17 September 2024

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १).मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड ✅

२.जम्मू काश्मीर

३.सिक्किम 

४.उत्तर प्रदेश


२).भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट 

२.त्रिभुजप्रदेश 

३.द्वीपकल्प✅

४.मैदानी प्रदेश


३). केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश 

२. हिमाचल प्रदेश 

३. उत्तराखंड ✅

४. जम्मू-काश्मीर


४). राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. २ वर्ष

२. ४ वर्ष

३. ५ वर्ष

४. ६ वर्ष✅


५). भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे 

२. हैदराबाद 

३. चेन्नई

४. मुंबई✅


६) .मार्च २०१९ मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग

२.  रघुराम राजन✅

३.  विमल जलान 

४.  उर्जित पटेल


७) .चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

 १. जानेवारी - २००७

२. ऑक्टोबर- २००८✅

 ३. सप्टेंबर-  २०११

४. ऑक्टोबर -२०१२


८) .ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?


१. अरबी समुद्र ✅

२. बंगालचा उपसागर

 ३. पॅसिफिक महासागर

४.  हिंदी महासागर


९) .लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर २०१९ पुरस्कार कोणी जिंकला? 

१. नोवाक जोकोविक✅

२.  रॉजर फेडरर 

३. राफेल नदाल

 ४.टायगर वूड्स


१०) .मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२

२. भाग -३

३. भाग -४

४. भाग -४अ✅


११) .'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती✅

 २. स्वामी विवेकानंद 

३. राजाराम मोहन राय  

४. स्वामी परमहंस


१२). आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

१. क्षय

२.  डायरिया 

३. ॲनिमिया✅

४. बेरीबेरी


१३) .बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो 

२. लॉर्ड कर्झन✅

३. लॉर्ड रिपन 

४. लॉर्ड डलहौसी


१४) .मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले

२. सावित्रीबाई फुले

३. लोकमान्य टिळक 

४.वि.रा. शिंदे✅


गाळाची मृदा

गाळाची मृदा

◆या मृदेने गंगा ब्रह्मपुत्रेचा मैदानी भाग व्यापलेला आहे.

◆पश्चिमेकडील पंजाबच्या काही भागात नदी आणि वारा दोहोंनी वाहून आणलेली मिश्र मृदा आढळते.

◆मैदानाचा उर्वरित भाग मात्र नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेला आहे.

★या थरांचे दोन उपप्रकार पडतात.

 1) भांगर
2) खादर

 1)भांगर म्हणजे पूर्वी केव्हा तरी संचित झालेली माती होय.

- ही माती राखट रंगाची जाड थरांची असून नद्यापासून दूर जास्त उंचीच्या प्रदेशात आढळते.

 2)खादर म्हणजे नवी गाळमाती. ही गाळमाती नद्या लगतच्या सखल मैदानी भागात दिसते.

- दरवर्षी पावसाळ्यात नवीन थरांची भर पडताना आढळून येते.

महत्वाचे दरी


🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे. 


🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

 

🚣🏻कलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.


🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.


🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

 हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते. 

📚🙏

हिमालयीन शिखरे

🔳एव्हरेस्ट:-8850 मी


🔳K2:-8611 मी


🔳कांचनगंगा:-8598 मी


🔳वहॉटसे:-8501 मी


🔳मकालु:-8421 मी


🔳धवलगिरी:-8172 मी


🔳मसलू:-8163


🔳चो आया:-8153 मी


🔳अन्नपूर्णा:-8078 मी


🔳नदादेवी:-7817 मी


🔳कामेत:-7756 मी


🔳गरला मंधता:-7694 मी


🔳तरिशूल:-7140 मी


🔳बद्रीनाथ:-7138 मी

Question banks

 प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल


प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

अ. पृथ्वीचे परीभ्रमण 

ब. पृथ्वीचे परिवलन

क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे    

ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे


1) अ,ब 

2) ब, क, ड

3) सर्व कारणीभुत घटक   √

4) अ,ब व क


प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह


1) अ,ब, क 

2) अ, ब, ड 

3) अ,ब,ड √

4) वरील सर्व


प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.


1) अ,क

2) अ 

3) अ,ब 

4) वरील सर्व. √


प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी

इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच 

उ. भुस्तंभ


1) सर्व योग्य 

2) सर्व अयोग्य 

3) क, ड, इ, ई, उ 

4) इ, ई.  √


प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.

ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.


1) अ 

2) ब 

3) क 

4) यापैकी नाही.  √


प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

अ. ऑस्टे्रलिया 

ब. नामिबिया 

क. ब्राझिल 

ड. चिली


1) अ,ब,क 

2) ब व क 

3) अ,ब, क 

4) सर्व योग्य.  √


प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

अ. छोटा नागपूर 

ब.माळवा 

क. बुंदेलखंड 

ड. बाघेलखंड


1) ब,क,ड,अ.  √

2) क,ब,ड,अ 

3) अ,क,ड,ब 

4) ब,क,अ,ड


प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.


