Ads

02 January 2021

जन्मदाता/आविष्कारक/खोजकर्ता


1. इंटरनेट के जनक - विन्टन जी. सर्प

2. मोबाइल फोन के जनक - मार्टिन कूपर

3. www वल्र्ड वाइड वेव के जनक- टिम बनर्स

4. क्लोनिंग - इयान विल्मुट

5. जीनोम परियोजना- माइकल कार्लिन्स

6. उपग्रह प्रणाली- आर्थर क्लार्क

7. विश्व के सात नये आश्चर्य - बर्नार्ड बेबर

8. इंटरपोल की स्थापना - जोहान्न स्क्रेबर

9. रेड क्रास की स्थापना - हेनरी डयूनांट

10. नर्सिंग व्यवस्था - फ्लोरेंस नाइटिंगेल

11. स्काऊट एण्ड गाइड- वेडेन पावेल

12. ब्रेल लिपि -लुई बेल

13. ईसाई धर्म - ईसा मसीह

14. मुस्लिम धर्म - मोहम्मद पैगम्बर

15. धर्म सुधार - मार्टिन लूथर किंग

16. पारसी धर्म - जरथुस्त्र (जोरास्टियन)

17. जर्मन साम्राज्य - बिस्मार्क

18. फासिस्टवाद- मुसोलिनी

19. रूसी क्रांति - लेनिन

20. चीनी क्रांति - माओत्से तुंग

21. समाजवाद - कार्ल मार्क्स

22. विकासवाद का सिद्धांत - चार्ल्स डार्विन

23. दासप्रथा की समाप्ति- अब्राहिम लिंकन

24. डाक टिकिट के जनक - रोनोल्ड हिल

25. पुलिस व्यवस्था - अगस्ट्स

26. मोनालिसा - लियोनार्डो-द-विन्सी

27. टेस्ट ट्यूब बेबी तकनीक -डा0 राबर्ट एडवडर्स एवं पैट्रिक स्टेप्टो

28. प्रत्यक्षवाद के जनक- अगस्त काम्टे

29. आधुनिक टुर्की का निर्माता -मुसतफा कमाल पाशा

30. इटली का एकीकरण - कैबूर

31. अमरीका की खोज - कोलम्बस (1492)

32. नेपोलियन को पराजित करने वाला सेनापति- ड्यूक आफ वेलिंगटन

33. इटली में लालकुर्ती दल - गैरीबाल्डी

34. पक्की सड़कों को जन्मदाता - जान लंदन

35. वेदो का अध्ययन - मैक्समूलर

36. राष्ट्रसंघ की स्थापना - बुडरो विल्सन

37. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना- फ्रेकलिन रूजवेल्ट

38. चार बार इंग्लेण्ड का प्रधानमंत्री बनने वाला व्यक्ति - ग्लैडस्टन

39. चार बार अमरीका का राष्ट्रपति बनने वाला व्यक्ति- रूजवेल्ट

40. गुटनिरपेक्ष आन्दोलन के संस्थापक - जवाहर लाल नेहरू कर्नल नासिर एवं मार्शल टीटो

41.फुटबॉल का जादूगर - पेले

42. सामाजिक समझौते का सिद्धांत -हाब्स, लाक, रूसो

43. हरित क्रांति - नार्मन बोरलांग (मैक्सिको)

