21 April 2022

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती : कलम ७५(१) नुसार पंतप्रधानची तरतूद केली आहे. पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्र्पतींद्वारे होते.

पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे घटक असतात.

भारताने संसदीय शासनपद्धतीचा स्वीकार केला आहे. या पद्धतीत ‘घटनात्मक प्रमुख’ व ‘वास्तव कार्यकारी प्रमुख’ असे दोन प्रमुख कार्यरत असतात.

राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख (de jure executive) तसेच राष्ट्रप्रमुख (Head of the State) असतात.

पंतप्रधान हेच वास्तव कार्यकारी प्रमुख (de facto executive) तसेच शासन प्रमुख (Head of the Government) असतात.

संविधानात पंतप्रधान या पदाचा उल्लेख ‘प्रधानमंत्री’ (Prime Minister) असाच आहे हे नेहमीच लक्षात ठेवावे.
प्रमुख असे दोन प्रमुख कार्यरत असतात.

निवडणुकीत बहुमत मिळवलेला पक्ष आपल्या नेत्याची प्रधानमंत्रीपदी निवड करायची हे ठरवतो. त्याच पक्षातील प्रधानमंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांचा प्रधानमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होतो. प्रधानमंत्री व अन्य मंत्री संसदेचे सदस्य असणे आवश्यक असते. नसल्यास त्यांना सहा महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते.

प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते. याचाच अर्थ राज्यकारभाराची वास्तव सत्ता प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.

भारताचे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची माहिती
पंतप्रधानांची निवड (कलम ७५) : लोकसभेत बहमत मिळविणाऱ्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधानपदी नेमणूक करतात व पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात.

शपथ : पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती देतात.

पंतप्रधान म्हणून नेमणूक होण्यासाठी उमेदवार हा संसदेचा सदस्य असावा लागतो. नसल्यास सहा महिन्यांच्या आत त्यास संसदेच्या कोणत्याही एका सभागृहावर निवडून येणे क्रमप्राप्त ठरते.

पंतप्रधानांचा कार्यकाल : घटनेने निश्चित केलेला नाही.

लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत राहू शकते.

मुदतीपूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास पंतप्रधान आपला राजीनामा राष्ट्रपतींना सादर करतात.

पंतप्रधानांचे अधिकार व कार्ये :

(१) प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते.

(२) प्रधानमंत्री आपल्या पक्षातील कायदयांच्या विश्वासू सहकाऱ्यांना प्राधान्य देतातच पण त्याचबरोबर तयार प्रशासकीय अनुभव, राज्यकारभाराचे कौशल्य, संसदेच्याकार्यक्षमता, विषयातील तज्ज्ञता यांचाही विचार मंत्री महत्त्वाच्या निवडताना केला जातो.

(३) मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा हे व्यवहार ठरल्यानंतर प्रधानमंत्री त्यांच्यात खात्यांचे वाटप निश्चित करण्याचे काम करतात.

(३) प्रधानमंत्री मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात.मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका प्रधानमत्र्याच्या अध्यक्षतेखाली होतात.

(४) खातेवाटप झाल्यानंतर विविध खात्यांमध्ये सुसूत्रता राखणे, खात्यांमधील परस्पर सहकार्य वाढवणे, खात्यांचा कारभार कार्यक्षमतेने होत आहे अमलबजावणीच
की नाही हे पाहणे, इत्यादी कामे प्रधानमंत्र्यांना पार कायद्याच्या पाडावी लागतात.

(५) आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावण्यास जागतिक लोकमत आपल्याला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, देशातील जनतेला आश्वस्त करणे, आपत्तीच्या काळात आपत्तीग्रस्तांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणे इत्यादी भूमिका प्रधानमंत्री पार पाडू शकतात.

(६) पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष (प्रमुख) असतात.

(७) मंत्रिमंडळाचा समन्वयक. पंतप्रधानांचा पदावर असताना आकस्मिक मृत्यू झाल्यास मंत्रिमंडळ बरखास्त होते.

(८) पंतप्रधान हे नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय लोकसंख्या आयोग यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

(९) पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो.

(१०) पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवितात. पंतप्रधान हे देशाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रवक्ते मानले जातात.

(११) पंतप्रधान हा राष्ट्रपती आणि मंत्रीमंडळ यांना सांधणारा दुवा आहे. पंतप्रधान मंत्र्यांमध्ये खातेवाटपाचे कार्य करतात.

(१२) पंतप्रधान मंत्र्यांना बडतर्फ करण्याची शिफारस करतात. संसदेत सरकारच्या वतीने महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान करतात.

