11 November 2021

स्वयंसहाय्यता गटातील महिलांना ‘लखपती’ करण्याचा ग्रामीण विकास मंत्रालयाचा उपक्रम

🔰महिलांना उच्च आर्थिक व्यवस्थेकडे नेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहाय्यता गटातील गटातील महिलांना ‘लखपती’ करण्याचा एक उपक्रम हाती घेतला आहे.

🔰या उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता गटातील ग्रामीण महिलांना वार्षिक किमान 1 लक्ष रुपये कमावता येईल. या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, मंत्रालयाने पुढील दोन वर्षांत स्वयंसहाय्यता गटातील 25 दशलक्ष ग्रामीण महिलांना उपजीविकेसाठी मदत पुरवण्याची कल्पना मांडली आहे.

🔰कृषी आणि संलग्न, पशुधन, NTFP (लाकूड नसलेली वन उत्पादने) आणि अभिसरणाद्वारे इतर उपाययोजनाच्या माध्यमातून घरगुती स्तरावर शाश्वत आधारावर वार्षिक 1 लक्ष रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी उपजीविकेच्या कामांमध्ये विविधता आणण्यासाठी सुनियोजित उपायांच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे.

🔰बचत गट, ग्रामसंस्था आणि CLF (क्लस्टर लेव्हल फेडरेशन्स) यांना या प्रकारच्या उपक्रमांना मदत करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात प्रशिक्षित बचत गटसदस्यांचे समर्पित समुदाय गट त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील.

🅾पार्श्वभूमी

🔰राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान संपृक्ततेच्या दृष्टिकोनानुसार काम करते. आजपर्यंत, 7.7 कोटी महिलांना 70 लक्ष बचत गटांमध्ये एकत्र आणून 6768 प्रभागात अभियानाशी जोडण्यात आले आहे. बचत गटांना प्रारंभिक भांडवल सहाय्य देण्यासाठी वार्षिक सुमारे 80 हजार कोटी रुपये जमा केले जात आहेत. या अभियानाच्या अंतर्गत, वर्ग आणि जातीच्या विविध विभागातील गरीब स्त्रियाना बचत गट आणि त्यांच्या महासंघांमध्ये सामावून घेतले जात आहे आणि हे गट त्यांच्या सदस्यांना त्यांचे उत्पन्न आणि जीवनमान वाढवण्यासाठी वित्तीय, आर्थिक आणि सामाजिक विकास सेवा पुरवतात.

🔰दीनदयाल अंत्योदय योजना ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी ग्रामीण गरीबांना स्वयंशासित संस्थांमध्ये संघटित करते आणि ग्रामीण गरीब महिलांसाठी क्षमता निर्मिती आणि विविध उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर भर देते.

मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप

मंगळ ग्रहावरच्या (Mars) मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप तयार करण्यात मानवाला मोठे यश आलं आहे. अमेरिकन फूड कंपनी हेन्झने (Heinz) मंगळ ग्रहासारख्या मातीत पिकवलेल्या टोमॅटोपासून नवीन ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप तयार केले आहे. मानवाने मंगळावर राहण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे केले गेले आहे. (Heinz makes Mars Edition tomato ketchup grown in Mars soil)

टोमॅटो पिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानचा शोध

पृथ्वीवरच्या मातीच्या उलट, मंगळाची माती पिकांसाठी कठोर आहे. मंगळ ग्रहावरची माती मार्टियन रेगोलिथ म्हणून ओळखली जाते. त्या मातीत सेंद्रिय पदार्था नसतात. याशिवाय मंगळावर सूर्यप्रकाशही कमी पोहोचतो. यामुळे, टोमॅटो पिकवणाऱ्या टीमने ते वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधून त्याचा वापर केला आणि त्यांना यश आलं.

‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचप

हेन्झने तयार केलेल्या ‘मार्स एडिशन’ टोमॅटो केचपची चव साधारण टोमॅटो केचपपेक्षा वेगळी असल्याचे त्यात म्हटले आहे. हेन्झने मार्स व्हर्जन केचपची बाटलीही अंतराळातपण पाठवली होती, जिथे ही बाटली -94 अंश तापमानात होती.

हेन्झमधील टोमॅटो मास्टर्सने मंगळावर भविष्यात जाणारे लोक त्या ग्रहाच्या मातीत टोमॅटो पिकवू शकतील का, त्याचं केचप बनवू शकतील की नाही हे शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. त्यासाठी उत्तम बियाणे घेण्यात आले आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची वाढ करण्यात आली.

