Ads

31 March 2020

वनांबद्दल सर्व माहिती

1 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

- 200 सेंमी किंवा त्या पेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात
- जांभा मृदेच्या भागात ही वने आढळतात
- वर्षभर हिरवी दिसतत् म्हणून त्यांना सदाहरित वने म्हणतात
- वृक्षाची उंची 45 ते 60 मी दरम्यान

-भरपूर पाऊस ,आद्रतेचे जास्त प्रमाण व जमिनी मध्ये "ह्युमसचे" मुबलक प्रमाण असल्याने घनदाट वनस्पतींचे आच्छादन पहावयास मिळते

- घनदाट अरण्य मध्ये कमी उंचीच्या वनस्पतीची वाढ होते.

- महाराष्ट्र मध्ये सिधुदुर्ग भगत सावंतवाडी, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, अमरावती- गाविलगड गड, गडचिरोली, चंद्रपूर

- उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षाचे प्रकार : पांढरा, सिडार, फणस, नागचंपा, कावसी, जांभूळ,वेत,तेलताड,तसेच बांबू आई कळक 

- त्या घनदाट अरण्यामधेय कमी उंचीच्या वनस्पतींहीदेखील वाढ होते

* आर्थिक महत्व :

-आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो,त्याचे मुख्य कारण या वनस्पतीपासुन तयार होणारे लाकूड अतिशय
कठीण असल्याने ते "टिंबर" म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

- वृक्षाचे वनसंवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने मृदसंधारण होते

- भूमिगत पाण्याची पातळी वाढते आणि मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतींची निर्मिती होत नाही कमी प्रतीच्या वनस्पती येऊ लागतात

2) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:

- वार्षिक पर्जन्य 200 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात

-पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्याचा एक सलग भाग पाहायला मिळतो 

- सदाहरित आणि पानझडी वने  यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत

- सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात

- आंबोली, लोणावळा, इगतपुरी, या परिसरात निमसदाहरित अरण्ये आढळतात

-ह्याची उंची सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात

- वृक्षाची पाने गळण्याचा हंगाम वेगळा असतो यामुळे वर्षभरात सर्वसाधारण स्वरूपात हिरवीगार वने असतात

- वृक्षाचे प्रकार : निमसदाहरित अरण्यात किंडल,रानफणस,नाना, कदंब, शिसम, बिबळा,आईनं, नाना, वावळी ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने कमी प्रमाणत आहेत

- निमसदाहरित वने कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत

3) उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने

-सहयाद्रीच्या पर्वतावर 250 सेंमी पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.

- पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात उपउष्णसदाहरित वने आढळतात

- उत्तर महाराष्ट्र गाविलगड टेकड्यावरही वने आढळतात

- सह्याद्रीच्या पर्वतामधील वर व पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात पावसाचे भरपूर प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता या सर्व घटकामुळे उप उष्ण सदाहरीत वृक्ष आढळतात

- जांभा जमिनीचाही प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला आहे

-अरण्यात ह्या वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून त्यांचे लहान पट्टे राहिलेलं आहेत

- वृक्षचे प्रकार:

जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, कारवी

आर्थिक महत्व:

- महाबळेश्वर च्या परिसरात "जावळीच्या खोऱ्यात" शिवकाळात अति घनदाट  वनस्पती होत्या त्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात तोड झाली

- हिरडा वृक्षाचे लाकूड चांगले मजबूत असते

- या वनस्पतीचा लाकडाचा उपयोग शेतीच्या अवजारे तयार करण्यासाठी आणि घरबांधणी साठी होतो

- मधूमक्षिपालन हा एक महत्वाचा लघुउद्योगधंदा आहे

4) उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:

-महाराष्ट्रात ही अरण्ये चंद्रपूर व गडचिरोली जिह्याच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आहेत तो परिसर "अलपल्ली अरण्ये" म्हणून ओळखला जातो

- याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात, सातपुडा पर्वतरांगेत गाविलगड टेकड्या(मेळघाट) यांचाही समावेश

- उत्तर कोकणात ठाणे पालघर

- सह्याद्रीच्या पर्वतातील घाटमाथा ओल्डल्यानंतर "पर्जन्यछायेचा प्रदेश" या शिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव डोंगररांगा , हरिश्चंद्राबाला घाट आणि सातमाळा डोंगररंगाच्या पश्चिम भागात आद्रपानझडी अरण्ये पहावयास मिलतात