1) अ व ब 

2) ब व क 

3) अ व क 

4) सर्व योग्य.  √


प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.


1. चिरोली   

2. गरमसूर 

3. गाळणा 

4. मुदखेड


.      अ     ब      क    ड

1)    3     4      2     1.  √

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

👍




बारा ज्योतिर्लिंगे


१) सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


२) मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३) महाकाळेश्वर -

 उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.


४) अमलेश्वर -

 ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.


५) वैद्यनाथ -

 शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.


६) भीमाशंकर -

 भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.


७) रामेश्वर -

 दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.


८) नागेश्वर -

 श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.


९) काशीविश्वेश्वर -

 वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.


१०) केदारेश्वर -

 हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.


११) घृष्णेश्वर -

 (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


१२) त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।


वली पर्वताची निर्मिती कशी होते :-


1) पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. 

2) या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. 

3) दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या 
प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते.  

परिणामी 👉  पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते.
 
💥  जगातील प्रमुख वली पर्वत पुढीलप्रमाणे.

⛰ हिमालय पर्वत 
⛰ अरवली पर्वत
⛰ रॉकी पर्वत
⛰ अँडीज पर्वत
⛰ आल्प्स पर्वत इत्यादी.


वर्णमाला, नाम व त्याचे प्रकार:

वर्णमाला

तोंडावाटे निघणार्‍या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या संकेतिक खुणेला ध्वनीचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण 48 वर्ण आहेत. या वर्णाच्या मालीकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ

मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.

स्वर
स्वरादी
व्यंजन

1. स्वर :

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत.

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.

र्‍हस्व स्वर,
दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर
1. र्‍हस्व स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
उदा. अ, इ, ऋ, उ
2. दीर्घ स्वर :

ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार

1. सजातीय स्वर :

एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
2. विजातीय स्वर :

भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ
3. संयुक्त स्वर :

दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
याचे 4 स्वर आहेत.

ए – अ+इ/ई
ऐ – आ+इ/ई
ओ – अ+उ/ऊ
औ – आ+उ/ऊ
2. स्वरादी :

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी

दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
दोन नवे स्वरदी : ओ, औ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
उदा. बॅट, बॉल
स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात.

अनुस्वार,
अनुनासिक,
विसर्ग
क. अनुस्वार –

स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात.
उदा. गंगा, चंचल इत्यादी.
ख. अनुनासिक –

जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात.
उदा. घरात, जेंव्हा, फुफ्फुसांतील, यांतील, आंतील इत्यादी.
ग. विसर्ग –

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंब देतात.
उदा. स्वत:, दु:ख:, नि:स्पृह: इत्यादी.
3.व्यंजन :

एकूण व्यंजन 34 आहेत.

ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

स्पर्श व्यंजन (25)
अर्धस्वर व्यंजन (4)
उष्मा, घर्षक व्यंजन (3)
महाप्राण व्यंजन (1)
स्वतंत्र व्यंजन (1)
1. स्पर्श व्यंजन :

एकूण व्यंजन 25 आहेत.

वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णाला स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा.

क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

कठोर वर्ण
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
1. कठोर वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
2. मृद वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात.
उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
3. अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.
उदा. ड, त्र, ण, न, म

______________________________


नाम व त्याचे प्रकार:


प्रत्यक्षात असणार्‍या किंवा कल्पनेने जाणवलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावालानामअसे म्हणतात.

उदा.

टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.


 नामाचे प्रकार :

नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.

सामान्य नाम –


एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात.

उदा.

मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.


सामान्य नाम विशेषनामपर्वतहिमालय, सहयाद्री, सातपुडामुलगास्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण, कपिल, भैरवमुलगीमधुस्मिता, स्वागता, तारा, आशा, नलिनीशहरनगर, पुणे, दिल्ली, मुंबई, कोल्हापूरनदीगंगा, सिंधू, तापी, नर्मदा, गोदावरी

टीप : (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

विशेष नाम –


ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात.

उदा.

राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.


टीप : (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास सामान्य नाम समजावे.) 
उदा. या गावात बरेच नारद आहेत.

भाववाचक नाम –


ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात.

उदा.

धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.


