06 March 2023

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग



स्थापना : १३ ऑगस्ट १९९३

मुख्यालय : दिल्ली 

रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य

कार्यकाळ : ३ वर्षे


अध्यक्ष व सदस्य पात्रता 

अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे

१ सदस्य सचिव असतील

१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील

२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील


स्थापना

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.



यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.


कार्य

OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

राज्य निवडणूक आयोग

♦️सथापना- संविधान अनुच्छेद 243k.

♦️पचायतीच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243k नुसार.

♦️नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी :- 243 ZA नुसार.

♦️राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती :- राज्यपाल.

♦️पदावरून काढण्याची पध्दत :- उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून काढण्याच्या पध्दतीप्रमाणे.

♦️नियुक्तीनंतर आर्थिक लाभात अहितकारक बदल नाही. आयोगाला स्वत:चा कर्मचारीवर्ग नसतो.

♦️महाराष्ट्रात स्थापना :- 23 एप्रिल 1994.

♦️पहिले आयुक्त :- श्री डी. एन. चौधरी.





मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती


निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

🔸मुख्य निडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक ➖


👉पंतप्रधान,

👉 विरोधी पक्षनेते आणि

👉 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 


यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी,


✅ तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

✅ निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले आहेत.


तसेच जोपर्यंत हा कायदा बनत नाही तोपर्यंत निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या समितीद्वारे करण्यात यावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती



०१) 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (NDA) कुठे आहे ?

- खडकवासला.(पुणे)


०२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय  आहे ?

- मुरलीधर देविदास आमटे. 


०३) जगातील कोणत्या खंडास बर्फाळ खंड असे म्हणतात ?

- अंटार्क्टिका.


०४) शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती  ?

- यकृत.


०५) गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे ?

- पणजी.


०१) महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे नाव काय होते ?

- यशवंतराव चव्हाण.


०२) महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे नाव काय आहे ?

- नागपूर.


०३) अजिंठा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

- औरंगाबाद.


०४) सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

- ३६.


०५) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब नदीचे नाव काय आहे ?

- गोदावरी.


०१) महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?

- मराठी.


०२) महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?

- हरियाल.


०३) महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?

 - आंबा.


०४) महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?

- कबड्डी.


०५) महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

- मुंबई.


०१) भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी कोण ?

- किरण बेदी.


०२) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

- पुरंदर किल्ला.


०३) नेपाळची राजधानी कोणती आहे ?

- काठमांडू.


०४) रेबिजची लस कोणी शोधली ?

- लुईस पाश्चर.


०५) सुशीलकुमार हा खेळाडू कोणता खेळ खेळतो ?

- कुस्ती.


०१) १ ते ९ अंकाची बेरीज किती होते ?

- ४५.


०२) इटली या देशाची राजधानी कोणती ?

- रोम.


०३) 'कऱ्हेचे पाणी' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

- प्र.के.अत्रे.


०४) ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

- उस्मानाबाद.


०५) इराक या देशाची राजधानी कोणती ?

- बगदाद.


१) राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी तयार केली ?

- होन आणि शिवराई.


०२) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोणास म्हणतात ?

- डॉ.होमी भाभा.


०३) अंधासाठीच्या ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?

- लुईस ब्रेल.


०४) संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ?

- डेंबुजी झिंगराजी जानोरकर.


०५) 'स्कर्व्ही' हा रोग कोणत्या जीवनसत्वाभावी होतो ?

- सी जिवनसत्व.


०१) 'इस्रो' (ISRO)चे मुख्यालय भारतात कोठे आहे ?

- बंगळुरू. 


०२) राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १४ सप्टेंबर.


०३) रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

- कुलाबा.


०४) 'विश्वनाथन आनंद' हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बुद्धिबळ.


०५) मराठवाड्याच्या राजधानीचा जिल्हा कोणता ?

- औरंगाबाद.


०१) ज्वारीच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो ? 

- महाराष्ट्र.


०२) प्रसिद्ध 'शनिवारवाडा ' कोठे आहे ?

- पुणे.


०३) सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?

- क्रांतिसिंह नाना पाटील.


०४) गरीबाचे 'बदाम'असे कशास म्हटले जाते ?

- शेंगदाणे.