44. पंचवर्षीय योजना - जोसेफ स्टालिन

45. अमरीकी स्वतंत्रता घोषणापत्र - थामस जैफरसन

46. स्वेज नहर का निर्माता- फर्डीनेण्ड-डी-लेसेप्स

47. जूलियस सीजर का हत्यारा - बू्ट्स

48. अब्राहम लिंकन का हत्यारा- जान विल्कस बूथ

49. जेम्स गारफील्ड का हत्यारा- चार्ल्स टीपू

50. विलियम मैकिन्ले का हत्यारा - लियोन जोलयोश्च

51. जान एफ0 कैनेडी का हत्यारा -ली-हार्वे-आस्वाइल्ड

52. डिजनीलैण्ड के निर्माता - वाल्ट डिजनी

53. द्वितीय विश्व युद्ध में मित्र राष्ट्रों की सेना का कमाण्डर - आइजन हावर

54. अंग्रेजी काव्य के पिता - ज्योफ्रे चौसर

55. जंगल बुक के लेखक - रूडयार्ड किपलिंग

56. के.जी. शिक्षा - फ्रीवेल

57. नरभक्षी शासक- ईदी अमीन

58. प्रसिद्ध भविष्यवेत्ता - नास्त्रोडेमस

59. बंगलादेश के जनक - शेख मुजीबुर रहमान

60. मिस बल्र्ड प्रतियोगिता के जनक- एरिक मोर्ली

61. हिरोशिमा पर परमाणु बम गिराने वाला पायलट - विलियम फिरकी

62. नागासाकी पर परमाणु बम गिराने वाला पायलट - जार्ज स्वीनी

63. जर्मनी में नाजीवाद - हिटलर

64. जापान पर परमाणु बम गिराने का आदेश देने वाले अमरीकी राष्ट्रपति - हेनरी ट्रूमेन

65. राजनीति विज्ञान के जनक- मैकियावेली

66. उत्परिवर्तनवाद के जनक -हयूगो-डी-ब्रीज

67. जीवन का संशलेषण -हरगोविन्द खुराना

68. डी0एन0ए0 की संरचना - वाटसन एवं क्रिक

69. डायनामाइट के अविष्कारक -अल्फ्रेड नोबेल

70. आनुवंशिकता के जनक - ग्रेगर जान मेंडल

71. जनसंख्या सिद्धांत - माल्थस

72. इतिहास के पिता - हिरोडोरस

73. भूगोल के जनक - हिकेटियस

74. माउण्ट एवरेस्ट की खोज- जार्ज एवरेस्ट

75. समाज शास्त्र के जनक - अगस्त काम्टे

76. डी0एन0ए0 फिंगर प्रिंटिंग की खोज - एलेक जेफ्रे

77. एण्डोनेशिया के स्वतंत्रता संग्राम सेनानी-हो-ची-मिन

78. अमरीकी क्रांति के जन्मदाता -जार्ज वाशिंगटन

79. ओलंपिक खेलो के जनक -बैरो-पियरे-द-कूबतीन

80. ऐलोपैथी चिकित्सा के जनक- हिप्पोक्रेट्स

81. होम्योपैथी के जनक- सेम्युअल हेनीमैन

82. टिंवक्ल-टिंवक्ल लिटिल स्टार कविता के लेखक- एन.एण्ड जेन टेलर

83. पृथ्वी का सर्वप्रथम चक्कर लगाया - मैगेलन

84. मानसून हवाओं की खोज - हिप्पेलस

85. चीन की खोज - मार्कोपोलो

86. तस्मानिया एवं न्यूजीलैण्ड की खोज- तस्मान

87. ग्रहों की खोज - कैपलर

88. भारत की समुद्री मार्ग से खोज- वास्कोडिगामा

89. कागज का अविष्कारक - साईलुन

90. फिलीस्तीन मुक्ति संगठन के संस्थापक- महमूद अब्बास

91. वल्र्ड वाइल्ड फंड { WWF } के संस्थापक - पीटर स्काट माउंटफोर्ट एवं मैक्स निकोलसन


डिसेंबरमध्ये विक्रमी ‘जीएसटी’ संकलन


अप्रत्यक्ष कर संकलनाचा सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा ‘जीएसटी’ अर्थात वस्तू व सेवा कररूपी महसूल डिसेंबर २०२० मध्ये प्रथमच १,१५,१७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


वार्षिक तुलनेत १२ टक्क्य़ांची भर टाकणारे सरकारचे कर संकलन प्रणाली सुरू झालेल्या जुलै २०१७ कालावधीनंतर प्रथमच विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. डिसेंबर २०१९ मधील १.०३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा ते वाढले आहे.


अप्रत्यक्ष कर संकलनातील वाढ व त्याचा लक्षणीय टप्पा हा करोना आणि टाळेबंदीनंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये ८७ लाख जीएसटीआर-३बी भरणा झाला आहे.


वस्तू व सेवा कर प्रणाली १ जुलै २०१७ पासून अस्तित्वात आली. २१ महिन्यात डिसेंबरमध्ये प्रथमच १.१५ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला. यापूर्वी, एप्रिल २०१९ मध्ये १,१३,८६६ लाख कोटी रुपये असे सर्वोच्च कर संकलन झाले होते.


कर प्रणाली लागू झाल्यापासून संकलनाने एप्रिल २०२० मध्ये ३२,१७२ कोटी रुपये असा किमान महसूल मिळविला होता. टाळेबंदीचा हा परिणाम होता. तर सप्टेंबरमध्ये शिथील टाळेबंदीमुळे त्यात प्रथमच वार्षिक वाढ नोंदली गेली.


२०२० मधील लाख कोटीची परंपरा :


डिसेंबर – रु.१,१५,१७४ कोटी

नोव्हेंबर – रु.१,०४,९६३ कोटी

ऑक्टोबर – रु.१,,०५,१५५ कोटी

भारताचे आतापर्यंतचे मुख्य न्यायाधीश

🔰 ०१) हरिलाल जे. कानिया : १९५०-५१

🔰 ०२) एम. पतंजलि शास्त्री : १९५१-५४

🔰 ०३) मेहर चंद महाजन : १९५४-५४

🔰 ०४) बी.के. मुखर्जी : १९५४-५६

🔰 ०५) एस.आर. दास : १९५६-५९

🔰 ०६) भुवनेश्वर प्रसाद सिन्हा : १९५९-६४

🔰 ०७) पी.बी. गजेंद्रगडकर : १९६४-६६

🔰 ०८) ए.के. सरकार : १९६६-१९६६

🔰 ०९) के. सुब्बा राव : १९६६-६७

🔰 १०) के.एन. वांचू : १९६७-६८

🔰 ११) एम. हिदायतुल्लाह : १९६८-७०

🔰 १२) आई.सी. शाह : १९७०-७१

🔰 १३) एस.एम. सीकरी : १९७१-७३

🔰 १४) ए.एन. रे : १९७३-७७

🔰 १५) एम.एच. बेग : १९७७-७८

🔰 १६) वाई.वी. चंद्रचूड़ : १९७८-८५

🔰 १७) पीएन भगवती : १९८५-८६ 

🔰 १८) आर.एस. पाठक : १९८६-८९

🔰 १९) ई.एस. वेंकटरमैया :१९८९-८९

🔰 २०) एस. मुखर्जी : १९८९-९०

🔰 २१) रंगनाथ मिश्र : १९९०-९१

🔰 २२) के.एन. सिंह : १९९१-१९९१

🔰 २३) एम.एच. कानिया : १९९१-९२

🔰 २४) आई.एम. शर्मा : १९९२-१९९३

🔰 २५) एम.एन. वेंकटचलैया : १९९३-९४

🔰 २६) ए.एम. अहमदी : १९९४-९७ 

🔰 २७) जे. एस. वर्मा : १९९७-९८

🔰 २८) एम.एम. पंछी : १९९८-९८

🔰 २९) ए.एस. आनंद : १९९८-२००१

🔰 ३०) एस. पी. भरूचा : २००१-०२

🔰 ३१) बी.एन. कृपाल : २००२-०२

🔰 ३२) जी. बी. पटनायक : २००२-०२

🔰 ३३) वी. एन. खरे : २००२-०४

🔰 ३४) एस. राजेंद्र बाबू : २००४-०४

🔰 ३५) आर. सी. लाहोटी : २००४-०५

🔰 ३६) वाई. के. सब्बरवाल : २००५-०७

🔰 ३७) के. जी. बालकृष्णन : २००७-१०

🔰 ३८) एस. एच. कपाड़िया : २०१०-१२

🔰 ३९) अल्तमस कबीर : २०१२-१३

🔰 ४०) पालानीसामी सदाशिवम : २०१३-१४

🔰 ४१) राजेन्द्र लोढ़ा : २०१४-१४ 

🔰 ४२) एच.एल दत्तु : २०१४-१५

🔰 ४३) तीरथ सिंह ठाकुर २०१५-१७

🔰 ४४) जगदीश सिंह खेहर : २०१७-१७

🔰 ४५) दीपक मिश्रा : २०१७-१८

🔰 ४६) रंजन गोगोई : २०१८-१९

🔰 ४७) शरद अरविंद बोबडे : १८ नोव्हेंबर २०१९ पासून .

एमपीएससी मंत्र : ऐतिहासिक घटनांचे शताब्दी वर्ष : २०२०


✔️ स्वातंत्र्यपूर्व भारतातील पहिल्या सार्वजनिक निवडणुका, असहकार आंदोलन आणि गांधीजींच्या हाती स्वातंत्र्यलढय़ाची सूत्रे, भारतीय उद्योग जगतात असोचॅमची स्थापना, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे अलिगड मुस्लीम विद्यापीठात रूपांतर अशा आधुनिक भारताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणाऱ्या घटनांचे शताब्दी वर्ष म्हणून २०२० या वर्षांकडे पाहता येईल.


✳️ पहिल्या सार्वजनिक निवडणुका : १९२० ➖


✅ नगरपालिका, जिल्हा मंडळ अशा स्थानिक मंडळांमध्ये पूर्णपणे लोकप्रिय नियंत्रण असावे, प्रांतीय शासनात अंशत: जबाबदार सरकारची स्थापना करावी, केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार करून तेथे भारतीयांना अधिक प्रतिनिधित्व द्यावे, प्रांतातील लोकप्रिय शासनावरील भारत सचिवाचे नियंत्रण कमी करावे या १८१८च्या माँटफर्ड अहवालातील शिफारशींना १९१९च्या भारत सरकार कायद्यात कायदेशीर रूप देण्यात आले आणि त्यानुसार प्रांतात दुहेरी शासन (अर्थात प्रांतिक शासन आणि केंद्रीय शासन) पद्धतीचा प्रारंभ झाला. प्रारंभापासूनच या कायद्याला पुरेसे सहकार्य मिळाले नसले तरीही भारतातील पहिली निवडणूक १९२० साली झाली आणि १९२१ ते १९३७ या कालावधीत नऊ प्रांतांमध्ये दुहेरी शासन चालले. बंगालमध्ये मात्र १९२४ ते १९२७ आणि मध्य प्रांतात १९२४ ते १९२६ या काळात दुहेरी शासन नव्हते.