टीप : (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्‍या नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

   भाववाचक नामे साधण्याचे प्रकार –

सामान्यनामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा, य, या यासारखे प्रत्यय लावून नामे तयार होतात ती खालीलप्रमाणे –

शब्दप्रत्ययभाववाचक नामइतर उदाहरणेनवलआईनवलाईखोदाई, चपडाई, दांडगाई, धुलाईश्रीमंतईश्रीमंतीगरीबी, गोडी, लबाडी, वकिलीपाटीलकीपाटीलकीआपुलकी, भिक्षुकीगुलामगिरीगुलामगिरीफसवेगिरी, लुच्चेगिरीशांतताशांतताक्रूरता, नम्रता, समतामनुष्यत्वमनुष्यत्वप्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्वशहाणापण, पणाशहाणपण, पणादेवपण, प्रामाणिकपणा, मोठेपणसुंदरयसौदर्यगांभीर्य, धैर्य, माधुर्य, शौर्यगोडवागोडवाओलावा, गारवा

नामाचे कार्य करणारे इतर शब्द :

टीप : नाम, सर्वनाम, विशेषण, ही जी नावे शब्दांच्या जातीला दिली जातात, ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिली जातात तीच गोष्ट येथेही लक्षात ठेवावयास हवी, सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली गेली आहेत.

अशाच पद्धतीने नामांच्या कार्यावरून त्यांचे काही नियम आहेत ते खालीलप्रमाणे-

नियम –

1. केव्हा-केव्हा सामान्यनाम हे विशेषनामांचे कार्य करतात.

उदा.

आत्ताच मी नगरहून आलो.


शेजारची तारा यंदा बी.ए. झाली.


वरील वाक्यामध्ये वापरली गेलेली नगर कोणतेही शहर, तारा(नक्षत्र) ही  मुळीच सामान्यनामे आहेत परंतु येथे ती विशेषनामे म्हणून वापरली गेलेली आहेत.

2. केव्हा-केव्हा विशेषनाम सामान्य नामाचे कार्य करतात.

उदा.

तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.


आमचे वडील म्हणजे जमदग्नि आहेत.


आम्हाला आजच्या विधार्थ्यात सुदाम नकोत भीम हवेत.


वरील वाक्यांत कुंभकर्ण, जमदग्नि, सुदाम, भीम गे मुळची विशेषनामे आहेत.
पण येथे कुंभकर्ण अतिशय झोपाळू, जमदग्नि = अतिशय रागीट मनुष्य, सुदाम=अशक्त मुलगे व भीम=सशक्त मुलगे या अर्थाने वापरली आहेत. म्हणजे मुळची विशेषनामे वरील वाक्यांत सामान्य नामांचे कार्य करतात.

3. केव्हा-केव्हा भाववाचक नामे विशेषनामांचे कार्य करते.

उदा.

शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे.


विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.


माधुरी उधा मुंबईला जाईल.


वरील वाक्यात अधोरेखित केलेली शब्दे ही मुळची भाववाचक नामे आहेत. पण याठिकाणी त्यांचा वापर विशेषणामासारखा केला आहे.

4. विशेषनामाचे अनेकवचन होत नाही झाल्यास त्यांना सामान्यनाम म्हणतात.

उदा. 

आमच्या वर्गात तीन पाटील आहेत.


या गावात बरेच नारद आहेत.


माझ्या आईने सोळा सोमवारांचे व्रत केले.


विशेषनामाचे अनेकवचन होत नाही पण वरील वाक्यात विशेषनामे अनेकवचनी वापरलेली दिसतील या वाक्यातील विशेषनामे म्हणून वापरली आहेत.

5. विशेषण केव्हा-केव्हा नामाचे कार्य करतात.

उदा. 

शहाण्याला शब्दांचा मार.


श्रीमंतांना गर्व असतो.


जातीच्या सुंदरांना काहीही शोभते.


जगात गरीबांना मान मिळत नाही.


वरील वाक्यात विशेषण ही नामासारखी वापरली आहेत.

6. केव्हा-केव्हा अव्यय नामाचे कार्य करतात.

उदा.  

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.


त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.


नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली.


वरील वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्यये ही नामाची कार्य करतात.

7. धातू-साधिते केव्हा-केव्हा नामाचे कार्ये करते.

उदा.

ज्याला कर नाही त्याला डर कसली.


गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते.


ते ध्यान पाहून मला हसू आले.


देणार्‍याने देत जावे.


वरील उदाहरणांवरून असे दिसून येते की, सामान्यपणे, विशेषनामे व भाववाचकनामे ही एकमेकांचे कार्य करतांना आढळतात. तसेच विशेषणे, अव्यय, धातुसाधिते यांचा वापरसुद्धा नामांसारखा करण्यात येत.

आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली.
त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो.
नापास झाल्यामुळे त्याची छी-थू झाली

यात नाम कोणते आहेत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


प्लासिचे युद्ध :- 

जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


बक्सरची लढाई :- 

बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


अलाहाबादचा तह :- 

बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


2. सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 


भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 


3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 

तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

हवामान

◾️भारताचे हवामान ‘मान्सून’ प्रकारात मोड़ते. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तवार जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान अधिक असते.

सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते.

उन्हाळ्यात राजस्थानातील गंगानगर भागात (५० डिग्री हून अधिक) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते.

हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालयीन पर्वत क्षेत्र या भागातील तापमान उणे ४० डिग्री इतके खली उतरते.

◾️भारतीय ऋतु: भारतात ऋतुची विभागणी खालीलप्रमाणे

उष्ण हवेचा उन्हाळा – मार्च ते मे
दमट व उष्ण पावसाळी ऋतु – जून ते सप्टेंबर
माघारी मान्सूनचा काळ –  ऑक्टोंबर ते नोव्हेंबर
ठंड व कोरडा हिवाळा –  डिसेंबर ते फेब्रुवारी

◾️१ – उन्हाळा: मार्च ते मे 

२१ मार्च रोजी सूर्यकिरणे विषुवृत्तावर लंबरूप पडतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते
भारतात या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते व उन्हाळा सुरु होतो, परिणाम – लू वारे, धुळीची वादळे, नॉर्वेस्टर, कालबैसाखी
लू वारे – उन्हाळ्यात उत्तर भागात वाहणारे अति उष्ण वारे म्हणजे लू वारे
नॉर्वेस्टर – पश्चिम बंगाल, ओरिसा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार बाष्पयुक्त वारे व वायव्येकडून येणारे उष्ण कोरडे वारे यांच्या मिलनातून गडगडाटी वादळांची निर्मिती होते, त्यास नॉर्वेस्टर म्हणतात
कालबैसाखी – पश्चिम बंगालमध्ये अशा वादळांना (नॉर्वेस्टर) कालबैसाखी म्हणतात
आंबेसरी – उन्हाळ्यात निर्माण होनारया कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु या राज्यांत पडणारा पाउस म्हणजे आंबेसरी
वसंत वर्षा – पश्चिम बंगाल, आसाममध्ये या पावसास आंबेसरी म्हणतात

◾️२ – पावसाळा: जून ते सप्टेंबर 

हिंदी महासागरावरून वाहणार्या बाष्पयुक्त नैऋत्य मौसमी वरयांमुळे भारतात पाउस पडतो
भारतात प्रवेश करताना नैऋत्य मौसमी वारयांचे अरबी समुद्रावरून वाहणारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे असे दोन प्रकार पडतात
हे वारे भारतात ८० टक्के हून अधिक पाउस देतात

◾️३ – माघारी मान्सून काळ: ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 

२३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरु होते आणि उत्तर गोलर्धात् तापमान कमी होऊन वायुदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैऋत्य मौसमी वरयांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे सर्कु लागतात. यालाच मान्सूनची माघार असे म्हणतात

◾️४ – हिवाळा: डिसेंबर ते फेब्रुवारी

२२ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर असतो, त्यावेळी भारतात तापमान कक्षा खाली येऊन कोरडा व थंड हिवाळा सुरु होतो
या काळात ‘ईशान्य मौसमी वारे’ बंगालच्या उपसागरावरून वाहताना बाष्पयुक्त बनतात
ईशान्य मौसमी वारयांमुळे पूर्व किनर्यावर आंध्रप्रदेश, तमिलनाडु येथे हिवाळ्यात पाउस पडतो

हिमालय

 

ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान.

हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. 

माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे.

भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते.

हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार राहण्यास मदत होते.

हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत, पाकिस्तान,बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. 

गंगा,ब्रह्मपुत्रा,सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत.

13 September 2024

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

🔻स्थापनाः 1964 - संथानम समितीच्या शिफारशींनुसार.

🔻2003 मध्ये वैधानिक दर्जा

🔻रचनाः राष्ट्रपतींद्वारे नियुक्त एक केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) आणि कमाल दोन दक्षता आयुक्त (सदस्य) +2

🔻CVC कोणत्याही मंत्रालय/विभागाद्वारे नियंत्रित नाही.
CVC एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे..

🔻लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काही विशिष्ट श्रेणीतील लोकसेवकांनी केलेल्या गुन्ह्यांची  'चौकशी करण्याचा अधिकार आहे.

🔻CVC ला भ्रष्टाचार किंवा पदाच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होतात आणि तिच्यातर्फे योग्य कारवाईची शिफारस केली जाते.

🔻CVC ही तपास यंत्रणा नाही. सीव्हीसी एकतर सीबीआय किंवा सरकारी कार्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांमार्फत (सीव्हीओ) तपास करते.

🔻पहिले CVC: एन. एस. राव)

🔴सध्याचे CVC: पी. के. श्रीवास्तव

05 September 2024

काकोरी कट घटना


( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती. 


- दिनांक: ९ ऑगस्ट १९२५

- स्थान: काकोरी जवळ, लखनऊजवळील एक लहान गाव, (उत्तर प्रदेश) 


प्रमुख सहभाग:


- हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA): काकोरी घटना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्यांनी घडवून आणली होती, ही १९२४ मध्ये स्थापन झालेली ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठीची क्रांतिकारी संघटना होती

.

- प्रमुख क्रांतिकारी: 

  - रामप्रसाद बिस्मिल (या ऑपरेशनचे नेते)

  - अशफाकुल्ला खान

  - चंद्रशेखर आझाद

  - राजेंद्र लाहिरी

  - रोशन सिंग

  - मुकुंदी लाल

  - सचिंद्र बक्षी

  - बनवारी लाल

  - केशब चक्रवर्ती

  - ठाकूर रोशन सिंग

  - विष्णु शरण दुब्लिश


उद्दिष्टे:


- क्रांतिकारी क्रियाकलापांसाठी निधी जमा करणे: काकोरी घटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी निधी घेऊन जाणाऱ्या ट्रेनची लूट करणे होते. क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी त्यांचे क्रियाकलाप चालवण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून पैसा जप्त करण्याचा प्रयत्न केला.


घटना:


- ९ ऑगस्ट १९२५ रोजी, क्रांतिकारकांनी काकोरी येथे ८-डाउन सहारनपूर-लखनऊ ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. त्यांनी ट्रेनमध्ये ठेवलेली सरकारी पैसे असलेली तिजोरी लुटली. लुटलेली रक्कम सुमारे ₹८,००० होती, जी त्या वेळी एक मोठी रक्कम होती.


परिणाम:


- अटक आणि खटले: लुटीनंतर, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी HRA वर मोठा आघात केला. अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आणि "काकोरी कट प्रकरण" नावाचा खटला चालवला गेला.


- शिक्षा:

  - रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि १९२७ मध्ये त्यांची फाशी झाली.

  - इतर क्रांतिकारकांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या, ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा देखील होती.


महत्व:


- स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा: काकोरी घटना ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनली. या घटनेमुळे अनेक तरुण भारतीयांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

- शहादत: बिस्मिल, अशफाकुल्ला खान, लाहिरी, आणि रोशन सिंग यांची फाशी भारतीय इतिहासात शहादत म्हणून ओळखली जाते, जी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे.


वारसा:

- काकोरी घटना ही ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या धैर्याच्या कृती म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता वाढल्याचे दिसते. या घटनेत सहभागी झालेल्या क्रांतिकारकांचे स्मरण भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील नायक म्हणून केले जाते. उत्तर प्रदेशात विशेषतः दरवर्षी या घटनेचे स्मरण केले जाते.


ह घटना भारतातील क्रांतिकारक क्रियाकलापांमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध अधिक थेट आणि लढाऊ कृतींना चालना मिळाली. 


मुघल साम्राज्याचा उदय


♦️1. बाबर (सन 1526 ते 1530) :

✔️Founder 


✔️Battle of Khanwa

:Babur defeated Rana Sunga of Mewar and his allies.


✔️Battle of Ghaghra

Babur defeated the joint forces of the Afghans and Sultan of Bengal


✔️Babur defeated Ibrahim Lodi in the first battle of Panipat.



2. हुमायून (सन 1530 ते 1555) :


• बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

• यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.


3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

:सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

✔️जमीन महसूल सुधारणा: –

• शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

✔️रस्ते बांधणी :-

✔️चलन व्यवस्था :-

• त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

✔️टपाल व्यवस्था :-


४.हुमायून (सन 1555 ते 1556) :


🔥His biography Humayunnama was written by Gulbadan Begum in Persian language.


5. अकबर (1556 ते 1606) :


   ✔️second battle of Panipat in 1556

  ✔️In the Battle of Haldighati, Rana Pratap Singh was severely defeated by the Mughal army

   ✔️ Chand Bibi defended Ahmednagar against the Mughal forces.


✔️Ibadat Khana (House of worship) at his new capital Fatepur Sikri.

• अकबर हा सहष्णू राजा होता.

• त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

• सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

• हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

• बालहत्या प्रथा बंद केली.

• सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

✔️, he promulgated a new religion called Din Ilahi or Divine Faith.

कला व विद्याप्रेमी :-

• अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

• अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

• अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

• तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

• अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.


6. जहांगीर (1606 ते 1627) :


• त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

• मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

• काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

• जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.


7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

• त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

• 

• शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आणी लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.


8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

👉🏾Alamgir, World Conqueror.


✔️ninth Guru of Sikhs Guru Tegbahadur was executed by Aurangazeb.


• औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. 


याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.


• औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

• शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. 



औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.


• सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले.

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)


- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:


महत्वाचे खटले

❇️केशवानंद भारती खटला 1973:-

✍️भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

✍️मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


❇️मिनर्व्हा मिल खटला 1980:- 

✍️भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

✍️घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

✍️राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


❇️बेरुबारी युनियन खटला 1960:-

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


❇️ए के गोपालन खटला 1950:- (

✍️कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


❇️मेनका गांधी खटला1978:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


❇️आय आर कोहेल्लो खटला 2007:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


❇️एस आर बोंमई खटला 1994:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

02 September 2024

झांशी संस्थान :

 ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील अठराव्या शतकातील बुंदेलखंडातील एक संस्थान. हे संस्थान उत्तरेस ग्वाल्हेर संस्थान व जालौन, पूर्वेस धसान नदी, पश्चिमेस दतिया, ग्वाल्हेर ही संस्थाने, दक्षिणेस ओर्छा संस्थान यांनी सीमांकित झाले होते.


