🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
23 June 2020
अलंकारिक शब्द
प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची खरी नावे
● *स्वामी विवेकानंद* : नरेंद्र दत्त
● *स्वामी दयानंद सरस्वती* : मुळशंकर तिवारी
● *म. गांधी* : मोहनदास करमचंद गांधी
● *मानवेंद्रनाथ रॉय* : नरेंद्र भट्टाचार्य
● *स्वामी श्रद्धानंद* : लाल मुन्शीराम
● *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* : भीमराव रामजी सकपाळ
● *राजर्षी शाहू महाराज* : यश वंत
● *लोकमान्य बाळगंगाधर टिळक* : केशव
● *अण्णा हजारे* : किसन बाबुराव हजारे
अमेरिकेनंतर ब्राझिल ठरतोय करोनाचा नवा हॉस्पॉट.
🔰जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे.
🔰अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे.
🔰ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही.
🔰एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
🔰अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे.
🔰तर मागील 24 तासांत ब्राझिलमध्ये 1022 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
🔰तसेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 50 हजार 629 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
🔰गेल्या 24 तासांत ब्राझिलमध्ये 34 हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.तसेच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार झाली आहे.
🔰ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख 22 हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
MPSC पूर्व परीक्षांबाबत थोडक्यात मार्गदर्शन
✅ विद्यार्थी मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व यांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केले आहे.【राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर तर ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त पूर्व गट - ब परीक्षा】..
✅ तर आपण उर्वरित दिवसांचे कसे नियोजन करावे याबद्दल तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे.
✅ आपण सध्या बरेच जण घरी अभ्यास करत आहात तर आपण जवळच्या शाळेत जाऊन अभ्यास करणाऱ्या मित्रांनी एकत्र येऊन तिथे अभ्यास करू शकता.. किंवा गावातच एखादी रिकामी खोली मध्ये अभ्यास करू शकता.
✅ सध्या वेळापत्रक आल्यामुळे किमान रोज १० तास अभ्यास झाला पाहिजे. तर आपण दर ५० मिनिटं अभ्यास १० मिन ब्रेक असे गट पाडूयात. पण या १० मिन मध्ये दुसरा कोणताही घ्यायचा नाही. फ्रेश होऊन बसण्यासाठी तसेच थोडा शांत बसून ध्यान करून ५० मिनिटं आपण काय वाचले यासाठी हा १० मिन चा ब्रेक आहे. मग परत ५० मिन अभ्यास १० मिन ध्यान करून वाचलेलं आठवणे असे करून अभ्यास करू शकता.. ही खूपच उपयुक्त पद्धती आहे.
✅ तर सर्वांनी शक्य होईल तेव्हढे लवकर सकाळी अभ्यासाला बसावे.
🏆 सध्या राज्यसेवा पूर्व २०२० चे कसे असावे अभ्यासाचे नियोजन या बद्दल सांगतो. नंतर 🏆संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब - २०२० बद्दल सांगेल...
◾️ 8 ते 8:50 = 50 मिन
◾️ 9 ते 9:50 = 50 मिन
◾️ 10 ते 10:50 = 50 मिन
◾️ 11 ते 11:50 = 50 मिन
☑️ या 200 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता. यानंतर 40 मिन मध्ये जेवण तसेच इतर सर्वकाही करून लगेच 1 ला बसावे अभ्यासाला.
◾️ 1 ते 1:50 = 50 मिन
या 50 मिन मध्ये रोज चालू घडामोडी विषय वाचवा.
◾️ 2 ते 2:50 = 50 मिन
◾️ 3 ते 3:25 = 25 मिन
☑️ या 75 मिन मध्ये रोज Comprehension म्हणजेच मराठी & इंग्रजी उतारे यांचा सराव करावा.
◾️ 3:30 ते 4:20 = 50 मिन
◾️ 4:30 ते 5:20 = 50 मिन
◾️ 5:25 ते 6:00 = 25 मिन
☑️ या 125 मिन मध्ये रोज गणित आणि बुद्धिमत्ता याचा सराव करावा.
✅ असे एकूण 200 मिन तरी C-SAT चा रोज स्टडी केला पाहिजे
◾️ 6:00 ते 6:30 = नाष्टा किंवा बाकी काम असेल काही तर करावे.
