25 April 2020

“तियानवेन 1”: चीनची पहिली मंगळ मोहीम

- चीन देशाने मंगळावर मानवरहित उपग्रह पाठविण्याची योजना तयार केली आहे. पुढील वर्षी प्रत्यक्षात येणाऱ्या चीनच्या मंगळ मोहिमेचे नाव 'तियानवेन 1' असे आहे. 'चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

- चीनचे प्रसिद्ध कवी क्व युआन यांच्या कवितेवरून 'तियानवेन' असे नाव देण्यात आले आहे. 'स्वर्गाला विचारलेले प्रश्न' असा तियानवेन या चीनी शब्दाचा अर्थ आहे. मंगळ मोहिमेची आखणी करताना या कवितेच्या संदर्भाने मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

- भारत, अमेरिका, रशिया आदी देशांनंतर आता चीनची मंगळ मोहीम चालवली जाणार आहे.

- चीनने आपला पहिला उपग्रह 'डाँग फेंग हों-1' अवकाशात पाठवला त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही घोषणा करण्यात आली आहे. हा दिवस चीनकडून 'अंतराळ दिन' म्हणून साजरा केला जातो.

▪️ ग्रह

- मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला ‘तांबडा ग्रह’ असे सुद्धा म्हटले जाते. आयर्न ऑक्साइडमुळे ग्रहाला तांबडा रंग मिळाला आहे.

- हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे.

-  सूर्यमालेतला आतापर्यंतचा सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स (उंची: 26.4 किलोमीटर) तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळ ग्रहावर आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.

- मंगळाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 23 कोटी किमी (1.5 खगोलशास्त्रीय एकक) असून त्याचा परिभ्रमण काळ पृथ्वीवरील सुमारे 687 दिवस इतका आहे. मंगळावरील एक सौर दिवस 24 तास, 39 मिनिटे व 35.244 सेकंद इतका भरतो.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच


1] खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A) बालदिन - १४ नोव्हेंबर

B)  कामगार दिन -१ मे

C)  शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✔️

D)  बालिका दिन -३ जानेवारी

=========================

2] छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A)  तुकाराम - एकनाथ

B) रामदास -तुकाराम✔️

C) तुकाराम - नामदेव

D) रामदास - एकनाथ

=========================

3] शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A)  सर्वनाम

B)  नाम✔️

C) क्रियापद

D) विशेषण

=========================

4] मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A)  फक्त दिवस

B)  डोपरी किंवा पहाटे

C)  फक्त रात्री✔️

D) दिवस किंवा रात्री

=========================

5] खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A)  १८

B) १६

C)  १७✔️

D)  १९

=========================

6] अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A) १४

B)  ८

C)  ७✔️

D) ११

=========================

7] ३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A)  ९२०✔️

B)  २३०

C) ११५

D)  ६९०

=========================

8]    यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A) संत गाडगेबाबा✔️

B) संत तुकाराम

C)  संत चोखामेळा

D)  संत शेख महंमद

=========================
9] बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A) स्वदेशी आंदोलन

B)  चोरीचौरा आंदोलन

C) फोडा आणि तोडा आंदोलन

D)  बंग - भंग आंदोलन✔️

=========================

10] खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A) ५/६

B) ३/५

C) ७/९

D)  ४/७✔️

=========================

🔳धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?

A)  रेशीम उत्पादन

B)  दुध उत्पादन✅

C)  अंडी उत्पादन

D) कापूस उत्पादन

🔳एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने ८ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल .

A) ४ तास ४८ मिनिट✅

B)  ४ तास ३० मिनिट

C) ४ तास ५८ मिनिट

D) यापैकी नाही

🔳१५  मीटर  लांब व ४ मीटर रुंद अशा जमिनीवर २०cm X २०cm  आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसविण्याच्या खर्च ४८ रुपये असून एक फरशी २५० रुपये किमतीची आहे, तर एकूण खर्च सांगा .