- कोल्हापूर नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार जिह्यात पानझडी अरण्ये आहेत

- वृक्षाचे स्वरूप:

-वार्षिक पाऊस 120 ते 160 सेंमी असून  तो प्रामुख्याने पावसाळयात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात नैत्रुत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि वर्षातील बाकीचे आठ महिने जवळ जवळ कोरडे असतात

- पाण्याचा पुरवठा वनस्पतींना वर्षभर पुरेसा असत नाही म्हणजेच वर्षातील  बाराही महिने वनस्पती हिरव्यागार राहण्या
इतपत जमिनी ओल्या राहत नाही विशेषतः उन्हाळयात जडत उष्णतेमुळे  जमिनीत ओलावा वनस्पती ना पुरत राहावा म्हणून अनेक वनस्पती ची पाने गळून पडतात. त्यामुळे या पर्णहीन वनस्पती पुन्हा पावसाळयात सुरू होईपर्यंत कशीतरी तग धरून शकतात म्हणून ह्यांना पानझडी अरण्ये (उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:) म्हणतात

-या अरण्ये मध्ये घनदाट वृक्षाचे मध्यम स्वरूपाचे असते

- वृक्षाची उंची  30 ते 40  मीटर एवढी असते

- वृक्षाचे प्रकार:

- उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने अरण्यात मुख्य वनस्पती सागवान आहे
- आईन, हिरडा, सिरस, शिसम, कुसुम,आवळा, किंडल,लेंडी, येरुल, बिबळा ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने मिळतात.

* आर्थिक महत्व:

- सर्वात महत्वाचं वृक्ष म्हणजे सागवान

- चंदनाची वृक्ष अधून मधुन आढळतात

- चंद्रपूर व गडचिरोली  जिह्यात " आल्लापल्ली अरण्यातील" वृक्षची भारतातील प्रसिद्ध वृक्षाची गणना केली जाते

5) उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये:

- सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

-विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

- वृक्षाचे स्वरूप :

- वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात
-काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात
- पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात
- कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

- वृक्षाचे प्रकार :

-सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

आर्थिक महत्व:

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

- इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

- खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

6) उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये

- "दख्खनच्या पठारावर" "मध्य महाराष्ट्र नद्यांच्या खोऱ्यात" च्या लागवडी च्या परिसरात असणाऱ्या डोंगररांग व कमी उंचीच्या पठारावर  काटेरी झाडे आढळतात

- पुणे, सातारा, सांगली , अहमदनगरच्या पूर्व भागात , सोलापूर मराठवाडा विदर्भ भगत काटेरी वनस्पती आढळतात

: वृक्षाचे स्वरूप:

वार्षिक पर्जन्य 80 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात

- कोरड्या हवामानात जुळवून घेणाऱ्या काटेरी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे

-वृक्षाचे प्रकार:

बाभूळ, खैर, हिवर
-निबं झाड अनेक ठिकाणी सापडतात
- तारवड्यासारख्या झउडुओचा उपयोग टॅनिग साठी केला जातो

आत्तापर्यंतचे वित्त आयोग


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟥 पहिला     ➖ 1951  ➖ के. सी. नियोगी
🟧 दुसरा       ➖ 1956 ➖ के. संथानम
🟨 तिसरा      ➖1960 ➖ ए. के. चंदा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟩 चौथा        ➖1964 ➖ पी.व्ही.राजमन्नावर
🟦 पाचवा      ➖1968 ➖ महावीर त्यागी
🟪 सहावा      ➖1972  ➖ के. ब्रह्मानंद रेड्डी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⬛️ सातवा      ➖ 1977 ➖ J. M. शेलार
⬜️ आठवा     ➖ 1983 ➖ यशवंतराव चव्हाण
🟫 नववा       ➖ 1987 ➖ एन पी के साळवे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟥 दहावा      ➖ 1992 ➖ के सी पंत
🟧 अकरावा  ➖ 1958 ➖ ए. एम. खुश्रो
🟨 बारावा     ➖ 2002 ➖ C. रंगराजन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🟩 तेरावा       ➖2007 ➖ विजय केळकर
🟦 चौदावा     ➖2013 ➖ वाय व्ही. रेड्डी
🟥 पंधरावा    ➖ 2017 ➖ एन. के.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घटना समितीतील प्रमुख स्त्रिया

