20 May 2024

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सरोजिनी नायडू


 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?

उत्तर : सुभाषचंद्र बोस


 महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : खान अब्दुल गफार खान


 महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?

उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी


 मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

उत्तर : नागपूर


 प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?

उत्तर : औरंगाबाद


माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1 ऑगस्ट 2003


 आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?

उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.


 सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?

उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)


माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?

उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.


नासा ही संस्था कोठे आहे?

उत्तर : वॉशिंग्टन


 fbp म्हणजे काय?

उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)


WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?

उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.


समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : मध्य प्रदेश



घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : मध्य प्रदेश


महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?

उत्तर : अंतरा मेहता


 पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?

उत्तर : निगार जोहर


 पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?

उत्तर : राहुल देव


सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)


 पहिले नंबरलेस कार्ड कोणते?

उत्तर : Fam Pay


सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

उत्तर : ओडिशा


‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : महाराष्ट्र


प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : हिमाचल प्रदेश


 एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? 

उत्तर : तमिळनाडू


भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?

उत्तर : फायझर


आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?

उत्तर : अली खान


एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?

उत्तर : लिओने मेस्सी


 भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?

उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट


नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : उत्तरप्रदेश


 सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : कर्नाटक


ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?

उत्तर : भारत


 आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : ओडिसा


 गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)


 भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?

उत्तर : अरुणाचल प्रदेश


 भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?

उत्तर : भारतरत्न


 भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?

उत्तर : इंदिरा गांधी (1971)


भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?

उत्तर : लार्ड विलियम बैंटिक


चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?

उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)


 रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?

उत्तर : व्हिटॅमिन A


 कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?

उत्तर : चीन


 सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?

उत्तर : कोपर्निकस


खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?

उत्तर : महाराणी ताराबाई


 रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?

उत्तर : LG


 कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?

उत्तर : सिंगापूर


 युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?

उत्तर : मिटी अग्रवाल


वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : दिल्ली


 प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : गोवा


टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?

उत्तर : शोएब मलिक


 राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?

उत्तर : शिवाजीनगर, पुणे


 डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?

उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू


 केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?

उत्तर : पंजाब


 संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर : केरळ


 संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?

उत्तर : दिल्ली विद्यापीठ


 पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?

उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)


 पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?

उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)


 FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?

उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई


मानवी रक्ताची चव कशी असते?

उत्तर : खारट


मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?

उत्तर : यकृत


 पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?

उत्तर : 5  वर्षा पर्यंत


 रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?

उत्तर : 300  मि.ली.


 शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?

उत्तर : 8%


 मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?

उत्तर : 52


मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?

उत्तर : 37° सेल्सियस


कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

उत्तर : यकृत


मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?

उत्तर : लहान आतड्यात


 रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?

उत्तर : चार वेळा


 पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?

उत्तर : मज्जासंस्था


 चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?

उत्तर : एडिस इजिप्ती


 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?

उत्तर : 1438 मी.


महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नागपूर


 भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?

उत्तर : बोधगया


8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

उत्तर : भारतीय वायुसेना दिवस


 उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?

उत्तर : अवंतिका


मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?

उत्तर : 46


 सर्वात मोठा ग्रह कोणता?

उत्तर : बृहस्पति


 सर्वात लहान ग्रह कोणता?

उत्तर : बुध


 आग्रा शहर कोणी बनवले आहेत?

उत्तर : सिकंदर लोदी


 पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?

उत्तर : लाला लजपतराय


महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर : 2 ऑक्टोबर 1869


 काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?

उत्तर : आसाम


गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?

उत्तर : ऋग्वेद


राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 28 फेब्रुवारी


 राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 12 जानेवारी


 राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : 12 नोव्हेंबर


 वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?

उत्तर : नायट्रोजन


 ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?

उत्तर : सूर्य


 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?

उत्तर : न्यूटन


 सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?

उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद


विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?

उत्तर : टंगस्टन


 डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?

उत्तर : मूत्रपिंडाचे आजार


 मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?

उत्तर : पांढऱ्या पेशी


आजचे प्रश्नसंच

 1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली  ? 

1) पाचवी 

2) तिसरी 

3) सातवीं ✅

4) यापैकी नाही


2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----

1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅

2) अनेक संस्थाने खालसा करणे 

3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे 

4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे


3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो. 

1) रोहू 

2) कटला 

3) मृगल ✅

4) तिलापिया


4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?

1) 0.19✅

2) 0.50

3) 0.75

4) 0.90


5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे . 

1) भाट्ये, रत्नागिरी 

2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग 

3) श्रीवर्धन, रायगड ✅

4) गणेशखिंड,पुणे


6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ? 

1) समाज सेवा 

2) शैक्षणिक गुणवत्ता 

3) शास्त्रीय संशोधन ✅

4) साहित्य


7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 

1) 29✅

2) 27

3) 31

4) 25


8) जर O + H + P = 39 

M + A + N = 28

तर M + C + H + I + N + E = ? 


1) 43 

2) 53✅

3) 64

4) 54


9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण? 

1) श्रीमंती किरण बेदी 

2) श्रीमती कविता करकरे 

3) श्रीमती स्मिता साळसकर 

4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅


10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो? 

1) राष्ट्रपती ✅

2) वित्तमंत्री 

3) पंतप्रधान 

4) गृहमंत्री


11) --------- is getting blurred.  I cannot see. Fill in the blank with the suitable option. 

1) Everything ✅

2) something 

3) Nothing 

4) ANYTHING


12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ? 

1) 15,17✅

2) 16,17

3) 19,16

4) 18,15


13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ? 

1) 250

2) 300

3) 200✅

4) 325


14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 

1) 660

2) 540✅

3) 630

4) 450


15) 0.004 x 0.5 = ? 

1) 0.00020

2) 0.0020✅

3) 0.0200

4) 0.2000


16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word 

AFFLUENCE 


1) Influence 

2) poverty ✅

3) Indifference 

4) Riches 


🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय. 


17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ".  - या वाक्यातील कर्ता कोण ? 

1) शोध 

2) लवकर 

3) तो ✅

4) परतला 


🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो


18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.

1) विधानार्थी - होकारार्थी ✅

2) नकारार्थी 

3) उद्गारवाचक

4) प्रश्नार्थक 


🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.


19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?

1) अफगाणिस्तान   ✅

2) इराण

3) श्रीलंका

4) बांग्लादेश


20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.

1) पाकिस्तान

2) बर्मा

3) भूतान

4) बांग्लादेश   ✅

वंदे मातरम.



🅾️वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा मिळालेला आहे.

 🅾️बकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.

🅾️१८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गाऊन अख्खे अधिवेशन
राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली.

 🅾️तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत जागृतीचा शंखनाद बनले. हिदू-मुस्लिम सर्वांनी मुक्त कंठाने याचे गायन केले.

🅾️सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा कसा मिळाला, याची गोष्ट पण फार रोमहर्षक आहे.

🅾️१९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की वंदे मातमच्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही.

🅾️परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गाच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम् गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला. परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन' या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वंदे मातरम्‌ची अवहेलना करणारी ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर वंदेमातरम् याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली.