(१३) पदव्या देणे : व्यक्तींच्या गुणांची कदर करून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण यासारख्या पदव्या देण्याचा
अधिकार पंतप्रधान व त्यांच्या मंत्रीमंडळास आहे.

चालू घडामोडी 21 एप्रिल 2022

चालू घडामोडी 21 एप्रिल 2022:-

१) “जागतिक यकृत दिवस” कधी साजरा केला जातो?

(१)१७ एप्रिल

(२) १८ एप्रिल

(३) १९ एप्रिल

(४)२० एप्रिल

उत्तर:(३) १९ एप्रिल

२) “राष्ट्रीय सायबर सुरक्षा घटना प्रतिक्रिया” कार्यक्रम कोण द्वारे आयोजित करण्यात आला आहे?

(१) CSIR

(२)C-DAC

(३) NITI AYOG

(४) राष्ट्रीय सुरक्षा परिषद

उत्तर:(४) राष्ट्रीय सुरक्षा परिषद

३) १२ व्या “सिनिअर पुरुष हॉक्की चाम्पिंअनशिप २०२२” कोणी जिकले आहे?

(१) तामिळनाडू

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४)गोवा

उत्तर:(२) हरियाना

४) नरेंद्र मोदी यांनी कोठे “WHO ग्लोबल सेंटर फॉर टेडीशनल मेडिसिन” चे उद्घाटन केले आहे?

(१) पानिपत,हरियाना

(२) जामनगर,गुजरात

(३) अमृतसर,पंजाब

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) जामनगर,गुजरात

५) कोणत्या राज्यात “करगा मंदिर उत्सव” चे आयोजन केले आहे?

(१) महाराष्ट्र

(२)गुजरात

(३) कर्नाटक

(४) तामिळनाडू

उत्तर:(३) कर्नाटक

६) पहिली“सेमिकोन इंडिया २०२२ कॉन्फेरंस” कोठे आयोजित होणार आहे?

(१) हैदराबाद

(२) मुंबई

(३) बेंगलोर

(४) दिल्ली

उत्तर:(३) बेंगलोर

७) अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ज्यांना १ वर्षाचा कार्यकाल वाढून दिला आहे?

(१)संजय मिश्रा

(२)विनीत जोशी

(३) कमलेश नीलकंठ व्यास

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(३) कमलेश नीलकंठ व्यास

८) युनेस्को ने किती “युनेस्को ग्लोबल जिओपार्क” ची घोषणा केली आहे?

(१)८

(२)१०

(३) १२

(४) १४

उत्तर:(१) ८

९) भारत आणि कोणत्या देशात “क्वानटम कॅम्पुटीग आणि VARTUAL नेटवर्क सेंटर” स्तापित करण्याचा निर्णय झाला आहे?

(१)चीन

(२) अमेरिका

(३) फिनलंड

(४) रशिया

उत्तर:(३) फिनलंड

१०) “इंडिया स्मार्ट सिटीज अवार्ड २०२०” नुसार सर्वशेष्ट राज्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) राजस्थान

(२) बिहार

(३) उत्तरप्रदेश

(४) गुजरात

उत्तर:(३) उत्तरप्रदेश

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


1) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर- अप्रत्यक्ष

2) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर- गटविकास अधिकारी

3) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर- राजस्थान

4) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
उत्तर- 5

5) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
उत्तर- माळशेज

6) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर- वेलवंडी
7) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
उत्तर- 8 नोव्हेंबर 2016

8) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
उत्तर- तेलबीया

9) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
उत्तर- इंदापुर

10) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
उत्तर- छत्रपती शाहू महाराज

11) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
उत्तर- जॉन चेसन

12) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
उत्तर- आर्थरसीट

13) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
उत्तर- छत्रपती राजाराम राजे ‌

14) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
उत्तर- कराड

15) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ?
उत्तर- पुणे

16) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
उत्तर- 21 ऑक्टोंबर

17) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
उत्तर- मनोधैर्य

18) 31 ऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा होतो?
उत्तर- सरदार पटेल

19) पेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे?
उत्तर- मुजुमदार

20) कोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्ह्या असे  दोन भाग पाडण्यात आले?
उत्तर- 1949

21) ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळगाव कोणते?
उत्तर- कण्हेरखेड

22) वाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
उत्तर- रास्ते

23) खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्राॅन्झ मिळाले?
उत्तर- हेलसिंकी

24) कोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे?

उत्तर- कृष्णराव साबळे

25) सातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वातंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली?

उत्तर- 1913

26) कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला?
उत्तर- सातारा

27) MACOCA मकोका हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो?
उत्तर- संघटित गुन्हेगारी

28) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर- आसाम

29) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती?
उत्तर- बाळ गंगाधर टिळक

30) रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो?
उत्तर- स्पीग्मोमॅनोमीटर

31) प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो?
उत्तर- ऑक्सिजन

32) मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे?
उत्तर- दर्पण

33) मीराबाई चाणु कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर- वेटलिफ्टिंग
34) नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर- कोहिमा

35) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
उत्तर- बिलासपुर

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण ६ प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” असे म्हणतात.

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय?

महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण ६ प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे. यालाच “महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग” असे म्हणतात.


कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे.

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग संपूर्ण माहिती Prashasakiy Vibhag
1. कोकण प्रशासकीय विभाग (Konkan Administrative Department in Marathi):-

कोकण विभाग : मुंबई शहर, पालघर, ठाणे,  मुंबई उप नगर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड


कोकण विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 30728 चौरस किलो मीटर (10%)


कोकण विभागामध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 50

कोकण विभागामधील सर्वांत मोठा जिल्हा : रत्नागिरी

2. नाशिक प्रशासकीय विभाग Nashik Prashasakiy Vibhag (Nashik Administrative Department in Marathi):-

नाशिक विभाग : नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार

नाशिक विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57493 चौरस किलो मीटर (18.70%)

नाशिक विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या: 54

नाशिक विभागा मधील सर्वांत मोठा जिल्हा: अहमदनगर

3. पुणे प्रशासकीय विभाग (Pune Administrative Department in Marathi):-

पुणे विभाग :  पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर

पुणे विभागाचे एकूण क्षेत्रफळ : 57, 275 चौरस किलो मीटर (16. 60%)

पुणे विभागा मध्ये अस्तित्वा मध्ये असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 58

पुणे विभाग मधील सर्वात मोठा जिल्हा : पुणे

4. औरंगाबाद प्रशासकीय विभाग (Aurangabad Administrative Department in Marathi):-

औरंगाबाद विभाग : औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मनाबाद, परभणी आणि हिंगोली

औरंगाबाद विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 64, 813 चौरस किलो मीटर (21. 06%)

औरंगाबाद विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 76

औरंगाबाद विभाग मधील सर्वांत मोठा जिल्हा : बीड

5. अमरावती प्रशासकीय विभाग (Amravati Administrative Department in Marathi):-

अमरावती विभाग : अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ

अमरावती  विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 46, 027 चौरस किलो मीटर  (14. 95%)

अमरावती विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 56

अमरावती विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : यवतमाळ

6. नागपूर प्रशासकीय विभाग (Nagpur Administrative Department in Marathi):-

नागपूर विभाग : नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा

नागपूर विभागाचे एकूण क्षेत्रफळ: 51, 377 चौरस किलो मीटर (16. 69%)

नागपूर विभागा मध्ये अस्तित्वात असणारे एकूण तालुक्यांची संख्या : 64

नागपूर विभागा मध्ये सर्वांत मोठा जिल्हा : गडचिरोली

प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळा अनुसार क्रमवारी (Sorting of administrative departments by area in Marathi)

औरंगाबाद 64, 813 चौरस किलो मीटर
नाशिक 57, 493 चौरस किलो मीटर
पुणे 57, 275 चौरस किलो मीटर
नागपूर 51, 377 चौरस किलो मीटर
अमरावती 46, 027 चौरस किलो मीटर
कोकण 30, 728 चौरस किलो मीटर
क्षेत्रफळा अनुसार सर्वात मोठे पाच जिल्हे
अहमदनगर : 17, 048 चौरस किलो मीटर
पुणे : 15, 643 चौरस किलो मीटर
नाशिक : 15, 530 चौरस किलो मीटर
सोलापूर : 14, 895 चौरस किलो मीटर
गडचिरोली : 14, 412 चौरस किलो मीटर

क्षेत्रफळाच्या दृष्टी ने सर्वात लहान शेवटचे पाच जिल्हे

मुंबई शहर : 157 चौरस किलो मीटर
मुंबई उपनगर : 446 चौरस किलो मीटर
भंडारा : 3, 896 चौरस किलो मीटर
ठाणे : 4, 214 चौरस किलो मीटर
हिंगोली : 4, 524 चौरस किलो मीटर
महाराष्ट्रा मधील समान नावाचे तालुके असणारे जिल्हे
कळंब : यवतमाळ -उस्मानाबाद
नांदगाव : नाशिक- अमरावती
शिरूर : बीड -पुणे
आष्टी : बीड- वर्धा
खेड :  पुणे- रत्नागिरी
मालेगाव : नाशिक- वाशिम
कारंजा : वाशिम- वर्धा
कर्जत : अहमदनगर -रायगड
सेलू : परभणी- वर्धा
महाराष्ट्रा मधील सर्वाधिक तालूक्यांची संख्या असणारे जिल्हे कोणते (Districts with highest number of talukas in Maharashtra in Marathi)

