28 October 2021

तुम्हाला हे ठाऊक आहे का ?

भारतीय रेल्वे विभाग

विभाग    - केंद्र  -   स्थापना

1) मध्य विभाग
▪️ मुंबई - सन 1951

2) पश्चिम विभाग
▪️ मुंबई - सन 1951

3) उत्तर विभाग
▪️ दिल्ली - सन 1952

4) दक्षिण विभाग
▪️ चेन्नई - सन 1951

5) पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955

6) दक्षिण पूर्व विभाग
▪️ कलकत्ता - सन 1955

7) दक्षिण-मध्य
▪️ सिकंदराबाद - सन 1966

8) उत्तर पूर्व विभाग
▪️ गोरखपूर - सन 1952

9) सरहद्द रेल्वे
▪️ गोहाटी - सन 1958

10) पूर्व किनारपट्टीय विभाग
▪️ भुवनेश्वर - सन 1996

11) उत्तर मध्य विभाग
▪️अलाहाबाद - सन 1996

12) पूर्व मध्य विभाग
▪️ हाजीपूर - सन 1996

13) उत्तर पश्चिम विभाग
▪️ जयपूर - सन 1996

14) पश्चिम मध्य विभाग
▪️ जबलपूर - सन 1996

15) दक्षिण पश्चिम विभाग
▪️ बंगलोर - सन 1996

16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग
▪️ बिलासपुर - सन 1998

17) कलकत्ता मेट्रो
▪️ कलकत्ता - सन 2010

18) दक्षिण किनारी रेल्वे
▪️ विशाखापट्टणम, सन - 2019

महाराष्ट्रा मधील घाट



औटराम घाट
हा घाट चाळीसगाव-औरंगाबाद ह्या गाडीरस्त्यावर आहे. पायथ्याचे गाव चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव व माथ्याचे गाव कन्नड ता. कन्नड, जि. औरंगाबाद हे आहेत. ह्या घाटाने पितळखोरे लेणी, गौतम गुंफा, गौताळा अभयारण्य येथे जाता येते.

एकदरा घाट
एकदरा : पायरस्ता असलेला हा घाट असून, पायथ्याचे गाव टाकेद ता. इगतपुरी व माथ्याचे गाव कोकणगाव ता. अकोले जि. अहमदनगर यांना जोडणारा आहे. किल्ले अवंध पट्टा येथे जाता येते.

उंबरदरा घाट
पायरस्ता असलेल्या घाटाचे पायथ्याचे गाव चोंढा/साकुर्ली ता. शहापूर जि. ठाणे व माथ्याचे गाव सामरद ता. अकोले, जिल्हा अहमदनगर आहे. किल्ले रतनगड, शिपनेर येथे जाता येते

उत्तर तिवे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, पायथ्याचे गाव तिवरे ता. चिपळूण/खेड जि. रत्नागिरी व माथ्याचे गाव वासोटा ता. जावळी, जि. सातारा हे आहेत. ह्या घाटाने किल्ले वासोटा येथे जाता येते.

आंबोली घाट-४
हा घाट पायरस्त्याचा असून, ह्या घाटाचे गाव आंबोली ता. खेड जिल्हा रत्नागिरी व माथ्याचे गाव चक्रदेव ता. जावळी, जि. सातारा हे आहे. किल्ले रसाळगड, सुभारगड, महिपतगड येथे जाता येते.

आंबोली घाट-३
हा घाट सावंतवाडी-बेळगाव ह्या गाडीरस्त्यावर असून, पायथ्याचे गाव सावंतवाडी व माथ्याचे गाव आंबोली ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आहेत. आंबोली गाव माथ्याचे गाव असल्यामुळे ते थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. व ह्या घाटात हिरण्यकेशी ही नैसर्गिक गुहा आहे.

आंबोली घाट-२
हा घाट ता. मुरबाड जि. ठाणे व ता. जुन्नर जि. पुणे यांना जोडणारा पायरस्ता असणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव पळू ता. मुरबाड, जिल्हा ठाणे, व आंबोली हे माथ्याचे गाव आंबोली ता. जुन्नर, जि. पुणे हे आहेत. ह्या घाटाने किल्ले धाकोबा, जीवधन येथे जाता येते.

