Thursday 2 January 2020

Flashback 2019 : ‘या’ आहेत वर्षातील सर्वात मोठ्या घटना

📌सुधारित नागरिकत्व कायदा :

👉धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारिक नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही. या कायद्याला देशभरातून विरोध करण्यात येत आहे.

📌कर्नाटकातील राजकीय नाट्य :

👉कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये १५ मधून १२ जागांवर विजय मिळवत येडीयुरप्पा सरकारनं पूर्ण बहुमत मिळवलं. गेल्या वर्षी १५ मे रोजी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपानं १०४, काँग्रेसनं ७८ तर जेडीएसनं ३७ जागांवर विजय मिळवला होता. सुरूवातील येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारली होती. परंतु त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसनं जेडीएसची साथ देत सरकार स्थापन केलं होतं. परंतु वर्षभरातचे ते सरकार कोसळलं. काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. परंतु काही दिवसांनी त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यांनंतर राज्यात पोटनिवडणुका झाल्या आणि १५ पैकी १२ जागांवर भाजपाला यश मिळालं.

📌महाराष्ट्रातील राजकीय नाट्य :

👉राज्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली होती. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परंतु दोनच दिवसात त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आलं आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सत्ता स्थापनेत उशीर होत असल्याचं कारण पुढे करत अजित पवार यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. तर सत्तेत समसमान वाटप आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावर ठाम असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ देत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून यामध्ये ३६ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेसाठीही ही निवडणुक महत्त्वाची ठरली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले.

📌अयोध्या प्रकरणाचा निकाल :

👉गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमीचा निकालही नोव्हेंबर महिन्यात लागला. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यासंदर्भातील निकाल दिला. ३ महिन्याच्या कालावधीत एका ट्रस्टची स्थापना करून राम मंदिर बांधण्यात यावे, असाही निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला. सर्व वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला होता. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

📌चांद्रयान २ :

👉९ जुलै रोजी चांद्रयान २ चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ही भारताच्या या महत्त्वाकांशी मोहिम होती. ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण भागावर लँड करणार होतं. परंतु काही तांत्रिक बाबींमुळे ते शक्य होऊ शकलं नाही. अखेरच्या टप्प्यात विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला होता. परंतु चांद्रयान २ चे ऑर्बिटर आपलं काम करत राहणार आहे. या मोहिमेनंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरातून कौतुक करण्यात आलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर देत त्यांच्या कार्याला सलाम केला होता.

📌जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं :

👉कलम ३७० च्या माध्यमातून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...