07 November 2020

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :


1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

1907 - हिंगणे महिला विद्यालय.

1910 - निष्काम कर्मकठ.

1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

1 जानेवारी 1944 - समता संघ.

1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

1948 - जातींनीर्मुलन संघ.

1918 - पुणे - कन्याशाळा.

1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :


मानवी समता - मासिक.

1893 - विधवेशी पुनर्विवाह.

1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.


संस्थात्मक योगदान :


1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.

संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.

18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.

कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.


आचार्य यांचे लेखन :


1923-महाराष्ट्र धर्म मासिक.

गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

मधुकर(निबंधसंग्रह)

गीता प्रवचने.

'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.

विचर पोथी.

जीवनसृष्टी.

अभंगव्रते.

गीताई शब्दार्थ कोश.

गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.


वैशिष्टे :


वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.

गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.

मंगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.

'जय जगत' घोषणा

राजर्षि शाहू महाराज :



जन्म - 16 जुलै 1874.

मृत्यू - 6 मे 1922.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

एक कल्याणकारी राजा.

संस्थात्मक योगदान :


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917 - विधवा विवाहाचा कायदा.

1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.

ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :


महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

उदार विचार प्रणालीचा राजा.

राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.


कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.


शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.


टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

1857 च्या पूर्वीचे उठाव :



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)


गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

हटकरांचा उठाव - मराठवाड्यात


नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.

नेता - नौसोजी नाईक

प्रमुख ठाणे - नोव्हा

ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

खानदेशातील भिल्लाचा उठाव


भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

काजरसिंग नाईकचा उठाव:


1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

आधुनिक भारताचा इतिहास



भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

गोंद्या आला रे .....



कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून रँडवर ही कारवाई करणारे तीन युवा क्रांतिकारक चाफेकर बंधू यांनीही फाशीच्या तक्तावर चढून आत्माहुती दिली. 


त्यांच्या या बलिदानाने साऱ्या देशात खळबळ उडाली. चाफेकर बंधू अमर झाले.


वासुदेव, दामोदर व बाळकृष्ण हे तिघे चाफेकर बंधू मुळचे कोकणातले. त्यांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवडला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले.


ते लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले व त्यांच्या कार्याला दिशा व गती लाभली. १८९7मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. 


रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची व रँडचा वध करण्याची योजना त्यांनी तयार केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव भारतातही साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. 


याच संधीचा फ़ायदा घेत दामोदर चाफेकर यांनी गणेश खिंडीत पाळत ठेवली व २२ जून १८९७ च्या मध्यरात्री रँडच्या घोडागाडीवर चढून जवळून गोळ्या झाडल्या. रँड काही काळ कोमात राहिला व ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. 


याचवेळेस दामोदराचा  भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.


चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू हुतात्मा झाले.


तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी स्वातंत्र्य लढ्यास बलिदान करण्याची जगातील ही बहुधा पहिली व एकमेव घटना!


त्यांच्या तेजस्वी स्मृतींना आदरांजली!

Online Test Series

डेली का डोज


1.हाल ही में किस देश के पूर्व प्रधानमंत्री जॉन टर्नर का 91 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a.    कनाडा✔️

b.    नेपाल

c.    जापान

d.    रूस


2.अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (आइएमएफ ) के कार्यकारी निदेशक का सलाहकार किसे नियुक्त किया गया है?

a.    अनिल अग्रवाल

b.    सीमांचल दास✔️

c.    राहुल सचदेवा

d.    मोहन त्यागी


3.अंतरराष्ट्रीय शांति दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?

a.    10 मार्च

b.    12 अप्रैल

c.    21 सितम्बर✔️

d.    15 जून


4.हाल ही में किस देश में कोरोना के बढ़ते संक्रमण के कारण दूसरी बार देशव्यापी लॉकडाउन लगाया गया है?

a.    भारत

b.    चीन

c.    रूस

d.    इजराइल ✔️


5.किस हाईकोर्ट ने हाल ही में हर्षवर्धन लोढ़ा को बड़ा झटका देते हुए एमपी बिड़ला समूह के सभी पदों से तत्काल हटाने का फैसला दिया है?

