खर तर हा आज बनलेला संवेदनशील विषय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये मागासवर्गीय जातींसाठी आरक्षणाची तरतूद केली ती करत असताना त्यांनी सर्व समाज घटकाचा एकंदरीत अभ्यास केला जाती-जातील उतरंड संपुष्टात आणणे आवश्यक आहे या मतावर ते ठाम होते परंतु ही व्यवस्था बदलण्यासाठी बराचसा कालावधी लागेल याची देखील त्यांना जाण होती म्हणून त्यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने काही मागासवर्गीय जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली ती करत असताना त्यांनी ह्या गोष्टी कायमस्वरूपी राहणार नाहीत याची देखील दक्षता घेतली कारण आरक्षण हे मुख्य प्रवाहात आणण्याचे एक माध्यम आहे. ते कुठल्याही समाजासाठी कायमस्वरूपी असू शकत नाही हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं परंतु इथल्या राजकीय व्यवस्थेने आपल्या राजकारणासाठी वर्षानुवर्ष आरक्षणाची मुदत वाढवत आपल्या राजकारणाची पोळी शेकली. गेली 70 वर्ष एकही समाज आरक्षणातून सुदृढ झाला नाही का? आणि जर झाला नसेल तर का? या प्रश्नाची उत्तर अनुत्तरीत राहिली नाही तर ती जाणून बुजून अनुत्तरीत ठेवण्यात आली ज्या समाजाचा आर्थिक विकास आरक्षणातून झाला त्या समाजातील किती लोकांनी आरक्षण सोडून दिले? ते मुख्य प्रवाहात आल्यानंतर त्यांनी आरक्षण खरंतर सोडायला हवं होतं कारण त्याचा लाभ त्याच समाजातील इतर घटकालाही मिळाला असता परंतु असे झाले नाही वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या आरक्षणाचा लाभ घेत श्रीमंत त्यातील श्रीमंत होत गेले आणि त्याच समाजातील गरीब वर्ग हा गरीबच राहिला. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार आहे परंतु आरक्षणाच्या नावाखाली किती दिवस आपण ह्याच गोष्टी करणार हे कुठेतरी थांबायला हवं आणि हे थांबवण्यासाठी ज्या समाजातील आरक्षित वर्ग सुदृढ झाला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला त्यांनी स्वतः आरक्षणाचा त्याग करावा अन्यथा प्रत्येक समाजात गरीब वर्ग कायमस्वरूपी गरीबच राहील तुम्ही माझ्या मताशी सहमत असालच असे नाही परंतु भारताचा नागरिक या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱ्या विचारांनी सर्व मागासवर्गीय समाजांनी खर तर याचा सारासार विचार करावा
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
11 October 2022
आरक्षण गरज की अधिकार?
चालू घडामोडी
हिमाचल प्रदेशला मंडी येथे पहिले जैवविविधता उद्यान
लुप्तप्राय हिमालयीन वनौषधींच्या संवर्धनासाठी योगदान देणारे पहिले जैवविविधता उद्यान हिमाचल प्रदेशला मिळाले आहे.
हे उद्यान मंडीच्या भुला व्हॅलीमध्ये उभारण्यात येणार आहे.
HP च्या वनविभागातर्फे नॅशनल मिशन ऑन हिमालयन स्टडीज (NMHS) अंतर्गत 1 कोटी रुपये खर्च करून जैवविविधता उद्यान उभारण्यात आले आहे.
नोबेल शांतता पुरस्कार 2022: युक्रेन, रशिया आणि बेलारूसमधील मानवाधिकार प्रचारकांना सन्मानित
बेलारूसमधील मानवाधिकार रक्षक एलेस बिलियात्स्की, जो आता तुरुंगात आहे, मेमोरियल , एक रशियन मानवाधिकार संस्था, आणि सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज, एक युक्रेनियन मानवाधिकार संस्था, या सर्वांना संयुक्तपणे यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार 2022 देण्यात आला आहे.
रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल ही या वर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या दोन संस्थांपैकी एक आहे.
गंभीर आवाजांविरुद्ध दडपशाहीच्या लाटेदरम्यान स्मारक बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता आणि "पुतिनच्या नेतृत्वाखाली रशियाची विवेकबुद्धी प्रतिबंधित" म्हणून त्याचा संदर्भ देते.