०५) पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

- परिवलन.


०१) 'ऊसतोड कामगारांचा जिल्हा' म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?

- बीड.


०२) ऑक्सीजन चा शोध कोणी लावला ?

- जोसेफ प्रिस्टले. 


०३) बांगलादेशची राजधानी कोणती आहे ?

- ढाका.


०४) भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यास किती कालावधी लागला ?

- २ वर्ष ११ महिने १७ दिवस.


०५) 'श्रीमान योगी' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- रणजित देसाई.



०१) जपान या देशाची राजधानी कोणती ?

- टोकियो.


०२) कोणाचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०३) महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे 'गुरु ग्रंथसाहेब' या शीख धर्मीयांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज.


०४) 'क्ष'(X-ray) किरणांचा शोध कोणी लावला ?

- रॉंन्टजेन.


०५) फ्रान्स या देशाची राजधानी कोणती ?

- पॅरिस.


०१) 'विवेकसिंधू' हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

- मुकुंदराज.


०२) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?

- कर्नाटक.


०३) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे ?

- त्यागाचे.


०४) मिठाचे रासायनिक नाव काय आहे ?

- सोडियम क्लोराइड.


०५) 'धवलक्रांती' म्हणजे  कशाच्या उत्पादनात वाढ ?

- दूध उत्पादन.


०१) सरदार सरोवर' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०२) 'आग्रा' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

- यमुना.


०३) शिवाजी सागर' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

- कोयना.


०४) 'संजय गांधी' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

- बोरिवली.(मुंबई)


०५) महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- चंद्रपूर.


०१) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

- ७२० कि.मी.


०२) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- पुणे.


०३) 'भंडारदरा' धरण कोणत्या नदीवर आहे ?

- प्रवरा.


०४) पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

- सातपाटी.


०५) 'बिहू' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- आसाम.


१) भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल.


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.


०१) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

- पुणे.


०२) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

- जेम्स वॅट.


०३) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

- प्रल्हाद केशव अत्रे.


०४) ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?

- भावार्थ दीपिका.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

- ८ जुलै १९३०.

लक्षात ठेवा



🔸१) पुण्याजवळ .... येथे 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (National Defence Academy) आहे.

- खडकवासला


🔹२) राज्यातील .... या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.

- वर्धा


🔸३) राज्यातील नियोजित औष्णिक विद्युत केंद्रामुळे अधिक (प्रकाशझोतात आलेले .... हे ठिकाण दगडी कोळशाच्या खाणींबद्दलही प्रसिद्ध आहे. 

- उमरेड (नागपूर)


🔹४) राज्यातील मधुमक्षिकापालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण .....

- महाबळेश्वर


🔸५) महाराष्ट्र पठारावरील ..... या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

- महादेव डोंगररांगा


🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते. 

- एक वर्ष


🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.

- दोन


🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.

- १९७१


🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.

- राष्ट्रपती


🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.

- राज्यसभा

जगभरातील सर्वात लांब, सर्वात मोठी, सर्वात उंच, सर्वात लहान



1. सौर मंडळामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

उत्तर: बृहस्पति ग्रह


2. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

 उत्तर: रशिया


3. लोकसंख्येनुसार सर्वात मोठा देश कोणता आहे?

उत्तर: चीन.


4. लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते आहे?

उत्तर: टोकियो, जपान.


5. जगातील सर्वात मोठे विमान वाहक कोण आहे?

उत्तर: अँटोनोव्ह अन -225 / Antonov An-225


6. जगातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

 उत्तर: Industrial & Commercial Bank of China (ICBC) / आयसीबीसी, चीन


7. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी कोणती आहे?

उत्तर: आयसीबीसी, चीन.


8. जगातील सर्वात मोठे डिस्नेलँड कोणते आहे?

उत्तर: ऑरलँडो, फ्लोरिडा मधील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट.


9. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

उत्तर: अंटार्क्टिका, अंटार्क्टिका.


10. जगातील सर्वात मोठे इंग्रजी बोलणारे राष्ट्र कोणते आहे?

उत्तर: अमेरिका


11. जगातील सर्वात मोठे फुटबॉल (किंवा सॉकर) स्टेडियम कोणते आहे?

उत्तर: रुंगनाडो मे डे स्टेडियम, उत्तर कोरिया / Rungnado May Day Stadium, North Korea.


12. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे तलाव कोणते आहे?

उत्तर: लेक सुपीरियर, उत्तर अमेरिका.


13. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

उत्तर: आशिया / Asia


14. जगातील सर्वात मोठी हॉटेलची साखळी कोणती आहे?

उत्तर: इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स गट / Inter Continental Hotels Group.


15. क्षेत्रानुसार जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड, उत्तर अटलांटिक


16. जगातील सर्वात मोठे शॉपिंग मॉल कोणते आहे?

उत्तर: न्यू साउथ चायना मॉल.


17. जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर: ग्रीनलँड नॅशनल पार्क.


18. सर्वात मोठा अणुबॉम्ब कोणता आहे?

उत्तर: झार बोंबा / Tsar bomb


19. जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे?

उत्तर: पॅसिफिक महासागर.


20. लोकांच्या संख्येने सर्वात मोठा धर्म कोणता आहे?

उत्तर: ख्रिश्चन

21. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

उत्तर: नाईल – करेगा.


22. जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी कोणते आहे?

उत्तर: हवाईच्या बिग बेटावरील मौना लोआ.


23. जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय कोणते आहे?

उत्तर: ओमाहा, नेब्रास्का मधील हेनरी डोरली प्राणीसंग्रहालय.


24. जगातील सर्वात लांब माउंटन साखळी कोणती आहे?

उत्तर: अँडीज.


25. जगातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे?

उत्तर: दानियांग-कुन्शन ग्रँड ब्रिज, चीन.


26. जगातील सर्वात लांब गुहा कोणती आहे?

उत्तर: अमेरिकेतील केंटकी, ब्राउनस्विलेजवळील, मॅमथ गुहा.


27. सर्वात लांब इंग्रजी शब्द कोणता आहे?

उत्तर: pneumonoultramicroscopicsilicovolcanoconiosis / न्यूमोनॉल्ट्रॅमिकोस्कोपिक्सिलिकोव्होलकेनोकोनिसिस – हा एक फुफ्फुसाचा रोग आहे – 45 अक्षरे


28. जगातील सर्वात लांब महामार्ग कोणता आहे?

उत्तर: ऑस्ट्रेलियाचा हायवे १.


29. सर्वात लांब प्राणी कोणता आहे?

उत्तर: Ocean Quahog


30. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई


31. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

उत्तर: माउंट एव्हरेस्ट.


32. जगातील सर्वात उंच लाईटहॉउस कोणते आहे?

उत्तर: जेद्दाह लाइट, जेद्दाह, सौदी अरेबिया – 436 फूट (133 मीटर)


33. जगातील सर्वात उंच कार्यालय इमारत कोणती आहे?

उत्तर: बुर्ज खलिफा, दुबई.


34. जगातील सर्वात उंच / सर्वात मोठे पिरॅमिड कोणते आहे?

उत्तर: गीझाचा ग्रेट पिरॅमिड (ज्याला खुफूचा पिरॅमिड किंवा चॉप्सचा पिरॅमिड देखील म्हणतात).


35. जगातील सर्वात उंच झाड कोणते आहे?

उत्तर: जगातील सर्वात उंच वृक्ष म्हणजे कोस्ट रेडवुड, 115.72 मीटर (379.7 फूट) उंच.



हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 (24व्या) :-


◆ स्थळ :- बीजिंग (चीन), 

◆ उद्घाटन स्थळ :- बीजींग नॅशनल स्टेडियम

◆ कालावधी :- 4 ते 20 फेब्रुवारी 2022 (17 दिवस)


➤ उद्घाटन सोहळ्यातील क्रीडाज्योत प्रज्वलन :-

1) डिनीजीर यीलामुजिआंग (चीन)

2) झाओ जिआवेन (चीन) 


उद्घाटन सोहळ्याची मुख्य संकल्पना :- "एक जग एक कुटुंब"


◆ शुभंकर :- बिंग डेवन (एक प्रकारचा पांडा)


➤ एकूण सहभागी देश :- 91

➤ घोषवाक्य :- "सामायिक भविष्यासाठी एकत्र".


➤ भारतातील सहभागी खेळाडू :- 1 (मोहम्मद आरिफ खान)


◆ या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही.