🅾️अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५० ला घटना समितीत हा ठराव पास करवून घेतला.

गांधी प्रश्नमंजुषा

प्रश्न 1 गांधीजींचा जन्म कधी झाला? 

2 ऑक्टोबर 1869

प्रश्न 2 गांधीजींनी फिनिक्स सेटलमेंट कुठून सुरू केले होते?
दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन मध्ये

प्रश्न 3 दक्षिण आफ्रिकेत गांधीजीं द्वारे सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोणते होते?
इंडियन ओपिनियन (1904)

प्रश्न 4 गांधीजी दक्षिण आफ्रिकेच्या यात्रेहून भारतात कधी परत आले होते?
9 जानेवारी 1915

प्रश्न 5 गांधीजी वकालत करण्यासाठी दक्षिण आफ्रिका कधी गेले होते?
1893 मध्ये

प्रश्न 6 गांधीजींचे पहिले अनशन कुठे झाले होते?
अहमदाबाद

प्रश्न 7 कोणत्या कारणामुळे गांधीजींनी केसर-ए-हिन्द पदवी सोडली होती?
1919 मध्ये जळियावाला बाग नरसंहार

प्रश्न 8 यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिक कोणी प्रारंभ केले होते?
महात्मा गांधींनी

प्रश्न 9 कोणत्या एकमेव काँग्रेसच्या अधिवेशनाची अध्यक्षता गांधीजींनी केली होती?
1924 मध्ये बेलगाम येथे काँग्रेस अधिवेशन

प्रश्न 10 1932 मध्ये आखील भारतीय हरिजन समाज कोणी सुरू केले होते?
महात्मा गांधी

प्रश्न 11 गांधीजींना पहिल्यांदा कारवास कधी झाले होते?
1908 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे

प्रश्न 12 गांधीजींचे राजकारणी गुरू कोण होते?
गोपाल कृष्ण गोखले

प्रश्न 13 गांधीजींचे आध्यात्मिक गुरू कोण होते?
लियो टॉल्स्टॉय

प्रश्न 14 कोणत्या रेल्वे स्थानकावर गांधीजींचा अपमान करण्यात आला असून अपदस्थ केले गेले होते?
दक्षिण आफ्रिकेत पीटरमारित्झबर्ग रेल्वे स्टेशन

प्रश्न 15 गांधीजींना महात्मा कोणी म्हटले?
रवींद्रनाथ टागोर

प्रश्न 16 गांधीजींची हत्या कधी झाली?
30 जानेवारी 1948 रोजी नाथुराम विनायक गोडसे हस्ते

प्रश्न 17 गांधीजींनी टालस्टाय फार्म केव्हा सुरू केले होते?
1910

प्रश्न 18 वर्धा आश्रम कुठे स्थित आहे?
महाराष्ट्र

प्रश्न 19 गांधीजींनी साप्ताहिक हरिजन केव्हा सुरू केले होते?
1933

प्रश्न 20 गांधीजींनी सुभाषचंद्र बोस यांना काय म्हटले होते?
देशभक्त

आंतरराष्ट्रीय निर्देशांक आणि भारताचा क्रमांक (2023-24)

हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023
⏺7 वा

आंतरराष्ट्रीय आयपी इंडेक्स 2024
⏺42वा

ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2024
⏺29 वा

मानव विकास निर्देशांक 2024
⏺134 वा

हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024
⏺28 वा

जागतिक आनंद अहवाल 2024
⏺126 वा

जागतिक दहशतवाद निर्देशांक 2023
⏺13 वा

ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023
⏺40 वा

ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
⏺111वा

जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023
⏺40 वा

ग्लोबल पीस इंडेक्स 2023
⏺126 वा

ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2023
⏺67 वा

करप्शन परसेप्शन इंडेक्स 2023
⏺93 वा

लोकशाही निर्देशांक 2023
⏺41वा

मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग 2024
⏺4 वा

लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023
⏺ 38 वा

19 May 2024

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त


➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना


🔖छेत्रीचा जलवा  :-


💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान.


💡 दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.


💡२००८ साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे २७ वर्षात पहिल्यांदाच भारताला २०११ साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले.


💡२००२ मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत २०१० मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली.


💡सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला.


💡छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे.

BRIC परिषद

 📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर 100% प्रश्न अपेक्षित आहे...✅✅ (#Prediction)


🔴'BRIC’ हा शब्द 2001 मध्ये जिम ओ’नील यांनी ‘बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स’ या book मध्ये प्रथम वापरला.


➡️रूपा पुरुषोत्थमन यांनी ही संज्ञा प्रत्यक्षात आणली होती.


➡️2008 - BRIC एकत्र आले

➡️2009 - पहिली परिषद- रशियात

➡️2010 - मध्ये दक्षिण आफ्रिका सदस्य झाल्याने - 2010 पासून BRIC चे BRICS झाले.


➡️संघटनेची उद्दिष्ट व कार्ये :-


🔴गटांतील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे.

🔴परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे.

🔴आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे.


➡️सध्या Permenent = 9 सदस्य


🇧🇷 Brazil

🇷🇺 Russia

🇮🇳 India

🇨🇳 China

🇿🇦 South Africa

🇮🇷 Iran

🇪🇹 Ethiopia

🇪🇬 Egypt

🇦🇪 UAE


🇦🇷 Argentina सदस्यत्व घेण्यास नकार दिला आहे

🇸🇦 Saudi Arabia चा अजून Official सहभाग नाही.


➡️Summit :-

🔴2009 - 1 ली - एडातरीनबर्ग (रशिया)

🔴2021 - 13 वी - नवी दिल्ली (भारत) (video conference)

🔴2022 - 14 वी - बिजिंग (चीन) (video conference)

🔴2023 - 15 वी - जोहान्सबर्ग (द.आफ्रिका)

🔴2024 - 16 वी - कझान (रशिया)


Aspirant to Officer

"एक SERIOUS ATTEMPT लागतोच पोस्ट काढायला..It's your Turn Now"


माझी Score मध्ये झालेली सुधारणा

2019 राज्यसेवा 447

वरून

2020 राज्यसेवा 534.5 = 87.5 Marks 


Seriousness आणि योग्य  Approach वापरून मागे झालेल्या चुका शोधून त्या जवळपास कमी करून 87.5 मार्क्स ने next attempt ला सुधारणा केली होती..

🔴माझ्या Common mistakes आणि त्यावरील उपाय--

❌Phone अती वापर सर्वात मोठी mistakes 

✔️Action - 2020 ला phone घरीच ठेवला फक्त दुपारी आणि रात्री चेक करायचो..


__


❌Exam विषयी आणि Content विषयी मार्केट ने निर्माण केलेली अनावश्यक भीती..

✔️Action - Result पण आहे आणि Approach पण Simple आहे अश्यांकडूनच मार्गदर्शन घेतले फाफट पसारा सांगणाऱ्यांपासून लांब राहिलो..senior शी consult करून Internet वापरलेच पाहिजे ही अनावश्यक भीती काढून टाकून 100 % प्रिंट मटेरियल वर विश्वास ठेऊन तेच चांगले केले..

_


❌शिस्त कमी -- 

✔️Action - दिवसाची सुरवात वेळेवर होईल याची काळजी घेतली म्हणजे बाकी  दिवस चांगला जातो..

