Ads

26 December 2020

मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती



मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठय़ा प्रमाणात असून, या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे.


भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम आणि तेजस ठाकरे यांच्या चमूने या प्रजातीवर संशोधन केले आहे. नुकतेच अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्टच्या ‘कोपिया’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला.


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयमधील एरिस्टोन रेडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीचे छायाचित्र जयसिन्हा यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह मेघालयाचा दौरा करून या प्रजातीचा अभ्यास केला. गुणसूत्रे, आकारशास्त्राच्या अभ्यासाद्वारे जयसिन्हा यांनी त्यावर जानेवारीमध्ये शोधनिबंध लिहिला. त्यानंतर एक वर्षांने कोपियाने त्यावर शिक्कामोर्तब केले.


एरिस्टोन यांनी ही प्रजाती सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘चन्ना एरिस्टोनी’ असे करण्यात आल्याचे जयसिन्हा यांनी सांगितले. डोंगराळ भागातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये हा मासा हमखास सापडतो. 


तसेच पाण्यात दगडांच्या सांद्रीमधून त्याचा अधिवास असतो असे त्यांनी नमूद केले. तसेच या माशास वर्षभर थंड पाणी आणि भरपूर ऑक्सिजनची गरज असते. 


या माशास चांगली मागणी असते.

महाराष्ट्रात चन्ना कुळातील प्रजाती ‘डाकू’ या नावाने ओळखली जाते, असे जयसिन्हा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत राज्यातून या प्रजातीचे अस्तित्व जवळपास नामशेष झाले असून, गेल्या वर्षी रत्नागिरीजवळ नोंद झाली होती.

1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य



नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या दि. 1 जानेवारी, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय सरकारच्या रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात घोषणा केली असून ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.


फास्टॅग सुविधा


‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे. फास्टॅग - इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) योजनेच्या अंतर्गत ही सुविधा अंमलात आणली जात आहे. फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.


रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते. गाडीच्या वाहकाला ऑनलाइन पद्धतीने ‘फास्टॅग’चे टॅग मिळते. त्याच्या खात्यात वाहक काही रक्कम टाकणार. नाक्यावरचे टॅग रीडर प्रत्येक वेळी वाहकाने वाहनावर चिपकवलेले टॅग वाचणार आणि त्यातून टोल रक्कम वजा होणार.

देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राबवित आहे. 


स्वयंचलित पद्धतीने तात्काळ होणारा व्यवहार वाहनांच्या दळणवळणाला गती देणार. त्यामुळे वाहनांच्या रांगा नाक्यावर दिसणार नाहीत. उभ्या अवस्थेत असलेल्या चालू गाड्यांमुळे वायफळ जाणार्‍या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार.

देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत!


देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहे.


 इसवीसन १८०५ मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत.


कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच शेकडो वर्षांनंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्त्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात. 


यातील अनेकजण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आज, २५डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास खुला ठेवला आहे.


देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या. परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या.


 त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहजप्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रणकलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती.

इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिद्ध केले होते.


 याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता. 


हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला.


१६६ पृष्ठांची गीता


या ग्रंथासाठी प्रथम तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरण्यात आली. या ठशांच्या आधारे पुढे छपाई करत या भगवद्गीतेच्या काही प्रती मुद्रित करून घेण्यात आल्या. या प्रथम मुद्रित प्रतीमधील एक प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे. 


१६६ पृष्ठांच्या या भगवद्गीता ग्रंथाच्या शेवटी मुद्रणस्थळ, काळाचा उल्लेख केला आहे. यामध्ये मिरजेचा उल्लेख ‘मरकडेय मुनीक्षेत्रे’ असा तर काळाचा उल्लेख ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा आलेला आहे.

25 December 2020

Online test Series

वय (वयवारी)


🏮🏮🏮 परकार पहिला 🏮🏮🏮


📍नमूना पहिला –

उदा.👁

अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?


1) 15 वर्षे 2)10 वर्षे 3)5 वर्ष 4) 20 वर्षे


उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :-

वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.

अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

 

📍नमूना दूसरा –

उदा.👁

जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?


1)11 वर्षे   2 )36 वर्षे  3)  34 वर्षे  4) 38 वर्षे


उत्तर : 38 वर्षे

क्लृप्ती :-

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2

(49+27) ÷ 2 = 38

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

 

🏮नमूना तिसरा –

उदा.👁

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?


1) 24 वर्षे  2) 32 वर्षे

3) 40 वर्षे   4) 48 वर्षे


उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-

राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x    

दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x

फरक = 3 x – x = 2x =16,   

:: x=8

:: 4x = 4×8 = 32

 

👁 नमूना चौथा –

उदा.🌷

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

21 वर्षे

23 वर्षे

15 वर्षे

28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :-

सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20 -5 = 15 वर्षे,

:: अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास     

x/3+8=15 म्हणून x/3=7, :

: x=21




🏮🏮🏮 परकार दूसरा🏮🏮🏮

नमूना पहिला –

उदा.

सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

10 वर्षे

12 वर्षे

15 वर्षे

18 वर्षे

उत्तर : 12 वर्षे

स्पष्टीकरण :-

    सीता     :    गीता

आजचे वय      6x     :     5x

दोन वर्षापूर्वीचे (6x-2)2    :     (5x-2)

 

6x-2/5x-2 = 5/4b

:: 4(6x-2) =5(5x-2)    24x-8=25x-10     :: x=2

:: सीताचे आजचे वय = 6x = 6×2=12 वर्षे

 

📍नमूना दूसरा –

उदा.👈

मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती?

6 वर्षे

10 वर्षे

35 वर्षे

11 वर्षे

उत्तर : 11 वर्षे

स्पष्टीकरण :-

                         मुलगी    :    आई

5 वर्षांपूर्वी                 1      :     5            

आजचे वयांचे                         

गुणोत्तर               (x+5)    :    (5x+5)            

5 वर्षांनंतर                         

वयांचे गुणोत्तर        (x+10)   :    (5x+10)

        

x+10/5x+10 = 2/5

:: 5(x+10) = 2(5x+10)

5x=50=10x+20

5x=30

:: x=6

मुलीचे आजचे वय = x+5     

:: 6+5 = 11 वर्षे

 

🛑 नमूना तिसरा –

उदा.👁 

मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये 3:7:9 या प्रमाणात होतील ?

10

6

3

5

उत्तर : 5

स्पष्टीकरण:

3+7+9=19 भाग,  उदाहरणाप्रमाणे (10+30+49) = 80     

80+3x/19 =19×5 = 95  

85 – 80 = 15,

3x=15     

:: x=5

काळ ,काम & वेग पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत"


(पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत")


   🚇🏃🚴‍♀

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     ✍️मजा निर्मळ (STI)

     👉9595805222

〰️〰️〰️🔥〰️〰️〰️🔥〰️〰️〰️〰️


🚀 ‘काळ’ म्हणजे काम करण्यासाठी लागणारा वेळ . काळ आणि काम यांचे ‘सम प्रमाण’ असते. कारण कमी वेळ काम केले तर कमी काम होईल. जास्त वेळ काम केले तर जास्त काम होईल.


🚀 वग म्हणजे काम करण्याची गती. वेळ आणि वेग यांचे ‘व्यस्त प्रमाण’ असते. म्हणजे काम करण्याचा वेग वाढविला तर काम कमी वेळेत पूर्ण होते. उलट वेग कमी केला तर जास्त वेळ लागेल.


         ❤️ IMP points ❤️


1)    काळ व काम : एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 


2)    काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.


3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.


4)    काळ, अंतर व वेग (सूत्र) : अंतर = वेग x वेळ


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


🚨 सोडवून दाखविलेली उदाहरणे 🚨


1) 3 कागद टाईप करावयास 40 मिनिटे लागली, तर 12 कागद टाईप करावयास किती वेळ लागेल?


1) 2 तास 40 मिनिटे 

2) 2 तास 30 मिनिटे 

3) 3 तास 

4) 3 तास 20 मिनिटे


स्पष्टीकरण


टाईप करावयाचे कागद वाढले म्हणून त्यासाठी जास्त वेळ लागणार.


3 कागदांना 40 मिनिटे


12 कागदांना 160 मिनिटे = 2 तास 40 मिनिटे


काम चौपट वेळ चौपट ( सम प्रमाण) पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


2) एका मजुराने 8 खड्डे दोन तासांत खोदले, तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?


1) 35 मिनिटे 2) 30 मिनिटे 3) 25 मिनिटे 4) 40 मिनिटे


स्पष्टीकरण – 8 खड्डे तयार करण्यास 2 तास 120 मिनिटे


दोन खड्डे तयार करण्यास 30 मिनिटे


काम कमी वेळ कमी ( सम प्रमाण ) पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


3) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर तो एका दिवसात किती काम करील?


1) 1/3 2) 1/6 3) 1/8 4) 1/12


स्पष्टीकरण


मजुराला काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात.


म्हणजे एका दिवसात तो कामाचा 12 वा भाग किंवा 1/12 भाग तयार करतो.


:. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


4) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर 4 दिवसांत तो किती काम करील?


1) ¼ 2) 1/3 3) 1/6 4) 1/12


स्पष्टीकरण


संपूर्ण कामाला 12 दिवस लागतात.


म्हणून 1 दिवसाचे काम 1/12 आणि 4 दिवसांचे काम 4/12 = 1/3


:. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


5) 2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 2 दिवस 4) 5 दिवस


स्पष्टीकरण


माणसे वाढली तर काम कमी दिवसांत पूर्ण होईल म्हणून हे ‘व्यस्त प्रमाण’


आहे .


2 माणसांना 6 दिवस लागतात.


4 माणसांना 3 दिवस लागतात.


माणसे दुप्पट झाली म्हणून दिवस निमपट लागणार. :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


6) घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसांत करतात. जर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 5 दिवस 4) 6 दिवस


स्पष्टीकरण


4 सुतार वाढविले म्हणजे 12+ 4 = 16 झाले.


सुतारांचे गुणोत्तर 12/16 , दिवसांचे गुणोत्तर 8/ क्ष चा व्यस्त क्ष /8


12/16 = क्ष /8 तिरकस गुणाकाराने 12 x 8 = 16 x क्ष


16 क्ष = 12 x 8


:. क्ष = 6 :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


7) एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यांपैकी 2 गवंडी निघून गेले, तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?


1) 20 दिवस 2) 21 दिवस 3) 22 दिवस 4) 24 दिवस


स्पष्टीकरण


6 गवंडी – 2 गवंडी = 4 गवंडी राहिले.


6 गवंड्यांना 14 दिवस लागतात.


4 गवंड्यांना क्ष दिवस लागतील.


6/4 = क्ष /14 तिरकस गुणाकाराने 6 x 14 = 4 क्ष


4 क्ष = 84


:. क्ष = 21 दिवस :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


8) 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदांत ओलांडते, तर गाडीचा दर ताशी वेग काय ?


1) 50 कि.मी. 2) 45 कि.मी. 3) 40 कि.मी. 4) 36 कि.मी.


स्पष्टीकरण


आगगाडी एका खांबास ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीइतके अंतर तोडते . आगगाडी 9 सेकंदात 100 मीटर जाते तर 3,600 सेकंदात किती जाईल?


3,600 x 100/9 = 40,000 मीटर.


40,000 मीटर ÷ 1,000 = 40 किलोमीटर :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


9) 150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल, तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?


1) 200 सेकंद 2) 300 सेकंद 3) 32 सेकंद 4) 36 सेकंद


स्पष्टीकरण


आगगाडीस तोडावयाचे एकूण अंतर =


स्वतःची लांबी 150 मीटर + पूलाची लांबी 250 मीटर = एकूण 400 मीटर


गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर आहे.


40 किलोमीटर जाण्यास गाडीला 3,600 सेकंद लागतात.


1 किलोमीटर जाण्यास 3,600सेकंद ÷ 40 = 90 सेकंद लागतील.


400 मीटर म्हणजे 0.4 किलोमीटर जाण्यास


90 x 0.4 = 36 सेकंद लागतील. :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


10) ताशी 24 किलोमीटर वेगाने गेल्यास एका


भावी अधिकारी®, [14.06.17 08:30]

गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात, तर ताशी 30 कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?


1) 2 तास 2) 2 तास 10 मिनिटे 3) 1 तास 35 मिनिटे 4) 1 तास 45 मिनिटे


स्पष्टीकरण


24 किलोमीटर वेगाने 150 मिनिटे लागतात.


30 किलोमीटर वेगाने किती मिनिटे लागतील?


वेग वाढल्याने वेळ कमी लागेल. ( व्यस्त प्रमाण)


वेगाचे गुणोत्तर 24/30, वेळेचे गुणोत्तर 150 / क्ष चा व्यस्त क्ष/ 150


24/30 = क्ष /150 तिरकस गुणाकाराने 24 x 150 = 30 क्ष


30 क्ष = 24 x 150


:. क्ष = 120 मिनिटे = 2 तास :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅

〰️〰️〰️〰️〰️👇👇〰️〰️〰️〰️〰️

https://telegram.me/Rajmargbymunjanirmal

〰️〰️〰️〰️👆👆👆👆〰️〰️〰️〰️

11) ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबास 18 सेकंदांत ओलांडते , तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?


1) 235 मीटर 2) 240 मीटर 3) 200 मीटर 4) 242 मीटर


स्पष्टीकरण


आगगाडीची लांबी म्हणजे तिने 18 सेकंदांत तोडलेले अंतर


आगगाडीचा ताशी वेग 48 कि.मी.


3,600 सेकंदांत 48,000 मीटर


36 सेकंदांत 480 मीटर


18 सेकंदात 240 मीटर


:. आगगाडीची लांबी = 240 मीटर :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


12) जे काम ‘अ’ 60 दिवसांत करतो तेच काम एकटा ‘ब’ 40 दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?


1) 22 दिवस 2) 42 दिवस 3) 24 दिवस 4) 27 दिवस


स्पष्टीकरण

एकटा ‘अ’ 60 दिवसांत काम करतो.

त्याचे 1दिवसाचे काम 1/60

एकटा ‘ब’ 40 दिवसांत काम करतो.

त्याचे 1 दिवसाचे काम 1/40

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम

1/60 + 1/40 = 5 / 120 = 1/24

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम 1/24

म्हणजेच त्या दोघांना ते काम करण्यास 24 दिवस लागतील.

:. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


13) रस्ता तयार करण्याचे एक काम 60 मजूर रोज 6 तास काम करून 56 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 40 मजूर रोज 7 तासांप्रमाणे काम करून किती दिवसांत संपवतील?


1) 72 दिवस 2) 70 दिवस 3) 75 दिवस 4) 80 दिवस


स्पष्टीकरण


60 मजूरांना 56 दिवस लागतात.

60 x 56 = 40 x (व्यस्त प्रमाण )

40x = 3,360

:. x = 84

40 मजूरांना रोज 6 तासांप्रमाणे 84 दिवस लागतील.

6 x 84 = 7x (व्यस्त प्रमाण )

7x = 504

:. x = 72

7 तासांप्रमाणे 72 दिवस लागतील . पर्याय क्र. 1 हे उत्तर✅



14) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 380 मीटर लांबीच्या आगगाडीला त्याच दिशेला ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी 320 मीटर लांबीची आगगाडी किती वेळात ओलांडील?


1) 9 मिनिटे 2) 7 मिनिटे 3) 2 मिनिटे 4) 3 मिनिटे


स्पष्टीकरण

एका आगगाडीने दुसर्‍या आगगाडीस ओलांडून जाण्यासाठी तोडावयाचे अंतर=

380 मीटर + 320 मीटर = 700 मीटर

दोन्ही आगगाड्यांची जाण्याची दिशा एकच असल्यामुळे तोडावयाचे अंतर दोन्हींच्या वेगांच्या वजाबाकीने म्हणजे ताशी

(54 – 40 ) 14 कि.मी. वेगाने तोडले जाईल.

14,000 मीटर अंतर तोडण्यास 60 मिनिटे लागतील.

1,400 मीटर अंतर तोडण्यास 6 मिनिटे लागतील

700 मीटर अंतर तोडण्यास 3 मिनिटे :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅



15) एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास पाच तास लागतात.


त्या हौंदातील पाणी सोडण्यास दोन तोट्या आहेत; त्यापैकी कोणतीही एक तोटी सोडली तर 20 तासांत हौद रिकामा होतो. जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल?


स्पष्टीकरण

नळामुळे हौद पाच तासात पूर्ण भरतो.

:. तो हौद एका तासांत 1/5 इतका भरतो.

एका तोटीमुळे तो 20 तासांत रिकामा होतो.

:. एका तासात तो 1/20 इतका रिकामा होतो.

:. दोन तोट्या वापरल्यास एका तासात तो 2/20 किंवा 1/10 इतका रिकामा होईल.

आता नळ व दोन्ही तोट्या एकाच वेळी सोडल्यासतो हौद 1 तासात 1/5 भरला जाईल आणि 1/10 इतका रिकामा होईल. एका तासात तो 1/5 – 1/10 इतका भरेल.

1/5 = 2/10 :. 2/10 – 1/10 = 1/10

:. एका तासात हौद 1/10 इतका भरेल .

म्हणजेच हौद भरण्यास 10 तास लागतील. :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅



वेग , वेळ आणि अंतर गणित उदाहरण





🚨नमूना पहिला 🚨–


उदा.

300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?


45 से.

15 से.

25 से

.35 से. 


उत्तर : 15 से.


क्लृप्ती :-


एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा.  


खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद


🚨नमूना दूसरा –🚨


उदा.


ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्याल 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?


1मि. 12से.

1मि. 25से.

36से

.1मि. 10से. 


उत्तर : 1मि. 12से.


क्लृप्ती :-


एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.

पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5


🚨नमूना तिसरा –🚨


उदा.


ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?


540मी.

 162मी. 

270मी. 

280मी. 


उत्तर : 270 मी.


सूत्र :-


गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.


🔴नमूना चौथा 🔴–


उदा.


800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडण्यार्‍या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?


54 कि.मी.

40 कि.मी.

  50 कि.मी.

60 कि.मी. 


उत्तर : 40 कि.मी.  


क्लृप्ती :-


वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40     

(वेग काढताना 18/5 ने गुणणे)




🔴नमूना पाचवा 🔴–


उदा.


मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?


दु.12 वा.

12.30 वा.

1.30 वा.

11.30 वा. 


उत्तर : 12.30 वा.


क्लृप्ती :-


भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

= वेळेतील फरक × पहिल्या गाडी चा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास


🔴नमूना सहावा –🔴


उदा.


मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्याा गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?


दु.12.30वा.

दु.12वा.

दु.1.30वा.

दु.1वा. 


उत्तर : दु.12.30वा.


क्लृप्ती :-


लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज


🚨नमूना सातवा 🚨–


उदा.


ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?


300 कि.मी.

240 कि.मी.

210 कि.मी.

270 कि.मी. 


उत्तर : 240 कि.मी.


स्पष्टीकरण :-


60 व 75 चा लसावी = 300

300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.

300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

〰️〰️〰️〰️〰️〰️🚨🚨〰️〰️〰️〰️

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना



🔶राजश्री योजना : राजस्थान 


🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔶 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔶 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔶 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔶 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔶 ममता योजना : गोवा 


🔶सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔶 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔶 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; जागा, नाव आणि कधी सुरु होणार हे ही ठरलं.


🔥कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.


🔥रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.


🔥ह प्राणीसंग्रहालय २८० एअर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. येथून रिलायन्स समुहाचा पेट्रोकेमिकल्समधील सर्व व्यवसाय चालतो.

रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा.


🥀रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.


🥀तर या नवीन कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीविरोधात कोणत्याच प्रकारचा कायदेशीर खटला दाखल करता येणार नाही. म्हणजेच एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर खटल्यांपासून मरेपर्यंत संरक्षण मिळणार आहे.


🥀तसेच या कायद्यासंदर्भातील माहिती मंगळवारी ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली. या कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या कालावमध्ये केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यात आलं आहे.


🥀तर या व्यक्तींविरोधात या नवीन कायद्यानुसार कोणताही न्यायालयीन खटला चालवता येणार नाही. केवल खटल्यापासून मुक्ती नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा हक्क पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना असणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा

 राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्याक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठय़ा अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्च २०२० पर्यंतच्या ‘चालू घडामोडीं’वरच प्रश्न येणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर विषयांवर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडीं’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारेखा अंदाज घेऊन करीत असतात. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने पूर्व परीक्षा तब्बल चारदा स्थगित केली. ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अगदी तोंडावर आली आली असताना मुख्यमंत्र्यांनी ९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. याला दोन महिने लोटूनही परीक्षेच्या नवीन तारखेबाबत अद्यापही निश्चिती नाही. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्याने पुढील काही महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये विशेषत: ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार, असा प्रश्न परीक्षार्थीसमोर होता. ‘चालू घडामोडी’ हा विषयच वारंवार बदलणारा असल्याने आयोग अभ्यासक्रम बदल करणार, अशीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. या सर्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत होता. मात्र, परीक्षांच्या तारखा बदलल्या तरी अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसून चालू घडामोडींसाठी मार्च २०२० पर्यंतचाच अभ्याक्रम दिला जाणार असल्याची माहिती आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली. याशिवाय परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोगाने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ केली. राज्यात तब्बल ७६१ केंद्रांवर परीक्षा होणार होती. सर्व जिल्हा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आताही सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आयोगाने अद्यापही परत बोलावल्या नसल्याने याच प्रश्नपत्रिकांवर परीक्षा होणार आहे. शिवाय नव्याने प्रश्नपत्रिका काढणे कठीण असल्याने अभ्यासक्रमात कुठलाही बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा.


📜ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच लिकर इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता.


📜कोविड काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानं बंद होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. जी मान्य करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे .


📜लॉकडाउनमधून सूट देत असताना म्हणजेच अनलॉकमध्ये जात असताना ठाकरे सरकारने मंदिरांच्या आधी बार सुरु केले, दारु दुकानांना संमती दिली आणि दारु परवान्यांच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे समाजातले इतरही घटकही त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या करुनही त्यांना दिलासा मिळत नाही.


📜मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? का दारुवाले या सरकारमधल्या काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत? असा प्रश्न विचारत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सामान्य माणूस भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होता. त्यासाठी रस्त्यावरही उतरला तरीही या सरकारने सूट दिली नाही. घरपट्टी, पाणीपट्टी असेल कशातच सामान्य माणसांना दिलासा दिला नाही. मग दारुवाल्यांनाच दिलासा का? दारुवाल्यांचं भलं करणं हाच या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय.


🔓मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.


🔓तयानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔓मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे.


🔓एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

24 December 2020

आयपीलमध्ये आता ‘दस का दम’; दोन नव्या संघांना मंजुरी

‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) करोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.

‘‘२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. 

नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लेवांडोस्की सर्वोत्तम

🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

🔥झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. परंतु ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांनी म्युनिक येथे जाऊन लेवांडोस्कीला पुरस्कार प्रदान केल्याची चित्रफीत या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. नेहमीप्रमाणे जगभरातील निवडक राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांचा आढावा घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली.

🔥३२ वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक ५५ गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस

🔥अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे.

🔥 जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

🔥जोय बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार


🔶 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


🔶 स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


🔶 या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. 


🔶सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.


🔶 त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

Online Test Series

गोवा मुक्ती लढा


🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.


🔺पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.


🔺आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.


🔺पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.


🔺1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.


🔺2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.


🔺या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.


🔺1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.


🔺 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.


🔺भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.


🔺काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.


· गोवा मुक्त झाला.


· भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.


 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.


 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते. आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती. त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते. त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


▪️ब्राम्हो समाजाची स्थापना :


त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते. हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते. हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.


📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-

 बेहरामजी मलबारी..


📚 इडियन :-

 फिल्ड किशोरीचंद मित्र..


📚 अबला बांधव :-

 द्वारकानाथ गांगुली..


📚 फरी हिन्दुस्थान :-

तारकानाथ दास..


📚 परिदर्शक :-

 बिपिनचंद्र पाल..


📚 जन्मभूी :- 

पट्टाभि सितारामय्या..


📚 मबई समाचार :-

 फरदुनजी मर्झबान..


📚 तलवार :-

 विरेंद्रनाथ चटोपाध्याय..


📚 लीडर पं. मदन :-

 मोहन मालवीय..


📚 पख्तून :- 

खान अब्दुल गफारखान..


📚 इडियन मजलीस :-

 अरविद घोष (केम्ब्रिज)..

विभक्ती व त्याचे प्रकार


🔶 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔶 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


▪️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


▪️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


▪️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


▪️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


▪️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


▪️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


▪️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण

मानव विकास अहवाल 2020 प्रसिद्ध; भारताचे स्थान एकाने घसरून 131 वर.


🔰 सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध. 


🔰 दशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


✳️ ठळक बाबी :-


🔰निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.


🔰 यदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.


🔰 भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🔰 गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🔰 दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.


🔰 कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.


🔰 आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🔰 मानव विकास निर्देशांक हा देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. 


🔰 हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🔰1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.


🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.


🔺तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव  देण्यात आलं आहे.


🔺एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.


🔺तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी



लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. 


GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.


१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.


प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.


कोण आहेत टॉप १० खासदार


अनिल फिरोजिया – भाजपा

अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी

राहुल गांधी-काँग्रेस

महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस

एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा

हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना

सुखबीर सिंग बाद-एसएडी

शंकर लालवानी -भाजपा

नितीन गडकरी-भाजपा

डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके