31 December 2019

आयआयटी टेकफेस्टमध्ये ‘आईन्स्टाईन’ रोबो

📌 मुंबई आयआयटीच्या 3 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या टेकफेस्टमध्ये यावेळी हाँगकाँगमधून येणाऱ्या आईन्स्टाईन रोबो आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

📌 हॅन्सन रोबोटिक्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या रोबोची निर्मिती केली आहे.

📌 तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या समोर उभ्या असणाया व्यक्तीच्या चेहयावरील भावनांना ओळखून समोरील व्यक्तीची भावना तो ओळखू शकतो. व्यक्ती आनंदी, दु:खी, संतप्त, घाबरलेली, गोंधळलेली आहे हे रोबो सांगेल. एवढेच नव्हे तर व्यक्ती स्त्री आहे की पुरुष, त्याचे वय किती याची माहितीही तो देईल.

📌 तसेच या रोबोला 10 लाखांपेक्षा जास्त चेहऱ्यांवरील भावभावना ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

📌 मुंबई आयआयटीचे टेकफेस्ट यंदा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या टेकफेस्टमध्ये 5 जानेवारी रोजी टेकवेडे आईनस्टाईनला भेटू शकतील.

📌 टेकफेस्टमध्ये येणायांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आईन्स्टाईनप्रमाणे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हा रोबो देईल, असा दावा आयोजकांनी केला आहे.

📌 याआधी ह्युमनॉइड सोफिया नावाचा रोबो टेकफेस्टमध्ये सहभागी झाला होता.

📌 तेव्हा सोफियाने ‘नमस्ते इंडिया’ म्हणून मुलाखतीदरम्यान सर्वांचे स्वागत केले होते. सोफियापेक्षा हा रोबो अधिक विकसित आहे. कारण तो केवळ बोलणारच नाही तर भावभावना ओळखून त्याबाबत उपस्थितांशी संवाद साधेल, त्यांना यासंदर्भातील अधिक माहिती देईल, असे आयोजकांनी सांगितले.

📌आईन्स्टाईन व्यक्तीकडे बघून त्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, त्याच्या भावना ओळखू शकतो. जसे की त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती आनंदात आहे की दु:खात हे रोबो ओळखू शकेल. एखाद्या व्यक्तीच्या मनात भीती असेल तर तीदेखील तो अचूक ओळखेल, असे आयोजकांनी सांगितले. सोबतच त्या व्यक्तीचे लिंग, वय अशा बयाच गोष्टी हा रोबो सांगणार आहे. तसे प्रशिक्षणच आईन्स्टाईनला देण्यात आले आहे.

📌 विशेष म्हणजे आईन्स्टाईन हा हाँगकाँगचा रोबो असून तो भारतात पहिल्यांदाच येणार आहे.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संधीचा मसुदा तयार करण्यासाठी  संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता

- सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने एक आंतरराष्ट्रीय संधी करण्यासाठी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी त्यासंबंधी एक ठराव मंजूर केला आहे.

- हा ठराव रशियाने मांडला. आता सर्व जगाचे प्रतिनिधित्व करणारी एक तज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी देशांमध्ये माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानात मदत व्हावी यासाठी पाळावयाच्या शिष्टाचारांचे विस्तृत वर्णन करणार.

- युरोपीय संघ (EU), अमेरिका आणि इतर देशांच्या आक्षेपांवरून संयुक्त राष्ट्रसंघाकडे यासंदर्भात वारंवार मागणी होत आली आहे.

▪️संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA)

- आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना करण्यात आली.

- दुसर्‍या महायुद्धानंतर दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी या संघटनेची स्थापना करण्यात आली. UNचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 

- सध्या या संघटनेचे जगभरात 193 सदस्य देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधल्या सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्वाचा हक्क दिला गेला आहे.
------------------------------------------------

लष्करप्रमुख बिपीन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ 【CDS】

🎆 लष्करप्रमुख बिपीन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) होणार आहेत. केंद्र सरकारने रविवारीच सीडीएस पोस्टसाठी वयोमर्यादा वाढवली होती.

🎆 सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील हुद्याचे असणार आहे.

🎆 जनरल बिपीन रावत हे ३१ डिसेंबर रोजी लष्करप्रमुखांच्या पदावरून निवृत्त होणार आहेत.

🎆 संरक्षण मंत्रालयाने लष्करी सेवा व नियम कायद्यात सुधारणा केल्या आहेत.

🎆 संरक्षण मंत्रालयाने २८ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत सीडीएस प्रमुख ६५ वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात असे नमूद केले आहे.

🎆 केंद्र सरकारला आवश्यकता वाटल्यास सीडीएस प्रमुखांना मुदतवाढ देण्यात येऊ शकते.

🎆 सध्याच्या नियमांनुसार, तिन्ही दलांचे प्रमुख वय ६२ वर्ष अथवा तीन वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात.

🎆 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने २४ डिसेंबर रोजी सीडीएस पद आणि त्यांचे कर्तव्य व नियमांना मंजुरी दिली होती.

🎆 सीडीएस पद सोडल्यानंतर संबंधित व्यक्तिला कोणतेही पद स्विकारता येणार नाहीत.

🌀 सीडीएस म्हणजे काय?

🎆 भूदल, हवाई दल आणि नौदल या तिन्ही सैन्य दलाचे सीडीएस प्रमुख सल्लागार असणार आहेत.

🎆 भारतासमोर असणाऱ्या संरक्षणविषयक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिन्ही सैन्य दलात ताळमेळ वाढवण्याची जबाबदारी चीफ ऑफ डिफेंस स्टाफची(सीडीएस) असणार आहे.

30 December 2019

शॉपिंगसाठी RBI ने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

🎆 डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे.

🎆 त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.

🎆 भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे.

🎆 त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे.

🎆 तर पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे.

🎆 हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे.

🎆 हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी 10 हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

🎆 एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही.

🎆 यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडूनकिंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.

🎆 तसेच या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे.

🎆 या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता येणार आहे.

🎆 हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत.

Current Affairs - 30/12/2019

1)कोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
(A) रतन टाटा.   √
(B) अजीम प्रेमजी
(C) आनंद महिंद्रा
(D) गौतम अदानी

2)______ या देशाचा ‘लॉन्ग मार्च-5’ प्रक्षेपक विंचिंग अंतराळ केंद्रावरून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
(A) उत्तर कोरिया
(B) जापान
(C) चीन.   √
(D) सिंगापूर

3)_____ यांच्यावतीने ‘कवींची राष्ट्रीय परिषद 2020’ आयोजित केली गेली.
(A) दूरदर्शन
(B) ऑल इंडिया रेडियो.   √
(C) द पोयट्री सोसायटी
(D) साहित्य अकादमी

4)सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने गठित केलेल्या ‘आर्थिक सांख्यिकी’ विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे?
(A) अरविंद पानगरिया
(B) बिबेक डेब्रोय
(C) प्रणब सेन.  √
(D) रजनीश कुमार

5)_____ राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला.
(A) मध्यप्रदेश.  √
(B) छत्तीसगड
(C) ओडिशा
(D) आंध्रप्रदेश

6)भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना _ रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
(A) 10 कोटी
(B) 6 कोटी
(C) 5 कोटी.  √
(D) 2 कोटी

7)संयुक्त राष्ट्रसंघाने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात एका नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा  मसुदा तयार करण्यास मंजूरी दिली. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
(A) बुडापेस्ट करारनामा.   √
(B) पालेर्मो करारनामा
(C) मॉस्को करारनामा
(D) रोम करारनामा

8)संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह _ यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
(A) युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास.   √
(B) ज्ञान निर्मिती मोहीम
(C) मानवतावादी मदत
(D) शांती मोहीम

9)‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
(A) CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था.   √
(B) CSIR-केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(C) भारतीय एकात्मिक औषधी संस्था
(D) तेजपूर विद्यापीठ

Mpsc Student:
10)अर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी _ व्यासपीठाचे उद्घाटन केले.
(A) eBक्रय.   √
(B) ईबँक
(C) ईबॅकरे
(D) ईबीड

विषय : चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण

प्र.१) कोणता देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे?
अ) इस्राईल      ब) स्वीडन      क) जर्मनी ✅     ड) फ्रान्स

स्पष्टीकरण : जर्मनी देश भारतात पर्यावरणपूरक शहरी वाहतूक तयार करण्यासाठी आगामी पाच वर्षांमध्ये एक अब्ज युरो एवढ्या रकमेची गुंतवणूक करणार आहे.
 
प्र.२) चित्रपट क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले?
अ) अमिताभ बच्चन     ब) कमल हसन
क) राज बब्बर              ड) रजनीकांत ✅

स्पष्टीकरण : चित्रपट क्षेत्रातल्या रजनीकांत व्यक्तीला ‘IFFI 2019’ या कार्यक्रमाचा ‘आयकॉन ऑफ द गोल्डन जुबली’ पुरस्कार देण्याचे जाहीर झाले.