◾️ 6:30 ते 7:20 = 50 मिन
◾️ 7:30 ते 8:20 = 50 मिन
◾️ 8:30 ते 9:20 = 50 मिन
☑️ या 150 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता.
◾️ 9:20 ते 10 जेवण + इतर काम
◾️ 10 ते 10:50 = 50 मिन
☑️ या 50 मिन मध्ये 1 रोज एकच विषय या time ला वाचू शकता. Like इंडियन पोलिटी... कारण हा विषय पूर्व बरोबरच मुख्य ला देखील महत्त्वाचा Scoring विषय आहे.
✅✅ असे एकूण कमीतकमी 650 मिन स्टडी 【म्हणजेच जवळपास 11 तास】असे आपण【200 मिन. मुख्य विषय - १ + 50 मिन. चालू घडामोडी + 200 मिन. CSAT + 150 मिन. मुख्य विषय -२ + 50 मिन. रेग्युलर १ विषय.】करू शकता. ते ही जास्त टेन्शन न घेता. ✅✅
कागदी चलन.
🅾कागदी चलन हे नियंत्रित चलनव्यवस्थेखाली काढले जाते. मध्यवर्ती बॅंक कागदी नोटा प्रचारात आणते व कागदी चलनाला आधार म्हणून चलनाला काही टक्के भाग सुवर्णाच्या स्वरूपात आपल्या खजिन्यात ठेवते. प्रातिनिधिक कागदी चलन असले, तर जेवढ्या कागदी नोटा असतील तेवढ्याच किमतीचे सोने आधार म्हणून ठेवावे लागते. कागदी चलनाचे रूपांतर सुवर्णात करता येते.
🅾प्रमाणित निधिपद्धती असेल, तर एकूण कागदी चलनाच्या काही विशिष्ट प्रमाणात सुवर्णनिधी ठेवावा लागतो. वेळोवेळी कायद्याने हे प्रमाण ठराविले जाते. मर्यादित विश्वासनिधि-पद्धती अस्तित्वात असेल, तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चलनास सोन्याचा आधार द्यावा लागत नाही. मात्र त्या मर्यादेपेक्षा अधिक कागदी चलन काढावयाचे असेल, तर तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बॅंकेत वा सरकारी तिजोरीत ठेवावे लागते.
🅾आज बहुतेक देशांनी अपरिवर्तनीय कागदी चलनपद्धतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीत कागदी चलनाचे धातूत रूपांतर करून मिळत नाही. लोकांचा सरकारवर जो विश्वास असतो, त्या आधारावर ही पद्धती टिकून राहते. चलननिर्मितीवर योग्य ते नियंत्रण ठेवले, तर किमती स्थिर राहतात व चलनव्यवहार सुरळीतपणे पार पडू शकतात .
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
मुद्रा (चलन).
🅾चलन पैसे किंवा पैशाचे स्वरूप आहे जे रोजच्या जीवनात खरेदी आणि विक्री करते. यात नाणी व कागदी नोट्स दोन्ही आहेत. एखाद्या देशात सामान्यतः वापरलेले चलन त्या देशाच्या सरकारी यंत्रणेद्वारे तयार केले जाते.
🧩उदाहरणार्थ,:- भारतीय रुपया आणि पैसा विनिमय.
🅾आम्ही करतो त्या आधारे आपण चलनाबद्दल बोलू शकतो. सामान्यत: आम्ही चलनाच्या कामांमध्ये विनिमय करण्याचे माध्यम, मूल्याचे मोजमाप आणि पैसे जमा करणे आणि डिफर्ड पेमेंट्सचे मूल्य इ. समाविष्ट करतो. विविध अर्थशास्त्रज्ञांनी चलन काय करते त्या आधारावर परिभाषित केले आहे.
🅾चलनमध्ये सामान्य स्वीकृतीची मालमत्ता असणे फार महत्वाचे आहे, जर एखाद्या वस्तूमध्ये सामान्य स्वीकृतीचे वैशिष्ट्य नसते तर त्या वस्तूला चलन म्हटले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे चलन म्हणजे कोणतीही वस्तू जी नियमन, मूल्य मोजणे, संपत्ती साठवणे आणि सर्वसाधारणपणे कर्जे भरण्याचे माध्यम म्हणून स्वीकारली जाऊ शकते.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
रुपयाच्या नोटेचा खर्च ७८ पैसे
🅾एक रुपये मूल्याच्या नोटेची छपाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करणे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशनला यश आले आहे. या नोटेचा छपाईखर्च प्रति नोट १.१४ रुपयांवरून ७८.५ पैशांवर आला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
🅾सध्या १० व २० रुपये मूल्याच्या नोटांची छपाई प्रति नोट अनुक्रमे ७० व ९५ पैशांत रिझर्व्ह बँकेच्या मालकीची असलेली भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रा. लि. ही कंपनी करते. याच नोटा सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन अनुक्रमे १.२२ व १.२१६ रुपयांना छापते. रुपयाची नोट छापणे खर्चिक होत असल्यामुळे १९९४पासून ही छपाई थांबवण्यात आली होती. त्यावेळी एक रुपयाची नोट छापण्यासाठी १.४८ रुपये खरच प्रतिनोट येत होता. परंतु आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे छपाई खर्च खाली आला आहे, असे आरबीआयने सांगितले आहे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
22 June 2020
पुणे जिल्हा
जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे
क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.
सीमा – उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.
पुणे जिल्हा विशेष
‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली.
आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.
राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.
देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी
(1) श्री विघ्नेश्वर, ओझर
(2) श्री गणपती, राजणगांव
(3) गिरजात्मक, लेण्याद्री
(4) चिंतामणी, थेऊर
(5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.
पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे
पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.
जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.
आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.
देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.
चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.
लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.
जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.
आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.
भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.
उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.
दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.
वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.
सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे.
सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.
भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.
वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.
वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.
पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.
पुणे जिल्हयाची वैशिष्ट्ये
पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.
1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.
ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.
पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे
राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे
राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे
भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे)
महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे
सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला
फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे
नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)
मराठी शुद्ध लेखनाचे नियम
अनुस्वार
▫️ नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.
उदा.
डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.
▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.
उदा.
लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.
▫️ आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.
उदा.
शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.
▫️ पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)
हस्व - दीर्घ अक्षरे
▫️ इ - कारान्त आणि 'उ’ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.
उदा -
मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.
परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.
उदा -
विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.
अपवाद - अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.
▫️ सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त किंवा 'उ' कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ 'ई' कारान्त किंवा ऊ' कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.
उदा -
कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ.
एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत -
उदा -
मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.
▫️ शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.
उदा-
दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.
अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.
उदा -
परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.
मराठी व्याकरण
▫️ स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल अक्षरावर जो शीर्षबिंदू दिला जातो त्यास अनुस्वार असे म्हणतात.
▫️ संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीमध्ये आलेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात.
▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रुपावर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार देतात.
▫️ अनुच्चारित अनुस्वार लिहू नये हा विचार प्रथम रा. भिं. गुंजीकर यांनी मांडला.
▫️ शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर उपांत्य इ - कार व उ - कार -हस्व असतो.
▫️ सरकारमान्य असलेले लेखनविषयक नियम मराठी साहित्य महामंडळाने तयार केले.
▫️ शब्दांची संक्षिप्तरूपे पूर्णविराम चिन्हे देऊन पूर्ण करतात.
▫️ साम्यभेद असणा-या बोली वापरणारे लोक परस्परामध्ये व्यवहार करताना ज्या भाषिक रूपाचा आश्रय घेतात त्याला प्रमाणभाषा / प्रमाणबोली असे म्हणतात.
▫️ शब्दांच्या पुढे जे अक्षर किंवा जी अक्षरे लागतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात.
▫️ प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटित असे म्हणतात.
▫️ धातूस प्रत्यय लागून जे साधित शब्द बनतात त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
▫️ धातूशिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना शब्दसाधिते असे म्हणतात. उदा. कविता, नवीनता या शब्दामध्ये धातू व्यतिरिक्त शब्दांना [ ता ] हा प्रत्यय लागतो.
▫️टाकाऊ, टिकाऊ, लढाऊ, चढाऊ या शब्दामध्ये धातूला [ ऊ ] हा प्रत्यय लागल्यामुळे त्यांना धातूसाधिते असे म्हणतात.
▫️ समास झाल्यावरच्या जोडशब्दांना समासघटित शब्द असे म्हणतात.
▫️ शब्दांच्या पुनरुक्तीतून जे जोडशब्द तयार होतात त्यांना अभ्यस्त असे म्हणतात.
▫️ मराठीचे इंग्रजी राजवटीमधील पहिले व्याकरणाचे पुस्तक श्रीरामपूर [ कलकत्ता ] येथे तयार झाले.
▫️ महाराष्ट्र प्रयोगचंद्रिका हे मराठीचे संस्कृतमध्ये रचलेले व्याकरणाचे पुस्तक आहे.
उपसर्ग जोडून येणारे शब्द
मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.
(१) अ + चूक = अचूक
(२) अ + मर = अमर
(३) अ +पार =अपार
(४) अ + नाथ = अनाथ
(५) अ + पात्र = अपात्र.
(६) अ + चल = अचल
(७) अ + शांत = अशांत
(८) अ +ज्ञान = अज्ञान
(९) अ + माप = अमाप
(१०) अ +शुभ = अशुभ
(११) अ + सत्य = असत्य
(१२) अ + बोल = अबोल
(१३) अ + खंड =अखंड
(१४) अं + धार = अंधार
(१५) अ + समान = असमान
(१६) अ + स्थिर = अस्थिर
(१७) अ + न्याय = अन्याय
(१८) अ + पचन = अपचन
(१९) अ + जय = अजय
(२०) अ + प्रगत = अप्रगत
(२१) अ + मोल = अमोल
(२२) अ + योग्य = अयोग्य
(२३) कु + रूप = कुरूप
(२४) सु + काळ = काळ
(२५) सु + गंध = सुगंध
(२६) सु + पुत्र = सुपुत्र
(२७) सु + मार्ग = सुमार्ग
(२८) सु + यश = सुयश
(२९) सु + योग्य = सुयोग्य
(३०) वि + नाश = विनाश
(३१) आ + मरण =
आमरण
(३२) ना + खूष = खूष
(३३) ना + पसंत = नापसंत
(३४) ना + पास = नापास
(३५) ना + बाद = नाबाद
(३६) बिन + चूक =
बिनचूक
(३७) बिन + पगारी =
बिनपगारी
(३८) गैर + हजर =
गैरहजर
(३९) अप + मान = अपमान
(४०) अप + यश अपयश
जागतिक बँकेचा “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट: जून 2020” अहवाल
🔘 जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी “‘ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाच्या अहवालाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे.
▪️अहवालानुसार -
🔘 2020-21 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
🔘 महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 5.2 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे. महामारीमुळे उद्भवलेली मंदी ही 1870 सालानंतर पहिल्यांदाच पाहिली गेली आहे.
🔘 2020 साली महामारीमुळे देशांतर्गत मागणी व पुरवठा, व्यापार आणि वित्तपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक क्रियाकलापांमध्ये सात टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
🔘 2020-21 या आर्थिक वर्षात उदयोन्मुख बाजारपेठ आणि विकसनशील अर्थव्यवस्था 2.5 टक्क्यांनी आकुंचन पावण्याचा अंदाज आहे, जे की गेल्या 60 वर्षांत प्रथमच पाहिले गेले आहे.
🔘 दरडोई उत्पन्नात 3.6 टक्क्यांनी घट होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे यावर्षी कोट्यवधी लोक अत्यंत दारिद्र्यात ढकलले जाणार आहेत.
🔘 सध्याच्या अंदाजानुसार महामारीच्या मंदीमुळे जागतिक दरडोई GDP मध्ये 6.2 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.
🔘 जागतिक व्यापार, पर्यटन, वस्तूंच्या निर्यातीवर आणि बाह्य वित्तपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या देशांना महामारीचा सर्वात मोठा फटका बसत आहे.
🔘 वर्ष 1870 नंतर 1876, 1885, 1893, 1908, 1914, 1917-21, 1930-32, 1938, 1945-46, 1975, 1982, 1991, 2009 आणि 2020 या वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेने 14 वेळा जागतिक मंदी अनुभवली आहे.