२५ मे २०२५

राज्यसेवा परीक्षा नियोजनअभ्यासासाठी टिप्स-

-- जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे

-- दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये

-- मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका

-- तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका

-- जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा

-- परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका

-- या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा

-- या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका

--CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत

-- उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा

-- बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.

-- सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते 70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.

-- इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.

-- चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2023 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा

-- भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल  व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा

-- राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कम कुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.

-- जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी 
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.

-- लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका

--- आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.

-- फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2023 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद -- यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

राज्यसेवा पूर्व परीक्षा : विस्तृत अभ्यासक्रम

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) असे 2 पेपर असतात. त्यांचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरूपात पाहुयात.

पेपर 1 : सामान्य अध्ययन ( गुण: 200, वेळ : 2 तास )

▪️ इतिहास : यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन तसेच आधुनिक इतिहासाची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच भारताच्या इतिहासाबरोबरच महाराष्ट्राचा प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास अवगत असणे गरजेचे आहे.

▪️ भगोल : भारत आणि महाराष्ट्राच्या भूगोलाबरोबरच जगाच्या भूगोलाचा अभ्यास. त्यातही प्राकृतिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर, लोकसंख्या इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहे.

▪️ भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया : यात राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि नागरिकांचे हक्क इ. मुद्दे, भारतीय तसेच महाराष्ट्राच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करावा लागणार आहे.

▪️ आर्थिक आणि सामाजिक विकास : शाश्वत विकास, दारिद्रय़, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, समावेशक विकास इ. मुद्दे यामध्ये आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भातही हा घटक अभ्यासावा लागणार.

▪️ पर्यावरण : पर्यावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यासंबंधी सर्वसाधारण मुद्दे

▪️ सामान्य विज्ञान : सामान्य विज्ञानासाठी आठवी ते बारावी विज्ञानाची पुस्तके वाचावीत.

👉 पपर 2 :  नागरी सेवा कल चाचणी (सी-सॅट) ( गुण: 200, वेळ: 2 तास )

▪️ इटरपर्सनल स्किल्स : सरकारमध्ये उच्चपदावर काम करताना अनेक व्यक्ती , संस्था , राजकारणी , अधिकारी , कर्मचारी इत्यादींशी नेहमी संपर्क येत असतो. त्यामुळे इंटरपर्सनल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्सविषयी माहिती असणे आवश्यक असते

▪️ तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा / पृथ:करण क्षमता : तर्कशुद्ध विचार किंवा युक्तिवाद तसेच एखाद्या गोष्टींची मीमांसा व अनुमान काढण्याची क्षमता यामध्ये तपासली जाते.

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल : प्रशासकीय अधिकारी म्हणून योग्य निर्णयक्षमता तसेच विविध प्रश्नांना हाताळण्याची क्षमता या घटकांमधून पडताळली जाते.

▪️ सामान्य बुद्धिमापन क्षमता : यामध्ये काळ, काम, वेग, गुणोत्तर, कोडिंग, डिकोडिंग, प्रोबॅबिलिटी, घड्याळ, कॅलेंडर, दिशा आदींवर आधारित प्रश्न असतात.

▪️ बसिक न्यूमरसी, डेटा इंटरप्रिटेशन : यामध्ये आकड्यांमधील संबंध ओळखून क्रम किंवा रिक्त स्थानं भरणं, लसावि / मसाविवर आधारित प्रश्न, सरासरी, वयांचे गुणोत्तर नफा-तोटा, क्षेत्रफळ, आकारमान, प्रोबॅबिलिटी, आकृती, ग्राफ, टेबल्स यांवर आधारित प्रश्न असतात.

▪️ इग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता : उताऱ्यावर प्रश्न, पॅराग्राफ उलटेसुलटे करुन त्याची संगती लावणं, वाक्यरचना ओळखणं, योग्य शब्दाची निवड करणं, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द लिहीणं अशा अनेक गोष्टी त्यात येतात.

पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा

🌀 रामसर परिषद = 1971रामसर-इराण 

 👉खारफुटीचे  संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975


🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी 

👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली


🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा

👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989


🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड

👉 घातक कचरा संबंधी. Effective1992


🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ

👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993


🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान

👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005


🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड

👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004


🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा 

👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003


🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन

👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004


🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान

👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017

 

🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स

👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016

भारतातील जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन विषयक कायदे व नियम

1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन -: 1974

2) पर्यावरण संरक्षण अर्धीनियम -: 1986

3)हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम -: 1981

4) जैवविविधता अध्धीनियम -: 2002

5)भारतीय वन कायदा -: 1927

6.)वन संवर्धन अधिनियम :- 1980

7)आदिवासी जमाती आणि इत वनरहिवासी अधिनियम -: 2006

8.)वन्य जीवन संरक्षण अधिनियम - :1972

9.) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम -: 1991

10) राष्ट्रीय पर्यांवरण अपील प्राधिकरण अधिनियम -: 1997

11) राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम -: 2010

12) आयात आणि निर्यात नियंत्रण अधिनियम -: 1947

13) खनन आणि खनिज द्रव्य विकास अधिनियम -: 1957

14) सीमाशुल्क अधिनियम -: 1962

15 ) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम -: 2000

16) पर्यावरण स्नैही उत्पादनावरून खून पट्टी कायदा -: 1991

17) जैविक कचरा नियोजन -: 1998

18) पुन्हा वापरण्यासाठी प्लैस्टिकचे उत्पादन व वापर नियम -: 1999

२४ मे २०२५

महत्त्वाचे संमेलन आणि परिषदा २०२४


Group C Imp.

IIFA पुरस्कार २०२५: जयपूर

पहिली जॉइंट कमांडर्स परिषद लखनौ

१९ वी पूर्व आशिया शिखर परिषद :- लाओस

INDUS-X समिट २०२४ कॅलिफोर्निया

२७ वी राष्ट्रीय परिषद ई-गव्हर्नन्स-२०२४ :- मुंबई

पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवः नवी दिल्ली

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :- दिल्ली

ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट-२०२४: हैदराबाद

अखिल भारतीय राजभाषा परिषद २०२४ :- नवी दिल्ली

इंटरनॅशनल मिथेनॉल सेमिनार आणि एक्स्पो २०२४ :- दिल्ली

क्वाड लीडर्स समिट २०२४ अमेरिका, QUAD समिट २०२५ :- भारत

QUAD परिषद २०२४ : अमेरिका

९ वा रायसीना डायलॉग २०२४ नवी दिल्ली

NATO शिखर संम्मेलन २०२४: अमेरिका

५० वी G७ समिती २०२४- इटली

AI फॉर गुड ग्लोबल समिट २०२४: स्वित्झर्लंड

G२० कृषि मंत्रिस्तरीय बैठक २०२४ कुइआबा (ब्राजील)

२६ वी विश्व ऊर्जा काँग्रेस गोलमेज परिषद २०२४: नेदरलँड

ग्लोबल इंडिया AI समिट २०२४: नवी दिल्ली भारत

७७ वी जागतिक आरोग्य सभा २०२४: जीनेव्हा (स्वित्झर्लंड)