प्र.३) पवन कपूर यांची .....................मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अ) सौदी अरेबिया     ब) संयुक्त अरब ✅ अमिराती    क) कुवेत    ड) बहरीन
 
स्पष्टीकरण : पवन कपूर यांची संयुक्त अरब मधील नवे भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्र.४) .....................या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.
अ) १ ऑक्टोबर         ब) १५ ऑक्टोबर   क) १ नोव्हेंबर ✅    ड) १५ नोव्हेंबर
 
स्पष्टीकरण :  १ नोव्हेंबर या दिवशी जागतिक व्हेगन दिन पाळतात.

प्र.५) .....................मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.
अ) पॅरिस     ब) टोकियो ✅     क) बीजिंग     ड) रोम

स्पष्टीकरण : टोकियो मध्ये ‘डिझाइन फेस्टा’ नावाचा कलात्मक कार्यक्रम आयोजित केला गेला.

प्र.६) हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे?
अ) साम्यानुमान                     ब) केवलगणनात्मक विगमन ✅
क) अभ्युपगमात्मक निगमन    ड) सर्व योग्य

स्पष्टीकरण : हळद पिवळ्या रंगाची असते हे खालीलपैकी केवलगणनात्मक विगमन उदाहरण आहे.

प्र.७) मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर केला जातो?
अ) कोबाल्ट ६०    ब) सोडिअम २४   क) आयोडीन १३१✅    ड) वरील सर्व

स्पष्टीकरण : मेंदूतील गाठी व कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी आयोडीन १३१ वापर केला जातो.

प्र.८) नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स' संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या,

I. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्देशांक प्रसिद्ध केला आहे.

II. या यादीत केरळ आणि बिहार अनुक्रमे प्रथम व तळाशी आहेत.

III. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे मूल्यांकन केले गेले नाही.

वरती दिलेले कोणते विधान अचूक आहे?

अ) केवळ I
ब) एकही नाही✅✅✅
क) I आणि II
ड) II आणि III

स्पष्टीकरण : दोन्ही विधाने चूक आहेत.

प्र.९) ____________ याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

अ) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
✅✅✅
ब) कामगार व रोजगार मंत्रालय
क) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
ड) मनुष्यबळ विकास मंत्रालय

स्पष्टीकरण :  कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय याच्यावतीने देशभरात 15 दिवस चालणारा “अॅप्रेंटिसशिप पखवाडा’ नावाचा कार्यक्रम राबविण्यास सुरू करण्यात आला आहे.

प्र.१०) _____ याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

अ) आयुषमान भारत✅
ब) स्वच्छ भारत
क) राष्ट्रीय पोषण मिशन
ड) मिशन इंद्रधनुष

स्पष्टीकरण :  आयुषमान भारत याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्यावतीने नवी दिल्लीत ‘आरोग्य मंथन’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

देशातील सव्वालाख गावांत मार्चपर्यंत मोफत वाय-फाय..

भारत नेटशी जोडलेल्या देशभरातील सव्वा लाख गावांत मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हरियाणातील रेवाडी येथे केली.

तर येत्या चार वर्षांत देशभरातील 6 लाख गावांपैकी 15 टक्के गावांचे रुपांतर डिजिटल गावांत केले जाईल, असे सांगत त्यांनी बुधवारी रेवाडीस्थित गुरुवारा गाव डिजिटल गाव म्हणून घोषित केले.

देशभरातील 1.3 लाख ग्राम पंचायती भारत नेट प्रकल्पाशी जोडली गेली आहेत. अडीच लाख ग्रामपंचायती भारत नेट आॅप्टिकल फायबरशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

इंटरनेट सेवा लोकप्रिय करण्यासाठी भारतनेटशी जोडल्या गेलेल्या सर्व गावांना मार्च 2020 पर्यंत मोफत वाय-फाय सुविधा दिली जाईल. सध्या 48 हजार गांवात वाय-फाय सुविधा आहे.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी रेवाडी गावाचे रुपांतर डिजिटल गावांत झाल्याने आनंद होत आहे. यामुळे गावकऱ्यांना शहर, तालुक्याला न जात गावातच एक क्लिकवर सरकारी योजना व सेवा उपलब्ध होईल.

या गावांतील प्रत्येक घर वाय-फाय सुविधा उपलब्ध असेल. एक लाख गावांचे रुपांतर डिजिटल गावांत करण्याच्या  घोषणेनंतर भिवाडी नजीक अल्वरस्थित करींदा गावात व्हीएनएल कंपनीने डिजिटल गावांचे प्रारुप तयार केले होते. तत्कालीन दूरसंचार सचिवांनीही हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले होते.