A)  ४१७०००

B)  ४४७०००✅

C) ४३७०००

D)  ४२७००

🔳६ गायी व ४ बैल यांची किंमत सारखीच येते. जर १० गायी व १२ बैल मिळून एकूण किंमत ८४००० रु. येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती ?

A) ३५०० रु.

B)  ४००० रु.

C)  ४२०० रु.

D)  ४५०० रु.✅

🔳तीन संख्यांची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर २:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती  ?

A)  १०

B) १४

C) १२✅

D) १६

🔳पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

A)  नाविन्य✅

B)  प्रतीक्षागृह

C)  परीक्षा

D) अध्यात्मिक

🔳ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?

A) क्लाउड कॉम्प्यूटींग

B) क्लाउड कंट्रोल

C)  क्लाउड इंजिनिअरिंग

D)  क्लाउड सिंडीग✅

🔳अजर म्हणजे’ –

A) जो कधी 'जर' म्हणत नाही असा

B) ज्यास कधी म्हतारापण येत नाही असा✅

C) जो नेहमीच जर-तर भाषा वापरतो असा

D)  जो कधी नश पावत नाही असा

🔳‘फासा पडेल तो डाव सजा बोलेल टो न्याय’ -या अर्थच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.

A)  पळणाऱ्यास एक वाट आणि शोधणाऱ्यास बारा वाटा

B)  ऐकावे जनाचे करावे मनाचे✅

C)  पिंडी ते ब्रम्हांडी

D) बडा घर पोकळ वासा

🔳खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.

A) अनल-विस्तव, पावक-अग्नि, वन्ही

B) घर-सदन, भवन, गृह, आलय

C) अमृत-सुधा, पियुष, रस, चिरंजीवी✅

D) चंद्र-इंदू, सुधाकर, हिमांशू, शशी

उन्हाळ्यात करोनाला लगाम!

- सूर्यप्रकाश, उष्णता, आद्र्रता यामुळे करोनाचा विषाणू टिकाव धरू शकत नाही, असे मेरीलँड येथील बायोडिफेन्स अँड काउंटर मेजर यासंस्थने संशोधनाअंती म्हटले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील आरोग्यविषयक अधिकारी बिल ब्रायन दिली आहे.

- या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सूर्यप्रकाशात करोनाचा विषाणू टिकू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते अतिनील किरणही या विषाणूला मारू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता कमी आहे. भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने करोनाला अटकाव होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. पृष्ठभागावरचे व हवेतील विषाणू सूर्यप्रकाशात मारले जातात. तपमान व आद्र्रतेचाही यात संबंध असतो.

- वाढते तपमान व आद्र्रता या दोन्ही गोष्टी करोनाला मारक असतात.
या शोधनिबंधची शहानिशा अजून तटस्थ तज्ञांकडून झाली नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही.
ब्रायन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यात असे सांगितले गेले की, हा विषाणू २१ ते २४ अंश सेल्सियस किंवा त्यावरील तपमान व २० टक्के आद्र्रता असेल तर निम्मा होतो.

- थोडक्यात तो क्रियाशील राहत नाही. या तपमान व आद्र्रतेला तो दारांचे हँडल, पोलाद यावरही टिकत नाही. जेव्हा आद्र्रता ८० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल हा सहा तासांपर्यत खाली येतो म्हणजे तो सहा तासात निम्माच राहतो. हा विषाणू सूर्यप्रकाशात दोन मिनिटातच निष्क्रीय होतो. जेव्हा विषाणू हवेत असतो व तपमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर आद्र्रता २० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल एक तास असतो.

-  सूर्यप्रकाशात हवेत असलेला विषाणू ३० सेकंदात निष्क्रिय होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार कमी होतो असे ब्रायन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ विषाणू नष्ट होतो म्हणजे सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असा घेण्यात येऊ नये.

- भारतात पावसाळ्यात दक्षतेची गरज
शिव नाडर विद्यापाठीच्या गणित विभागाचे सहायक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतात आता टाळेबंदी उठवल्यानंतर करोना विषाणूचा प्रसार रोखल्याचा आभास निर्माण होईल, त्याचा आलेखही स्थिर येईल, पण नंतर काही महिन्यांनी पुन्हा करोना पुन्हा सक्रिय होईल. आता काही आठवडे किंवा महिने करोना कमी झालेला दिसेल पण नंतर तो पुन्हा उसळी घेईल. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून ती काही काळ कमी दिसेल. आलेख स्थिर होइलही पण ती स्थिती फसवी असण्याचा धोका अधिक आहे.

- दुसऱ्या संसर्गाची लाट जुलै व ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते. बेंगळुरू येथील आयआयएससीचे प्राध्यापक राजेश सुदर्शन यांनी या मताशी सहमती दर्शवली.

कोविड-19 नमुने गोळा करण्यासाठी DRDOने विकसित केली फिरती प्रयोगशाळा

- हैद्राबादमधले ESIC रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) रिसर्च सेंटर इमारत येथील संशोधकांनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (MVRDL) विकसित केली आणि त्याला हैदराबादमध्ये तैनात केली आहे.

- 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या फिरत्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत पूर्ण केली गेली आहे.

▪️ठळक वैशिष्ट्ये

- या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत क्षमता अधिक वृद्धिंगत होणार.

- कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची ही पहिलीच फिरती सुविधा आहे.

- ही फिरती प्रयोगशाळा BSL 3 प्रयोगशाळा आणि BSL 2 प्रयोगशाळेचे संयोजन आहे जे उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी WHO आणि ICMR जैव सुरक्षा मानदंडांनुसार प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

-  या प्रणालीमध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल


- दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो.

▪️पार्श्वभूमी

- संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत –

▪️अरबी (18 डिसेंबर)

▪️फ्रेंच (20 मार्च)

▪️चीनी (20 एप्रिल)

▪️इंग्रजी (23 एप्रिल)

▪️स्पॅनिश (23 एप्रिल)

▪️रशियन (6 जून)

- 23 एप्रिलला प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू झाला. तसेच प्रसिद्ध लेखक मिगुएल डी. सर्वेन्टेस यांची पुण्यतिथी आणि अनेक महान लेखकांची जयंती याच दिवशी येते.

-  त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने भाषा दिनाची स्थापना केली.

- बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

चीन सीमेजवळ भारताचा नवा पूल, तोफांसह सैन्य वेगाने करु शकते कूच


- चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे. ४० टनापर्यंत भार पेलण्याची या पूलाची क्षमता आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.

- या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.

- भारताने शेजारी देशातून होणाऱ्या एफडीआय गुंतवणूकीसंदर्भात नियम अधिक कठोर केल्याने चीन भारतावर नाराज आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चिनी उद्योगांना भारतीय कंपन्यांचे सहजपणे अधिग्रहण करता येऊ नये, यासाठी एफडीआय नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

- त्यावर चीनने आपला आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमीच आपला दावा सांगत आला आहे. आता या पूलावरुन भारत-चीन संबंध आणखी बिघडू शकतात. भारताने आपले रणनितीक हित लक्षात घेऊनच या पूलाची उभारणी केली आहे. २०१७ साली डोकलामवरुन भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते.

- त्याच भागामध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
---------------------------------------------------

संयम मोबाईल ॲप’ द्वारे पुण्यातील विलगीकरण केलेल्या रूग्णांवर ठेवले जाणार लक्ष.


- स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे.

- पुणे शहर व्यवस्थापनाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शहरातील घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर निगराणी ठेवणे सुरु केले आहे. त्यासाठी शहरात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी  पाच विभागांमधून समर्पितपणे काम करणाऱ्या लोकांची पथके तयार केली आहेत.

- ही पथके परदेशातून प्रवास करून आलेल्या, तसेच कोविड-19 चे उपचार पूर्ण करून घरी पाठवलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवतील.

- ही पथके या लोकांच्या तब्येतीची अद्ययावत माहिती मिळवतील तसेच त्या रूग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांची देखील चौकशी करतील.घरगुती विलगीकरण केलेल्या, ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, असे लोक आपले अन्न ,बिछाने,भांडी, कपडे आणि स्वच्छतागृहे वेगळी ठेवत आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा करतील.