आंबोली घाट
हा घाट ठाणे व नाशिक जिल्ह्यांना जोडणारा घाट आहे. ह्या घाटाचे पायथ्याचे गाव मोखाडा ता.मोखाडा जि. ठाणे व माथ्याचे गाव अळवंडी (वैतरणा) ता. इगतपुरी जि. नाशिक हे आहेत. पायरस्ता असलेल्या घाटाने किल्ले हरिहर, उतवड, भाजगड येथे जाता येते.

आंबेनळी घाट
हा घाट ता. महाबळेश्वर जि. सातारा येथे आहे. वाडा कुंभरोशी हे घाटपायथ्याचे तर महाबळेश्वर हे घाटमाथ्याचे गाव आहेत. हा घाट महाड महाबळेश्वर गाडीरस्ता असून, ह्या घाटातून प्रतापगड, चंद्रगड येथे जाता येते.

अहुपे घाट
हा घाट पायरस्त्याचा असून, देहेरी हे घाटपायथ्याचे गाव ता. मुरबाड जिल्हा ठाणे व अहुपे घाटमाथ्याचे गाव ता. जुन्नर, जि. पुणे ह्यात आहे. या घाटाने जवळ असलेले सिद्धगड, गोरखगड, मच्छिंद्रगड व इतर किल्ल्यांना जाता येते.

भूगोल प्रश्नसंच

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

A]  200.60 लाख हेक्टर

B] 207.60 लाख हेक्टर

C]  307.70 लाख हेक्टर✔️

D]  318.60 लाख हेक्टर


कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.

A] 513✔️

B]  213

C]  102

D]  302

खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

A]  तेरणा

B] प्रवरा

C] मांजरा

D]  भातसा✔️


___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

A]  कांडला

B] कोची

C]  मांडवी

D] वरीलपैकी नाही

जागतिक वारसा शिल्पस्थानात _________ या लेणीची नोंद केलेली आहे.

A]  अजंठा लेणी✔️

B] कार्ले लेणी

C] पितळखोरा लेणी

D] बेडसा लेणी

गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

A]  अकोला   

B]  बुलढाणा

C] धुळे✔️

D] ठाणे

2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

A] नाशिक

B] औरंगाबाद

C] पुणे✔️

D] सोलापूर


महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

A] सह्याद्रि पर्वत✔️

B]  सातपुडा पर्वत

C] निलगिरी पर्वत

D]  अरवली पर्वत


महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _________ नावाने ओळखली जाते.

A] सायरस

B]  ध्रुव

C]  पूर्णिमा

D] अप्सरा ✔️


महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _________ जिल्ह्यात आहे.  

A]  अमरावती व अकोला

B] नांदेड व परभणी

C] हिंगोली व वाशिम

D] यवतमाळ वे रत्नागिरी✔️

औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर)

औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? - मराठवाडा.

मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? - औरंगाबाद.

लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - उस्मानाबाद.

जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? - औरंगाबाद.

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? - मराठवाडा.

गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद-जळगाव.

औरंगाबाद जिल्ह्यातील वनोद्यान कोणते? - अजिंठा.

·        जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? - नांदेड.

·        गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? - पैठण-औरंगाबाद.

·        जायकवाडी जलाशयाचे नाव काय? - नाथसागर.

·        जायकवाडी योजना स्टेज-1 कोणत्या जिल्हयासाठी आहे? - औरंगाबाद, अहमदनगर, बीड, परभणी, नांदेड.

·        महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या उद्देशाने हाती घेण्यात आला? - कोरडवाहू जमीन ओलीताखाली आणणे.

·        बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? - राहुरी व औरंगाबाद.

·        महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? - मराठवाडा.

·        महाराष्ट्रातील मराठवाडा भागातून इतर ठिकाणी लोक स्थलांतर होण्याचे कारण काय? - कोरडा दुष्काळ.

·        जायकवाडी जलविद्युत केंद्र कोठे आहे? - पैठण, औरंगाबाद.

·        गोदावरी नदीवरील जलविद्युत प्रकल्पास कोणत्या देशाचे साह्य लाभले आहे? - जपान.

