20 September 2021

स्पर्धा परीक्षा तयारी-चालू घडामोडी प्रश्न


१) ‘हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट २०२१’ याच्यानुसार, कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते?
उत्तर :- भारत

२) कोणत्या खेळाडूने ‘२०२० टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये, पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले?
उत्तर :-  हरविंदर सिंग

३) कोणत्या राज्यात ‘बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र’ आहे?
उत्तर :-  हिमाचल प्रदेश

४) कोणत्या संस्थेला 'ड्युन अँड ब्रॅडस्ट्रीट - कॉर्पोरेट अवॉर्ड २०२१' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला?
उत्तर :- SJVN लिमिटेड

५) कोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १२ सदस्यांच्या समितीची स्थापना केली, जी पत्रकार कल्याण योजनेच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणार आहे?
उत्तर :- अशोक कुमार टंडन

६) भारतीय हवाईदलाचे प्रमुख _ येथे ३० ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर २१ या कालावधीत झालेल्या ‘पॅसिफिक एअर चीफ्स सिम्पोजियम २०२१ (PACS-२१) या कार्यक्रमात उपस्थित होते.
उत्तर :- जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम

७) कोणत्या रेल्वे स्थानकांना ५-स्टार 'ईट राइट स्टेशन' प्रमाणपत्र देण्यात आले आहे?
उत्तर :- चंदीगड रेल्वे स्थानक

८) कोणत्या ठिकाणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी ६ वी ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) शिखर परिषद’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर :-  व्लादिवोस्तोक ( रशिया )

९) कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले?
उत्तर :- नासा ( अमेरिका )

१०) कोणत्या संघटनेने जगभरातून लीड-मिश्रित पेट्रोलचा वापर पूर्णपणे बंद झाला असल्याची घोषणा केली?
उत्तर :- UNEP ( संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम )

अनुशीलन समिती

🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था

🔸युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात.

🔸गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

🔸वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले.

🔸अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली.

🔸पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे,
तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते.

🔸 ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

🔸पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई.

संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न 𝗽𝗮𝗿𝘁-1

Q :  खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज ✅✅
(क) बेल्स पास्कल
(ड) जोसेफ जॅकवर्ड

Q :  संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान  मोलाचे आहे?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज
(क) सॅबल्स पास्कल
(ड) वाँन न्यूमन✔️✔️

Q :  सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? 
(अ) इ.स 1946 ✔️✔️
(ब) इ.स 1950
(क) इ.स1960
(ड) इ.स 1965

Q :  संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात?
(अ) सॉफ्टवेयर
(ब) हार्डवेयर ✔️✔️
(क) फर्मवेयर
(ड) वरील सर्व

Q :  संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात
(अ) सॉफ्टवेअर✔️✔️
(ब) हार्डवेअर
(क) नेटवर्क
(ड) फर्मवेअर

Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?
(अ) प्रिंटर
(ब) की बोर्ड
(क) सीपीयू✔️✔️
(ड) हार्ड डिस्क

Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते?
(अ) RAM
(ब) CPU✔️✔️
(क) ALU
(ड) ROM

Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे?
(अ) हार्ड डिस्क
(ब) CPU✔️✔️
(क) NIC
(ड) मदर बोर्ड

Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात?
(अ) हार्ड डिस्क✔️✔️
(ब) चिप
(क) व्हॅक्युम  ट्यूब
(ड) यापैकी  नाही

Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?
(अ) हरमन गोलेरीथ
(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️
(क) बेल्स पास्कल
(ड) विलियम बुरोस

मराठी व्याकरण

📚 चला ग्रंथकार ओळखू या📚

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

आर्थिक आणीबाणी

संविधानाच्या कलम ३६० अनुसार राष्ट्रपतींची अशी खात्री झाली की, भारताचे किंवा भारताच्या एखाद्या भागाचे आर्थिक स्थैर्य धोक्यात आहे, तर आर्थिक आणीबाणी राष्ट्रपती जाहिर करु शकतात

१) आर्थिक आणीबाणीची घोषणा केल्यापासून २ महिन्याच्या आत संसदेने मान्यता देणे आवश्यक आहे असे न झाल्यस घोषणा देणे रद्द होते

२) आर्थिक आणीबाणीची घोषणा केलेल्या कालावधीत जर लोकसभा विसर्जित असेल तर राज्यसभेची मान्यता घेणे आवश्यक असते.

■ आर्थिक आणीबाणीचे परिणाम:–

१. केंद्र व राज्य सरकारांना आर्थिक बाबतीत राष्ट्रपती योग्य ते आदेश देतात.

२. राज्य सरकारांना आपली आर्थिक विधेयके राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवावी लागतात

३. कोणत्याही अधिका-याचे किंवा पदाधिका-यांचे वेतन वा भत्ते कमी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस आहे. आर्थिक वर्षातील महसूल – उत्पन्नाच्या वाटणीमध्ये राष्ट्रपती सुधारणा करु शकतात (आत्तापर्यत भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली नाही.)
यात भारताचा सर्व प्रकारच्या महसूलातून मिळालेले उत्पन्न कर्ज व सार्वजनिक उद्योगांचा नफा सरकार ने दिलेल्या कर्जाची आलेली परत फेड इतर उत्पन्नाचा समावेश होतो.
सरकारचा पुर्ण खर्च एकत्रित व संचित निधीतुन केला जातो.
भारताच्या एकत्रित व संचित निधी खर्चासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता असते.

■ संसदेच्या संमतीची आवश्यकता नसलेले खर्च:–

१. राष्ट्रपतीचे वेतन, भत्ते व राष्ट्रपतींच्या कार्यालयावरील खर्च

२. सर्वोच्च न्यायालयच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते.

३. CAG चे वेतन, भत्ते व निवृत्ती वेतन.

४. न्यायालयाच्या निर्णया प्रमाणे द्याव्या लागणा-या रकमा

५. घटना/संसद यांनी मान्य केलेल्या खर्चाच्या बाबी
वरील सर्व बाबी वरील खर्चावर संसदेत चर्चा होते पण मतदान होत नाही.

भारताचा आकस्मित खर्च निधी – कलम २६७

■ रचना – १९५०
या प्रकारच्या खर्चास प्रथम राष्ट्रपती परवानगी देतात, नंतर संसद मंजूरी देते.
केंद्र सरकारचा कर उभारणीचा अधिकार घटनेच्या कलम २९२ अन्वये आहे तर घटक राज्यांना कर आकारणीचा अधिकार कलम २९३ अन्वये आहे
जेवढी रक्कम या निधीतुन काढली जाते त्यांची पुन्हा पुर्ती केली जाते. सध्या हा निधी ५०० कोटी इतका आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

44वी घटनादुरुस्ती 1978

1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.

4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.

5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.

6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.

7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.

8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.

9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.

10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.

11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.

12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.

13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना :

ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100 टक्के केंद्र-पुरस्कत म्हणून सुरू करण्यात आली.
सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे.
निधी पुरवठा; केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेल वरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते.त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जाते.
या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ/ आदिवासी/ वाळवंटी/ डाव्या अतिरेकाने प्रभावी प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना
सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे, हे आहे. या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे.
आतापर्यंत 3,41,257 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना (SJSRY):

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण जयंतीच्या वर्षी 1 डिसेंबर 1997 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. तीन योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.

नेहरू रोजगार योजना

अर्बन बेसिक सर्विस फॉर पुअर

प्राईम मिनिस्टर इंटिग्रटेड अर्बन प्रॉव्हर्टी    

ही योजना शहरी भागातील बेरोजगार तसेच अर्ध बेरोजगार यांना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करते. तसेच, योजनेत माजुरी रोजगाराचीही तरतूद करण्यात आली आहे.

लाभर्थ्यांची निवड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत घरोघरी जाऊन केली जाते.

योजनेचा वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारमध्ये 75:25 या प्रमाणात केला जातो.

या योजनेत पुढील दोन उप-योजना राबविल्या जातात

अर्बन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

इंदिरा आवास योजना (IAY):

1985-86 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. एप्रिल 1989 पासून तिची अंमलबजावणी जवाहरलाल रोजगार योजनेचा भाग म्हणून करण्यास सुरुवात झाली. 1 जानेवारी 1966 पासून

भारत सरकारने तिला स्वातंत्र्य दर्जा दिला आहे.