- संयम मोबाईल ॲप अशा लोकांनी डाऊनलोड केले आहे का,हे देखील पहातील.या मोबाईल ॲपमधे GPS ट्रँकींग बसवले असून घरगुती विलगीकरण केलेले लोक घराबाहेर पडतात का ते कळेल, त्यायोगे शहर आस्थापनेला त्याची माहिती मिळून विभागातील स्थानिक पोलिसांना त्याची वर्दी मिळेल.
---------------------------------------------------

विकास दरात होणार मोठी घट, फिचने दिली चिंता वाढवणारी बातमी

- करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे.

- भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.

- जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता.

-  त्याच काळात जागतिक बँकेने भारताचा विकासदर १.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

- २०१९-२० मध्ये ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते. ते घसरुन २०२०-२१ मध्ये ०.३ टक्के होईल असा फिचचा अंदाज आहे. भारतच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या जगातील सगळयाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांना करोना व्हायरसचा मोठा आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.
---------------------------------------------------

24 April 2020

भूगोल प्रश्नसंच

◾️जैतापूर उर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविला जाणार आहे ?

A) फ्रान्स✅

B) जपान

C) इंग्लंड

D) अमेरिका


◾️1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात _____ जिल्हे होते.

A) 26✅

B) 29

C) 35

D) 23


◾️'मुंबई राज्य' या द्वैभाषीक राज्याची स्थापना _____ रोजी झाली.

A) 1 मे 1960

B)  1 नोव्हे. 1956✅

C) 1 जाने. 1950

D) 15 ऑगष्ट 1947



◾️1 जुलै 1998 रोजी ____ या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

A) उस्मानाबाद

B)  धुळे ✅

C) परभणी

D) भंडारा

◾️महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर कोणती पर्वतरांग आहे ?

A) सातमाळा

B) सातपुडा✅

C)  बालाघाट

D) सह्याद्


◾️खालील पैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?

A) वैराट ✅

B) अस्तंभा

C) हनुमान

D)  तौला


◾️कोंकणाचे हवामान _____ असते.

A) कोरडे

B)  विषम

C) सम✅

D) थंड


◾️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

A)  लोणावळा

B) चिखलदरा ✅

C)  महाबळेश्वर

D)  माथेरान



◾️महाराष्ट्र राज्यास ______ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

A) 720✅

B)  730

C) 740

D)  750


◾️_________ ही डोंगररांग कृष्णा व भिमा नद्यांचा जलविभाजक आहे.

A) शंभू महादेव✅

B)  हरिश्चंद्र बालाघाट

C)  सातपुडा

D) सातमाळा अजंठा


◾️महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली____________आहे.

A) भीमा

B) गोदावरी✅

C) कृष्णा

D) वैन गंगा


◾️नैर्ऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

A) आवर्त

B) आरोह

C)  प्रतिरोध✅

D) मान्सून पुर्व

◾️खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

A) सिंधुदुर्ग

B) भंडारा✅

C) सातारा

D)  सोलापूर


◾️कोयना धरणातील जलाशय__________  या नावाने ओळखला जाते.

A) शिवसागर ✅

B) वसंत सागर

C) शरद सागर

D) नाथ सागर


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र _____ या विभागात आहे.

A)  विदर्भ

B)  कोंकण

C) मराठवाडा✅

D)  नाशिक

◾️महाराष्ट्राच्या पठारावर _____ मृदा आढळते.

A) क्षारयुक्त

B) वाळुकामय

C) काळी✅

D) जांभी



◾️महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ____ जिल्हयात आढळतात.

A)  सोलापूर

B) अहमदनगर✅

C) जालना

D) अमरावती



◾️तीळाच्या लागवडीसाठी _______हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.

A)  सोलापूर

B)  कोल्हापूर

C)  जळगाव✅

D)  औरगाबाद


◾️महाराष्ट्रात _____ येथे खनिज तेल आढळते.