७ वी हिंद महासागर परिषद २०२४: पर्थ (ऑस्ट्रेलिया)

पाहिले विश्व ऑडियो विजुअल आणि मनोरंजन शिखर परिषद २०२४ गोवा (भारत)

३rd व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ परिषद २०२४: भारत

जागतिक हाइड्रोजन शिखर सम्मेलन २०२४: नेदरलँड

४ थे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन स्टार्टअप फोरम २०२४ : नवी दिल्ली

जागतिक सरकार शिखर परिषद २०२४: UAE

४६ वी जागतिक वारसा समितीची बैठक २०२४: नवी दिल्ली भारत (पहिल्यांदा)

२४ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन २०२४: अस्ताना कझाकिस्तान

२३ मे २०२५

23 मे टाॅप महत्त्वपूर्ण चालु घडामोडी


(Q१) खालीलपैकी कोणत्या भारतीय लेखिकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) बानू मुस्ताक

(B) डेझी रॉकवेल

(C) दीपा भास्ती

(D) अनुराधा पाटील

Ans-(A) बानू मुस्ताक


(Q२) बानू मुस्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

(A) रेड कॅम्प

(B) ट्रेन टू पाकिस्तान

(C) हार्ट लॅम्प

(D) The God of small things

Ans-(C) हार्ट लॅम्प                  

                                                                                                                                                                             (Q३) हार्ट लॅम्प हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळणारे कोणत्या भाषेतील पहिलेच पुस्तक आहे?

(A) मराठी

(B) कन्नड

(C) बंगाली

(D) तेलगू

Ans-(B) कन्नड


(Q४) कोणत्या राज्यात कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI अँप चे लोकार्पण करण्यात आले आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) गोवा

(D) महाराष्ट्रमुंबईत नोकऱ्या

Ans-(D) महाराष्ट्र


(Q५) भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी कोणते ॲप लाँच केले आहे?

(A) My train

(B) उमंग

(C) स्वरेल

(D) स्वदेश

Ans-(C) स्वरेल            

                                                                                                                                                                                       (Q६) भारताने चहा निर्यातीत जागतिक क्रमवारी कितवे स्थान मिळवले आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(B) ३


(Q७) जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २२ मे

(B) २३ मे

(C) २० मे

(D) २१ मे

Ans-(A) २२ मे


(Q८) जागतिक जैवविविधता दिन २०२५ ची थीम काय आहे?

(A) Save The Nature

(B) निसर्ग आणि उद्योग

(C) निसर्ग आणि जागतिक तापमान

(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास

Ans-(D) निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास


(Q९) कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) जपान

(D) जर्मनी

Ans-(B) अमेरिका


(Q१०) सर्वोच्च न्यायालयाने राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा केला आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

१७ मे २०२५

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.

- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.

- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.

- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.

- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले 

- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले. 

- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले. 

- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.

- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.

- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.

- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले


अॅनी बेझंट यांची होमरुल लीग

(स्थापना सप्टेंबर १९१६)

> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,
उत्तर व दक्षिण भारत.

> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.

कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.

> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून
द्यायचे.
> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.
> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -

मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.

> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका
भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.

बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.
> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे


1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 



1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी 



1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष 



1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष



1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष



1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले. 



1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले. 



1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला. 



1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली. 



1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला. 



1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला. 



1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.



1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला. 



1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 



1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले. 



1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 



1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा. 



1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

०२ मे २०२५

टॉप १० चालू घडामोडी 2 मे 2025


१. 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?
अ) १५ ऑगस्ट
ब) २६ जानेवारी
क) १ मे
ड) ५ जून
उत्तर: क) १ मे
स्पष्टीकरण: १ मे १९६० रोजी मुंबई राज्यापासून वेगळे होऊन महाराष्ट्र स्थापना झाली.

२. भारताने अलीकडेच कोणत्या देशाकडून २६ राफेल सागरी विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे?
अ) रशिया
ब) फ्रान्स
क) अमेरिका
ड) इस्रायल
उत्तर: ब) फ्रान्स
स्पष्टीकरण: फ्रान्ससोबतचा हा संरक्षण करार नौदलाची ताकद वाढवण्यासाठी करण्यात आला आहे.

३. २०२५ च्या आशियाई योगासन चॅम्पियनशिपमध्ये कोणी अव्वल स्थान पटकावले?
अ) जपान
ब) भारत
क) नेपाळ
ड) थायलंड
उत्तर: ब) भारत
स्पष्टीकरण: योगामध्ये पारंपारिक श्रेष्ठता दाखवून भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

४. 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' साजरा करण्याचा उद्देश काय आहे?
अ) क्रीडा दिन साजरा करा
ब) कामगारांचे हक्क ओळखा
क) पर्यावरणाचे रक्षण करा
ड) विज्ञानाचा सन्मान करा
उत्तर: ब) कामगारांचे हक्क ओळखणे
स्पष्टीकरण: कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

५. २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान उष्णतेच्या लाटेत राजस्थानमधील कोणते शहर सर्वात उष्ण होते?
अ) जयपूर
ब) उदयपूर
क) बारमेर
ड) जोधपूर
उत्तर: क) बारमेर
स्पष्टीकरण: बाडमेरमधील तापमान ४६.४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले.

६. अलीकडेच फिजीचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणाला देण्यात आला?
अ) मधुसूदन साई
b) नरेंद्र मोदी
क) अजय बंगा
ड) सतीश धवन
उत्तर: अ) मधुसूदन साई
स्पष्टीकरण: सेवा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला.

७. 'महुआदानर लांडगा अभयारण्य' कुठे आहे?
अ) बिहार
ब) झारखंड
क) ओडिशा
ड) आसाम
उत्तर: ब) झारखंड
स्पष्टीकरण: लांडग्यांच्या संवर्धनासाठी हे भारतातील एकमेव संरक्षित ठिकाण आहे.

८. रिअल माद्रिदने अलीकडे कोणती स्पर्धा जिंकली?
अ) युईएफए कप
ब) कोपा डेल रे
क) ला लीगा
चॅम्पियन्स लीग
उत्तर: ब) कोपा डेल रे
स्पष्टीकरण: रिअल माद्रिदने स्पेनची प्रतिष्ठित कप स्पर्धा जिंकली.

९. 'कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन' कधी साजरा केला जातो?
अ) १ मे
ब) ३० एप्रिल
क) २८ एप्रिल
ड) ५ मे
उत्तर: क) २८ एप्रिल
स्पष्टीकरण: कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयएलओ द्वारे हा दिवस साजरा केला जातो.

१०. एटीएम व्यवहारांसाठी नवीन मर्यादा आणि शुल्क कोणती संस्था ठरवते?
एसबीआय
ब) अर्थ मंत्रालय
क) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
ड) धोरण आयोग
उत्तर: c) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
स्पष्टीकरण: एटीएमशी संबंधित धोरणे आणि शुल्क आरबीआयद्वारे नियंत्रित केले जातात.

