Ads

12 October 2019

नोबेल शांतता पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना जाहीर

◾️ इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

◾️एरिट्रियाबरोबर केलेल्या शांती करारासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

◾️त्यांच्या पुढाकारामुळे गेल्यावर्षी एरिट्रियासोबत झालेल्या शांतताकरारामुळे 20 वर्षांपासूनचा लष्करी तिढा सुटला आहे.

◾️१९९८ ते २००० दरम्यान झालेल्या सीमायुद्धापासून या तिढ्याला सुरुवात झाली होती.

◾️📌शांततेच्या नोबेल पुरस्कारांचं हे १०० वं वर्षं ❗️असून ओस्लोमध्ये याची घोषणा करण्यात आली.

◾️याच शांतता पुरस्कारासाठी तरूण पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची चर्चा होती.

◾️अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी यावर्षी एकूण ३०१ नावं सुचवण्यात आली होती. यामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संस्थांचा समावेश होता.

◾️नोबेलच्या शिफारसीसाठीच्या नियमांनुसार शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी पुढची ५० वर्षं प्रसिद्ध केली जात नाही.

        कोण आहेत अॅबी अहमद?

◾️43 वर्षांचे अॅबी अहमद हे एप्रिल २००८मध्ये इथिओपियाचे पंतप्रधान झाले.

◾️त्यानंतर त्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर उदारीकरण केलं. तोपर्यंत इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते.

◾️तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या हजारो विरोधकांची - कार्यकर्त्यांची त्यांनी मुक्तता केली आणि हद्दपार करण्यात आलेल्यांना घरी परतण्याची परवानगीही दिली.

◾️सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथिओपियाचा शेजारी देश असणाऱ्या एरिट्रियासोबत शांतता करार करत त्यांनी दोन दशकांचा संघर्ष संपुष्टात आणला.

                 नोबेल  पुरस्कार

📌 भौतिकशास्त्र,
📌 रसायनशास्त्र,
📌 वैद्यकशास्त्र,
📌 साहित्य आणि
📌 शांतता या
क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात.
📌 या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने १९६८मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही

◾️आधीच्या १२ महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

◾️१९०१ मध्ये 📌पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले.

      याआधीचे प्रसिद्ध विजेते

📌अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना २००९मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं.
📌 जिमी कार्टर (२००२),
📌 मलाला युसुफजाई (संयुक्तपणे २०१४मध्ये)मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती,
📌युरोपियन युनियन (२०१२), 
📌कोफी अन्नान (२००१मध्ये संयुक्तपणे) युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस आणि
📌मदर टेरेसा (१९७९) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

◾️लेखक आणि विचारवंत जीन - पॉल सार्त्र यांनी १९६४मध्ये हा पुरस्कार नाकारला होता.

◾️तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी १९७३मध्ये पुरस्कार नाकारला.

◾️तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली.

◾️२०१६मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.

तुम्ही हे वाचले आहे का ?

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका

◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान

◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका

◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल

◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी

◆Lamitye :-भारत आणि सेशल्स

◆इंद्र :- भारत आणि रशिया

◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया

◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल

◆Ekuverin:- भारत आणि मालदीव

◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश

◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल

◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया

◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव

◆कोकण - भारत आणि ब्रिटन नौदल

📒भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४P

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६

नक्की सोडवा, सराव 20 प्रश्नउत्तरे

1. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.

 पंचगंगा

 भोगावती

 कोयना

 वारणा

उत्तर : भोगावती

2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन केले जाते?

 मुंबई हाय

 कोल्हापूर

 चंद्रपूर

 नाशिक

उत्तर : मुंबई हाय

3. जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता?

 सुएझ कालवा

 पनामा कालवा

 राजस्थान कालवा

 कील कालवा

उत्तर : सुएझ कालवा

4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते.

 यांत्रिक ऊर्जा

 रासायनिक ऊर्जा

 गतिज ऊर्जा

 चुंबकीय ऊर्जा

उत्तर : रासायनिक ऊर्जा

5. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?

 उपराष्ट्रपती

 वित्त मंत्री

 संसद   

 राष्ट्रपती

उत्तर : राष्ट्रपती

6. ‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा.

