24 July 2020

One liner सराव प्रश्न उत्तरे

● ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा कोणत्या वनाला प्रदान करण्यात आला?

उत्तर : ‘पोबा’ (आसाम)

● “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल कोणती कंपनी बांधणार आहे?

उत्तर : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.)

● "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे कोणी अनावरण केले?

उत्तर : पेमा खंडू, अरुणाचल मुख्यमंत्री

● कोणत्या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला?

उत्तर : सायबर गुन्हे

● खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?

उत्तर : हरसिमरत कौर बादल, केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री

● ‘FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा कोणत्या देशात खेळवली जाणार आहे.

उत्तर : कतार

● ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून कोणत्या योजनेला ओळखले जाते?

उत्तर : 'एअर बबल'

● दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर : श्रीपाद येसो नाईक

● ‘आर्मी कमांडर’ परिषदेचे अध्यक्ष कोण आहे?

उत्तर : भुदलाचे प्रमुख (जनरल एम.एम. नरावणे)

● ‘इकाबॉग’ हे शीर्षक असलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

उत्तर : जे. के. रोलिंग (प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका)

● शारीरिक ताण निर्माण झाल्यास ‘धक्के शोषक’ म्हणून काम करून एक्सॉन (मज्जापेशीपासून सुरू होणारा तंतू) यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणाऱ्या रेणूचे नाव काय?

उत्तर : स्पेक्ट्रिन

● ‘सायबर सेफ्टी- ए हँडबुक फॉर स्टूडेंट्स ऑफ सेकंडरी अँड सीनियर सेकंडरी स्कूल्स’ हे शीर्षक असलेले पुस्तक कोणत्या संस्थेनी प्रकाशित केले?

उत्तर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)

● जगातले पहिले ‘कॉन्टॅक्टलेस विझिटर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर’ कोणत्या कंपनीने विकसित केले?

उत्तर : व्हीएएमएस ग्लोबल ( ‘VAMS सेफगार्ड’)

● भारतीय हवाई दलाच्या कोणत्या स्क्वाड्रनमध्ये ‘तेजस’ विमानांच्या तुकडीचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर : फ्लाइंग बुलेट्स

● ‘कोविड कथा’ या पुस्तकाची हिंदी आवृत्ती कोणत्या संस्थेनी प्रसिद्ध केली?

उत्तर : राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संप्रेषण परिषद (NCSTC)

● ‘न्यू डेव्हलपमेंट बँक’ या संस्थेच्या अध्यक्ष पदावर कोणाची निवड झाली?

उत्तर : मार्कोस प्राडो ट्रोयजो

   
▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

आजचे प्रश्नसंच


कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?

(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’✅✅
(B) रजनीश कुमार
(C) स्मृती इराणी
(D) प्रकाश जावडेकर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

____________ या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.

(A) भारत✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) ग्रेटब्रिटन
(D) चीन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?

(A) सत्य नदेला
(B) टीम कूक
(C) रीड हेस्टिंग
(D) वेद प्रकाश दुडेजा✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

(A) अबीर लवासा
(B) नागेंद्र सिंग
(C) अशोक लवासा✅✅
(D) सुशील चंद्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?

(A) वेस्ट इंडीज✅✅
(B) ऑस्ट्रेलिया
(C) श्रीलंका
(D) पाकिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO ✔
B. IMF
C. IBRD
D. ADB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ ✔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 ✔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन ✔
C. केसीन
D. व्हिटेलीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे ✔
D. 6 वर्षे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

___साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.

(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मान्सूनचे स्वरूप


अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल
ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण
क) मान्सूनचा खंड
ड) मान्सूनचे निर्गमन

▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल
- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो 

2) पाऊसाचे  वितरण
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो .
- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध
- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .
- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.
- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.

क) मान्सूनचा खंड
- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.

🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....

- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
- पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही .
- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .

ड) मान्सूनचे निर्गमन
- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .
- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

23 July 2020

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

हल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे एक आव्हान बनले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच सुयोग्य नियोजन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता.    

1. *वेळापत्रक बनवा* : अभ्यासाचा Syllabus, जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच वेळापत्रक बनवावे. त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

2 *नोट्स तयार करा* : तयारी करताना जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्या. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही.

3. *शिस्त पाळा* : आपण जे ठरवलंय ते त्याचा पद्धतीने होत आहे कि नाही? हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावा. याने नक्कीच फायदा होईल.

4. *प्रलोभनांना बळी नको* : सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) तसेच वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर रहा. याने तुमचा वेळ वाचेल.

5. *मॉर्क टेस्ट सोडवून बघा* : मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. ऑफलाईन टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. यामुळे सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल व परीक्षेची भीती नाहीशी होईल.

MPSC ची तयारी : जागतिकीकरणाचा परिणाम

📌आजघडीला बहुतांश सामाजिक समस्या कमी अधिक प्रमाणात जागतिकीकरणाच्या प्रभावापासून अलिप्त राहू शकलेल्या नाहीत. त्यामुळे जागतिकीकरण हा सामाजिक मुद्दा म्हणून समजून घेताना संकल्पना आणि तिचा व्यवहार, त्यात गुंतलेले विविध प्रवाह, तसेच त्याकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक आहे.

📌संपूर्ण जग एका मोठय़ा बाजारपेठेत रूपांतरित होण्याच्या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. वस्तू आणि सेवा तसेच भांडवल आणि श्रम यांच्या व्यापारावरील र्निबध उठवून जागतिक पातळीवर व्यापार खुला करण्याची प्रक्रिया यात सामावलेली आहे. खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया १९ व्या शतकापासून सुरू झाली. भांडवलशाहीची वाढ, उपलब्ध सागरी दळणवळण, टेलिग्रामपासून ते २० व्या शतकातील उपलब्ध हवाई मार्ग, दूरध्वनी, संगणक, बहुराष्ट्रीय कंपन्या, व्यापार आणि गुंतवणुकीवरील र्निबध सैल होण्यातून ही प्रक्रिया सुरू झाली.

📌२० व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या पूर्वाधात माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि सेवांचा उदय आणि पुढे जागतिक पातळीवर व्यापार खुला झाल्याने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला.

📌फ्रान्सिस फुकुयामा यांनी जागतिकीकरणाला ‘मानवी शासनाचे उदारमतवादी लोकशाहीचे अंतिम प्रारूप’ असे संबोधले. थॉमस फ्रीडमनच्या मते, जागतिकीकरण म्हणजे व्यापार, वित्त आणि माहितीच्या एकत्रीकरणातून एकच एक अशी जागतिक बाजारपेठ आणि संस्कृतीची निर्मिती होय. अँथनी गिडन्स म्हणतो त्याप्रमाणे, जागतिकीकरण म्हणजे जगभरात सामाजिक संबंधांचे सघनीकरण घडून येणे होय.

📌जागतिकीकरणाच्या समर्थकांच्या मते, अविकसित आणि विकसनशील देशांच्या आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊन विकसित देश आणि बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब देशात मोठी भांडवल गुंतवणूक करीत आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रवाह मागास राष्ट्रांकडे जाताना दिसतो आहे. जागतिकीकरणाच्या धोरणातून दक्षिणपूर्व आशियायी देश आणि ब्राझील यांनी विकास संपादन केला. याउलट जागतिकीकरणांतर्गत उदारीकरण, खासगीकरण, तंत्रज्ञानात्मक क्रांती, बहुराष्ट्रीय कंपन्या, आंतरराष्ट्रीयीकरण, राष्ट्र राज्याचा ऱ्हास, कल्याणकारी राज्याचा ऱ्हास, बाजारपेठांचे सार्वभौमत्व, बहुसांस्कृतिकवाद असेही प्रवाह सुरू झाले.

📌‘जे स्थानिक आहे ते जागतिक आहे आणि जे जागतिक ते स्थानिक आहे’ या प्रक्रियेला रॉबर्टसन ‘विशिष्टतेचे सार्वत्रिकीकरण’आणि ‘सार्वत्रिकतेचे विशिष्टीकरण’ या रूपाने ओळखतो. संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनून आजघडीला ‘विचार जागतिक आणि कृती राष्ट्रीय’ असाच नारा बळावत असल्याचे दिसते. ग्लोबल आणि लोकल यातून ग्लोकल बनले आहे. त्यामुळे अरेनाज यांनी यास ‘हायब्रीडायझेशन’असे संबोधले. सांस्कृतिक आक्रमण आणि मागास राष्ट्रांचे आर्थिक सार्वभौमत्व पायदळी तुडवण्यामुळे जागतिकीकरणास नववसाहतवादाचे नवे रूपदेखील मानण्यात येते.

📌जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही व्यक्ती स्वतंत्र अथवा विभक्त समूहाचा भाग न राहता संपूर्ण समाजच थेट जागतिक व्यवहाराशी जोडला गेला आहे.

📌जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला दिसतो. कुटुंब व्यवस्था, विवाह, स्त्री-पुरुष संबंध, जाती, जनजाती, भाषा, इ. सामाजिक घटकांमध्ये सामाजिक—आर्थिक स्थित्यंतरे घडून येत आहेत. जागतिकीकरणामुळे लहान मुले, तरुण वर्ग आणि वृद्धांचे जीवनमान प्रभावित झालेले आहे. ग्राहकवादाच्या प्रभावातून नव समाज आकार घेत आहे.

📌माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे लोकांच्या जीवनाचा सांस्कृतिक आकृतिबंध बदलत असून अमेरिकन कपडे, चायनीज अन्न, फ्रेंच व्हिस्की, इंग्लिश पॉप संगीत याबाबी नित्य परिचयाच्या झालेल्या आहेत. जागतिकीकरणातून नव्या नागरी समाजाची निर्मिती होत आहे.

📌जागतिकीकरणाचा स्पष्ट आविष्कार बाजारपेठा, व्यापार, वस्तू आणि वित्तीय गुंतवणूक या क्षेत्रातील आर्थिक प्रक्रियांमध्ये दिसून येतो. आर्थिक धोरणे, कृषी, रोजगार, नैसर्गिक आणि मानवी संसाधने यावरही जागतिकीकरणाचा प्रभाव दिसून येतो.

📌जागतिकीकरणाची नैसर्गिक नाळ उदारीकरणाशी जोडली असल्याने जगभर भांडवलाचा प्रवाह व बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच कार्पोरेशन्स स्वत:चे जाळे विणत आहेत. त्यातून डिस्नेफिकेशन, मॅकडोनाल्डायझेशन आणि कोकाकोलोनायझेशन इ. शब्द आपल्या अंगवळणी पडत आहेत. थेट परकीय गुंतवणूक हे जगभरातील घटीत बनले आहे.

📌राष्ट्र राज्याच्या सीमा धूसर होऊन ‘राष्ट्रांचे सार्वभौमत्व’धोक्यात आलेले आहे. कल्याणकारी भूमिकेतून माघार घेऊन राज्याने कायदा सुव्यवस्था सांभाळावी, असा दबाव तयार होत आहे. राज्यसंस्था बिगर राजकीय अभिकर्त्यांच्या मदतीने राज्यकारभार चालवीत आहे. त्यातून प्रातिनिधिक लोकशाही राजकारणाचा अवकाश नागरी समाजाकडून गिळंकृत केला जात आहे.

📌जागतिकीकरणामुळे ‘राष्ट्रातीत नागरिकत्व’ निर्माण होत आहे. विल किमलिका यांच्या मते, आजघडीला ‘बहुसांस्कृतिक नागरिकत्व’ उदयाला येत आहे. पुढे ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर गोल्डस्मिथच्या शब्दात ‘जागतिक नागरिकत्व’ या संकल्पना मूर्त रूपात येऊ शकतील. या उलट जागतिकीकरणात सांस्कृतिक वैविध्य नष्ट होऊन एकछापी संस्कृती निर्माण होते असाही प्रतिवाद केला जातो.

📌सोविएत युनियनचे विघटन आणि आखातातील युद्ध, देशांतर्गत निर्माण झालेली राजकीय अस्थिरता तसेच अनिवासी भारतीयांची गुंतवणुकीमधून माघार यांच्या एकत्रित परिणामातून भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला सोडचिठ्ठी देऊन खुले आर्थिक धोरण स्वीकारले. खासगी क्षेत्रावरील र्निबध काढून गुंतवणुकीचे मार्ग खुले केले. विदेशी गुंतवणुकीवरील बंधने हटवून भारतीय बाजारपेठ जागतिक बाजारपेठांशी जोडली गेली.

मोहनदास करमचंद गांधी.

 🅾(ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)

🅾हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

🅾अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

🅾रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.

🅾 सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

🅾त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या पाचवर येणार!

🅾केंद्र सरकारने बँकिंग उद्योगाच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून सध्याच्या १२ राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या आणखी कमी करण्याचे ठरविले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन दिवसांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही योजना प्रस्तावित केली असून त्यात काही बँकांचे खासगीकरणही अभिप्रेत आहे.

🅾वृत्तसंस्थेने सरकारी आणि बँकिंग सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार प्रस्तावित योजनेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी मालकीच्या बँकांची संख्या केवळ पाचच राहील असे उद्दिष्ट राखण्यात आले आहे. तथापि सध्याच्या १२ वरून पाच अशी ही संख्या खासगीकरणाच्या माध्यमातून कमी केली जाणार आहे. सरकारी मालकीच्या बँकांपैकी बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक या बँकांतील सरकारकडे असलेल्या बहुमताचा भागभांडवली हिस्सा विकण्याचा पर्यायाने या बँकांचे खासगीकरण प्रास्तावित आहे.

🅾एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तसंस्थेने दोन वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या चार किंवा पाचवर आणण्याचे प्रास्तावित असल्याचे म्हटले आहे. करोना विषाणूबाधेमुळे स्थंभित झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारला अपेक्षित महसूल मिळू शकलेला नाही. याची भरपाई करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील भागभांडवल विकून निधी उभारण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे.

🅾याआधी अनेक सरकारी समित्यांनी आणि भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी बँकांची संख्या कमी करण्याचे प्रस्तावित केले आहे. सरकारने या वित्तीय वर्षांच्या सुरुवातीला १० सरकारी बँकांचे चार बँकांत विलीनीकरण करून राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २२ वरून १२ वर आणली आहे. भविष्यात सरकारी बँकांचे विलीनीकरण शक्य नसल्याने भागभांडवल विकणे हाच पर्याय असल्याचा मतप्रवाह केंद्रीय अर्थ खात्यात बळावत असल्याचे दिसत आहे.
करोना विषाणूबाधेच्या संकटामुळे आर्थिक वर्षांच्या अखेरीस बँकांना वाढत्या अनुत्पादित मालमत्तेचा सामना करावा लागेल असे मानण्यात येते. परिणामी बँकांच्या पुनर्भाडवलीकरणाची आवश्यकता लक्षात घेता, सरकारपुढे वाढीव आर्थिक पेच निर्माण होईल. आधीच घटलेल्या महसुलामुळे बँकांच्या पुनर्भाडवलीकरणासाठी तरतूद करणे सरकारला जवळजवळ अशक्य असल्याचे मानले जाते.

🅾या तरतुदीपेक्षा बँकांतील भागभांडवल विकून खासगीकरण करण्यावर अर्थमंत्रालय अनुकूल असल्याचे दिसून येते. पुनर्भाडवलीकरणापेक्षा भागभांडवल विकून खासगीकरणाची योजना कितपत यशस्वी होईल याबद्दल बँकिंग वर्तुळात मात्र साशंकता व्यक्त होत आहे.