हे टोमॅटो तयार करणाऱ्या टीमचे म्हणणे आहे की, पृथ्वीवरील वातावरणातील बदलामुळे शेती करणे कठीण होत चाललय. अशा प्रकारे पृथ्वीवरही शेती करणं शक्य आहे. नासाचे (NASA) माजी अंतराळवीर माईक मॅसिमिनो म्हणाले की, घरापासून (पृथ्वीपासून) ईतके दूरवर पिकवलेल्याली चव परिचयाची असणे हे मानवाच्या कल्याणासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी आवश्यक आहे.

Online Test Series

09 November 2021

प्रश्न उत्तरे


1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?


👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?


👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?


👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?


👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?


👉पणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?


👉 भकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?


👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?


👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?


👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?


👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?


👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?


👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.


👉 थड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?


👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?


👉 रत्नागिरी

भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ दिल्ली आणि पटना या स्थानकांना जोडणार .



🔰भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ दिल्ली आणि पटना या स्थानकांना जोडणार

भारतीय रेल्वेच्यावतीने भारतातील पहिली ‘गती शक्ती एक्सप्रेस’ (01684/01683) या रेलगाडीचे अनावरण करण्यात आले आहे. ही गाडी “पीएम गती शक्ती” योजनेच्या अंतर्गत तयार करण्यात आली आहे.


🔰रलगाडीला विशेष 20 3-एसी इकॉनॉमी श्रेणीचे डबे जोडले आहेत. ही 3-एसी इकॉनॉमी कोच विशेष रेलगाडी दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) आणि पटना या स्थानकांना जोडणार आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान गाडी कानपूर सेंट्रल, प्रयागराज, वाराणसी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि दानापूर या स्थानकांवर थांबेल.


🔴“पीएम गती शक्ती” योजनेविषयी..


🔰13 ऑक्टोबर 2021 रोजी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या “पीएम गती शक्ती” या नावाने बहू-पद्धती संपर्कासाठीच्या राष्ट्रीय मास्टर योजनेचा शुभारंभ केला.


🔰ही योजना एकापासून ते दुसऱ्या पद्धतीच्या वाहतूक पद्धतीने लोक, वस्तूमाल आणि सेवांच्या दळणवळणासाठी एकात्मिक आणि अखंड संपर्क व्यवस्था प्रदान करेल.


🔰सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रमाची निश्चिती, सुयोग्य उपयोजन, तादात्म्य, विश्लेषणात्मक, गतीशील या सहा स्तंभावर “पीएम गतीशक्ती” आधारित आहे.

अशोक भूषण: राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) याचे नवीन अध्यक्ष.



🔰कद्रीय सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक भूषण यांची राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.


🔰तयांची ही नियुक्ती 4 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे पहिले असणार त्या काळापर्यंत प्रभावी असेल.


🔰याव्यतिरिक्त, सरकारने न्यायमूर्ती रामलिंगम सुधाकर यांची राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) याच्या अध्यक्ष पदावर 5 वर्षांसाठी नियुक्ती केली.


🔴राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) विषयी...


🔰राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण (NCLAT) याची स्थापना ‘कंपनी कायदा-2013’च्या ‘कलम 410’ अन्वये केंद्रीय सरकारने केली. त्याचे कार्य 1 जून 2016 पासून सुरू झाले. देशातील कंपनीमधील कायद्याशी संबंधित तंटा सोडविण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे.

२०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य.



🔰भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी दिली. भारत आपली गैर-जीवाश्म ऊर्जा क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत वाढवेल आणि २०३० पर्यंत अक्षय ऊर्जेद्वारे आपली ५० टक्के ऊर्जेची गरज पूर्ण करेल, असा विश्वास मोदी यांनी जागतिक नेत्यांना आश्वस्त करताना व्यक्त केला. 


🔰पढील पिढीला जागरूक करण्यासाठी हवामान बदलाबाबतच्या धोरणांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची गरजही मोदी यांनी व्यक्त केली.


🔰‘सीओपी-२६’ परिषदेत सहभागी जागतिक नेत्यांपुढे पंतप्रधान मोदी यांनी भाषण केले. ते म्हणाले, आपल्याला परिस्थितीनुसार बदल हा विकास धोरणांचा आणि योजनांचा मुख्य भाग बनवावा लागेल. भारतात, नल से जल, क्लीन इंडिया मिशन आणि उज्ज्वला योजनांनी नागरिकांना फायदा झालाच, परंतु त्यांचे जीवनमानही उंचावले.

ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींहून अधिक जीएसटी संकलन.



🔰सणोत्सवाच्या काळातील खरेदी हंगामाचा सुपरिणाम दिसू लागला असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचा वेग कायम आहे. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये या करापोटी १.३० लाख कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.


 🔰कद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी करप्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. चालू वर्षात एप्रिलमध्ये सर्वाधिक १.४१ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. सणोत्सवाचा काळ असल्याने देशभर वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. त्याचेच प्रतिबिंब वाढलेल्या कर महसुलात उमटले आहे. वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने चारचाकी वाहने आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर कर महसुलात आणखी भर पडली असती. 


🔰सरकारचे महसुली उत्पन्न प्रत्येक महिन्याला वाढत असून सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढीव जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते.

तापमानवाढ रोखण्यासाठी कृती करा - जी २० नेत्यांना ब्रिटनच्या युवराजांचे आवाहन.



☘️जी २० नेत्यांच्या बैठकीच्या अंतिम दिवशी, रविवारी जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर व्यापक ऊहापोह झाला. ब्रिटनचे युवराज चार्लस् यांनी जगातील श्रीमंत देशांच्या नेत्यांना आवाहन केले की, त्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले शब्द आता प्रत्यक्ष कृतीत आणावेत.


☘️गलासगो (स्कॉटलंड) येथे संयुक्त राष्ट्रांची हवामानविषयक परिषद होणार असून त्याआधी जी २० बैठकीत हवामान बदलांबाबत चिंतेचा सूर तीव्र करण्यात आला आहे.


☘️पथ्वीवासीयांसाठी (स्वत:ला वाचविण्यासाठीची) कदाचित ही शेवटची संधी आहे, असा इशारा देत चार्लस् जी २० नेत्यांना उद्देशून म्हणाले की, जागतिक तापमानाढ थांबविण्यासाठी शाश्वत ऊर्जास्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठीची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक उभी करायची असेल तर सार्वजनिक- खासगी भागीदारी हा एकमेव पर्याय आहे.


☘️तयांनी या नेत्यांना सांगितले की, जगातील असहाय युवा तुमच्याकडे त्यांच्या भवितव्याचे नियंते म्हणून पाहात असताना यापुढे त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला अशक्य होणार आहे.

राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2020



🔰कद्रीय क्रिडा मंत्रालयाच्यावतीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात 2020 या वर्षासाठी घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराच्या सर्व विजेत्यांना पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. केंद्रीय युवा कार्ये आणि क्रिडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.


🔰परस्कार विजेत्यांची नावे -


🔴राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार - 


🔰रोहित शर्मा (क्रिकेट), मरियप्पन थांगावेलू (पॅरा-खेळाडू), मनिका बत्रा (टेबल टेनिस), विनेश फोगट (कुस्ती), राणी रामपाल (हॉकी)


🔴अर्जुन पुरस्कार – 


🔰चिराग चंद्रशेखर शेट्टी (बॅडमिंटन), अतनु दास (तिरंदाजी), दुती चंद (मैदानी खेळ), सात्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), विशेष भृगुवंशी (बास्केटबॉल), मनीष कौशिक (मुष्टियुद्ध)


🔴दरोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी) –


🔰 शिव सिंग (मुष्टियुद्ध), धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (मैदानी खेळ), रोमेश पठानिया (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (सामान्य श्रेणी) – गौरव खन्ना (पॅरा-बॅडमिंटन), जसपाल राणा (नेमबाजी), ज्युडे फेलिक्स (हॉकी), योगेश मालवीय (मल्लखांब), कुलदीप कुमार हंडू (वुशू)


🔴धयानचंद पुरस्कार - 


🔰एन उषा (मुष्टियुद्ध), लखा सिंग (मुष्टियुद्ध), प्रदीप श्रीकृष्ण गंधे (बॅडमिंटन), कुलदीप सिंग भुल्लर (मैदानी खेळ), जिन्सी फिलिप्स (मैदानी खेळ), तृप्ती मुरगुंडे (बॅडमिंटन)

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक - पंजाब विद्यापीठ, चंदीगड


🔴तनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार - 


🔰अनिता देवी (भूमी), कर्नल सरफराज सिंग (भूमी), ताका तामुत (भूमी), केवल हिरेन कक्का (भूमी), सतेंद्र सिंग (जल), गजानंद यादव (हवाई), (मृत) मगन बिस्सा (जीवनगौरव)

नाव बदलानंतर फेसबुकचा दुसरा मोठा निर्णय, फोटो आणि व्हिडीओसाठीचं ‘हे’ फिचर बंद होणार .



🔰आपल्या मूळ कंपनीचं नाव बदल्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. यानुसार फेसबुकवरील चेहरा ओळखीच्या स्वयंचलित तंत्रज्ञानाचा म्हणजेच ‘ऑटो फेस रिकॉग्निशन’ (Auto Face recognition system) वापर बंद केला जाणार आहे. यामुळे फेसबुकवर फोटो किंवा व्हिडीओ अपलोड झाला की त्यात कोण व्यक्ती आहेत हे आपोआप ओळखणं आणि त्या व्यक्तींना टॅग करण्याबाबतचे नोटिफिकेशन बंद होणार आहे.


🔰फसबुकने ऑटो फेस रिकॉग्निशन तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. यानंतर फेसबुकवरील फोटोज आणि व्हिडीओमध्ये आपोआप टॅगिंग सुरू झालं. हा अनुभव वापरकर्त्यांसाठी नवा होता. त्यामुळे सुरुवातीला अनेक वापरकर्त्यांनी फोटो आणि व्हिडीओत स्वतःला आपोआप टॅग करून घेण्यासाठी हे फिचर वापरण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक डेटा वापरण्याची फेसबुकला परवानगी दिली.


🔰फसबुकच्या या निर्णयानंतर आता ज्या वापरकर्त्यांनी आधी ऑटो फेस रिकॉग्निशनलला परवानगी दिली होती होती त्यांचंही आपोआप टॅगिंग बंद होणार आहे. याशिवाय यापूर्वी ऑटो फेस रिकॉग्निशनसाठी गोळा करण्यात आलेल्या चेहऱ्यांचा कोट्यावधी लोकांचा डेटा देखील फेसबूक डिलीट करणार आहे.

मोदी यांच्या शून्य उत्सर्जन घोषणेचे ब्रिटिश पंतप्रधानांकडून स्वागत.



🔰भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या समतोल वापरातून २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य साध्य करण्याची घोषणा केली असून त्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वागत केले आहे. ग्लासगो येथील जागतिक परिषदेत सोमवारी मोदी यांनी भारताची भूमिका मांडताना ही घोषणा केली असून भारतातर्फे तसे प्रथमच जाहीर करण्यात आले आहे.


🔰२०३० पर्यंत भारताची इंधनाची निम्मी गरज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागविली जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्याची पंचसूत्री मोदी यांनी ग्लासगो परिषदेत मांडली. त्यात २०३० पर्यंत भारताची जिवाश्मरहित इंधननिर्मितीची क्षमता ५०० गिगावॉटपर्यंत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. या कालावधीपर्यंत भारतात अपेक्षित असलेल्या कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनांची घट करण्याचा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला आहे.


🔰यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जॉन्सन म्हणाले की, भारताने २०३० पर्यंत आपली इंधनाची निम्मी गरज अपारंपरिक ऊर्जेतून भागविण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. यातून कार्बनचे उत्सर्जन कित्येक अब्ज टनांनी कमी होणार आहे. जगभरात हवामान बदल रोखण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला यामुळे मोठी मदत होणार आहे.

अभ्यास": क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी वापरण्यात येणारे हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT)


🔰सरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) 22 ऑक्टोबर 2021 रोजी ओडिशामध्ये बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर विविध क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी वापरण्यात येणारे "अभ्यास" नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) ड्रोनची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.


‘🅾️अभ्यास’ची वैशिष्ट्ये


🔰उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.


🔰वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.

वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.


🔰‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.

“वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड” प्रकल्प



🔰2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो (ब्रिटन) येथे भारत आणि ब्रिटन या देशांच्या पंतप्रधानांनी “ग्रीन ग्रिड्स इनिशिएटिव्ह - वन सन वन वर्ल्ड वन ग्रीड” प्रकल्पाचे अनावरण केले, जी स्वच्छ ऊर्जेच्या जागतिक संक्रमणाला गती देण्यासाठी खंडांमध्ये वीज ग्रीड जोडण्याची योजना आहे.


🔰OSOWOG (वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड) उपक्रम हा जगभरातील देशांना वीजपुरवठा करणारी एकल ट्रान्सनेशनल इलेक्ट्रिसिटी ग्रिड यंत्रणा ठरत आहे.


🔰या उपक्रमामुळे केवळ साठवण गरजा कमी होणार नाहीत तर सौर प्रकल्पांची व्यवहार्यता देखील वाढेल. या उपक्रमामुळे केवळ कार्बन फूटप्रिंट आणि ऊर्जा खर्च कमी होणार नाही तर विविध देश आणि प्रदेशांमधील सहकार्यासाठी एक नवीन मार्ग देखील उघडेल.


🔰अश्या एकल ग्रीड यंत्रणेद्वारे, स्वच्छ ऊर्जा कुठेही आणि कधीही प्रसारित केली जाऊ शकते.

13 प्रमुख क्षेत्रांसाठी ‘उत्पादन-संलग्न लाभांश’ (PLI) योजना लागू करण्यास मंजूरी



🔰भारत सरकारने 1,97,291 कोटी रुपयांयांहून अधिक तरतुदीसह 13 प्रमुख क्षेत्रांसाठी ‘उत्पादन-संलग्न लाभांश’ (PLI) योजना लागू करण्यास मंजूरी दिली आहे.


🅾️ठळक बाबी


🔰निर्मितीला केंद्र स्थान देणे आणि रोजगार निर्मितीसाठी सरकारने उत्पादन-संलग्न लाभांश (PLI) योजना मंजूर केलेली आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) ही PLI योजनेची मध्यवर्ती संस्था आहे.

‘व्हाईट गुड्स’ क्षेत्रासाठी PLI योजनेला मंजूरी


🔰6,238 कोटी रुपयांच्या तरतूदीसह ‘व्हाईट गुड्स’ (वातानुकूलन यंत्रणा आणि एलईडी दिव्यांचे क्षेत्र) या क्षेत्रासाठी PLI योजनेच्या अंतर्गत 42 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 26 कंपन्या वातानूकूलन यंत्रांच्या सुट्या भागांसाठी तीन हजार 898 कोटी तर 16 कंपन्या एलईडी सुट्या भागांच्या निर्मितीसाठी 716 कोटी रुपये गुंतवणार आहेत.

सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याची आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)



🎄सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याद्वारे युरोपिय संघाच्या पाठिंब्याने “आंतरराष्ट्रीय मिथेन उत्सर्जन वेधशाळा (IMEO)’चे उद्घाटन करण्यात आले आहे. ग्लासगो (ब्रिटन) येथे आयोजित करण्यात आलेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान IMEOचे अनावरण करण्यात आले.


🎄मिथेन वायू वर्तमानात वैश्विक तापमानवाढीला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये किमान एक चतुर्थांश भागासाठी जबाबदार आहे. त्यामुळे वायुच्या उत्सर्जनावर लक्ष ठेवण्याच्या कार्यामध्ये IMEOची मदत होणार आहे.


🌳ठळक बाबी


🎄ही नवीन वेधशाळा हरितगृह वायू असलेल्या मिथेन वायूच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचे कार्य करणार आहे. IMEO याला जगभरातील कंपन्या आणि सरकारांना धोरणात्मक शमनक्रियेवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी आणि विज्ञान-आधारित धोरण पर्यायांना समर्थन देण्यासाठी या माहितीचा वापर करण्यास अनुमती देईल.


🎄मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायुच्या पातळीविषयी स्पष्ट आणि अचूक माहिती पुरविण्यात IMEO अहवालाची मदत होणार आहे. IMEO सुरुवातीला जीवाश्म इंधनाच्या क्षेत्रातून होणाऱ्या मिथेन उत्सर्जनावर लक्ष केंद्रित करेल आणि कालांतराने कृषी आणि कचरा यासारख्या इतर प्रमुख उत्सर्जन क्षेत्रांपर्यन्त कार्यविस्तार करेल.


🎄ताज्या ‘UNEP-CCAC ग्लोबल मिथेन असेसमेंट’ अहवालानुसार, शून्य किंवा कमी निव्वळ-किंमत कपात ही मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनची पातळी जवळजवळ निम्मी करू शकते आणि सिद्ध उपाययोजना 2050 सालापर्यंत ग्रहाच्या सरासरी वैश्विक तापमानात अंदाजित वाढीपासून 0.28 अंश सेल्सिअसने कमी करू शकतात.


🌳सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) विषयी


🎄हा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अंग असून ते प्रमुख जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. ही संस्था जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्य करते. संस्थेची 5 जून 1972 रोजी स्थापना झाली. संस्थेचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा 'भाषा संगम' उपक्रम



🦋सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर 2021 रोजी शाळांसाठी 'भाषा संगम' उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.


🐙ठळक बाबी


🦋हा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत 22 भारतीय भाषांमध्ये दैनंदिन वापरातील मूलभूत वाक्ये शिकवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे.


🦋लोकांनी त्यांच्या मातृभाषेशिवाय इतर भारतीय भाषेतील मूलभूत संभाषण कौशल्ये आत्मसात करावीत ही त्यामागची संकल्पना आहे.

या कार्यक्रमाची रचना आणि विकास राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) याने केले आहे.


🦋शालेय विद्यार्थ्यांसाठी हा असा एक उपक्रम जो दिक्षा (DIKSHA), ई-पाठशाला (ePathshala) या मंचावरून आणि 22 पुस्तिकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.


🦋तयाव्यतिरिक्त, ‘भाषा संगम’ मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे, जो MyGov कडून समार्थित शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचा एक उपक्रम आहे. ते अॅप मल्टीभाषी या स्टार्टअप कंपनीने विकसित केला आहे.

चालू घडामोडी

 ● कोणत्या देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?

उत्तर : दक्षिण कोरिया


●  कोणत्या देशाला “नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट” हे शीर्षक असलेल्या अहवालात ‘कंट्री ऑफ कंसर्न’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले?

उत्तर :  भारत, हैती, उत्तर कोरिया


● त्रेचाळीस देशांनी ____ देशाला उईघुर नामक मुस्लिम समुदायासाठी कायदे अंमलबजावणीदरम्यान पूर्ण आदर सुनिश्चित करावे असे आवाहन केले आहे.

उत्तर : चीन


●  कोणत्या संस्थेने रिलायन्स रिटेल या कंपनीसोबतच्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय करारावरील अंतरिम स्थगिती उठविण्याची फ्युचर रिटेल या कंपनीची याचिका फेटाळली?

उत्तर : सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर


● भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्याविरोधात याचिका दाखल केली?

उत्तर :  कलम १३१ 


● कोणत्या व्यक्तीला ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार"ने सन्मानित केले जाईल?

उत्तर : मार्टिन स्कोर्सेज


● भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चार अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी (AIFI) किमान __ भांडवल प्रस्तावित केले आहे.

उत्तर : ११.५ टक्के


●  कोणत्या चित्रपटाची ‘ऑस्कर २०२२’ पुरस्कारांच्या नामांकन यादीत भारताकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली?

उत्तर : कुझंगल


● भारतीय नौसेनेने भारतीय नौकानयन संघटनेच्या (INSA) सहकार्याने ____ ते गोवा दरम्यान सागरी नौकानयन स्पर्धा आयोजित करीत आहे.

उत्तर : कोची


●  कोणते मंत्रालय २०२१ इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IIGF) कार्यक्रम आयोजित करणार?

उत्तर : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय


● कोणत्या देशाकडे भारताने ‘जयनगर-कुर्था रेल्वे मार्ग’ याचे व्यवस्थापन सुपूर्द केले?

उत्तर : नेपाळ


●  सौदी अरब देशाने _ या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी त्याचे वार्षिक लक्ष्य दुप्पट केले आहे.

उत्तर : २०६० 


● कोणत्या देशाने २४ ऑक्टोबर २०२१ रोजी “शिजियान-२१” नामक नवीन उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात प्रक्षेपित केला?

उत्तर :  चीन


● कोणत्या दिवशी “संयुक्त राष्ट्रसंघ दिवस” साजरा करतात?

उत्तर : २४ ऑक्टोबर


● कोणत्या देशाने दहाव्या ‘जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह’ निमित्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर : दक्षिण आफ्रिका


●  कोणत्या संस्थेने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली?

उत्तर : RBI


● गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात 'बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF रेडकूचा जन्म झाला?

उत्तर : गीर सोमनाथ


●  कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस” साजरा करतात?

उत्तर : २४ ऑक्टोबर


● कोणती व्यक्ती "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?

उत्तर : वेंकटराघवन सुभा श्रीनिवासन


●  कोणत्या संस्थेने “गरुड” ॲप तयार केले?

उत्तर : भारतीय निवडणूक आयोग


● कोणत्या दिवशी “जागतिक विकास माहिती दिवस” साजरा करतात?

उत्तर : २४ ऑक्टोबर


● कोणत्या व्यक्तीला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात २०१९ या वर्षासाठी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला?

उत्तर : रजनीकांत


● कोणती २०२१ साली “जागतिक पोलिओ दिवस”ची संकल्पना आहे?

उत्तर : डिलिव्हरिंग ऑन ए प्रॉमिस


●  कोणत्या संस्थेने "PEC लिमिटेड" या कंपनीला 'नॉट फिट अँड प्रॉपर (अयोग्य)' म्हणून घोषित केले?

उत्तर : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडल

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग/समित्या

1. सनदी कायदा 1813
2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
6. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
7. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
8. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
9. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
10. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
11. सार्जंट योजना (1944)
12. राधाकृष्णन आयोग (1948)
13. कोठारी आयोग (1964)

विष्णुबुवा ब्रह्मचारी(विष्णू भिकाजी गोखले)

जन्म: शिरवली गावी, जिल्हा कुलाबा १८२५
कार्यकाळ: १८२५ - १८७१
गुरु: दत्तात्रय
समाधी: १८ फेब्रुवारी १८७१
विशेष: क्रांतीकारी समाज सुधारक 

👉विष्णुबुवांना पाच भाऊ आणि पाच बहिणी. विष्णुबाबा भावंडांमध्ये दहावे. ते पाच वर्षांचे असतांना वडील गेले. तरीदेखील एक वर्ष वेदाध्ययन करता आले. त्याच काळात लेखन, वाचन, हिशेब करणे असे जीवनावश्यक शिक्षणही मिळाले. त्यात अक्षर अतिशय सुंदर! ह्या एवढया शिदोरीवर अवघ्या नवव्या वर्षी त्यांना त्या काळांत जमीन-महसूल खात्यात नोकरी मिळाली. पण आईने नोकरी सोडावयास लावून त्यांना पुन्हा घरच्या शेतीत आणि गाईगुरांना रानात चारण्यासाठी नेण्याचे काम करण्यास सांगितले. मात्र विष्णुबुवा फार काळ ह्या कामात रमले नाही. कोणाला न सांगता घर सोडून ते महाडला एका किराणा दुकानात नोकरी करु लागले. त्याच काळात सरकारी नोकरीसाठी आवश्यक ती परीक्षा देऊन साष्टी तालुक्यात कस्टम खात्यात रुजू झाले. सात वर्षांच्या नोकरीच्या काळात ते अनेक ठिकाणी फिरले.

👉हे करीत असतानाही त्यांची धार्मिक वृत्ती सतत सजग होती. एवढया लहान वयातही कीर्तन-प्रवचनें, पूजा-अर्चा नेमाने करीत असत. कधी ना कधी आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देणारा गुरु मिळेल अशी त्यांना आशा वाटत असे. आत्मज्ञानाची त्यांची भूक काही शमेना. दुसरीकडे धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, मनन चालूच होते. ह्या विषयातील त्यांची प्रगती एकलव्याप्रमाणे होत होती. अखेर व्यावहारिक जीवनाचा कंटाळा येऊन त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरी सोडली. घर त्यागले. पुन्हा गुरुप्राप्तिसाठी पुष्कळ हिंडूनही निराशाच पदरी आली. शेवटी सप्तशृंगीच्या डोंगरावर स्वतःच्या मनानेच घोर तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला.

👉ह्या आत्मसाक्षात्काराचा लाभ सर्व समाजालाही व्हावा, संपूर्ण हिंदु समाजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण काहीतरी केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. ख्रिश्चनांच्या धार्मिक अतिक्रमणाने ते अस्वस्थ झाले. त्यांनी ह्या धर्मांतरविरोधात लढा देण्यास सुरुवात केली. लेख लिहून आणि भाषणे करून ते ख्रिस्तीधर्मातील दोष लोकांना दाखवून देऊ लागले. त्यांच्या ह्या कार्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला. उदंड म्हणजे किती? तर त्यांना व्याख्यानाला जागा कमी पडू लागली. 'कुठलीही शंका घेऊन या, मी त्या शंकांचे निरसन करण्यास समर्थ आहे' ह्या त्यांच्या आश्वासकतेमुळे लोकांना धीर आला.

👉समाजाची उन्नती होण्यासाठी स्त्री मुक्तीची आवश्यकता आहे. त्याचवेळी स्त्रीशिक्षणाची जोडही दिली जाणे गरजेचे आहे. हा विचार समाज मनावर त्यांनी प्रथम बिंबविण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरीनेच स्त्रीचा विवाह तिच्या अनुमतीने व्हावा, तो योग्य वयात व्हावा. पती-पत्नींमध्ये वयाचे अंतर फार नसावे, तीस वर्षांवरील गृहस्थाने विधवेशीच लग्न करावे. सतीप्रथा पूर्णतः बंद होणे गरजेचे आहे, विधवा विवाह होणे आवश्यक आहे. जाती किंवा वर्ण जन्मावरुन न ठरविता कर्मावरुन ठरविणे योग्य ठरेल, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावयास हवे. असे अनेक क्रांतिकारक विचार त्यांनी सतत सोळा वर्षें आपल्या व्याख्यानांमधून समाजासमोर मांडले.

👉१८७१ मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला.

        🌷🌷☘☘🌷🌷☘☘🌷🌷☘☘🌷

भारतीय महिला स्वातंत्र्यसेनानी

सुचेता कृपलानी

- गांधीवादी, स्वतंत्र सेनानी आणि राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग, उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
- 1940 मध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसची स्थापना

मातीगिनी हाजरा

- Gandhi Buri या नावाने प्रसिद्ध
- चले जाव आणि असहकार चळवळीत सक्रीय सहभाग

लक्ष्मी सेहगल

- नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापलेल्या Indian National Army मध्ये कॅप्टन
- झाशीची राणी रेजिमेंटचे नेतृत्व
- दुसर्या महायुद्धात सहभाग

कित्तूरची राणी चनम्मा

- कर्नाटकातील कित्तूर संस्थानाची राणी
- वयाच्या 33 व्या वर्षी 1824 मध्ये ब्रिटिशांच्या खालसा धोरणाविरोधात सशस्त्र उठाव

कनकलता बारूआ

- आसाममधील स्वतंत्रसेनानी, वीरबाला या नावाने प्रसिद्ध.
- चले जाव (1942) चळवळीत सक्रीय सहभाग
- वयाच्या 18 व्या वर्षी ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात शहीद