चालू घडामोडी प्रश्नसंच

प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

👉 उत्तर - देवेन भारती

प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ?

👉 उत्तर - नर्मदेश्वर तिवारी

प्रश्न.3) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

👉 उत्तर - आलोक जोशी

प्रश्न.4) कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालय मध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे ?

👉 उत्तर - सिंधुदुर्ग

प्रश्न.5) कोणत्या राज्यातील अमलसाडी चिकू ला GI टॅग प्राप्त झाला आहे ?

👉 उत्तर - गुजरात

प्रश्न.6) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने पदकतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे ?

👉 उत्तर - पहिला 

प्रश्न.7) SIPRI रिपोर्ट नुसार भारत २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे ?

 👉 उत्तर - क्रमांक 5 

प्रश्न.8) SIPRI रिपोर्ट नुसार २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

👉 उत्तर - अमेरीका 

प्रश्न.9) हार्वर्ड च्या AI फॉर Good Hackathon मध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्ट ने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे ?

👉 उत्तर - मेघा प्रोजेक्ट

प्रश्न.10) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे ?

👉 उत्तर - दुसऱ्या


२९ एप्रिल २०२५

28 एप्रिल TOP १० चालू घडामोडी MCQ


१. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची व्यापार तूट कोणत्या देशासोबत वाढली आहे?
अ. अमेरिका
B. फ्रान्स
सी. चीन
D. रशिया
उत्तर: C. चीन

२. 'जागतिक पशुवैद्यकीय दिन' कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला?
अ. २३ एप्रिल
ब. २४ एप्रिल
क. २५ एप्रिल
D. २६ एप्रिल
उत्तर: दि. २६ एप्रिल

३. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत?
ए. आकाश अंबानी
बी. नीता अंबानी
सी. अनिल अंबानी
डी. मुकेश अंबानी
उत्तर: ए. आकाश अंबानी

४. भारतातील अणुऊर्जा क्षेत्रात परदेशी कंपन्यांना किती टक्के हिस्सा परवानगी आहे?
अ.२५%
बी.३७%
सी.४९%
डी.५१%
उत्तर: क. ४९%

५. २०२५ च्या आशियाई क्रमवारीत कोणते भारतीय विद्यापीठ अव्वल स्थानावर होते?
ए.आयआयटी
बी.आयआयएससी
सी. अण्णा विद्यापीठ
डी. बनारस हिंदू विद्यापीठ / बनारस हिंदू विद्यापीठ
उत्तर: बी.आयआयएससी

६. अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान अणु चर्चेची दुसरी फेरी इटलीमध्ये झाली?
अ. इराण
ब. सुदान
सी. चीन
D. म्यानमार
उत्तर: अ. इराण

७. भारताचे १०७ वे राष्ट्रीय उद्यान कोणते घोषित करण्यात आले?
अ. १०२ वा
बी. १०५ वा
सी.१०७ वा
दि.११० वा
उत्तर: क. १०७ वा

८. कोणत्या राज्य सरकारने 'ग्लोबल इंडिया समिट २०२५' आयोजित केले होते?
अ. बिहार
ब. केरळ
C. तेलंगणा
D. गुजरात
उत्तर: C. तेलंगणा

९. 'कोस्टल स्टेट्स मीटिंग २०२५' कुठे आयोजित केली जाईल?
A. आंध्र प्रदेश
B. ओडिशा
C. गुजरात
डी. मुंबई
उत्तर: डी. मुंबई

१०. २०२५ मध्ये भारतात कोणता आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाईल?
अ. राष्ट्रकुल खेळ
ब. आशियाई खेळ
C. आयसीसी क्रिकेट विश्वचषक
D. फिफा विश्वचषक
उत्तर: C. आयसीसी क्रिकेट विश्वचषक

२७ एप्रिल २०२५

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५


१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे?
अ. ३०००
बी.५०००
सी.७०००
डी.१०,०००
उत्तर: डी. १०,०००
स्पष्टीकरण: पारंपारिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी, १०,००० नवीन आयुष केंद्रांना मान्यता देण्यात आली.

२. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच शाळांमध्ये एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घातली आहे?
अ. पंजाब
ब. राजस्थान
C. आसाम
D. केरळ
उत्तर: अ. पंजाब
स्पष्टीकरण: मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, पंजाबने ही बंदी घातली.

३. भारत आणि कोणत्या देशाने अलीकडेच विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
अ. जपान
बी. अमेरिका / यूएसए
C. जर्मनी
D. फ्रान्स
उत्तर: अ. जपान
स्पष्टीकरण: विज्ञान-तंत्रज्ञान भागीदारीला चालना देण्यासाठी भारत आणि जपानने करारावर स्वाक्षरी केली.

४. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा कोणता वर्धापन दिन अलिकडेच साजरा करण्यात आला?
अ. १५० वा
ब. १४५ वा
क. १५५ वा
डी. १६० वा
उत्तर: अ. १५० वा
स्पष्टीकरण: १८७५ मध्ये स्थापन झालेल्या बीएसईला १५० वर्षे पूर्ण झाली.

५. देशातील पहिले जैवविविधता विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होत आहे?
अ. केरळ
बी. कर्नाटक
C. उत्तराखंड
डी. ओडिशा
उत्तर: अ. केरळ
स्पष्टीकरण: भारतातील पहिले जैवविविधता विद्यापीठ स्थापन करण्यात केरळ आघाडीवर आहे.

६. 'डिजिटल इंडिया फ्युचर स्किल्स प्रोग्राम' अलीकडेच कोणाकडून सुरू करण्यात आला ?
अ. नीती आयोग
ब. शिक्षण मंत्रालय
C. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय
ड. कौशल्य विकास मंत्रालय
उत्तर: C. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय
स्पष्टीकरण: याचा उद्देश तरुणांना एआय, सायबर सुरक्षा इत्यादींमध्ये प्रशिक्षित करणे आहे.

७. कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे?
अ. हिमाचल प्रदेश
B. उत्तर प्रदेश
सी. तामिळनाडू
D. गुजरात
उत्तर: अ. हिमाचल प्रदेश
स्पष्टीकरण: महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

८. कोणत्या वर्षापर्यंत फायलेरियासिसचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य WHO ने ठेवले आहे?
अ. २०३०
बी.२०२८
सी.२०३५
डी.२०४७
उत्तर: अ) २०३०
स्पष्टीकरण: WHO ने २०३० पर्यंत जागतिक स्तरावरील निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

९. 'प्रोजेक्ट इंडिया' चे उद्दिष्ट काय आहे?
'प्रोजेक्ट इंडिया' चे उद्दिष्ट काय आहे?
अ. १० लाख उद्योजक तयार करणे
ब. महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे
क. सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणे
D. कृषी नवोपक्रम
उत्तर: अ. १० लाख उद्योजक निर्माण करणे
स्पष्टीकरण: प्रोजेक्ट इंडिया युवा उद्योजकतेला चालना देते.

१०. संयुक्त राष्ट्रांचा चिनी भाषा दिन कधी साजरा करण्यात आला?
अ. २० एप्रिल
ब. १८ एप्रिल
क. १९ एप्रिल
D. २१ एप्रिल
उत्तर: अ. २० एप्रिल
स्पष्टीकरण: चिनी भाषेचे सांस्कृतिक महत्त्व साजरे करते.

२४ एप्रिल २०२५

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या


══════════════════════
❀【गंगा】
1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा

❀【यमुना】
1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन 6. हिंडन

❀【गोदावरी】
1. इंद्रावती 2. मंजिरा 3. बिंदुसरा 4. सरबरी 5. पैनगंगा 6. प्राणहिता

❀【कृष्ण】
1. तुंगभद्रा 2. घटप्रभा 3. मलप्रभा 4. भीम 5. वेदवती 6. कोयना

❀【कावेरी】
1. काबिनी 2. हेमावती 3. सिमशा 4. अर्कावती 5. भवानी

❀【नर्मदा】
1. अमरावती 2. भुखी 3. तवा 4. बांगेर

❀【सिंधू】
1. सतलुज 2. द्रास 3. जनस्कर 4. श्योक 5.गिलगिट 6. सुरु

❀【ब्रह्मपुत्र】
1. दिबांग 2. लोहित 3. झिया भोरेली (कामेंग) 4. डिखोव 5. सुबनसिरी मानस

❀【दामोदर】
१. बाराकर २. कोणार

❀【महानंदी】
1. शिवनाथ 2. हसदेव 3. जोंक 4. मांड 5. Ib 6. ओंग 7. तेल

❀【चंबळ】
1. बनस 2. काली सिंध 3. शिप्रा 4. पार्वती 5. तक्ता

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज


👇👇👇👇👇👇👇

महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?

👉 १ मे १९६०

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

👉 मबई 

महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?

👉 नागपूर 

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?

👉 ६

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?

👉 ५

महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?

👉 ३६

महाराष्ट्रातील महानगरपालिका?

👉 २६

महाराष्ट्रातील नगरपालिका?

👉 २२२

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?

👉 ७

महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?

👉 ३४

महाराष्ट्रातील एकुण तालुके?

👉 ३५८

महाराष्ट्रातील पंचायत समित्या?

👉 ३५५

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

👉 ११,२३,७४,३३३

स्त्री : पुरुष प्रमाण किती?

👉 ९२९ : १०००

महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?

👉 ८२.९१%

महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग

सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?

👉 मबई उपनगर (८९.९१% )

सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?

👉 नदुरबार (६४.४% )

सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?

👉 रत्नागिरी

सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?

👉 मबई शहर

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 अहमदनगर 

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?

👉 मबई शहर 

जास्त लोकसंख्येचा जिल्हा?

👉 ठाणे 

कमी लोकसंख्येचा जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग 

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?

👉 ९३%

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?

👉 आबा

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

👉 मोठा बोंडारा

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

👉 हारावत 

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

👉 शकरु

महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?

👉 मराठी

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?

👉 कळसुबाई (१६४६ मी.)

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?

👉 गोदावरी

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

भारतातील जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇👇

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?

👉 गगानगर ( राजस्थान )

सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?

👉 उत्तरप्रदेश

सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?

👉 मबई (१,८४,१४,२८८ )

सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?

👉 करळ

सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 गिरसप्पा धबधबा 

सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद 

सर्वांत लांब नदी कोणती?

👉 बरह्यमपुत्रा

सर्वांत मोठी घुमट कोणती?

👉 गोल घुमट 

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 थरचे वाळवंट 

सर्वांत उंच पुतळा कोणता?

👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

सर्वांत मोठे धरण कोणते?

👉 भाक्रा नांगल

सर्वांत उंच धरण कोणते?

👉 टिहरी

सर्वांत लांब धरण कोणते?

👉 हिराकुड

सर्वांत लांब बोगदा कोणता?

👉 जवाहर बोगदा 

सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?

👉 यवा भारती

सर्वांत उंच मनोरा कोणता?

👉 दरदर्शन मनोरा 

सर्वांत उंच झाड कोणते?

👉 दवदार

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 कच्छ 

लोकसंख्येने मोठा जिल्हा?

👉 ठाणे 

सर्वाधिक पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

जगाचे जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 सहारा ( आफ्रिका )

सर्वांत मोठे बेट कोणते?

👉 गरीनॅलंड

सर्वाधिक लोकसंख्येचा देश?

👉 चीन

क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?

👉 रशिया

सर्वांत मोठा खंड कोणता?

👉 आशिया

सर्वांत मोठी गर्ता कोणती?

👉 मरियना

सर्वांत मोठा पक्षी कोणता?

👉 शहाम्रुग

सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?

👉 सदरबन

सर्वांत मोठा पुतळा कोणता?

👉 सटॅचु ऑफ लिबर्टी

सर्वांत मोठी नदी कोणती?

👉 अमेझॉन

सर्वांत मोठे बंदर कोणते?

👉 सिडनी

सर्वांत मोठा महासागर कोणता?

👉 पसिफिक महासागर 

सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद ( दिल्ली )

सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 वहेनेझुएला

सर्वांत लहान खंड कोणता?

👉 ऑस्ट्रेलिया 

सर्वांत लहान महासागर कोणता?

👉 आर्क्टिक महासागर 

सर्वांत लहान पक्षी कोणता?

👉 हमिंग बर्ड

सर्वांत लहान दिवस कोणता?

👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?

👉 नाईल

सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम ( मेघालय )

सर्वांत जलद उडणारा पक्षी?

👉 हमिंग बर्ड 

सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?

👉 मलाक्काची सामुद्रधुनी


जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

 

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव


1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 

3) काळे खंड - आफ्रिका 

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन

सामान्य ज्ञान


1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात.

Ans:- संप्लवन


2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात.

Ans:- 92


3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला.

Ans:- सर जे.जे. थॉमसन


4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते.

Ans:- रुदरफोर्ड


5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे……..

Ans:- अणुअंक


6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला.

Ans:- जॉन चॅडविक


7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली.

Ans:- सर जे.जे. थॉमसन


8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात.

Ans:- अणु वस्तुमानांक


9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत.

Ans:- परिवलन


10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात.

Ans:- कंपनगती


11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे.

Ans:- तिसऱ्या


12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी …….. आहेत.

Ans:- सदिश


13. गुरूत्व त्वरणचे सर्वात जास्त मुल्य ध्रुवावर असते तर सर्वात कमी मुल्य …….. असते.

Ans:- विषुववृत्तावर


14. गुरूत्व त्वरणाचे सरासरी मुल्य ………….. मापले जाते.

Ans:- 9.8


15. गतिमान पदार्थाच्या गती ला विरोध करणाऱ्या बलास ………… म्हणतात.

Ans:- घर्षण बल


16. आपली मुळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तुच्या प्रवृत्तीला…..असे म्हणतात.

Ans:- जडत्व


17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास ….. म्हणतात.

Ans:- संवेग


18. एक अश्वशक्ती (Hourse Power) म्हणजे …….

Ans:- 746 वॅट


19. ध्वनीचा वायू, द्रव, व स्थायू या माध्यमापैकी …… या माध्यमात सर्वाधिक वेग असतो.

Ans:- स्थायू


20. नॅचरल गॅस मध्ये मुख्यतः ……….. वायु असाते.

Ans:- मिथेन


21. शृंखला अभिक्रियेचे निंयत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा ……….. कांड्यांचा वापर केला जातो.

Ans:- कॅडमिअम


22. ………… यांस ‘रसायनाचा राजा’ असे म्हटले जाते.

Ans:- सल्फ्यूरिक अॅसिड


23. …………. या वायूला ‘हसविणारा वायु’

Ans:- नायट्रस ऑक्साईड (N2O)


24. ………… किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.

Ans:- गॅमा


25. ……….. या वायुचा सडक्या अंडयासारखा वास असतो.

Ans:- हायड्रोजन सल्फाईट


26. ………… या वायुला ठसका आणणारा वास असतो.

Ans:- सल्फर डायऑक्साईड


27. पारा आणि गॅलिअम हे द्रवरूप धातू असून….. हा एकमेव द्रवरूप अधातू आहे.

Ans:- ब्रोमीन


28. अधातुंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव अधातू…..

Ans:-ग्रॅफाईट


29. सोडियम – बाय – कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा होय तर सोडीयम कार्बोनेट म्हणजेच ……. .. होय.

Ans:- धुण्याचा सोडा


30. बंदुकीच्या दारुत ……… या अधातूचा वापर होतो.

Ans:- सल्फर


31. गोबरगॅस सयंत्रातून ………. हा वायू मिळतो.

Ans:- मिथेन


32. स्थायुरूप कार्बनडायऑक्साईडला ……….. असे म्हणतात.

Ans:- शुष्क / कोरडा बर्फ


33. सर्व साधारण परिस्थितीत ………………. हा द्रव्यस्थितीत असणारा धातू आहे.

Ans:- पारा


34. ………… चा अपवाद सोडता सर्व अणुंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात.

Ans:- हायड्रोजन


35. ………….व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात.

Ans:- अणुवस्तूमान


36. बलाचे एम.के.एस. मधील एकक……. आहे.

Ans:- न्यूटन


37. कार्याचे एम.के.एस. मधील एकक………. आहे.

Ans:- ज्युल


38. वारंवारतेचे एकक ……… हे आहे.

Ans:- हर्टझ


39. ………….. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते.

Ans:- ४ अंश


40. अल्बर्ट आइनस्टाइन या ………….. देशाच्या शास्त्रज्ञाने १९०५ साली अणुयुगाचा पाया रचला.

Ans:- जर्मन


41. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ………. तंत्रामुळे शक्य झाले.

Ans:- क्लोनिंग


42. अवकाशात मानव जिंवत राहू शकतो हे ……….. यांच्या यशस्वी अवकाश यात्रेनी सिद्ध केली.

Ans:- युरी गागारिन


43. सतिश धवन अवकाश संशोधन केंद्र ……… या ठिकाणी आहे.

Ans:- श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)


44. ……….. साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला.

Ans:- १९६९


45. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे …………. उशीरा होतो.

Ans:- ५० मिनिटे


46. हॅले चा धूमकेतू ……….. वर्षांनी एकदा दिसतो.

Ans:- 66


47. भारताचा पहिला उपग्रह ………. हा १९ एप्रिल १९७५ रोजी आवकाशात सोडण्यात आला.

Ans:- आर्यभटट्


48. महाराष्ट्रात ……….. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.

Ans:- तारापूर


49. शुद्ध सोने ………….. कॅरेटचे असते.

Ans:- २४


50. आधुनिक आवर्तसारणी ……… ह्यावर आधारीत आहे.

Ans:- मुलद्रव्यांचे अणुअंक


51. विभवंतराचे एस. आय. एकक ……. हे आहे

Ans:- व्होल्ट


52. मानवी रक्ताचे एकूण ………. गट पडतात.

Ans:- ४


53. विद्युत उर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ……….. यांनी शोधून काढला.

Ans:- ओरस्टेड


54. ……….. पासून मिळणारी ऊर्जा प्रदुषणरहित असते.

Ans:- सौरघट


55. सर्व इंधनात ………. चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक असते.

Ans:- हायड्रोजन


56. स्पॉट हे ………… ऊर्जा स्त्रोत आहे.

Ans:- भूगर्भ औष्मिक


57. द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी ………… वापरतात.

Ans:- सौर शुष्कक


58. एल.पी.जी. मध्ये ………. हे घटक असतात.

Ans:- ब्युटेन व आयसोब्युटेन


59. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ………. हे आहे.

Ans:- डेसीबल


60. ध्वनीचे प्रसारण …………. मधून होत नाही.

Ans:- निर्वात प्रदेश


61. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण ………….. तरंगामार्फत होते.

Ans:- अनु


62. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती …………. यामुळे सुरक्षित राहतात.

Ans:- पाण्याचे असंगत आचरण


63. रडार या यंत्रात चा ………. वापर केलेला असतो.

Ans:- रेडीओ लहरी


64. …………. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

Ans:- पाणी


65. क्ष-किरण म्हणजे ………….. आहेत.

Ans:- विद्युत चुंबकीय लहरी


66. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते. या अभिक्रियेस ………. म्हणतात.

Ans:- केंद्रकीय विखंडीकरण


67. केंद्रकीय विखंडन किंवा संमिलनात ………. या मुळे ऊर्जा निर्माण होते.

Ans:- वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर


68. क्ष-किरणांचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला.

Ans:- रॉन्टजेन


69. किपचे उपकरण ………… तयार करण्यासाठी वापरतात.

Ans:- हायड्रोजन सल्फाईड


70. अग्निशामक साधनामध्ये ………….. या वायुचा वापर केलेला असतो.

Ans:- कार्बन डायऑक्साईड


71. ………… हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.

Ans:- संगमरवर


72. …………… पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवितात.

Ans:- जिप्सम


73. फेरस सल्फेटला …………. असे म्हणतात.

Ans:- ग्रीन व्हिट्रीऑल


74. तुरटीचा वापर ……….. साठी करतात.

Ans:- रक्त प्रवाह थांबविणे


75. अवयव ……… पासून बनतात.

Ans:- उती


76. प्रथिने ही ………. ची बहुवारिके आहेत.

Ans:- अमिनो आम्ले


77. …………….. या मुलद्रव्याशिवाय इतर सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.

Ans:- हायड्रोजन


78. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी …………… आम्ल वापरतात.

Ans:- हायड्रोक्लोरीक


79. प्राचीन खगोल अभ्यासकांनी ………… नक्षत्रांची कल्पना केली आहे.

Ans:- २७


80. आधुनिक जैव तंत्रज्ञान ……… च्या पातळीवर कार्य करते.

Ans:- रेणु


81. शून्य या अंकाचा शोध …………. या भारतीय शास्त्रज्ञाने लावला.

Ans:- वराहमिहीर


82. पृथ्वी, त्रिशुल, व अग्री या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे श्रेय ………… यांच्याकडे जाते.

Ans:- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम


83. बल्बच्या दिव्यात ……….. ची तार असते.

Ans:- टंगस्टन


84. ………….. हा सर्वात हलका वायू आहे.

Ans:- हायड्रोजन


85. पाण्याचा द्रवणांक (गोठणाक) शुन्य अंश से. असतो. तर उत्कलनांक ……… असते.

Ans:- १०० अंश से.


86. पाऱ्याचा द्रवणांक वजा एकोणचाळीस अंश सेल्सीअस असतो तर उत्कलनांक ……

Ans:- ३५७ अंश से.


87. उकळत्या पाण्याचे तापमान ……. असते.

Ans:- १०० अंश से.


88. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………. हे उपकरण वापरतात.

Ans:- सिस्मोग्राफ


89. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास …… म्हणतात.

Ans:- सुजवटी


90. ऊर्जा, प्रथिने तसेच इतर पोषणतत्व यांच्या सतत अभावामुळे…. हा रोग होतो.

Ans:- सुकटी


91. लोहाच्या अभावामुळे ……….. हा रोग होतो.

Ans:- पंडूरोग/रक्तक्षय (अॅनेमिया)


92. आयोडिनच्या कमतरतेमुळे ……….. हा रोग होतो.

Ans:- गलगंड (गॉयटर)


93. कोवळ्या सुर्यप्रकाशात …….. ची निर्मिती त्वचेखाली होते.

Ans:- जीवनसत्व ‘ड’


94. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ……… चा नाश होतो.

Ans:- जीवनसत्व ‘ब’


95. रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्त्व आवश्यक असते.

Ans:- के


96. जीवनसत्व ………………… चे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते.

Ans:- ड


97. ………. ही जीवनसत्वे मेद-द्राव्य असतात.

Ans:- अ आणि ड


98. ……….. ही जीवनसत्वे जल-द्राव्य असतात.

Ans:- ब आणि क


99. मानवात गुणसुत्रांच्या ……….. जोडया असतात.

Ans:- २३


100. मुलीचा जन्म ……… या गुणसुत्रांमुळे होतो.

Ans:- एक्स-एक्स


चित्तरंजन दास

जन्म :- ५ नोव्हेंबर १८७०.

मृत्यू :- जून १९२५.


🎤 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात.


🏬 चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय्. सी. एस्. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली


📝 शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले.


📜 चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.


🏛 बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. 


♟ १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू–चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला. कलकत्ता येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला; पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली. 


🎯 त्यांची अहमदाबाद (१९२१) व नंतर गया (१९२२) येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

🏤 १९२४–२५ या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते


🔮 सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती; माझे राजकारण म्हणजे धर्म’.


💐 अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.


🏩  त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात (भोवनीपूर बंगल्यांत) चित्तरंजन सेवासदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.

महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था :-

⭕️नाना शंकरशेठ:- 

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई , 

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852 


⭕️ नया. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डक्कन सभा :- 1896 , पुणे



⭕️ सेवासदनरानडे :- 

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई 

➡️ सवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई


⭕️महर्षी वि. रा. शिंदे :-  

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

 ➡️ तरुण मराठा संघ.


⭕️ जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन



⭕️ कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९), 


⭕️ वि. दा. सावरकर : -

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).


⭕️ महात्मा गांधी:- 

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .


⭕️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)


⭕️नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)


⭕️ गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :- 

➡️ सार्वजनिक सभा (पुणे), 

➡️ दशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)



⭕️ सरस्वतीबाई जोशी:- 

➡️ सत्री-विचारवंती संस्था, पुणे


⭕️ पडिता रमाबाई:-

 ➡️ कपासदन 

➡️ शारदा सदन (मुंबई), 

➡️ मक्तीसदन (1896, केडगाव), 

➡️ आर्य महिला समाज, पुणे



😜😜चहा पिताना discuss करा 100% हेच कामाला येणार आहे उगाच कोणाला तरी discuss करण्या पेक्षा हे वाचा फायदा guaranteed🔥✌️


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?

अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे 

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️

________________________

2) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

________________________

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

________________________

4) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

________________________

5) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे 

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

________________________

6) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ____ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

________________________

7) नैसर्गिक रबर हा एक _____ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड 

 D. फिनॉल.

________________________


8) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.

_______________


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी

B. लॉर्ड रिपन

C. लॉर्ड कर्झन

D. लॉर्ड हार्डिंग II ☑️



◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?


A. अकबर

B. अलेक्झांडर लोदी

C. शेरशाह सुरी ☑️

D. बल्बन


◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा

B.कावेरी☑️

C. नर्मदा

D. तुंगभद्रा



◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815

B. 1812

C. 1828 ☑️

D. 1830



 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️

B. पेरिस

C. वॉर्न

D. लिस्बन.



*‘दिनबंधू’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?* 


 A) महात्मा ज्योतिबा फुले ✅

 B) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 C) म. गो. रानडे 

 D) यापैकी नाही


*खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर नाही?* 


 A) पैठण 

 B) नाशिक 

 C) वर्धा ✅

 D) यापैकी नाही


*नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?* 


 A) उपनगराध्यक्ष 

 B) विभागीय आयुक्त ✅

 C) मुख्याधिकारी 

 D) यापैकी नाही


*‘इंडियन इंस्टीट्युट ऑफ अँस्ट्रो फिजिक्स’ हि संस्था कोठे आहे?* 


 A) मुंबई 

 B) बंगळूर ✅

 C) दिल्ली 

 D) यापैकी नाही


डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?


 A) गुजरात 

 B) महाराष्ट्र 

 C) कर्नाटक 

 D) गोवा✅


‘रामगुंडम’ औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?


 A) तामिळनाडू 

 B) गुजरात 

 C) तेलंगणा ✅

 D) केरळ


नदी गावाजवळून वाहत होती’ या वाक्यात विधेय विभाग कोणता?


 A) गावाजवळून वाहत होती. ✅

 B) होती. 

 C) वाहत होती. 

 D) नदी वाहत होती.


खालील वाक्यातील काळ ओळखा.“आम्ही सिनेमा पाहत आहोत?”


 A) अपूर्ण वर्तमानकाळ ✅

 B) पूर्ण वर्तमानकाळ 

 C) अपूर्ण भूतकाळ 

 D) अपूर्ण भविष्यकाळ

पंडिता रमाबाई

★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.

★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)

★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.

★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.

★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.

★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.

★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.

★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष

★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.

★ आत्मचरित्र - माझी साक्ष

★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.

★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.


🎯 पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था

१) आर्य महिला समाज

२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी

३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी

४) बातमी सदन 👉 अंधांसाठी

५) प्रीतिसदन 👉 वृद्ध,अशक्त,अपंगांसाठी

६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी


★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.

🎯 सेवासदन :-

★ स्थापना-1908 (मुंबई)

★ संस्थापक - रमाबाई रानडे,


👉 बेहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने


★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.


