Ads

01 May 2022

वनस्पती

वनस्पती

हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.

वनस्पतींमधील विविधता
वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.

वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.

वनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणाऱ्या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.

ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.

अथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.

मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.

पाराशर , वृक्षायुर्वेदचा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.

वनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके
संपादन करा
ए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)
कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)
घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)
ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)
नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)
निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)
निसर्गभान (प्रा. श्री.द. महाजन)
परसबाग (द.गो. मांगले)
प्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)
फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)
वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)
सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)
सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)
सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)
हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)
अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके
संपादन करा
गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णू स्वरूप)
जड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)
डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)
प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)
फ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)
फ्लॉवरिग ट्रीज अँड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)
द बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)
मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)
व्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)

____________________

पाच महत्त्वाच्या औषधी वनस्पती
कडूनिंब
तुळस
कोरफड (कुमारी)
अडुळसा
कुडा
काही सोपे घरगुती उपाय
आपल्या देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या पाच महत्त्वाच्या वनौषधींबद्दल माहिती घेणार आहोत.
कडूनिंबहे झाड सर्वांच्याच ओळखीचे आहे. त्याची पाने, फळे, तसेच खोड औषधी आहेत. इसबासारख्या त्वचेच्या रोगाकरता याच्या पानांचा उपयोग होतो. कडूनिंबाच्या पानांच्या तेलाचा वापर खाज आणि जखमा भरून येण्यासाठी करतात. तसेच या पानांचा उकळून काढा करूनही वापरता येतो. कडूनिंब हे एक उत्तम जंतुसंसर्गनाशक आणि कीटकनाशक आहे. त्याच्या खोडाच्या बाहेरील भागाचा काढाही ब-याच आजारांवर उपायकारक ठरतो. या झाडाची लागवड करणं आणि त्याची काळजी घेणं हे आपल्या फायद्याचं आहे. कडूनिंब तेल असे तयार करावे कडूनिंबाच्या पानांचा पाणी घालून 100 मि.लि. ताजा रस काढावा. त्यात 25 मि.लि. तिळाचं तेल घालावे. मंद आचेवर ते झाकून उकळावे. साधारण अर्ध्या तासात त्यातील पाण्याचा अंश निघून जातो. उरलेलं मिश्रण गार करून गाळावे. हे तेल घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवल्यास वर्षभर सहज टिकतं. जखमेवर हे लावल्यास ती लवकर बरी होते. बाळंतपणातल्या जखमा ब-या होण्याकरतादेखील कडूनिंबाची पानं घातलेल्या गरम पाण्याच्या टबमध्ये रोज 15 मिनिटे बसावे.
तुळसतुळस म्हणजे 'वनस्पती लहान पण गुण महान' असे आहे. तुळशीची पानं ही सर्दी खोकल्यावर विशेष गुणकारी आहेत. तुळशीच्या पानांचा रस मधात घालून किंवा पानांचा काढा करून खोकल्यासाठी देतात. तुळशीची पानं उष्ण असतात म्हणून ती कफदोषामध्ये वापरतात. ही पानं आपण नुसतीदेखील चावून खाऊ शकतो. याउलट तुळशीच्या बिया थंडावा निर्माण करणा-या असतात. म्हणून त्या उष्णतेचे दोष घालवण्यासाठी (पित्तदोष) म्हणजे, जळजळ, पायांची आग, तोंड येणे, नाकातून रक्त येणे,रक्ती मूळव्याध, इत्यादींकरता घेतात. ह्या बिया दूध, किंवा तुपाबरोबर घ्याव्यात. 20 ते30 बिया पाण्यात किंवा दुधात भिजवून ठेवाव्या आणि एका वेळी घ्याव्यात. असे दिवसातून तीन चार वेळा करावं. सर्दी आणि तापाकरता तुळशीचा रस काढणे - एक कप तुळशीची पानं पाच मिनिटे पाण्यात भिजवावी. मग ती वाटून कापडातून गाळावी. याचा 20 मि.लि. म्हणजे साधारण अर्धा कप, इतका रस काढावा. इतका रस होण्याकरता जितकी लागतील तितकी पाने घ्यावी. हा मोठया माणसांकरता एक वेळचा डोस आहे. तो सकाळी व संध्याकाळी याप्रमाणे तीन दिवस घ्यावा. सर्दी आणि तापाकरता ह्याचा उपयोग होतो.
कोरफड (कुमारी)या वनस्पतीचा उपयोग जखमेवरची मलमपट्टी म्हणून छान होऊ शकतो. जखमेच्या आकाराचा कोरफडीचा तुकडा कापा. जखम धुऊन घ्या. तुकडयाची ओली बाजू जखमेवर ठेवून वरून पट्टी बांधा. कोरफड पट्टी रोज बदला. याने जखम लवकर बरी होईल. भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरदेखील कोरफडीची मलमपट्टी लागू पडते. ब-याच आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केला जातो. यकृताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि खोकला यावर हे खूप गुणकारी आहे.
आपण कोरफड आपल्या बागेत लावू या आणि लोकांनाही लावायला सांगू या. कोरफड कणखर असते आणि वर्षानुवर्षे वाढते व टिकते .