✳️ असहकार चळवळ ➖


✔️ १९१९ मध्ये संमत करण्यात आलेल्या जुलमी रौलट कायद्यामुळे झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांड तसेच खिलाफत वादावरील इंग्रजांची भूमिका, पंजाबमधील लष्करी कायदा आणि त्यानंतर पंजाबमधील घटनांची चौकशी करण्यासाठी सरकारने केलेली हंटर आयोगाची नियुक्ती ही केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी केलेली क्लृप्ती आहे असे लक्षात आल्यामुळे १ ऑगस्ट १९२० रोजी गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली. त्याच दिवशी १ ऑगस्टच्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाल्याने त्यांच्या मृत्यूचा दुखवटा व आंदोलनाची सुरुवात देशभरातील जनतेने हरताळ पाळून केली. सप्टेंबर १९२० मध्ये कोलकत्ता येथे खास अधिवेशन बोलावून राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा कार्यक्रम अंगीकारला. डिसेंबर १९२० मधील राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सरकारी पदव्यांचा त्याग करणे, कायदे मंडळ, न्यायालये, शिक्षण संस्था, परकीय माल यावर बहिष्कार टाकणे तसेच शिस्त राखणे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांना संरक्षण, खादीचा वापर अशा मार्गाचा वापर करून असहकार आंदोलनाचा मार्ग निश्चित केला. १९२१ मध्ये असहकार चळवळीत जवळजवळ ३०००० लोक तुरुंगात गेले, परंतु चळवळीदरम्यान उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे लोकांनी एका पोलीस चौकीला आग लावली त्यात अनेक पोलीस जळून मृत्युमुखी पडल्यामुळे अहिंसक मार्गाने चालणाऱ्या चळवळीला गालबोट लागले आणि गांधीजींनी या घटनेचा निषेध म्हणून ही चळवळ मागे घेतली. गांधीजींच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली परंतु तत्कालीन एकूण परिस्थिती पाहता आम जनतेची चळवळ दडपून टाकणे सरकारला अवघड नव्हते. जाळपोळीचे निमित्त होऊन जर ही चळवळ दडपली गेली असती तर जनतेची चळवळ दडपली जाऊ शकते असा निष्कर्ष निघाला असता तसेच जवळपास दीड वर्ष चाललेल्या चळवळीमुळे जनतेच्या सहनशीलतेचा अंत होत आला होता त्यामुळे गांधीजींनी कठोर आत्मसंयमाशिवाय सत्याग्रहाचा प्रयोग होऊ शकत नाही असे स्पष्ट करून जनतेला रचनात्मक कार्य करण्याचा निर्देश देऊन चळवळ मागे घेतली.


🏢 अलिगड मुस्लीम विद्यापीठ ➖ 


✔️ इस्लाममधील सामाजिक दुष्प्रवृत्ती असणाऱ्या पीर प्रथेला विरोध, गुलामांची प्रथा इस्लामविरोधी आहे अशा आपल्या आधुनिक विचारांचा प्रसार ‘तहजीब उल अखालाक’ या पत्रिकेतून करणाऱ्या सर सय्यद अहमद खान यांनी १८७५ साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सुरु केले. तेथे पाश्चात्त्य विज्ञानाबरोबरच मुस्लीम धर्माचेही शिक्षण दिले जात होते. याच कॉलेजचे रूपांतर १९२० साली अलिगड मुस्लीम विद्यापीठात झाले. या विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त एक टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. सध्या या ठिकाणी उर्दू, अरबी आणि पर्शियन भाषांवर तसेच इस्लामिक साहित्यावर संशोधन केले जात असल्यामुळे संपूर्ण इस्लामिक जगाबरोबर भारताच्या सांस्कृतिक संबंधांना नवी ऊर्जा मिळत आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी या विद्यापीठातर्फे सध्या ‘ब्रिज कोर्स’ सुरू करण्यात आला आहे.


02 January 2021 Current Affairs


Q.1. रिवर क्रूज 'ब्रह्मपुत्र मुकुता' का उद्घाटन किस राज्य में किया गया है ?

Ans. असम


Q.2. किसे विश्व संगीत समारोह में तानसेन सम्मान से सम्मानित किया गया है ?

Ans. प. सतीश व्यास


Q.3. रक्षा मंत्रालय ने किस रक्षा कंपनी को 'ग्रीन चैनल का दर्जा' दिया है ?

Ans. L&T डिफेंस


Q.4. महाराष्ट्र के किस आदिवासी शहर ने 'मिनी महाबलेश्वर' का टैग अर्जित किया है ?

Ans. जौहर


Q.5. ग्लोब सॉकर अवार्डस में प्लेयर ऑफ़ द सेंचुरी पुरस्कार किसने जीता है ?

Ans. क्रिस्टियानो रोनाल्डो


Q.6. प्रतिष्ठित इंजीनियर पुरस्कार 2020 से किसे सम्मानित किया गया है ?

Ans. वी. के. यादव


Q.7. किस बैंक ने खुदरा ग्राहकों को लोन देने के लिए डिजिटल लेंडिंग प्लेटफ़ॉर्म शुरू किया है ?

Ans. बैंक ऑफ़ बडौदा


Q.8. केंद्र सरकार ने किसे अगले छः महीने के लिए अशांत क्षेत्र घोषित किया है ?

Ans. नागालैंड


Q.9. किस देश ने 'फाइव आइज' के पांच देशों वाले गठबंधन में शामिल होने के संकेत दिए हैं ?

Ans. जापान


Q.10. भारत के सबसे ऊंचे मौसम विज्ञान केंद्र का उद्धाटन कहाँ किया गया है ?

Ans. लेह

सिंहगड इन्स्टिट्युट ची प्लेसमेंट मध्ये उत्तुंग झेप


 देशातील विविधनामांकित कंपनीत सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पितांबरे यांनी माहिती दिली.

“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून “टीसीएस” चा उल्लेख केला जातो.


“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत सिंहगड संस्थेत अंतीम वर्षात( २०२१)मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या “टीसीएस” कंपनीकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीतून कंपनीत आवश्यक असलेली शैक्षणिक गुणवत्ता, उपयुक्त ज्ञान, शिस्त या सर्व गोष्टींवर “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीतील मुलाखत घेणारे अधिकारी प्रभावित झाले. कंपनीत आवश्यक असलेले सर्व गुण सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांकडे दिसुन आल्याने सिंहगड मधील ३८२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली. त्यामधील ३२७ विद्यार्थ्यांची “टीसीएस नॅशनल काॅलिफायर टेस्ट” (एन क्यु टी) परिक्षेमधुन निवड झाली आहे तसेच ५५ विद्यार्थ्यांची “टीसीएस कोड विटा” परिक्षेमधुन निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक वर्गातून अभिनंदन होत आहे.


भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सिंहगड संस्था विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवीन मुल्यवर्धित कार्यशाळा यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून शिक्षण देत आहे. याशिवाय सिंहगड संस्थेच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग व प्लेसमेंट यांचा स्वतंत्र विभाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज सिंहगड संस्थेमधील विद्यार्थी “टीसीएस” सारख्या नामांकित कंपनीत निवडला जात आहे.
“टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” या कंपनीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेतील सर्व पदाधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

देशात १०५ वाघांचा मृत्यू; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर



व्याघ्रसंवर्धसाठी आटोकाट प्रयत्न होत असतानाच मागील वर्षी देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यात वाघांची राजधानी मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. ६१ टक्के वाघांचे मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याने हा चिंतेचा विषय मानला जात आहे.


भारतात २०१८मध्ये करण्यात आलेल्या व्याघ्रगणना सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या वाढल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये देशात सुमारे २ हजार ९६७ वाघ असल्याची नोंद झाली. ही संख्या जगभरातील एकूण व्याघ्रसंख्येच्या सुमारे ७५ टक्के आहे. त्यामुळे व्याघ्रसंवर्धनात केलेल्या कामांना यश आले होते. पण, २०२०मध्ये देशात १०५ वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने दिली आहे. यात मध्य प्रदेशात सर्वाधिक २९, तर महाराष्ट्रात १६ मृत्यू झाले आहेत. ६४ वाघांचे मृत्यू देशातील विविध भागातील व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यात शिकारीच्या घटनांचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात १६पैकी नऊ मृत्यू हे प्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज प्रतिपादित केली जात आहे.


२०२०मधील व्याघ्रमृत्यू


मध्य प्रदेश २९


महाराष्ट्र १६


कर्नाटक १२


तामिळनाडू ८


उत्तर प्रदेश ८



देशातील वाघांचे पाच वर्षांतील मृत्यू -


वर्ष मृत्यू


२०१६ -१२१

महत्वपूर्ण भारतीय संविधान के Question answer



🔲 किस अधिनियम द्वारा भारत में प्रांतों को स्वायत्तता प्रदान की गई थी

Ans- भारत सरकार अधिनियम, 1935✅✅


🔲 शासन की एकात्मक पद्धति का लाभ हैं

Ans- दृढ़ राज्य✅✅


🔲 जिस संविधान सभा द्वारा भारत के संविधान का अधिनियम किया गया, उसके सदस्य थे

Ans- विभिन्न प्रांतों की विधान सभाओं द्वारा निर्वाचित✅✅


🔲 भारतीय संविधान में आपात उपबंध कहां से लिए गए हैं

Ans- भारत सरकार अधिनियम,1935✅✅


🔲 भारत की संविधान सभा किसके कहने पर बनाई गई थी

Ans- कैबिनेट मिशन✅✅


🔲 भारत का संविधान सभा का अध्यक्ष कौन था

Ans- डाॅ. राजेन्द्र प्रसाद✅✅


🔲 भारतीय संविधान की प्रस्तावना में किस प्रकार के न्याय की बात कही गई हैं

Ans- सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय की बात की गई हैं।✅✅


🔲 सविधान की प्रस्तावना में भारत को किस रूप में घोषित किया गया हैं

Ans- एक प्रभुसत्तासंपन्न, समाजवादी, पंथनिरपेक्ष, लोकतांत्रिक गणराज्य✅✅


🔲 भारत पूर्ण संप्रभु लोकतांत्रिक गणतंत्र कब बना

Ans- 26 नवंबर, 1949✅✅


🔲 सविधान की उद्देशिका का संशोधन कितनी बार किया गया था

Ans- एक बार✅✅


🔲 भारतीय संविधान में ‘संघीय’ शब्द का प्रयोग कहां पर हुआ हैं

Ans- संविधान में कही नही✅✅


🔲 भारतीय संविधान के अनुच्छेद 1 में यह घोषणा की गई हैं, कि ‘‘इंडिया अर्थात भारत’’ ……… हैं

Ans- राज्यों का संघ✅✅


🔲 किस अनुच्छेद में इंडिया को भारत भी कहा गया हैं

Ans- अनुच्छेद 1✅✅


🔲 भारत में किस प्रकार का संघवाद देखा जाता हैं

Ans- संघ बनाकर राज्यों का गठन करना✅✅


🔲 भारतीय संविधान कब लागू हुआ

Ans- 26 जनवरी, 1950✅✅


🔲 भारतीय संविधान की रचना के समय संविधान सभा का संविधानिक सलाहकार कौन था

Ans- बी.एन.राव✅✅


🔲 सरकार की किस प्रणालि में द्विसदन पद्धति एक अनिवार्य लक्षण हैं

Ans- संघीय प्रणाली✅✅


🔲 भारत एक कैसा देश हैं

Ans- लोकतंत्र✅✅


🔲 भारत में, एकल नागरिकता की अवधारणा अपनाई गई हैं

Ans- इंग्लैड से✅✅


🔲 सविधान का कौन सा भाग नागरिकता के प्रावधानों से संबंधित हैं- 

Ans- II ✅✅


🔲 भारतीय संवाद निकट हैं

Ans- कनाडा कें✅✅


🔲 भारतीय संविधान ने भारतीय महासंघ की योजना किसके संविधान से ली थी

Ans- कनाडा✅✅


🔲 भारत के संविधान का निर्माता किसे माना जाता हैं

Ans- बी.आर. अंबेडकर✅✅

मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश


👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय .

शनिवारच्या कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनसाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड.


🔰 कोरोना लसीकरणाचा ड्राय रन उद्या देशभर होणार असून त्यासाठी राज्यातल्या पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. 


🔰 कद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन केल्याचं त्यांनी सांगितलं.


🔰 ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातली तीन आरोग्य केंद्रं निवडली आहेत. तीनही  ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडलं जाईल. मात्र प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही. पण त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. 


🔰 परत्यक्ष लसीकरणाच्या दृष्टीनं काही उणिवा राहिल्या असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीनं या ड्रायरनचा मोठा उपयोग होईल, असं टोपे यांनी सांगितलं.


🔰 लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तिनं कक्ष केले जातील. 


🔰 पण्यातलं जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातलं जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातलं डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचं शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातलं शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

आजपासून काय बदलणार.


🔰नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🔰सपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.


🔰वहॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉईडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.


🔰लण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.


🔰यपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.


🔰वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.


🔰एलपीजी सिलिंडर गॅस किंमत : स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरच्या किंमती नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील लक्षणीय बदलापोटी गॅस वितरक कंपन्या त्यांच्या सिलिंडरच्या किंमती सातत्याने बदलत असतात. नव्या वर्षांलाही ही परंपरा कायम राहणार आहे.

मुकेश अंबानींना मागे टाकत चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.


🔰चीनचे के झोंग शानशान हे एक असे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा माध्यमांमध्ये खूपच कमी प्रमाणात उल्लेख होतो. मात्र, शानशान यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.


🔰बलूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांनी ही संपत्ती खूपच कमी वेळेत कमावली आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. काही काळापर्यंत चीनच्या बाहेर जगात त्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती होती.


🔰६६ वर्षीय शानशान यांचा राजकारणात हस्तक्षेप नाही त्यामुळे त्यांची ‘लोन वोल्फ’ अशीही ओळख बनली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात चांगलं यश मिळवलं आहे. चीनची लस बनवणारी कंपनी बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मेसी इंटरप्रायझेसला त्यांनी एप्रिल महिन्यांत अधिग्रहित केलं. त्यानंतर काही महिन्यांनंतर बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नोंग्फू स्प्रिंग देखील ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीला त्यांनी बाजारातील मोठी कंपनी बनवलं. शेअर बाजारात नोंग्फूचे शेअर १५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर वंताईच्या शेअरमध्ये २ हजार टक्के वाढ झालेली पहायला मिळाली.

जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.


🔰तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.


🔰तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.


🔰तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.

जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.


🔰तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.

तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.

लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.

Pfizer-BioNTech लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी


🔰जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे.

तर या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.


🔰बरिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.


🔰करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

01 January 2021

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

31 December 2020

वहाबी आंदोलन


🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

 🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते 

🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

 🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते



📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚

🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले


📚  फाँसी ची शिक्षा 📚

🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

🔹कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली


फॉर्वर्ड ब्लाॕक



🔹सभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


 🔸पक्षाचे उद्दीष्ट -


कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना

मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


मुखपत्र-फार्वड ब्लॉक


"नागपुर-पहिली परिषद "


२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

 परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

ताश्कंद करार



● भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी हा करार झाला.


● भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 


● भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या मध्यस्थीने हा करार झाला.


●या करारान्वये संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.


● २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.


● एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.


● एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.


● एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.


● एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.


● युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.


● उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.


● अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे. 


● या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथेच निधन झाले.

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य



●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



🎯 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


🎯 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


🎯 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

सटॅच्यू ऑफ युनिटी


✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार 

✔️ कोठे :-  नर्मदा नदी , गुजरात

✔️ उची :- १८२ मीटर 

✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात 

      भव्य पुतळा आहे. 

✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ✔️ पतळ्याचे वजन :-  १७०० टन 

✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प 

      आहे. 

✔️ पायांची उंची :- ८० फूट,

✔️ हाताची उंची :-  ७० फूट

✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये  

     असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची       

     उंची १५३ मीटर आहे.


✔️  हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच 

       पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू 

       ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही 

       रेकॉर्ड मोडला आहे.

✔️  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास 

        कालावधी :-  ३३ महिने 

✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० 

      पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. 

✔️ खर्च :-  २ हजार ९८९ कोटी रुपये 

✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३

✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या 

     जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात 

     आले होते.

✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री 

      होते

✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन' 

      नावाची ट्रेनही धावणार आहे.

✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, 

      अलाहबाद,रायबरेलीहून लोक या  

      ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.