Tuesday 11 August 2020

कोळ्यांचे बंड


  1) प्रथम उठाव - इ.स. 1824 ते 1829

       नेतृत्व :- रामजी भांगडीया

       मुख्य ठिकाण :- मुंबई

  2) दुसरा उठाव - इ.स. 1839 ते 1844

     नेतृत्व :- भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना     दरबारे

     मुख्य ठिकाण :- पुणे

  3) तिसरा उठाव - इ.स. 1845 ते 1850

      नेतृत्व :- रघु भांगडीया, बापू भांगडीया

      मुख्य ठिकाण :- कोकण, पुणे, नाशिक, नगर, सातारा.

🖍 कोळ्यांची मुख्यत: वस्ती ही मध्यप्रदेश, दक्षिण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व कोकण या भागात
होती.

🖍किल्ल्यांच्या बंदोबस्तामध्ये कोळ्यांचे महत्वाचे स्थान होते. परंतु इंग्रजांनी किल्यांची संपूर्ण व्यवस्था
बदलल्यामुळे कोळ्यांच्या नोकऱ्या गेल्यात व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.

🖍रांची, सिंगभूम, हजारीबाग या जिल्ह्यातील जवळपास 400 गावात कोळ्यांची वस्ती होती.

🖍 येथील कोळ्यांच्या स्थानिक प्रमुखांना इंग्रजांनी बाजूला सारुन त्यांच्याकडून शेतसारा गोळा करण्याचे अधिकार काढून घेतले व उत्तर भारतातून आलेल्या शीख व मुसलमानांच्या हाती सोपविले.

🖍 यांनी कोळ्यांकडून जबरीने महसूल गोळा करताच कोळ्यांनी त्यांच्या विरुध्द तसेच इंग्रजांविरुध्द सशस्त्र प्रतिकार केला.

🖍 कोळ्यांच्या दुसऱ्या उठावादरम्यान त्यांनी 2 घोषणा दिल्या.

1)  दुसऱ्या बाजीरावला पेशवेपद देवून पुन्हा         मराठा राज्याची स्थापना झाली आहे.

2)  संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे.

🖍तसेच त्यांनी सरकारी खजिन्यास वेढा घातला असता इंग्रजांनी 54 कोळ्यांना पकडले तर त्यातील
काहींना फाशी दिली.

🖍1845 ला बापू भांगडीयाला पकडण्यात आल्यामुळे कोळ्यांचा असंतोष वाढला व तिसऱ्या कोळी उठावाला सुरूवात झाली. यावेळी कोळ्यांनी आसपासच्या सावकारांना लुटले, कोकणाचा मार्ग

🖍अडविला व नानेघाट, माळशेस घाट ताब्यात घेतले. अखेर इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करुन शांतता प्रस्तापित केली.

🖍 कोळ्यांना रामोशी तसेच अन्य समाजाने साथ दिली असता इंग्रज हे उठाव आटोक्यात आणू शकले नाही.

🖍 वरील सर्व उठावांचे टप्पे हे कोळी, साधे कोळी, डोंगरी कोळी, सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...