स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
26 November 2020
२६ नोव्हेंबर : संविधान दिन
🟢 घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता
🙎♀ १) अम्मू स्वामीनाथन
🙎♀ २) एनी मस्करीन
🙎♀ ३) बेगम एजाज रसूल
🙎♀ ४) दक्षयानी वेलायुधन
🙎♀ ५) दुर्गाबाई देशमुख
🙎♀ ६) हंसा मेहता
🙎♀ ७) पुर्णिमा बँनर्जी
🙎♀ ८) रेणुका रे
🙎♀ ९) सरोजिनी नायडू
🙎♀ १०) विजयालक्ष्मी पंडित
🙎♀ ११) सुचिता कृपलानी
🙎♀ १२) कमला चौधरी
🙎♀ १३) लीला रे
🙎♀ १४) मालती चौधरी
🙎♀ १५) राजकुमारी कौर
चालू घडामोडी प्रश्नसंच
📍विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोणता?
A) अँडी मरे ✅✅
B) नोव्हाक जोकोविच
C) राफेल नदाल
D) रॉजर फेडरर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
A) प्रणव मुखर्जी ✅✅
B) शरद पवार
C) लालकृष्ण आडवाणी
D) बरखा दत्त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?
A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया ✅✅
B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
C) ऑडीटर जनरल ऑफ इंडिया
D) सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
A) विश्वास नांगरे पाटील
B) सतीश माथुर ✅✅
C) संजीव द्याल
D) प्रवीण दीक्षित
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍धळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?
A) AH-48
B) AH-45
C) AH-47
D) AH-46 ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌भारताचा कॉर्पोरेट कर दरात कपात करत ____ एवढा केला, ज्यामुळे खासगी क्षेत्रासाठी अप्रत्यक्षपणे 1.45 लक्ष कोटी रुपयांचे भांडवल मिळणार.
(A) 24 टक्के
(B) 22 टक्के✅✅✅
(C) 26 टक्के
(D) 28 टक्के
📌कोणते राज्य सरकार सरकारी रुग्णालयात काम करणार्या डॉक्टरांच्या खासगी सरावावर बंदी घालणार आहे?
(A) आंध्रप्रदेश✅✅✅
(B) पंजाब
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
📌कोणत्या राज्यात NTPC भारतातले सर्वात मोठे सौर पार्क तयार करणार?
(A) तामिळनाडू
(B) कोलकाता
(C) राजस्थान
(D) गुजरात✅✅✅
📌खालीलपैकी कोणते विधान ‘INS खंदेरी’ बाबत अचूक नाही?
(A) INS ‘खंदेरी’ स्कॉर्पियन पाणबुडी मझगाव डॉक लिमिटेड (MDL) द्वारे तयार करण्यात आली आहे.
(B) INS ‘खंदेरी’ ही कलवरी श्रेणीतली डिझेल-इलेक्ट्रिक वर चालणारी लढाऊ पाणबुडी आहे
(C) पाणबुडी खंदेरीची संरचना अमेरिकेच्या नेवल ग्रुप या संस्थेने तयार केली आहे.
(D) पाणबुडी खंदेरीचे नाव हिंद महासागरात सापडणार्या घातक सॉफिश खंदेरी याच्या नावावरून ठेवले गेले आहे.
📌चीन आणि तैवान यांच्यातल्या तणावावरून तैवान आणि ___ या देशाने त्यांच्यातले राजनैतिक संबंध तोडले.
(A) किरीबाती✅✅✅
(B) फिलीपिन्
(C) जापान
(D) अफगाणिस्तान
📌कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?
(A) इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय✅✅✅
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
📌 शतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?
1) गोवा
2) तेलंगणा✅✅
3) गुजरात
4) पंजाब
📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?
1) मुंबई
2) कोलकाता
3) नाशिक✅✅
4) हैदराबाद
📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?
1) पुणे ✅✅
2) सिंधुदुर्ग
3) अमरावती
4) सोलापूर
📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?
(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक
📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?
(A) 2025
(B) 2035
(C) 2030✅✅✅
(D) 2027
📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.
(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅
(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट
📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?
(A) दिल्ली
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) केरळ✅✅✅
📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books
(A) विक्रम संपथ✅✅✅
(B) श्री प्रह्लादसिंग पटेल
(C) रीना बॅरॉन
(D) व्यंकय्या नायडू
📌कोणत्या देशाच्या मंजुरीनंतर ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठराव आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे?
(A) बोलिव्हिया
(B) ब्रुनेई
(C) क्रोएशिया
(D) कंबोडिया
📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?
(A) जागतिक व्यापार संघटना
(B) ASEAN✅✅✅
(C) BRICS देश
(D) बांग्लादेश
डेली का डोज 23 नवम्बर 2020
1.केंद्र सरकार ने किस राज्य में सूक्ष्म सिंचाई परियोजनाओं के लिए 3,971 करोड़ रुपये के ऋण को मंजूरी दी?
a. बिहार
b. तमिलनाडु✔️
c. पंजाब
d. झारखंड
2.निम्न में से किस देश को 2023 में होने वाली G-20 देशों की बैठक की अध्यक्षता प्रदान की गयी है?
a. भारत✔️
b. नेपाल
c. पाकिस्तान
d. बांग्लादेश
3.अरब सागर में भारत, सिंगापुर एवं किस देश के बीच “सिटमैक्स-20” सैन्य अभ्यास के दूसरे संस्करण को शुरू किया गया है?
a. नेपाल
b. चीन
c. रूस
d. थाईलैंड✔️
4.अमेरिका के निर्वाचित राष्ट्रपति जो बाइडन ने अपनी पत्नी जिल बाइडन के लिए निम्न में से किस भारतीय मूल की महिला को नीति निदेशक नियुक्त किया है?
a. प्रमिला जयपाल
b. कमला हैरिस
c. माला अडिगा✔️
d. मेधा नार्वेकर
5.राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) ने 22 नवंबर को अपना कौन सा स्थापना दिवस मनाया है?
a. 50वां स्थापना दिवस
b. 72वां स्थापना दिवस✔️
c. 65वां स्थापना दिवस
d. 62वां स्थापना दिवस
6.अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में डेब्यू करने की उम्र क्या निर्धारित की है?
a. 15 साल✔️
b. 20 साल
c. 25 साल
d. 12 साल
7.विश्व दूरदर्शन दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 22 अगस्त
b. 10 मार्च
c. 21 नवंबर✔️
d. 15 अप्रैल
8.विश्व मत्स्य दिवस निम्न में से किस दिन मनाया जाता है?
a. 21 नवंबर✔️
b. 15 मार्च
c. 10 अप्रैल
d. 12 जून
टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९).
म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे. हैदर अलीचा हा थोरला मुलगा. कर्नाटकातील देवणहळ्ळी (बंगलोर) या गावी जन्मला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि त्याने मौलवींकडून पारंपरिक शिक्षण आणि गाझीखान या अधिकाऱ्याच्या हाताखाली लष्करी शिक्षण घेतले होते. पहिली काही वर्षे तो हैदरबरोबर लढाईत भाग घेत असे. एवढेच नव्हे, तर स्वतंत्र रीत्याही त्याने लढाया केल्या होत्या. म्हैसूरच्या गादीवर येण्यापूर्वी १७७१ मध्ये त्याने मराठ्यांच्या सैन्याबरोबर मुकाबला दिला होता, तर १७८१ मध्ये सेनापती कर्नल बेली आणि कर्नल ब्रॅथवेट असे दोघेजण टिपूवर चालून आले असता उभयतांचा पराभव करून त्याने दोघांनाही पकडले व काही फौज कैद केली. १७८२ मध्ये हैदरच्या मृत्यूनंतर टिपू म्हैसूरच्या गादीवर आला. टिपूचे फ्रेंचांशी प्रथमपासून सख्य होते. यामुळे इंग्रज सेनापती एअर कूट हा टिपूवर चालून आला असता फ्रेंच सेनापती बुसी याने टिपूला मदत केली. सालबाईच्या तहाप्रमाणे इंग्रजांचा जो मुलूख हैदर अलीने जिंकला होता, तो परत करावा असे ठरले होते. पण टिपूस ही अट मान्य नव्हती. म्हणून इंग्रजांनी टिपूचा बीदनूर प्रांत घेतला. तेव्हा त्याने जनरल मॅथ्यूझला पकडले. त्यामुळे इंग्रजांना मंगलोरचा शांतता तह करावा लागला (१७८४). त्यानुसार एकमेकांचा घेतलेल्या प्रदेश परत करावा, असे ठरले. याच साली टिपूने नरगुंद व कित्तूर या संस्थानांवर सैन्य पाठवून लूट केली व तेथील किल्ले हस्तगत केले. टिपूचे धोरण नेहमी आक्रमक होते परंतु लढाई अंगाशी येत, असे दिसताच तो तह करी. पण पुढे तो तह कधीच पाळीत नसे. टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा. पुढे मराठ्यांच्या सैन्याने कर्नाटकातून माघार घेताच त्याने कित्तूरचा किल्ला पुन्हा हस्तगत केला आणि मराठ्यांशी कायमचे वैर निर्माण केले. निजामाने टिपूशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले ते असफल ठरले. तेव्हा कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांना टिपूविरुद्ध एकत्र आणण्यास ही संधी चांगली आहे, हे हेरून त्यांच्याशी स्नेह वाढविला. शिवाय टिपूच्या या धोरणामुळे शेजारच्या राजवटी त्यावर विश्वास ठेवीत नसत.
अशा परिस्थितीत टिपूने त्रावणकोरवर हल्ला केला तो फसला. पण दरम्यान कॉर्नवॉलिसने मराठे व निजाम यांच्याशी मैत्रीचा तह करून टिपूवर स्वारी करण्याचे ठरविले. १७९० मध्ये प्रत्यक्ष मोहिमेस सुरुवात झाली. टिपूने आपल्या कणखर नेतृत्वाखाली प्रतिकार केला. पण या तिघांच्या सैन्यापुढे त्यास अखेर शरणागती पतकरावी लागली. त्याने २३ फ्रेब्रुवारी १७९२ रोजी श्रीरंगपटण येथे तह केला. त्यानुसार निम्मा प्रदेश व तीन कोट रु. नुकसानभरपाई व ती फिटेपर्यंत दोन मुलगे इंग्रजांकडे ओलिस ठेवणे त्यास भाग पडले. या अपमानास्पद तहामुळे तो पुढे अधिकच बेफिकीर व आक्रमक झाला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तो इतरांच्या मदतीची शोधाशोध करू लागला. या संदर्भात त्याने इराण, तुर्कस्तान तसेच नेपोलियन यांच्यांशी संधान बांधून आपली बाजू बळकट करण्याचाही प्रयत्न सुरू केला. एवढेच नव्हे, तर त्याने काही फ्रेंच पलटणी नोकरीस ठेवल्या. या सर्व कारवायांसंबंधी लॉर्ड वेलस्ली याने त्यास जाब विचारला आणि तैनाती फौज स्वीकारण्यासंबंधी विचारणा केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून वेलस्लीने निजामाशी तह केला, मराठ्यांनाही त्याला यात सहभागी करून घ्यावयाचे होते. पण पेशव्यांचे धोरण अनिश्चित होते. १७९९ च्या सुरुवातीस इंग्रजांनी युद्ध पुकारले व टिपूची वेलस्लीने कुर्ग, मळवळ्ळी वगैरे काही ठाणी काबीज केली. पुढे श्रीरंगपटणास वेढा घातला. तिथे टिपून शिकस्तीचा पराक्रम केला. अखेर तो गोळी लागून मरण पावला. नंतर इंग्रजांनी भयंकर लुटमार केली. टिपूचे एक कोटी सहा लक्ष रुपायांच्या उत्पन्नाचे राज्य घेतले व काही भाग निजामाला दिला व काही भाग मुळाच्या चामराज वोडेयर यांच्या वंशजास दिला. टिपूच्या मुलांना व नातेवाईकांना २४,००० होनांचा मुलूख लावून दिला. पुढे वेल्लोरच्या बंडात टिपूच्या मुलाचा हात आहे, या सबबीवर इंग्रजांनी टिपूची जहागीर खालसा केली. अशा रीतीने टिपूचे राज्य इंग्रजांनी पुढे पूर्णतः गिळंकृत केले.
टिपूच्या खासगी जीवनासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याला दोन बायका होत्या. त्यांपैकी पहिली नवायेत मुस्लिम घराण्यातील असून हैदरने निवडली होती व दुसरी रुकय्या बानू स्वतः टिपूने निवडली होती. यांपासून त्यांस अनेक मुले झाली. त्यांत १२ मुलगे होते. यांपैकी दोन मुलगे त्याने इंग्रजांकडे ओलिस ठेवले होते. काही इंग्रज लेखकांच्या मते टिपू हा अत्यंत धर्मवेडा, क्रूर, लोभी, अविश्वासू व चंचल होता परंतु टिपूचा एकूण कारभार, राज्यव्यवस्था व धडाडी पाहिली असता, हे आरोप सबळ पुराव्यांवर आधारित आहेत असे म्हणता येत नाही. तथापि काही दुर्गुण व सेनापतींची फितूरी यांमुळे त्याच्या सुसंघटित सैन्याचा अखेर पराभव झाला, ही वस्तुस्थिती आहे.
राज्यकारभारात त्याने चोख व्यवस्था ठेवून प्रांतांची नावे बदलली. स्वतःची नवीन मापे, वजने व नाणी पाडली. एवढेच नव्हे, तर स्वतःची कालगणना सुरू करून तीमधील वर्षे व महिने यांस नवी नावे दिली. त्याचप्रमाणे मुलकी व लष्करी खात्यांत अनेक सुधारणा केल्या. त्याला कलाकौशल्याचा व वाङ्मयाचा छंद होता. फार्सी, मराठी, उर्दू व कन्नड या भाषा अवगत होत्या. त्याची मराठी पत्रे उपलब्ध आहेत. त्याने जमविलेला संग्रह लंडन, मद्रास व कलकत्ता या ठिकाणी आहे. त्यात दहाव्या शतकापासून त्या वेळेपर्यंतच्या अनेक कलाकुसरींच्या वस्तू, हस्तलिखित ग्रंथ, कुराणाची भाषांतरे, मोगल कालीन इतिवृत्ते, तवारिखा इ. साहित्य आहे. टिपूने फर्मान बनाम अलीराजा व फतह-उल्-मुजाहिदैनत या नावांचे ग्रंथ लिहिले, असे म्हणतात. तो खुतबापठणाच्या बाबतीत दक्ष असे. त्याने आपल्या नावे खुतबापठण करण्याची प्रथा सुरू केली होती.
संदर्भ :1. Ahmad, Fazl, Sultan Tippu, Lahore, 1958.
2. Forrest, Denys, Tiger of Mysore, Bangalore, 1970.
3. Hasan, Mohibbul, History of Tipu Sultan, Calcutta, 1951.
यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार
◾️आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी.
◾️ महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
◾️यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.
◾️यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.
◾️यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.
🔺यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी
◾️ यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
◾️तयांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
◾️ यरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
◾️ 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला
◾️ 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
◾️ दसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
◾️1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले
◾️1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
◾️1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले
◾️1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.
◾️ 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.
◾️ यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.
संयुगाचे नाव रेणुसूत्रे Chemical Name
पाणी(हायड्रोजन ऑक्साइड) H2O Hydrogen Oxide
अमोनिआ NH3 Ammonia
हायड्रोक्लोरिक आम्ल HCl Hydrochloric Acid
सल्फ्युरिक आम्ल H2SO4 Sulphuric Acid
कार्बनडाय ऑक्साइड CO2 Carbon Dioxide
सोडिअम ब्रोमाइड NaBr Sodium Bromide
कॅल्शिअम ऑक्साइड CaO Calcium Oxide
मॅग्ननोशीअम वलोराइड MgCl2 Magnesium chloride
पोटॉशीअम नायट्रेट KNO3 Potassium Nitrate
पोटॉशीअम कार्बोनेट K2CO3 Potassium Carbonate
पोटॉशीअम क्लोराइड Kcl Potassium Chloride
अमोनिअम सल्फेट (NH4)2SO4 Ammonium Sulphate
सोडिअम फॉस्फेट Na3PO4 Sodium Phosphate
अॅल्युमिनिअम क्लोराइड AlCl3 Aluminium Chloride
अॅल्युमिनिअम हायड्रॉंक्साइड Al(OH)3 Aluminium Hydroxide
कॅल्शिअम कार्बोनेट CaCO3 Calcium Carbonate
अमोनिअम हायड्रॉंक्साइड NH4OH Ammonium Hydroxide
सोडिअम बायकार्बोनेट NaHCO3 Sodium Bicarbonate
हायड्रॉंब्रोमीक आम्ल HBr Hydrotropic Acid
नायट्रीक आम्ल HNO3 Nitric Acid
हायड्रोजन सल्फाइड H2S Hydrogen Sulphide
कार्बोनिक आम्ल H2CO3 Carbonic Acid
फॉस्पोरिक आम्ल H3PO4 Phosphoric Acid
सोडिअम हायड्रॉंक्साइड NaOH Sodium Hydroxide
पोटॉशीअम क्लोरेट KOH Potassium Chlorate
चुनखडी (शाहाबाद) CaCO3 Calcium Chlorate
पोटॉशीअम क्लोरेट KClO3 Potassium Chlorate
पोटॉशीअम परमँगनेट KMnO4 Potassium Permanganate
मॅगनीजडाय ऑक्साइड MnO2 Manganese dioxide
मॅग्नोशीअम ऑक्साइड MgO Magnesium Oxide
झिंक सल्फेट ZnSO4 Zinc Sulphate
झिंक क्लोराइड ZnCl2 Zinc Chloride
मिथेन CH4 Methane
सिल्व्हर नायट्रेट AgNO3 Silver Nitrate
सोडिअम नायट्रेट NaNO3 Sodium Nitrate
सोडिअम सल्फेट NaSO4 Sodium Sulphate
जिपसम (कॅल्शिअम सल्फेट) CaSO4 Gypsum (Calcium Sulphate)
इपसम(मॅग्नेशिअम सल्फेट) MgSO4
Epsom (Magnesium Sulphate)
कॉपर सल्फेट (मोरचूद) CuSO4 Copper Sulphate
चुन्याची निवळी (कॅल्शिअम हायड्रॉंक्साइड) Ca(OH)2 Calcium Hydroxide
मीठ/ कॉमन सॉल्ट / सोडिअम क्लोराइड) NaCl Common Salt (Sodium Chloride)
सोडाअश/ सोडिअम कार्बोनेट Na2CO3 Sodium Carbonate
25 November 2020
२६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस ..

आज २६ नोव्हेंबर – भारतीय संविधान दिवस त्यानिमित्त आपल्या राज्यघटनेविषयी…
भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून राज्यघटना अंमलात आली.
१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.
ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.
नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो.
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २२ विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
सध्या राज्यघटनेत ४४८कलमे (३९A, ५१A यांसारखे कलमे घटना दुरुस्तीद्वारा) असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे. मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.
काही महत्वपूर्ण वैशिट्ये –
-मूलभूत आधिकार
-सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे
-संघराज्य प्रणाली
-प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये.
–विभाग –
*प्रशासकीय (Executive)
*विधीमंडळे(Legislative)
*न्यायालयीन (Judicial)
1. प्रशासकीय (Executive) – भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो.
राष्ट्रपती : भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिलीआहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो.
प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ : राष्ट्रपती संविधानात्मक प्रमुख असतात. त्यांच्या हाती नाममात्र सत्ता असते व प्रत्यक्षात प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ राज्यकारभार चालवते.
2. विधीमंडळे(Legislative) – भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात.
संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.
लोकसभा : भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले भागृह असेही म्हणतात.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत पाच वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ असते. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे.
राज्यसभा : भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभेत घटकराज्यांचे
प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात.
3. न्यायालयीन (Judicial) – : भारत हे संघराज्य आहे. केंद्रशासन आणि घटकराज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे. परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्र व घटकराज्ये अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ, भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे.
सर्वोच्च न्यायालय : भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश ‘सरन्यायाधीश’ या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे.
उच्च न्यायालय : भारताच्या संविधानातील प्रत्येक घटकराज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. सध्या आपल्या देशात २४ उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात.
जिल्हा व दुय्यम न्यायालये : ज्या न्यायसंस्थांशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो.
भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा : कायदा पद्धतीच्या प्रमुख दोन शाखा आहेत.
(१) दिवाणी कायदा (२) फौजदारी कायदा
महाराष्ट्र दिन
हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे.
१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.
२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 100 हून अधिक आंदोलक हुतात्मे झाले.
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.
कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या
नदी -------- खाडी
वैतरणा -------दातीवर
उल्हास --------वसई
पाताळगंगा------- धरमतर
कुंडलिका -------रोह्याची खाडी
सावित्री -------बाणकोट
वशिष्ठी ------दाभोळ
शास्त्री ------जयगड
शुक -------विजयदुर्ग
गड -------कलावली
कर्ली ------ कर्ली
तेरेखोल -----तेरेखोल
कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :
⬇️ [उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]
1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट
सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांनी १८४८ ते १८५२ दरम्यान १८ शाळा सुरु केल्या
🔰 भिडेवाडा , पुणे : ०१/०१/१८४८
🔰 महारवाडा , पुणे : १५/०१/१८४८
🔰 हडपसर , पुणे : ०१/०९/१८४८
🔰 ओतूर , पुणे : ०५/१२/१८४८
🔰 सासवड , पुणे : २०/१२/१८४८
🔰 आल्हाटाचे घर , पुणे : ०१/०७/१८४९
🔰 नायगाव , सातारा : १५/०७/१८४९
🔰 शिरवळ , सातारा : १८/०७/१८४९
🔰 तळेगाव ढमढेरे , पुणे : ०१/०९/१८४९
🔰 शिरूर , पुणे : ०८/०९/१८४९
🔰 अजीरवाडी , मजगाव : ०३/०३/१८५०
🔰 करंजे , सातारा : ०६:०३:१८५०
🔰 भिंगार : १९/०९/१९५०
🔰 मढवे , पुणे : ०१/१२/१८५०
🔰 चिपळूणकर वाडा , पुणे : ०३:०७:१८५१
🔰 नाना पेठ , पुणे : ०१/१२/१८५१
🔰 रास्ता पेठ , पुणे : १७/०९/१८५१
🔰 वताळ पेठ , पुणे : १५/०३/१८५१ .
कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे.
🅾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ
🅾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ
🅾️ शवेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ
🅾️ नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ
🅾️ पीतक्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ
🅾️ लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
🅾️ तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे
🅾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ
🅾️ सवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन
🅾️ रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन
🅾️ गलाबी क्रांती – कांदा उत्पादन
इस्रोच्या शुक्रयान मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणांसाठी परदेशी प्रस्ताव.
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस प्रस्तावांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यात फ्रान्सच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. याशिवाय रशिया, स्वीडन व जर्मनी या देशांचेही प्रस्ताव असून ते देशही भारताच्या शुक्रयानासमवेत संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यास तयार आहेत.
🔰शक्राच्या अभ्यासासाठी हे यान पाठवले जाणार असून त्यात परदेशांतून वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी काही प्रस्ताव आले होते, त्यातील वीस वैज्ञानिक उपकरणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. हे २० पेलोड म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पाठवले जाणार आहेत.
🔰फरान्सच्या सीएनइएस संस्थेचे ‘व्हीनस इन्फ्रारेड अॅटमॉस्फेरिक गॅस लिंकर’ हे उपकरण रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संशोधन संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. फ्रान्सच्या सीएनआरएस संस्थेने ‘लॅटमॉस’ नावाचे उपकरण तयार केले असून त्याच्या मदतीने शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल.
महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा.
🔰पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील शाळा मात्र १ डिसेंबरनंतर शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
🔰जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने दिली असून त्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार, आमदार आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
🔰वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
🔰तयाचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमती पत्र घेण्यात येणार आहे. त्या संमतीपत्रांनंतर स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात.
🔰वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.
🔰मकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.
🔰अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.
राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी.
🔰जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण 6 पुरस्कार पटकाविले आहेत.
🔰तर सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
🔰कद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले.
भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला
🔰हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले आहे.
🔰“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये सहाय्य करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार.
🌍भारताची ‘NavIC’ प्रणाली
🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ (नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन) नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे. या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे.
🔰‘NavIC’ प्रणाली ही अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली’ (इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जात आहे.
🔰IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.
🔰IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करते - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).
🔰ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करते. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणार्या मच्छीमारांना त्याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.
व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर
🔰व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने 194 देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली.
🔰तर या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड सर्वात तळाशी आहेत.
महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान
🔰दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
🔰तर या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.
🔰सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे.
🔰दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती.
‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय .
🔰भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत.
🔰रल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी ट्रेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वेने अर्ज मागवले होते. याला प्रतिसाद देताना एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.
🔰या कंपन्यांची नावं पुढे :-
1. IRCTC
2. GMR Highways Ltd.
3. Gateway Rail Freight Ltd.
4. IRB Infrastructures Developers
5. Welspun Enterprise Ltd.
2030 पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाही.
🔰पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटनने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून पुढील दहा वर्षांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे उद्देश समोर ठेवलं आहे.
2030 पासून देशामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे.
🔰तर अशाप्रकारे वाहनविक्रीवर बंदी घालण्याची घोषणा करुन दहा वर्षांमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रीक्स कार्स असणारा ब्रिटन हा पहिला देश ठरणार आहे.
🔰बरिटन सरकारने बुधवारी 10 मुद्दांच्या समावेश असणारी ‘ग्रीन इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन’ योजना लागू करत असल्याची घोषणा केली.
UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद
🔰संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे.
UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे.
🔰तर करोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने म्हटले आहे.
🔰तसेच मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.
७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री.
🔰बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली. यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.
🔰सवातंत्र्यानंतर कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल,की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
🔰बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.