उठायचा कंटाळा - Used my friend style to wake up..(एका झटक्यात पटकन उठून wash basin ला जाऊन तोंडावर पाणी मारणे) 

उगाच बेड वर रेंगाळत बसू नये..

_


❌PYQ ANALYSIS केले नव्हते- 

✔️action - जबरदस्त strong केले..लॉजिक approch Tricks develop केल्या..

____


❌Revision कमी - 

✔️आवश्यक तिथे नोट्स काढून घेतल्या..(not 100%) त्यामुळे Revision होण्यास मदत झाली.


शेवटच्या Revision ला जास्त वाचण्याचा मोह आवरला.. त्यामुळे परीक्षाभिमुख Content चांगला Revise झाला..

___


❌Consistency नव्हती --

✔️Action - self Audit आणि स्वतः चा Productivity chart तयार करून त्यातून सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला..

___


✔️Positive भीती तयार केली--

"आत्ता कंटाळा केला की अजून एक वर्ष या Process मध्ये घालवावे लागेल परत तोच अभ्यास करावा लागेल  म्हणून हाच शेवटचा अभ्यास करू परत अभ्यासच नको.."


असे स्वतः ला सांगून एक positive भीती तयार केली..

_


✔️Most Important - पहिले planning खुप करायचो Execution नीट नव्हते होत..

यावेळेस Execution वरच विशेष भर दिला.


वैयक्तिक स्तरावर चांगला Score येण्यासाठी काय काय करू शकता...


🌷DAILY टार्गेट -

आपल्या क्षमते नुसार SET करणे आणि ते ACHIEVE करण्याचा प्रयत्न करणे.. 


🌷ACCOUNTABILITY -

कुणाला तरी आपण जबाबदार असावे..जमल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना , even घरच्यांना 😜आपले आजचे, Weekly audit share करा..

(Productivity chart आणि weekly Analysis share केले आहे अगोदर)


🌷रोज चुका कमी करणे - audit मधून स्वतःच्या चुका ओळखणे आणि त्या सुधारणे..


🌷PYQ paper-  पेपर वेळ लावून solve करणे त्यातील आपल्या चुका ओळखणे ..

त्या चुका कश्या सुधारता येतील त्यावर Action काय घ्यावी हेही लिहून काढणे. पुढील पेपर सोडविण्यापूर्वी त्या चुका Action Item परत वाचणे आणि नंतर paper solve करणे..तसेच चुका कमी झाल्या का याचे विश्लेषण करणे..


🌷Tips & Tricks- PYQ वरून माहिती नसलेले प्रश्न सोडविण्यासाठी tips, tricks आणि logic विकसित करणे..


🌷Revision - ठराविक काळाने करणे..ढोबळ नियम :  आज जे वाचलेले ते परत एकदा किमान 15 दिवसाच्या आत नजरेखालून जायला पाहिजे.. Reference साठी आपला कुठलाही REVISION plan ऐका..



96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी

⭐️बेस्ट फिल्म :- ओपेनहायमर

⭐️बेस्ट अ‍ॅक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)

⭐️बेस्ट अ‍ॅक्ट्रेस :- एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज)

⭐️बेस्ट डायरेक्टर :- ख्रिस्तोफर नोलान (ओपेनहायमर)

⭐️बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस :- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)

⭐️बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट :- वॉर इज़ ओव्हर

⭐️बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर :- द बॉय अँड द हेरॉन

⭐️बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी :- अमेरिकन फिक्शन

⭐️बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)

⭐️बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग :- पुअर थिंग्स

⭐️बेस्ट प्रोडक्शन डिझाइन :- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)

⭐️बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी :- पुअर थिंग्स

⭐️बेस्ट इंटरनॅशनल फीचर :- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)

⭐️बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर :- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)

⭐️बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट :- गॉडज़िला मायनस वन

⭐️बेस्ट फिल्म एडिटिंग :- ओपेनहायमर

⭐️बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट :- द लास्ट रिपेयर शॉप

⭐️बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर :- 20 डेज इन मारियुपोल

⭐️बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट :- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर

⭐️बेस्ट सिनेमॅटोग्राफी :- डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)

⭐️बेस्ट ओरिजनल स्कोर :-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)

⭐️बेस्ट ओरिजनल साँग :- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-


👉 भारताचे प्रवेशद्वार 

-- मुंबई


👉 भारताची आर्थिक राजधानी 

-- मुंबई


👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       

--  मुंबई शहर


👉 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार 

-- रायगड


👉 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा 

-- रायगड


👉 मुंबईची परसबाग 

-- नाशिक


👉 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 

-- रत्नागिरी


👉 मुंबईचा गवळीवाडा 

-- नाशिक


👉 द्राक्षांचा जिल्हा 

--  नाशिक


👉 आदिवासींचा जिल्हा 

-- नंदूरबार


👉 महाराष्ट्रातील कापसाचे शेत 

-- जळगाव


👉 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा

-- यवतमाळ


👉 संत्र्याचा जिल्हा 

-- नागपूर


👉 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ 

-- अमरावती


👉 जंगलांचा जिल्हा 

-- गडचिरोली


👉 महाराष्ट्रातील केळीच्या बागा 

-- जळगाव


👉 साखर कारखान्यांचा जिल्हा 

-- अहमदनगर


👉 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार 

--  सोलापूर


👉 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा 

-- कोल्हापूर


👉 कुस्तीगिरांचा जिल्हा 

-- कोल्हापूर


👉 लेण्यांचा जिल्हा 

-- औरंगाबाद


👉 महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर

--  औरंगाबाद


👉 महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा 

-- बीड जिल्हा


👉 महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा

-- उस्मानाबाद


👉 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा

-- नांदेड


👉 देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा

 --  अमरावती


𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....


❇️ चीन वर्ष 2023 - 24 मध्ये  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे

प्रमुख व्यापारी भागीदार


◾️चीन: 118.4 अरब डॉलर

◾️USA: 118.3 अरब डॉलर

◾️रशिया: 65.7 अरब डॉलर

◾️सऊदी अरब5 : 43.4 अरब डॉलर

◾️सिंगापुर : 35.6 अरब डॉलर


❇️ जपानने चालू केले जगात पाहिले 6G 

◾️Speed : 100 Gbps

◾️5G पेक्षा 20 पट वेगवान


❇️ फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोप्रा ने सुवर्ण पदक जिंकले

◾️27 वी राष्ट्रीय फेडरेशन सीनियर एथलेटिक्स स्पर्धा  

◾️दिनांक :  12 ते 15 मे 

◾️ठिकाण : भुवनेश्वर (ओडिशा)  

◾️82.27 मीटर थ्रो केला


❇️ काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवा 

◾️नीरज चोप्रा ने 2020 साली टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला गोल्ड मिळवून दिले होते

◾️7 ऑगस्ट ला हे पदक जिंकल्याने 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो


❇️ रास्किन बॉण्ड यांना साहित्य अकादमी च्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले गेले

◾️प्रसिद्ध इंग्रजी लेखक आहेत 

◾️300 पेक्षा जास्त कथा लिहल्या

◾️30 पेक्षा जास्त बालकथा संग्रह


❇️ रास्किन बॉण्ड यांना मिळालेले पुरस्कार

◾️साहित्य अकादमी पुरस्कार (1992), 

◾️साहित्य अकादमी चा बाल साहित्य पुरस्कार (2012)

◾️पद्म श्री (1999) 

◾️ पद्म भूषण (2019)


❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया 

◾️2G : 1991 साली

◾️3G : 2001 साली

◾️4G : 2010 साली

◾️5G : 2022 साली

◾️6G : 2030 साली सुरू होईल


भारताची राज्यघटना मधील महत्त्वाचे ६० प्रश्न

१).  राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?

   अ) कलम – 73 
   ब) कलम – 74   
  क) कलम – 76 
  ड) कलम – 78

   1) अ, ब आणि क 
  2) ब, क आणि ड   
  3) अ, ब आणि ड   
4) ब आणि ड केवळ

  उत्तर :- 4

२).  भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते.

     इंग्लंडमध्ये मात्र :
   अ) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते.

   ब) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण “राजा चुक करू शकत नाही.”
        वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) अ  
   2) ब  
   3) दोन्ही  
   4) एकही नाही

उत्तर :- 3

३). भारताच्या महान्यायवादींसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.

   ब) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

   क) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब   
   2) फक्त ब  
   3) ब आणि क   
   4) अ आणि क

   उत्तर :- 1

४). खालील बाबींचा विचार करा.

   अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.

   ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने  दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.

   1) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.
   2) ब बरोबर व अ चूक आहे.
   3) अ बरोबर व ब चूक आहे.  
   4) अ व ब दोन्ही चूक आहेत.

    उत्तर :- 2

५) . महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ........................ आहे.

   1) 288 
   2) 19   
   3) 48    
   4) 67

   उत्तर :- 4

६). खालील विधाने लक्षात घ्या.

   अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे.

  ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.

   क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.

         भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत  ?

   1) अ, ब  
  2) ब, क    
  3) अ, क    
  4) वरील सर्व

   उत्तर :- 3

७) . राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात.

   अ) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.

   ब) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   क) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.

   1) अ व ब योग्य  
   2) अ, क योग्य 
   3) ब व क योग्य
   4) तिन्ही अयोग्य

    उत्तर :- 4



८) . खालील विधाने विचारात घ्या .

   अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.

   ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या  प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

   1) विधान अ बरोबर, ब चुक

   2) विधान अ चुक, ब बरोबर

   3) दोन्हीही विधाने चुकीची 

  4) दोन्हीही विधाने बरोबर

   उत्तर :- 4

९). भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.

   ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.

   क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

   ड) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.

   1) अ, ब आणि क   
   2) अ आणि क  
  3) ब आणि ड   
  4) ब, क आणि ड

  उत्तर :- 3

१०) . भारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत  ?

   अ) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

   ब) ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात.

   क) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.

    1) वरील सर्व विधाने सत्य आहेत.
    2) फक्त अ सत्य आहे.
    3) कोणतेही विधान सत्य नाही.
    4) फक्त अ आणि ब सत्य आहेत.

    उत्तर :- 4

११).  जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

  अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii
         2)  iv  iii  i  ii
         3)  iv  iii  ii  i
         4)  I  iii  iv  ii

        उत्तर :- 3

१२) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना
  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  iv  ii  iii
         3)  iii  i  iv  ii
         4)  i  iii  iv  ii

     उत्तर :- 2

१३). राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार 
   2) केंद्रीय प्रांत 
   3) बाँम्बे    
   4) पंजाब

   उत्तर :- 2

१४) . सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व  
   ब) स्वातंत्र्याचे तत्व  
   क) संघराज्य  
   ड) समाजवादी संरचना
   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार 
  फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ 
   2) अ, क, इ, फ  
   3) अ, ब, क, ड, फ 
   4) अ, ब, क, इ, फ

    उत्तर :- 2

१५) खालील विधानांचा विचार करा.
   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे 
   2) अ बरोबर आहे   
   3) दोन्ही बरोबर आहेत
   4) दोन्ही चूक आहेत

    उत्तर :- 2

१६) .भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?

   1) विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल

    2) राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा

   3) विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल

   4) राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा

   उत्तर :- 2

१७) . राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ...................... अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

   1) तीन 
   2) दोन   
   3) चार  
   4) पाच

उत्तर :- 2

१८) . सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?

     1) व्दिगृही   
      2) एकगृही   
      3) बहुगृही
      4) यापैकी नाही

      उत्तर :- 1

१९) . संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .....................  महिन्यांपेक्षा कमी असावे.

   1) दोन   
   2) तीन   
   3) चार   
   4) सहा

   उत्तर :- 4

२०) . दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा :

   अ) 1976 सालच्या एक घटनादुरुस्तीव्दारे मतदार संघांची पुनर्रचना 2001 च्या जणगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली.

   ब) परिसिमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदार संघामध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार  पडल्या.

   1) दोन्ही विधाने चुकीची आहेत. 

   2) विधान (अ) चुकीचे आहे.

   3) विधान (ब) चुकीचे आहे.   

   4) दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि         (ब) हा (अ) चा परिणाम आहे.

उत्तर :- 3

२१) संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?

   अ) महालेखापाल 

  ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   क) मुख्य निवडणूक आयुक्त 

   ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   1) अ, ब, क आणि ड   
   2) अ, ब आणि ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, क आणि ड

उत्तर :- 1

२२) महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधीत्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्या होत्या.

   ब) 16 व्या लोकसभेत त्या सहापट वाढल्या आहेत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/ त  ?

   1) अ    
   2) ब    
   3) अ, ब   
   4) यापैकी नाही

    उत्तर :- 1

२३) पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे.

   अ) मिझोराम  
   ब) नागालँड   
   क) त्रिपुरा  
   ड) सिक्कीम
   इ) गोवा 
  फ) चंदीगढ   
  ज) मणीपूर

   1) अ, ब, क, ड, इ
   2) अ, ब, ड, फ 
   3) अ, ब, ड  
   4) ब, क, ड, ज

   उत्तर :- 3

२४). लोकसभेविषयी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे.

   ब) केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.

   क) ती सर्वस्वी सार्वभौम आहे.

   ड) ती जनतेला उत्तरदायी आहे.

   1) अ आणि ब  
   2) ब, क आणि ड  
   3) अ, ब आणि ड
   4) अ आणि ड

   उत्तर :- 4

२५). बिनविरोध निवडून येणा-या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण  ?

   1) विजयालक्ष्मी पंडित
   2) इंदिरा गांधी   
   3) शीला दक्षित  
   4) मीरा कुमार

   उत्तर :- 4

२६).  देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

   1) राज्य विधिमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ  
   3) संसद 
   4) न्यायमंडळ

    उत्तर :- 3

२७) सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

   1) संसद सदस्य    
   2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
   3) विद्यापीठाचे कुलगुरू
   4) चौकशी आयोगाचे प्रमुख

उत्तर :- 1

२८) घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर  होऊ शकते ?

   1) 2016 
   2) 2021   
   3) 2026   
   4) 2031

    उत्तर :- 3

२९) .  विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
     कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

   4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर
आहे.

उत्तर :- 2

३०) .  राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

   1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

   2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

   3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

   4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

    उत्तर :- 1

३१).  खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

   1) घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली.

   2) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली.

   3) 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली.

   4) राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्षे 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास तीन वर्ष लागले.

उत्तर :- 1

३२).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद   
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर
   3) जे.बी. कृपलानी 
   4) सरदार वल्लभभाई पटेल

    उत्तर :- 1

३३).  संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ............ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका  
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

३४) . भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू
   2) मान्वेंद्रनाथ रॉय
   3) महात्मा गांधी 
   4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

३५).  खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे 
   2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे
   3) भारत भांडवलशाही राज्य आहे                          
   4) भारत सर्वकषवादी राज्य आहे

   उत्तर :- 2
३६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ   
   2) अ व ब 
  3) अ व क 
  4) अ, ब आणि क

उत्तर :- 2

३७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 
   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
   क) कल्याणकारी राज्य 
    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

     1) अ, ब, क 
     2) अ, ब
     3) अ, ब, ड
     4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4

३८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

      1) पंडित जवाहरलाल नेहरू
     2) सच्चिदानंद सिन्हा
     3) डॉ. राजेंद्र प्रसाद 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

    उत्तर :- 4

३९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

     1) डॉ. बी. आर. आंबेडकर
     2) डॉ. राजेंद्र प्रसाद
     3) जवाहरलाल नेहरू
     4) बी. एन. राव

उत्तर :- 4

४०). संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

      1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते

      2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

     3) यामध्ये केवळ एकच सरकार असते

   4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर २

४१).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर   
   3) जे. बी. कृपलानी   
  4) सरदार वल्लभभाई पटेल

   उत्तर :- 1

४२) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ........... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका 
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

४३) भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू 
  2) मान्वेंद्रनाथ रॉय 
  3) महात्मा गांधी  
  4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

४४) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे
  
  2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे

   3) भारत भांडवलशाही राज्य आहे  
 
4) भारत सर्वंकषवादी राज्य आहे

  उत्तर :- 2

४५).  खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा ?

   अ) कॅबिनेट व्यवस्था – फ्रान्स 
'   ब) मूलभूत हक्क – सोव्हिएत युनियन
   क) उर्वरित अधिकार – ऑस्ट्रेलिया            ड) मार्गदर्शक तत्वे – जर्मनी

   1) अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत

   2) अ, क, ड बरोबर, तर ब चूक आहे

   3) सगळे चूक आहेत

   4) क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक आहेत

उत्तर :- 3

४६). खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?

   अ) विजया लक्ष्मी पंडीत
    ब) सुब्बलक्ष्मी 
    क) सुचेता कृपलानी  
    ड) सरोजीनी नायडू

   1) अ आणि ब केवळ 
   2) अ, क आणि ड  
   3) ब, क आणि ड    
   4) अ, ब आणि ड

    उत्तर :- 2

४७). भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

   1) कॅनडा   
   2) ऑस्ट्रेलया  
   3) यू.एस.ए    
   4) वरीलपैकी एकही नाही

    उत्तर :- 1

४८.) भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) संसदीय लोकशाही – ब्रिटीश राज्यघटना    

ब) संघराज्य – अमेरिकेची राज्यघटना

   क) मार्गदर्शक तत्वे – आयर्लंडची
राज्यघटना    

ड) सामायिक सूची – ऑस्ट्रेलियाची

राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.

   1) अ एकमेव बरोबर आहे. 

    2) अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क बरोबर आहेत.  

    4) सर्व बरोबर आहेत.

    उत्तर :- 4

४९).  राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे .

   अ) एकेरी न्यायव्यवस्था  

   ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता

   क) समान अखिल भारतीय सेवा

   1) अ, क   
   2) अ, ब  
   3) ब, क   

   4) वरील सर्व

     उत्तर :- 4

५०). योग्य जोडया लावा.
  तरतूदी        स्त्रोत
         अ) कायद्याचे राज्य    i) ऑस्ट्रेलिया
         ब) घटनादुरस्ती प्रक्रिया  ii) इंग्लंड
         क) समवर्ती सूची    iii) दक्षिण आफ्रिका

     अ  ब  क
         1) ii  iii  i
         2) i  ii  iii
         3) iii  ii  i
         4) iii  i  ii

         उत्तर :- 1

५१) .  भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

   1) सत्ता विभाजन 
   2) पक्षविरहीत लोकशाही   
   3) न्यायालयीन स्वातंत्र्य 
   4) लोकशाही विकेंद्रीकरण

   उत्तर :- 4

५२) .   संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते ?

   अ) संयुक्त राज्य अमेरिका 
   ब) यू.एस.एस. आर
   क) चीन प्रजासत्ताक 
   ड) ऑस्ट्रेलियाचे सरकार

   1) अ, ब, ड 
  2) अ, क, ड 
  3) अ, ब, क  
  4) ब, क, ड

  उत्तर :- 2

५३).   जोडया लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष)

   अ) संघ अधिकार समिती      i) जे.बी. कृपलानी 

   ब) वित्त व स्टाफ समिती      ii) एच.सी. मुखर्जी

   क) अल्पसंख्याक उपसमिती    iii) राजेंन्द्र प्रसाद

   ड) मुलभूत अधिकार उपसमिती    iv) जवाहरलाल नेहरु

  अ  ब  क  ड

         1)  i  iv  ii  iii
         2) i  ii  iii  iv
         3) iv  iii  ii  i
         4) iv  ii  iii  i

उत्तर :- 3

५४).  कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?

   1) शीख 
  2) ख्रिश्चन  
  3) अनुसूचित जाती  
  4) अनुसूचित जमाती

   उत्तर :- 1

५५) . संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती  जुळत नाही  ?

  समित्या      अध्यक्ष
         1) सुकाणू समिती         -   डॉ. राजेंद्र प्रसाद

         2) कामकाज समिती         -   के.एम. मुन्शी

         3) मुलभूत हक्क उपसमिती -  जे.बी. कृपलानी

         4) अल्पसंख्याक उपसमिती -  मौलाना अबुल कलाम आझाद

उत्तर :- 4

५६) . भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा.

   अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी

   ब) एकात्म न्यायसंस्था

   क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा

   ड) एकेरी नागरिकत्व

        वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/ आहेत ?

   1) अ   
   2) अ, ब   
   3) अ, ब, क
   4) सर्व

   उत्तर :- 4

५७).  भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा :

   अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्टये  असलेले एकात्म राज्य          i) सर आयव्हर जेनिंग्ज

   ब) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले    ii) ग्रॅनव्हीले ऑस्टीन

   क) प्रबळ केंद्रिकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य            iii) दुर्गा दास बसु

   ड) एकात्म किंवा अद्भूत प्रकारचे संमिश्र राज्य              iv) के.सी. व्हिअर

  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  ii  iii  iv
         3)  iii  iv  ii  i
         4)  ii  i  iv  iii

         उत्तर :- 1

५८) .  घटना समितीमध्ये ब्रिटीश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते ?

   1) 290 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   2) 292 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   3) 296 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 89 – भारतीय संस्थाने

   4) 296 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 87 – भारतीय संस्थाने

उत्तर :- 2

५९)  ‘कॅबिनेट मिशन योजना’ संदर्भात जुळणी करा :

   अ) निवडावयाची एकूण सदस्य संख्या  i) 292

   ब) संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी    ii) 4

   क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी    iii) 93

   ड) प्रांतांचे प्रतिनिधी      iv) 389
  अ  ब  क  ड
         1)  iv  iii  ii  i
         2)  i  ii  iii  iv
         3)  ii  i  iv  iii
         4)  iii  iv  i  ii

      उत्तर :- 1

६०).  राज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदवन’ अशी टिका केली जाते, त्याची कारणे अशी आहेत.

   1) मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे.

   2) तरतुदीमागील ध्वन्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकतो.

   3) मसूदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात.

   4) मसुदा समितीतील सातपैकी तीन सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते.
    
   वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

उत्तर :- 4

राज्यघटनेविषयी महत्वाची माहिती :

भारतीय राज्यघटनेची निर्मिती :

 

कॅबिनेट मिशन योजने प्रमाणे जुलै 1946 मध्ये प्रांतिक कायदेमंडळातर्फे संविधान सभा निर्माण झाली. ही संविधान सभा सार्वभौम नव्हती. मात्र 14 ऑगस्ट 1947 मध्ये ती सार्वभौम झाली.

प्रा. एन. श्रीनिवासच्या मते भारतीय संविधान 1935 च्या कायद्याची पुनरावृत्ती आहे.

भारतीय संविधानने अंतिम सत्ता जनतेला दिली आहे.

घटना समितीची निर्मिती 6 डिसेंबर 1946 रोजी झाली.

घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

घटना समितीमधील प्रमुख सदस्य - डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर. बॅ. जयकर, कन्हैयालाल मुन्सी, गोविंद वल्लभ पंत, हंसाबेन मेहता, सरोजीनी नायडू, राजकुमारी अमृता कौर.

22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरूंनी घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली.

29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली.

मसुदा समितीचे सदस्य - के.एम. मुन्सी, गोपाल अय्यंगार, डी.सी. खेतान, एन. माधवराव, मोहम्मद सादुल्ला, अल्लादी कुलस्वामी अय्यर.

भारतीय राज्यघटना लिहिण्यास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. (1082 दिवस)

घटना निर्मितीचा खर्च = 63 लाख 96 हजार 729 रु.

22 जुलै 1947 रोजी भारताने तिरंगी झेंडा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने राज्यघटना स्वीकार केली.

26 जानेवारी 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.  

भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :


जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.

अतिशय लांबलचक व क्लिष्ट अशा स्वरूपाची आहे.

या राज्यघटनेत कलम - 395, प्रकरण - 22, परिशिष्ट - 8, व जोडपत्र - 1 अशी सुरूवातीस स्थिती होती.

1985 मध्ये कलम 395 प्रकरण - 22, परिशिष्ट - 12, जोडपत्र अशी स्थिती होती.

एक प्रधान पक्ष व बहुपक्ष पद्धती.

मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये व मार्गदर्शक तत्वे याची तरतूद.

निधर्मी राष्ट्राची कल्पना आहे.

स्वतंत्र्य न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे.

एकेरी नागरिकत्व आहे.

संसदीय शासनपद्धती या तत्वाचा अवलंब केला आहे.

राष्ट्रगीत - 'जन गण मन'

राष्ट्रीयगीत - 'वंदे मातरम'

बिद्रवाक्य - 'सत्यमेव जयते'

राष्ट्रीय फूल - 'कमळ'

राष्ट्रीय पक्षी - 'मोर'

राष्ट्रीय प्राणी - 'वाघ'

निरनिराळ्या राज्यघटनांच्या भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव

संसदीय शासनपद्धती - इंग्लंड

संघराज्यात्मक स्वरूप - अमेरिका

मार्गदर्शक तत्वे - आयरिश (आर्यलंड)

मूलभूत हक्क - फ्रान्स आणि अमेरिका

राष्ट्रपती अधिकार - इंग्लंडचा राजा आणि फ्रान्सचा अध्यक्ष

घटना दुरूस्ती - दक्षिण अफ्रिका

आणीबाणी - जर्मनी

समाजवाद - रशिया

मूलभूत कर्तव्ये - जपान

संघसूची, राज्यसूची - ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा समवर्ती सूची

कायद्याचे राज्य - इंग्लंड

न्यायालयीन पुनर्विलोकन - अमेरिका                 

भारताच्या राज्यघटनेतील तरतुदी :


भाग  -   कलम   -  तरतुदी

I.  - 1-4 -  केंद्र-राज्ये आणि त्यांच्या सीमा व भूप्रदेश

II. - 5-11 - नागरिकत्व

III. - 12-35 - मुलभूत हक्क

IV. - 36-51 - मार्गदर्शक तत्वे

IVA. - 51-अ - मुलभूत कर्तव्ये

V. - 52-78 - राष्ट्रपती, उपराष्ट्रपती

      79-122 - संसद

      123  - राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार

      124-151 - सर्वोच्च न्यायालय

VI. - 152  - घटक राज्य प्रशासन

    153-167 - राज्यपाल

    168-213 - राज्य विधिमंडळ

    213 - राज्यपालांचे वैधनिक अधिकार

    214-232 - उच्च न्यायालये

    233-237 - कनिष्ठ न्यायालये

VII. - 238 - निरसन (सातवी घटनादुरूस्ती 1956)

VIII. - 239-242 - केंद्रशासित प्रदेश

IX. - 243 - निरसन (सातवी घटनादुरूस्ती 1956)

X. - 244 - अनुसूचित व आदिवासी प्रदेश  

XI. - 245-255 - केंद्रराज्य प्रशासकीय संबंध  

XII. - 264-291 - केंद्रराज्य आर्थिक संबंध

    292-293 - उसनवारी व आर्थिक संबंध

    294-300 - मालमत्ता, करार, देणी, दायित्व, दावे

XIII. - 301-307 - देशांतर्गत व्यापार, वाणिज्य व व्यवहार

XIV. - 308-314  - प्रशासकीय सेवा

    315-323 - लोकसेवा आयोग

XIVA. - 323-अ  - प्रशासकीय लवाद

XV. - 324-329 - निवडणुका

XVI. - 330-342 - विशिष्ठ घटकांसाठी खास तरतुदी

XVII. - 343-344 - केंद्राची भाषा

    345-347 - प्रादेशिक भाषा

    348-349 - सर्वोच्च व उच्च न्यायालयाची भाषा

XVIII. - 352-360 - आणीबाणीच्या तरतुदी

XIX. - 361-367 - किरकोळ तरतुदी

XX. - 368 - घटनादुरुस्ती

XXI. - 369-392 - तात्पुरत्या, सांस्कृतिक व खास तरतुदी

XXII. - 393-395 - घटनेचे नाव, सुरुवात, अंमलबजावणी

परिशिष्ट्ये (Schedules) :


सध्या राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्ट्ये आहेत.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

वाचा :- राज्यघटना निर्मिती


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? 

एन् एम् राॅय(1934)


2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता? 

नेहरू रिपोर्ट

 

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली? 

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना) 


4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते? 

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स


5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले? 

24 मार्च 1946


6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली? 

16 मे 1946


7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 

389


8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या? 

जुलै -आॅगस्ट 1946


9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या? 

296


10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या? 

काँग्रेस 208


11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली? 

299


12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 

70


13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते? 

संयुक्त प्रांत(55)


14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला? 

10 लाख

 

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 

15


16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते? 

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात) 


17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? 

9ते23 डिसेंबर 1946


18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते? 

211


19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? 

सच्चिदानंद सिन्हा 


20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते? 

ए के अँथनी 


21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली? 

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)


22)घटना समितीचे सल्लागार कोण होते? 

बी एन राव

 

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? 

हरेंद्र मुखर्जी 


24)घटना समितीचे सचिव कोण होते? 

व्हि आर अय्यंगार

 

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले. 

11

भारतीय संविधान - प्रश्नोत्तर


प्रश्‍न 1- भारतीय संविधान सभा की प्रथम बैठक कब हुई । 

उत्‍तर - 9 दिसम्‍बर 1946 । 

प्रश्‍न 2- स‍ंविधान सभा का स्‍थाई अध्‍यक्ष कौन था । 

उत्‍तर - डॉ. राजेंन्‍द्र प्रसाद । 

प्रश्‍न 3- संविधान सभा का अस्‍थाई अध्‍यक्ष कौन था । 

उत्‍तर - डॉ. सच्चिदानंद सिन्‍हा । 

प्रश्‍न 4- संविधान सभा की प्रारूप समिति के अध्‍यक्ष कौन थे । 

उत्‍तर - डॉ. भीमराव अम्‍बेडकर । 

प्रश्‍न 5- संविधान सभा का औपचारिक रूप से प्रतिपादन किसने किया । 

उत्‍तर - एम. एन. राय । 

प्रश्‍न 6- भारत में संविधान सभा गठित करने का आधार क्‍या था । 

उत्‍तर - कैबिनेट मिशन योजना (1946) । 

प्रश्‍न 7- संविधान के गठन की मांग सर्वप्रथम 1895 में किस व्‍यक्ति ने की । 

उत्‍तर - बाल गंगाधर तिलक । 

प्रश्‍न 8- संविधान सभा में देशी रियासतों के कितने प्रतिनिधि थे । 

उत्‍तर - 70 । 

प्रश्‍न 9- संविधान सभा में किस देशी रियासत के प्रतिनिधि ने भाग नही लिया । 

उत्‍तर - हैदराबाद । 

प्रश्‍न 10- बी. आर. अम्‍बेडकर कहॉं के संविधान सभा में निर्वाचित हुए । 

उत्‍तर - बंगाल से । 

प्रश्‍न 11- संविधान सभा का संवैधानिक सलाहकार किसे नियुक्‍त किया गया था । 

उत्‍तर - बी. एन. राव । 

प्रश्‍न 12- संविधान सभा की प्रारूप समिति का गठन कब हुआ । 

उत्‍तर - 29 अगस्‍त 1947 । 

प्रश्‍न 13- संविधान की प्रारूप समिति के समक्ष प्रस्‍तावना का प्रस्‍ताव किसने रखा । 

उत्‍तर - जवाहर लाल नेहरू । 

प्रश्‍न 14- संविधान सभा की रचना हेतु संविधान का विचार सर्वप्रथम किसने प्रस्‍तुत किया । 

उत्‍तर - स्‍वराज पार्टी ने 1924 में । 

प्रश्‍न 15- संविधान सभा में भारत के संविधान को कब स्‍वीकृत किया । 

उत्‍तर - 26 नवम्‍बर 1946 । 

प्रश्‍न 16- संविधान को बनाने में कितना समय लगा । 

उत्‍तर - 2 वर्ष 11 माह 18 दिन । 

प्रश्‍न 17- स‍ंविधान में कितने अनुच्‍छेद है। 

उत्‍तर - 444 

प्रश्‍न 18- संविधान में कितने अध्‍याय है। 

उत्‍तर - 22 

प्रश्‍न 19- भारतीय सभा में कितनी अनुसूचियॉ है। 

उत्‍तर - 12

महाराष्ट्रातील खनिजे / खनिज संपत्ती :-


१) भंडारा. :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट


२)नागपूर. :- मँगनीज, लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, जांभा, संगमरवर, टंगस्टन, अभ्रक, दगडी कोळसा 


३)चंद्रपूर.  :-  लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट 


४)गडचिरोली :- लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट, तांबे,अभ्रक


५)कोल्हापूर. :- बॉक्साईट, जांभा


६)सिंधुदूर्ग :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट, चुनखडी, डोलोमाईट, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


७)रत्नागिरी :- बॉक्साईट, क्रोमाईट, डोलोमाईट, चुनखडी, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


८)यवतमाळ :- चुनखडक, दगडी कोळसा 

ठाणे व रायगड :- बॉक्साइड, मीठ, खनिजतेल


९)बॉम्बे  :- खनिज तेल

महाराष्ट्राचा भूगोल


दख्खनवरील पठारे

------------------------------------------------------------

-----------------------

अ.क्र. पठार. जिल्हा.


१) अहमदनगर पठार. अहमदनगर.

२) सासवड पठार. पुणे.

३) औंध पठार. सातारा.

४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.

५) खानापूर पठार. सांगली.

६) मालेगांव पठार. नाशिक.

७) बुलढाणा पठार. बुलढाणा.

८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.

------------------------------------------------------------

-----------------------

दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)

------------------------------------------------------------

-----------------------

अ. क्र. डोंगर. जिल्हा.


०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.

०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.

०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.

०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.

०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.

०६) मुदखेड डोंगर. नांदेड.

०७) गरमसूर डोंगर. नागपुर.

०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.

०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.

१०) भामरागड. गडचिरोली.

११) सुरजागड. गडचिरोली.

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.

------------------------------------------------------------

-----------------------

अ. क्र. शिखर. उंची जिल्हा


०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.

०२) साल्हेर. १५६७. नाशिक.

०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.

०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.

०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.

०६) तोरणा. १४०४. पुणे.

०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.

०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.

०९) तौला. १२३१. नाशिक.

१०) वैराट. ११७७. अमरावती.

११) चिखलदरा. १११५. अमरावती.

१२) हनुमान. १०६३. धुळे.

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्रातील प्रमुख घाट.

------------------------------------------------------------

-----------------------

अ. क्र. घाट. मार्ग


०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.

०२) बोरघाट. पुणे-मुंबई.

०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.

०४) दिवा घाट. पुणे-बारामती.

०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.

०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.

०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.

०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.

------------------------------------------------------------

----------------------------

अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.

०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०

०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५

०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०

०४) पेंच नागपुर. २५९.७१० (जवाहरलाल नेहरु).

०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०

०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७० कोल्हापुर, रत्नागिरी

------------------------------------------------------------

--------------------------

महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.

------------------------------------------------------------

--------------------------------

अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ

(चौकिमी)

०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९

०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८

०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी ११६६ कोल्हापुर, रत्नागिरी

०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१

०५) नागझिरा गोंदिया

------------------------------------------------------------

---------------------------------

महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे

------------------------------------------------------------

-----------------------

अ.क्र. जिल्हा ठिकाण

०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.

०२) रायगड. माथेरान.

०३) बीड. चिंचोली.

०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.

०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, तोरणा

०६) अमरावती चिखलदरा.

०७) नागपुर. रामटेक.

०८) जळगांव. पाल.

०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.

१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.

११) नाशिक. सप्तश्रुंगी.

१२) नंदुरबार. तोरणमाळ.

१३) अहमदनगर. भंडारदरा.

१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.

१५) अकोला नर्नाळा.

१६) सिंधुदुर्ग. अंबोली.


महाराष्ट्र : गरम पाण्याचे झरे.

------------------------------------------------------------

-----------------------

अ.क्र. जिल्हा झरे

०१) जळगांव. चांगदेव, अडावेद, उपनदेव.

०२) रायगड. साव, उन्हेर.

०३) अमरावती सालबरडी.

०४) नांदेड. उनकेश्वर.

०५) यवतमाळ. कापेश्वर.

०६) ठाणे वज्रेश्वरी, अकलोली, सतीवली.

०७) रत्नागिरी उन्हर्वे, अरवली, फनसवने,

राजापौर उन्हाळे, तूरळ, गोळवली.

महाराष्ट्र : लेण्या

------------------------------------------------------------

-----------------------

अ.क्र जिल्हे लेण्या

०१) औरंगाबाद. अजिंठा & वेरुळ, म्हैसमाळ व

गलवाडा.

०२) नाशिक. पांडव, भिलवाडा, मुंगी-तुंगी,

चांदवड,

चांभार, अंकाई-टंकाई लेण्या.

०३) पुणे कार्ले, बेडसा, भादे, लेण्याद्री, चावंड,

जीवधन.

०४) नांदेड. माहूर & शिऊर.

०५) लातूर. खरोसा (औसा)

०६) जालना भोकरदन.

०७) जळगांव. घटोत्कच लेणी.

०८) कोल्हापुर. हिद्रापूर.

०९) ठाणे सोपारा, अंबरनाथ, अशरगड, लोणाड.

१०) सिंधुदुर्ग. आचरा.

११) सातारा लोणारवाई.

१२) उस्मानाबाद. धाराशिव.

१३) अकोला पातूर.

१४) चंद्रपुर. भद्रावती.

१५) बीड. अंबाजोगाई.

१६) मुंबई उपनगर. महाकाली, जोगेश्वरी, मंडपेश्वर,

कान्हेरी(मुंबई ठाणे सिमेवर).

१७) रायगड. धारापूरी (एलीफंटा अरोरा.)

गांधारफणी, चामले, कोंडगांव, कोल,

कोंडाणे, कुडा, पाले, खडसावळे.

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्र : अष्टविनायक


अ.क्र. अष्टविनायक. स्थान

०१) महागणपती रांजणगांव (पुणे)

०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)

०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)

०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)

०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)

०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)

०७) वरद विनायक. महाड. (रायगड)

०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प

------------------------------------------------------------


अ.क्र. प्रकल्प. ठिकाण.

०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.

०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)

०३) डहाणू, चोला ठाणे.

०४) एकलहरे नाशिक.

०५) बीड. परळी वैजनाथ.

०६) फेकरी भुसावळ.

०७) पारस. अकोला.

०८) ऊरण. रायगड.

------------------------------------------------------------

-----------------------

महाराष्ट्र : अभयारण्ये.

------------------------------------------------------------


कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) कर्नाळा, फनसाड रायगड.

०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.

०३) मालवण. सिंधुदुर्ग.

------------------------------------------------------------

पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.

०२) कोयना अभयारण्य. सातारा.

०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.

०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.

०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

------------------------------------------------------------

नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.

०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर & अहमदनगर.

०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.

०४) यावल अभयारण्य. जळगांव.

०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

------------------------------------------------------------

औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये.

०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद व नगर.

०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.

०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य. उस्मानाबाद.

०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद व जळगांव.

------------------------------------------------------------

अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य. अमरावती.

०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.

०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.

०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य बुलढाणा.

०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.

०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ. नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये

०१) नागनागझिरा गोंदिया

०२) बोर. वर्घा व नागपुर

०३) अंधारी चंद्रपुर

०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा


💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹


🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१ 

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१


🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२ 

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

 

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०


🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८ 

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८


🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९


🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

आदिवासी जमाती !!

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. 


कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने  म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत


आदिवासी जमातीची सर्वात जास्त संख्या (सर्वात जास्त ते कमी) 

==> भिल्ल- (२१.२%), 

==> गोंड- (१८.१%), 

==> महादेव कोळी-(१४.३%), 

==> वारली- (७.३%), 

==> कोकणा- (६.७%)  

==> ठाकूर- (५.७%) 


अशी लोकसंख्येची विभागणी आहे. महाराष्ट्रात एकुण १९ आदिवासी जमाती अशा आहेत ज्यांची संख्या १००० पेक्षाही कमी आहे

महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान

🔴 राज्य – गुजरात  

◆स्थान – महाराष्ट्राच्या वायव्येस

◆स्पर्श करणारे जिल्हे – पालघर, नाशिक व धुळे.

________________________

🟠  राज्य – मध्यप्रदेश

◆स्थान – महाराष्ट्राच्या उत्तरेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.

________________________

🟣 राज्य – छत्तीसगढ

◆स्थान – महाराष्ट्राच्या पूर्वेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – भंडारा व गडचिरोली.

________________________

🔵 राज्य – तेलंगणा  

◆स्थान – महाराष्ट्राच्या आग्येयस

◆स्पर्श करणारे जिल्हे – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.

________________________

🟢. राज्य – कर्नाटक  

◆स्थान – महाराष्ट्राच्या दक्षिणेस

◆स्पर्श करणारे जिल्हे – नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.

________________________

🟡. राज्य – गोवा

◆स्थान – महाराष्ट्राच्या नैऋत्येस

◆स्पर्श करणारे जिल्हे – सिंधुदुर्ग


17 May 2024

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची


🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲
-------------------------------------------------
अहमदनगर     कळसुबाई        1646
नाशिक            साल्हेर             1567
अहमदनगर      गोवळदेव         1522
अहमदनगर     घनचक्कर        1509
नाशिक          धोडप                1472
सातारा          महाबळेश्वर         1438
अहमदनगर      तारामती          1431
पुणे               भीमाशंकर          1431
सातारा          विल्सन पॉईंट      1425
अहमदनगर    हरिश्चंद्रगड          1424
नाशिक          सप्तशृंगी             1416
पुणे              तोरणा                  1404
पुणे               पुरंदर                   1387
पुणे              राजगड                 1376
पुणे              रायरेश्वर                1373
नाशिक         मांगीतुंगी              1331
नंदुरबार        अस्तंभा                1325
पुणे              सिंहगड                 1312
नाशिक         मुल्हेर                   1306
नाशिक         त्रंबकेश्वर              1304
अहमदनगर   रतनगड               1297
नाशिक         ब्रह्मगिरी              1295
पुणे             सिंगी                     1293
नाशिक        अंजनेरी                1280
अहमदनगर  नाणेघाट               1264
नाशिक       तौला                      1231
पुणे           तामिनी घाट            1226
अमरावती    वैराट                     1177
अमरावती    चिखलदरा             1115
सातारा        प्रतापगड               1080
धुळे            हनुमान टेकडी        1063
रत्नागिरी     कुंभार्ली                 1050
नंदुरबार      तोरणमाळ              1036
गडचिरोली    गडलगट्टा                967
रायगड         रायगड                    820
रायगड        माथेरान                   800