Ads

27 September 2020

पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX): भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे नौदल यांच्यामधला संयुक्त सागरी सराव


💬 पूर्व हिंद महासागर प्रदेशात 23 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाचे रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही यांच्यामधला संयुक्त “पॅसेज एक्सरसाईज” (PASSEX) नामक सागरी सराव आयोजित करण्यात आला.


♦️ठळक बाबी....


💬 दोन्ही नौदलांच्या दरम्यान होणाऱ्या कार्यात सुसूत्रबद्धता राखणे, एकमेकांना समजून घेणे तसेच सुयोग्य पद्धतीना आत्मसात करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.


💬 सरावात भारतीय नौदलाच्या INS सह्याद्री आणि INS कर्मुक या जहाजांनी भाग घेतला होता.हा भारतीय नौदलाच्या पुढाकाराने मित्र राष्ट्रांच्या नौदलासोबत नियमितपणे आयोजित केला जाणार सराव आहे.


♦️ऑस्ट्रेलिया देश....


💬 ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे

इटालियन खुली टेनिस स्पर्धा - जोकोव्हिचला पाचवे विजेतेपद.


🏆 सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली. जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला ७-५, ६-३ असे पराभूत केले. हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.


🏆 नकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली.


🏆  मात्र या सर्व प्रकारानंतरही जोकोव्हिचला लाल मातीवरील इटालियन स्पर्धा जिंकता आली. मात्र अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला.


🏆 दसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही ‘एटीपी’ १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य: डॉ हर्ष वर्धन


👁‍🗨 कद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी 23 सप्टेंबर 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांचे सभासद, संयुक्त राष्ट्रसंघ संस्थांचे प्रमुख आणि प्रतिनिधी आणि भागीदारी संस्था यांच्याशी आभासी पद्धतीने संवाद साधला. बैठकीत त्यांनी क्षयरोगाच्या उच्चाटनाबाबत भारताच्या भूमिकेविषयी स्पष्टता दिली.


🔵 भारत सरकारचे प्रयत्न....


👁‍🗨 कषयरोग एक प्रमुख जागतिक आरोग्य समस्या आहे.भारताने 2025 सालापर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. म्हणजेच जागतिक शाश्वत ध्येयाच्या 2030 सालाच्या मुदतीपूर्वी साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.अनेक नवोन्मेष योजनांच्या माध्यमातून क्षयरोग निर्मुलनासाठी अनेक महत्त्वाचे उपाय योजिले आहेत.


👁‍🗨  नोंद नसलेल्या क्षयरोगांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. 2016 साली रुग्णांच्या एक दशलक्ष संख्येवरुन ही संख्या 2019 साली अर्ध्या दशलक्षावर आली.वर्ष 2020 मध्ये 2.4 दशलक्ष रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एक तृतीयांश नोंदी खासगी क्षेत्राच्या मदतीने केल्या गेल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्यात रॅपीड मोलेक्युलर निदान चाचणी सुविधा प्रदान केल्यामुळे 2019 साली 66,000 रुग्ण ओळखण्यास मदत झाली.


👁‍🗨 कोविड-19 महामारीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात क्षयरोग रुग्णांना घरपोच औषधी पुरविण्यात आली. तसेच सुदूर-संवाद, सक्रीय छाननी अनेक रुग्णांसाठी फलदायी ठरली.टाळेबंदीनंतर क्षयरोग रोग्यांना ओळखण्याविषयी राज्य सरकारांसाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. 


👁‍🗨 सरकारने क्षयरोग आणि कोविड रूग्णांमध्ये बाय-डिरेक्शनल तपासणी आणि ILI आणि SARI प्रकरणांमध्ये क्षयरोगाची तपासणी आरंभ करण्यात आल्या.सरकारने थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून क्षयरोग्यांना आर्थिक मदत देत आहे. एप्रिल 2018 पासून 3 दशलक्ष लाभार्थ्यांना 7.9 अब्ज रुपये एवढी रक्कम दिली गेली.


🔵क्षयरोगाविषयी....


👁‍🗨 हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला.


👁‍🗨 कषयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.

अभ्यास’ ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वी.


✅ 22 सप्‍टेंबर 2020 रोजी ‘अभ्यास’ नामक हाय-स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) म्हणजेच एका ड्रोनची उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने (DRDO) ओडिशा राज्यात ही चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन निदर्शक वाहनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


✅ विविध क्षेपणास्त्र यंत्रणेचे मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून ‘अभ्यास’चा उपयोग केला जाऊ शकतो.


🔆‘अभ्यास’ची वैशिष्ट्ये...


✅ उड्डाणासाठी यात जुळे अंडरलंग बूस्टरचा वापर करण्यात आला आहे. लहान गॅस टर्बाइन इंजिनाच्या मदतीने ते उडते.


✅ वाहनात मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कंम्प्यूटर (FCC) सोबतच MEMS आधारित इनर्शल नेव्हिगेशन सिस्टिम (INS) बसविण्यात आले आहे.


✅ वाहनाच्या उड्डाणाचे ‘प्रोग्रॅमिंग’ स्वतंत्रपणे केले जाऊ शकते. तसेच वाहनाची सर्व कार्यप्रणाली लॅपटॉपच्या मदतीने GSAवरून संचालित केली जाऊ शकते.‘अभ्यास’ची रचना आणि विकास DRDOच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट ईस्टॅब्लिशमेंट (ADE) या केंद्राने केले.

DRDO एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं.


💠 लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे.


💠 डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली.


💠 “नजीक भविष्यात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेहनत करणाऱ्या डीआरडीओच्या टीमचा भारताला अभिमान आहे” असे राजनाथ सिंह यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.


💠 आर्मड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल अहमदनगर येथे यशस्वी चाचणी केल्याचे डीआरडीने मंगळवारी जाहीर केले होते.एमबीटी अर्जुन रणगाडयावरुन डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने तीन किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूकतेने वेध घेतला.

शिवांगी सिंह ‘राफेल’च्या पहिल्या महिला फायटर पायलट.


🛫 अलीकडेच ‘राफेल’ या अत्याधुनिक फायटर विमानांचा इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश  झाला.


🛫 ‘गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे.


🛫 फलाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.

शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. 


🛫 तया दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत.त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या 17 व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे निधन.


💐ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर बसू यांचे करोना संसर्गाने गुरुवारी कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.


💐वयाची 68 वर्षे पूर्ण केल्यानंतर तीनच दिवसांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. बसू यांना 2014 साली पद्मश्री उपाधीने गौरवण्यात आले होते. 


💐‘आयएनएस अरिहंत’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या भारताच्या पहिल्या पाणबुडीसाठी अतिशय गुंतागुंतीची अणुभट्टी (रिअ‍ॅक्टर) तयार करण्याचेही ते प्रणेते होते.


💐2012 साली डॉ. बसू यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (बीएआरसी) संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली.


💐तारापूर व कलपक्कम येथील ‘न्यूक्लियर रिसायकल प्लांट’ यांचा आराखडा, बांधकाम व संचालन यामागे प्रामुख्याने त्यांचीच प्रतिभा  होती.

RAISE 2020: कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणारी आभासी शिखर परिषद


🌺सामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे – “RAISE 2020” (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.


🔰कार्यक्रमाविषयी...


🌺भारत सरकारचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.


🌺AI तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातल्या विचारवंतांची ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.


🌺इतर क्षेत्रांबरोबर आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण आणि स्मार्ट वाहतूक यासारख्या क्षेत्रात सामाजिक परिवर्तन, समावेशकता आणि सशक्तीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी अभ्यासक्रम आखणे आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी हा जागतिक मंच असणार आहे.


🌺परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, धोरण आणि नवसंशोधन विषयातले प्रतिनिधी आणि तज्ञ जगभरातून सहभागी होणार आहेत.


🌺‘महामारी सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’, ‘डिजिटलीकरणाला नवसंशोधनाची चालना’, ‘सर्वसमावेशक AI’, ‘यशस्वी नवसंशोधनासाठी  भागीदारी’ इत्यादी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.


🌺कार्यक्रमांचाच एक भाग म्हणून, ‘AI सोल्यूशन चॅलेंज’द्वारे निवडलेले  स्टार्टअप 6 ऑक्टोबर 2020 रोजी ‘AI स्टार्टअप पिच फेस्ट’ या प्रदर्शनीत सादरीकरण करणार.


🌺भारत या क्षेत्रासाठी जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी परिसंस्था आहे. उद्योग विश्लेषकांचा असा अंदाज आहे की, 2035 सालापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या अर्थव्यवस्थेत 957 अब्ज डॉलर एवढ्या उत्पन्नाची भर घालू शकते.

अक्किथम अच्युतन नंबुथिरी (मल्याळी कवि): 55 व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी.


🧩परसिद्ध मल्याळी कवि अक्किथम अच्युतन नंबुथिरी यांचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.


🅾️अक्किथम नंबुथिरी विषयी....


🧩मल्याळी साहित्यातले नामांकित व्यक्तित्व असलेले अक्किथम नंबुथिरी यांच्या नावावर 55 पुस्तके आहेत, त्यात 45 काव्यसंग्रह आहेत.


🧩93 वर्षांचे अक्किथम नंबुथिरी यांना साहित्य अकादमी, पद्मश्री, कबीर यासहित देशातले बहुतेक सारे वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ‘उन्नी नंबुद्री’ या मासिकाचे ते संस्थापक आहेत. याशिवाय, त्यांनी ‘आकाशवाणी’मध्ये दीर्घकाळ काम केले.


🧩‘योगक्षेम सभा’ आणि ‘पलियम सत्याग्रह’ या दोन संस्थांमार्फत त्यांनी अनेक दशके सामाजिक कार्ये केलीत.


🅾️जञानपीठ पुरस्काराविषयी...


🧩जञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. पुरस्कारस्वरूप प्रमाणपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लक्ष रुपयांचा धनादेश दिला जातो.


🧩22 मे 1961 रोजी रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी स्वतःच्या कौटुंबिक न्यासच्यावतीने भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ देण्याची घोषणा केली.


🧩भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.

‘पृथ्वी’ बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी.


🔰संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे.


🔰सट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


🔰या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला.पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे.


🔰“350 किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-3 मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

परशासकीय विभागाचे नाव : कोकण



🔺भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 


🔺मख्यालय : मुंबई


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : पुणे


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

🔺 मख्यालय : पुणे 

 विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर


_________________________



🔴 परशासकीय विभागाचे नाव : नाशिक


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश


🔺 मख्यालय : नाशिक


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


🔺 भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा


🔺 मख्यालय : औरंगाबाद


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद


_________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : अमरावती


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ

 

🔺 मख्यालय : अमरावती


🔺विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम


________________________


🔴 परशासकीय विभागाचे नाव : नागपूर


🔺भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 


🔺 मख्यालय : नागपूर 


🔺 विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

26 September 2020

IPL शी संबंधित हे १५ विक्रम



१) आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवण्यात अपयशी ठरलेला RCB संघ, स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या करणारा मानकरी आहे…आणि ते देखील एकदा नव्हे दोनवेळा RCB ने अशी कामगिरी करुन दाखवली आहे. २०१३ साली पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध २६३ तर २०१६ साली गुजरात संघाविरुद्ध २४८ धावा RCB ने केल्या होत्या. सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या निकषांत चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानी येतो. २०१० साली चेन्नईने राजस्थानविरोधात २४६ धावा केल्या होत्या.


२) आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात निच्चांकी धावसंख्येवर बाद होण्याचा नकोसा विक्रमही RCB च्याच नावावर जमा आहे. २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्स संघाने RCB चा संघ ४९ धावांवर गुंडाळला होता.


३) २०१७ च्या हंगामात मुंबईने दिल्लीवर केलेली १४६ धावांनी मात ही आयपीएलच्या इतिहासात धावांच्या निकषात सर्वात मोठी मात आहे. दुसऱ्या स्थानी RCB चा संघ असून तिसरं स्थान कोलकाता संघाने पटकावलं आहे.


४) आतापर्यंत ८ सामन्यांचा निकाल हा सुपरओव्हवर लागलेला असून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ ३ वेळा यात सहभागी होता. राजस्थान रॉयल्सने दोनवेळा सुपर ओव्हरवर सामना जिंकलेला आहे.


५) एका सामन्यात सर्वाधिक अवांतर धावा देण्याचा नकोसा विक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर आहे. २००८ साली डेक्कन चार्जर्सविरोधात कोलकाताच्या गोलंदाजांनी २८ अवांतर धावा दिल्या होत्या.


६) RCB चा कर्णधार विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासातला सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याच्या नावावर ५ हजार ४१२ धावा जमा आहेत. दुसऱ्या स्थानी सुरेश रैना असून त्याच्या नावावर ५ हजार ३६८ धावा जमा आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर ४ हजार ८९८ धावा जमा आहेत.


७) स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा पराक्रम हा वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ३२६ षटकार ठोकले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे एकही फलंदाज सध्या गेलच्या शर्यतीत नाहीयेत.


८) आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहेत. २०१३ पुणे संघाविरोधात केलेल्या १७५ धावा ही आयपीएलमधली सर्वोच्च धावसंख्या आहे. यंदाच्या हंगामात गेल किंग्ज इलेव्हन पंजाबचं नेतृत्व करतोय.


९) आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रमही गेलच्याच नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ६ शतकं झळकावली असून विराट कोहली ५ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.


१०) लोकेश राहुलने १४ चेंडूत झळकावलेल्या ५१ धावा हे आयपीएलमधलं सर्वात जलद अर्धशतक मानलं जातं.


११) १७० बळींसह लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. यंदा खासगी कारणामुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे.


१२) ३.४ षटकांत १२ धावा देऊन ६ बळी ही आतापर्यंत आयपीएलमधली गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या अल्झारी जोसेफने गेल्या हंगामात सनराईजर्स हैदराबादविरुद्ध ही कामगिरी केली होती.


१३) आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रीक घेण्याचा विक्रम हा दिल्लीच्या अमित मिश्राच्या नावावर आहे. अनुभवी अमित मिश्राने आतापर्यंत ३ वेळा हॅटट्रिक घेतली आहे.


१४) सर्वाधिकवेळा ४ बळी घेण्याचा विक्रम हा कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीनच्या नावावर आहे.


१५) आयपीएलमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम हा प्रवीण कुमारच्या नावावर जमा आहे. त्याने आतापर्यंत ११९ सामन्यांत १४ निर्धाव षटकं टाकली आहेत.

जगातील महत्वाच्या संघटना, त्यांचे सदस्य व मुख्यालय

 


● जागतिक व्यापार संघटना (WTO)

सदस्य - 164

मुख्यालय - जिनिव्हा (स्वित्झर्लंड)


● युरोपियन युनियन (EU)

सदस्य - 28

मुख्यालय - ब्रुसेल्स (बेल्जियम)


● ओपेक (Organization Of Petroleum Exporting Countries)

सदस्य - 13

मुख्यालय - व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)


● सार्क (South Asian Association for Regional Co-operation)

सदस्य - 8

मुख्यालय - काठमांडू (नेपाळ)


● आसियन (ASEAN)

(Association Of South East Asian Nations)

सदस्य - 10

मुख्यालय - जकार्ता (इंडोनेशिया)


● ब्रिक्स (BRICS)

सदस्य - 5

मुख्यालय - शांघाय (चीन)

संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.

 


ती पुढीलप्रमाणे


📌१.पहिले सत्र  : ९ ते २३ डिसेंबर, १९४६


📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७


📌३.तिसरे सत्र  : २८ एप्रिल ते २ मे, १९४७


📌४.चौथे सत्र : १४ ते ३१ जुलै, १९४७


📌५.पाचवे सत्र :  १४ ते ३० ऑगस्ट, १९४७


📌६.सहावे सत्र : २७ जानेवारी, १९४८ 


📌७.सातवे सत्र :  ४ नोव्हेंबर, १९४८ ते ८ जानेवारी, १९४९


📌८.आठवे सत्र  : १६ मे ते १६ जून, १९४९


📌९.नववे सत्र : ३० जुलै ते १८ सप्टेंबर, १९४९


📌 १०.दहावे सत्र :  ६ ते १७ ऑक्टोबर, १९४९.


📌११.अकरावे सत्र : १४ ते २६ नोव्हेंबर, १९४९.


(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा २४ जानेवारी, १९५० रोजी झाली, ज्या दिवशी २८४ सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या केल्या.)

क्षयरोग त्याची लक्षणे व उपचार



· हा संसर्गजन्य आजार असून तो 'मायक्रोबॅक्टेरियम' ट्युबरक्युलोसिंस' या जिवाणूमुळे होतो.

· या जिवाणूचा शोध 'सर रॉबर्ड कॉक' यांनी 24 मार्च 1882 रोजी लावला म्हणून 'कॉक्स इन्फेक्शन' असेही म्हणतात.

· जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

· क्षयरोगचा प्रसार हवेमार्फत (रुग्णाच्या खोकण्याने, शिकण्याने) होतो.

· क्षयरोगाचे जंतू मुख्यतः फुप्फुसावर परिणाम करतात म्हणून फुप्फुसाच्या क्षयरोगाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.


क्षयरोगाचे प्रकार : 


1. फुप्फुसाचा 2. इतर अवयवांचा (ग्रंथी, हाडे/सांधे, मूत्रपिंड, मेंदूआवरण, आतड्यांचा, कातडीचा इ.)


क्षयरोगाची लक्षणे :


1.    तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,

2.    हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप

3.    वजन कमी होणे

4.    थुंकीतून रक्त पडणे

5.    भूक मंदावणे इ.


क्षयरोगाचे निदान : 


लहान मुलांमधील क्षयरोग निदानासाठी 'मोन्टोक्स टेस्ट' वापरली जाते.

1.    थुंकी तपासणी (बेडका) : सर्वात खात्रीशीर, कमी खर्चाची पद्धत. संशयित रुग्णाच्या थुंकीचे तीन नमुने तपासण्यात येतात.

2.    'क्ष-किरण' तपासणी (X-Ray) : छातीचा एक्स-रे काढून करतात. वरील तपासणीपेक्षा कमी खात्रीशीर. विशिष्ट तज्ञांची आवश्यकता असते.


प्रतिबंधक लस -


0 ते 1 वर्ष बालकांना क्षयरोग प्रतिबंधक लस टोचण्यात येते. त्या लसीला 'बी.बी.सी' (बॅसिलस कॉलमेटग्युरिन) असे म्हणतात.

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 1962 साली सुरू करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक्स-रे तपासणीवर जास्त भर

होता तसेच औषधोपचाराचा कालावधी जास्त होता.(दीर्घ मुदतीचा)

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (RNTCP) सन 1992-93 मध्ये सुरू करण्यात आला.


क्षयरोग औषधोपचार :


सुधारित कार्यक्रमामध्ये क्षय रुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली चार प्रकारच्या गोळ्या तसेच 'स्ट्रेप्टोमायसीन' हे इन्जेक्शन देण्यात येते.

1. सदर औषधोपचार पद्धतीला डॉट्स (DOTS) असे म्हणतात.

2. DOTS - Directly Observed Treatment With Short Cource Cheniotherapy (प्रत्यक्ष निरीक्षणाखाली दिलेल्या अल्प मुदतीचा क्षयरोग औषधोपचार)

राष्ट्रीय आरोग्य अहवाल 2019 [National Health Profile 2019]



- केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी नुकतेच अहवालाचे प्रकाशन केले.

- 2005 पासून हा अहवाल प्रकाशित केला जातो. या वर्षीची ही 14 वी आवृत्ती आहे.

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या Central Bureau of Health Intelligence या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.

--------------------------------------------

- भारतातील आरोग्य क्षेत्रातील माहितीचे संकलन करून आरोग्य क्षेत्रात काम करत असणारे संघटना किंवा लोकांना ही माहिती उपलब्ध करून देणे हे या अहवालापाठीमागचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

- लोकसंख्या, राहणीमान, आरोग्य सुविधा इ. वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला जातो.

--------------------------------------------

● महत्त्वाच्या गोष्टी 


- मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे भारतीयांमध्ये प्रमाण जास्त आहे. 

- डेंग्यू आणि चिकनगुनिया हे सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणारे दोन मुख्य घटक आहेत. 

- जन्म दर, मृत्यू दर आणि नैसर्गिक वाढीचा दर यातील वाढ कमी झाली आहे. 

- लोकांचे आयुर्मान वाढले आहे, 49.7 वर्षावरून (1970 - 75) वाढून ते आता 68.7 वर्षे (2012 - 16) एवढे झाले आहे. 

- लोकसंख्येची सर्वाधिक घनता NCT दिल्ली (11320 चौकिमी) तर सर्वात कमी घनता अरूणाचल प्रदेशात (17 चौकिमी) आहे. 

- अर्भक मृत्यू दरात घट झाली आहे, 2016 मध्ये हा दर 1000 बालकांमागे 33 एवढा होता. आता ग्रामीण भागात हा दर 37 तर शहरी भागात 23 आहे. 

- 2017 मध्ये जन्म दर 20.2/1000, मृत्यू दर 6.3/1000 तर नैसर्गिक लोकसंख्या वाढीचा दर 13.9/1000 एवढा होता.

- सध्या भारतात 14 वर्षाच्या आतील 27% लोक, 15 ते 59 या वयोगटात 64.7% लोक तर 8.5% लोक हे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. 

- भारताचा एकूण उत्पादन दर 2.3% आहे, हाच दर ग्रामीण भागात 2.5% तर शहरी भागात 1.8% आहे. 

---------------------------------------

● महाराष्ट्राची स्थिती 


- राज्यातील संसर्गजन्य रूग्णांची संख्या 58,53,915 एवढी आहे, यामध्ये मधुमेह (155628), उच्च रक्तदाब (250875), उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही (97651) तर 16880 लोकांना ह्रद्य आणि रक्तवाहिन्यांचे विकार आहेत. 

- राज्यातील 14103 लोकांना तोंडाचा, गर्भाशय मुखाचा तसेच स्तनांचा कॅन्सर आहे.

- 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील 54% बालकांत रक्ताक्षयाचे प्रमाण आढळते तर महिलांमध्ये हे प्रमाण 48% एवढे आहे. 

- राज्यातील 49.3% गरोदर महिलांना रक्ताक्षय (अॅनेमिया) आहे. 

- 15 ते 49 या वयोगटातील 47.9% महिला अॅनेमिया ग्रस्त आहेत.

हयुमन कॅपिटल इंडेक्स २०२०


जागतिक बँकेच्या मानव भांडवलाच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक ११6 आहे. 


🎓ह्युमन कॅपिटल इंडेक्स २०२०  च्या अद्ययावतमध्ये मार्च २०२० पर्यंतच्या १७४ देशांमधील आरोग्य आणि शैक्षणिक डेटाचा समावेश होता. 


🎓जगातील जवळपास 98% लोकसंख्या यात समाविष्ट आहे. जागतिक बँकेच्या मानव भांडवलाच्या निर्देशांकात भारताचा क्रमांक ११6 आहे. 


🎓जागतिक बँकेच्या वार्षिक मानवी भांडवल निर्देशांक २०२० च्या ताज्या आवृत्तीत भारताचे ११6 वे स्थान आहे. गेल्या वर्षी 157 देशांपैकी भारत 115 व्या स्थानावर आहे.


🎓 विश्लेषणाने असे सिद्ध केले की पूर्व-साथीचा रोग, बहुतेक देशांनी मुलांची मानवी भांडवल तयार करण्यात स्थिर प्रगती केली. हे देखील नमूद केले आहे की सर्वात कमी प्रगती कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये झाली.


🎓 निर्देशांकात असेही नमूद करण्यात आले आहे की रेमिटन्समध्ये मोठी घसरण झाली असून एकूण उत्पन्न 11 किंवा 12% ने कमी होत आहे.


नाफ्टा (NAFTA)

🌻पार्श्वभूमी : उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार (North American Free Trade Agreement) असा त्याचा पूर्णरूप होतो. हा करार कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या तिघांमध्ये झाला. हा जगातील सर्वांत मोठा करार मानला जातो. 


🌻या करारातील तीन सभासदीय देशांचे एकूण देशांतर्गत उत्पादन २० ट्रिलियन डॉलर्स (२० लक्ष कोटी रुपये) पेक्षाही जास्त होते. नाफ्टाअंतर्गत प्रथमच दोन विकसित देशांनी जागतिक बाजारपेठेतील मेक्सिको या उदयोन्मुख देशाबरोबर करार केला.


🌻 या तिघांनी आपापसातील व्यापारामधील अडथळे दूर करण्याचे निर्णय घेतले. उत्पादनावरील ज्या करांमुळे परदेशी वस्तू महाग होत असत, ते कर हळूहळू रद्द करण्यात आले. या कराराची व्याप्ती ही आठ विभाग आणि २२ अध्यांयासहित २००० पाने एवढी मोठी आहे.



🌻रचना आणि कार्यपद्धती : साधारणपणे तीस वर्षांपेक्षाही आधीच्या काळात अमेरिकेने कॅनडाबरोबर द्विपक्षीय व्यापारसंबंधात वाटाघाटी सुरू केल्या. जिच्या परिणामस्वरूप अमेरिका आणि कॅनडा यांमध्ये मुक्त व्यापार करार केला गेला. 


🌻तो १ जानेवारी १९८९ मध्ये अमलात आणला गेला. १९९१ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोबरोबर वाटाघाटी सुरू केल्या. त्यात कॅनडानेही सहभाग घेतला. १ जानेवारी १९९४ मध्ये नाफ्टा करार अमलात आणला गेला.


🌻नाफ्टा कराराचे अनेक फायदे आणि तोटे निदर्शनास आले. पहिला तोटा म्हणजे, अमेरिकेमध्ये होणारी बरीचशी उत्पादने कमीखर्चीक मेक्सिकोकडे देण्यात आली. दुसरा म्हणजे, ज्या कामगारांनी या औद्योगिक क्षेत्रात आपली नोकरी कायम ठेवण्याचे ठरविले, त्यांना कमी वेतनावर काम स्वीकारावे लागले. आणि तिसरा म्हणजे, ‘म्याकिलाडोरा प्रोग्रॅम’द्वारे कामगारांचे शोषण घडले. ‘म्याकिलाडोरा’ ही मेक्सिकोमधील एक परदेशी कंपनी आहे.


🌻 ती करमुक्त कराराचा फायदा घेत कच्चा माल आणि उपकरणे उत्पादनप्रकियेसाठी निर्यात करत असे आणि उत्पादित माल परत कच्चा माल पुरविणाऱ्या देशांकडून आयात करत असे. या कंपनीने नफा कमाविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि कामगारांचे शोषणसुद्धा केले. ही पद्धत (प्रोग्रॅम) सामाजिक आणि कायद्याच्या दृष्टीने स्वीकारार्ह नव्हती.


🌻या कराराचे फायदे नमूद करायचे झाले, तर एक म्हणजे, मेक्सिकोमधून करमुक्त किराणा मालाच्या आयातीमुळे अमेरिकेतील किराणा मालाच्या किमती मर्यादित राहिल्या.


🌻 तयाचप्रमाणे मेक्सिको आणि कॅनडा येथून खनिज तेलाच्या आयातीमुळे पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती मर्यादित राहिल्या आणि त्यामुळे या तिन्ही देशांची व्यापार आणि आर्थिक वृद्धी झाली.


🌻नाफ्टामुळे तिन्ही सभासद देशांना ‘मोस्ट फेव्हर्ड नेशन’ (MFN)चा दर्जा मिळाला. याअंतर्गत या तिन्ही देशांना सर्व बाबतींत समान वागणूक ठेवणे (ज्यात थेट परकीय गुंतवणुकीचाही समावेश होता) अनिवार्य होते. 


🌻तयामुळे या तिन्ही देशांना देशांतर्गत भांडवलदारांना एक व परदेशी भांडवलदारांना वेगळी अशी वागणूक देता येत नव्हती. त्याचप्रमाणे या करारांतर्गत नसलेल्या देशांबरोबर वेगळ्या प्रकारचा किंवा फायदेशीर सौदा करता येत नव्हता.


🌻नाफ्टाच्या तिन्ही देशांतील व्यवसायांना सरकारी कंत्राटे दिली जात असत. नाफ्टाअंतर्गत निर्यातीवरील करात सवलत मिळविण्यासाठी त्या मालाचे उत्पादन या तीन देशांत केले गेले असण्याची खात्री देण्यासाठी निर्यातदाराला ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन’ देणे बंधनकारक होते. म्हणजे मेक्सिकोमधून कॅनडा किंवा अमेरिकेत माल निर्यात करण्यात येत असेल;


🌻 पण त्याचे उत्पादन जर पेरूमध्ये झाले असेल, तर मात्र निर्यातकर बंधनकारक असे. नाफ्टा करारानुसार असलेल्या निर्यातकराच्या सवलतीचा लाभ अशा वेळेस दिला जात नसे.


🌻नाफ्टाद्वारे जरी प्रत्येकाच्या एकस्व (Patent), प्रताधिकार (Copyright) किंवा व्यापार चिन्ह (Trade Mark) यांची कदर केली जात असली, तरी बौद्धिक उत्पादनाच्या हक्कांमध्ये मात्र व्यापारी हस्तक्षेप केला जात नसे.


🌻 नाफ्टा करारामध्ये आणखी दोन करारांची भर घातली गेली. एक म्हणजे, पर्यावरण कायद्याच्या समर्थनार्थ पर्यावरण सहकार्याबाबतचा उत्तर अमेरिकी करार आणि दुसरा म्हणजे, कार्यकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला मजदूर संघटनेबाबतचा उत्तर अमेरिकी करार.


🌻नाफ्टाच्या ५२ व्या कलमानुसार उद्योगधंद्यांचा अयोग्य प्रथांपासून बचाव आणि व्यापारातील आपापसांतील मतभेद मिटविण्याच्या काही कार्यपद्धती नमूद केल्या आहेत. दोन गटांतील काही अनौपचारिक ठराव सुलभ करण्यासाठी नाफ्टाच्या सचिवस्तरावर प्रयत्न केले जात असत.


🌻 पण जर हे अमलात आले नाही, तर त्यापुढे जाऊन स्थानिक कोर्टकचेऱ्यांचा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने दोन गटांतील मतभेदांवर विचारविनिमय करण्यासाठी एक ‘गट’ (Pannel) प्रस्थापित केले जात असे. हे गट नाफ्टाच्या जटिल कायदे आणि कार्यपद्धतीचा योग्य तो अर्थ लावण्यास मदत करत असे. व्यापार मतभेदांबाबतचे हे कायदे भांडवलदारांनासुद्धा लागू असत.

जी—२० (G-20)

🌷आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या २० देशांची आणि त्या देशांच्या केंद्रिय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना. 


🌷जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी औद्योगिक दृष्ट्या प्रगत आणि विकसनशील देशांना एकत्र आणण्याच्या हेतूने १९९९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.


🌷 या २० देशांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे अर्थमंत्री आणि त्या देशांच्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांची या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वर्षातून एकदा बैठक होते.



🌷जी–२० संघटनेत १९ देश आणि युरोपियन युनियनचा समावेश होतो. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, टर्की, ब्रिटन आणि अमेरिका हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. 


🌷जगाच्या एकूण उत्पादनाच्या ८५ टक्के उत्पादन जी–२० देशांकडून होते. जगाच्या एकूण व्यापाराच्या ८० टक्के व्यापार या देशांकडून केला जातो आणि जगाच्या एकूण लोकसंख्येच्या दोनतृतीयांश लोकसंख्या या देशांत आढळते.


🌷रचना आणि कार्य : जी–२० संघटनेतील देशांची वर्षातून एकदा बैठक होते. या संघटनेचे कायमस्वरूपी कार्यालय नाही. सदस्यदेशांची पाच क्षेत्रीय गटांत विभागणी करण्यात आली असून एका गटात चार देशांचा समावेश करण्यात आला आहे.


🌷 दरवर्षी एका गटातील सदस्यदेशाकडे संघटनेचे अध्यक्षपद असते. ते आळीपाळीने बदलते. संघटनेच्या आजी, माजी आणि भावी अध्यक्षांचा एक व्यवस्थापकीय गट तयार करण्यात आला असून त्याला ‘ट्रॉइका’ म्हणतात. 


🌷विद्यमान अध्यक्ष हा या गटाचा सदस्य असतो. विद्यमान अध्यक्ष त्याच्या कार्यकाळापुरते या संघटनेचे सचिवालय स्थापन करतो. या सचिवालयामार्फत संघटनेचे काम चालते. या सचिवालयामार्फतच विविध बैठकांचे आयोजन केले जाते. 


🌷या ट्रॉइकामुळे संघटनेच्या कामात आणि व्यवस्थापनात सातत्य राहते. संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय सुरू करण्याविषयी सध्या चर्चा चालू आहे. संघटनेच्या शिखर परिषदेची विषयपत्रिका दरवर्षी वेगळी असते आणि बहुतेक विषय जागतिक आर्थिक घडामोडींशी संबंधित असतात. 


🌷या घडामोडींच्या संदर्भात कुठल्याही निर्णयांची वा नियमांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार या संघटनेला नसला, तरी बलशाली सदस्यदेशांमुळे ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेला दिशा मात्र नक्की देऊ शकते. संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेला सदस्यदेशांव्यतिरिक्त १२ कायम निमंत्रित देश आणि अन्य ३० देशांना निमंत्रित केले जाते.


🌷मल्यमापन : जी–२० संघटनेच्या कार्याच्या संदर्भात अनेक मतभेद असून बरीच टीकाही झाली आहे. ही संघटना स्वयंघोषित आहे आणि ती जगातल्या प्रबळ अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या २० देशांचे प्रतिनिधित्व करत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संघटनेच्या वैधतेलाच अनेकांनी आव्हान दिले आहे. 


🌷दरवर्षी संघटनेच्या शिखर परिषदेच्या वेळी विविध संघटनांतर्फे निदर्शने केली जातात आणि परिषदेच्या आयोजनात अडथळे आणले जातात. अशा स्वरूपाच्या संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाची एक संलग्न संस्था या नात्याने काम केले पाहिजे, असे मत अनेक विचारवंतांनी व्यक्त केले आहे. निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे अधिकारही या संघटनेला असावेत, असे या विचारवंतांना वाटते. 


🌷आर्थिक दृष्ट्या पहिल्या २० क्रमांकांत असलेल्या पोलंड, स्पेन, सिंगापूर यांसारख्या देशांनी या संघटनेचे सदस्य नसलेल्या जगातल्या इतर १७३ देशांचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे निर्णय धुडकावले आहेत. 


🌷सिंगापूरने जागतिक प्रशासकीय गट (ग्लोबल गव्हर्नन्स ग्रुप) या नावाने एक गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. जी–२० संघटनेचे सदस्य नसलेले २८ छोटे देश या गटाचे सदस्य आहेत. 


🌷जी–२० संघटनेपुढे आपले म्हणणे प्रभावीपणे मांडणे, हा या गटाचा मुख्य उद्देश आहे.  अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सदस्यत्वालाही या देशांनी आक्षेप घेतला आहे. 


🌷सघटनेचे उद्दिष्ट निश्चित नाही आणि शिखर बैठका बंद दाराआड होतात, त्यामुळे संघटनेची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे अनेकांना वाटते.

जम्मू काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक 2020


√ मंगळवारी लोकसभेत जम्मू - काश्मीर अधिकृत भाषा (संशोधन) विधेयक मंजूर करण्यात आल. 


√ काश्मिरी, डोगरी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या जम्मू - काश्मीरच्या अधिकृत भाषा असतील.

  

√ लोकसभेत हे विधेयक गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सादर केलं. 


√ जम्मू काश्मीरमध्ये उर्दू बोलणारे केवळ ०.१६ टक्के लोक आहेत, ७० वर्षांपासून हीच इथली अधिकृत भाषा बनली होती.


√ जम्मू काश्मीरमध्ये ५३.२६ टक्के लोक काश्मिरी भाषा बोलतात.


√ २६.६४ टक्के लोक डोगरी भाषेत संवाद साधतात.


√ २.३६ टक्के लोक हिंदी बोलतात, असंही रेड्डी यांनी संसदेत म्हटलं.

तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार

 तामिळनाडूमध्ये भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार


तामिळनाडू राज्याच्या थाटी जिल्ह्यात बोडी वेस्ट हिल्सच्या परिसरात भारतातली न्यूट्रिनो वेधशाळा उभारली जाणार आहे.


ठळक बाबी


तिथे पृथ्वीच्या वातावरणात तयार होणाऱ्या न्यूट्रिनो कणांचे निरीक्षण केले जाणार. त्याद्वारे न्यूट्रिनो कणांच्या गुणधर्मांबद्दल अधिक माहिती गोळा केली जाणार.


‘न्यूट्रिनो डिटेक्टर’ हे एक ‘मॅग्नेटाईज्ड आयर्न कॅलोरीमीटर’ उपकरण असते. कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक वजनी उपकरण तयार केले जाणार आहे.


वेधशाळा जमिनीच्या खाली तयार केली जाणार आहे.प्रकल्पाला अणुऊर्जा विभाग आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग वित्तपूरवठा करणार आहेत.


न्यूट्रिनो म्हणजे काय?


न्यूट्रिनो हे ब्रह्मांड तयार करणारे आकाराने सर्वात छोटे कण असतात. न्यूट्रिनो नावाप्रमाणेच विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात आणि त्याचे वस्तुमान इतर कोणत्याही ज्ञात कणांपेक्षा शून्यसमान अगदीच कमी असते.


सूर्य आणि पृथ्वीचे वातावरण ही न्यूट्रिनो कणांचे मुख्य स्रोत आहेत.


न्यूट्रिनो वेधशाळा कॅनडा, जापान आणि इटली या देशांमध्ये जमिनीखाली तर अंटार्क्टिका व फ्रान्स या देशांमध्ये समुद्राखाली आहेत.

‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्रासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले



👉परथमच, ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भारतातल्या आठ सागरी किनाऱ्यांचे नामांकन देण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत -


👉शिवराजपूर (गुजरात), घोघला (दमण व दीव), कासारकोड आणि पादुबिद्री (कर्नाटक), कप्पड (केरळ), ऋषिकोंडा (आंध्रप्रदेश), गोल्डन बीच (ओडिशा) आणि राधानगर (अंदमान व निकोबार)


ठळक बाबी


👉दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा तिसरा शनिवार हा ‘आंतरराष्ट्रीय तटिय स्वच्छता दिन’ साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 19 सप्टेंबर 2020 रोजी साजरा करण्यात आला आहे. 


👉या दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली.


👉‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्या आठ किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार.


"BEAMS" (सागरी किनारा पर्यावरण व सौंदर्यिकरण व्यवस्थापन सेवा)


👉हा भारत सरकारचा स्वतःचा कार्यक्रम आहे, ज्याच्याअंतर्गत स्वच्छ किनाऱ्यांना राष्ट्रीय प्रमाणपत्र बहाल केले जातात.


👉 किनारी प्रदेशात शाश्वत विकासासाठी असलेल्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी SICOM आणि पर्यावरण मंत्रालयाने ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) प्रकल्पाच्या अंतर्गत BEAM कार्यक्रम राबवत आहे.


👉 तटीय व्यवस्थापनाद्वारे किनारी आणि सागरी पर्यावरण तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मंत्रालयाने संवादात्मक ICZM (एकात्मिक किनारी क्षेत्र व्यवस्थापन) उपक्रम राबवत आहे.


👉 ICZMची संकल्पना 1992 साली रिओ दे जनेरो येथे झालेल्या पृथ्वी शिखर परिषदेत मांडली गेली होती.


‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र


🌷हा पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सागरी किनारा, सागरी परिसंस्था किंवा शाश्वत बोटिंग टूरिझम कार्यवाहक यांना बहाल केला जाऊ शकणारा सन्मान आहे. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो.

Online test series

घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा 

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई 

24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर

महाराष्ट्र पोलीस दल विशेष



🅾️ महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?


👉अनिल देशमुख


🅾️ पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?


👉गहमंत्रालय


🅾️ पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? 


👉राज्यसूची


🅾️ राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?


👉  दक्षता


🅾️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?


👉तलंगणा


🅾️ सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?


 👉हदराबाद


🅾️ महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?


👉सबोध जयस्वाल


🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?  


👉सदरक्षणाय खलनिग्रहणाय


🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?


👉पोलीस महासंचालक



🅾️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?


👉 मबई


🅾️ सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?


👉सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?


👉पचकोणी तारा


🅾️ पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?


👉21 ऑक्टोबर 


🅾️ सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?


 👉सट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🅾️ महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?


👉पणे 


🅾️ पोलीस दलातील शेवटचे पद कोणते? 


👉शिपाई


🅾️ महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?


👉काटोल, जि. नागपूर


🅾️ महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?


 👉हाताचा पंजा_ 


🅾️ जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? 


👉पोलीस अधीक्षक


🅾️ महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?


👉गडद निळा 


🅾️ शरी. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?


👉42 वे


🅾️ मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?


👉परमबिरसिंह


🅾️ राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?


👉राज्यशासन


🅾️ पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?


 👉 महानिरीक्षक


🅾️ FIR चा फुल फॉर्म काय ?


👉first information report


🅾️ महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत? 


👉दवेन भारती


🅾️ गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?


👉गहरक्षक दल , तुरुंग


🅾️ महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?


👉पणे


🅾️  भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?


👉कपी-बोट


🅾️ राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?


👉1948


🅾️ भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?


👉जनरल बिपिन रावत_


🅾️ दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? 


👉राजनाथ सिंह