Ads

28 January 2022

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1. पुढील शब्दाचा सामासिक प्रकार कोणता? (दारोदार)
अव्ययीभाव
बहुव्रीही
व्दंद
तत्पुरुष

● उत्तर - अव्ययीभाव

2. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता?
उपाशी राहणे
थंड पदार्थ खाणे
भरपुर फराळ करणे
थंड करून मग खाणे

● उत्तर - उपाशी राहणे

3. शिपायाने चोरास पकडले प्रयोग ओळखा.
कर्मणी
भावे
कर्मभावसंस्कार
कर्तरी-कर्म संकर

● उत्तर - भावे

4. पद्य सुरावर म्हणण्याची पध्दत म्हणजे खालील पैकी काय?
कविता
चाल
गद्य
गाण

● उत्तर - गाण

5. ‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
दोष देणे
शब्दांनी रचना करणे
लेखन करणे
बोलणे

● उत्तर - दोष देणे

6. 'उंदिर' या नामाचे अनेक वचन कोणते?
उंदरे
उंदरांना
उंदीरं
अनेकवचन होत नाही

● उत्तर - अनेकवचन होत नाही

7. 'दही' या शब्दाचा प्रकार कोणता?
तत्सम
तद्भव
परभाषिक
यापैकी नाही

● उत्तर - यापैकी नाही

8. 'बोलका पोपट उडून गेला.'
'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातुसाधित विशेषण
गुण विशेषण
अनिश्चय वाचक
ते विशेषणाच नाही

● उत्तर - गुण विशेषण

9. हत्ती गेला ...... राहिले.
चिन्ह
अंकुश
शेपूट
माहूत

● उत्तर - शेपूट

10. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.
तृतीय
पंचमी
सप्तमी
व्दितीय

● उत्तर - पंचमी

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.

   1) आम्ही भारतीय नागरिक    2) भारतीय नागरिक
   3) आज भारताशी      4) प्रामाणिक आहोत

उत्तर :- 1

2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) भावे प्रयोग    2) सकर्मक कर्तरी प्रयोग   
   3) कर्मणी प्रयोग    4) अकर्मक कर्तरी प्रयोग

उत्तर :- 4

3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’

   1) नत्र बहुव्रीही समास    2) व्दिगू समास   
   3) समाहार व्दंव्द – समास  4) मध्यमपदलोपी समास

उत्तर :- 1

4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?

   1) पूर्णविराम    2) उद्गारवाचक चिन्ह   
   3) अर्धविराम    4) प्रश्नचिन्ह

उत्तर :- 2

5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?

   1) मंदाक्रांता    2) वसंततिलका     
   3) शिखरिणी    4) पृथ्वी

उत्तर :- 4

6) या टोपीखाली दडलंय काय?

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.

   1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय    2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
   3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय      4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?

   1) सात    2) आठ     
   3) नऊ    4) दहा

उत्तर :- 3

9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
     ‘मधू लाडू खात जाईल’

   1) साधा भविष्यकाळ    2) अपूर्ण भविष्यकाळ
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) रीती भविष्यकाळ

उत्तर :- 4

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी

   1) पुल्लिंगी    2) नपुंसकलिंगी   
   3) स्त्रीलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती – कार्य, विचार आणि निबंध

🎥मूळ आडनाव – गोह्रे
🎥जन्म – 11 एप्रिल 1827
🎥मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

🎥1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

🎥1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

🎥21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

🎥युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

🕹आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते.

🎥फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण:-

@Ravi sir

🎥फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.

🕹गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.

🎥परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

🎥विवाह:-
महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

🎥संस्थात्मक योगदान:-

🕹3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

🕹4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

🕹1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

🕹1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

🕹1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

🕹1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

🕹10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

🕹24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

🕹1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

🕹1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

🕹1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

🕹1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

🕹1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

🕹1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

🕹1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

🕹1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

🕹1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

🕹अस्पृश्यांची कैफियत.

🕹शिवाजी महाराजांचा पोवाडा.

🎥महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:-

👉थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.

🎥1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

🕹1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

🎥1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

🎥2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

🎥ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

🕹उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

🎥सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘

🎥सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला..

=========≠=≠==========

27 January 2022

Online Test Series

स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड.....

🏏 भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना हिची ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे.

🏏 स्मृतीला दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तिला हा पुरस्कार मिळाला होता.

🏏 पुरुष गटात यावर्षी कोणत्याही भारतीय खेळाडूला कोणत्याही प्रकारात पुरस्कार जिंकता आला नाही.

🏏 भारताच्या एकाही खेळाडूला ICCच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थानही मिळवता आले नाही.

🏏 स्मृतीने गेल्या वर्षी २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५५ धावा केल्या होत्या. गेल्या वर्षीही तिने एक शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होती.