◾️राजकुमारी अमृता कौर,

◾️अम्मू स्वामीनाथन,

◾️बेगम एझाज रसूल,

◾️दाक्षायिनी वेलायुधान,

◾️रेणुका रे, लीला रे,

◾️कमला चौधरी,

◾️ पूर्णिमा बॅनर्जी,

◾️ मालती चौधरी,

◾️हंसाबेन मेहता,

◾️दुर्गाबाई देशमुख,

◾️विजयलक्ष्मी पंडित,

◾️ नलिनी रंजन घोष,

◾️सरोजिनी नायडू

तुम्हाला हे आठवते का :- अर्थसंकल्प 2020 ठाकरे सरकारचे 1 ले महाबजेट


                                                                                                                                                                                                                                                                                                                                          
▪ राज्यात 1500  आदर्श शाळा समोर आणल्या जाईल, प्रत्येक जिल्ह्यात 4 आदर्श शाळा बनवणार
▪ भूमिपुत्रांना 80% नोकरीसाठी कायदा करू
▪ 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020 च्या आधी वर्ग करणार
▪ शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर पंप बसवण्यात येणार आहेत यासाठी 6700 कोटींची तरतूद
▪अण्णासाहेब पाटील महामंडळास ५० कोटी
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ शिकाऊ योजनेसाठी 6000  कोटी रुपये
▪ 10वी उत्तीर्णांना रोजगार प्रशिक्षण देणार
▪ माध्यमिक शाळांतील मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार 
▪ उच्च तंत्र शिक्षणासाठी 1300  कोटी रुपये
▪ 5 वर्षात 100000 बेरोजगार प्रशिक्षित होणार
▪ मेडिकल डिग्री च्या 118 जागा वाढवणार
▪ प्राथमिक आरोग्यसेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
▪ 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार
▪ नंदुरबार मध्ये नवे मेडिकल कॉलेज
▪ कबड्डी कुस्ती स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ खो - खो व्हॉलीबॉल स्पर्धांना 75 लाख अनुदान
▪ बालेवाडीत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
▪ कर्नाटकात मराठी वृत्तपत्रांना अनुदान देणार
▪ एस टी बसस्थानकांसाठी 456  कोटी
▪ महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार त्यासाठी 401 कोटी रुपये 
▪ महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3500 कोटी तरतूद
▪ महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, सागरी महामार्गांसाठी 3595 कोटींचा निधी
▪ ऊर्जा विभागास 8  कोटी रुपये
▪ 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
▪ प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलीस ठाणे
▪ महिला बचत गटांकडून 1000  कोटींची खरेदी करणार
▪ 10 रुपये शिवथाळी भोजन योजना - प्रत्येक केंद्रावर 500 थाळी - 1 लाख थाळींचं उद्दिष्टं - 150 कोटी रुपये
▪ पेट्रोल डिझेल च्या दरात 1 रुपयांची वाढ
▪ पाणीपुरवठा विभागासाठी 2043  कोटी
▪ मुंबईत मराठी भाषा भवन बांधणार
▪ मुबंईत वस्तू व सेवा केंद्र बांधणार, त्यासाठी 148  कोटी रुपये
▪ नाग , इंद्रायणी , वालधुनीचे प्रदूषण रोखणार ; पर्यावण विभागासाठी 230 कोटी रुपये
▪ वनविभागाची 1630 कोटी रुपये
▪ वरळीत पर्यटन संकुल उभारणार
▪ सोलापूर व पुणे येथे नवे विमानतळ उभारणार
▪ लोणार सरोवराचाही विकास करणार
▪ मुरुड जंजीरयाचा सुशोभिकरण करणार
▪ कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटी
▪ आमदार विकास निधी दर वर्षी 3  कोटी होणार;
▪ पर्यटन विकासाठी एकूण 1400 कोटी
▪ मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी तसेच सिंचनासाठी 10,235 कोटी
▪ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवणी 4  कोटी रुपये
▪ सामाजिक न्याय विभागास 9668 कोटी रुपये
▪ पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
▪ नाट्यसंमेलनांना 10 कोटी रुपये अनुदान
▪ भारतरत्नांचे एकत्रित स्मारक उभारणार
▪ आदिवासी विकास  विभागासाठी 8853 कोटी रुपये
▪ जिल्हा वार्षिक योजनांसाठी 9800
▪ मुद्रांक शुल्कात 1 % सूट
▪ तृतीयपंथीय मंडळासाठी 5 कोटी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था ‘कोरोना अभ्यास मालिका’ पुस्तके प्रकाशित करणार