युक्रेनमधील अशांततेच्या काळात, 2007 मध्ये तेथे लोकशाही आणि मानवी हक्क वाढवण्यासाठी सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीजची स्थापना करण्यात आली.
10 October 2022
दुसऱ्यांदा नोबेल
कर्करोगाच्या गाठींवर असलेल्या ‘ग्लायकॅन’ या काबरेहायट्रेट पॉलिमर्सवर बेटरेझी यांनी संशोधन केले.
शार्पलेस आणि मेल्डल यांचे संशोधन सजीव पेशींवर वापरून गाठींचे प्रतिकाश्क्तीपासून संरक्षण करणाऱ्या ‘ग्लायकॅन’ची माहिती मिळवली. यातून नव्या पद्धतीच्या जैविक औषधांची निर्मिती शक्य झाली.
दुसऱ्यांदा नोबेल
शार्पलेस यांना २००१ सालीही नोबेलने सन्मानित करण्यात आले असून दोन वेळा पारितोषिक जिंकणारे ते पाचवे संशोधक ठरले आहेत. त्यांना २०१९ साली अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या ‘प्रिस्टले पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले होते..
आज 2⃣0⃣2⃣2⃣ भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर यांना एकमेकांमध्ये अडकलेल्या फोटॉन ( Entangled Photons ) संदर्भातील अभ्यासासाठी यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
अलेन आस्पेक्ट हे फ्रान्सचे मधील स्वेले विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आहेत.
तर जॉन एफ क्लॉजर हे अमेरिकेतील शास्रज्ञ आणि अँटोन झेलिंगर हे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत
गेल्या वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सौकुरो मनाबे (जपान), क्लोस हेसलमन (जर्मनी) आणि जॉर्जिओ पॅरिसी (इटली) यांना देण्यात आला होता.
‘आसरा’ पेन्शन
तेलंगणा सरकारने गरिबांसाठी ‘आसरा’ पेन्शन सुरू केली आहे.
तेलंगणा सरकारने राज्याच्या कल्याणकारी उपायांचा आणि सामाजिक सुरक्षा नेट धोरणाचा एक भाग म्हणून ‘आसारा’ पेन्शन सुरू केली आहे. ‘आसरा’ पेन्शनचे उद्दिष्ट सर्व गरिबांचे जीवन सुरक्षित करणे आहे.
राज्यातील वृद्ध वर्ग, विधवा, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि विडी कामगारांना पेन्शन सुविधा मिळण्यासाठी ही कल्याणकारी योजना आहे. आसिफ नगर मंडळाच्या कार्यक्षेत्रात 10,000 नवीन आसरा पेन्शन मंजूर करण्यात आली आहे.
"आसरा पेन्शनशी संबंधी महत्वाचे मुद्दे" :-
आसरा पेन्शन योजना 8 नोव्हेंबर 2014 रोजी तेलंगणा सरकारने सुरू केली होती.
या योजनेत वृद्ध, खिडक्या, हत्तीरोग किंवा एड्स ग्रस्त रुग्ण, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, विडी कामगार आणि एकल महिलांना पेन्शन दिली जाते.
राज्य सरकारने वृद्ध, विधवा, एड्स रुग्ण, हातमाग कामगार आणि ताडी टपरीधारकांना दिलेली पेन्शन दरमहा 200 रुपयांवरून 2,016 रुपये करण्यात आली आहे.
दिव्यांगांसाठी निवृत्ती वेतन 500 रुपयांवरून 3,016 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे.
अविवाहित महिला, विडी कामगार आणि फायलीरियल रूग्णांसाठी दरमहा 2,016 रुपये पेन्शन असेल.
Nobel Prize for Literature 2022
जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एर्नो यांना जाहीर झाला आहे.
अॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे. अॅनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखविल्याबद्दल त्यांना या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ग्रामीण भागातील पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या साहित्यात याचा प्रभाव दिसून येतो. अॅनी एर्नो यांनी 1974 मधील Les Armoires vides (Cleaned Out) या आत्मचरित्रपर कांदबरीद्वारे साहित्यिक प्रवासाला सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांना La Place (A Man's Place) या कादंबरीसाठी रेनॉडॉट पुरस्कार मिळाला.
दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार स्थगित: 1901 पासून नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली. नोबेल पुरस्काराच्या इतिहासात फक्त दोन वेळेस साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे पहिल्यांदा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला होता. तर, दुसऱ्यांदा 2018 मध्ये स्वीडिश अकॅडमी च्या परीक्षक सदस्या कॅटरिना यांचे पती आणि फ्रेंच फोटोग्राफर जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यामुळे पुरस्कार स्थगित करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरुप काय?
सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिशी क्रोनर ( जवळपास 8.20 कोटी रुपये) असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वीडिशी क्रोनर हे स्वीडनचे चलन आहे.
UNHCR 'Nansen' Refugee Award 2022
संयुक्त राष्ट्र निर्वासितांसाठी उच्चायुक्त (UNHCR) यांनी 04 ऑक्टोबर 2022 रोजी माजी जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांना सीरियातील निर्वासित संकटादरम्यान त्यांच्या 'नैतिक आणि राजकीय धैर्या'बद्दल UNHCR 'Nansen' Refugee Award 2022 ने सन्मानित करण्यात आले आहे.
त्याची निवड त्याच्या नेतृत्व, धैर्य आणि करुणेसाठी करण्यात आली आहे, जे लाखो असाध्य आश्रय साधकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यात मदत करतात. मर्केल यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी जिनिव्हा येथे या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
माजी जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांच्या नेतृत्वाखाली, सीरिया आणि इतरत्र हिंसक संघर्षापासून जीव वाचवण्यासाठी जर्मनीने 2015 आणि 2016 मध्ये 1.2 दशलक्षाहून अधिक शरणार्थी आणि आश्रय-शोधकांचे आयोजन केले.
UNHCR Nansen Refugee Award या पुरस्काराची स्थापना : 1954
नॉर्वेच्या वैज्ञानिक, मुत्सद्दी आणि मानव कल्याण कार्याला वाहिलेल्या फिजॉफ नानसेन यांच्या स्मरणार्थ दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
निर्वासित, विस्थापित आणि बेघर लोकांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, गट किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
जाणून घेऊया
माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान.
शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
यकृत.
सर्वांधिक लिंगगुणोत्तर कोणत्या राज्यात आहे ?
केरळ.( १०८४ )
पेशी हे नाव सर्वप्रथम कोणत्या शास्रज्ञाने वापरले ?
राॕबर्ट हुक.
सुमात्रा हे बेट कोणत्या देशात आहे ?
इंडोनेशिया.
सर्वात जास्त झपाट्याने वाढणारी वनस्पती कोणती ?
निलगिरी.
चिपको आंदोलनाशी सहभागी व्यक्ती कोण ?
सुंदरलाल बहुगुणा.
जागतिक हरितक्रांतीचे जनक कोण ?
नाॕर्मन बाॕरलाॕग.
भारतीय धवलक्रांतीचे जनक कोण ?
व्हर्गिस कुरियन.
वनस्पतींनाही संवेदना असतात असे संशोधन करणारा भारतीय शास्त्रज्ञ कोण ?
जगदिशचंद्र बोस.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
व्हाइट हाऊस.
अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
ब्रेल लुईस.
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
अरूणा ढेरे.
'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
पी. टी. उषा.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.
काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष
नोबेल पुरस्कार : १९०१
पुलित्झर पुरस्कार : १९१७
ऑस्कर पुरस्कार : १९२९
गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३
कलिंगा पुरस्कार : १९५२
भारतरत्न पुरस्कार : १९५४
पद्म पुरस्कार : १९५४
साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५
मँगसेसे पुरस्कार : १९५७
अर्जुन पुरस्कार : १९६१
लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५
मँनबुकर पुरस्कार : १९६९
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार : २००५
दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९
शिवछत्रपती पुरस्कार : १९७०
आगा खान पुरस्कार : १९७७
राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८०
द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५
सरस्वती सम्मान : १९९१
व्यास सम्मान : १९९१
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९१_९२
महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५
महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६
ध्यानचंद पुरस्कार : २००२
एबेल पुरस्कार : २००३ .
लष्करी सराव(समविष्ट देश )
१. नसीम अल बहर:- भारत व ओमान
२. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
३. वरुणा :-भारत व फ्रान्स
४. SIMBEX:- भारत व सिंगापूर
५. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
६. AL Nagh Li:- भारत व ओमान
७. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
८. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
९. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
१०. कोकण: भारत व ब्रिटन
११. इंद्र:- भारत व रशिया
१२. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
१३. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
१४. अजेय वारियर :- भारत व युके.
