Tuesday 31 March 2020

वनांबद्दल सर्व माहिती

1 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

- 200 सेंमी किंवा त्या पेक्षा जास्त असणाऱ्या प्रदेशात
- जांभा मृदेच्या भागात ही वने आढळतात
- वर्षभर हिरवी दिसतत् म्हणून त्यांना सदाहरित वने म्हणतात
- वृक्षाची उंची 45 ते 60 मी दरम्यान

-भरपूर पाऊस ,आद्रतेचे जास्त प्रमाण व जमिनी मध्ये "ह्युमसचे" मुबलक प्रमाण असल्याने घनदाट वनस्पतींचे आच्छादन पहावयास मिळते

- घनदाट अरण्य मध्ये कमी उंचीच्या वनस्पतीची वाढ होते.

- महाराष्ट्र मध्ये सिधुदुर्ग भगत सावंतवाडी, महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, अमरावती- गाविलगड गड, गडचिरोली, चंद्रपूर

- उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षाचे प्रकार : पांढरा, सिडार, फणस, नागचंपा, कावसी, जांभूळ,वेत,तेलताड,तसेच बांबू आई कळक 

- त्या घनदाट अरण्यामधेय कमी उंचीच्या वनस्पतींहीदेखील वाढ होते

* आर्थिक महत्व :

-आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो,त्याचे मुख्य कारण या वनस्पतीपासुन तयार होणारे लाकूड अतिशय
कठीण असल्याने ते "टिंबर" म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

- वृक्षाचे वनसंवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण त्याच्या साह्याने मृदसंधारण होते

- भूमिगत पाण्याची पातळी वाढते आणि मूळ वनस्पती तोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच प्रकारच्या वनस्पतींची निर्मिती होत नाही कमी प्रतीच्या वनस्पती येऊ लागतात

2) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित अरण्ये:

- वार्षिक पर्जन्य 200 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात

-पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्याचा एक सलग भाग पाहायला मिळतो 

- सदाहरित आणि पानझडी वने  यांच्या संक्रमण अवस्थेत ही अरण्ये आहेत

- सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावरही काही वनस्पती आढळतात

- आंबोली, लोणावळा, इगतपुरी, या परिसरात निमसदाहरित अरण्ये आढळतात

-ह्याची उंची सदाहरित अरण्यापेक्षा कमी उंचीचे असतात

- वृक्षाची पाने गळण्याचा हंगाम वेगळा असतो यामुळे वर्षभरात सर्वसाधारण स्वरूपात हिरवीगार वने असतात

- वृक्षाचे प्रकार : निमसदाहरित अरण्यात किंडल,रानफणस,नाना, कदंब, शिसम, बिबळा,आईनं, नाना, वावळी ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने कमी प्रमाणत आहेत

- निमसदाहरित वने कोकण व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आहेत

3) उपउष्णकटिबंधीय सदाहरित वने

-सहयाद्रीच्या पर्वतावर 250 सेंमी पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आहेत.

- पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात उपउष्णसदाहरित वने आढळतात

- उत्तर महाराष्ट्र गाविलगड टेकड्यावरही वने आढळतात

- सह्याद्रीच्या पर्वतामधील वर व पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान व भीमाशंकर च्या परिसरात पावसाचे भरपूर प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान, दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता या सर्व घटकामुळे उप उष्ण सदाहरीत वृक्ष आढळतात

- जांभा जमिनीचाही प्रभाव वनस्पतीच्या वितरणावर झालेला आहे

-अरण्यात ह्या वृक्षाची फार मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली असून त्यांचे लहान पट्टे राहिलेलं आहेत

- वृक्षचे प्रकार:

जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा, कारवी

आर्थिक महत्व:

- महाबळेश्वर च्या परिसरात "जावळीच्या खोऱ्यात" शिवकाळात अति घनदाट  वनस्पती होत्या त्यानंतर त्यांची मोठ्या प्रमाणात तोड झाली

- हिरडा वृक्षाचे लाकूड चांगले मजबूत असते

- या वनस्पतीचा लाकडाचा उपयोग शेतीच्या अवजारे तयार करण्यासाठी आणि घरबांधणी साठी होतो

- मधूमक्षिपालन हा एक महत्वाचा लघुउद्योगधंदा आहे

4) उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:

-महाराष्ट्रात ही अरण्ये चंद्रपूर व गडचिरोली जिह्याच्या पूर्व भागात चिरोल व नवेगाव टेकड्यावर आहेत तो परिसर "अलपल्ली अरण्ये" म्हणून ओळखला जातो

- याशिवाय भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या काही भागात, सातपुडा पर्वतरांगेत गाविलगड टेकड्या(मेळघाट) यांचाही समावेश