a.    कलकत्ता हाईकोर्ट✔️

b.    पटना हाईकोर्ट

c.    दिल्ली हाईकोर्ट

d.    इलाहाबाद हाईकोर्ट


6.हाल ही में किस केंद्रीय मंत्री ने मोदी कैबिनेट से कृषि सम्बन्धी विधेयक का विरोध करते हुए अपने पद से इस्तीफा दे दिया है?

a.    नरेन्द्र सिंह तोमर

b.    हरसिमरत कौर✔️

c.    कैलाश चौधरी

d.    परषोत्तम रूपाला


7.हाल ही में किस देश ने लोकप्रिय चीनी सोशल मीडिया ऐप टिकटॉक और वीचैट को राष्ट्रीय सुरक्षा के मद्देनजर प्रतिबंधित करने का आदेश जारी किया है?

a.    नेपाल

b.    पाकिस्तान

c.    बांग्लादेश

d.    अमेरिका✔️


8.रॉ के पूर्व प्रमुख अनिल धस्माना को कितने साल के लिए राष्ट्रीय तकनीकी अनुसंधान संगठन (एनटीआरओ) का नया अध्यक्ष बनाया गया है?

a.    पांच साल

b.    चार साल

c.    तीन साल

d.    दो साल✔️


9.भारत ने कोविड-19 महामारी के अर्थव्यवस्था पर पड़े प्रभाव से निपटने में मदद हेतु मालदीव को कितने करोड़ डॉलर की वित्तीय सहायता उपलब्ध करायी है?

a.    25 करोड़ डॉलर✔️

b.    15 करोड़ डॉलर

c.    20 करोड़ डॉलर

d.    30 करोड़ डॉलर


10.हाल ही में किस राज्य सरकार ने मुख्यमंत्री महिला उत्कर्ष योजना (MMUY) का शुभारंभ किया है?

a.    बिहार

b.    पंजाब

c.    गुजरात✔️

d.    दिल्ली




मलय.


1) मलयगिरि : 


🅾️दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.


🅾️अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम्‌ टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्‍या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.


🅾️पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.


🅾️या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.


2) भारतातील एक प्राचीन ठिकाण. 

याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.


🅾️रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.


ह्युमिक अँसिड.



🧩१५ कारणे का वापरावे पिकांसाठी ह्युमिक अँसिड....


🅾️सद्रिय शेतीचे महत्त्व आता सर्वांनाच समजले आहे. परंतु हि शेती अधिक कार्यक्षम पद्धतीने कशी करु शकतो हे शेतक-याने जाणुन घेणे खुप महत्वाचे आहे. सेंद्रिय शेती अधिक फायदेशिर करण्यासाठी शेतीसाठी लागणारे आवश्यक घटकांचा म्हणजेच माती, पाणी, हवा यांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करता येईल ते पहाणे गरजेचे आहे. यासर्व घटकांचा पुरेपुर वापर करण्यासाठी ह्युमस /ह्युमिक अँसिडचा वापर करणे आवश्यक आहे. ह्युमिक अँसिडचा वापर करणे प्रत्येक शेतक-यासाठी अनिवार्यच झाले आहे.


🧩हयुमस /ह्युमिक अँसिड?


🅾️हयुमस म्हणजे सेंद्रिय घटक म्हणजेच  पालापाचोळा, जनावरांची विष्टा, शेतातील इतर सेंद्रिय पदार्थ यांच्या विघटनातुन तयार होणारा पदार्थ आहे. हा पदार्थ म्हणजे अनेक सेंद्रिय घटकांचे मिश्रण असुन हे पिकांच्य सर्वांगिण वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे.


🧩हयुमिक अँसिडचे गुणधर्म....


🅾️हयुमिक अँसिड हे खत नसुन यात अतिशय अल्प प्रमाणात सुक्ष्म व मुख्य अन्नद्रव्ये असुन मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारणारे भुसुधारक आहे.हे मानवनिर्मीत नसुन पुर्णपणे नैसर्गिक पदार्थ आहे.ह्युमिक अँसिडमध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असुन हायट्रोजन अतिशय अल्प प्रमाणात असतो. तसेच त्यात ४% पर्यंत नत्र असते.ह्युमिक अँसिड हे मुख्य करुन पावडर, दाणेदार स्वरुपात तसेच द्रवरुपातही वापरता येते.


🧩हयुमिक अँसिडचे फायदे ...