◆ उन्हाळी तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे बीजिंग हे पहिले शहर बनले. 


◆ हैती आणि सौदी अरेबिया हे देश हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धामध्ये पहिल्यांदाच सहभागी झाले.

कर्नाटकने बयंदूर येथे देशातील पहिल्या मरीनाची योजना आखली आहे.


◆ कर्नाटकातील किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी कर्नाटक सरकार देशातील पहिले मरीना किंवा डॉकेज देणारे बोट बेसिन, उडुपी जिल्ह्यातील बाइंदूर येथे बांधणार आहे. 


◆ किनारी भागात समुद्रकिनारा पर्यटन आणि तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) शिथिल करण्यासाठी सरकार केंद्राकडून परवानगी मागणार आहे. 


◆ सरकार पुरातत्व विभागाकडून गंगा, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य आणि होयसाळ या महान राजवंशांचा इतिहास संकलित करेल आणि राज्यातील पर्यटनाचा इतिहास विकसित करेल. यामुळे पर्यटनाचा विकास तर होईलच शिवाय लोकांना राज्याचा समृद्ध इतिहास समजण्यास मदत होईल.


➤ कर्नाटक राज्यासंबंधी :-


◆ राजधानी :- बेंगळुरू (कार्यकारी शाखा),

◆ राज्यपाल :- थावर चंद गहलोत,

◆ मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई.

कॅच द रेन 2023' मोहीम द्रौपदी मुर्मूने सुरू केली आहे.




🔹राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी असा दावा केला की अनियंत्रित शहरीकरणामुळे जलसंधारणाच्या पारंपारिक पद्धती देशात सोडल्या गेल्या आहेत.


🔸पाण्याची टंचाई आणि ग्लोबल वॉर्मिंग या समस्यांचे परिणाम आहेत यावर राष्ट्रपतींनी भर दिला.


🔹नवीन तंत्रज्ञानाचा वापर करूनही, जुनी जलसंधारण तंत्रे टिकवून ठेवणे आणि पुनर्संचयित करणे अत्यावश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.


🔸जलसंधारण आणि स्वच्छता यांमध्ये महिलांनी बजावलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी स्वच्छ भारत मिशनच्या अनेक श्रेणींमध्ये ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनसह "स्वच्छ सुजल शक्ती सन्मान 2023" प्रदान केले.


-------------------------------------------------------

04 March 2023

AP मध्ये US$ 3.9 अब्ज गुंतवणुकीसह सरकारने 2,880 - MW Dibang MPP ला मंजूरी दिली


💸💵अरुणाचल प्रदेश (AP) मधील 2,880 मेगावॅट (MW) दिबांग बहुउद्देशीय प्रकल्प (MPP), आतापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प, वीज मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने ₹31,876.39 कोटी (US$3.9 अब्ज) च्या गुंतवणुकीसह कार्यान्वित केला आहे. कडून मान्यता मिळाली.


🔮🧿चीनच्या सीमेला लागून असलेला हा प्रकल्प नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) लिमिटेड विकसित करेल.


⏳⌛️प्रकल्पाच्या बांधकामाचा अंदाजे कालावधी 9 वर्षांचा होता.


💸🪙आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने प्रकल्पाच्या "गुंतवणूकपूर्व क्रियाकलापांसाठी" 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.


❎💠प्रकल्पातून दरवर्षी 11,223 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्माण होईल.


♣️🟦हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील लोअर दिबांग व्हॅली जिल्ह्यातील दिबांग नदीवर आहे.


🔴🔘दिबांग नदीच्या खालच्या भागाचा विकास करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.


🚓🔵👁‍🗨या भागाचा मोठा भाग पुरापासून वाचवावा लागला.

उत्तराखंड भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक स्थापन करणार आहे



🌹❣️उत्तराखंड सरकार भारतातील पहिली सरकारी मातेची दूध बँक स्थापन करणार आहे, ही एक सुविधा आहे जी नवजात बालकांना आईच्या दुधातील पोषक तत्वे पुरवली जाईल याची खात्री करू शकते.


🌕🌺ही घोषणा उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी अमर उजालाच्या गढवालच्या उदयोन्मुख नेत्यांच्या कार्यक्रमादरम्यान केली.


