Ads

03 May 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) भारतीय हवाई दलाचे मिग-२७ लढाऊ विमान निवृत्त झाले. हे विमान कोणत्या वर्षी भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले.
अ) १९७५
✓ब) १९८५
क) १९९१
ड) २०००

२) २०१९ मध्ये हवामान बदलावरील काऊंटडाऊन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे ?
अ) टाइम्स मॅगझीन
ब) यून न्यूजवेब
✓क) लान्सेट जर्नल
ड) यापैकी नाही

३) ए लाॅग नाइट इन पॅरिस या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✓अ) डोभ अल्फोन
ब) विनोद राय
क) अनुपम खेर
ड) विनोद खन्ना

४) सी. बी. एस. ई चा ' फिट इंडिया सप्ताह ' उपक्रम कोणत्या महिन्यात साजरा करण्यात येतो ?
✓अ) डिसेंबर
ब) नोव्हेंबर
क) आॅक्टोबर
ड) सप्टेंबर

५) १७ वर्षांखालील ' फिफा महिला फुटबॉल विश्वकप २०२० '  चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?
अ) श्रीलंका
ब) जपान
क) पोर्तुगाल
✓ड) भारत

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

30 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे


▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

▪️ कोणत्या बँकेनी गुगल असिस्टंट आणि एलेक्सा या तंत्रज्ञानांवर व्हॉईस बँकिंग सेवा सुरू केली?
उत्तर : ICICI बँक

▪️ कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?
उत्तर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

▪️ 2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी

▪️ कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
उत्तर : व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल

▪️ कोणत्या देशात ‘बाऊन्स बॅक लोन’ योजना सादर करण्यात आली आहे?
उत्तर : ब्रिटन

▪️ कोणत्या संस्थेनी ‘मल्टी-सर्फेस सेनिटायझर’ तयार केले?
उत्तर : IIT भुवनेश्वर

▪️ कोणत्या संस्थेनी ‘GRID 2020’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : IDMC

▪️ कोणत्या देशाने कोविड-19 विषयक BRICS परराष्ट्र मंत्र्यांची आभासी परिषद आयोजित केली?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या संस्थेनी ‘फ्रॉम द ग्रेट लॉकडाउन टू द ग्रेट मेल्टडाउन’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर : UNCTAD

▪️ कोणत्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेतली?
उत्तर : दिपंकर दत्ता

▪️ आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️ कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
उत्तर : पेटीएम

▪️ दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
उत्तर : शिल्पा मेडिकेअर

▪️ 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर

▪️ अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
उत्तर : VITAL

▪️ कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
उत्तर : रसायने आणि पेट्रोकेमिकल्स

▪️ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
उत्तर : इंडियन ओव्हरसीज बँक

▪️ चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
उत्तर : कच्च्या तेलाचा एक ग्रेड

▪️ झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अ‍ॅप तयार केले?
उत्तर : झारखंड बाजार

02 May 2020

प्रश्न मंजुषा

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

_________

महाराष्ट्र दिन विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

📌देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे.

📌 ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

📌या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील.

📌 परंतु रेड झोनमध्ये कोणत्याही भागांना  कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌 रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत.

📌ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे.

📌तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान; निवडणूक कार्यक्रम जाहीर


त्यानुसार येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

राज्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे.

*निवडणुकीसाठी*

✅ ४ मे 🔜 पासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार आहे.

✅ १२ मे 🔜 रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

✅ १४ मे 🔜 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

✅ २१ मे 🔜 रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

✅ 21 मे 🔜 त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

✅ २७ मेच्या आत विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचं सदस्य होणं मुख्यमंत्री यांना बंधनकारक असल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या नसत्या तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं असतं.

01 May 2020

सर्वाना पुढील वर्गात प्रवेश!

- सर्व अभ्यासक्रमांतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश देण्यात यावेत, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेची अतिरिक्त संधी देण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने केली आहे.

- यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचेही आयोगाने सुचवले आहे.
करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे कामकाज मार्चपासून बंद करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने शैक्षणिक वेळापत्रक आणि परीक्षा यांबाबत अभ्यास करून उपाय सुचवण्यासाठी समित्या नेमल्या होत्या.

- या समित्यांनी त्यांचे अहवाल आयोगाला सादर केले आहेत. त्यानुसार परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी, अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढील सत्रासाठी प्रवेश देण्यात यावा, अशी शिफारस या समितीने केली. मात्र, विद्यापीठ ज्यावेळी पुढील परीक्षा घेईल, त्यावेळी विद्यार्थ्यांना आधीच्या सत्राच्या राहिलेल्या विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. विद्यार्थ्यांना गुणवाढीसाठी अतिरिक्त परीक्षेची संधी देण्याचेही या समितीने सुचवले आहे.

- प्रवेश प्रक्रियेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
यंदा विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्यात याव्यात. परीक्षेपूर्वी किमान आठ दिवस विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात यावी. विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल १४ ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात यावेत. परीक्षांसाठी आवश्यक त्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घ्याव्यात, मात्र या सर्व परीक्षा, निकाल यांसह प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी.

-  गरज असल्यास तात्पुरता प्रवेश देण्याचा मार्ग अवलंबावा. त्यानंतर परीक्षांचे निकाल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ३० सप्टेंबपर्यंत प्रवेश निश्चित करण्यात यावेत, असे समितीने सुचवले आहे.

- आता पावसाळी सुट्टी
यंदाचे शैक्षणिक वर्ष पुढे गेल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षही (२०२१-२२) उशिरा सुरू होणार आहे. साधारण एप्रिल-मे महिन्यात अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपून सुट्टी लागते.

- आता मात्र उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात शैक्षणिक वर्षांअखेरीची सुट्टी मिळणार आहे. सुरू असलेल्या शैक्षणिक वर्षांची सुट्टी १ ते ३० जून या कालावधीत, तर येत्या शैक्षणिक वर्षांची (२०२०-२१) सुट्टी १ ते ३० जुलै २०२१ या कालावधीत देण्याची शिफारस आयोगाच्या समितीने केली आहे.

▪️वेळापत्रक कसे असेल?
- १६ ते ३१ मे - प्रकल्पाची पूर्तता
- १ ते ३० जून - वार्षिक सुट्टी (उन्हाळी सुट्टी)
- १ ते ३१ जुलै - विद्यापीठांच्या परीक्षा
- १ ऑगस्ट - जुन्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- १४ ऑगस्टपर्यंत - विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणे
- ३१ ऑगस्ट - पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत
- १ सप्टेंबर - नव्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात
- ३० सप्टेंबर - तात्पुरते प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत
- १ ते २५ जानेवारी २०२१ - पहिली सत्र परीक्षा
- २७ जानेवारी २०२१ - दुसऱ्या सत्राची सुरुवात
- २६ मे ते २५ जून २०२१ - दुसरी सत्र परीक्षा
- १ ते ३० जुलै २०२१ - वार्षिक सुट्टी
- २ ऑगस्ट २०२१ - नव्या शैक्षणिक वर्षांची (२०२१-२२) सुरुवात
परीक्षा कशी?

- कमीतकमी वेळेत आणि गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचवण्यात आले आहे. लघुत्तरी, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका देणे, परीक्षेत पुस्तक बाळगण्याची मुभा (ओपन बुक टेस्ट), लेखी परीक्षेऐवजी सादरीकरण करण्यास सांगणे, पन्नास टक्के अंतर्गत मूल्यमापन ग्राह्य़ धरून पन्नास टक्क्य़ांसाठी प्रकल्प करण्यास सांगणे, असे पर्याय समितीने सुचवले आहेत. लेखी परीक्षा ही साधारण अडीच ते तीन तास असते, त्याऐवजी कमी वेळात परीक्षा घेण्याचे पर्याय विद्यापीठांनी शोधून काढावेत, असे आवाहनही समितीने केले आहे.

-  एमफील, पीएचडीसह इतर अभ्यासक्रमांच्याही तोंडी परीक्षा किंवा मुलाखती ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात याव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे.
---------------------------------------------------

आयआयटीची यंदा शैक्षणिक शुल्क वाढ नाही.

- भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांचे शैक्षणिक शुल्क २०२०-२१ या वर्षांत वाढवण्यात येणार नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

- करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून  ते म्हणाले की, आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही.

- या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असे संचालकांना सांगण्यात आले आहे.

- ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
--------------------------------------------------

संचारबंदीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी धान्याच्या मालवाहतुकीत मोठी वाढ


- संचारबंदीच्या काळातही अन्नधान्य आणि अत्यावश्यक वस्तू देशभरात उपलब्ध राहणार याची खबरदारी भारतीय रेल्वे त्याच्या माल व पार्सल सेवेच्या माध्यमातून घेत आहे.

- संचारबंदी जाहीर झाल्यापासून 25 मार्च ते 28 एप्रिल या कालावधीत 7.75 लक्ष टनांहून अधिक खासगी धान्याची मालवाहतूक भारतीय रेल्वेनी देशभरात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे 6.62 लक्ष टन धान्याची मालवाहतूक झाली होती.

▪️इतर ठळक बाबी

- रेल्वेद्वारे खासगी धान्याची मालवाहतूक करण्यामध्ये आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ही आघाडीची राज्ये आहेत.

- कोविड19 महामारीमुळे जाहीर संचारबंदीच्या काळात अन्नधान्यासारखी कृषी उत्पादने वेळेवर गोळा केली जाणार आणि देशभरात त्यांचा पुरवठा सुरळीत राहणार यासाठी भारतीय रेल्वे सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

- फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नाशवंत वस्तू आणि शेतीसाठी बियाणे याकरिता विशेष पार्सल गाड्यांसाठी भारतीय रेल्वेने मार्ग निश्चित केले आहेत.

- देशाच्या सर्व भागात अविरत पुरवठा राहावा यासाठी ज्या ठिकाणी मागणी कमी आहे अशा मार्गावरही गाड्या चालवल्या जात आहेत. मार्गावर शक्य त्या सर्व ठिकाणी रेल्वेगाडयांना थांबा देण्यात आला आहे.