कमलादेवी चटोपाध्याय

- 1930 मध्ये मीठाच्या सत्याग्रहात सहभाग
- परखड राष्ट्रभक्ती धोरणामुळे ब्रिटिश सरकारकडून अटक होणार पहिल्या महिला
- कायदेमंडळाच्या पहिल्या महिला उमेदवार
- अखिल भारतीय महिला परीषदेच्या स्थापनेत सहभाग

मादाम भिकाजी कामा

- लिंग समानतेवर भर देणार्या भारतीय राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या
- 1904 मध्ये भारतीय राजदूत या नात्याने जर्मनीत भारतीय राष्ट्रध्वज फडकवला

अरूणा असफ अली

- भारतीय स्वातंत्र्य चळवळीची The Grand Old Lady म्हणून ओळख.
- भारत छोडो आंदोलना दरम्यान गवालिया टॅक मैदान मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा फडकवला

समाजसुधारक :- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले

स्रियांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडून स्रियांना चूल आणि मुलाच्या पलीकडचे जीवन दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. म्हणून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाचा प्रवास.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला. आई सत्यवती तर वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईंचे लग्नाच्या वेळी अवघे 9 वर्ष वय तर ज्योतिरावांचे वय 13 होते.

ज्योतिराव मूळचे फुरसुंगीचे. परंतु पेशव्यांनी बक्षीस म्हणून त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन दिली. त्यानंतर ज्योतिरावांच्या वडिलांनी बागेतील फुलाचा व्यवसाय करून त्यांना 'फुले' आडनाव मिळाले.

जातिव्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि आधी शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.

त्यांचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. शिक्षण प्रसार सुरु असताना सनातन्यांनी धर्म बुडाला..जग बुडणार... असा कांगावा करत उच्च वर्णीयांनी त्यांना प्रचंड विरोध केला, त्यांच्या अंगावर शेणही फेकण्यात आले परंतु त्या डगमगल्या नाहीत.

1854 साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो.

शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरु असताना त्यांनी पाहिले की लहानपणीच लग्न झालेल्या मुलींना पतीच्या निधनानंतर सती जावे लागे. या जुन्या रूढी परंपरा बंद करण्याचा विडा त्यांनी उचलला होता.

त्यांनी केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांना प्रबोधन करून त्यांचा संप घडविला होता. पुनर्विवाह कायदा होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पती महात्मा फुले (1890) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा संभाळली.

1896 च्या दुष्काळात पोटासाठी शरीराची विक्री करणाऱ्या स्रियांची त्यांनी धनदांडग्याच्या तावडीतून सुटका करून सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. अठराव्या शतकात प्लेगच्या साथीने थैमान घातले. पुण्यातील प्लेगबाधितांना इंग्रजांनी एका माळावर दवाखाना सुरु करून उपचार चालू केले.

या दवाखान्यातील प्लेगबाधित रुग्णाची सेवा सावित्रीबाई फुले करू लागल्या, सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि अशातच 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.

आर्य समाजाची तत्वे.

🅾ईश्वर हेच ज्ञानाचे परम कारण आहे . सत्य , ज्ञान व विद्या या सर्वांचे मुळ ईश्वर आहे.

🅾ईश्वर हा सर्वव्यापी , सर्वशक्तिमान, दयाळू अनादि , अनंत , अमर , अभय  व निर्विकार आहे .

🅾वेद हे हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत .

🅾सत्याचा स्वीकार व असत्याचा नेहमीच त्याग करावा .

🅾वेदांचा अभ्यास करण्याचा सर्वाना अधिकार आहे .

🅾सर्व कामे धर्मानुसार आणि सत्य व असत्य याचा विचार करून करणे .

🅾अविद्या चा नाश करावा व विद्येची वाढ करावी .

🅾प्रत्यकाने सर्वांच्या शारीरिक , मानसिक , आत्मिक उन्नतीचा प्रयत्न केला पाहिजे .

🅾प्रत्येकाने आपल्याच उन्नतीवर संतुष्ट राहू नये .

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान.

🅾दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🅾परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🅾सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🅾प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🅾परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🅾मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🅾सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

🧩प्रार्थना समाजाचे कार्.

🅾प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🅾न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🅾ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🅾देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🅾प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🅾मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🅾४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🅾मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🅾इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🅾इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🅾प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

🧩प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन..

🅾प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

🧩 चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) :-

🅾 चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली..

🧩 साराबंधी चळवळ (सन 1918) :-

🅾 1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल
करीत असत..

🅾गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली..

🅾 शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला..

🅾हा गांधीजीचा दूसरा विजय होता..

🧩 रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) :-

🅾 भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला..

🅾 या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता..

🅾 या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला..

🅾 हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय
बंद होय..

🅾 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली..

🅾 या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