अडुळसाया झुडुपाचा उपयोग खोकला बरा होण्यासाठी करतात. अडुळशाच्या पानांचा काढा किंवा रस खोकल्यासाठी घेतात. रस मधाबरोबर दिला जातो. 50-60 अडुळशाची पाने स्वच्छ धुऊन, ती एक लिटर पाण्यात अर्ध्या तासाकरता मंद आचेवर उकळावी. साधारण पावपट पाणी उरले पाहिजे. हा काढा गार करून गाळून ठेवावा. खोकला झाल्यास 20 मि.लि. काढा दिवसातून 2 ते 3 वेळा या प्रमाणात 3 दिवस द्यावा. लहान थोर व्यक्तींना हा काढा उपयुक्त आहे. हे असताना इतर खोकल्याच्या बाटल्यांची गरज नसते.
कुडाहे जंगलात सापडणारं झाड आहे. त्याची शेंगेसारखी फळं पिकल्यावर काळी होतात ही फळे जोडीने लटकलेली असतात. म्हणून ती मध्ये जोडलेल्या दोन शेवग्याच्या शेंगांसारखी दिसतात. या झाडाच्या खोडाचे साल औषधी असते. जुलाब आणि आव यासाठी ते वापरतात. खोडाच्या सालाचा एक तुकडा कुटून त्यात एक चमचा मध मिसळून औषध तयार केले जाते. कुडयाचा काढादेखील करतात. सोळा कप पाण्यामध्ये सालाचे एक कप कूट घालून मिश्रण चार कप होईपर्यंत उकळा. गार करून बाटलीत भरून ठेवा. एका माणसाला एका वेळी 20 मि.लि. काढा, दिवसातून तीनदा द्यावा.
काही सोपे घरगुती उपाय1. हळद ही एका वनस्पतीच्या कंदाची पूड असते. आपल्या देशात ती जेवणात वापरतात आणि औषध म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. शेकडो वर्षापासून तिचे औषधी गुण सर्वांना माहीत आहेत. हळदीची पूड रक्त थांबायला आणि जखम बरी करण्यात मदत करते. खरचटणे किंवा कापण्यावरही हळद आणि तेल लावण्याची पध्दत आहे. आंघोळ करताना दूध बेसन आणि हळदीचा लेप लावण्याची देखील पध्दत आहे. 2. त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहेडा या तीन फळांचं औषधी मिश्रण आहे. बध्दकोष्ठ, मधुमेह तसेच वजन कमी करण्याकरता याचे चूर्ण पोटात घेतात. बाहेरून लावल्यास जखमा भरून निघण्याकरता हे उपयुक्त आहे. आंघोळीच्या वेळी त्रिफळा चूर्ण लावल्यास त्वचेकरतादेखील याचा उपयोग होतो. हे चूर्ण दात घासण्याकरताही वापरतात. घशावर सूज आल्यास, हिरडयातून रक्त येत असल्यास किंवा तोंड आल्यावर याच्या काढयाने गुळण्या करतात. 3. सांधेदुखीकरता तेलाने मालिश करणे चांगले. पण औषधांचीदेखील गरज असते. 4. ज्येष्ठमध ही एक अतिशय गुणकारी वनस्पती आहे. हिच्या सुक्या काटक्या मिळतात. घसा बसल्यास याच्या खोडाची पूड मधात कालवून देतात. ही पूड वरवरचा घशातील खोकलाही बरा करते. गाईच्या दुधाबरोबर पूड घेतल्यास मेंदूची क्षमता वाढवण्यात याचा उपयोग होतो. ही वनस्पती शरीरात थंडावा निर्माण करणारी असते. म्हणूनच पित्तदोषाच्या आजारांवर हिचा वापर करतात. 5. चमकदार त्वचेकरता ज्येष्ठमध पूड आणि हळद दुधात कालवून लावावी. शतावरीची पूड दुधाबरोबर घेतल्यास शक्तिवर्धक औषधासारखा उपयोग होतो आणि आरोग्य सुधारते. 6. आम्लतेसाठी आवळयाची पूड तुपात कालवून पोटात घेतात. 7. पोटात जळजळीकरता गुलकंद आणि तूप उपयोगी आहे. 8. कोरडया खोकल्याकरता गरम किंवा कोमट पाणी प्यावे. 9. जुलाब होत असल्यास शरीरातील पाणी भरून येण्यासाठी लिंबाचा रस, साखर आणि मीठ घ्यावे. 10. कोरडया खोकल्याकरता मध चांगला. इतर औषधे मधात घोळवून देण्यासाठी पण उपयोग होतो. 11. वजन कमी असल्यास ते वाढवण्याकरता दूध आणि तूप उपयुक्त आहेत. 12. झोप लागत नसल्यास, तेलाने डोक्याला मालिश करावे. तसेच गायीच्या तुपाने तळपायाला मालिश करावी. वनौषधींबद्दल अधिक माहिती आपल्याला इतर आजार आणि विषयांच्या माहितीसोबत मिळेलच.

महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या

महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या

महाराष्ट्र स्थान- विस्तार- सीमा- लोकसंख्या (Maharashtra General Information Short Notes)
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना: १ मे १६३०

२) महाराष्ट्राचे स्थान व विस्तार:

अक्षांश: १५.८° उत्तर ते २२.१° उत्तर
रेखांश: ७२.६° पूर्व ते ८०.९° पूर्व

शेजारील राज्य :

पूर्वेस- छत्तीसगड , आग्नेयेस – आंध्रप्रदेश, दक्षिणेस- कर्नाटक आणि गोवा, उत्तरेस- मध्यप्रदेश, पश्चिमेस- अरबी समुद्र, वायव्येस- दादरा, नगर हवेली व गुजरात.

३) दक्षिणोत्तर अंतर    : सुमारे ७०० कि.मी.

४) पूर्व-पश्चिम अंतर    : सुमारे ८०० कि.मी.

५) समुद्र किनारा      : ७२० कि.मी.

६) राजधानी        : मुंबई

७) उपराजधानी         : नागपूर

८) प्रशासकीय विभाग     : सहा

९) प्रादेशिक विभाग     : चार

१०) एकूण जिल्हे         : ३६

११) जिल्हा परिषदा     : ३४ (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जिल्हा परिषद नाहीत)

१२) तालुके         : ३५५

(खालील माहिती २०११ च्या जणगणनेनुसार आहे)

१३) महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या     : ११,२३,७२,९७२

१४) महाराष्ट्राची पुरुष लोकसंख्या     : ५,८३,६१,३९७

१५) महाराष्ट्रातील स्त्री लोकसंख्या     : ५,४०,११,५७५

१६) महाराष्ट्रातील पुरुष-स्त्री प्रमाण : १०००:९१५

१७) लोकसंख्येची घनता         : ३६५ व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर

१८) लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात क्रमांक:    दुसरा

१९) महाराष्ट्रातील एकूण साक्षरता     : ८२.९१%

२०) पुरुष साक्षरता         : ८९.८२%

२१) स्त्री साक्षरता         : ७५.४८%

२२) ग्रामीण साक्षरता         : ७७.०९%

२३) नागरी साक्षरता         : ८९.८४%

२४) ग्रामीण लोकसंख्या         : ५४.७७%

२५) नागरी लोकसंख्या         : ४५.२३%

२६) महाराष्ट्राचा राज्यपक्षी     : हरियाल (कबुतराच्या जातीचा एक पक्षी)

२७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी    : शेकरू (मोठी खार)

२८) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष     : आंबा

२९) महाराष्ट्राची राजभाषा         : मराठी

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार-

महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार –

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने


2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने


3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने

4. उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने / मान्सून वने

5 . उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने

6. उष्ण कटिबंधीय काटेरी वने

7. किनारपट्टीवरील खारफुटीची वने

1. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
वार्षिक पर्जन्यमान 200 सेंमी पेक्षा जास्त असलेल्या भागात ही वने आढळतात .

महाराष्ट्रात सह्याद्रीचा घाटमाथा , माथेरान , महाबळेश्वर , पाचगणी , कोयना , दक्षिण कोकणात राधानगरी , आंबोली या ठिकाणी हि वने आढळतात .

वैशिष्ठ्य-

घनदाट वनांचे आच्छादन वृक्षांची उंची साधारण 45 ते 60 मी .

हि बने नेहमी सदाहरित व अतिशय घनदाट असतात .

हि वृक्षे दाटीवाटीने व सलग वाढलेली असतात .

वृक्षांचा प्रकार –

जांभूळ , फणस , नागचंपा , कळब , कावसी , पांढरासिडार , शिसव , ओक , जंगली आंबा व तेल्या ताड इ .

वेल व झुडपी वेत करवंद , बामणी , निर्गुडी , रानकेळी , व बांबू .

आर्थिक महत्व-

या वनस्पती आर्थिकदृष्ट्या फार महत्वाची नसतात . या वनातील लाकूड कठीण असते .

2. उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने
वार्षिक पर्जन्यमान 150 ते 200 सेंमी असते त्या प्रदेशात हे वने आढळतात .

कोकण किनारपट्टीच्या भागात व घाटमाथ्यावर हि वने आढळतात .

महाराष्ट्रातील 8 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्ठ्ये-

सदाहरित वनापेक्षा कमी उंचीची म्हणजे 20 ते 30 मी एवढी उंची असते .

हि वने सलग पट्ट्यात न वाढता तुटक स्वरूपात वाढतात .

सर्व वृक्षांची पाने हि एकाच वेळी गळून पडत नाहीत .

विशिष्ट कालावधीने ती गळतात म्हणून ती वने हिरवीगार असतात .

वृक्षांचा प्रकार-

नारळ , सुपारी , आंबा , कदंब , शिसव , बेहडा , केन , किंजल , फणस , बिबळा , शेवरी , ऐन , व किंजल इ .

आर्थिक महत्व-

हि वने आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतात .

वृक्षांचा वापर इमारत व फर्निचरसाठी केला जातो .

महाबळेश्वर , माथेरान , भिमाशंकर परिसरात मध गोळा करण्याचा व्यवसाय चालतो .

3. उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने
हि वने सह्याद्री पर्वतरांगांच्या 1200 मी . पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात .

उन्हाळा कडक व हिवाळा थंड अशा प्रदेशात हि वने आढळतात .

पर्जन्यमान 350 सेंमी ते 400 सेंमी पेक्षा अधिक .

वैशिष्ट्ये-

वृक्षांचे लाकूड मऊ असते .

अनेक प्रकारची वृक्ष , वेली , झुडपी या भागात असतात .

त्यामुळे ती हिरवी दिसतात .

वृक्षांची विविधता या ठिकाणी जास्त असते .

वृक्ष-

अंजन , जांभूळ , बेहडा , हिरडा , आंबा , बकुळ , कारवी , शेंदरी , काटेकवट , तेजपान , लव्हेंडर इ .

प्रदेश-

अस्तभा डोंगर , सातपुडा ( नंदुरबार ) , गाविलगड टेकड्या ( अमरावती ) , भिमाशंकर , महाबळेश्वर , पाचगणी .

आर्थिक महत्व-

वन औषधी तयार करणे व तिचा विक्रीचा व्यवसाय करणे .

मध गोळा करणे व मधुमक्षिका पालन केंद्र चालवणे .

विविध प्रकारची फुले गोळा करून वनौषधी , पेय तयार करणे .

4 . उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी / मान्सून वने
हि वने जास्त उंच व मध्यम पावसाच्या प्रदेशात आढळतात .

पर्जन्यमान 100 सेंमी ते 150 सेंमी .

महाराष्ट्रातील 30 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्टये-

हि वने पावसाळ्यात वाढतात , तर उन्हाळ्याच्या सुरवातीला यांची पाने गळतात .

झाडाची उंची -30 ते 40 मी

पावसाळा सुरू झाल्यावर वृक्षांना नवीन पालवी फुटतात .

या प्रकारची वने जास्त घनदाट नसतात .

वृक्ष –

पिंपळ , तेंदू , महू , साग , साल , चंदन , पळस , कांचन , अर्जुन , आवळा , खैर , शिसव .

प्रदेश-

पूर्व महाराष्ट्रात भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली , तसेच सह्याद्रीचा पर्जन्यछायेचा प्रदेश , सातमाळा , हरिशचंद्र , बालाघाट , महादेव डोंगररांगा , धुळे , नाशिक , पुणे , ठाणे , कोल्हापूर या जिल्ह्यात हि वने आढळतात .

आर्थिक महत्व-

सागाच्या लाकडाचा वापर इमारत व फर्निचरसाठी होतो .

डिंक , लाख , मध गोळा करणे , तेंदूची पाने गोळा करणे , मोहाची फुले गोळा करणे इत्यादी व्यवसाय चालतात .

वनौषधी , वनफुले इ . विक्री व्यवसाय या वन प्रकारात चालतो .

5 . उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने
तीव्र उन्हाळा असणाऱ्या व जास्त तापमानाच्या व कमी पर्जन्याच्या प्रदेशात हि वने आढळतात .

पर्जन्यमान 80 ते 120 सेंमी .

महाराष्ट्रातील 60 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्ट्ये-

हि वने अतिशय विरळ असतात , वृक्षांना काटे असतात .

मध्यम उंचीची व झुडपांची स्वरूपात आढळतात . वनातील वृक्षांची पाने हि उन्हाळ्याच्या सुरवातीला गळतात .

वृक्ष-

बोर बेल पळस , अंजन , आवळा , साग , खैर , तेंदू हे वृक्ष आढळतात .

प्रदेश-

सह्याद्रीचा पूर्व उतार , सातपुडा , अजिंठा डोंगररांगा , मराठवाडा , विदर्भ या प्रदेशात तसेच जळगाव , बुलढाणा , अमरावती , नागपूर , भंडारा , गोंदिया या जिल्ह्यात आढळतात .

आर्थिक महत्व-

सागवान लाकडाचा समावेश असल्यामुळे आर्थिकदृष्टया महत्वाची .

मध , डिंक , लाख , व कात तयार करण्याचा व्यवसाय या वन प्रकारात चालतो .

तेंदूची पाने गोळा करून विडी उद्योग चालतो .

6 . उष्ण कटिबंधीय काटेरी वने
महाराष्ट्र पठारावरील कमी पावसाच्या व कायम अवर्षणग्रस्त प्रदेशात हि वने आढळतात .

पर्जन्यमान 80 सेंमी पेक्षा कमी या वनस्पतींना पोषक हवामान नसल्यामुळे त्याची पुरेशी वाढ होत नाही .

वनस्पती खुरट्या व काटेरी असतात .

महाराष्ट्रातील 1 % वने या प्रकारात मोडतात .

वैशिष्ट्ये-

या वनातील वृक्षांच्या फांद्यांना काटे असतात .

पानाच्या टोकावर शेवटी काटे असतात .

पाण्याच्या शोधार्थ वृक्षांची मुळे जमिनीत खूप खोलवर गेलेली असतात .

वृक्षांच्या पानाचा आकार लहान असतो .

वृक्षांचे लाकूड टणक असते व वृक्षांची साल जाड असते .

वृक्ष-

बोर , कोरफड , धामण , सालाई , बाभूळ , निंब , हिरडा , निवडुंग , हिवर , घायपात , इ .

प्रदेश-

जळगाव , धुळे , अहमदनगर , सातारा , सांगली , पुणे , कोल्हापूर , सोलापूर या जिल्ह्यात तसेच मराठवाडा , विदर्भ भागातही हि वने आढळतात .

7. किनारपट्टीवरील खारफुटीची वने
पश्चिम किनारपत्तीलगत नद्यांच्या मुखाशी भरती- अहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खड्यांची निर्मिती झाली आहे .

या प्रदेशात या वनस्पती आढळतात .

या वनांचे महाराष्ट्रात नगण्य म्हणजे 0.1 % आहे .

या वनाना कांदळवने म्हणतात .

वैशिष्ट्ये-

हि वने दाट व एकमेकांत वाढलेली असतात , दलदलयुक्त प्रदेशातून वर आलेली असतात .

वृक्षांची उंची फार नसते .

या वनातील वृक्षांना सुंद्री असे म्हणतात .

ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी या झाडांची मुळे जमिनीमधून वर अशी उलटी वाढतात .

वृक्ष-

चिपी , आंबेटी , काजळा , मरांडी , कांदळ व तिवरी .

प्रदेश-

आचरा , रत्नागिरी , देवगड , वैतरणा , मुंब्रा , श्रीवर्धन , कुंडलिका , वसा या प्रदेशात आढळतात .

आर्थिक महत्व-

लाकूड हलके असल्यामुळे व पाण्याच्या संपर्कात वाढल्यामुळे होड्या व बोटी तयार करण्यासाठी लाकडाचा वापर होतो .

या वनांमुळे सागरकिनारपट्टीचे विनाशकारी लाटांपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होते .

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात १३ पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र पोलीस
देश
भारत ध्वज भारत
विभाग
पोलीस
आकार
११२,३७२,९७२ (२०११)
ब्रीदवाक्य
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
मुख्यालय
मुंबई
सेनापती
श्री.रजनीश सेठ (फेब्रु 2021)
संकेतस्थळ
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात १३ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी
संपादन करा
भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी
संपादन करा
रजनीश सेठ (भारतीय पोलीस सेवा) पोलीस महासंचालक - १९ फेब्रुवारी २०२२
Sanjay Pandey (भारतीय पोलीस सेवा) पोलीस महासंचालक - 10th April 2021
राजनीश सेठ (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -११ मार्च २०१९
कुलवंत कुमार सरागंल (भारतीय पोलीस सेवा)पोलीस आयुक्त -२ नोव्हेंबर २०१८
एस.जगन्नाथन RR (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -२६ मार्च २०१९
संजीव कुमार सिंघाल (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त -२० मे २०१९
प्रभात कुमार (भारतीय पोलीस सेवा) पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हा अधिकारी) ३१ मे २०१८
राजेश प्रधान (भारतीय पोलीस सेवा) (Estt.)[[ विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकारी २५ मे २०१९
कृष्ण प्रकाश (भारतीय पोलीस सेवा) (Admn.)विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा १६ मे २०१९
मिलिंद भाराबें (भारतीय पोलीस सेवा) (Admn.) विशेष पोलीस महानिरीक्षक-२१ जून २०१९
ब्रिजेश बी. सिंग (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक ११ जानेवारी २०१६
मोहम्मद कैसेर खालीद (भारतीय पोलीस सेवा) २८ जून २०१६
प्रताप दिघवेकर (भारतीय पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक ५ मे २०१९
एच.एम.बैजाल (भारतीय पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक २४ आॅगस्ट २०१९
शिला साइल (राज्य पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक 23 ऑगस्ट २०१९
मनोज नवल पाटील (राज्य पोलीस सेवा) पोलिस महानिरीक्षक १६ सप्टेंबर २०१९
व्ही.बी.देशमुख (भारतीय पोलीस सेवा) सहायक पोलीस महानिरीक्षक ३१-७-२०१८
अभिषेक भगवान त्रिमुखे (भारतीय पोलीस सेवा) सहायक पोलीस महानिरीक्षक १६-७-२०१९
जयश्री कोंडिबा जाधव (राज्य पोलीस सेवा) आर्थिक गुन्हा अधिकारी ७-५-२०१९
बालसिंग खंडुसिंग राजपुत (राज्य पोलीस सेवा) ८-३-२०१६
सचिन सुरेश पांडेकर (१-११-२०१८)
विशेष ऑपरेशन
संपादन करा
राजेंद्र सिंह (RR) २५-३-२०१९
बजराज बनसोडे (राज्य पोलीस सेवा) २२-७-२०१९
दहशतवाद विरोधी पथक
संपादन करा
देवेन भारती (भारतीय पोलीस सेवा) अतिरिक्त पोलीस महासंचालक १६-५-२०१९
डॉ.सुहास वारके (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक २०-२-२०१९
जयवंत नाईकवारे (भारतीय पोलीस सेवा)
विनाय कुमार राठोड (राज्य पोलीस सेवा)
विक्रम देशमुख ( भारतीय पोलीस सेवा)
रविंद्र सिंग परदेशी
Nagpur ANO
संपादन करा
आर.जी.कदम
एस.एच.रिझावी (PI)
Force One
संपादन करा
डॉ.सुखवीदर सिंग (भारतीय पोलीस सेवा)
किरण कुमार चोहान (राज्य पोलीस सेवा)
संदीप डोईफोडे (राज्य पोलीस सेवा)
अमरसिंह जाधव (राज्य पोलीस सेवा)
राज्य इंटेलिजन्स विभाग
संपादन करा
रेशमी शुक्ला (भारतीय पोलीस सेवा)
अमितेश कुमार
सत्यनारायण
यशस्वी या दव
सुधाकर पठारे भारतीय पोलीस सेवा
अजित अंबादास बोह्राडे राज्य पोलीस सेवा २८-७-२०१९
भरत तागंडे राज्य पोलीस सेवा
संजय जाधव भारतीय पोलीस सेवा
पुरस्वोतंम कराड राज्य पोलीस सेवा
नम्रता पाटील राज्य पोलीस सेवा
रुपाली खैरमोडे राज्य पोलीस सेवा
राजा रामसम्य भारतीय पोलीस सेवा
उज्वला वानकर
रमेश चोपाडे
अनिता पाटील
संदीप जाधव
कल्पना बरवाकर
संजय बारकुंड
रुपाली खौरमोडे
महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी
संपादन करा
पी.व्ही.देशपांडे (भारतीय पोलीस सेवा)
बृह-मुंबई पोलीस आयुक्त
संपादन करा
संजय बर्वे भारतीय पोलीस सेवा
नवल बजाज भारतीय पोलीस सेवा
व्ही.के.चौबे
संतोष रस्तोगी
मधुकर पांडे
राजवर्धन
नितीश मिश्रा
लक्ष्मी गौतम
मनोज कुमार शर्मा
दिलीप सावंत
सगकाल विरेश प्रभु
सुनील कोल्हे
एस.जय कुमार
संदीप कार्नीक
ज्ञानेश्वर चैहान
प्रवीन पटवाळ
बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालय
संपादन करा
एन.आंबिका IPS
सचिन पाटील IPS
दक्षिण क्षेत्र
संपादन करा
संग्रामसिंग पी. निशादंर IPS
राजीव जैन
रश्मी करंदीकर sps
मध्य क्षेत्र
संपादन करा
अविनाश कुमार IPS
सौरभ त्रिपाठी ips
नियती दावे Rr
पूर्व क्षेत्र
संपादन करा
शशी कुमार मिना IPS
अखिलेश कुमार सिंग IPS
पश्चिम क्षेत्र
संपादन करा
मंजुमनाथ सिंगे sps
परमजीत दहीया IPS
अनिकेत गोयेल
उत्तर क्षेत्र
संपादन करा
मोहन दहिकर sps
डी.एस.स्वामी sps
क्राईम शाखा
संपादन करा
अकबर पठाण sps
शहाजी उमाप ips
क्राईम शाखा-CID
संपादन करा
दत्ता किसन नलावडे sps
सायबर गुन्हा शाखा
संपादन करा
विठ्ठल ठाकूर sps
ॲंटी नारकोटिक्स सेल
संपादन करा
संदीप लाडे IPS
आर्थिक ऑफिस विंग
संपादन करा
पराग मानेरे
विशेष शाखा-१ CID
संपादन करा
गणेश शिंदे sps
प्रशांत कदम
सशस्त्र पोलीस
संपादन करा
सी.के.मीना IPS CRPF
नंदकुमार ठाकूर sps
सुनीता सालुंके ठाकरे sps
सोमनाथ गारगे sps
अश्विनी सानप
वसंत जाधव
कायदा आणि नियम
संपादन करा
प्रनय अशोक
वाहतूक व्यवस्था
संपादन करा
रंजन शर्मा IPS
COMMRS
संपादन करा
मुंबई
पुणे
नागपूर
ठाणे
नवी मुंबई
पिंपरी चिंचवड
महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक
संपादन करा
गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
राज्य गुप्तवार्ता विभाग
दहशतवाद विरोधी पथक
महाराष्ट्र महामार्ग पोलीस
राज्य राखीव पोलीस बल
प्रशिक्षण आणि खास पथके
नागरी हक्क संरक्षण विभाग
मोटार परिवहन विभाग
पोलीस बिनतारी संदेश विभाग
भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग
प्रमुख
संपादन करा
सं.न नाव कार्यालय
१ नारायणराव मारुतीराव कामटे ८ऑगस्ट १९४७ते१०जुलै१९५५
२ मानसिंघजी मेरूजी चुडासमा ११जुलै१९५५ते२४डिसेंबर१९५९
३ कुमार श्री प्रवीणसिंगजी २५डिसेंबर१९५९ते२४जानेवारी१९६०
४ कैकश्रू जहांगिर नानावाती २५जानेवारी१९६०ते२४फेब्रुवारी१९६५
५ सय्यद मजीदुल्लाह २५ फेब्रुवारी१९६५ते१९जानेवारी१९६८
६ अनंत गणेश राजाध्यक्ष २०-जानेवारी-१९६८ ते २८- फेब्रुवारी-१९७५
७ महारुद्र गणपतराव वाघ ०१-मार्च-१९७५ते३१-मे-१९७६
८ इमानुअल सुमित्रा मोडक ०१-जून-१९७६ते३१-मार्च-१९७८
९ श्री.मधुकर गणपत मुग्वे ०१-एप्रिल-१९७८ते३१-मे-१९७८
१० श्रीधर व्यंकटेश तांखीवाला ०१-जून-१९७८ते३१-जुलै-१९७८
११ विनायक वासुदेव चौबाल ०१-ऑगस्ट-१९७८ते३१-ऑक्टोबर-१९७९
१२ वसंत विनायक नगरकर ०१-नोव्हेंबर-१९७९ते१८-मार्च-१९८०
१३ रामदास लक्ष्मण भींगे १९-मार्च-१९८०ते२३- फेब्रुवारी-१९८१
१४ सुशिलकुमार चतुर्वेदी २४- फेब्रुवारी-१९८१ते२४- फेब्रुवारी-१९८२
१५ कृष्णकांत पांडुरंग मेढेक २५- फेब्रुवारी-१९८२ते३०-एप्रिल-१९८५
१६ सुर्यकांत शंकर जोग ०१-मे-१९८५ते३१-जुलै-१९८७
१७ दत्तात्रय शंकर सोमण ०१-ऑगस्ट-१९८७ते३१-मे-१९८८
१८ सत्येंद्र प्रसन्न सिंघ ०१-जून-१९८८ते३१-जानेवारी-१९८९
१९ रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी ०१- फेब्रुवारी-१९८९ते३१-डिसेंबर-१९८९
२० श्री. वसंत केशव सराफ ०१-जानेवारी-१९९०ते३१-ऑगस्ट-१९९२
२१ एस. राममूर्ती ०१-सप्टेंबर-१९९२ते३०-जून-१९९३
२२ शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर ०१-जुलै-१९९३ते३१-ऑक्टोबर-१९९४
२३ ए. व्ही. कृष्णन ०१-नोव्हेंबर-१९९४ते३१-ऑक्टोबर-१९९५
२४ सुरेंद्र मोहन पठानिया ०१-नोव्हेंबर-१९९५ते३१-मे-१९९६
२५ अमरजित सिंघ समारा ०१-जून-१९९६ते३०-सप्टेंबर-१९९७
२६ अरविंद सिद्धेश्वर इनामदार ०१-ऑक्टोबर-१९९७ते०५-जानेवारी-२०००
२७ सुभाष चंद्र मल्होत्रा ०६-जानेवारी-२०००ते३०-जून-२००३
२८ ओम प्रकाश बाली ०१-जुलै-२००३ते३१-ऑक्टोबर-२००३
२९ सुरेंद्र मोहन शंगारी ०१-नोव्हेंबर-२००३ते३१-ऑगस्ट-२००४
३० कमल कृष्ण कश्यप ०१-सप्टेंबर-२००४ते३०-एप्रिल-२००५
३१ डॉ. पी.एस. पासरिचा ०१-मे-२००५ते२९- फेब्रुवारी-२००८
३२ अनामी नारायण रॉय ०१-मार्च-२००८ते०७- फेब्रुवारी-२००९
३३ एस. एस. विरक १४-मार्च-२००९ते३१-ऑक्टोबर-२००९
३४ अनामी नारायण रॉय २२-जानेवारी-२०१०ते३१-मे-२०१०
३५ डी. सिवानंधान ३१-मे-२०१०ते२८- फेब्रुवारी-२०११
३६ अजित पारसनीस २८- फेब्रुवारी-२०११ते३०-सप्टेंबर-२०११
३७ के. सुब्रमण्यम ३०-सप्टेंबर-२०११ते३१-जुलै-२०१२
३८ संजीव दयाल ३१-जुलै-२०१२ते३०-सप्टेंबर-२०१५
३९ प्रवीण दिक्षीत ३०-सप्टेंबर-२०१५ते३१-जुलै-२०१६
४० सतीश माथुर ०१-ऑगस्ट-२०१६ते३०-जून-२०१८
४१ डॉ. डी. डी. पडसलगीकर ०१-जुलै-२०१८ते२८- फेब्रुवारी-२०१९
४२ सुबोध कुमार जयसवाल ०१-मार्च-२०१९ ते २२-फेब्रुवारी-२०२१
४३ हेमंत नगराळे २२-फेब्रुवारी-२०२१-आतापर्यंत