________

general question

 प्रश्न 1

कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” ही 25 सैनिकांच्या चमूची धावशर्यत आहे जे इतक्या दिवसांत 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील 

                      🔴 45 दिवस.



प्रश्न 2

भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत इतक्या खासगी ट्रेन (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे 

                        🔴 150


प्रश्न 3

या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे 

                  🔴 गरेटर नोएडा, उत्तरप्रदेश.


प्रश्न 4

भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळाचे वर्तमानातले अध्यक्ष 

                      🔴 विनोद कुमार यादव


प्रश्न 5

इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्णय देणारे उच्च न्यायालय  

                    🔴 करळ उच्च न्यायालय.


प्रश्न 6  

“PACEसेटर फंड”ची स्थापना या साली भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका यांनी केली होती 

                    🔴 सन 2015.



प्रश्न 7

भारतीय रेल्वे याचे स्थापना वर्ष  

                    🔴 सन 1845 (08 मे).

प्रश्न 10

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते

          🔴 यशवंतराव चव्हाण


प्रश्न 11

महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते

          🔴 शरी. प्रकाश


प्रश्न 12

महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती

          🔴 मबई



प्रश्न 13

महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते  

          🔴 मबई (1927)


प्रश्न 14

महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते

          🔴  मबई (2 ऑक्टोबर 1972



प्रश्न 15

महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते

          🔴 कर्नाळा (रायगड)



प्रश्न 16

महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते

          🔴 खोपोली (रायगड)



प्रश्न 17

महाराष्ट्रातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोणता

           🔴 तारापुर



प्रश्न 18

महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते

      🔴 राहुरी (1968 जि. अहमदनगर)



प्रश्न 19

महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता

🔴 परवरानगर (1950 जि. अहमदनगर)




प्रश्न 20

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोणती

🔴 कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था इचलकरंजी


प्रश्न 21

महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता 🔴 जमसांडे  देवगड (जि. सिंधुदुर्ग)



प्रश्न 22

महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते

            🔴 आर्वी (पुणे)



प्रश्न 23

महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणते

           🔴 चद्रपुर



प्रश्न 24

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते

           🔴 दर्पण (1832)



प्रश्न 25

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते

          🔴 दिग्दर्शन (1840)



प्रश्न 26

महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते

          🔴 जञानप्रकाश (1904)



प्रश्न 27

महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणती

          🔴 पणे (1848)




प्रश्न 28

महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती

          🔴 सातारा (1961)


प्रश्न 29

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती

          🔴 मबई (1854)


प्रश्न 30

महाराष्ट्रचे पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते

          🔴 ताजमहाल, मुंबई



प्रश्न 31

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण



प्रश्न 32

भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 महर्षि धोंडो केशव कर्वे


प्रश्न 33

महाराष्टाचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति कोण

          🔴 शरी. सुरेन्द्र चव्हाण


प्रश्न 34

रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति

         🔴 आचार्य विनोबा भावे



प्रश्न 35

महाराष्टाचे पहिले रँग्लर कोण

         🔴 रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे



प्रश्न 36

महाराष्ट्रातील पहिल्या महिल्या डॉक्टर कोण

        🔴 आनंदीबाई जोशी



प्रश्न 37

महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा

       🔴 वर्धा जिल्हा



प्रश्न 38

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष 

       🔴 नयायमूर्ती महादेव रानडे



प्रश्न 39

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे ( वाफेचे इंजिन ) कोठून कोठे धावली

    🔴 मबई ते ठाणे (16 एप्रिल 1853 )



प्रश्न 40

महाराष्ट्रातील पहिली रेल्वे (विजेवरील) कोठून कोठे धावली

        🔴 मबई ते कुर्ला (1925)



प्रश्न 41

महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण

        🔴 सरेखा भोसले (सातारा)



प्रश्न 42

महाराष्ट्रातील पहिला  संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता

        🔴 सिंधुदुर्ग



प्रश्न 43

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा 

        🔴 कसुमावती देशपांडे



प्रश्न 44

महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण

        🔴 डॉ. सुरेश जोशी




प्रश्न 45

महाराष्ट्रातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे केला

         🔴 वडूज



प्रश्न 46

ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता

          🔴 शवास (2004)



प्रश्न 47

राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट कोणता

          🔴 शवास



प्रश्न 48

राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता

          🔴 शयामची आई


प्रश्न 49

पृथ्वीवरील तापमान अतिकमी- अतिजास्त न होता नियंत्रणात कोणत्या घटकामुळे राहते?

           🔴 पाण्याच्या वाफेमुळे



प्रश्न 50

भूकंपापुर्वी पृथ्वीवर भूगर्भातून कोणत्या वायूचे उत्सर्जन वाढते?

           🔴 रडॉन चे



प्रश्न 51

शृंग' या हिमनदी कार्यामुळे निर्माण भुरुपावर जेव्हा बर्फ जमतो त्याचे रूपांतर तेव्हा टेकडीत होते.तेव्हा त्या टेकडीस काय म्हणतात?

          🔴 ननाटक



प्रश्न 52

भारतातील भ्रंश पर्वत खालीलपैकी कोणते आहेत?

         🔴 सातपुडा,विंध्यानचल



प्रश्न 53

कोणत्या मंत्रालयाने “नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी (NEAT) आर्टिफिश्यल इंटेलिजेंस (AI)” या नावाने योजना सादर केली?

          🔴 मनुष्यबळ विकास मंत्रालय



प्रश्न 54

विम्बलडन टेनिस स्पर्धा – २०१६ चा पुरुष एकेरीचा विजेता खेळाडू खालीलपैकी कोण

           🔴 अडी मरे 


प्रश्न 55

‘द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे

           🔴 परणव मुखर्जी 

 


प्रश्न 56

भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

            🔴 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया 

 


प्रश्न 57

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?

            🔴 सतीश माथुर



राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1)"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई


उत्तर : लालबहादूर

शास्त्री


2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)


A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942

उत्तर : 1942


3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि

तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)


A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक

D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक



5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल

B. लालबहादूर शास्त्री

C. जवाहरलाल नेहरू

D. विनोबा भावे


उत्तर : लालबहादूर शास्त्री


7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930

B. 1919

C. 1942

D. 1945


उत्तर : 1942


8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले

B. दयानंद सरस्वती

C. मुळ शंकर

D. एम. जी. रानडे


उत्तर : दयानंद सरस्वती


Q.1 व्यावसायिक बँकांच्या दुसर्‍या राष्ट्रीयीकरणात ___ बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.


1. 4

2. 5

3. 6 ✅

4. 8



Q2) वायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?

1.म्युच्युअल फड  

2.वस्तू विनिमय  ✅

3.भागभांडवल बाजार

4.परकीय चलन बाजार



Q3.12 जुलै 1982 रोजी एआरडीसीमध्ये विलीनीकरण करण्यात आले ?