भारत सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयांच्या अंतर्गत पुस्तक प्रकाशन आणि पुस्तक संवर्धनासाठी काम करणारी राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) यांनी कोविड-19 या विषयावर अभ्यास मालिका प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

भविष्यकाळात मानवी समाजासाठी कोरोना आजारा विषयीच्या जागरूकतेचे विलक्षण मनोवैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोरोनाचा प्रभाव ओसारल्यानंतर वाचकांच्या गरजेसाठी सर्व वयोगटांकरिता ही पुस्तके तयार करण्यात येत आहे. उपक्रमाच्या अंतर्गत योग्य वाचन साहित्य तयार करण्यासाठी विविध क्षेत्रांची माहिती घेतली जात आहे.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ‘सायको-सोशल इम्पॅक्ट ऑफ कोरोना पॅन्डमिक अँड वेज टू कोप’ या उप-विषयावर पुस्तके तयार करण्यासाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञ / सल्लागारांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.

कोरोनाच्या विविध पैलूंविषयी जाणून घेण्यासाठी मुलांची पुस्तके तयार केली जात आहोत. जागरूकता, कला, साहित्य, लोकसाहित्य, आर्थिक आणि समाजशास्त्रीय बाबी, कोरोना महामारीतून उद्भवणारी विज्ञान / आरोग्य जागरूकता आणि विलगीकरण, संचारबंदी या विषयांवर आधारित पुस्तकेदेखील नियोजित आहेत.

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) विषयी

राष्ट्रीय पुस्तके विश्वस्त संस्था (NBT) हे एक भारतीय प्रकाशन गृह आहे, ज्याची 01 ऑगस्ट 1957 रोजी स्थापना झाली. हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत एक स्वायत्त संस्था आहे. आता ही संस्था मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

30 March 2020

करोनाने अर्थव्यवस्थेचे नुकसान पाहून जर्मनीत मंत्र्याची आत्महत्या

🔸कोरोनाचा विपरित परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसंच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसत आहे.

🔹कोरोनामुळे जगभरात प्रामुख्याने अर्थव्यवस्तेवर कसा परिणाम होतोय हे आपण पाहत आहोतच.
याचच एक अस्वस्थ करणार एक उदाहरण सांगायचं झाल्यास हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचं. 

🔹जर्मनीत अर्थव्यवस्थेच्या चिंतेतून हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय.
करोनामुळे होत असलेले मृत्यू आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान ला यासर्व परिस्थिला तोंड कसे द्यावे या तणावात होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.

🔸थॉमस शेफर यांचा मृतदेह रेल्वे रूळाजवळ आढळून आला. त्यांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याचं बोललं जातंय.

🔹शेफर गेल्या १० वर्षांपासून हेस्सीचे अर्थमंत्री होते.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.


त्यानंतर ही देशातील सर्वांत मोठी दुसरी बँक ठरणार आहे. या बँकेकडे एकूण १७ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

कॅनरा बँकेमध्ये सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण होणार आहे. त्यानंतर ही देशातील चौथी सर्वांत मोठी बँक ठरणार आहे. या बँकेकडे १५.२० लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

युनियन बँकेचे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेसह विलीनीकरण होणार आहे. विलीनीकरणानंत ही देशातील सर्वांत मोठी पाचवी सरकारी बँक बनणार आहे. या बँकेकडे १४.५९ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे.

इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेच्या विलीनीकरणानंतर ही देशातील सातवी मोठी बँक ठरणार आहे.

राजघराण्यातील पहिला बळी स्पेनच्या राजकन्येचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

🔹करोना व्हायरसचा कहर जगभरात वाढतो आहे आणि जगभरात या व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे.

🔸आता त्यात स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तिचाही समावेश झाला आहे.
स्पेनची राजकन्या मारिया तेरेसा यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.
त्या ८६ वर्षांच्या होत्या.

🔹मारिया यांचे बंधु प्रिन्स सिक्सटो एनरिक दी बॉरबोन यांनी ही माहिती दिली.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 30 मार्च 2020.