A)  अंकलेश्वर

B)  बॉम्बे हाय✅

C)  दिग्बोई

D) विशाखापट्टण


◾️तारापूर अणुविद्युत केंद्र _______ जिल्हयात आहे.

A)  रायगड

B) ठाणे✅

C) नाशिक

D) पुणे


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या _____ या जिल्हयात आहे.

A) चंद्रपूर

B) परभाणी

C) गडचिरोली✅

D)  लातूर


◾️महाराष्ट्रात प्रामुख्याने _____ उर्जेचा वापर केला जातो.

A)औष्णिक ✅

B) अणु

C) पवन

D)  नैसर्गिक गैस


◾️पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर ______वसलेले आहे.

A) कराड

B) पंढरपूर

C) औदुंबर

D) ✅ नृसिंहवाडी

महागाई भत्तावाढ स्थगित

केंद्राचा निर्णय; वाचलेल्या १.२० लाख कोटींचा वैद्यकीय सुविधांसाठी वापर
करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे केंद्र सरकारने गुरुवारी महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२० ते जून २०२१ या दीड वर्षांच्या काळात वाढीव भत्ता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, विद्यमान १७ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काढलेल्या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ अशी तीन हप्त्यांतील महागाई भत्तावाढ थांबवण्यात आली आहे. २०२०-२१ तसेच, २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी महागाई भत्त्याची वाढ गोठवल्यामुळे केंद्राचे ३७,३५० कोटी रुपये वाचतील.
आता केंद्राने महागाई भत्त्यातील वाढ गोठवल्यामुळे महाराष्ट्रानेही महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राज्यांकडूनही त्याचा कित्ता गिरवला जाईल. त्यामुळे राज्यांचे ८२,५६६ कोटी रुपये वाचतील. म्हणजेच एकूण १.२० लाख कोटी रुपयांची बचत होईल. या पैशांचा वापर करोनासंदर्भातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.
दीड वर्षे १७ टक्केच भत्ता लागू
* गेल्या महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता २१ टक्के झाला होता. मात्र, ही वाढ लागू होणार नसून आधीचा १७ टक्के महागाई भत्ता दिला जाईल.
* गोठवलेल्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकीही दिली जाणार नाही. जुलै २०२१ नंतर महागाई भत्तावरील स्थगिती रद्द केली गेल्यानंतर महागाई भत्त्याचे वाढीव दर जाहीर केले जातील, असे आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.
* या निर्णयामुळे ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी व ६५.२६ लाख निवृत्तिधारकांना वाढीव महागाई भत्त्याला मुकावे लागणार आहे.
राज्य सरकारकडून दोन दिवसांत आदेश
मुंबई : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यानचा १८ महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता गोठविण्यात येणार असून, त्याबाबतचा आदेश दोन दिवसांत जारी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे २२ लाख अधिकारी- कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. करोनामुळे राज्य सरकारला महिन्याला सुमारे १६ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावतानाच केंद्राचा कित्ता गिरवत महागाई भत्तावाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयाचा सुमारे तीन लाख अधिकारी, १९ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सात लाख निवृत्तिवेतनधारकांना फटका बसणार आहे.
मुंबईत ४७८ नवे रुग्ण
मुंबईत आणखी ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ४२३२ वर गेला आहे. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
महसूल कर्मचाऱ्यांचे दरमहा एक दिवसाचे वेतन कापणार
करोनामुळे निर्माण झालेल्या आथिर्क कोंडीवर मात करताना दीड वर्षांचा महागाई भत्ता गोठविणाऱ्या के ंद्र सरकारने आता केंद्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभर एक दिवसाचा पगार पंतप्रधान निधीसाठी कापण्याचा निर्णय घेतला आहे.
वित्त मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महसूल खात्याने कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२१पर्यंतच्या दर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका प्राप्तिकर, वस्तू आणि सेवाकर, सीमा शुल्क मधील लाखो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाने जारी के ले असून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी वेतन कपात करण्यास कोणाचा आक्षेप असेल तर त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तो नोंदवावा, असेही या आदेशात म्हटले आहे.