०७ एप्रिल २०२२

आजचे प्रश्नसंच , महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र



✅ महाराष्ट्र जिल्हे निर्मिती ✅

1⃣1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2⃣16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून– लातूर (29 वा जिल्हा)

3⃣26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

4⃣1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

5⃣1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

6⃣1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

भंडार्यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)

7⃣1ऑगस्ट 2014 : ठाण्यापासुन -पालघर (36वा जिल्ह्या)

गाल्फ प्रवाह

🔹गाल्फ प्रवाह

काय आहे गल्फा प्रवाह

📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌त्यांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌त्याला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 ते तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

पानवळ रेल्वे पूल

पानवळ रेल्वे पूल:
.
कोकण रेल्वेवरील पानवळ पूल हा एक अभियांत्रिकी चमत्कार आहे.


पानवळ रेल्वे पूल:
.. हा पूल कोकण रेल्वेवरील रत्नागिरी आणि निवसर या दोन स्थानकांदरम्यान पानवळ नदीवर बांधला आहे. रत्नागिरी स्थानकापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाची लांबी सुमारे 360 मीटर्स आणी उंची 64 मीटर आहे. सर्वसाधारणपणे इतक्या लांब पुलाच्या निर्माणासाठी अनेक गर्डर्स वापरले जातात; परंतु पानवळ पुलाच्या निर्मितीसाठी केवळ एक सलग गर्डर बनविला गेला. हा गर्डर इंक्रीमेंटल लॉंचिंग या पद्धतीने पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत लॉंच केला गेला. या गर्डर लॉंचिंगचा वेग सुमारे दोन फूट प्रती तास एवढा होता. अशाप्रकारचे गर्डर लॉंचिंग तंत्र भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच वापरण्यात आले. या पुलाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे याचा एक पिअर कुतुब मिनारपेक्षाही उंच आहे. या पुलावरून खाली पाहिले, तर जीप आगपेटीएवढी दिसते. या पुलावरून शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने धावणारी गाडी पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हिरव्यागार पर्वतांनी वेढलेल्या पानवळ पुलाखालून वाहणारे पानवळ नदीचे पात्र पुलावरून खूपच सुंदर दिसते. या पुलाची भौगोलिक स्थिती अशी आहे, की येथे वाऱ्याचा वेग धोकादायक पातळीपर्यंत जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन या पुलावर वाऱ्याचा वेग सतत मोजण्यासाठी ऍनॉमिमीटर बसविण्यात आले आहे. वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रतितासापेक्षा अधिक झाल्यास, गाडी निवसर आणि रत्नागिरी स्थानकावर थांबविण्यासाठी विशेष प्रणाली बसविण्यात आली आहे. रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवळ फाट्यावरून पानवळ पुलापर्यंत पोचता येते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात हा पूल पाहायला जाऊ शकतो.

भारतातील महत्वाची सरोवरे , भारतातील महत्वाचे धबधबे , महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

🔹भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____________________________________

🔹भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी.



🔹महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि

*१)मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,
            भारताचे प्रथम क्रमांकाचे
           औद्योगिक शहर,भारताची,
           राजधानी

*२)रत्नागिरी*---देशभक्त व
                समाजसेवकांचा जिल्हा

*३)सोलापूर*----ज्वारीचे कोठार,
                सोलापुरी चादरी

*४)कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा
                गुळाचा जिल्हा

*५)रायगड*-----तांदळाचे कोठार व
               डोंगरी किल्ले असलेला
              जिल्हा

*६)सातारा*----कुंतल देश व शुरांचा
               जिल्हा

*७)बिड*------जुन्या मराठी कविंचा
              जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,
              देवळादेवळा जिल्हा, ऊस
              कामगारांचा जिल्हा

*८)परभणी*---ज्वारीचे कोठार

*९)उस्मानाबाद*--श्री.भवानी मातेचा
                    जिल्हा

*१०)औरंगाबाद*--वेरुळ-अजिंठा
                   लेण्यांचा जिल्हा,
                  मराठवाडयाची
                  राजधानी

*११)नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा

*१२)अमरावती*--देवी रुख्मिणी व
                   दमयंतीचा जिल्हा

*१३)बुलढाणा*--महाराष्ट्राची
                 कापसाची बाजारपेठ

*१४)नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा

*१५)भंडारा*-----तलावांचा जिल्हा

*१६)गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा

*१७)चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा

*१८)धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा
                    
*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल
                                   जिल्हा

*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-
                     कापसाचा जिल्हा
                   
*२१)जळगाव*--कापसाचे शेत,
                      केळीच्या बागा,
                       अजिंठा लेण्यांचे
                      प्रवेशद्वार

*२२)अहमदनगर*-साखर कारखाने
                   असलेला जिल्हा

*२३)नाशिक*---मुंबईची परसबाग,
                   द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा
                   गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,
                    कलावंतांचा जिल्हा
____________________________________

मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

🔹मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा

अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.

भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.

खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.

निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.

भारतात आढळणाऱ्या खरफुटींचे जवळजवळ २० टक्के क्षेत्र अंदमान आणि निकोबार बेटांवर असून हे भारताचं सुंदरबननंतरचं दुसरं सगळ्यात मोठं क्षेत्र आहे. इथे खारफुटीची जंगले २८३ वर्ग किलोमीटर क्षेत्रांत व्यापली आहेत. या क्षेत्रांत ४६ टक्के एवढे क्षेत्र अत्यंत दाट खारफुटीचे आहे. ४२ टक्के मध्यम आणि १२ टक्के क्षेत्र विरळ खारफुटीचे आहे.
खरफुटींच्या संरक्षण-संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य अंदमानच्या धानीनल्लाह या ठिकाणी अंदाजे दीड किमी लांबीचा नॅचरल मॅनग्रोव वॉक वे बनविण्यात आला आहे. इथे आपण प्रत्यक्ष दाट खारफुटीच्या जंगलातून किनाऱ्यापर्यंत जातो. धानीनल्लाह इथे कासवांची अंडी घालण्याची ठिकाणेही आहेत, इथे त्यांच्या त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे.