या योजेनेअतर्गत अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व मुक्त वेठबिगर या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबीयांना घरे बांधण्यासाठी/सुधारण्यासाठी वित्तीय सहाय्य दिले जाते.

ही केंद्र पुरस्कार योजना असून वित्तीय संसाधनांची विभागणी केंद्र व राज्यांमध्ये 75:25 प्रमाणात केली जाते.पूर्वात्तर राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 असे आहे.

टिकाऊ पदार्थाची घरे बांधण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल 2010 पासून प्रत्येक घराची किमत प्रत्येकी रु. 45000 इतकी निश्चित केली आहे. राज्य शासनाने ही किंमत प्रत्येकी रु. 70,000 एवढी सुधारित केली आ

18 September 2021

महाराष्ट्र - जलाशय व धरणे.


🔶कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)


🔶जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद


🔶बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड


🔶 भडारदरा - (प्रवरा) अहमदनगर


🔶गगापूर - (गोदावरी) नाशिक


🔶 राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर


🔶मोडकसागर - (वैतरणा) ठाणे


🔶 उजनी - (भीमा) सोलापूर


🔶तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर


🔶यशवंत धरण - (बोर) वर्धा


🔶 खडकवासला - (मुठा) पुणे


🔶 यलदरी - (पूर्णा) परभणी

Online Test Sreies

Online Test

15 September 2021

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर राजस्थान राज्यात आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन झाले?

उत्तर : राष्ट्रीय महामार्ग 925A


● कोणत्या संस्थेने १ जानेवारी २०२२ पासून 'ट्रेड-प्लस-वन' (T+1) सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर केला?

उत्तर : भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ (SEBI)


● कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बांधण्यात आले?

उत्तर : चंदीगड


● कोणत्या अंतराळयानाने २०२१ साली चंद्राभोवती ९,००० प्रदक्षिणा पूर्ण केल्या?

उत्तर : चंद्रयान-२


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ८ सप्टेंबर


● कोणत्या शहरासाठी पहिले “पोलन कॅलेंडर” विकसित करण्यात आले आहे?

उत्तर : चंदीगड


● कोणत्या संस्थेने अशी माहिती जाहीर केली की २०२१ या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये ४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे?

उत्तर :  राष्ट्रीय महिला आयोग


● तामिळनाडू सरकारने सुधारक नेता समजल्या जाणाऱ्या _ यांची जयंती “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर :  ई व्ही रामासामी पेरियार

महत्त्वाचे प्रश्न उत्तरे



1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.

1. कांस्य

2. रौप्य

3. सुवर्ण

4. यापैकी नाही


उत्तर- 2


---------------------------------------------------


2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात  कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.

1. सुहास यथीराज

2. कृष्णा नागर

3. प्रमोद भगत

4. मनीष नरवाल


उत्तर- 2

 ---------------------------------------------------

 

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.

1. भारत आणि चीन

2. भारत आणि सिंगापूर

3. भारत आणि अमेरिका

4. भारत आणि ऑस्ट्रेलिया


उत्तर- 2


 --------------------------------------------------


4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.

1. मध्य प्रदेश

2. महाराष्ट्र

3. केरळ

4. दिल्ली


उत्तर- 3


---------------------------------------------------


5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.

1. सिक्कीम

2. आसाम

3. हिमाचल प्रदेश

4.  यापैकी नाही


उत्तर-2


  ---------------------------------------------------


6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.

1. कृष्णा नागर

2. सुहास यथिराज

3. मनीष नरवाल

4. अवनी लेखारा


उत्तर- 4


--------------------------------------------------


7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.

1. मेघालय

2. अरुणाचल प्रदेश

3. सिक्कीम

4.आसाम


उत्तर – 4


---------------------------------------------------


8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?


1. 3 सप्टेंबर

2. 4 सप्टेंबर

3. 5 सप्टेंबर

4. 6 सप्टेंबर


उत्तर- 3

---------------------------------------------------


9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.

1. बँक ऑफ इंडिया

2. बँक ऑफ महाराष्ट्र

3. Axis बँक

4. आयसीआयसीआय बँक


उत्तर- 1


---------------------------------------------------


10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.

1. चीन 

2. नेपाळ

3. भारत

4. श्रीलंका


उत्तर- 3 


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ०८ सप्टेंबर


● कोणत्या व्यक्तीची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) याचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : अरुण कुमार सिंग


● 'शिक्षक पर्व-२०२१' याची संकल्पना कोणती आहे?

उत्तर :  गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांकडून शिक्षण घेणे


● कोणत्या मंत्रालयाने “प्राण / PRANA” नामक एका संकेतस्थळ आधारित डॅशबोर्डचे अनावरण केले?

उत्तर : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय


● कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या सर्व सरकारी शाळांमध्ये "बिझनेस ब्लास्टर्स" कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर : दिल्ली


● कोणत्या व्यक्तीची जी२० समूहासाठी भारताचे शेर्पा या पदावर नेमणूक झाली?

उत्तर : रवी शंकर प्रसाद


● नॅशनल ब्युरो ऑफ अॅनिमल जेनेटिक रिसोर्सेस (NBAGR) या संस्थेने भारतात आढळणाऱ्या देशी म्हशींच्या जातींपैकी कितवी एकमेव अशी जात म्हणून “मांडा म्हैस” याला मान्यता दिली आहे.

उत्तर : १९ वी 


● कोणत्या व्यक्तीची अफगाणिस्तान देशाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली?

उत्तर : मुल्ला हसन अखुंड

11 September 2021

HDFC बँक आणि NSIC यांच्यात सामंजस्य करार.



🔰सपूर्ण भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी HDFC बँक आणि राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.


🔰कराराच्या अंतर्गत, HDFC बँक विशेषतः MSME उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी बँक विविध योजना आखणार आहे. तसेच प्रकल्पांसाठी स्थानिक पातळीवर आणि भारतातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये समर्थन वाढविणार. या भागीदारीने आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने भारताच्या वाढत्या MSME क्षेत्राला चालना देण्यास मदत होईल.


🔰राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) मर्यादित ही एक मिनीरत्न सरकारी संस्था आहे. त्याची स्थापना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSMEs) 1955 साली केली.


🔰HDFC बँक लिमिटेड ही मुंबई येथे मुख्यालय असलेली एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय कंपनी आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत ती भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ठरत आहे.

भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा राजस्थानमध्ये.



🔰राजस्थान राज्यात राष्ट्रीय महामार्गावर प्रथमच आपत्कालीन लँडिंग सुविधा स्थापन करण्यात आली आहे. 09 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन झाले.


🔴ठळक बाबी...


🔰आणीबाणीच्या स्थितीत भारतीय हवाई दलाची विमाने उतरविण्यासाठी आणि उड्डाण भरण्यासाठी उभारण्यात आलेले हे आपत्कालीन लँडिंग स्टेशन राजस्थानच्या बाडमेर येथे ‘राष्ट्रीय महामार्ग-925A’ यावर बांधण्यात आले आहे.महामार्गावर विमानांसाठी योग्य अशी 3.5 किलोमीटरची धावपट्टी तयार करण्यात आली आहे.


🔰तयाची निर्मिती भारतमाला योजनेच्या अंतर्गत करण्यात आली आहे.

हा बाडमेर (राजस्थान) येथील दोन नव्याने बांधलेल्या सट्टा-गंधव आणि गगारिया-बखसर विभागांच्या बांधकामाचा भाग आहे.

ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर स्वाक्षऱ्या..



🔰आसामच्या प्रादेशिक अखंडतेची सुनिश्चिती करून या भागात अनेक दशके रेंगाळत राहिलेली समस्या संपविण्याच्या हेतूने ऐतिहासिक “कार्बी आंगलाँग” करारावर 4 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.


🔰या ऐतिहासिक करारामुळे 1,000 हून अधिक सशस्त्र कार्यकर्ते हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेले. कार्बी भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने विशिष्ट प्रकल्प हाती घेण्यासाठी केंद्रीय सरकार तसेच आसाम राज्य सरकार येत्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये वापरण्यासाठी 1,000 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देणार आहे.


🔰कार्बी करार हा “बंडखोरी मुक्त समृध्द ईशान्य प्रदेश” निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.


🔴कराराची ठळक वैशिष्ट्ये..


🔰हा सामंजस्य करार कार्बी आंगलाँग स्वायत्त मंडळाला अधिक स्वायत्तता मिळेल तसेच कार्बी जनतेची विशिष्ट ओळख, भाषा, संस्कृती, इत्यादींचे संरक्षण होईल याची हमी देईल आणि आसामच्या प्रादेशिक तसेच प्रशासकीय अखंडतेला धक्का न लावता मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रदेशाचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.


🔰हिंसेचा मार्ग सोडून या भागात कायद्याने प्रस्थापित केलेल्या शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेत सामील होण्यास सशस्त्र कार्बी गटांनी सहमती व्यक्त केली आहे. सशस्त्र गटाच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्याची सुविधा देखील या करारान्वये देण्यात आली आहे.

मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्पासंबंधी भारत आणि अमेरिका यांच्यात करार..


🔰भारताचे संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राज्ये अमेरिका या देशाचे संरक्षण विभाग यांच्या दरम्यान 30 जुलै 2021 रोजी ‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) यामधील संयुक्त कृतीगट हवाई प्रणाली अंतर्गत प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या मानवरहित यान (ALUAV) यांच्या निर्मितीसाठी आखलेल्या प्रकल्पासंबंधीचा करार झाला.


🔰हा करार संशोधन, विकास, चाचणी आणि मूल्यमापन अंतर्गत येत असून ते संरक्षण उपकरणाच्या सह-विकासाद्वारे दोनही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरते आहे.


🔴‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) विषयी...


🔰‘संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकार’ (DTTI) याचे मुख्य उद्दिष्ट सहकार्यात्मक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतीय आणि अमेरिकेच्या सैन्य दलांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे सह-उत्पादन आणि सह-विकासासाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे.


🔰DTTI अंतर्गत, संबंधित शाखांमधील परस्पर सहमतीच्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी लष्कर, नौदल, हवाई आणि विमानवाहू तंत्रज्ञानावरील संयुक्त कृतीगट स्थापन करण्यात आले आहेत. मानव रहित हवाई प्रक्षेपण यानाच्या संयुक्त विकासावरील करारावर हवाई प्रणालीवरील संयुक्त कृतीगटाकडून देखरेख ठेवली जात आहे.


🔰मानवरहित हवाई प्रक्षेपण यानाच्या प्रारूपाच्या संयुक्त विकासासाठी प्रणालींची रचना, विकास, प्रात्यक्षिक, चाचणी आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रकल्प करारात हवाई दल संशोधन प्रयोगशाळा, भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) यांच्यातील सहकार्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.

वाचा :- पोलीस दल विशेष



▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

*✓ दिलीप वळसे पाटिल*


▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

*✓ गृहमंत्रालय*


▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

*✓ राज्यसूची*


▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

*✓ दक्षता*


▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

*✓ तेलंगणा*


▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

*✓ हैदराबाद*


▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

*✓ संजय पांडे*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

*✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय* 


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

*✓ पोलीस महासंचालक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

*✓ मुंबई*


▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

*✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट*

 

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

*✓ पंचकोणी तारा*


▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

*✓ 21 ऑक्टोबर* 


▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 

*✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स*


▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

*✓ पुणे*


▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

*✓ शिपाई*


▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

*✓ काटोल, जि. नागपूर*


▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 

*✓ हाताचा पंजा*


▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

*✓ पोलीस अधीक्षक*


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

*✓ गडद निळा*


▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

*✓ हेमंत नगराळे*


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

*✓ राज्यशासन*


▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

*✓ महानिरीक्षक*


▪️FIR चा फुल फॉर्म काय ?

*✓ first information report*


▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

*✓ देवेन भारती*


▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

*✓ गृहरक्षक दल , तुरुंग*


▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

*✓ पुणे*


▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

*✓ केपी-बोट*


▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

*✓ 1948*


▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

*✓ जनरल बिपिन रावत*


▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

*✓ राजनाथ सिंह*


पोलीस भरती 2020 - 21




(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.