Friday 23 August 2019

भारतात तयार होणारे पॅकेजिंग फूड सर्वात हलक्या दर्जाचे

▪️ एका सर्वेक्षणामध्ये समोर आले आहे की, जगभरातील पँकेट बंद अन्न आणि पेयच्या बाबतीत भारताची स्थिती सर्वाधिक खराब आहे.

▪️भारतातील पॅकिंग केलेले खाद्य आरोग्याला धोकादायक आहे. 12 देशांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.

✅ भारतातील खाद्य पदार्थांमध्ये ट्रांस फॅट, मीठ आणि साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते.हा परिणाम 12 देशांमधील 4 लाख खाद्य पदार्थांचे विश्लेषण केल्यानंतर समोर आला आहे.

▪️सर्वेमध्ये प्रामुख्याने साखर, सॅच्युरेटेड फॅट, मीठ आणि कँलेरीच्या मात्रेवर लक्ष्य देण्यात आले होते.

✅ पहिल्या स्थानावर ब्रिटन असून, त्यानंतर अनुक्रमे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आहे. चीन आणि भारत या यादीत सर्वात शेवटी आहे.

▪️भारतात 100 ग्राम खाद्य पदार्थामध्ये साखरेचे प्रमाण हे 7.3 ग्राम आहे. तसेच सर्वेक्षणानुसार, भारतातील पॅकेजिंग पदार्थ हे अधिक उर्जा प्रदान करतात.

▪️रिपोर्टनुसार, ही चिंतेची बाब आहे की, अधिक उत्पन्न असणाऱ्या देशाच्या तुलनेत कमी उत्पन्न असणाऱ्या चीन आणि भारतातील पॅकेजिंग फूडमुळे धोका निर्माण होत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...