अंदमान आणि निकोबारची जंगलं फक्त प्रेक्षणीय नाहीत, तर श्रवणीयही आहेत, मग ती वर्षांवने असोत की खारफुटीची. तुम्ही कुठेही थांबून शांतपणे ऐकलं तर इथल्या जीवसृष्टीचं संगीत आणि लयबद्ध जीवन अनुभवू शकता. या सुंदर जीवसृष्टीच्या मागचा कणा आहे इथला मान्सून, जो भरभरून मुक्तहस्ताने अमृताचा वर्षांव करत आला आहे आणि पुढेही करत राहील. गरज आहे त्याला समजून घेण्याची आणि त्याला अनुसरून वागण्याची.

अंदमानातील जैवविविधता:
अंदमान आणि निकोबार ही जैवविविधतेची एक जिवंत प्रयोगशाळाच आहे. या बेटांवर एक मोठी जीवसृष्टी राज्य करते. त्यात कीटक, पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव सर्व काही आहेत. या बेटांवर जवळजवळ ७१७१ वर्ग किमी एवढं वनक्षेत्र आहे. काही वृक्षांची उंची ४० ते ५० मीटपर्यंत असते, त्याचा बेस तीन मीटपर्यंत असतो. उष्ण हवामान आणि तीन हजार मिमीपेक्षा जास्त वर्षांचा पाऊस इथल्या जीवसृष्टीस एक वरदान आहे.

या बेटांवर माहीत असलेल्या जवळजवळ २२०० फुलांच्या जाती आहेत, त्यापकी २१५ या बेटांव्यतिरिक्त कुठेही आढळत नाहीत. या बेटांवर फर्नच्या १३० जाती, आíकडचे ११० प्रकार आढळतात. तर इथे पक्ष्यांच्या आजवर माहीत असलेल्या २७० प्रजाती आहेत आणि त्यांच्या पकी १०६ फक्त इथेच आढळतात. त्याव्यतिरिक्त अंदमानमध्ये १२ आणि निकोबारमध्ये नऊ पक्ष्यांच्या अशा जाती आहेत ज्यांचे क्षेत्र खूपच सीमित आहे. निकोबार मेगापोड, घरटं बनविणारी अबाबिल, आणि नारकोंडाम धनेश अशा काही संरक्षित जाती आहेत. शिवाय अंदमानी सप्रेट ईगल, निकोबार पेराकीट, अंदमानी महोक इथेच आढळणारे काही पक्षी आहेत.

इथे ७६ सरपटणाऱ्या प्राण्यांची नोंद आहे आणि त्यांच्यापकी २४ फक्त इथे विशिष्ट क्षेत्रांत आढळतात. या बेटांवर एकूण ४० जातींचे सर्प आढळतात त्यांच्यापकी १० विषारी आहेत. अंदमान नाग, अंदमान पिट वायपर, अंदमान करेत, अंदमान किलबॅक वॉटर स्नेक हे काही स्थानिक सर्प आहेत.
अंदमान आणि निकोबारला मगरींची फक्त एकच जात आढळते ती आहे खाऱ्या पाण्यातली मगर. या मगरी खारफुटींच्या क्षेत्रात राहतात. जितकं जंगलात वाघाचं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व खारफुटीच्या जंगलात मगरीचं आहे. इथल्या खाद्यशृंखलेत मगर ही सर्वोच्च स्थानावर आहे. या मगरींची लांबी सात मीटर आणि वजन एक हजार किलोपर्यंत असते.

काही संशोधकांच्या मते आज आढळणाऱ्या कासवांचा विकास जवळजवळ १२ कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला असावा. अंदमानात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, हॉक्सबिल, किलोनिया मिडास, आणि लेदर बेक या कासवांच्या जाती आढळतात. समुद्री कासवे वर्षभरात हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. ती काही विशिष्ट ठिकाणी अंडी घालायला येतात. अंदमान आणि निकोबारातली काही ठिकाणे ही त्यांची त्यासाठीची आवडती ठिकाणे मानली जातात. लेदर बॅक कासव हे जगातील सर्वात मोठं कासव आहे. त्याची लांबी तीन मीटपर्यंत असते. हे कासव खोल समुद्रात १२०० मीटपर्यंत जाते. अंदमानात रटलॅंड बेटांवर ही कासवं अंडी घालतात.

पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या जीवजातींपैकी कीटकांचे प्रमाण जवळजवळ ८० टक्के आहे. फुलपाखरंदेखील कीटक याच प्रकारात मोडतात. या बेटांवर वावरणाऱ्या फुलपाखरांच्या आजवर २२५ जाती ज्ञात आहेत. यातली काही फुलपाखरं बहुतेक जगातली सर्वात मोठी आहेत. अशांपैकी दहा जातींची फुलपाखरं फक्त या बेटांवरच आढळतात. यातील काही जाती अंदमान मोर्मोन, अंदमान क्लब टेल, अंदमान स्वोर्ड टेल, अंदमान याम फ्लाय अशी आहेत. माउंट हॅरियट नेशनल पार्कच्या क्षेत्रात सर्वात जास्त फुलपाखरं दिसतात.