- उत्तर कोकणात ठाणे पालघर

- सह्याद्रीच्या पर्वतातील घाटमाथा ओल्डल्यानंतर "पर्जन्यछायेचा प्रदेश" या शिवाय सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या शंभू महादेव डोंगररांगा , हरिश्चंद्राबाला घाट आणि सातमाळा डोंगररंगाच्या पश्चिम भागात आद्रपानझडी अरण्ये पहावयास मिलतात

- कोल्हापूर नाशिक ठाणे पालघर धुळे नंदुरबार जिह्यात पानझडी अरण्ये आहेत

- वृक्षाचे स्वरूप:

-वार्षिक पाऊस 120 ते 160 सेंमी असून  तो प्रामुख्याने पावसाळयात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या काळात नैत्रुत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि वर्षातील बाकीचे आठ महिने जवळ जवळ कोरडे असतात

- पाण्याचा पुरवठा वनस्पतींना वर्षभर पुरेसा असत नाही म्हणजेच वर्षातील  बाराही महिने वनस्पती हिरव्यागार राहण्या
इतपत जमिनी ओल्या राहत नाही विशेषतः उन्हाळयात जडत उष्णतेमुळे  जमिनीत ओलावा वनस्पती ना पुरत राहावा म्हणून अनेक वनस्पती ची पाने गळून पडतात. त्यामुळे या पर्णहीन वनस्पती पुन्हा पावसाळयात सुरू होईपर्यंत कशीतरी तग धरून शकतात म्हणून ह्यांना पानझडी अरण्ये (उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने- उष्ण कटिबंधीय मान्सून अरण्ये:) म्हणतात

-या अरण्ये मध्ये घनदाट वृक्षाचे मध्यम स्वरूपाचे असते

- वृक्षाची उंची  30 ते 40  मीटर एवढी असते

- वृक्षाचे प्रकार:

- उष्ण कटिबंधीय आद्रपानझडी वने अरण्यात मुख्य वनस्पती सागवान आहे
- आईन, हिरडा, सिरस, शिसम, कुसुम,आवळा, किंडल,लेंडी, येरुल, बिबळा ही वृक्ष आढळतात

- बांबूची वने मिळतात.

* आर्थिक महत्व:

- सर्वात महत्वाचं वृक्ष म्हणजे सागवान

- चंदनाची वृक्ष अधून मधुन आढळतात

- चंद्रपूर व गडचिरोली  जिह्यात " आल्लापल्ली अरण्यातील" वृक्षची भारतातील प्रसिद्ध वृक्षाची गणना केली जाते

5) उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये:

- सातपुडा पर्वतरांगा आणि अजिठ डोंगररांग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- घटमाथ्याच्या पूर्वेस पायथ्यालागत असणाऱ्या कमी उंचीच्या टेकड्यावरही ही अरण्ये पाहाव्यास मिळतात

-विदर्भाच्या डोंगररांळ भाग उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये व्यापलेला आहे

- वृक्षाचे स्वरूप :

- वार्षिक पर्जन्य  80 ते 120 सेंमी असणाऱ्या प्रदेशात रुक्ष पानझडी अरण्ये आढळतात

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी वृक्ष उंच असतात
-काही ठिकाणी कमी उंचीचे सुद्धा आढळतात
- पावसाळ्यात फक्त वनस्पती हिरव्यागार दिसतात
- कोरड्या हवामानात पाण्याच्या अभावामुळे बसरेसचे वृक्ष पर्णहीन  आढळतात

- वृक्षाचे प्रकार :

-सागवान,धावडा, शिसम, तेंदू पळस,बीजसाल लेंडी, हेडी, बेल, खैर, अंजन वैगरे

आर्थिक महत्व:

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये अनेक वनस्पती चा उपयोग टिंबर म्हणून केला जातो

- इंधन म्हणून लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

- खैरसारख्या वनस्पतीच्या उवयोग "कात" निर्माण करण्यासाठी केला जातो

- उष्ण कटिबंधीय रुक्ष पानझडी अरण्ये मध्ये मानवाचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे, बरीचशी जमीन पिकाच्या लागवडीखाली आणण्यात आली आहे

6) उष्ण कटिबंधीय काटेरी अरण्ये

- "दख्खनच्या पठारावर" "मध्य महाराष्ट्र नद्यांच्या खोऱ्यात" च्या लागवडी च्या परिसरात असणाऱ्या डोंगररांग व कमी उंचीच्या पठारावर  काटेरी झाडे आढळतात

- पुणे, सातारा, सांगली , अहमदनगरच्या पूर्व भागात , सोलापूर मराठवाडा विदर्भ भगत काटेरी वनस्पती आढळतात

: वृक्षाचे स्वरूप:

वार्षिक पर्जन्य 80 सेंमी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात ही अरण्ये आढळतात

- कोरड्या हवामानात जुळवून घेणाऱ्या काटेरी वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे

-वृक्षाचे प्रकार:

बाभूळ, खैर, हिवर
-निबं झाड अनेक ठिकाणी सापडतात
- तारवड्यासारख्या झउडुओचा उपयोग टॅनिग साठी केला जातो

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...