20 January 2020

भारताची राज्यघटना प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे

प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड

प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६

 प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य

प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड

प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे

 प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही

प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i

प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व

प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.

Ans :

१) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४

परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात रिझर्व्ह बँक सहाव्या क्रमांकावर.

🔥भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) इतर देशांच्या प्रमुख केंद्रीय बँकांच्या तुलनेत परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सहावा सर्व मोठा खरेदीदार ठरला आहे.

🔥RBIने भारत सरकारच्या ‘सार्वभौम सुवर्ण बाँड’साठी 2019 या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये 25.2 टन खरेदी केले होते त्यामुळे RBI सहाव्या क्रमांकाचा खरेदीदार झाला.

💧जागतिक सुवर्ण परिषद (WGC) यांच्या अहवालानुसार,

🔥RBI कडे 625.2 टन सुवर्ण (सोने) आहे आणि ते प्रमाण परकीय चलन साठ्याच्या 6.6 टक्के आहे.

🔥2019 या साली भारताच्या आधी अनुक्रमे चीन, रशिया, कझाकस्तान, तुर्की, पोलंड या देशांच्या केंद्रीय बँका परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात सर्वात मोठे खरेदीदार ठरले.

🔥भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गेल्या ऑक्टोबर 2019 या महिन्यामध्ये 7.5 टन सोने खरेदी केले होते आणि परकीय चलन साठा 450 अब्ज डॉलरपर्यंत भक्कम केला.

💧जागतिक सुवर्ण परिषद (WGC)..

🔥1987 साली स्थापना झालेली जागतिक सुवर्ण परिषद (WGC) ही सुवर्ण उद्योग बाजारपेठेसाठीची जागतिक विकास संस्था आहे. ही सोन्याचे खनिकर्म यापासून ते गुंतवणूक अश्या उद्योगांच्या

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोणत्या व्यक्तीला उत्कृष्टतेसाठी मुप्पावरपू व्यंकय्या नायडू राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला?

(A) अभिजित विनायक बॅनर्जी
(B) एम. एस. स्वामीनाथन✅✅
(C) कैलास सत्यार्थी
(D) सोनम वांगचुक


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 _______ येथे ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.

(A) मुंबई
(B) नवी दिल्ली✅✅
(C) कोलकाता
(D) हैदराबाद


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 भारत सरकारच्यावतीने इंधन बचतीविषयीची कोणती मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे?

(A) सक्षम✅✅
(B) संचय
(C) अमुल्य
(D) उज्ज्वल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणती व्यक्ती यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी पुरुषांच्या पथकाची पहिली महिला पथसंचलन सहाय्यक ठरणार?

(A) तानिया शेरगिल✅✅
(B) भावना कस्तुरी
(C) अंजली गुप्ता
(D) भावना कांत


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणाची ICCच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि कसोटी ‘टिम ऑफ द इयर’ या संघांचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे?

(A) स्टीव्ह स्मिथ
(B) विराट कोहली✅✅
(C) केन विल्यमसन
(D) इओन मॉर्गन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 16 जानेवारीला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी __ प्रदेशामध्ये पहिली-वहिली अन्नप्रक्रिया शिखर परिषद आयोजित केली गेली.

(A) जम्मू
(B) सिक्किम
(C) लडाख✅✅
(D) हरयाणा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता रशियाचे पंतप्रधान कोण आहेत?

(A) मिखाईल मिशूस्टीन✅✅
(B) रॉबर्ट अबेला
(C) मॅन्युएल व्हॅल्स
(D) महिंदा राजपक्षे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?

(A) चीन✅✅
(B) भारत
(C) रशिया
(D) इस्त्राएल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश✅✅
(B) आसाम
(C) मणीपूर
(D) मिझोरम


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने 9 फेब्रुवारीला “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे?

(A) राजस्थान
(B) हरयाणा
(C) महाराष्ट्र✅✅
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A) डॉ हर्ष वर्धन
(B) रवी शंकर प्रसाद✅✅
(C) नीता वर्मा
(D) बी. एस. येडियुरप्पा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?

(A) दक्षिण आफ्रिका✅✅
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) न्युझीलँड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?

(A) के. शिव रेड्डी
(B) ममता कालिया
(C) वासदेव मोही✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या शहरात इंधनाच्या संवर्धनासाठी PCRAच्या 'सक्षम 2020' नावाच्या जागृती मोहीमेला सुरूवात करण्यात आली?

(A) बेंगळुरू
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) लखनऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्यात प्रथम ‘कृषी मंथन’ (अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातली सर्वात मोठी शिखर परिषद) सुरू झाली?

(A) तेलंगणा
(B) आसाम
(C) दिल्ली
(D) गुजरात✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

19 January 2020

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –

1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

मायकेल पात्रा: RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर

🔆भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत.

🔆विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध विभागात 35 वर्षांचा पात्रा यांना अनुभव आहे.

💢डॉ. मायकेल पात्रा...

🔆IIT मुंबईमधून अर्थशास्त्रात पीएचडी केलेले डॉ. पात्रा हे 2005 सालापासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागात काम करीत आहेत. 1985 साली ते भारतीय रिझर्व्ह बँकेत रुजू झाले. त्यांनी हावर्ड विद्यापीठात आर्थिक स्थैर्य या विषयावर संशोधनात्मक लिखाण केले. आंतररराष्ट्रीय पातळीवरील वित्त, पैसा आणि धोरणे याविषयी आर्थिक विश्लेषण आणि धोरणे विभागाचे ते सल्लागार राहिले आहेत.

💢RBI विषयी...

🔆भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते.

🔆‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

🔆RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

ए. पी. माहेश्वरी: CRPF चे नवे महानिदेशक

🔰 केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

🔰 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

🔰 उत्तरप्रदेश संवर्गातून 1984च्या तुकडीचे IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी सध्या केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) आहेत.

🔰 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

🔴 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) याची स्थापना ‘क्राऊन रिप्रेझेंटेटीव्ज पोलीस’ या नावाने 27 जुलै 1939 रोजी झाली.

🔰 नक्षलविरोधी कारवाई आणि जम्मू व काश्मीरमधल्या दहशतवादविरोधी कारवाया यांची जबाबदारी असलेले देशातले आघाडीचे अंतर्गत सुरक्षा दल आहे.

🔰 त्यात 3.25 लक्षहून अधिक सैनिकांसह हे दल जगातले सर्वात मोठे निमलष्करी दल ठरते.

हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक

🌀स्पेनला २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅव्हिएर हर्नाडेझ लवकरच बार्सिलोनाच्याच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हर्नाडेझच्या भवितव्याविषयी स्वत: क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.

🌀बार्सिलोनाचे सध्याचे प्रशिक्षक इर्नेस्टो व्हॅलवरेड यांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे हर्नाडेझकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेषत: स्पॅनिश सुपर चषकातील उपांत्य फेरीत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🌀‘‘हर्नाडेझ बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्याच्या चर्चाना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. परंतु तूर्तास तरी अल-साद संघासोबतचा त्याचा करार संपलेला नाही,’’ असे अल-साद क्लबचे क्रीडा संचालक मोहम्मद गुलाम अल-बलुशी म्हणाले. मात्र याविषयी अंतिम निर्णय दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचा असेल, असेही अल-बलुशी यांनी सांगितले.

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला..

भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.

🧬या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.

🧬होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी...

🧬पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे. होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे. ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.

🧬या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत. कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.

महत्त्वाचे प्रश्नसंच

१) मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर होत नाही?(MPSC Main-IV 2016)
१) साक्षरता दर                         २) दरडोई स्थल देशांतर्गत उत्पन्न
३) जन्माच्यावेळी जगण्याचा दर        ४) कृषी उत्पादकता

२) २०१४ च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत. (MPSC Main-IV 2015)
१)१३५ व १७४             २)१२६ व १३६
३) १३५ व १४६ व          ४)१२५ व १४७

३) जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (२०१०) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main IV-2015)
अ) विकसनशील अर्थव्यवस्था खाली विश्वाची सुमारे ८३ टक्के लोकसंख्या आहे, ती जगाच्या सुमारे ३८ टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
ब) युरोपातील काही देश विकसनशील आर्थव्यवस्था दर्शवितात.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब            ३) दोन्ही          ४) एकही नाही

४) भ्रष्टाचाराबाबतच्या विधानांचा विचार करा.(MPSC Main-IN 2015)
अ) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही विविध देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोजणारी संस्था आहे.
ब) संस्थेने २०१४ यावर्षात १७५ देशांतील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला,
क) भारताला १०० पैकी ३८ गुण मिळाले.
ड) १७५ देशांमध्ये भारताला ८५ वा क्रमांक मिळाला,
इ) स्वित्झर्लंड सगळ्यात शिखरावर आहे.
फ) सोमालिया सगळ्यात खाली आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?
१)क       २) ड        ३) इ        ४) फ