नांदेड आणि  यवतमाळ : प्रत्येकी 16 तालुके
नाशिक, चंद्रपुर, जळगाव, आणि रायगड: प्रत्येकी 15 तालुके
पुणे, अहमदनगर आणि  नागपूर : प्रत्येकी 14 तालुके
कोल्हापूर आणि  गडचिरोली : प्रत्येकी 12 तालुके

अर्थशास्त्र सराव प्रश्न

अर्थशास्त्र सराव प्रश्न- Economics Practice Question best 10

१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे?

नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली.
नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली.
नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते.
नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.
उत्तर – नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.

२. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?

भूविकास बँका
प्रादेशिक ग्रामीण बँका
राज्य सरकार
वरील सर्व
उत्तर – वरील सर्व

३. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?

नायजेरिया
झिंबाब्वे
दक्षिण आफ्रिका
सुदान
उत्तर – दक्षिण आफ्रिका

४. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?

7
15
22
30
उत्तर – 30

5. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.

मौद्रिक धोरण
द्रव्य निर्मिती
राजकोषीय धोरण
चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण

6. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?

निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
निव्वळ देशी कर्जे
व्याज खर्च
लोक लेख्यातील जमा
उत्तर – व्याज खर्च

Economics Practice Question


७. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?

आयकर
सेवा कर
महामंडळ कर
जमीन महसूल
उत्तर – सेवाकर

८.सरकारने आकारलेल्या करा बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?

कर हे सक्तीचे देणे असते.
कर्ण भरणे हा कायद्याने गुन्हा असतो.
कर उत्पन्नाचा वापर सरकार सार्वजनिक खर्चासाठी करते.
करदात्यांना सरकार मार्फत प्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.
उत्तर – करदात्यांना सरकार मार्फत अप्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.

९. प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?

A. उत्पन्नावर
B. उत्पादनावर
C. संपत्तीवर
D. भांडवली नफ्यावर
उत्तर – उत्पादनावर

१०. खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही.

देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज
विमा निधी
भविष्य निर्वाह निधी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज
उत्तर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज

लक्षात ठेवा

1)अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या.

अ) तिच्या घुसणे पासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येतो जर त्याला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर

ब)राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्याची लिखित स्वरूपात शिफारस केली असेल तर

a) विधान अ बरोबर

b) विधान ब बरोबर

c) दोन्ही विधाने बरोबर

d) दोन्ही विधाने चुकीची

उत्तर – d) दोन्ही विधान चुकीचे

2)राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो?

a) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

b) राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

c) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती कडून

d) संबंधित राज्याच्या राज्यपाल आपण होऊन

उत्तर – a) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार

3)भारतीय निर्वाचन आयोग बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?


a) केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षितता आहे परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही.


b) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.

c) मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख आहेत.

d) जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो.

उत्तर – b) मुख्य निर्वाचन आयुक्तांचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.

4)भारतीय राजशिष्टाचार अनुसार पदनाम श्रेणी मध्ये राज्यात खालीलपैकी कोणाची स्थान सर्वात वरचे आहे?

a) उपपंतप्रधान

b) माजी राष्ट्रपती

c) घटक राज्याचे राज्यपाल

d) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

उत्तर – c) घटक राज्याचे राज्यपाल

5)महाराष्ट्राच्या राज्यपालांचे बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

a) ते अँग्लो-इंडियन समाजातील एकाच विधानपरिषदेवर नामनिर्देशित करू शकतात.

b) ते अँग्लो-इंडियन जमातीमधील किमान दोघास विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात.

c) त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) नुसार विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.

d) ते राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 व खालील सक्तीने खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकत नाहीत.

उत्तर – c) त्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 371 (2) नुसार विशेष जबाबदारी प्रदान करण्यात आली आहे.

6)एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर……

अ) राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या 2/3 सदस्यांनी तसा ठराव केला.

ब) राज्यपाल यांच्यामते राज्यांमध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली आहे.

क) विधानसभेने अविश्वास ठराव मंजूर केला.

ड) राज्य कायदे मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी अविश्वास ठराव मंजूर केला.

a)अ आणि ब

b)अ,ब आणि ड

c)ब आणि क

d)अ आणि ड

उत्तर – (c) ब आणि क

7)खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा.

अ) जी.व्ही.के. राव समिती

ब) बलवंतराय मेहता समिती

क) अशोक मेहता समिती

ड) के संथानम समिती

a) ब क ड अ

b) ब अ ड क

c) ब अ क ड

d) ब ड क अ

उत्तर -(b) ब अ ड क

8)भारतीय बँक, बँकांचा इतिहास, Banks Information In Marathi

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) पंचायतीमध्ये अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित जागा आहेत परंतु महिलांसाठी नाहीत.

ब) विसर्जन झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाल उपभोगता येत नाही फक्त उर्वरित कार्य कालच उपभोगता येतो.

a) फक्त अ

b) फक्त ब

c) अ आणि ब

d) दोन्ही नाही

उत्तर – (b) फक्त ब

9)भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन…… सुचविते.

A.कायद्याची आणि कार्यकारी देशांची घटनात्मक घोषित करण्याचा न्यायालयीन अधिकार.

B.कायदेमंडळात द्वारे मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांचे सुज्ञपणा यावर प्रश्न उपस्थित करण्याचा न्यायालयीन अधिकार.

C.कायदेशीर मान्यता असलेल्या सर्व बाबींचे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्यास अगोदर पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार

D.आपल्याच यापूर्वी समान अथवा भिन्न प्रकरणांमध्ये दिलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा न्यायालयीन अधिकार.

उत्तर – A

10)खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचलन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही?

a) लोकसभा निवडणुका

b) राज्यसभा निवडणूका

c) स्थानिक स्वशासन निवडणुका

d) राष्ट्रपती निवडणूक

उत्तर – स्थानिक स्वशासन निवडणुका.

11)राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो?

अ) पाच वर्षे

ब) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत

क) राज्यपालांची इच्छा असेपर्यंत

ड) मुख्यमंत्र्यांची इच्छा असेपर्यंत

a) अ आणि ब

b) अ आणि क

c) अ आणि ड

d) ब आणि क

उत्तर – अ आणि ब

12)भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे?

a) 550

b) 250

c) 100

d) 60 ते 500

उत्तर – (d) 60 ते 500

13)खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?

अ)कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ या दक्षिणेला ज्या पैकी केवळ दोन राज्यात विधानपरिषद आहे.

ब) विधान परिषदेत कमीत कमी 60 सदस्य असू शकतात.

a) केवळ अ

b) केवळ ब

c) अ आणि ब दोन्ही

d) अ आणि ब दोन्ही नाही

उत्तर – a) केवळ अ

14)स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे?

a) केंद्र सूची

b) राज्य सूची

c) समवर्ती सूची

d) पंचायत राज्य सूची

उत्तर – राज्य सूची

15)कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला?

a) 72वी   b) 73वी   c) 74वी  d) 75 वी

उत्तर – b) 73वी

16)73 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे?

a) २५ वर्षे

b) १८ वर्षे

c) २१ वर्षे

d) ३० वर्षे

उत्तर -c) २१ वर्षे

17)ग्राम सभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?

a) १८

b) २१

c) २३

d) २५

उत्तर – a) १८

18)बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या हेतूने करण्यात आली होती?

a) लोकशाही विकेंद्रीकरण यासाठी उपाय योजना सुचविणे.

b) सामुहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कार्यक्षमता आणण्याकरता उपाय योजना सुचविणे.

c) तत्कालीन ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती मिळवणे.

d) तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्त्रोतांची तपासणी करणे.

उत्तर – b) सामुहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत कार्यक्षमता आणण्याकरता उपाय योजना सुचविणे

19)राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदीबाबत कोणते विधान बरोबर नाही?

a) अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात.

b) त्यांच्या सेवाकाळात नुकसान कारक होईल अशा प्रकारे सेवा अटित बदल करता येत नाही.

c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा कडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.

d) राज्यपाल दोषी असणाऱ्या ची सेवा तात्पुरती स्थगित करू शकतात परंतु बडतर्फीचे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.

उत्तर – c) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश याकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही.

20)पंचायत राज्याच्या क्षेत्रात 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे खालीलपैकी कोणती तरतूद सुचवलेली नाही?

a) महिला उमेदवारांना सर्व स्तरावर एक-तृतीयांश आरक्षण.

b) राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी.

c) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील.

d) पंचायत राज्य संस्था जर विसर्जित झाल्या तर सहा महिन्याच्या कालावधीत निवडणुका झाल्या पाहिजेत.

उत्तर – c) निर्वाचित पदाधिकाऱ्यांना जर दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील तर ते आपल्या पदावर राहण्यास अपात्र ठरतील.