❇ हो संग सॉंग ने किआ मोटर्सचे अध्यक्ष नियुक्त केले

❇ राजस्थान पोलिसांनी 'राजकॉप' सिटीझन्स मोबाइल अॅप सुरू केले
 
❇ मिर्जा वहीदने कल्पित कथेत 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ संतानू दास यांनी नॉन फिक्शनमध्ये 'द हिंदू पुरस्कार 2019 'जिंकला

❇ सौदी अरेबियाकडून अखंड एलपीजी पुरवठा करण्यासाठी भारत

❇ मोहम्मद नबी यांना इराणच्या फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस म्हणून नियुक्त केले

❇ गोवाचे भागीदार इनोव्हेसरसह भारताचे पहिले सेल्फ असेसमेंट टूल लाँच करण्यासाठी

❇ अमेरिकेने 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक सहाय्य जाहीर केली

❇ शासनाने कोविड -19 राष्ट्रीय दूरसंचार केंद्र सुरू केले

❇ सर्वोच्च न्यायालयाने बीएस चतुर्थ ते बीएस सहामध्ये संक्रमणाची अंतिम मुदत वाढविली

❇ नेपाळ सरकारने एप्रिलपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी वाढविली

❇ उत्तर मॅसेडोनिया अधिकृतपणे नाटोमध्ये सामील झाले

❇ उत्तर मॅसेडोनिया नाटोचा 30 वा सदस्य होत

❇ गुजरात सरकारने "एसएमसी कोविड -19  ट्रॅकर" सुरू केले.

❇ भारतीय शॉट पुटर नवीन चिकारा 4 वर्षांसाठी निलंबित

General Knowledge

▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था

चलनवाढ व चलनघट

▪️अर्थव्यवस्थेतील किंमतीची पातळी  जेव्हा चढत जाते, तेव्हा ‘चलनवाढ’ होत आहे असे म्हणतात.

▪️ याउलट  किंमतीची पातळी जेव्हा घटत असते, तेव्हा ‘चलनघट’ होत आहे असे  समजतात.

▪️चलनवाढ व चलनघट ह्या सर्वस्वी चलनविषयक घटना  होत, हा विचार जागतिक महामंदीपर्यंतच्या काळात मान्यता पावलेला होता.

▪️परंतु केन्सप्रणीत विचारसरणीप्रमाणे जर अर्थव्यवस्था अपूर्ण  रोजगाराच्या अवस्थेत असेल, तर पैशाचा पुरवठा वाढल्यास  किंमतीबरोबर रोजगारही वाढतो. ही ‘अपूर्ण चलनवाढ’ किंवा ‘सौम्य  चलनवाढ’ होय.

💢 चलनवाढ  💢

▪️महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय.

◾️चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' आणि  'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले जातात .

◾️मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते.

◾️चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते.

💢 भारतातली चलनवाढीची कारणे 💢

●तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे.

●ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो.

●परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.

●ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.

●परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.

●काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.

● या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

महत्त्वाचे सामान्य ज्ञान

◆ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स

◆ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र

◆ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897

◆ शेतकर्‍यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना

◆ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक

◆ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा

◆ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०

◆ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये

◆ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी

◆ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

इतिहास :- खोती पद्धत

🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.

🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.

🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.

🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔹खोती पद्धत बहुतांशी 
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि 
सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती.

🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते.

🔹कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.

🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.

🔸 त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या.

🔹त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.

🔸शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते.

🔹शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली.
त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.

📚 खोतांचे अधिकार 📚

🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.

🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.

🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.

🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.

➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.

General Knowledge

▪ ‘काशी महाकाल एक्सप्रेस’ नावाची तिसरी कॉर्पोरेट पॅसेंजर रेलगाडी कोणत्या मार्गावर धावणार?
उत्तर : वाराणसी-इंदौर

▪ ‘फिरते मधमाशा पालनगृह’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे?
उत्तर : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय

▪ ‘भारतीय नौदल अकादमी’ कुठे आहे?
उत्तर : केरळ

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

▪ कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
उत्तर : एन. के. सिंग

▪ खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय कुठे आहे?
उत्तर : मुंबई

▪ ‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय कुठे आहे?
उत्तर : देहरादून

▪ कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
उत्तर : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

▪ 'जागतिक युनानी दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर : हकीम अजमल खान

▪ ‘खेलो इंडिया’ अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय हिवाळी खेळांचे आयोजन कुठे केले जाणार आहे?
उत्तर : गुलमर्ग

महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग

1. कोकण किनारपट्टी

2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

🔹1. कोकण किनारपट्टी

स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.

विस्तार: उत्तरेस – दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’  प्रकारची आहे.

लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी. 

क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

🔹2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.

सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

🔹3) महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.

ऊंची:  450 मीटर– या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.