५) २०१४ या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा. (MPSC Main -IN 2015)
अ) सिंगापूर         i) ०.८९१
ब) इस्त्रायल        ii) ०.९०१
क) जपान          iii) ०.८८८
ड) दक्षिण कोरिया  iv) ०.८९०

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -२, ४ - ३, ५ - १

६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

१०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ६- २, ७- ४, ८-२, ९ -२, १०-१

१) भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमख कारणे कोणती?(MPSC Main -IN 2015)
अ) मालमत्तेची खाजगी मालकी
ब) वारसाहक्काचा कायदा
क) करचुकवेगिरी ड) समांतर अर्थव्यवस्था

पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) ब,क आणि ड
३) अ,क आणि ड
४) वरील सर्व

२) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main -IV 2015)
अ) यु.एन.डी.पी. च्या (२०१४ च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार १५२ देशांमध्ये भारताचा १२७ वा क्रमांक लागतो.
ब) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत १८७ पैकी १६५वा आहे.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब          ३) दोन्ही         ४) एकही नाही

३) (UNDP) च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (२००९) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही?(MPSC Main -IV 2015)
(भारताची आयु अपेक्षा ६३.४ व प्रौढ साक्षरताटक्केवारी (२००७) ६६ होती)
अ) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा २००७ सुमारे ८४ होती.
ब) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी २००७ मध्ये सुमारे ९९ होती.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ       २) केवळ ब          ३) दोन्ही       ४) एकही नाही

४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय?(MPSC Main-IN 2015)
१) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक
२) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक
३) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक
४) पर्यावरणीय कुज़्नेत्स वक्र गृहितक

५) लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? (MPSC Main-IV 2015)
अ) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
ब) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
क) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
ड) शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी

१)ड,ब,अ        २) अ,ब,क       ३) क,ड,ब          ४) अ,ब,क,ड

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -१, ४ - ४, ५ - २.

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 16 जानेवारीला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ______ प्रदेशामध्ये पहिली-वहिली अन्नप्रक्रिया शिखर परिषद आयोजित केली गेली.

(A) जम्मू
(B) सिक्किम
(C) लडाख✅✅
(D) हरयाणा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता रशियाचे पंतप्रधान कोण आहेत?

(A) मिखाईल मिशूस्टीन✅✅
(B) रॉबर्ट अबेला
(C) मॅन्युएल व्हॅल्स
(D) महिंदा राजपक्षे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?

(A) चीन✅✅
(B) भारत
(C) रशिया
(D) इस्त्राएल


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या (IUCN) सोबत सामंजस्य करार केला आहे?

(A) अरुणाचल प्रदेश✅✅
(B) आसाम
(C) मणीपूर
(D) मिझोरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने 9 फेब्रुवारीला “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे?

(A) राजस्थान
(B) हरयाणा
(C) महाराष्ट्र✅✅
(D) उत्तरप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अरुणाचल प्रदेश विधानसभेनी नवीन बोधचिन्ह स्वीकारले


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
- अरुणाचल प्रदेश राज्याच्या विधानसभेनी नवीन बोधचिन्हाचा स्वीकार केला आहे, जो राज्याची विशिष्ट ओळख आणि संस्कृती प्रतिबिंबित करतो.

▪️ठळक बाबी

- नवीन बोधचिन्हामध्ये राष्ट्रीय चिन्ह आणि फॉक्सटेल ऑर्किड (राइन्कोस्टाईलिस रेटुसा) हे राज्य पुष्प आहे.

- राष्ट्रीय चिन्ह भारतीय राज्यघटनेच्या महासंघ यंत्रणेचे प्रतीक आहे.

- फॉक्सटेल ऑर्किड हे राज्याचे राज्य फूल आहे. ते राज्याचे वैशिष्ट्य प्रदर्शित करते, तर फुलांचा निळा रंग विधानसभा सचिवालयाची स्वायत्तता दर्शवितो.

▪️अरुणाचल प्रदेश राज्य

- अरुणाचल प्रदेश हे भारताच्या ईशान्य भागातले एक प्रमुख राज्य आहे. आसाम राज्याचे विभाजन होऊन अरुणाचल प्रदेश हे वेगळे राज्य म्हणून 1987 साली स्थापना झाली. या राज्याच्या सीमा चीन व म्यानमार या देशांना लागून आहेत. इटानगर ही राज्याची राजधानी आहे.

- हे राज्य भारताच्या अगदी पूर्वेला येत असल्याने भारतात सर्वात आधी सूर्य या राज्यात उगवतो, म्हणून राज्याला अरुणाचल प्रदेश म्हणजेच सर्वप्रथम सू्र्य उगवणारा प्रदेश हे नाव मिळाले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