 झांशी संस्थानातून ब्रिटिशांनी झांशी जिल्हा निर्माण केला. त्याचे क्षेत्रफळ ९,२८२ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१८५४) व उत्पन्न ४·३ लाख रु. होते.


प्राचीन काळी या संस्थानच्या आसपास परिहार, काठी राजपूत व गोंड लोकांची वस्ती होती. काही वर्षे ते चंदेल्लांच्या अंमलाखाली होते.


 ११८२ साली पृथ्वीराजाने चंदेल्लांचा पराभव केला. तेराव्या शतकारंभी कुत्‌बुद्दीन (१२०२-०३) व अल्तमश (१२३४) यांनी या प्रांतावर स्वाऱ्या केल्या. नंतर हा प्रदेश खेंगर टोळीच्या ताब्यात गेला.


 त्यांनीच येथे किल्ला बांधला. तेराव्या शतकात रुद्रप्रताप बुंदेल्याने खेंगरांचा पराभव करून तेथे राज्य स्थापिले. त्याचा मुलगा भारतीचंद्र याने १५३१ मध्ये ओर्छा शहर वसविले. ओर्छाचा राजा बीरसिंगदेव याने १६१३ मध्ये झांशीची स्थापना करून झांशीचा किल्ला बांधला. अकबर, शाहजहान व वीरसिंग यांच्यात चकमकी उडाल्या होत्या. 


सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात चंपतराय बुंदेला याचा मुलगा छत्रसाल याने झांशीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याने पहिल्या बाजीरावास मुसलमानांविरुद्ध मदतीस बोलाविले. बाजीरावने मुसलमानांचा पराभव केला.


 त्याबद्दल छत्रसालने बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे कबूल केले. हा करार प्रत्यक्ष पाळला गेला नाही.


 महाराष्ट्रातून कोणी सरदार जाऊन सालीना सहा लक्षांची खंडणी वसूल करी. १७४२ मध्ये मल्हार कृष्ण व राणोजी शिंदे हे झांशीस गेले असता ओर्छाकरांनी त्यांचा पराभव करून मल्हार कृष्णचा खून केला. तेव्हा पुण्याहून गेलेल्या नारो शंकराने ओर्छाकरांचा पराभव करून झांशी मराठ्यांच्या ताब्यात आणली.


 पेशव्यांनी मल्हार कृष्णच्या वंशजांना झांशीची जहागीर दिली. १७४२ ते १७७० पर्यंत नारो शंकर, बाबुराव, कान्हेरपंत, विश्वासराव लक्ष्मण हे झांशीचे सुभेदार होते. 


नारो शंकराने झांशीचा किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याला लागून नवीन शहर वसविले. हाच झांशी संस्थानचा संस्थापक. झांशीची सुभेदारी वंशपरंपरेने १७७० मध्ये रघुनाथ हरी नेवाळकर यांच्या घराण्याकडे आली.


 रघुनाथरावाने २५ वर्षे कारभार केल्यानंतर आपला भाऊ शिवराव याच्या नावाने पुण्याहून वस्त्रे मागविली. इंग्रजांनी बुंदेलखंडावर चाल केली, तेव्हा शिवरावने त्यांना साह्य केले. ६ फेब्रुवारी १८०४ रोजी इंग्रज आणि शिवराव यांच्यात तह झाला.


 १८ वर्षे कारभार केल्यानंतर शिवरावचा नातू रामचंद्रराव हा गादीवर आला. १३ जून १८१७ रोजी पेशवे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या तहान्वये झांशी संस्थान हे इंग्रजांच्या ताब्यात गेले.


 इंग्रज व रामचंद्रराव यांच्यात तह होऊन इंग्रजांनी झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे वंशपरंपरेने चालविण्याचे मान्य केले. भरतपूरच्या वेढ्यात रामचंद्ररावाने इंग्रजांना साह्य केले म्हणून १८३२ मध्ये इंग्रजांनी त्याला महाराज हा किताब दिला.


 १८३५ मध्ये रामचंद्ररावानंतर त्याचा चुलता रघुनाथराव गादीवर बसला, पण तो १८३८ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर आला, पण वाद होऊन १८३८ ते १८४३ पर्यंत इंग्रजांनी झांशी संस्थानचा कारभार आपल्या हातात घेतला. पुढे इंग्रजांनी गंगाधररावाबरोबर तैनाती फौजेचा तह केला. तहाप्रमाणे २,२७,००० रु. वसुलाचा मुलूख इंग्रजांना मिळाला. 


गंगाधररावांची पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याने मोरोपंत तांबे यांची मुलगी लक्ष्मीबाई (मनुबाई) हिच्याशी लग्न केले. १८५३ मध्ये गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांनी नेवाळकर घराण्यातील आनंदराव यास दत्तक घेतले. नंतर त्याच साली गंगाधरराव मरण पावले.


 १८५४ साली लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस अमान्य करून झांशी संस्थान ब्रिटिश राज्यात समाविष्ट केले. लक्ष्मीबाईने आपला दत्तक मंजूर व्हावा, म्हणून खटपट केली. ती अखेरपर्यंत आशावादी होती आणि इंग्रजांना मदत करीत होती. 


अखेर राणीला वार्षिक ६०,००० रु. तनखा देऊन तिला शहरातील राजवाड्यात राहण्याची परवानगी दिली. १८५७ च्या उठावात झांशी इंग्रजांच्या हाती पडू नये, म्हणून राणीने आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस राणी रणांगणी मृत्यू पावली.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


देशातील प्रत्येक कारागीर कार्व्हर्सवासीय चालनांचा अहवाल राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या वेळी किंवा तणावग्रस्त देशांच्या स्वराज्यनिश्चिती: देशाच्या त्या देशातील राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारख्या आहेत.


कल्चरमचा कलम 356 नार, जेव्हा राज्यातील प्रशासकीय कार्यक्रम घटनात्मक परिस्थिती चालविते राष्ट्रपती राजपूत लागू होतात.


सामाजिक कलम 365 नूसार, राज्य सरकारच्या निर्देशांबद्दल दुर्लक्ष झाले तर संबंधित देशव्यापी राजवट घोषित करणे आवश्यक आहे.


देशपातळीवर लागू होणा दोन्या दु: खाचा त्रास कमी होणे आवश्यक आहे.


संसदेच्या माहुरीवर सहा दिवस राष्ट्रपती राजवट लागू होतात.


संसदेणे पुढील सहा वर्षाचे प्रमाणित राष्ट्रपती राजवतीचा कालावधी कमी होणे.


संसदेची प्रमाणित वास्तविकता, भावनांचा दोनदा अनुभव तीन वर्षांचा प्रदेश राष्ट्रपुत्र लागू करणे आवश्यक आहे.


राष्ट्रपती राजवती न्यायालयीन राज्ये सर्व राष्ट्र राष्ट्रपती हाती असतात.


राष्ट्रपती पुनर्निधी असे बहुमत पाळणारे राज्यपाल चालवा राज्य चालवा.


राज्यपाल राज्याचे मुख्य सत्य कार्यवाही चालतात.


राष्ट्रपती राजवतीशी संबंधित राज्याची पद्धतशीर कार्ये, अधिकार संसदेकडे सोप एब्ले.


राष्ट्रपती अध्यादेश राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.


लोकांच्या भेटीगाठींच्या बैठकीत काही काळ खर्च होत नाही.


राष्ट्रपती राजवती उच्चस्तरीय अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्यातील वातानुकूलित विदर्जन दिशानिर्देशित राष्ट्रपती असतात

भूगोल नोट्स


☀️  जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

☀️  भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

☀️  भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,

दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

☀️  क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

☀️  इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

☀️  पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

☀️  जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

☀️  भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

☀️  भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

☀️  भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते 


   🖊 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 


   मि - मिझोराम

    त्र - त्रिपुरा

    म - मध्य प्रदेश

  झा - झारखंड

    रा - राजस्थान

    गु - गुजरात

  छा - छत्तीसगड

    प - पश्चिम बंगाल


सिंधू संस्कृती



1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?


   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?


   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?


   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.


  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?


   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?


   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.


  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.


   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?


   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3

खिलजी_वंश



1. जलालुद्दीन फिरोज खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1290-96) जलालुद्दीन फिरोज खिलजी


2. जलालुद्दीन फिरोज खिलजी दिल्ली की गद्दी पर कब बैठा ?

►-1290 ई.


3. सुल्तान बनने से पहले जलालुद्दीन क्या था ?

►-बुलंदशहर का इफ्तादार


4. नवीन मुसलमान किसे कहा गया ?

►-दिल्ली में बसने वाले मंगोलों को ।


5. किसने जलालुद्दीन फिरोज खिलजी की हत्या कर दिल्ली की गद्दी हासिल की 

►-अलाउद्दीन खिलजी (1296 ई. में)


6. अलाउद्दीन खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1296-1316 ई.) अलाउद्दीन खिलजी


7. जलालुउद्दीन खिलजी के शासन में अलाउद्दीन क्या था ?

►-कड़ा-मानिकपुर का सुबेदार


8. उसने देवगिरी पर कब आक्रमण किया ?

►-1296 ई.


9. सिकंदर-ए-सानी की उपाधि किसने ग्रहण की ?

►-अलाउद्दीन


10. अलाउद्दीन के समय किसने दिल्ली में विद्रोह किया था ?

►-हाजियों ने ।


11. हाजियों के विद्रोह को किसने खत्म किया ?

►-हमीदुद्दीन


12.अलाउद्दीन ने कौन-सा सिद्धांत चलाया था ?

►-दैवी अधिकार


13. अलाउद्दीन खिलजी ने सेना में कौन-सी प्रथा शुरू की ?

►-हुलिया रखने की प्रथा ।


14. खिलजी वंश में घोड़ों को दागने की पद्धति किसने शुरू की ?

►-अलाउद्दीन खिलजी ।


15. भू-राजस्व व्यवस्था को अधिक प्रभावी बनाने के लिए अलाउद्दीन खिलजी ने किसकी स्थापना की ?

►-दीवान-ए-मुस्तखराज


16. अलाउद्दीन का प्रसिद्ध सेनापति कौन था जिसने दक्षिण भारत अभियान का नेतृत्व किया था ?

►-मलिक काफूर


17. अलाउद्दीन के दरबारी कवि कौन थे ?

►-अमीर खुसरो


18. सितार एवं तबले के अविष्कार का श्रेय किन्हें जाता है ?

►-अमीर खुसरो


19. इब्नबतूता की पुस्तक रेहला में किस शासक की घटनाओं का वर्णन है ?

►-मुहम्मद तुगलक


20. अलाउद्दीन की मृत्यु के बाद दिल्ली का सुल्तान कौन बना ?

►-कुतुबुद्दीन मुबारक । इसने खलीफा की उपाधि ग्रहण की ।

पोलीस भरती प्रश्नसंच

 1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

आकाशगंगा

 दीर्घिका

 तेजोमेघ  

तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा


2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

 भांगाची भरती

उधानाची भरती

 ध्रुवीय भरती

 विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती


 3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 भूपट्ट निर्मिती

 ज्वालामुखी

भूकंप

 मंद हालचाली

उत्तर : भूकंप


 4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 तांबे

 बॉक्साइट

 लोखंड

मॅगनीज

उत्तर : मॅगनीज


 5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 हिराकुंड

 जायकवाडी

भाक्रा नांगल

 तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल


 6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.


 साल

 देवदार

 हलदू

खैर

उत्तर : खैर


 7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

 कळसूबाई

धुपगड

 महेंद्रगीरी

 अनैमुडी

उत्तर : धुपगड


 8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

भारत

 नेपाळ

 चीन

 म्यानमार

उत्तर : भारत


 9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

व्हेनिस

 नेपल्स

 मिलान

 तुरीन

उत्तर : व्हेनिस


 10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 श्रीलंका

 आयर्लंड

ग्रीनलंड

 ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड


 11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.


 हिमालय

अंडीज

 आल्पस

 रॉकी

उत्तर : अंडीज


 12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.

 पाचव्या

 सहाव्या

सातव्या

 आठव्या

उत्तर : सातव्या


 13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

 पोर्टब्लेयर

कंवरती

 दिल्ली

 सिल्वासा

उत्तर :कंवरती


 14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

 गुजरात

राजस्थान

 उत्तर प्रदेश

 मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान


 15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

 विंध्य

 सातपुडा

अरवली

 हिमालय

उत्तर : अरवली


 16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

 ओडिसा

 केरळ

कर्नाटक

 आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक


 17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

नर्मदा

 कृष्णा

 गोदावरी

 कावेरी

उत्तर : नर्मदा


 18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 मीटर

 रिश्टर

फॅदम

 फूट

उत्तर : फॅदम


 19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

 पंपाज

डाऊन्स

 प्रेअरी

 व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स


 20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.

 व्हेसूव्हियस

 किलीमांजारो

 काटमाई

फुजियामा

उत्तर : फुजियामा

साम्यानज्ञान प्रश्नोउत्तरे -भूगोल(भारत) (Geography)


🔹 1. मुंबर्इ बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ✅ 

राज्य मार्ग

जिल्हा मार्ग

ग्रामीण मार्ग


🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.

अरवली 

विंध्य

सहयाद्री

सातपुडा ✅


🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

पश्चिमी घाट ✅

निलगिरी पर्वत

अरवली पर्वत

सातपूडा पर्वत


🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे

श्रीहरीकोटा ✅

कोचीन

हसन

बेंगलोर


🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ✅


🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ✅

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ✅

३८०° अक्षांश


🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ✅

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ✅

ऑस्ट्रेलिया 


🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

वातावरण ✅

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:


वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते


क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”


गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले


क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""


अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


क्लुप्ती : "MIM BSP"


M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.


आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "


स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


क्लुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट


आंबा कोर -आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी


वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


क्लूप्त्या : 'गोभीकृतान '


गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा