यक्तींवर जास्त focus राहू द्या.अजून आयोग महत्वाच्या व्यक्तींवरतीच प्रश्न विचारतो त्यामुळे Options मध्ये तुम्हाला जर एखादी महत्त्वाची व्यक्ती दिसत असेल तर तेच उत्तर निवडले पाहिजेत.

उदा.2018 च्या Prelims ला अल्लाउद्दीन खिलजी वरती multistatement प्रश्न आला होता. त्यामध्ये अमीर खुसरो हा नामवंत कवी त्याच्या दरबारी होता हे वाक्य होते. आणि तेवढं वाक्य माहित असली की प्रश्न सुटेल.


2. इतिहासामध्ये उत्तरे ही most Inclusive पर्यायचीच असतात.2020 च्या परीक्षेमध्ये शहाजहाच्या दरबारातील चित्रकार विचारले होते. आणि ऑप्शन खूपच Narrow होते.म्हणजे फक्त ab, फक्त bc, फक्त cd आणि चौथा abd. अशा वेळी चौथा म्हणजे most inclusive Option उत्तर असते.

 

3. इतिहासामध्ये एक Timeline असते ती timeline perfect लक्षात आली पाहिजे. उदा.महाजनपदे, मौर्य आणि गुप्त या timeline मधील महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या सभोवतालच्या छोट्या गोष्टी जरी माहिती असलं तरी प्रश्न Tackle होतो.


4. प्राचीन व मध्ययुगीन भारतातील 8-9 प्रश्नांपैकी साधारणता दोन ते तीन प्रश्न हे जोड्या लावा यावरती असतात. पुढील पाच-सहा दिवस तुम्ही आयोगाचे 2017 पासून 2020 पर्यंत चे पेपर घेऊन  जोड्यांचे पॅटर्न व्यवस्थित बघा. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मध्ये काही कॉमन ऑप्शन्स दिसतील तीच उत्तरे बऱ्यापैकी असतात. किंवा प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहासामध्ये 1234 किंवा 4321 या जोड्यांचा पॅटर्न देखील चालतो.


5. प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न हे out of box असतात. पण त्यालादेखील logic लागू शकत. उदा.2019 मध्ये Achaemenid विजयानंत्तर कंभोज मध्ये कोणता उद्योग सुरु झाला असा प्रश्न होता. आपलं Confusion हे जहाजबांधणी व ब्लॅंकेट बनवणे यामध्ये होत. पण कंभोज हे शहर समुद्रकाठावर वसलेलं नव्हतं याचाच अर्थ तिथं जहाजबंधनी उद्योग सुरु होणे थोडे अवघड आहे.त्यामुळे ब्लॅंकेट बनवणे हा एकच पर्याय शिल्लक राहतो.


6. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्नातील Options संबंधीचा. तो कोणता? समजा एखाद्या प्रश्नातील Options मध्ये दोन पर्याय जर Close दिसत असतील तर तेच उत्तर असण्याची शक्यता जास्त असते.प्रश्न सोडवताना ही Technique तुम्ही निश्चितच वापरू शकता.


7. 2020 ला प्राचीन व मध्ययुगीन भारताचे प्रश्न थोडे tough होते हे मान्य आहे पण त्यामध्येदेखील आपण वरती सांगितल्याप्रणे वेगवेगळे method वापरून उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो.


सर्वांना शुभेच्छा!

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...