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

🅾चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

🅾चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

🅾त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं

UPSC मार्फत रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती करण्यात येणार

🌷भारतीय रेल्वेमध्ये होणारी सर्व नवीन भरती आता पुढे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत केली जाणार आहे. याबाबत सुधारणा करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्या आठ संवर्गांचे एकाच मंडळात विलीनीकरण करून नवे ‘भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा’ (IRMS) हा संवर्ग तयार करण्याला मान्यता दिली आहे.

🌿मंडळाविषयी:-

🌷IRMS मंडळ ही एकमेव संस्था असेल जी उमेदवाराद्वारे अर्ज भरताना सूचित केलेली पसंती लक्षात घेणार.नवीन व्यवस्थेनुसार, नव्या विस्तारीत मंडळात रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असणार. त्याव्यतिरिक्त रेल्वेकडेचे 4 सदस्य आणि उर्वरित स्वतंत्र सदस्य असणार. हे सदस्य वित्त, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि उद्योग क्षेत्रातली 30 वर्षांचा अनुभव असलेले अत्यंत प्रतिष्ठित व्यवसायिक असणार आहेत.

🌷स्वतंत्र सदस्य मंडळाच्या बैठकीत उपलब्ध असणार परंतू ते रेल्वेच्या दैनंदिन कारभारात नसणार.पुढे होणारी सेवा भरती सुलभ करण्यासाठी ‘कार्मिक व प्रशिक्षण विभाग’ आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्याशी सल्लामसलत करून नवीन सेवा तयार केली जाणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी

🌷भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) या संस्थेची स्थापना दिनांक 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातली कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

🌿भारतीय रेल्वे विषयी:-

🌷भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातली सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या कें‍द्रीय रेल्वे खात्यातला विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. रेल्वे खात्याचा कारभार कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.

🌷भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🌷भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.

🌷1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

🌷आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

हेमंत सोरेन बनले  झारखंडचे ११वे मुख्यमंत्री

🍀 झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली.

🍀 राजधानी रांचीतील मोरहाबादी मैदानावर हा शपथविधीसोहळा पार पडला.

🍀 राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत सोरेन यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

🍀 हेमंत सोरेन (वय ४४) हे दुसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत.

🍀 हेमंत सोरेन यांचा पहिला कार्यकाळ हा १३ जुलै २०१३ – २३ डिसेंबर २०१४ इतका होता ह्या पदावर असणारा हेमंत सोरेन आपल्या कार्यकाळामध्ये भारतामधील सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.

🎇 झारखंड राज्य माहिती 🎇

🍀 झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागातले एक राज्य आहे.

🍀 बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा काढून, या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन २००० मध्ये संमत केला.

🍀 भारतीय गणराज्यातील २८ वे राज्य म्हणून १५ नोव्हेंबर २००० रोजी झारखंड अस्तित्वात आले.

13 वे दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धा - 2019

स्थळ - काठमांडू-पोखरा, नेपाळ

कालावधी - 1 ते 10 डिसेंबर 2019

सर्वाधिक पदक विजेता - भारत (312 पदके)

1984 साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांची सुरुवात

भारत 1984 पासून सलग आजपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानी राहिलेला आहे.

सर्वाधिक पदक विजेते 5 देश
1. भारत (312 - 174 सुवर्ण, 93 रौप्य, 45 कांस्य)

2. नेपाळ (206 - 51 सुवर्ण, 60 रौप्य, 95 कांस्य)

3.श्रीलंका (251 - 40 सुवर्ण, 83 रौप्य, 128 कांस्य)

4. पाकिस्तान (131 - 31 सुवर्ण, 41 रौप्य, 59 कांस्य)

श्रीकांत, अंजुम चोप्रा यांना 'सी. के. नायडू जीवनगौरव

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि १९८३चा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य कृष्णमाचारी श्रीकांत आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांना बीसीसीआयकडून देण्यात येणारा यंदाचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणार असून या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

श्रीकांत आणि अंजुम यांनी भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले.

टीम इंडियाचे शतकांचे महाशतक

श्रीकांत यांनी १९८१ ते १९९२ यादरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

६० वर्षीय श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला होता.

वनडेत त्यांनी भल्याभल्या गोलंदाजांची पिसं काढली. वेगवान गोलंदाजांनाही श्रीकांत हेल्मेटविना खेळायचे.

याच दौऱ्यात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. ही मालिका बरोबरीत राहिली. त्यानंतर श्रीकांत यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले.

१९९२च्या वर्ल्डकपनंतर श्रीकांत यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

२००९ ते २०१२ पर्यंत श्रीकांत यांच्याकडे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद होते.

अंजुम चोप्रा भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे.