17 May 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?
   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.
   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.
   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.
   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर :- 1

2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?
  
1) समभूज त्रिकोण   
2) काटकोन त्रिकोण   
3) सरळ रेषा     
4) वरीलपैकी कोणतीही  नाही
उत्तर :- 2

3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.
  
अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.   
ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.
क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.   
ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) अ, ब, क    2) अ, क, ड   
3) अ, ब, ड    4) फक्त क
उत्तर :- 3

4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
1) जोग             2) नायगारा   
3) कपिलधारा    4) शिवसमुद्र
उत्तर :- 1

5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
1) वाघ      2) हत्ती     
3) सिंह      4) गेंडा
उत्तर :- 3

6) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.
1) रावी       2) बियास   
3) चिनाब    4) व्यास
उत्तर :- 3

7) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.
1) महानदी       2) सोन     
3) सुवर्णरेखा    4) गंगा
उत्तर :- 3

8) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
   1) दिल्ली ते आग्रा       2) मुंबई ते ठाणे
   3) हावडा ते खडकपूर 4) चेन्नई ते रेनीगुंठा
उत्तर :- 2

9) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.
1) आसाम    2) बिहार     
3) महाराष्ट्र    4) ओरिसा
उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?
   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.
   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.
   4) वरील कोणतेही नाही.
उत्तर :- 4

11) नियोजन आयोगाच्या मते, “सार्वजनिक बचतीत वाढ होऊन अत्यावश्यक सार्वजनिक गुंतवणूक अल्प राजकोषीय तुटीतून साध्य होईल की मध्यमकालीन राजकोषीय धोरणाचे उद्दिष्ट होते. सुधारणांचा हा भाग दुर्देवाने कधीच अंमलात आला नाही.” याचे कारण म्हणजे 
  
अ) मोठे सार्वजनिक कर्ज     
ब) उच्च व्याज दर
क) ऋण (उणे) सार्वजनिक बचती   
ड) जागतिकीकरण
1) अ आणि क    2) फक्त ब   
3) ब आणि ड     4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

12) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का......होता
1) सतत घसरला      2) अचल राहिला   
3) सातत्याने वाढला  4) कुठलाही स्पष्ट आलेख नाही
उत्तर :- 1

13) सार्वजनिक खर्चाचे योजनाबाह्य खर्च आणि योजना अंतर्गत खर्च असे वर्गीकरण कुठल्या सालापासून सुरू झाले  ?
1) 1987 – 88    2) 1982 -86   
3) 1991 – 92    4) 2000 – 2001
उत्तर :- 1

14) भारतात 2009 -10 मध्ये सार्वजनिक खर्चाचे प्रमाण जी. डी. पी. च्या किती टक्के होते ?
1) 17.2 टक्के    2) 25.6 टक्के   
3) 15.3 टक्के    4) 29.1 टक्के
उत्तर :- 4

15) 1987 – 1988 नंतर सार्वजनिक खर्चाचे कोणते वर्गीकरण अंमलात आले ?
  
अ) नागरी खर्च आणि संरक्षण खर्च     
ब) नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च
क) अनुदाने व बिगर अनुदाने खर्च     
ड) महसूली व भांडवली खर्च
         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
1) अ आणि ब    2) ब फक्त   
3) ब आणि क    4) ड फक्त
उत्तर :- 2

16) सार्वजनिक खर्चासंबंधी खालील बाबी विचारात घ्या.
   अ) असा खर्च आर्थिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मदत करतो.
   ब) प्रादेशिक समतोल विकास साध्य करण्यात सहाय्य.
   क) ग्रामीण भागात विद्युतीकरणाच्या सोयी उभारण्यात मदत.
   ड) व्यवहारतोल सुधारण्यात सहाय्यभूत
        वरीलपैकी कोणत्या बाबी आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत मदत करतात ?
1) अ, ब आणि ड    2) ब, क आणि ड   
3) अ, ब आणि क    4) अ आणि ब फक्त
उत्तर :- 3

17) “सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत” कोणी मांडला ?
  
1) प्रो. पिकॉक व प्रो. वाईजमन   
2) प्रो. पिगु
3) डॉ. मार्शल       
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 1

18) खालीलपैकी कोणती कार्ये सार्वजनिक आयव्ययाची आहेत ?
  
अ) संसाधनांची वाटणी   
ब) उत्पन्न विभाजन
क) स्थिरीकरण कार्ये   
ड) खाजगी वस्तुंचा पुरवठा
        दिलेल्या पर्यांयापैकी योग्य पर्याय निवडा :
1) अ फक्त              2) ब आणि क   
3) अ, ब आणि क    4) वरील सर्व
उत्तर :- 3

19) जेव्हा सार्वजनिक खर्चामध्ये घट करून चलन वाढीवर नियंत्रण ठेवले जाते, तेव्हा त्या उपायाला काय म्हणतात ?
  
1) राजकोषीय धोरणाचा उपाय   
2) द्रव्यविषयक धोरणाचा उपाय
3) व्यापारी धोरणाचा उपाय   
4) कर विषयक धोरणाचा उपाय
उत्तर :- 1

20) खालीलपैकी कोणता भारताच्या केंद्रशासनाच्या भांडवली खर्चाचा भाग नाही ?
  
1) संरक्षणावरील खर्च   
2) सामाजिक आणि सामुहिक विकासावरील खर्च
3) व्याजाचा भरणा   
4) सर्वसाधारण सुविधांवरील खर्च
उत्तर :- 3

21) मोबाईल फोन कंपनाची वारंवारता किती असते.
 
1) 130 ते 180 Hz   
2) 150 ते 200 Hz   
3) 80 ते 100 Hz   
4) 180 Hz पेक्षा जास्त
उत्तर :- 1

22) अ) जो पदार्थ दुस-या पदार्थाला प्रोटॉन देतो तो म्हणजे आम्लारी होय.
    ब) जो पदार्थ दुस-या पदार्थाकडून प्रोटॉन घेतो तो म्हणजे अम्ल होय.
          वरील विधानांपैकी अयोग्य विधान / विधाने कोणते ?
1) फक्त अ            2) फक्त ब   
3) दोन्ही अ व ब    4) दोन्हीही नाही
उत्तर :- 3

23) खालीलपैकी अचूक विधाने निवडा.
   अ) प्रद्रव्यपटल आणि केंद्रकामधील या तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.
   ब) अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इ. महत्त्वाच्या पदार्थांची साठवण पेशीद्रव्य करते.
   क) वनस्पती पेशीमधील पेशीद्रव्य प्राणी पेशीमधील पेशी द्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त आणि दाट असते.
   ड) वरील सर्व विधाने अचूक आहे.
1) अ, ब    2) अ, क     
3) ड         4) ब, क
उत्तर :- 3

24) माध्यमातील ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असतो ?
1) आयात        2) ध्वनितरंग   
3) वारंवारता    4) माध्यमाचे स्वरूप
उत्तर :- 4

25) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: विचरण होत नाही त्यांना ....................... असे म्हणतात.
1) सौम्य आम्ल        2) तीव्र आम्ल   
3) सौम्य आम्लारी    4) तीव्र आम्लारी
उत्तर  :- 3

26) वटवाघूळ आकाशात उडताना मार्गातील अडथळे कोणत्या लहरींव्दारे ओळखते ?
1) श्रव्यातील ध्वनी   
2) अश्रव्यातील ध्वनी   
3) अवश्राव्य ध्वनी   
4) यापैकी नाही
उत्तर :- 4

27) ‘मिथिल अमाईन’ हे आम्लारी असून ते आम्लारीच्या कोणत्या प्रकारात मोडते ?
  
1) तीव्र आम्लारी     
2) सौम्य आम्लारी     
3) दोन्ही तीव्र व सौम्य आम्लारी   
4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 1

28) खालील विधानांचा विचार करा.
   अ) गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे.
   ब) गॉल्गी संकुल मेदरेणूंची निर्मिती करतात.
   क) गॉल्गी संकुल रिक्तीका व पीटिकांची निर्मिती करते.
   ड) पेशी भित्तीका, लयकारिका यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते.
1) अ, ब, क सत्य    2) सर्व सत्य   
3) अ, क, ड सत्य    4) अ, ड सत्य
उत्तर :- 3

29) RADAR म्हणजे काय ?
  
1) Range and detection Avoid Radiowaves     
2) Radio Detection and Ranging
3) Radio And Determine Applicated Range     
4) None of the above
उत्तर :- 2

30) ज्या आम्लारीचे पाण्यात पूर्णत: ‍विचरण होते त्यांना ........................ असे म्हणतात.
1) तीव्र आम्ल        2) सौम्य आम्ल   
3) तीव्र आम्लारी    4) सौम्य आम्लारी
उत्तर :- 1

अम्फान चक्रीवादळ

◾️ पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील काही दिवसांमध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या किनारी भागाला अम्फान (Amphan) चक्रीवादळाचा फटका बसू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

◾️देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या वादाळाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

◾️शनिवारी (१६ मे २०२०)
अंदमान-निकोबारसहीत लक्षद्वीपमध्ये चक्रवादळासहीत जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

◾️याचबरोबर ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

◾️बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या अम्फान चक्रवादळाचा सर्वाधिक फटका पूर्वेकडी राज्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दक्षिण, पश्चिम आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.

◾️काही भागामध्ये धुळीची वादळेही उठतील असं अंदाज वर्तवण्यात येत आहे.
_________________________________

‘इस्रो’च्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या

- अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांसाठी संरचनात्मक सुधारणांच्या रुपात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’अंतर्गत चौथ्या टप्प्यांतील घोषणा केल्या. देशाच्या आण्विक ऊर्जा क्षेत्राला नवकल्पनांद्वारे जोम धरत असलेल्या नवउद्यमी क्षेत्राशी जोडण्याच्या दिशेने पावले टाकताना, आजवर बंदीस्त असलेल्या या क्षेत्राची कवाडेही त्यांनी खासगी सहभागासाठी खुली केली.

-  त्याचप्रमाणे ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या केल्या आहेत.
अंतराळ संशोधन उपक्रमांमध्ये खासगी सहभागास चालना देण्याचा सरकारचा मानस असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

- त्यानुसार उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ मोहिमांमध्ये खासगी कंपन्यांना पुरेपूर वाव उपलब्ध करून दिला जाईल. ग्रह-ताऱ्यांचा शोध, अंतराळ यात्रा यात खासगी कंपन्यांना सहभागी होता येईल. त्या अंगाने क्षमता विकासासाठी त्यांना ‘इस्रो’ या सरकारसमर्थित अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

- नवउद्यमी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने भू-अवकाश विदा (जिओ-स्पॅशियल डेटा) धोरणाच्या उदारीकरणाची लवकरच घोषणा केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. उपग्रहांद्वारे मिळविल्या जाणाऱ्या माहितीचा तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी व नवउद्यमी उपक्रमांना वापर करण्याची अनुमती मिळेल. त्यांना आजवर यासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यासाठी मोठी किमत मोजावी लागते, असेही या नवीन धोरणाची गरज प्रतिपादित करताना सीतारामन यांनी सांगितले.

- या माहितीचा वापर करून, शेती, सिंचन या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक पायाभूत सुविधांसाठी ८,१०० कोटी
भारतातील रुग्णालये, प्रयोगशाळा, चिकित्सालये वगैरे सामाजिक पायाभूत सोयीसुविधांची वेगाने उभारणी केली जाणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करीत त्यांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या भागीदारीला चालना देणारी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

- केंद्र व राज्य सरकार या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण खर्चाच्या २० टक्कय़ांऐवजी ३० टक्के वाटा उचलत निधी सहाय्य करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी एकूण ८,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- संशोधन अणुभट्टीत खासगी सहभाग!
अणुऊर्जा संशोधनाच्या क्षेत्रात खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ‘संशोधन अणुभट्टी (रिसर्च रिअँक्टर)’ स्थापित करण्याची अभिनव घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी या निमित्ताने केली. भारतातील नवउद्यमी (स्टार्टअप्स) संस्कृती आणि तिच्या सृजनाने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केला आहे. या नवउद्यमी संस्कृतीचा अणुऊर्जा क्षेत्राशी मिलाफ घडवून आणून मानवतेच्या सेवेला बळ देणारे अनेक प्रकल्प राबविले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

-  कर्करोगाच्या उपचारासाठी मदतकारक ठरणाऱ्या वैद्यकीय वापराच्या समस्थानिकांच्या (मेडिकल आयसोटोप्स) उत्पादनातही खासगी-सार्वजनिक भागीदारीचे उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगावरील किफायती उपचारपद्धतीच्या विकसनाची ती भारताकडून जगाला दिला जाणारा अमूल्य नजराणा असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

-शिवाय कांद्यासारख्या नाशिवंत पीक अधिक काळ साठवून ठेवता येईल अशा विकिरण केंद्रांची उभारणीही खासगी सहभागासाठी खुली करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण खासगी कंपन्यांकडे
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणेसाठी त्यांचे खासगीकरण केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

  - यातून ग्राहकांना सेवा गुणवत्तेचा लाभ मिळेल आणि प्रतिसहायता अनुदानातून होणारे सरकारचे नुकसानही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणून हे धोरण सध्या केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येईल आणि नंतर त्या यशस्वी मॉडेलची अन्य राज्यातही अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्नसंच


1️⃣
जगातील येरेनियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचे सर्वाधिक उत्पादन करणारे राष्ट्र कोणते?

1   कॅनडा
2   ऑस्ट्रेलिया
3  कझाकिस्तान✅✅
4 रशिया

2️⃣
वनस्पती तेलाची कोणत्या घटकासह निकेल उत्प्रेकाच्या उपस्थितीत 60℃ तापमानास अभिक्रिया होताच वनस्पती तूप प्राप्त होते?

1  हायड्रोजन वायू✅✅
2 सोडियम
3 अल्युमिनीयम भुकटी
4 झिंक सल्फेट

3️⃣
भारताच्या पंतप्रधानांचे प्रधान सचीव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे?

1 अनुल मिश्रा
2 राजीव गौबा
3 पी. के. मिश्रा✅✅
4 संजय कोठारी

4️⃣
दक्षिण आफ्रिका प्रामुख्याने   ........
खाणीसाठी  प्रसिद्ध आहे?

1  चांदी
2 तांबे
3 सोने✅✅
4 अभ्रक

5️⃣
सलोर हे अभयारण्य ......साठी प्रसिद्ध आहे

1  सिह
2 झेब्रा
3 हत्ती✅✅
4 हरण

6️⃣
2020 ला कोणाला 29 वा सरस्वती सन्मान दिला जाणार आहे?

1  डॉ. के. शिवा रेड्डी

2  महाबळेश्वर

3  ममता कालिया

4  वासदेव मोही✅✅

7️⃣
गोल क्रांती कशाशी संबंधित आहे

1  संत्री उत्पादन
2 आंबा उत्पादन
3 बटाटे उत्पादन✅✅
4 मोसंबी उत्पादन

8️⃣
न्यूटने गुरुत्वाकर्षण नियम मांडण्यासाठी क्लेपरच्या कितव्या नियमाची मदत घेतली होती?

1   पहिल्या
2 दुसऱ्या
3 तिसऱ्या✅✅
4 चौथ्या

9️⃣
भारतात कोणत्या शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल स्थापन केले जाणार आहे?
(मुंबई, जयपूर, अहमदाबाद, नवी दिल्ली, कानपुर, कोलकत्ता)

1   वरील सर्व
2  अ,ब,क,फ
3   अ, क,इ✅✅
4   ब,ड, इ,फ

🔟
संसदीय शासन पद्धती...... येते विकसित झाली?

1  इंग्लंड✅✅
2 अमेरिका
3 फ्रान्स
4 नेपाळ

🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉

One liner General_Knowledge

▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

नदी व उगमस्थान

🅾पूर्णा:-मेळघाट-अमरावती

🅾काटेपूर्णा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

🅾मोरणा:-अजिंठा डोंगर:-वाशीम

🅾द्यानगंगा:-नागझिरा:-बुलढाणा

🅾वाघूर:-अजिंठा:-औरंगाबाद

🅾गिरणा:-सुरगाणा:-नाशिक

🅾पांझरा:-पिंपळनेर:-धुळे

🚫सिना:-हरिश्चंद्र डोंगर

🚫घोड:-गावडेवाडी(जुन्नर)

🚫नीरा:-शोरगाव(भोर)

🚫कुकडी:-नानेखडी(जुन्नर)

🚫इंद्रायणी:-लोणावळा

🚫भामा:-भामनेर

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

● अटल पेन्शन योजनेचे संचालन कोणती संस्था करते?

*उत्तर* : ‘निवृत्ती वेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण’ (PFRDA)

● ‘FIR आपके द्वार’ हि  योजना कोणत्या राज्य सरकारने राज्यात लागू केली?

*उत्तर* : मध्यप्रदेश

● भारतात ‘सेरोसर्वे’ कोणती संस्था आयोजित करणार आहे?

*उत्तर* : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

● भारतात तयार केले गेलेले पहिले ‘PPE किट सीम सीलिंग’ यंत्र कोणत्या कंपनीने विकसित केले?

*उत्तर* : मॅकपॉवर सीएनसी

● देशातील कोणत्या राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर आहे?

*उत्तर* : केरळ

● केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

*उत्तर* : मनोज अहुजा

● तामिळनाडूच्या कोणत्या उत्पादनाला GI हा टॅग प्राप्त झाला?

*उत्तर* : तंजावूर नेट्टी कलाकृती

● ‘फेड कप हार्ट अवॉर्ड’ जिंकणारी प्रथम भारतीय कोण ठरली?

*उत्तर* : सानिया मिर्झा

● DFRL संस्थेनी विकसित केलेल्या फिरत्या तपासणी प्रयोगशाळेचे नाव काय?

*उत्तर* : परख

● स्कायट्रॅक्सचा जगातले सर्वोत्कृष्ट विमानतळ हा 2020 सालाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाला जाहीर झाला?

*उत्तर* : चांगी विमानतळ

तुम्हास हे माहीत आहे का :- महाराष्ट्र पोलीस यंत्रणेची रचना


● पोलीस महासंचालक (Director General of Police) (राज्यातील पोलीस खात्यातील सर्वोच्चा पद)

● अतिरिक्त पोलीस महासंचालक (Additional Director General of Police)

● विशेष पोलीस महानिरीक्षक (Special Inspector General of Police)

● पोलीस उपमहानिरीक्षक (Deputy Inspector General of Police)

● पोलीस अधीक्षक (Superintendent of Police)

● पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (Asst. Superintendent of Police)

● सहाय्यक पोलीस निरीक्षक (Asst. Police Inspector)

● पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector)

● सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Asst. Police Inspector)

● पोलीस हवालदार (Police Head Constable)

● पोलीस नाईक (Police Naik)

● पोलीस शिपाई (Police Constable)

यशाचा राजमार्ग 17/05/2020

15 May 2020

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-


१) रामसर करार - 
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES - 
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार - 
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
 वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार - 
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC - 
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल - 
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार - 
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
 वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६
________________________________

केंद्रकीय बल (Nuclear Force) :



     अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

       अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

      या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

       केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

        दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

       केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

क्षीण बल (Weak Force) :

         इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

·         हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

·         निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

विविध उत्पादने वाढीसाठी झालेले प्रयत्न व त्यांना दिलेली नावे



1) हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन

2) निल क्रांती :- मत्स्य उत्पादन

3) पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन

4) सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ

5) सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन

6) कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र

7) करडी क्रांती :- खत उत्पादन

8) धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन

9)गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन

10)चंदेरी क्रांती:- अंडी

11) चंदेरी तंतू :- कापूस

12) अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प

13) लाल क्रांती :- टोमॅटो/मांस

14)तपकिरी क्रांती :- कोको

15)गोल क्रांती :- बटाटे

16) नारंगी :- युक्रेन मधील क्रांती

17)इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास


पोलीस भरती प्रश्नसंच

🟤  नागपूर जवळील..... येथे संरक्षण
साहित्याचा कारखाना आहे? -

☑️ अंबाझरी
_________________________________
⚫️ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 

☑️बोरिवली ( मुंबई)
_________________________________
🟣 गोदावरी नदीची एकूण लांबी किती? - 

☑️1465 कि.मी.
_________________________________
🟠 महाबळेश्वर, पाचगणी हे थंड हवेचे
ठिकाण कोणत्या राज्यात आहे? - 

☑️महाराष्ट्र
_________________________________
🔴 गुरुशिखर हे कोणत्या राज्यात येते?  - 

☑️ राजस्थान
_________________________________
🟤 सर्वाधिक जलसाठा कोणत्या राज्यात आहे? -

☑️ महाराष्ट्र
________________________________
🔵 महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के वने आहेत? - 

☑️16.47 टक्के
_____________________________________
⚫️ महाराष्ट्र वृक्ष तोडणी सुधारित अधिनियम कधी लागू झाला? -

☑️ 1988
________________________________
🟣 देशातील सर्वात वेगवान वंदे भारत रेल्वे कोणत्या दोन स्टेशनदरम्यान सुरू करण्यात आली? - 

☑️ दिल्ली ते वाराणसी
_____________________________________
🟤 भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत 2018 मध्ये कोणत्या स्थानकांचा प्रथम क्रमांक लागतो? 

 ☑️ जोधपूर रेल्वे स्टेशन
_________________________________
🟠 भारतातील पहिले रेल्वे व वाहतूक
विद्यापीठ 2018 मध्ये कोठे स्थापन करण्यात आले? 

☑️ वडोदरा
________________________________
🔴 चीनने उभारलेला जगातील सर्वात लांब सागरी पूल हाँगकाँग -मकाऊ- झुहाईची लांबी किती किलोमीटर आहे ? -

☑️ 55 किलोमीटर

विश्व के प्रमुख संगठन और उनके मुख्यालय



1. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) - नैरोबी
2. अफ़्रीकी एकता संगठन (OAU) - आदिस-अबाबा
3. गैट (GATT) - जेनेवा
4. एशियाई विकास बैंक (ADB) - मनीला
5. नाटो (NATO) - ब्रुसेल्स
6. एमनेस्टी इंटरनेशनल - लंदन
7. अंतर्राष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) - वाशिंगटन डी. सी.
8. रेडक्रॉस - जेनेवा
9. सार्क (SAARC) - काठमाण्डु
10. इंटरपोल (INTERPOL) - पेरिस(लेओंस)
11. विश्व व्यापार संगठन (WTO) - जेनेवा
12. अमरीकी राज्यों का संगठन (OAS) - वाशिंगटन डी. सी.
13. यूनेस्को - पेरिस
14. परस्पर आर्थिक सहायता परिषद् (COMECON) - मास्को
15. वर्ल्ड काउंसिल ऑफ़ चर्चेज (WCC) - जेनेवा
16. यूरोपीय ऊर्जा आयोग (EEC) - जेनेवा
17. यूनिसेफ - न्यूयॉर्क
18. पश्चिमी एशिया आर्थिक आयोग (ECWA) - बगदाद
19. संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायोग (UNHCR) - जेनेवा
20. अंतर्राष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजेंसी (IAEA) - वियना

21. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संगठन (UNIDO) - वियना
22. संयुक्त राष्ट्र व्यापार एवं विकास सम्मलेन (UNCTAD) - जेनेवा
23. विश्व वन्य जीव संरक्षण कोष (WWF) - ग्लांड(स्विट्ज़रलैंड)
24. अंतर्राष्ट्रीय ओलम्पिक कमिटी (IOC) - लुसाने
25. यूरोपीय कॉमन मार्केट (ECM) - जेनेवा
26. राष्ट्रमंडलीय राष्ट्राध्यक्ष सम्मलेन (CHOGM) - स्ट्रान्सबर्ग
27. पेट्रोलियम उत्पादक देशों का संगठन (OPEC) - वियना
28. आर्थिक सहयोग और विकास संगठन (OECD) - पेरिस
29. यूरोपीय मुक्त व्यापार संघ (ECTA) - जेनेवा
30. राष्ट्रमंडल (कॉमनवेल्थ) - लंदन
31. यूरोपीय आर्थिक समुदाय (EEC) - जेनेवा
32. यूरोपीय संसद - लक्जमबर्ग
33. यूरोपियन स्पेस रिसर्च आर्गेनाईजेशन (ESRO) - पेरिस
34. यूरोपियन परमाणु ऊर्जा समुदाय (EURATON) - ब्रुसेल्स
35. एशिया और प्रशांत क्षेत्रों का आर्थिक और सामाजिक आयोग - बैंकाक
36. अफ़्रीकी आर्थिक आयोग (ECA) - आदिस-अबाबा
37. विश्व बैंक - वाशिंगटन डी. सी.
38. अरब लीग - काहिरा
39. दक्षिण पूर्वी एशियाई राष्ट्रों का संघ (ASEAN) - जकार्ता

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच 15/05/2020

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे 

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
 पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे 

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे 

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे 

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे 

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात 

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

​राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ऐवजी २०२३मध्ये


- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ ऐवजी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला आहे. २०२१ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेदरम्यानच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे. 

- करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कारणास्तव राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली.

- ‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या संचालक मंडळाने २०२१ ऐवजी ही स्पर्धा २०२३ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती तेव्हा त्याच दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

-  या स्थितीत पुढील वर्षी स्पर्धा घेणे शक्य नाही,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

- ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार होती. 

- ‘‘२०२३ मध्ये आता ही स्पर्धा होणार असली तरी यजमान म्हणून पहिली पसंती त्रिनिदाद आणि टोबॅगोलाच असणार आहे,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले

भारतीय पोस्टाने स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ टपालाचे विशेष कव्हर..


 
🔰स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ भारतीय पोस्टाने आज एका विशेष समारंभात मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसच्या ऐतिहासिक इमारतीतील बायसेंटेनरी सभागृहात टपालाचे एक विशेष कव्हर प्रकाशित केले.

🔰या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल, हरिश चंद्र अगरवाल आणि मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाच वेगवेगळ्या विभागातील स्थलांतरित कामगारांना बोलावून त्यांच्या हस्ते हे कव्हर प्रकाशित करण्यात आले.

🔰 या स्थलांतरीत कामगारांमध्ये भारतीय टपाल विभागासाठी मास्क शिवणा-या एका शिंप्यासह दोन बांधकाम मजूर, टॅक्सीचालक, सोनारकाम करणारा कारागीर यांचा समावेश होता. देशाभरातील टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांत परतण्याच्या प्रयत्नात असतांना हा समारंभ झाला.

पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घोषणा.




🔰 पॅरालिम्पिक अ‍ॅथलिट दीपा मलिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
भारताच्या पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी दीपा मलिकने हा निर्णय घेतल्यचं कळतंय.

🔰 तर पॅरालिम्पिक खेळांमध्ये पहिलं पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिकच्या नावावर जमा आहे.

🔰 तसेच 2016 साली रिओमध्ये झालेल्या शॉटपुट प्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त IPC ओशिनीया-आशियाई अजिंक्यपद यासह अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये दीपाने पदकांची कमाई केली होती.

🔰 राष्ट्रीय क्रीडा संहीतेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचं असेल तर त्याला आधी निवृत्ती स्विकारावी लागते. या नियमाचं पालन करतानाच दीपाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आदिकेंद्रकी पेशी

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


◾️ स्पष्ट दिसणारे केंद्रक व पेशीअंगके नसतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असते म्हणतात

◾️ आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूप लहान असतात 

◾️या पेशीतील केंद्रकांच्या मध्ये आवरण नसते व  पेशींच्या मध्ये एकच गुणसूत्रांची जोडी असते 

◾️यामध्ये तंतुकणिका नसतात परंतु परंतु रायबोझोम चे कण असतात 

📌 उदाहरण जिवाणू ,सायानोबॅक्टरिया ,मायक्रोप्लाजमा 
______________________________________
.             🔰दृश्यकेंद्रकी पेशी 🔰
______________________________________
◾️या पेशींच्या मध्ये स्पष्ट दिसणारे केंद्रक आणि पेशीअंगके असतात त्या पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात 

◾️दृश्यकेंद्रकी पेशी आकाराने मोठे असतात यामध्ये स्पष्ट दिसणारे केंद्र व केंद्र की द्रव असते 

◾️या पेशी मध्ये गुणसूत्रांच्या अनेक जोड्या असतात 

◾️या पेशी अति विकसित असतात 

📌उदाहरणत आमीबा , स्पायरोगायरा, वनस्पती , प्राणी
_______________________________________

अर्जुन पुरस्कारासाठी BCCI बुमराहच्या नावाची शिफारस करण्याच्या तयारीत


🔰भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहचं नाव बीसीसीआय यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या अर्जुन पुरस्कारासाठी प्रत्येक क्रीडा संस्थेला दोन नावांची शिफारस करायची असते.

🔰२०१९ साली बुमराहचं नाव चर्चेत होतं, मात्र रविंद्र जाडेजासोबतच्या शर्यतीत बुमरहाचं नाव मागे पडलं होतं. गेल्या काही वर्षांमधली बुमराहची कामगिरी पाहता बीसीसीआयचे अधिकारी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
__________________________________

14 May 2020

वाचा :- घटना आणि देशातील पहिले राज्य

● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : *हिमाचल प्रदेश*

● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : *तामिळनाडू*

● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : *राजस्थान*

● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : *राजस्थान* 

● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : *उत्तराखंड*

● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : *हरियाणा*

● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : *आंध्रप्रदेश*

● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : *हिमाचल प्रदेश*

● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : *केरळ*

● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : *पंजाब*

● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : *कर्नाटक*

● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : *कर्नाटक*

● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : *उत्तरप्रदेश*

● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : *तामिळनाडू*

● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र (मुंबई)*

● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : *महाराष्ट्र*

● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : *आंध्रप्रदेश* (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : *छत्तीसगड*

● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : *मध्यप्रदेश*

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका

२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार

४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२

५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान

लॉर्ड जॉन लॉरेन्स

कार्यकाळ :  (१८६३-१८६९) :

  सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला.

   १८६८ मध्ये  पंजाब अवधसाठी कूळ कायदा  लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

  दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

  सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच 14/05/2020

देशातील करोना मृत्युदर जगात सर्वात कमी.

🔰इतर देशांपेक्षा भारतात करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे ३.२ टक्के इतके आहे. काही राज्यांमध्ये तर हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. या तुलनेत जागतिक करोना मृत्युदर ७.५ टक्के राहिलेला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी दिली.

l🔰जगभरात ४१ लाख लोक करोनाग्रस्त झाले असून त्यापैकी आत्तापर्यंत २ लाख ८५ हजार रुग्ण दगावले. भारतात २२९३ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰केंद्रीय आरोग्यमंत्री राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी हर्षवर्धन यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, देशात केवळ मृत्यूचा दर कमी आहे असे नव्हे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. हे प्रमाण आता ३१.७० टक्क्यांवर पोहोचलेले आहे.

🔰देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२,४५५ इतकी आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये १५३८ रुग्ण बरे झाले. मात्र देशभरातील करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ७० हजाराच्या घरात गेली असून मंगळवारी ती ७०,७५६ इतकी झाली. सोमवारी एका दिवसात चार हजारहून अधिक रुग्णांची भर पडली होती. गेल्या चोवीस तासांमध्ये ३६०४ नवे रुग्ण आढळले व ८७ रुग्णांचा मृत्यू झाला.