🤱मदर मिल्क बँक:👉


💮🌀प्रसूतीनंतर ज्यांची आई मरण पावली अशा नवजात बालकांना या मिल्क बँकेद्वारे दूध उपलब्ध करून दिले जाईल.


🏮👍👨‍⚕उत्तराखंडचे आरोग्य मंत्री डॉ धनसिंग रावत यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्तनदा महिला या बँकेत दूध दान करू शकतील.

फील्ड मेडल 2022


◆ युक्रेनियन गणितज्ञ मेरीना वायझोव्स्का (Maryna Viazovska) यांना 5 जुलै 2022 रोजी प्रतिष्ठित फील्ड मेडल जाहीर झाला. 


◆ इराणी मरियम मिर्झाखानी (2014) नंतर फील्ड पदकप्राप्त वायाझोव्स्का या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. 


➤ गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान यावर्षी 4 जणांना जाहीर झाला.


◆ इतर विजेत्यांमध्ये जिनेव्हा विदयापीठाचे फ्रेंच गणितज्ञ ह्यूगो डुमिनिल कॉपिन, प्रिन्स्टन विद्यापीठाचे कोरियन अमेरिकन गणितज्ञ जून हुह आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रिटिश गणितज्ञ जेम्स मेनार्ड यांचा समावेश आहे.


◆ विजेत्यांची घोषणा सामान्यतः गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये केली जाते, जी या वर्षी रशियामध्ये होणार होती परंतु त्याऐवजी ते हेलसिंकी येथे हलवण्यात आली.

30 एप्रिल Combine पूर्व साठी काही महत्वपूर्ण गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे...


_अभ्यासात सातत्य ठेवा .


_स्वतःच्या Note's असतील तर त्या व्यवस्थित Read करा.


_आयोगाचे मागील 2017 पासून ते 2022 पर्यंतचे पूर्व चे सर्व पेपर व्यवस्थित चाळा.(अतिशय महत्त्वपूर्ण 2020 ,2021 आणि 2022 चे Prelims चे पेपर व्यवस्थित चाळा)


_ 30 एप्रिल.. पेपर मध्ये चूका टाळण्यासाठी  'टेस्ट सिरीज' चा जास्तीत जास्त सराव करा.(वेळेचे महत्व तुम्हाला टेस्ट पेपर सोडवल्याशिवाय समजणार नाही)


_स्वतः प्रत्येक प्रश्नाचे Analysis करा. 


_ जास्तीत जास्त Revision करा.


_30 एप्रिल ला होणारा Combine चा पेपर आहे त्याच्यामुळे तुमचा अभ्यास एकदम जबरदस्त पाहिजे.. कारण इथे वेळेची मर्यादा असते...


_प्रश्न दिसत्या क्षणीच उत्तर मिळाले पाहिजे.. त्याच्यामुळे तुफान अभ्यास करा

समान नागरी संहिता म्हणजे काय?




UCC ची संकल्पना आहे की संपूर्ण देशासाठी एक कायदा असावा, की जो सर्व धार्मिक समुदायांना त्यांच्या वैयक्तिक बाबींना जसे की विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक इत्यादींना समान पद्धतीने सामावून घेईल.


राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये असे नमूद केले आहे की राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशातील नागरिकांसाठी UCC सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल.


कलम ४४ हे राज्य धोरणाच्या (DPSP) मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक आहे .


कलम 44 मागचा उद्देश संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केल्याप्रमाणे "धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक" च्या उद्देशाला बळकट करणे हा आहे .

राज्यघटना प्रश्नसंच

 1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०✅

ड) कलम ३६२

====================


२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता✅

ड) वरीलसर्व

===================


३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने✅

ड) सहा महिने

====================


४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली✅

ड) महाराष्ट्र

====================


५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय✅

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

====================


६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६✅

ड) यापैकी नाही

=================


७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग✅

ड) व्ही. के. सिंग

====================


८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०✅

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

====================


९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅

क) कलम २६३

ड) कलम २६४

====================


१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

तुम्हाला हे पाठ आहे का :- मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे

      

1) रायगड जिल्ह्याचे जूने नाव काय ?

उत्तर: कुलाबा


2) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना कधी केली ?

उत्तर: 1897


3) मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?

उत्तर: बराकपुर


4) मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयामुळे कोणता रोग होतो ?

उत्तर: मिनामाटा


5) आधुनिक अर्थशास्त्र जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर: ॲडम स्मिथ


6) कोणत्या जिल्ह्यात चुनखडी च्या खाणी मोठ्या प्रमाणात आहे ?

उत्तर: यवतमाळ


7) जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर: 11 जुलै


8) राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

उत्तर: 1993


9) महाराष्ट्र राज्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?

उत्तर: 1972


10) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची (जंगल) टक्केवारी सर्वात जास्त आहे ?

उत्तर: गडचिरोली

अंकगणित प्रश्नमंजुषा ( Test Series )

03 March 2023

सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

* *१८२९ : सती बंदीचा कायदा
* *१८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* *१८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* *१८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* *१८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* *१८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* *१८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* *१८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* *१८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* *१९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* *१९०४ : अभिनव भारतची स्थापना*
* *१९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* *१९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* *१९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* *१९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* *१९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* *१९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* *१९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* *१९०९ : मोर्ले- मंटो सुधारणा.
* *१९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* *१९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* *१९१६ : लखनौ करार.
* *१९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
* *१९१९ : माँटफर्ड कायदा.
* *१९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* *१९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* *१९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* *१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा
* *१९२२: राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* *१९२३ : झेंडा सत्याग्रह.
* *१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* *१९२७ : बार्डोली सत्याग्रह
* *१९२७ मार्च : महाड सत्याग्रह
* *१९२८ : हिन्दुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* *१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
* *१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* *१९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* *१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* *१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* *१९३१ : गांधी-आयर्विन करार.
* *१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* *१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* *१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* *१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* *१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* *१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* *१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* *१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* *१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* *१९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* *१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* *१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* *१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* *१९३९ सप्टेंबर ३ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.
* *१९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* *१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* *१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* *१९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* *१९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* *१९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* *१९४२ ऑगस्ट ८ : भारत छोडो ठराव सम्मत
* *१९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* *१९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* *१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे जिंकले व भारतीय भूमीवर पाय ठेवला.
* *१९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* *१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* *१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* *१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* *१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* *१९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* *१९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.
* *१९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* *१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* *१९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* *१९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* *१९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.
* *१९४७ जुलै१८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सम्मत
* *१९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला
* *१९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.
* *१९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात
* *१९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
* *१९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
* *१९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
* *१९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
* *१९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत
* *१९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी
* १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.
* *१९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू
* *१९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.
* *१९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर


२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी


३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी


४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल


५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट


६) यंग इंडिया - महात्मा गांधी


७) इंडियन मिरर - डी. डी. सेन


८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो


९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी


१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू


११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू


१२) अल-हिलाल - मौलाना आझाद


१३) अल-बलाघ - मौलाना आझाद


१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट


१५) भारतमाता - अजित सिंग


१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर


१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद


१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर


१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय


२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर


२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन रॉय


२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता


२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी


२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय


२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा


२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल


२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा


२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार 


२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार 


३०) गदर - लाला हरदयाल


३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय


३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय


३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद


३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर


३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल


३६) किर्ती - संतोषसिह


३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त


३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन


३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस


४०) इंडिया - सुब्रण्यम भारती


४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी


४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र


४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली


४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास


४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल


४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या


४७) मुंबई समाचार - फरदुनजी 


४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय


४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय


५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान


५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)


५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)


५३) वंदे मातरम् - अरविंद घोष (कोलकता)


५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)


५५) वंदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)


५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)


५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष


५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय


५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष


६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू


६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे



६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)


६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर 


६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर 


६५) जनता - डाॅ. आंबेडकर 


६६) केसरी - लोकमान्य टिळक 


६७) मराठा - लोकमान्य टिळक 


६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलू


६९) शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर 


७०) प्रभाकर - भाऊ महाजन 


७१) धुमकेतू - भाऊ महाजन 


७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन 


७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर 


७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर 


७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर


७६) हरिजन - महात्मा गांधी.


कर्मवीर भाऊराव पाटील



बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.


पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -

मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे.
निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान, उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले. केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.


सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.


भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली कर्मवीरांनी सातार्‍यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.


१९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणार्‍या- आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

Online Test Series

MPSC च्या अभ्यासावरती मी अजून कोणत्या परीक्षा देऊ शकतो?

  दिवसेंदिवस MPSC स्पर्धा परीक्षा क्षेत्र आव्हानात्मक बनत चालले असून विद्यार्थी आयुष्याची 5-10 वर्ष फक्त MPSC चाच अभ्यास करत असतात.

माहितीचा अभाव आणि अनाठायी भीती यामुळे विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षांचा विचार करताना दिसत नाहीत.( मी पण )

तर आज आपण MPSC चाच अभ्यास ( चांगला अभ्यास असलेला विद्यार्थी )इतर परीक्षासाठी कसा उपयोगी ठरु शकतो अशा 2 परीक्षा विचारात घेऊ.

या दोनही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत मी पोहचलो असल्याने त्याविषयी विस्तृत माहिती घेऊ.

1)UPSC CDS- 
                   
-वयोमर्यादा -19-25

-प्रत्येक वर्षी वर्षातून दोनदा UPSC ही परीक्षा Indian Army, Navy आणि Airforce यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी निवडण्यासाठी ही परीक्षा होते. (जर तुम्ही वयाच्या 21-22 वर्षी Select झालात तर तुम्ही या तिन्ही दलातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकता.)
-या परीक्षेचे 2 टप्पे असतात. 
 
पहिला टप्पा MPSC सारखाच Objective व MPSC चाच 90% अभ्यासक्रम असतो. (अभ्यासक्रम Website वरती Check करा.)

- दुसरा टप्पा आपल्या MPSC मुलाखत सारखा असतो. पण त्यामध्ये 3-4 दिवस जवळजवळ 25-30 Obstacles पार करावे लागतात. हा टप्पा सर्वात आव्हानात्मक असतो. व्यक्तिमत्वची सर्वांगीण तपासणी केली जाते.

  त्यामुळे, Defence Forces मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढवण्यासाठी जास्तीत जास्त तरुण विद्यार्थ्यांनी या परीक्षाचा नक्की विचार करावा.

2. UPSC CAPF-

-वयोमर्यादा -19-25(OBC+ALL NT-28 Yrs, SC&ST- 30 Yrs)

- दरवर्षी UPSC भारताच्या PARAMILITARY Forces मध्ये (CRPF,BSF, CISF, SSB, ITBP) Assistant Commandent(Central Dysp)पदासाठी परीक्षा घेते.

-  परीक्षेचे तीन टप्पे असतात.

पहिला टप्पा - यामध्ये 2 Papers असतात.
यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1 चा Syllabus असलेला एक 250 Marks चा पेपर असतो व दुसरा पेपर राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर सारखा 200 Marks cha असतो.

- दुसरा टप्पा -

Physical आणि Medical(विशेष तयारीची गरज नसते )

तिसरा टप्पा -

मुलाखत -150 marks.
  UPSC द्वारा उमेदवाराची पदासाठी असलेली योग्यता तपासण्यासाठी 150 Marks ची मुलाखत असते.

        तर मित्रांनो, माझे बरेच मित्र जे राज्यसेवा / Combine मध्ये अपयशी ठरलेले (पण आशा न हरलेले )आज CDS/CAPF मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत.
     
जर MPSC मध्ये वारंवार अपयश येत असेल तर या परीक्षांना कठीण न मानता(न लाजता)आपणदेखील या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या परीक्षांना Seriously घ्यायला हवे.

-टीप-
-UPSC CAPF 2021 form भरण्याची शेवटची तारीख 10 May 2022 आहे.

- CDS ची पुढची जाहिरात May -2022 मध्ये येणार आहे.

या परीक्षाची माहिती जास्तीतजास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पोस्ट share करा.

महाराष्ट्र भूगोल


❣महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल
(२ मार्क - Combine २०२3)❣

महाराष्ट्र स्थान आणि विस्तार

१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक  (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)

२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी

३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)

४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा
-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.
-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.

६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)

७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग

८. सर्वात कमी जिल्हे असणारा
विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग

१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)

१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे

१३.जिल्हा निर्मिती

१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)

१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)

(येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत-२ मार्क वरील एका टॉपिक मधून असतील)..