🅾️हयुमिक अँसिडमुळे मातीची रचना सुधारते तसेच पिकाची नत्र, स्फुरद, पालाश शोषण्याची क्षमता ही सुधारते.


🅾️मातीचा सामु स्थिर ठेवण्यास फायदेशिरनत्र स्थिरिकरण क्षमतेला चालना देऊन मातीतील नत्राची कमतरता भरुन काढते.ह्याचाच परिणाम त्या मातीतील पीक सशक्त व टवटवीत रहाण्यास फायदेशिर ठरते.ह्युमिक अँसिडचा वापर केल्यास पिकांसाठी आवश्यक असणा-या बुरशींची वाढ होऊन ह्या बुरशीमुळे मातीपासुन उद्भवणारे रोगांपासुन संरक्षण मिळण्यास मदत होते.


🅾️हयुमसयुक्त मातीमधील जलधारण क्षमता साधारण मातीच्या सातपट अधिक असते म्हणुनच दुष्काळयुक्त भागात ह्युमिक अँसिडचा वापर खुप महत्वाचा आहे.


🅾️जमिन हलकी होउन त्यात हवा खेळती राहते व मुळांची वाढ चांगली होते.याच्या वापरामुळे जमिनीतील स्फुरद, कल्शिअम, लोह यांचे उपलब्ध रुप तयार होते व पिकास हि अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरुपात मिळतात.


🅾️बीजप्रक्रिया म्हणुन वापर केल्यास बियांची उगवण चांगली होण्यास मदत होते.ह्युमिक अँसिडच्या वापरामुळे जिवाणुंना कार्बन पुरविला जातो व त्यामुळे जिवाणुंची संख्या वाढते.सोडियम व इतर विषारी रसायनांपासुन मातीवर होणारे दुष्परिणाम थांबवण्यास हे अतिशय उपयोगी पडते.


🅾️यरिया तसेच इतर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिन नापिक होण्यापासुन वाचवते.रासायनिक खतांची कार्यक्षमता ३०% पर्यंत वाढवते त्यामुळे खतांचा खर्च कमी येतो.सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या पांढ-या मुळींची वाढ जलद होते.


मस्लिम सामाजिक धार्मिक आंदोलन


♦️फराजी आंदोलन:-


◾️वर्ष:-1804


◾️सथान:-फरीदपूर


◾️सस्थापक:-हाजी शरीयतुला व दादू मियाँ


♦️तयुनी आंदोलन:-


◾️वर्ष:-1839


◾️सथान:-ढाका


◾️सस्थापक:-करामाती आली


♦️दवबंद आंदोलन:-


◾️वर्ष:-1867


◾️सथान:-देवबंद


◾️महम्मद कासीम ननोतवी व अहमद गंगोही


♦️अलिगढ आंदोलन:-


◾️वर्ष:-1875


◾️सथान:-अलिगढ


◾️सर सय्यद अहमद खान


♦️अहमदिया आंदोलन:-


◾️वर्ष:-1889-90


◾️सथान:-फरीदकोट


◾️सस्थापक:-कादिया के मिर्जा गुलाम अहमद


हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा‼️‼️



🦋हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे 8 नोव्हेंबर 2020 रोजी उद्घाटन होणार आहे. ते हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.


🅾️ठळक बाबी


🦋जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.


🦋रो-पॅक्स फेरी व्हेसलचे ‘व्होएज सिम्फनी’ या नावाचे तीन डेकचे जहाज आहे. त्याची क्षमता 2500-2700 मेट्रिक टन आहे. त्याचबरोबर 12000 ते 15000 GT सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. या फेरी बोटीच्या मुख्य डेकवरून 30 मालमोटारी (प्रत्येकी 50 मेट्रिक टन वजनाच्या) वाहून नेता येणार आहेत. अप्पर डेकवर 100 प्रवासी गाडया आणि सर्वात वरच्या प्रवासी डेकवर  500 प्रवासी आणि त्याव्यतिरिक्त जहाजावरील 34 कर्मचारी आणि आदरातिथ्य करणारा कर्मचारी वर्ग यांची वाहतूक होऊ शकणार आहे.

