Ads

26 December 2019

Super 30 Questions Current Affairs


1.   कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो?
✅.  23 डिसेंबर

2.  कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा केला जातो?
✅.  22 डिसेंबर

3.   "हेल्थ अँड वेल बीइंग इन लेट लाइफ: पर्स्पेक्टिव्ह्ज अँड नॅरेटीव्ह्ज फ्रॉम इंडिया" पुस्तकाचे लेखक कोण?
✅.  प्रसून चटर्जी

4.  कोणत्या ठिकाणी जंगलाचे सर्वात प्राचीन जीवाश्म सापडले?
✅.   न्यूयॉर्क

5.    अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेले ‘CBERS-4A’ हे काय आहे?
✅.   चीन आणि ब्राझिल यांचा उपग्रह

6.   कोणत्या संस्थेनी पुणे या शहरात ‘वॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ क्लिनिकचा शुभारंभ केला?
✅.   IIT हैदराबाद

7.   ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
✅.  देवेश श्रीवास्तव

8.   ‘प्रवेशयोग्य निवडणुका’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा कोठे पार पडली?
✅.  नवी दिल्ली

9.   कोणत्या संघटनेनी ICC सोबत महिला सक्षमीकरणाबाबत भागीदारीची घोषणा केली?
✅.  संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

10.   "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे लेखक कोण?
✅.   राहुल अग्रवाल

11.  कोणत्या देशाच्या अंतराळ स्थानकावरून इथियोपिया या देशाने त्यांचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला?
✅.  चीन

12.   कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो?
✅.  20 डिसेंबर

13.  कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?
✅.   ओडिशा

14.   डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?
✅.  HDFC

15.  भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?
✅.  अपहरण

16.   कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?
✅. पोर्तुगाल

17.   भारताचे ‘पिनाका’ क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारे मारा करते?
✅.    पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र

18.  आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने नव्याने शोधलेल्या एका तार्‍याचे नाव काय ठेवले?
✅.  शारजाह

19.   63 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर रायफल प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले?
✅.  झीना खिट्टा

20.   कोणत्या दिवशी ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 19 डिसेंबर

21.  अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
✅.  रिचर्ड व्हेंट्रे

22.   ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
✅. ऑपरेटिंग सिस्टममधला बग

23.   2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
✅.   ताहिती

24.  ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
✅.  जिनेव्हा

25.  कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
✅.  आंध्रप्रदेश

26.  ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
✅.  16 डिसेंबर

27.  कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
✅.  अमिताभ बागची

28.   "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
✅.  विश्वनाथन आनंद

29.   कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
✅.   भारत

30.   ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
✅.   डी. चौधरी

25 December 2019

इतिहास प्रश्नसंच

1.राजाराम मोहनराय यांना खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेचे श्रेय देता येणार नाही.

अ) ब्राह्मोसमाज 1828

ब) आत्मीय सभा 1815

क) आदी ब्राम्हो समाज 1865-केशववचंद्र सेन

ड) ब्रिटिश इंडिया युनिटेरीयन असोसिएशन-1827

2. 1918 मध्ये महात्मा गांधीनी गुजरातमधील खेडा जिल्ह्यात मोहनलाल पांड्या या स्थानिक शेतकर्‍यांच्या मदतीने कोणती चळवळ सुरू केली.

अ) मजूर सत्याग्रह (अहमदाबाद कामगार गिरणी लढा)

ब) निळ उत्पादकांचा सत्याग्रह (चंपारण्य)

क) सारा बंदी (खेडा सत्याग्रह)

ड) असहकार चळवळ 1920-नागपूर

3.मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून…यांचा यथार्थ गौरव केला जातो.

अ) बाळशास्त्री जांभेकर

ब) जगन्नाथ शंकरशेठ 

क) विष्णुशास्त्री चिपळुणकर

ड) नाना शंकरशेठ

4. खालीलपैकी कोणती संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली नाही?

अ) शेडयूल कास्ट फेडरेशन

ब) अखिल भारतीय मागास जातीसंघ

क) बहिष्कृत हितकारिणी सभा

ड) पीपल्स एज्युकेशन सोसायटी

5.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

अ) महात्मा फुले 

ब) सावित्रीबाई फुले 

क) लोकहितवादी 

ड) रा.गो.भांडारकर

6.चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?

अ) वल्लभभाई पटेल

ब) स्वातंत्र्यवीर सावरकर

क) महात्मा गांधी

ड) डॉ.आंबेडकर

7.महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते?

