Ads

07 December 2021

बुद्धिमत्ता प्रश्नसंच

🥨परश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.


१) ०, ७, २६, ६३, ?

१) ९  

२) २७

 ३) ६४ 

४) १२४


२) २०, १२, ६, २, ?

१) ४ 

२) २ 

३) १ 

४) ०


३) १, ३, ७, १५, ३१, ?

१) ३३ 

२) ५२       

३) ६३ 

४) ७१


४) २, ३, ५, ७, ११, १३, १७, ?

१) २१ 

२) १९ 

३) २७ 

४) ३१


५) २, ५, ११, १७, २३, ?

१) १९ 

२) २५ 

३) २७ 

४) ३१


६) ३, ७, १३, १९, २९, ?

१) ३१ 

२) ३३ 

३) ३७ 

४) ४७


७) १६, २७, ३८, ?, ६०

१) ४९ 

२) ५१ 

३) ५३ 

४) ५७


८) ११, १३, १६, २१, ?, ३९, ५२

१) २३ 

२) २८ 

३) ३१ 

४) ३७


९) १६, २५, ३९, ?, ६४

१) ४०        

२) ४३ 

३) ४६ 

४) ४९


१०) १०, २६, ५०, ?, १२२

१) ७१ 

२) ८२ 

३) ९६ 

४) १०४


११) १०, १७, २६, ३७, ?

१) ४२        

२) ५० 

३) ६१ 

४) ८२


१२) १२, ४४, २८, ६०, ४४, ?

१) ७६       

 २) ८० 

३) ४४ 

४) ६६


१३) १३, १३, २०, १८, २७, ?, ३४, २८

१) १९ 

२) २१       

३) २३ 

४) ३३


१४) ४, १६, ३६, ?, १००

१) ४२ 

२) ५४       

३) ६० 

४) ६४


१५) २४, ३५, ४८, ?, ८०

१) ५२ 

२) ६३       

३) ७१      

४) ७९


१६) ५, ३, १०, ८, १७, ?, २६, २४

१) १५ 

२) १७ 

३) २१ 

४) २९


१७) ६, २, १२, ६, ?, १२, ३०

१) ११ 

२) १७ 

३) २०        

४) ३१


१८) ८, २७, ६४, ?, २१६

१) १२५ 

२) ७८ 

३) ८६ 

४) ५८


१९) ९, 

२८, ६५, ?, २१७

१) ८२ 

२) ९३ 

३) १२६       

४) १५४


२०) ६, २६, ६३, १२४, ?

१) ८०        

२) ९६ 

३) १७६       

४) २१५


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⭕️उत्तर :

१) ४, २) ४ , ३) ३ , ४) २, ५) ४ 

६) ३ , ७) १,  ८) २,  ९) ४,  १०) २,  

११) २,  १२) १,  १३) ३,  १४) ४,  १५) २,

१६) १,  १७) ३,  १८) १,  १९) ३,   २०) ४


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


१) संख्यामार्लेत (n 3 - 1) या सुत्रानुसार १३ - १ = ०


२) संख्यामालेत (n2 - n) ) या सुत्रानुसार ५ - ५ = २०


३) संख्यांमध्ये अनुक्रमे २, ४, ८, १६, ३२ चा फरक


४) क्रमाने येणाऱ्या मुळसंख्या


५) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या


६) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या


७) लगतच्या दोन संख्यांमध्ये ११ चा फरक


८) संख्यामालेत अनुक्रमे २,३,५,७,११,१३ या क्रमवार मूळसंख्यांचा फरक


९) अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८ या नैसर्गिक संख्यांचे वर्ग


१०) n2 + 1 सुत्रानुसार ३, ५, ७, ९, ११ संख्यांचे वर्ग + १


११) n 2 + 1 सुत्रानुसार ३, ४, ५, ६, ७ संख्यांचे वर्ग + १


१२) स्म्स्थानावरील संख्या (उदा. ४४) मागील विषमसंख्येपेक्षा (उदा. १२) ३२ ने अधिक व पुढील विषमसंख्येपेक्षा (उदा. २८) १६ ने कमी


१३) विषमस्थानावरील संख्यांमध्ये ७ चा फरक, समस्थानावरील संख्यांमध्ये *५ चा फरक


१४) अनुक्रमे २, ४, ६, ८, १० या समसंख्यांचे वर्ग


१५) n 2 - 1 सूत्रानुसार ५, ६, ७, ८, ९ संख्यांचे वर्ग - १


१६) विषमस्थानावर n 2 + 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n 2 - 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग - १


१७) विषमस्थानावर n 2 + n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n2 - n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग उणे (-) अनुक्रमे त्याच संख्या.


१८) n3 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन


१९) n3 + 1 नुसार अनुक्रमे २,३,४,५,६ या संख्यांचे घन + १


२०) n3 - 1 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन उणे १

06 December 2021

सविनय कायदेभंग चळवळ 

🔹ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.

🔺चळवळीस सुरुवात

🔸भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटीश सरकार ते द्यायला तयार नव्हते.

🔹महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, ५० टक्के शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द, ५० टक्के लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण अकरा मागण्या ब्रिटीश सरकारपुढे मांडल्या होत्या.

🔸सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेत्वृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला.

🔸मिठावर लादलेला कर महात्मा गांधींना मान्य नव्हता; त्यामुळे या कायदेभंगाची चळवळ मिठाचा सत्याग्रह करून करावी, अशी कल्पना त्यांना सुचली व मार्च १२ १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रेला निघाले. 

🔸एप्रिल ५, १९३० ला त्यांनी मिठाचा कायदा मोडला.

🔺चळवळीचे स्वरूप

🔹मिठाचा सत्याग्रहसरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कारपरदेशी माल, दारू, अफू विकणार्या दुकांनांवर निदर्शनेपरदेशी मालाची होळीकरबंदी

🔸हे कायदेभंग चळवळीतील प्रमुख आदेश महात्मा गांधींनी जनतेला दिले होते. नेहरू रिपोर्ट लागू करण्यासाठी गाधीनी ब्रिटिशांना मुदत दिली.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

डासांमुळे होणारे आजार

1-मलेरिया
2-चिकुनगुनिया
3- डेंग्यू
4-हत्तीरोग

1) मलेरिया :-

🔹मलेरियावर औषधे व प्रतिबंधक उपाय आज पुरेसे सापडले आहेत; पण मलेरियामुळे वाया जाणारे मानवी श्रममूल्य, श्रमतास यांमध्ये मात्र फार फरक पडलेला नाही. मेंदूपर्यंत पोहोचलेला मलेरियाचा आजार (सेरेब्रल मलेरिया) झाल्यास रोगी दगावण्याची शक्यता आजही अगदी अद्ययावत रुग्णालयांतील अतिदक्षता उपचारकेंद्रात असते.
   
🔹 क्लोरोक्विन व तत्सम औषधांचा शोध व वापर सुरू झाला. प्रतिबंधक उपाय म्हणूनही क्लोरोक्विनच्या गोळ्या दर आठवड्याला दिल्या जाऊ लागल्या आणि मलेरियाचा घातकपणा कमी झाला. मात्र आजही पाणवठ्याजवळच्या जागा, दलदलीचा प्रदेश, जंगले येथे मलेरियाचा प्रभाव आढळतो.

2) चिकणगुणिया  :-

🔹स्वच्छ पाण्यात वाढणारे डास चिकुनगुनिया व डेंग्यू हे आजार पसरवतात. घरात, घराच्या आसपास साचलेल्या व ठेवलेल्या पाण्यातसुद्धा या डासांची वाढ होऊ शकते. फुलदाणीतील न बदललेले पाणी, बाल्कनीतील प्लास्टिकच्या भांडय़ांत, जुन्या टायरमध्ये साचलेले पावसाचे पाणी, गच्चीतील उघडी पाण्याची टाकी यांमध्ये हमखास या रोगांच्या वाहक डासांची निर्मिती होते. एडिस इजिप्ती जातीचा डास सहसा दिवसा चावतो. त्याच्या चाव्यातून या आजारांचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात.

🔹चिकनगुनिया म्हणजे हातापायांची बोटे व सांधे वेडेवाकडे होणे. हा आफ्रिकन भाषेतील शब्द आहे. त्याचा चिकन म्हणजे कोंबडय़ांशी वा बर्डफ्लूशी काहीही संबंध नाही. तीव्र ताप, अंग दुखणे, डोकेदुखी, क्वचित त्वचेवर लालसर पुरळ, डोळ्यांमधून पाणी येणे व डोळेही लाल होणे या प्राथमिक लक्षणानंतर चिकनगुनिया खरा प्रभाव दाखवतो.

🔹शरीरातील लिम्फॅटिक म्हणजेच रसवाहिका व कोशग्रंथी यांद्वारे विविध सांध्यांमध्ये पसरलेल्या दाहामुळे अनेक सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज दिसते. काही वेळा पायांवर सूज येऊ लागते. रुग्णाला हालचाल करणे देखील कठीण होते. अन्नपाणी नकोसे वाटते. त्यातून अशक्तपणा वाढतो. ताप उतरला, तरी काही आठवडे वा वयस्कर माणसांत काही महिनेसुद्धा या तक्रारी चालू राहतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या आजारावर वेदनाशामकांपलीकडे कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. क्वचित प्रसंगी हा आजार शरीरातील प्रमुख इंद्रियांच्या कामात अडथळा निर्माण करतो, तेव्हा रुग्णावर तातडीचे उपचार रुग्णालयात भरती होऊनच करावे लागतात.

3) डेंग्यू  :-
   
🔹डेंग्यू व इन्फ्लुएंझा यांची लक्षणे खूपशी सारखी असल्याने अनेकदा गल्लत होऊ शकते. पण फ्ल्यूचा ताप सहसा तीन ते पाच दिवसांत उतरतो व तो सहसा साथीचा असतो. डेंग्यू डास चावल्यामुळे होतो. स्वच्छ पाण्यात वाढणार्‍या एडीस अल्बोपिक्टस, इजिप्ती या जातींच्या डासांचा या आजाराच्या प्रसारात सहभाग असतो. ताप, डोकेदुखी, सांधे दुखणे, भूक मंदावणे या लक्षणांबरोबर डेंग्यूच्या मोजक्याच रुग्णांत अचानक रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स यांची संख्या कमी होऊ लागते. 

मानवी प्रतिकारक्षमता पांढऱ्या पेशींवर अवलंबून असल्याने रुग्णाची तब्येत गंभीर होऊ लागते. प्लेटलेट्समुळे रक्तस्राव बंद करणे हे कार्य पार पाडले जाते. विविध इंद्रियांत अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यातून डेंग्यूचा गंभीर रुग्ण दगावू शकतो.

🔹 रक्तघटक पुरवून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. डेंग्यूवरसुद्धा उपचार वा प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीत.

4) हत्तीरोग :-

🔹हत्ती रोगांमध्ये डासांद्वारे घेतलेल्या चाव्यातून मानवी शरीरात 'व्युचेरेरिया बँक्राफ्टाय' व व्युचेरेरिया मलायी' हे कृमी उपसर्गी अळीरूपाने प्रवेश करतात. मात्र क्युलेबस जातीच्या डासांमार्फत हा प्रसार होतो. या कृमींची वाढ शरीरातील रसवाहिन्यांमध्ये होते. दोन सेंटीमीटर एवढी  वाढ होऊ शकते. यांची संतती म्हणजे मायक्रोफायलेरिया. हत्तीरोगामध्ये रसवाहिन्यांमध्ये ही कृमी जागा अडवतात व रसवहनाची यंत्रणा (लिम्फ सिस्टीम) बंद पाडतात. यामुळे शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच पाय, वृषणे, मांडीचा भाग येथे सूज दिसू लागते. रससंचय झाल्याने ही सूज असते. जड वाटणे यापलीकडे वेदना नसतात.पायाला व्रण झाल्यास तो बरा होत नाही. अशा रुग्णाला डास चावल्यास त्याच्या रक्तातील मायक्रोफायलेरिया डासाच्या पोटात जाऊन त्यांची तेथेही वाढ होते. दुसर्‍या निरोगी माणसाला हा वाहक डास चावतो, तेव्हा त्याच्या सोंडेतून त्वचेवर उतरलेली उपसर्ग अळी निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते.

🔹 हत्तीरोगावरील डायइथिल कार्बामाझाइन हे एकमेव औषध  दिले जाते. पण पूर्ण वाढलेल्या कृमींवर या हत्तीरोगाने पीडित व्यक्तीच्या लक्षणांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. संपूर्ण बाधित भागातील व्यक्तींना प्रतिबंधक म्हणून हे औषध वापरतात.

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

1⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : कोकण*

● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण
● मुख्यालय : मुंबई
● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

2⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे*

● भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र
● मुख्यालय : पुणे
● विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

3⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक*

● भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश
● मुख्यालय : नाशिक
● विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव

4⃣*प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद*

● भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा
● मुख्यालय : औरंगाबाद
● विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद

5⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती*

● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
● मुख्यालय : अमरावती
● विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम

6⃣ *प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर*

● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ
● मुख्यालय : नागपूर
● विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

04 December 2021

MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगातर्फे शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सन २०२२ या वर्षात येत्या ७ मे पासून ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत होणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


राज्यसेवा परीक्षा 2019 ,महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्‍य परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा २०२२ आदी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.






भूकंप लहरींचे प्रकार


■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.

■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.

■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_____________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.

महाराष्ट्रातील अभयारण्ये

🍀   अनेर - धुळे
🍀 अंधेरी - चंद्रपूर
🍀 औट्रमघाट - जळगांव
🍀 कर्नाळा - रायगड
🍀 कळसूबाई - अहमदनगर
🍀 काटेपूर्णा - अकोला
🍀 किनवट - यवतमाळ
🍀 कोयना - सातारा
🍀 कोळकाज - अमरावती
🍀 गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
🍀 चांदोली - सांगली, कोल्हापूर
🍀 चापराला - गडचिरोली
🍀 जायकवाडी - औरंगाबाद
🍀 ढाकणा कोळकाज - अमरावती
🍀 ताडोबा - चंद्रपूर
🍀 तानसा - ठाणे
🍀 देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
🍀 नवेगांव - भंडारा
🍀 नागझिरा - भंडारा
🍀 नांदूर मध्यमेश्वर - नाशिक
🍀 नानज - सोलापूर
🍀 पेंच - नागपूर
🍀 पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
🍀 फणसाड - रायगड
🍀 बोर - वर्धा
🍀 बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
🍀 भिमाशंकर - पुणे, ठाणे
🍀 मधमेश्वर - चंद्रपूर
🍀 मालवण - सिंधुदुर्ग
🍀 माळढोक - अहमदनगर, सोलापूर
🍀 माहीम - मुंबई
🍀 मुळा-मुठा - पुणे
🍀 मेळघाट - अमरावती
🍀 यावल - जळगांव
🍀 राधानगरी - कोल्हापूर
🍀 रेहेकुरी - अहमदनगर
🍀 सागरेश्वर – सांगली

02 December 2021

जिल्हे निर्मिती

रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)-1 मे 1981

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),-16 ऑगस्ट 1982

चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)-26 ऑगस्ट 1982

मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)-1990

धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)1 जुलै 1998

अकोल्यापासून – वाशिम (33 वाशिम जिल्हा)
 
परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)-
1 मे 1999

भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा-1 ऑगस्ट 2014 )

सोलापूर जिल्हा - महत्त्वाची माहिती

भौगोलिक माहिती :-
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्याचा ) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदीजिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस  अहमदनगर  व  उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमासंगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी(१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो(हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका

◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान

◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका

◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल

◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी

◆Lamitye :-भारत आणि सेशल्स

◆इंद्र :- भारत आणि रशिया

◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया

◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल

◆Ekuverin:- भारत आणि मालदीव

◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश

◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल

◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया

◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव.

आरोग्यविषयक सरकारच्या महत्त्वाच्या योजना

1.जीवनदायी आरोग्य योजना :-

दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी 
१९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे.मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2.राजीव गांधी जीवनदायी योजना :-

ही योजना महाराष्ट्र सरकारने २ जुलै २०१२ पासून सुरू केली..

राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल.ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील.

राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही.

या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत.

या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3.जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना :-

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते.

महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

ही योजना ०१ जून २०११ रोजी सुरू करण्यात आली.

भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 मातांचे वैधानिक अधिकार :-

सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.

दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.

सर्व प्रकारची औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.

आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार.

आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार

भारत केंद्रीय अर्थसंकल्प.

🅾  तसेच संदर्भित वार्षिक वित्तीय स्टेटमेन्ट लेख 112 मध्ये भारतीय राज्यघटना ,  वार्षिक बजेट आहे भारत प्रजासत्ताक . सरकार फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर करते जेणेकरून एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस आधी ते पूर्ण केले जाऊ शकेल. 2016 पर्यंत तो फेब्रुवारीच्या शेवटच्या काम दिवशी सादर करण्यात आला अर्थमंत्री मध्ये संसदेत . वित्त विधेयक आणि विनियोजन विधेयक सादर करून अर्थसंकल्प १ एप्रिल रोजी लागू होण्यापूर्वीच लोकसभेने मंजूर केले पाहिजे, म्हणजे भारताच्या आर्थिक वर्षाची सुरुवात .

🅾एक अंतरिम बजेट हे 'व्होट ऑन अकाउंट' सारखे नसते. 'व्हॉट ऑन अकाउंट' हा सरकारच्या बजेटच्या खर्चाच्या बाजूनेच आहे. अंतरिम बजेट हा खर्च आणि पावती या दोन्ही खात्यांचा एक संपूर्ण संच आहे. एक अंतरिम बजेट संपूर्ण बजेट प्रमाणेच संपूर्ण आर्थिक विधान देते. कायदा केंद्र सरकारला कर बदल लागू करण्यास अपात्र ठरवित नाही, सामान्यत: निवडणुकीच्या वर्षात, सलग सरकारांनी अंतरिम अर्थसंकल्पात आयकर कायद्यात कोणतेही मोठे बदल करणे टाळले आहे. 

🅾सप्टेंबर 2017 पर्यंत म्हणून , मोरारजी देसाई 10 सर्वाधिक संख्या आहे व त्यानंतर जे खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले पी चिदंबरम यांनी च्या 9 आणि प्रणव मुखर्जी यांनी 'चे 8 यशवंत सिन्हा , यशवंतराव चव्हाण आणि चिंतामणराव देशमुख यांनी सादर केले आहेत प्रत्येकी 7 खर्चाचे अंदाजपत्रक मनमोहन सिंग आणि टीम कृष्णम्माचारी आहे 6 अर्थसंकल्प सादर केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