सेवेचे फायदे


🦋हजिरा ते घोघा या दरम्यान जलवाहतुकीचे अनेक लाभ होणार आहेत. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये हा जलमार्ग ‘गेट वे’ म्हणून काम करणार आहे. त्यामुळे घोघा ते हजिरा यांच्यामधले 370 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते अवघे 90 किलोमीटर होणार आहे. त्याचबरोबर सामानाच्या वाहतुकीचा वेळ 10 ते 12 तासांवरून फक्त चार तास होणार आहे.


🦋परिणामी, अंदाजे प्रतिदिनी 9000 लिटर इंधनाची बचत होऊ शकणार आहे. या जलमार्गामुळे वाहतुकीच्या कोंडीचा त्रास कमी होणार. त्याचबरोबर वाहनांची वाहतूक कमी झाली तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमालीचे कमी होणार आहे. प्रतिदिनी अंदाजे 24 मेट्रिक टन म्हणजेच प्रतिवर्षाला 8,653 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ शकणार आहे.


🦋फरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागामधील बंदरांच्या क्षेत्रात फर्निचर आणि खते उद्योगाला चालना मिळणार आहे. गुजरातमध्ये विशेषतः पोरबंदर, सोमनाथ, व्दारका आणि पालिताना येथे पर्यटनाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे. फेरी सेवेमुळे गिर येथील वन्यजीव अभयारण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.



🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी


🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी


🔶 धवनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स


🔶 गरह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी


🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी


🔶मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी


🔶 पराणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी


🔶पथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी


🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी


🔶धातूंचा अभ्यास - मेटलर्जी


🔶 भगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी


🔶जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी


🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी


🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स


🔶पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी


🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी


🔶आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स


🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी


🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी


🔶 हरदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी


🔶अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स


🔶पराणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी


🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी


🔶जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री


🔶सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी


🔶 रगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स


🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी


🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर


🔶शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी


🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी


🔶 मतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी


🔶 भपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

महाराष्ट्र नैसर्गिक सीमा


वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या


उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या


ईशान्य:- दरकेसा टेकड्या


पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर


दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी


पश्चिम:- अरबी समुद्र

देशी बनावटीचे स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्र



🔰सरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) देशी बनावटीच्या स्टँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.


🔴सटँड-ऑफ अँटी-टँक (SANT) क्षेपणास्त्राविषयी....


🔰त भारतीय हवाई दलासाठी (IAF) DRDO संस्थेनी विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.ते हवेतून पृष्ठभागावर मारा केले जाणारे क्षेपणास्त्र आहे.


🔰SANT क्षेपणास्त्र हेलिकॉप्टरद्वारे सोडल्या जाणाऱ्या ‘नाग (हेलीना)’ या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आहे.ते ‘लॉक-ऑन बिफोर लॉंच’ आणि ‘लॉक-ऑन आफ्टर लॉंच’ अश्या दोनही पद्धतीने मार्गदर्शित केले जाऊ शकते.

यावर्षी (Nov/Dec) MPSC चे पेपर होण्याची शक्यता उरली आहे का...?



✍️ यशाचा राजमार्गच्या  मताशी खालील दिलेल्या परीक्षा बद्दल माहिती बाबतीत आम्ही सहमत आहोत.. 🙏


मुख्यमंत्र्यांनी  पेपर  पुन्हा एकदा पुढे ढकलताना मुलांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला आणि कोरोना ही दोन कारणे सांगितली.परंतु मुख्य कारण सर्वांनाच माहीत आहे ते म्हणजे आरक्षण.आरक्षण या मुद्द्यामुळे पेपर पुढे ढकलण्यात आले ही वस्तुस्थिती आहे.तर आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने  4 आठवडे पुढे ढकलली आहे.म्हणजेच नोव्हेंबर च्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा सुनावणी होईल.आणि आरक्षणामुळे पेपर पुढे ढकलले आहेत तर आयोगाला निकाल लागेपर्यंत थांबावे लागेल.मग पुढील सुनावणीला निकाल लागेल का ?..पुढील सुनावणी ही खरे पाहता पहिलीच सुनावणी असणार आहे कारण मागील सुनावणीला राज्य सरकारचे वकील अनुपस्थित होते.त्यामुळे सुनावणी झालीच नाही.आरक्षणासारखे मुद्दे एकाच सुनावणीत निकालात निघतील याची शक्यता किती  आहे हे सर्वानाच माहीत आहे.आपल्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास नोव्हेंबर मधील सुनावणी जर पुन्हा एकदा पुढे ढकलली तर ती डिसेंबर मधे घ्यावी लागेल आणि डिसेंबर मध्ये समजा आरक्षणाचा निकाल लागला आणि पेपर घेण्याचा मार्ग मोकळा झाला तर पेपर कमीत कमी डिसेंबर end ला ला घ्यावे लागतील आणि मुख्य परीक्षा मार्च एप्रिल ला घ्यावी लागेल.असे झाले तर मग 2021 च्या पूर्व परीक्षा घेणार कधी ? ज्या की दरवर्षी एप्रिल मे मध्ये होतात... Practically पाहता यावर्षीची परीक्षा डिसेंबर मध्ये चालू करून पुन्हा पुढील वर्षाची परीक्षा एप्रिल मध्ये चालू करणे याची शक्यता कमी वाटत आहे...वरील गोष्टींना अनुसरून माझी काही मते सांगत आहे ही माझी वैयक्तिक मते आहेत.

👉काही रिक्त पदे add करून 2020 ची Ad हीच 2021 ची Ad म्हणून परीक्षा घेतली जाऊ शकते.

👉नकतेच Graduation झालेल्या विद्यार्थ्यांना 2021 चा फॉर्म भरण्याची संधी दिली जाऊ शकते.

👉पपर फेब्रुवारी अथवा एप्रिल ला होऊ शकतात.

👉मख्य परीक्षेला नेहमीप्रमाणे पुरेसा वेळ दिला जाऊ शकतो.

👉वर्ग ३ तसेच वनसेवा यांच्या परीक्षा ही 2021 मध्ये घेतल्या जाऊ शकतात.पदे कमी काढतील परंतु पेपर नक्कीच घेतील.

👉आरक्षणाच्या मुद्द्यावर जरी न्यायालयात निर्णय लवकर नाही होऊ शकला तरी त्यावर नक्कीच तोडगा काढला जाईल आणि परीक्षेचा मार्ग मोकळा होईल.

👉2021 मध्ये परीक्षा होणार हे मात्र 100% खरे.

👉 समजा वरील सर्व गोष्टी खोट्या ठरवत आयोगाने याच वर्षी पेपर घेतले तर माझ्या मते किमान December च्या शेवटच्या आठवड्या आधी पेपर घेण्याची शक्यता कमी आहे.त्यानंतर  पेपर घेतले तर ते केवळ रविवारीच होतील या भ्रमात राहू नका. कोणत्याही दिवशी घेऊ शकतात.

👉एवढ सांगण्याचा कारण हेच की आपल्याकडे किती वेळ आहे याप्रमाणे आपल्या अभ्यासाचा नियोजन करावे.

👉परत्येकाची जशी काही Prediction असतात तसेच माझेही आहे.यात कोणालाही Demotivate करण्याचा उद्देश नाहीये केवळ अभ्यासाला एक दिशा मिळावी हाच उद्देश आहे.कदाचित वरील सर्व Prediction खोटीही ठरू शकतात कारण शेवटी परिस्थितीनुसार  काय निर्णय घ्यायचा ते आयोग आणि सरकार घेणार आहे.

👉परत्येकाला परीक्षा कधी होतील हे गृहीत धरूनच अभ्यास करावा लागेल अन्यथा अभ्यासाला दिशा मिळणार नाही.

👉शवटी पुन्हा एकदा सांगत आहे आरक्षणाचा निकाल जरी प्रलंबित राहिला तरी त्यावर काहीतरी तोडगा काढून परीक्षा या 100% होतीलच.

(वरील सर्व मते ही माझी वैयक्तिक मते आहेत.याला कोणतीही अफवा अथवा अधिकृत समजू नये.खूप विद्यार्थी याबाबत विचारात असल्याने केवळ एक Prediction केले आहे)


डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप



🔰वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसा ज्यो बायडन यांना २६४ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.


🔰परसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.


🔰यावेळी विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन: 6 नोव्हेंबर


🔰दरवर्षी 6 नोव्हेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा केला जातो.


🔰सयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्या मते, गेल्या 60 वर्षांत सर्व अंतर्गत संघर्षांपैकी किमान 40 टक्के नैसर्गिक स्त्रोतांच्या शोषणाशी संबंधित होते.


🔰यद्ध व सशस्त्र संघर्षादरम्यान होणारी पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठीच्या उद्देशाने 2001 साली संयुक्त राष्ट्रसंघ महासभेनी 6 नोव्हेंबरला ‘युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून घोषित केले.


🔰हा दिवस कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचे संरक्षण आणि पर्यावरणविषयक जनजागृती करण्यासाठी समर्पित आहे. जगाच्या कोणत्याही भागात कोणत्याही सशस्त्र संघर्षादरम्यान पर्यावरणाला इजा होणार नाही याची खात्री करणे, हा या दिनाचा उद्देश आहे.

06 November 2020

Online Test Series

महत्वाच्या घटना दुरुस्त्या


४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट ५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक

४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.

१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]

५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]

७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]

७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]

२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट

७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट

९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट

२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]

२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत

२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द

३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा

५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा

५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा

६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.

८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट

८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)

९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.

९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद

९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले

९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]

१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना

१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]

११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी

११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी

११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

महिलां विषयी कायदे:



― सतीबंदी कायदा -1829

 

― विधवा पुनर्विवाह कायदा -1856


― धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866


― भारतीय घटस्फोट कायदा -1869


― मानवी हक्क संरक्षण कायदा -1993


― आनंदी विवाह कायदा -1909


― मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986


― विशेष विवाह -1954


― हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956


― विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959


― अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956


― वैद्यकी व गर्भपात कायदा -1929


― हुंडाप्रतिबंधक कायदा -1929


― बालविवाह निर्बंध कायदा -1929


― कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक  कायदा -2005


― महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन                कायदा -2005


― मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961


― समान वेतन कायदा -1976


― बालकामगार कायदा -1980


― अपंग व्यक्ती कायदा -1995


― मानसिक आरोग्य कायदा -1987


― कुटुंब न्यायालय कायदा - 1984


― राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990


― माहिती अधिकार कायदा -2005


― बालन्याय कायदा - 2000


― भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959


― अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960


― हिंदू विवाह कायदा -1955


― कर्मचारी विमा योजना -1952


― प्रसूती सुधारणा कायदा -1961

   

― अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

    

― वेश्या वृत्ती निवारण कायदा -1986

 

― हुंडा निषेध कायदा - 1986.

लोकसभेची सदस्यसंख्या ठरते कशी?



देशातील लोकसभेच्या 543 पैकी 542 मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मात्र, लोकसभेच्या सदस्यांचा हा 543 आकडा ठरला कसा? आपण इतकेच उमेदवार का निवडून देतो? याबाबतचे गणित आज जाणून घेऊयात... 


सध्या लोकसभेच्या 543 जागा (मतदारसंघ) आहेत. त्यापैकी 79 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी (एससी) आणि 41 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव आहेत. जनतेमार्फत निवडून येणाऱ्या 543 सदस्यांमध्ये घटक राज्यांच्या कमाल मर्यादेनुसार 530 खासदार निवडून येतात. 


तर केंद्रशासित प्रदेशांतून (दिल्ली 7, अंदमान-निकोबार 1, चंदीगड 1, दादरा व नगर हवेली 1, दमण व दीव 1, लक्षद्वीप 1, आणि पुदुचेरी 1) एकूण 13 सदस्य निवडून येतात. म्हणजेच, अद्याप केंद्रशासित प्रदेशांतील 7 जागा रिक्त आहेत. तशी गरज भासल्यास संसदेला या जागांमध्ये वाढ करता येईल.


▪️कमाल मर्यादा 550


भारतीय राज्यघटनेत कलम 81 नुसार लोकसभा सदस्यांची संख्या ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार, देशातील घटक राज्यांतील खासदारांची संख्या हि 530 पेक्षा अधिक व केंद्रशासित प्रदेशांतील खासदारांची संख्या 20 पेक्षा अधिक असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


देशातील प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडून खासदारांची कमाल मर्यादा हि 550 इतकी आहे. शिवाय, अँग्लो इंडियन समाजातील दोन सदस्यांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी तरतूद असल्याने लोकसभेतील खासदारांची कमाल मर्यादा हि 552 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोग



ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


▪️राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


▪️लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


▪️लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


▪️ पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03


▪️ वैशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये

--------------------------------------

• महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014

- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"



2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


- कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.