Saturday 18 January 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच

१) मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशांकाचा वापर होत नाही?(MPSC Main-IV 2016)
१) साक्षरता दर                         २) दरडोई स्थल देशांतर्गत उत्पन्न
३) जन्माच्यावेळी जगण्याचा दर        ४) कृषी उत्पादकता

२) २०१४ च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत. (MPSC Main-IV 2015)
१)१३५ व १७४             २)१२६ व १३६
३) १३५ व १४६ व          ४)१२५ व १४७

३) जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (२०१०) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main IV-2015)
अ) विकसनशील अर्थव्यवस्था खाली विश्वाची सुमारे ८३ टक्के लोकसंख्या आहे, ती जगाच्या सुमारे ३८ टक्के स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
ब) युरोपातील काही देश विकसनशील आर्थव्यवस्था दर्शवितात.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब            ३) दोन्ही          ४) एकही नाही

४) भ्रष्टाचाराबाबतच्या विधानांचा विचार करा.(MPSC Main-IN 2015)
अ) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही विविध देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण मोजणारी संस्था आहे.
ब) संस्थेने २०१४ यावर्षात १७५ देशांतील भ्रष्टाचाराचा अभ्यास केला,
क) भारताला १०० पैकी ३८ गुण मिळाले.
ड) १७५ देशांमध्ये भारताला ८५ वा क्रमांक मिळाला,
इ) स्वित्झर्लंड सगळ्यात शिखरावर आहे.
फ) सोमालिया सगळ्यात खाली आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?
१)क       २) ड        ३) इ        ४) फ

५) २०१४ या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा. (MPSC Main -IN 2015)
अ) सिंगापूर         i) ०.८९१
ब) इस्त्रायल        ii) ०.९०१
क) जपान          iii) ०.८८८
ड) दक्षिण कोरिया  iv) ०.८९०

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -२, ४ - ३, ५ - १

६) लक्ष्मीबाई टिळक यांच्याबाबत पुढील विधाने वाचा चुकीचे विधान ओळखा.

१) 'स्मृतिचित्रे' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
२) नारायण वामन टिळक हे त्यांच्या पतीचे नाव.
३) लक्ष्मीबाई टिळक व त्यांचे पती नारायण वामन टिळक यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
४) ब्राह्मण कन्या विवाह विचार हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.

१)२ ४,          २)४,        ३) १ व २,        ४) २

७) विधाने वाचा समाजसुधारक स्त्री ओळखा.
१) १९२० मध्ये पुण्यात मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला.
२) स्त्रियांना मतधिकार मिळावेत यासाठी त्यांनी आंदोलन हाती घेतले होते.
३) येरवडा तुरुंगाच्या त्या मानद सचिव होत्या.
४) गांधीजींच्या मते, त्या वैधव्य जीवनाचा आदर्श होत्या.

१) अवंतिका गोखले,        २) पंडिता रमाबाई,
३) अनुसया काळे,           ४) रमाबाई रानडे

८) विधाने वाचा समाजसुधारक ओळखा.

१) 'वेदोक्त धर्म प्रकाश' या ग्रंथाचे ते लेखक होते.
२) पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट, बाल विवाह, समुद्र पर्यटन, सती याबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते.
३) मार्क्सच्या विचारांशी त्यांचे विचार काही प्रमाणात जुळतात.

१) विष्णुशास्त्री चिपळूणकर,       २) विष्णुबुवा ब्रह्मचारी,
३) विष्णुशास्त्री पंडित,             ४) रामकृष्ण विश्वनाथ मंडलिक

९) गोपाळराव जोशी यांच्या बाबत पुढील विधाने वाचा. बरोबर विधान ओळखा.
१) गोपाळराव जोशी हे एक विक्षिप्त,जिद्दी,तहेवाईक,जिभेला हाड नसलेले व कशाचा धरबंध नसणारे एक सामान्य गृहस्थ होते. ते पोस्ट खात्यात नोकरीस होते.
२) गोपाळराव जोशी यांनी आपली पत्नी आनंदीबाई जोशींच्या मृत्युनंतर ४ वर्षानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
३) श्री. ज. जोशी यांच्या 'आनंदी गोपाळ' या चरित्रपर कादंबरीमुळे व त्यावर अंधारलेल्या नाटकामुळे गोपाळराव जोशी हे नाव महाराष्ट्राला माहित झाले.
४) आगरकरांची निंदानालस्ती करण्यात ते आघाडीवर होते.
आगरकरांची जिवंतपणीच त्यांनी प्रेतयात्रा काढली होती.

१)१ व ३,           २) १,२,३,४,        ३) १,३,४,         ४)१ व २

१०) त्र्यंबकजी डेंगळे यांचे दोन पुतणे गोदांजी व महिपा यांनी L000 .... ची पलटण उभी केली होती.
१) भिल्ल,        २) रामोशी,           ३) कोळी,         ४) यापैकी

उत्तर - ६- २, ७- ४, ८-२, ९ -२, १०-१

१) भारतातील उत्पन्न असमानतेची प्रमख कारणे कोणती?(MPSC Main -IN 2015)
अ) मालमत्तेची खाजगी मालकी
ब) वारसाहक्काचा कायदा
क) करचुकवेगिरी ड) समांतर अर्थव्यवस्था

पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब
२) ब,क आणि ड
३) अ,क आणि ड
४) वरील सर्व

२) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?(MPSC Main -IV 2015)
अ) यु.एन.डी.पी. च्या (२०१४ च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार १५२ देशांमध्ये भारताचा १२७ वा क्रमांक लागतो.
ब) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत १८७ पैकी १६५वा आहे.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ         २) केवळ ब          ३) दोन्ही         ४) एकही नाही

३) (UNDP) च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (२००९) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही?(MPSC Main -IV 2015)
(भारताची आयु अपेक्षा ६३.४ व प्रौढ साक्षरताटक्केवारी (२००७) ६६ होती)
अ) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा २००७ सुमारे ८४ होती.
ब) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी २००७ मध्ये सुमारे ९९ होती.

पर्यायी उत्तरे
१) केवळ अ       २) केवळ ब          ३) दोन्ही       ४) एकही नाही

४) आर्थिक विकास आणि पर्यावरण यामधील संबंध दर्शवणाऱ्या प्रमेयाचे नाव काय?(MPSC Main-IN 2015)
१) पर्यावरणीय फिलिप्स वक्र गृहितक
२) पर्यावरणीय मार्शल वक्र गृहितक
३) पर्यावरणीय पिगू वक्र गृहितक
४) पर्यावरणीय कुज़्नेत्स वक्र गृहितक

५) लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? (MPSC Main-IV 2015)
अ) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
ब) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
क) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
ड) शेतात काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी

१)ड,ब,अ        २) अ,ब,क       ३) क,ड,ब          ४) अ,ब,क,ड

उत्तर :- १ - ४, २ -१, ३ -१, ४ - ४, ५ - २.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...