अ) कर्मवीर भाऊराव पाटील

ब) महात्मा फुले 

क) शाहु महाराज

ड) डॉ.डी.वाय.पाटील

8.विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी वसतीगृहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे समाज सुधारक –

अ) कर्मवीर भाऊराव पाटील

ब) सयाजीराव गायकवाड 

क) महर्षी धोंडो केशव कर्वे

ड) छत्रपती शाहू महाराज

9.खालीलपैकी शाहू महाराजांनी कोणते कायदे केले?

अ) प्राथमिक शिक्षण सक्तिचे 

ब) वेठबिगारी पद्धत बंद

क) अस्पृशांना प्रशासनात नोकर्‍या

ड) बालविवाह बंदी

अ) अ,ब,क बरोबर

ब) अ,ब,क,ड बरोबर

क) ब,क बरोबर

ड) ब,क,ड बरोबर

10. शिका संघटित व्हा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली?

अ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

ब) काम्रेड.एस.के. डांगे

क) कर्मवीर भाऊराव पाटील

ड) म.जोतीराव फुले

11.शांतिनिकेतन ची स्थापना कोणी केली?

अ) दादाभाई नौरोजी 

ब) रविंद्रनाथ टागोर 

क) अरविंद घोष 

ड) देवेंद्रनाथ ठाकूर

12.सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

अ) लोकमान्य टिळक

ब) गोपाळ गणेश आगरकर

क) प्र.के. अत्रे

ड) गोपाल गणेश गोखले

13.सत्यार्थ प्रकाश ग्रंथ कोणी लिहिला?

अ) सत्य साईबाबा

ब) स्वामी विवेकानंद

क) महात्मा गांधी

ड) स्वामी दयानंद सरस्वती

14.बालविवाहाचे समाजावर होणारे घातक परिणाम लक्षात घेऊन ती रूढ कायद्याने बंद करावी अशी मागणी —सारख्या काही समाजसुधारकांनी केली होती?

अ) बहिरामजी मलबारी 

ब) केशवचंद्र सेन

क) दादाभाई नौरोजी

ड) गो.ग.आगरकर

15.महात्मा ज्योतिबा फुले यांनी…….या पहिलवानाकडून नेमबाजी व दांडपट्याचे प्रशिक्षण घेतले?

अ) लहूजी वस्ताद साळवे

ब) दादोजी साळवे 

क) गोरोबा साळवे

ड) विठूजी साळवे

16.1884 मध्ये टिळक व आगारकर यांनी पुणे येथे–ची स्थापना केली?

अ) फर्ग्युसन कालेज

ब) डेक्कन एज्युकेशन सोसायटी

क) न्यू इंग्लिश स्कूल

ड) सुधारक

17.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गांव कोणत्या जिल्ह्यात होते?

अ) पुणे

ब) सातारा

क) मुंबई

ड) रत्नागिरी

18. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामधील सरकारी नोकर्‍यांमध्ये मागास वर्गीयांसाठी ………… जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला?

अ) 60%

ब) 50%

क) 27%

ड) 33%

19.रमाबाई रानडे या कोणत्या संस्थेच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या?

अ) आर्य महिला संस्था 

ब) सेवासदन

क) मुक्तीसदन

ड) सर्व महिला समाज

20.कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात……येथे केली.

अ) दुधगाव

ब) केडगाव

क) पन्हाळा

ड) श्रीरामपूर

21.महाराष्ट्राच्या सर्वांगिण समाज सुधारणेस सुरुवात करणारे राजर्षि शाहू महाराज हे……या गावातील घाटगे घराण्यातून दत्तक गेले?

अ) शिरोळ

ब) कोल्हापूर

क) कागल

ड) जत

22.ऑक्टोंबर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

अ) शाहू महाराज

ब) डॉ.बाबासाहेब आंबेडकर

क) गो.कृ.गोखले

ड) न्यायमूर्ती रानडे

23.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात कोणती घटना घडली नाही.

अ) नागपूरात बौद्ध धर्माचा स्विकार

ब) मनुस्मृतीचे दहन

क) हिंदू कोडबीलाची निर्मिती

ड) खेडा सत्याग्रह

24.जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारा द्रष्टा समाज सुधारक कोण?

अ) आगरकर 

ब) चिपळूणकर 

क) लोकमान्य टिळक 

ड) धोंडो केशव कर्वे

25.शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी तलाव, धरणे, बंधारे बांधून सिंचनाच्या सोयी पुरवाव्यात असे इंग्रज सरकारला सांगणारा द्रष्टा समाज सुधारक कोण?