🏏 पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची ICC प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान त्याने प्रथमच पटकावला आहे. तसेच शाहीन आफ्रिदी वर्षातील सर्वात तरुण खेळाडू आहे. (वयाच्या २१व्या वर्षी)

🏏 इंग्लंडचा कसोटी कप्तान जो रूट :  ICCचा कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर (पुरुष)

🏏 बाबर आझम : एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू (पुरुष)

महाराष्ट्र चित्ररथ

१. महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा (Kass Plateau) समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ (Suparba) या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे.

२. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या (Shekru) सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे (Tamhan) सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत.

३. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या (Hariyal) प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड (mango tree) विशेष आकर्षक दिसत होते.

४. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’ची (Blue Mormon) आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली.

चालू घडामोडी

1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
----------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4.  यापैकी नाही

उत्तर-2
----------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

----------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

----------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
----------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3

1. कोणते राज्य हे देशातील पहिले धूम्रमुक्त राज्य बनले आहे?

1) आंध्रप्रदेश
2) झारखंड
3) हिमाचल प्रदेश
4) नागालँड

उत्तर-3

------------------------------------------------------------

2. ICC महिला विश्वचषक 2022 स्पर्धेसाठी BCCI ने भारतीय महिला संघाचे व्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

1) भरत अरुण
2) शैलेंद्रसिंह सोलंकी
3) राहुल द्रविड
4) विराट कोहली

उत्तर- 2

------------------------------------------------------------

3. नुकतेच उंटांसाठी जगातील पहिले हॉटेल कोठे सुरू करण्यात आले आहे?

1) पाकिस्तान
2) सौदी अरेबिया
3) कझाखस्तान
4) इराण

उत्तर-2

------------------------------------------------------------

4. खालीलपैकी कोणते  न्यायालय हे 'न्याय घड्याळ' असणारे भारतातील पहिले न्यायालय ठरले आहे?

1) गुजरात उच्च न्यायालयात
2) दिल्ली उच्च न्यायालय
3)मुंबई उच्च न्यायालय
4) केरळ उच्च न्यायालय

उत्तर-1

------------------------------------------------------------

5. अलिकडेच कोणत्या देशाने गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगासाठी  "कृत्रिम चंद्र" तयार केला आहे?

1) चीन
2) रशिया
3) अमेरिका
4) भारत

उत्तर-1

------------------------------------------------------------
6 नुकतेच निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या शांती देवी ह्या कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या होत्या?

1) त्रिपुरा
2) मेघालय
3) गुजरात
4) ओडिशा

उत्तर- 4

------------------------------------------------------------

7. केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने  भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) च्या कोणत्या  युनिटमध्ये भारतातील पहिला 'कोल टू मिथेनॉल' (CTM) पायलट प्लांट समर्पित केला आहे?

1) भोपाळ
2) मुंबई
3) हैदराबाद
4) बंगळुरू

उत्तर- 3

------------------------------------------------------------

8. नुकतेच निधन झालेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) डॉ.पाटील हे पुणे विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते
ब) त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तीन विद्यापीठांनी डी. लीट ही सन्माननीय उपाधी देऊन सन्मानित केले होते.

1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब
4) एकही नाही

उत्तर- 2
Correct ans- अ) डॉ.पाटील हे शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते

------------------------------------------------------------

9. 2022 महिला हॉकी एशिया कप कोणत्या देशात आयोजित करण्यात येणारआहे?

1) इंडोनेशिया
2)ओमान
3) थायलंड
4) जर्मनी

उत्तर-2

------------------------------------------------------------

10. खालीलपैकी कोणत्या  मंत्रालयाने खुल्या डेटाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या शहरी परिसंस्थेमध्ये नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ओपन डेटा सप्ताह सुरू करण्याची घोषणा केली आहे?

1) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
2) केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय
3) गृह मंत्रालय
4) सांस्कृतिक मंत्रालय

उत्तर- 1

================================

महत्वाचे धरण नदी आणि जिल्हे

🔰 भंडारदरा -  प्रवरा  👉 अहमदनगर
🔰 जायकवाडी - गोदावरी 👉 औरंगाबाद
🔰 सिद्धेश्वर - दक्षिणपूर्णा 👉 हिंगोली
🔰 भाटघर - वेळवंडी(निरा) 👉  पुणे
🔰 मोडकसागर - वैतरणा 👉  ठाणे
🔰 येलदरी - दक्षिणपूर्णा  👉 हिंगोली
🔰 मुळशी  - मुळा 👉 पुणे
🔰 तोतलाडोह - पेंच 👉 नागपुर
🔰 विरधरण - नीरा 👉 पुणे
🔰 गंगापूर - गोदावरी 👉 नाशिक
🔰 दारणा - दारणा 👉 नाशिक
🔰 पानशेत - अंबी(मुळा) 👉  पुणे
🔰 माजलगाव - सिंदफणा 👉 बीड
🔰 बिंदुसरा - बिंदुसरा 👉 बीड
🔰 खडकवासला - मुठा 👉 पुणे
🔰 कोयना(हेळवाक) - कोयना 👉 सातारा
🔰 राधानगरी - भोगावती 👉 कोल्हापूर

महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य


🔆 अंधारी ----------- चंद्रपुर
🔆 बोर --------------- वर्धा
🔆 टिपेश्वर ----------- यवतमाळ
🔆 नागझिरा --------- भंडारा
🔆 भामरागड -------- गडचिरोली       
🔆 चपराळा --------- गडचिरोली    
🔆 मेळघाट ----------- अमरावती    
🔆 नर्नाळा ------------- अकोला
🔆 नांदूर मध्यमेश्वर --- नाशिक     
🔆 यावल -------------- जळगाव  
🔆 येडसी रामलिंगघाट - उस्मानाबाद
🔆 अनेर डॅम ------------ धुळे      
🔆 लोणार अभयारण्य - बुलढाणा
🔆 तानसा --------------- ठाणे        
🔆 फनसाड -------------- रायगड       
🔆 भीमाशंकर ---------- पुणे
🔆 रेहकुरी --------------- अहमदनगर      
🔆 मयूरेश्वर-सुपे -------- पुणे
🔆 राधानगरी ------------ कोल्हापूर
🔆 सागरेश्वर -------------- सांगली
🔆 कोयना ---------------- सातारा
🔆 मालवण -------------- सिंधुदुर्ग
🔆 तुंगारेश्वर -------------- ठाणे

26 January 2022

पद्म पुरस्कार 2022 जाहीर

🔰 2022 वर्षासाठी 128 पद्म पुरस्कार जाहीर (34 महिला , 13 मरणोत्तर , 10 विदेशी)

📝 4 पद्मविभूषण , 17 पद्मभूषण व 107 पद्मश्री असे एकुण 128 पद्म पुरस्कार जाहीर

📌 महाराष्ट्रातील 8 व्यक्तींना पद्म पुरस्कार

◾️ पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते  पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.
◾️ कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार , विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इत्यादी विविध शाखांमधील / क्षेत्रातील योगदानासाठी हे  पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
◾️ असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला जातो.
◾️ दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कारांची घोषणा केली जाते.
◾️ दरवर्षी साधारणपणे मार्च/एप्रिलच्या आसपास हे पुरस्कार राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केले जातात.

🎖 महत्वाचे पद्म पुरस्कार मिळवणारे व्यक्ती* 🎖
🔅 जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) - पद्मविभूषण
🔅 प्रभा अत्रे - पद्मविभूषण
🔅 गुलाम नबी आझाद - पद्मभूषण
🔅 देवेंद्र झांझरिया - पद्मभूषण
🔅 सत्य नडेला - पद्मभूषण
🔅 सुंदर पिचाई - पद्मभूषण
🔅 सायरस पूनावाला - पद्मभूषण
🔅 प्रमोद भगत - पद्मश्री
🔅 सुमित अंतील -पद्मश्री
🔅 नीरज चोपरा - पद्मश्री
🔅 अवनी लेखरा - पद्मश्री
🔅 वंदना कटारिया - पद्मश्री
🔅 सोनू निगम - पद्मश्री

Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘हाय अलर्ट’

🔰प्रजासत्ताक दिनापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय सीमेपासून नियंत्रण रेषेपर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यात पोलिस अनेक ठिकाणी नाके लावून वाहने व संशयितांची चौकशी करत आहेत. दुसरीकडे, समाजकंटकांकडून धमकी देण्या आल्याने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना प्रजासत्ताक दिनी हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

🔰फोर्सचे महानिरीक्षक डीके बुरा यांनी सोमवारी सांगितले की, सीमेवर दोन आठवड्यांपासून कडक पहारा ठेवला जात आहे. याशिवाय जम्मू सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमेवर (IB) सैनिकांकडून सुरुंगविरोधी ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. ते म्हणाले की, बीएसएफ सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रत्येक ‘नापाक ’ योजना हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशद्रोही गडबड करू शकतात, असा अंदाज आहे.

🔰काश्मीर झोनच्या बीएसएफ अधिकार्‍यांनी सांगितले की, २०२१ या वर्षात दलाने विविध ऑपरेशन्समध्ये तीन एके-47 रायफल, सहा ९ एमएम पिस्तूल, दारूगोळा, २० ग्रेनेड, दोन आयईडी आणि १७.३ किलो अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.

25 January 2022

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :



सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 851 

सकन्या समृद्धी योजना



* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.


* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.


* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.


* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.


* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.


* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.


* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

राष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड.

🔰देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये  त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.

🔰वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.

🔰त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शाळा सुरू करण्याचा निर्णय.

🔰राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली.

🔰राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.

🔰“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

🔰लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.