1.आरबीआय 

 2.नाबार्ड  ✅

3. एक्झिम बँक

4. वरीलपैकी काहीही नाही



Q4)एअरटेल पेमेंट्स बँकेने भारतीय शेतकरी आणि लघु व मध्यम उद्योगांसाठी खास प्रकारच्या पेमेंट सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी कोणत्या कंपनीशी हातमिळवणी केली आहे?


1.पेपल

2.मास्टरकार्ड  ✅

3.व्हिसा

4.मेझॉन



Q5.ऑपरेशन ट्विस्ट कोणत्या बँकेची सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणे व विकणे हे आहे?


1.आरबीचा  ✅

2.एसबीआय

 3.एचडीएफसी

 4.BoB



Q6.सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार एमएसएमई क्षेत्राने जीडीपीमध्ये किती टक्के वाटा उचलला आहे?


1. 25%

2.29%  ✅

3.32%

4. 36%



Q7)भारत सरकारच्या कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागांतर्गत नाफेडने लॉकडाऊनमध्ये डाळी व तेलबिया खरेदी केली. नाफेडची स्थापना कोणत्या तारखेला झाली?


1.2 ऑक्टोबर 1958  ✅

2.2 ऑक्टोबर 1968

3.2 ऑक्टोबर 1978

4.2 ऑक्टोबर 1988



Q.8 राज्य सरकारांचा महसूल वगळता खालील स्त्रोतांकडून महसूल उठविला जातो?


1. करमणूक कर

2. खर्च कर

3.कृषी होय  ✅

4.जमीन महसूल



Q9. वित्तीय तूट म्हणजे काय?


1.नवीन चलन नोटा छापणे

2.थकित चलनासह नवीन चलन बदलणे

3.सार्वजनिक खर्चाची संख्या सार्वजनिक खर्च  ✅

4.. सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त सार्वजनिक उत्पन्न


Q10. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी खालील दिवशी कार्यरत झाले:

1.1 मार्च, 1944 

2.1 मार्च, 1945

3.1 मार्च, 1946

4.1 मार्च, 1947 ✅



Q11.भांडवळाच्या सेंद्रिय संरचनेची संकल्पना............ याने मांडली.

1.मार्शल  

2.जे.एस.मिल 

3.कार्ल मार्क्स  ✅

4.अॅडम स्मिथ 



Q12.भारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?

1.उत्तरप्रदेश 

2.बिहार 

3.राजस्थान 

4.मध्यप्रदेश ✅



Q13) 1971 पर्यंत SDR चे मूल्य याच्या समान होते:

1.एक औंस सोने  

2.एक पौंड सोने

3.एक यू.एस. डॉलर  ✅

4.एक ब्रिटिश पौंड 



Q14)न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून के.व्ही. कामथ यांची जागा कोण घेणार?


1.मिशेल टेमर

2.मार्कोस प्रडो ट्रोयझो  ✅

3. सर्जिओ मोरो

4. दिलमा 



Q15) तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1) नंदुरबार ✅


 १) पुढे दिलेल्या पदांचा उतरता क्रम लावा? 

अ) राष्ट्रपती    
ब) भारतरत्न सन्मान मिळालेल्या व्यक्ती      
क) उपपंतप्रधान                    ड) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१) अकबड   ✅✅
२) डअकब    
३) अडबक   
४) अ ब क ड

 २. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली? 

 एलफीन्स्टन
 एस.एन.डी.टी.
 फर्ग्युसन ✅✅
 विलिंग्टन

 ३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे? 

 १)  ISRO✅✅
 २)  GSI
 ३)  DAE
 ४)  CSIR

 ४) अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्यांच्या योग्य जोडया जुळवा. 

          प्रकल्प                     राज्य
         1) कल्पक्कम    अ) तमिळनाडू
         2) काक्रापार    ब) गुजरात
         3) रावतभाटा    क) महाराष्ट्र
         4) नरोरा        ड) राजस्थान
                               इ) उत्तर प्रदेश
 1) 1-अ, 2-ब, 3-ड, 4-इ ✅✅           2) 1-अ, 2-ड, 3-इ, 4-क
3) 1-अ, 2-इ, 3-ड, 4-ब     
4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ

 ५)  तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?  

 A) जळगाव 
 B) नाशिक  
 C) नंदूरबार ✅✅
 D) धुळे 

 ६) भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ? 

अ. बिहार
ब. कर्नाटक
क, तेलंगणा
ड. मध्यप्रदेश

 A) फक्त अ, ब, क  ✅✅
 B) फक्त अ, ब, ड  
 C) फक्त ब, क, ड  
 D) फक्त अ, क, ड

 ७)योग्य कथन/कथने ओळखा. 

अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात. * 

 A) फक्त अ  
 B) फक्त अ, ब  ✅✅
 C) फक्त अ, क 
 D) वरील सर्व 

 ८) खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल ? 

अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून
ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर
क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव
ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

 A) फक्त अ 
 B) वरील सर्व  
 C) क आणि ड 
 D) ब आणि क ✅✅

 ९) महाराष्ट्रातील प्रसिद्ध ' यावलीचा संग्राम '  पुढीलपैकी कोणत्या प्रदेशात आणि कुठल्या राष्ट्रीय चळवळीशी संबंधित होता? 

१) वऱ्हाड -सविनय कायदेभंग 

२) मराठवाडा -चले जाव 

३) पश्चिम महाराष्ट्र - चले जाव 

४) वऱ्हाड - चले जाव ✅✅


 10) ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत. 

 1) आंबे
 2) चिकू ✅✅
 3) द्राक्ष
 4) नारळ

 ११) 1916 राष्ट्रीय काँग्रेस चे   अधिवेशन खालीलपैकी कोठे पार पडले? 

१) लाहोर

२) पुणे 

३) कोलकाता

४) यापैकी नाही -लखनौ ✅✅

 12) कोणत्या राज्यात कोविड-19 विषयी जागृती करण्यासाठी ‘मिशन फतेह’ अभियान चालविले जात आहे? 

(A) गुजरात
(B) पंजाब ✅✅
(C) जम्मू व काश्मीर
(D) राजस्थान

 १३) अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 

A. रक्त गोठलेले असते
B. रक्त थंड असते
C. शरीराचे तापमान बाहेरच्य तापमानानुसार बदलत राहते✅✅
D. शरीराचे तापमान स्थिर असते

 14) ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला कारण :, 

(a) त्यांना ताग उद्येग गाबद्दल आकर्षण होते 
(b)भारतीय उद्योग धंध्यांचा विकास करणे 
(c) भारतीयांना रोजगार मिळवून देणे .
(d) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे .

A. (a) फक्त
B. (a) आणि (b)फक्त
C. (a)' (b) आणि (c) फक्त
D. (a) आणि (d) फक्त ✅✅


 15) . दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ? 

A. चिनाब ✅✅
B. कृष्णा
C. पेन्नार
D. कावेरी


* 16) जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक 2020 नुसार भारताचे स्थान कितवे आहे?** 

  ✅भारताचा क्रमांक 142 वा