·        हिमरुशाली साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? - औरंगाबाद.

·        गुजराती फेटे तयार केले जाणारे महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? - पैठण.

·        महाराष्ट्रातील औद्योगिकदुष्ट्या अविकसित भाग कोणता? - मराठवाडा.

·        शिखांचे दहावे धर्मगुरु गुरुगोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे? - नांदेड.

·        दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते? - पैठण.

·        पैठण हे कोणत्या संताची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते व तेथे कोणत्या संताचा जन्म झाला होता? - संत एकनाथ.

·        औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - हिंगोली.

·        घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        शिखांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे ठिकाण कोणते? - नांदेड.

·        परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणता जिल्ह्यात आहे? - बीड.

·        खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - लातूर.

·        अंबेजोगाई कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        तेर कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        पितळखोरा बौद्ध लेणी कोणत्या आहे? - औरंगाबाद.

·        धाराशिव ही जैन व हिंदू लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - उस्मानाबाद.

·        वेरूळची बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        अखंड शिल्पातले कैलास मंदिर कोठे आहे? - औरंगाबाद.

·        वेरूळ अजिंठा कशासाठी प्रसिद्ध आहे? - शिल्पकला.

·        महाराष्ट्रातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? - 1972.

·        वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टि. (वाल्मी) कोठे आहे? - औरंगाबाद.

·        श्री. शिवाजी महाराजाचे कुलदैवत भवानी मातेचे मंदिर कोठे आहे? - तुळजापूर (उस्मानाबाद).

·        महानुभव पंथाचे महत्वाचे केंद्र कोठे आहे? - नांदेड.

·        कवि मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? - अंबेजोगाई.

·        मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोठे सापडला? - अक्षी.

·        दौलताबाद जवळील देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? - औरंगाबाद.

·        प्रादेशिक वस्तु संग्रहालय कोठे आहे? - उस्मानाबाद.

·        महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला भाग कोणता? - मराठवाडा.

·        भारुडे लोकप्रिय करणारे संत कोण? - एकनाथ.

·        शिखांच्या ग्रंथ साहित्यामध्ये कोणत्या संताचे वाण्ड्मय समाविष्ठ आहे? - नामदेव.

·        प्रवारा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? - गोदावरी.

·        बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? - बीड.

·        मराठवाड्यातील प्रमुख कापड निर्मिती केंद्र कोणते आहे? - औरंगाबाद.

·        देवगिरीचा (दौलताबादचा) किल्ला कोणत्या डोंगरात आहे? - अजंठा रांगा.

·        गोदावरी व भीमा नदीना वेगळे करणारी रांग कोणती? - हरिषचंद्र-बालाघाट.

·        बालाघाट व अजंठा रांगांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे? - गोदावरी.

चाफेकर बंधू

हे आद्यक्रांतिकारी होते.

त्यांच्या मध्ये दामोदर (जन्म २४ जून १८६९),

बाळकृष्ण (जन्म १८७३)

आणि

वासुदेव हरी चापेकर (जन्म १८७९) होते.

🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷

🌺🌺  रॅंडचा खून 🌺🌺

१९व्या   शतकाअखेरीस पुण्यात प्लेगने थैमान घातले. प्लेगला आळा घालण्याच्या निमित्ताने ☘ विल्यम चार्ल्स रॅन्ड☘  या बिटिश अधिकार्‍याने लोकांचा छळ केला.

🌷लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे अशा त्याच्या क्रूर आणि अमानवी कृत्यांमुळे समाजाच्या सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळली. चापेकर बंधूंच्या मनात या अन्यायामुळे मनात सूडाची ठिणगी पडली आणि आग धगधगू लागली..

☘  राष्ट्र आणि धर्मप्रेमाच्या या जाज्वल्य भावनेतूनच चापेकरबंधू रॅंडच्या विरोधात पेटून उठले आणि २२ जून १८९७ला रॅंडवर पाळत ठेवून चापेकर बंधूंपैकी दामोदरने त्याच्यावर गोळी झाडली. २५ जूनला रॅंडचा मृत्यू झाला. आयर्स्ट तत्काल मृत्यू पावला.

🌷  दामोदर चापेकर यांना अटक होण्यासाठी बक्षिसाच्या लालचीने ब्रिटिश अधिकार्‍यांना मदत करणार्‍या द्रविड बंधुंना (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) वासुदेव चापेकर व महादेव रानडे यांनी गोळ्या घालून ठार केले.

🍃🍃🍃🍃🌷🌷🌷🌷🍃🍃🍃🍃🌷🌷🌷

🌺🌺 चाफेकर बंधू : शिक्षा  🌺🌺

🌷  दामोदर १८ एप्रिल १८९८ला फाशी गेले. वासुदेव यांस ८ मे १८९९ रोजी, महादेव रानडे यांस १० मे आणि बाळकृष्ण चापेकर यांस १२ मे १८९९ रोजी येरवडा कारागृहामध्ये फाशी देण्यात आले.

चापेकरांचा फटका

दामोदर चापेकरांच्या फाशीपूर्व अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चापेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्यांनंतर सावरकरांनी चापेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रॅंड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे ॥

ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷

गोवा मुक्ती लढा .

🅾पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.

🅾पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.

🅾आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.

🅾पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.

🅾1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.

🅾2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.

🅾या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.

🅾1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.

🅾 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.

🅾भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.

🅾काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.

🅾 गोवा मुक्त झाला.

🅾 भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी

३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी

४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी

७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी

१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू

१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट

१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर

१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय

२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय

२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय

२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा

२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार

२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल

३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय

३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद

३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर

३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल

३६) किर्ती - संतोषसिह

३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त

३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन

३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस

४०) इंडिया - सुब्रण्यम भारती

४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी

४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र

४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली

४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल

४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी

४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय

४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय

५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान

५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)

५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)

५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)

५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी
(गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष

५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय

५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू

महालेखापरीक्षक बद्दल संपूर्ण माहिती

· केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांचे हिशोब तपासण्यासाठी उद्देशाने भारतीय घटना कलम 148 ते 151 नुसार महालेखा परीक्षकाचे पद निर्माण केलेले आहे.

· या महालेखापालाचे पद देखील महत्वाचे व जबाबदारीचे पद असते.

2. कार्यकाल

· भारतीय राज्यघटनेत महालेखापालाचा तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही.

· परंतु त्याचे निवृत्ती वय 65 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महालेखापाल वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकते असे असले तरी महालेखापाल मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.

· याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल तरच त्याच्यावर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालवून राष्ट्रपती त्याला पदच्युत करू शकतात.

3. वेतन व भत्ते

· महालेखापालाला दरमहा रुपये 90,000/- वेतन प्राप्त होते. याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते.

· शासकीय कामासाठी देशीविदेशी प्रवास त्याला मोफत असतो.

· एकदा निश्चित झालेले त्यांचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु आणीबाणी लागू केली तर मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

· महालेखापालाचे वेतन हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते.

· निवृत्त झाल्यांनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

4. अधिकार व कार्ये

1. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या जमाखर्चाचे हिशेब तपासणे.

2. केंद्र सरकारच्या व घटक राज्य सरकारच्या लेखा पुस्तकाच्या नोंदी कशा ठेवाव्यात हे ठरविणे.

3. शासनामार्फत खर्च होणार्‍या रकमा नियमानुसार खर्च होत आहे किंवा नाही हे पाहणे.

4. घटक राज्य सरकारच्या लेखा संबंधीचा अहवाल घटक राज्याच्या राज्यपालाला पाठविणे.

5. शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांचे हिशोब तपासणे.

6. राष्ट्रपतीचे आर्थिक बाबीसंबंधी माहिती मागविल्यास ती पुरविणे.

7. एखदया खात्याचा अनाठायी अथवा जास्तीचा खर्च झाला असेल तर तो वसूल करणे.

भारताचे संविधान

📌भारताची राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे, असे सांगितले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ राजेंद्र प्रसाद चांगले मित्र होते.

📌 इतिहास -
१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक डिसेंबर ९ १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात पार पडली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २०७ सदस्य उपस्थित होते .  ऑगस्ट १५ १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते.

ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने जानेवारी २६ १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

📌 स्वरूप -
भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.