Sunday 16 October 2022

महिला आशिया चषक टी२० क्रिकेट विजेतेपद सातव्यांदा भारताकडे.


 
महिलांची टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतानं सातव्यांदा जिंकली आहे. बांगलादेशात सिल्हेट येथे काल झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ६९ चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ९ बाद ६५ धावसंख्येवर आटोपला. भारताच्या रेणुका सिंगनं केवळ ५ धावात ३ बळी घेतले.

हे आव्हान सहज पार करताना भारतानं केवळ ८ षटकं आणि ३ चेंडूत २ बाद ७१ धावा करत प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवला.

मात्र, भारताची भरवशाची खेळाडू स्मृती मनधानानं २५ चेंडूत नाबाद ५१ तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद ११ धावा करत भारतानं विजयाचं लक्ष्य सहज गाठण्यात मोलाची भूमिका बजावली.

  रेणुका सिंगला सामनावीर

दीप्ती शर्माला मालिकावीर (मालिकेत ९४ धावा आणि १३ बळी)

केंद्रीय क्रीडा मंत्री :- अनुराग ठाकूर.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...