 वैकल्पिक व्दंव्द

 समहार व्दंव्द

 इयरेतर व्दंव्द

 अव्ययीभाव

उत्तर : वैकल्पिक व्दंव्द

7. थायरॉक्झीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे?

 मॅग्नेशियम

 लोह

 फॉस्फोरस

 आयोडीन

उत्तर : आयोडीन

8. खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते?

 मीटर/सेकंद

 अर्ग

 फॅदम

 डेसिबल

उत्तर : डेसिबल

 

9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.

 दगडी कोळसा

 संगमरवर

 बॉक्साईट

 तांबे

उत्तर : दगडी कोळसा

10. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?

 राष्ट्रपती

 मुख्यमंत्री

 विधानसभा अध्यक्ष

 लोकसभा सभापति

उत्तर : राष्ट्रपती

11. शुद्ध शब्द ओळखा

 इस्पित

 ईस्पित

 ईस्पीत

 ईस्पिता

उत्तर : ईस्पित

12. यातील ‘नामाचा’ शब्द ओळखा.

 लिहितो

 श्रीमंत

 मुलगा

 तर

उत्तर : मुलगा

13. विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 जलxपाणी

 थंडxगरम

 पवनxवारा

 रवीxसूर्य

उत्तर : थंडxगरम

14. भूतकाळातील वाक्य कोणते?

 किती छान आहे हे

 किती सुंदर होता तो मोर

 काय सुंदर अक्षर आहे तिचे

 यापैकी नाही

उत्तर : किती सुंदर होता तो मोर

15. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. भूतकाळ करा.

 आम्ही रोज क्रिकेट खेळू

 आम्ही रोज क्रिकेट खेळतो

 आम्ही रोज क्रिकेट खेळणार

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

16. वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणार्‍या सर्वनामांना —– सर्वनामे म्हणतात.

 संबंधी

 दर्शक

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : संबंधी

17. ‘स्वरसंधी’ ओळखा.

 तट्टिका

 यशोधन

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : प्रश्नार्थक

18. काळ ओळखा ‘मधुने लाडू खाल्ला आहे’

 भूतकाळ

 भविष्यकाळ

 वर्तमानकाळ

 रिती भूतकाळ

उत्तर : वर्तमानकाळ

19. ‘लहान मुलांनापासून वृद्ध माणसांपर्यंत’ शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.

 आजनभाऊ

 अनुयायी

 अतिथी

 आबाल वृद्ध

उत्तर : आबाल वृद्ध

20. ‘सकाळाची रंग तुझा पावसाळी नभापरि’ वाक्यातील अलंकार ओळखा.

 उपमा

 उत्प्रेक्षा

 व्यतिरेक

 अतिशयोक्ती 

उत्तर : उपमा

वाहन उद्योगात सणासुदीतही मंदी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Oct 2019, 02:38 AM

वाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे.

वाहन उद्योगक्षेत्रातील मंदी सणासुदीच्या दिवसांतही हटताना दिसत नाही. सप्टेंबरमध्ये एकूण कारविक्रीमध्ये तब्बल २३.६९ टक्के घट नोंदवण्यात आली आहे. कारविक्रीत घट होण्याचा हा सलग अकरावा महिना ठरला. विशेष म्हणजे, दुचाकींच्या विक्रीलाही फटका बसला असून त्यांच्या विक्रीतही सुमारे २४ टक्के घट झाली आहे. कार उद्योजकांची संघटना सियामने (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) शुक्रवारी ही आकडेवारी प्रसिद्ध केली.
ऑक्टोबरमधील दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये कारच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. मात्र तसे घडल्याचे दिसत नाही. कारखरेदीसाठी सर्वसामान्य नागरिक अद्याप अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्ये एकूण २,२३,३१७ कारची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात कारविक्रीचा आकडा २,९२,६६० होता. सप्टेंबरमध्ये देशांतर्गत कारविक्रीमध्येही ३३.४ टक्के घट झाली असून १,३१,२८१ युनिट्स विकली गेली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये १,९७,१२४ कार विकल्या गेल्या होत्या. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही ३९ टक्के घट झाली असून सप्टेंबरमध्ये या प्रकारच्या वाहनांची विक्रीसंख्या ५८,४१९वर सीमित राहिली. आश्चर्याची बाब म्हणजे सप्टेंबरमध्ये दुचाकींची विक्रीही मंदावली. या महिन्यात दुचाकींची विक्री २३.२९ टक्क्यांनी कमी होऊन १०,४३,६२४वर मर्यादित राहिली

📕सियाम आशावादी📕

चालू महिन्याच्या गेल्या १०-१२ दिवसांमध्ये वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. दिवाळीमध्ये वाहनांची चांगली विक्री होईल. सरकारने केलेल्या विविध उपाययोजना व दिवाळीदरम्यान विक्रेत्यांकडून देण्यात येणाऱ्या सवलती यांमुळे या महिन्यात कारविक्रीची संख्या उत्साहवर्धक असेल, अशी आशा सियामचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी व्यक्त केली.

11 October 2019

अवकाश, खगोल संशोधनासाठी ‘सितारा’ प्रकल्प

◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुकाचा पुढाकार

◾️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांनी पुढाकार घेऊन ‘सितारा’  या प्रकल्पाची सुरुवात केली आहे.

◾️आगामी काळातील अवकाश आणि खगोल प्रकल्पातील संशोधनासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

◾️सितारा (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-आयुका प्रशिक्षण आणि संशोधन सहकार्य) या प्रकल्पाचे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय विज्ञान प्रशालेत सोमवारी उद्घाटन झाले.

◾️गेल्याच आठवडय़ात विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त संशोधन प्रकल्प, नवीन अभ्यासक्रम यांसाठी सामंजस्य करार करण्यात आला

◾️या कराराअंतर्गत विद्यापीठाच्या
  📌भौतिकशास्त्र,
  📌इलेक्ट्रॉनिक्स,
  📌तंत्रज्ञान,
  📌 अवकाश विज्ञान आणि
  📌 उपकरणशास्त्र या पाच विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसह आयुका काम करणार आहे.

◾️लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्सर्वेटरी (लिगो) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पासह इस्रोच्या आदित्य १ या सूर्यमोहिमेतही आयुकाचा सहभाग आहे.

◾️या पाश्र्वभूमीवर, विद्यापीठ आणि आयुका यांनी संयुक्त प्रकल्प हाती घेतला आहे.

◾️आगामी काळात सितारा अंतर्गत पेलोड इंटिग्रेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

◾️त्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थी छोटे उपग्रह तयार करू शकतील. मात्र, या सेंटरची कल्पना अद्याप प्राथमिक स्तरावर असून, त्यासाठी विविध प्रकारच्या परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत.

◾️केंद्र सरकारच्या ज्ञान समूह प्रकल्पासाठी (नॉलेज क्लस्टर प्रोजेक्ट) पुण्याच्या निवडीची बैठक प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांच्या उपस्थितीत झाली.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘पाऊस सगळीकडे पडला बरं का’ क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

   1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय      2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
   3) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय    4) परिणामदर्शक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 3

2) शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?

   1) नाम      2) क्रियापदे    3) क्रियाविशेषणे    4) वरील सर्व पर्याय बरोबर

उत्तर :- 4

3) अधोरेखित शब्दाची जात ओळखा – ‘भयंकर वादळ सुटले आणि पत्रे उडून गेले.’

   1) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय      2) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
   3) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय      4) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 4

4) अबब ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) संमती    2) आश्चर्य    3) विरोध      4) संबोधन

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच उशिरा येत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) साधा वर्तमानकाळ    2) रीती भविष्यकाळ
   3) रीती भूतकाळ    4) रीती वर्तमानकाळ

उत्तर :- 4

6) ‘वानर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) माकड    2) वानरी      3) माकडीण    4) बोका

उत्तर :- 2

7) लाली – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा..

   1) लाल्या    2) लाले      3) लाली      4) लाल

उत्तर :- 3

8) पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचे असलेले ‘विशेषणाचे सामान्यरूप’ होणारे विशेषण कोणते आहे ?

   1) गरीब    2) भला      3) लोकरी    4) खेळू

उत्तर :- 2

9) ‘पोपट पेरू खातो’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे.

   1) तृतीयान्त    2) चतुर्थ्यन्त    3) व्दितीयान्त    4) प्रथमान्त

उत्तर :- 4

10) तुमच्या परीक्षा कधी सुरू होणार ? – ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) विध्यर्थी    2) प्रश्नार्थी    3) उद्गारार्थी    4) विधानार्थी

उत्तर :- 2

भूगोल प्रश्नसंच ११/१०/२०१९

1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?
   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे
   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे
उत्तर :- 1

2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –
   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.
   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.
उत्तर :- 2

3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................
   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.
   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.
   3) जास्त तापमान असेल.
   4) कमी तापमान असेल.
उत्तर :- 2

4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :
   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.
   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.
   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.
   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.
उत्तर :- 3

5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?
   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी
   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी
उत्तर :- 2

तुम्हाला माहीत आहे का ? देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

• देशातील पहिली संत्रा वायनरी.
:- सावरगाव (नागपूर).

• देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन.
:- पुणे.

• देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात.
:- अरुणाचल प्रदेश.

• देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ.
:- नागपूर.

• देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी.
:- चैन्नई.

• देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय.
:- ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे).

• देशातील पहिले दूरदर्शन केंद्र.
:- दिल्ली.

• देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र.
:- पुणे.

• देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य.
:- कर्नाटक.

• देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प.
:- ताडोबा (चंद्रपूर).

• देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य.
:- हिमाचलप्रदेश.

• देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली.
:- बंगलोर.

• देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे.
:-  पुणे.

• देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य.
:- सिक्किम.

• देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी.
:-  पुणे.

• देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव.
:- गरिफेमा.

• देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर .
:- झारखंड.

• देशातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य .
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य .
:-  त्रिपूरा.

• देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर.
:- सुरत.

• देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य .
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य.
:-  तामिळनाडू.

• देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक.
:-  बंगळूर.

• देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प.
:- कांडला (गुजरात).

• देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य.
:- प.बंगाल.

• देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य.
:-  मध्यप्रदेश.

• देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ.
:- राज्यस्थान.

• देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र.
:- हडपसर (पुणे).

• देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य.
:- हरीयाणा.

• देशातील पहिले स्त्री बटालियन.
:- हडी राणी (राजस्थान).

• देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई – बँकीग सेवा देणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले ई – पंचायत सुरु करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य.
:-  दिल्ली.

• देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा.
:- नदिया (प.बंगाल).

• देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य.
:-  महाराष्ट्र.

• देशातील पहिला खासगी विमानतळ.
:-  दुर्गापूर (प.बंगाल).

• देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले.
:- दिल्ली.

• देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ.
:- वापी (गुजरात).

• देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य.
:- उत्तराखंड.

• देशातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क.
:- भुवनेश्वर.

• देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य.
:- आंध्रप्रदेश.

• देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प.
:- आळंदी.

• देशातील पहिले सॅटेलाईट शहर.
:- पिलखूआ (उत्तरप्रदेश).

• देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज.
:- काटेवाडी.

• देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य.
:- महाराष्ट्र.

• देशातील पहिला निर्मल जिल्हा.
:- कोल्हापूर.

• देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली.
:- भुसावळ – आजदपूर.

• देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी.
:- मुंबई.

• देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य.
:- गुजरात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📌39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.

(A) भोपाळ
(B) नवी दिल्ली
(C) भुवनेश्वर✅✅✅
(D) आग्रा

📌भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?

(A) मंगोलिया✅✅✅
(B) कंबोडिया
(C) लाओस
(D) व्हिएतनाम

📌उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?

(A) IIT कानपूर
(B) CSIR✅✅✅
(C) IISc बेंगळुरू
(D) IIT खडगपूर

📌भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) श्रीलंका
(B) बांग्लादेश✅✅✅
(C) मालदीव
(D) पाकिस्तान

📌संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.

(A) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
(B) राष्ट्रीय संरक्षण कोष
(C) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
(D) यापैकी नाही

📌21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.

(A) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
(B) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
(C) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
(D) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)

📌UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून __ यांची नेमणूक केली.

(A) कॅमेरून डायझ
(B) युना किम
(C) मिली बॉबी ब्राउन
(D) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅

📌जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.

(A) 9 ऑगस्ट✅✅✅
(B) 9 ऑक्टोबर
(C) 6 ऑक्टोबर
(D) 8 ऑक्टोबर