अ) आगरकर

ब) न्यायमूर्ती रानडे

क) लोकहितवादी 

ड) महात्मा फुले

उत्तरे

1-क 2-क 3-अ 4-ब 5-अ

6-ड 7-ब 8-ड 9- क 10-अ

11- ब 12-ब 13-ड 14- ब 15- अ

16- ब 17- ड 18- ब 19- ब 20- अ

21-क 22-ब 23-ड 24-अ 25-ड

*जाणून घ्या ग्राहक म्हणून तुमचे हक्क*

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 हक्क मिळाले आहेत. त्यांची माहिती असल्यास आपली फसवणूक होणार नाही.

*1) सुरक्षेचा हक्क* : आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणं अनिवार्य असतं. आपण ज्या वस्तू विकत घेतो त्याची उपयुक्तता हाच एकमेव निकष नाही तर त्या वस्तू सुरक्षितही असाव्यात. इलेक्ट्रिकल उत्पादनं घेताना ही काळजी घेणं आवश्यक आहे. वस्तू विकत घेण्यापूर्वी त्यांच्या गुणवत्तेबाबत तसंच त्या वस्तूवर मिळणाऱ्या सेवांबाबत आग्रही राहण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी शक्यतो आयएसआय आणि अॅगमार्कचं चिन्ह असलेल्या वस्तूच विकत घ्याव्यात. या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागते.

*2) माहितीचा हक्क* : एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकांचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. एखादं उत्पादन किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. हा हक्क कोणताही दुकानदार किंवा व्यावसायिक नाकारू शकत नाही. सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासून घेण्याचा अधिकार आहे.

*3) निवड करण्याचा अधिकार* : आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकाच ब्रॅंडच्या वस्तू दुकानदार विकत घेण्यास सांगत असेल तर लक्षात घ्या की, हे तुमच्या हक्कांचं उल्लंघन आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा ग्राहकांना अधिकार आहे.

*4) तुमचं म्हणणं मांडण्याचा हक्क* : जर तुम्हाला वाटत असेल तुमची फसवणूक झाली आहे तर तुम्हाला तुमचं म्हणणं योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सरकारनं तक्रार निवारण केंद्र आणि ग्राहक न्यायालयांची स्थापना केली आहे. इतकंच नाही तर ग्राहक त्यांच म्हणणं सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी ग्राहक मंचाची स्थापना करू शकतात.

*5) तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क* : जर ग्राहकाची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे. जर तक्रार रास्त असेल तर तिचं निवारण होईल असा हक्क कायद्यानं ग्राहकाला दिला आहे. कधीकधी एखादी तक्रार लहान असू शकते पण तरी देखील त्याविरोधात दाद मागता येऊ शकते.

*6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार* : ग्राहक हक्क शिक्षणाच्या अभावामुळं ग्राहकांची फसवणूक होते असं ग्राहक हक्क चळवळ कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ग्राहकांनी आपले हक्क काय आहेत हे नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, तसंच स्वयंसेवी संस्था शिबिरं किंवा कार्यशाळा घेत असतात.

66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019

- राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात 
- हस्ते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

- सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा: अंधाधून
- सर्वोत्कृष्ट पॉप्युलर सिनेमा: बधाई हो
- सामाजिक मुद्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट सिनेमा- पॅडमॅन
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: आयुषमान खुराना (अंधाधून) आणि विक्की कौशल (उरी)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
- सर्वोत्कृष्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : शिवानंद किरकिरे (चुंबक)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : सुरेखा सीकरी (बधाई हो)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - आदित्य धर (उरी: द सर्जिकल स्ट्राइक)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी यकंती (नाळ)
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
- सर्वोत्कृष्ट गायक - अरिजीत सिंह (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट गायिका- बिंदू मालिनी
- सर्वोत्कृष्ट गीत : बिंते दिल (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भंसाली (पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - शाश्वत सचदेवा (उरी)
- सर्वोत्कृष्ट साउण्ड डिझाइन: बिश्वदीप दीपक (उरी)
- बेस्ट फिल्म क्रिटिक: ब्ले जानी आणि अनंत विजय
- बेस्ट लिरिक्स- नितिचारमी (कन्नड फिल्म)
- मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट: उत्तराखंड
- बेस्ट स्पेशल इफेक्ट्स: 'KGF' आणि 'Awe'
- सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक : क्रूति महेश मिद्या (पद्मावत (घूमर गाणं))
- सर्वोत्कृष्ट संवाद - तारीख (बंगाली)

नॉन फिक्शन फिल्म

- स्पेशल मेन्शन अवॉर्ड- महान हुतात्मा- सागर पुराणिक
- ग्लो वॉर्म इन ए जंगल- रमण दुंपाल
- लड्डू- समीर साधवानी आणि किशोर साधवानी
- बेस्ट नरेशन - मधुबनी- द स्टेशन ऑफ कलर
- आवाज- दीपक अग्निहोत्री, उर्विजा उपाध्याय
- बेस्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- बेस्ट म्यूजिक फिल्म- ज्योति- डायरेक्टर केदार दिवेकर
- बेस्ट ऑडियोग्राफी चिल्ड्रन ऑफ द सॉइल- बिश्वदीप चटर्जी
- बेस्ट लोकेशन साउंड- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स- अजय बेदी
- बेस्ट सिनमॅटॉग्राफी- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स - अजय बेदी आणि विजय बेदी
- बेस्ट बीट डायरेक्शन- आई शपथ- गौतम वजे
- बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू- चलो जीते हैं- मंगेश हडावले
- बेस्ट टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब
- बेस्ट शॉट फिक्शन फिल्म- कासव- आदित्य सुभाष जंभाळे
- सोशल जस्टिस फिल्म- व्हाय मी- हरीश शाह
- सोशल जस्टिस फिल्म- एकांत- नीरज सिंह
- बेस्ट इन्वेस्टिगेटिव फिल्म- अमोली- जॅसमिन कौर आणि अविनाश रॉय
- बेस्ट स्पोर्ट्स फिल्म- स्विमिंग थ्रू द डार्कनेस- सुप्रियो सेन
- बेस्ट एज्युकेशनल फिल्म- सरला विरला- एरेगोडा
- बेस्ट फिल्म ऑन सोशल इशू- ताला ते कूंजी- शिल्पी गुलाटी
- बेस्ट एनवायरमेन्टल फिल्म- द वर्ल्ड्स मोस्ट फेमस टायगर- सुबिया नालामुथु
- बेस्ट प्रमोशनल फिल्म- रीडिस्कवरिंग जाजम- अविशान मौर्य आणि क्रिती गुप्ता
- बेस्ट आर्ट्स अँड कल्चरल फिल्म- बुनकर: द लास्ट ऑफ द वाराणसी वीवर्स- सत्यप्रकाश उपाध्याय
- बेस्ट डेब्यू नॉन-फीचर फिल्म ऑफ ए डायरेक्टर- फलूदा- साग्निक चटर्जी
- बेस्ट नॉन-फीचर फिल्म (शेयर्ड)- सन राइज - विभा बख्शी
- फिचर फिल्म इन मराठी - भोंगा
- नाॅन फिचर फिल्म दिग्दर्शन - गौतम वझे (आईशप्पथ)
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - स्वानंद किरकिरे (चुंबक)

संरक्षणप्रमुख पदाला मंत्रिमंडळाची मंजुरी

◾️तीनही संरक्षण दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुख ( चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) हे नवे पद निर्माण करण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली.

◾️संरक्षणविषयक मंत्रीगटाने हा  प्रस्ताव सादर केला होता. संरक्षण प्रमुख हे सरकारचे प्रमुख संरक्षण सल्लागारही असतील.

◾️१९९९ मध्ये कारगिल युद्धानंतर  संरक्षण दलांच्या फेरआढावा समितीने संरक्षण प्रमुख या पदाची निर्मिती करण्याची शिफारस केली होती.

◾️संरक्षण प्रमुख ही चार तारे असलेल्या जनरलच्या बरोबरीची श्रेणी असेल.

◾️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तीनही दलांमध्ये
📌 समन्वय साधणे,
📌 संरक्षण मंत्रालयाला गरजेनुसार सल्ला देणे,
📌 संरक्षणविषयक वित्तीय मुद्दय़ावर सल्ला देणे ही कामे त्यांना करावी लागतील. 
📌 तीन दलांच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेण्याचा अधिकारही त्यांना असेल.

📚✍ पदनिर्मितीचे लाभ

◾️ तीनही दलांच्या निर्णयप्रक्रियेत सुसुत्रता येईल. एकत्रित निर्णय घेतले जातील.

◾️ युद्धनीती, संरक्षणविषयक सामुग्रीची खरेदी, सरकारी प्रक्रियेवर एका व्यक्तीचे नियंत्रण राहील.

◾️ संरक्षण दल प्रमुख तीनही दलांचा सेनापती असेल.

◾️ तीनही दलांच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्षपदही संरक्षण प्रमुखाकडे असेल.

👆 संरक्षण प्रमुखांकडे लष्करी कमांडची जबाबदारी नसेल.

📚✍ पदाच्या अटी

◾️ चार स्टार जनरलचा दर्जा असेल.

◾️निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद भूषवता येणार नाही.

◾️ निवृत्तीनंतर पाच वर्षांपर्यंत खासगी क्षेत्रात नोकरी करता येणार नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"124 वे घटनादुरुस्ती विधेयक".

⛔️उच्च जातींना आर्थिक निकषांवर 10%आरक्षण

⛔️8 जानेवारी 2019 रोजी लोकसभेत 323 विरुद्ध 3 मतांनी विधेयक मंजूर

⛔️खुल्या प्रवर्गात आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचे 10% आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्क्यांच्या वर असेल.

⛔️या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून 60 टक्के होईल.

⛔️संविधानातील कलम 15 आणि 16 मध्ये दुरूस्ती केली जाईल.

⛔️ यापूर्वी 1990 च्या दशकात आर्थिक निकषांवर दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते.
(आर्थिक निकषांवर आरक्षण देता येत नाही व राज्यघटनेत तशी तरतूद नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.)

महत्वपूर्ण घटनादुरुसत्या (Important Constitutional Amendments)


1  ली घटनादुरुस्ती 1951:

1)  सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला.

2) मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे

3) जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी ९व्या परिशिष्टाचा समावेश

4) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या तीन आधाराचा उदा. सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणे इ. बाबींचा समावेश ह्या मर्यादा वाजवी असतील, म्हणून न्याय प्रविष्ट असतील.

5) राज्यातील व्यापार: राज्यसंस्थेने कोणताही व्यापार वा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्काचा भंग होतो, या आधारावर ती कृती अवैध ठरविता येणार नाही.

2री घटना दुरुस्ती 1952:

1)  लोकसभेचा एक सदस्य 7,50,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल. या पध्द्तीने लोकसभेतील प्रातिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना

3 री घटनादुरुस्ती 1954

1)  सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार दिले.

4थी घटनादुरुस्ती 1955

1)  खाजगी मालमत्तेची अनिवार्यपणे प्राप्ती केल्यानंतर देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचे प्रमाण ठरविले आणि हि बाब न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवली.

2) कोणताही व्यापार राष्ट्रीयकृत करण्यासाठी राज्यसंस्थेला सत्ता बहाल केली आहे.

3) ९व्या परिशिष्टामध्ये आणखी काही कायदे समाविष्ट केले

4) अनुच्छेद ३१ (अ) ची व्याप्ती वाढविली.

5 वी घटनादुरुस्ती 1955

1) राज्यांचा क्षेत्रावर, सीमारेषांवर आणि नामाभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मत प्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी याकरिता राष्ट्रपतींना अधिकार दिले.

6 वी घटनादुरुस्ती 1956

1) केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली.

उदा. राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर कर लावणे या संदर्भात राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध घातले.

7 वी घटनादुरुस्ती 1956

1)  अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण उदा. भाग अ, ब, क, ड रद्द करून भाग 7 वगळण्यात येऊन 14 घटकराज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली.

2) केंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्यात अली .

3) दोन किंवा अधिक घटकराज्यांसाठी सामाईक उच्च न्यायालयाची स्थापना करणे.

4) उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांच्या नियुक्ती संबंधी तरतूद

8 वी घटनादुरुस्ती 1960

1)  अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आंग्ल भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षाकरिता वाढविली (1970 पर्यंत)

9वी घटनादुरुस्ती 1960

1)  भारत -पाकिस्तान करारनाम्यानुसार (1958) बेरुबारी संघाचा (प. बंगालमधील) भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला हस्तांतरित करण्यात आला

10वी घटनादुरुस्ती 1961

1) भारतीय  संघराज्यात दादर  आणि नगर हवेलीचा समावेश केला

11वी घटनादुरुस्ती 1961

1) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्या ऐवजी  स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यात आला.

2) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही.

12वी घटनादुरुस्ती 1962

1) भारतीय संघराज्यात गोवा, दमण आणि दीव यांचा समावेश करण्यात आला.

13वी घटनादुरुस्ती 1962

1)नागालँडला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्यासंदर्भात विशेष तरतुदी

14वी घटनादुरुस्ती 1962

1)  भारतीय संघराज्यात पॉंडिचेरीचा समावेश

2) हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोआ, दमन-दीव  आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीची तरतूद

15वी घटनादुरुस्ती 1963

1)  एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रात घडलेले असेल तर त्या संबंधातील खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिसत्तेला न्यायालयीन आदेश बजावू शकते.

2) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय ६० वरून ६२ करण्यात आले.

3) उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशाला त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद

4) एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केलेल्या न्यायाधीशाला हानिपूरक भत