१५. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
१६. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
१७. गरुडा: भारत व फ्रान्स
१८. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
१९. IMBEX:- भारत व म्यानमार
२०. एकुवेरीन:- भारत व मालदीव
२१. मिलन :- भारतासह ९ देश
२२. JIMEx:- भारत व जपान
२३. CORPAT:- भारत व बांगलादेश
भारत रत्न पुरस्कार विजेता व वर्ष
डॉ. चन्द्रशेखर वेंकटरमण ➾ 1954
चक्रवर्ती राजगोपालाचारी ➾ 1954
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ➾ 1954
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया ➾ 1955
डॉ. भगवान दास ➾ 1955
जवाहर लाल नेहरू ➾ 1955
गोविन्द वल्लभ पंत ➾ 1957
महर्षि डॉ॰ धोंडो केशव कर्वे ➾ 1958
राजर्षि पुरुषोत्तम दास टंडन ➾ 1961
डॉ॰ बिधान चंद्र राय ➾ 1961
डॉ. राजेन्द्र प्रसाद ➾ 1962
डॉ. जाकिर हुसैन ➾ 1963
डॉ. पांडुरंग वामन काणे ➾ 1963
लाल बहादुर शास्त्री (मरणोपरांत) ➾ 1966
इंदिरा गांधी ➾ 1971
वराहगिरी वेंकट गिरी ➾ 1975
कुमारस्वामी कामराज (मरणोपरांत) ➾ 1976
मदर टेरेसा ➾ 1980
आचार्य विनोबा भावे (मरणोपरांत) ➾ 1983
खान अब्दुल गफ्फार खान ➾ 1987
मरुथुर गोपालन रामचंद्रन (मरणोपरांत) ➾ 1988
डॉ. भीमराव अम्बेडकर (मरणोपरांत) ➾ 1990
नेल्सन मंडेला ➾ 1990
सरदार वल्लभ भाई पटेल (मरणोपरांत) ➾ 1991
मोरार जी देसाई ➾ 1991
राजीव गांधी (मरणोपरांत) ➾ 1991
मौलाना अबुल कलाम आजाद (मरणोपरांत) ➾ 1992
जे. आर. डी. टाटा ➾ 1992
सत्यजीत रे ➾ 1992
डॉ. एपीजे अब्दुल कलाम ➾ 1997
अरुणा आसफ अली (मरणोपरांत) ➾ 1997
गुलज़ारी लाल नंदा (मरणोपरांत) ➾ 1997
एम. एस. सुब्बुलक्ष्मी ➾ 1998
चिदम्बरम् सुब्रह्मण्यम् ➾ 1998
जयप्रकाश नारायण (मरणोपरांत) ➾ 1998
पंडित रविशंकर ➾ 1999
प्रोफेसर अमर्त्य सेन ➾ 1999
गोपीनाथ बोरदोलोई (मरणोपरांत) ➾ 1999
उस्ताद बिस्मिल्लाह खां ➾ 2001
लता मंगेशकर ➾ 2001
भीमसेन जोशी ➾ 2008
चिंतामणि नागेश रामचंद्र राव ➾ 2014
सचिन तेंडुलकर ➾ 2014
अटल बिहारी वाजपेयी ➾ 2015
मदन मोहन मालवीय ➾ 2015
नानाजी देशमुख (मरणोपरांत) ➾ 2019
प्रणब मुखर्जी ➾ 2019
भूपेन हजारिका (मरणोपरांत) ➾ 2019
महाराष्ट्रातील महत्त्वाचे पठारांची नांवे आणि जिल्हे
1) खानापुरचे पठार :- सांगली
2) तोरणमाळचे पठार :- नंदुरबार
3) पाचगणीचे पठार :- सातारा
4) तळेगांवचे पठार :- वर्धा
5) औधचे पठार :- सातारा
6) गाविलगडचे पठार :- अमरावती
7) सासवडचे पठार :- पुणे
8) बुलढाण्याचे पठार :- बुलडाणा
9) मालेगांवचे पठार :- नाशिक
10) यवतमाळचे पठार :- यवतमाळ
11) अहमदनगरचे पठार :- अहमदनगर
12) बालाघाटचे पठार :- उस्मानाबाद
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या!
'या' आहेत महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या!
आज आपण महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांविषयी माहिती घेऊ.
गोदावरी : वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
तापी : गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा.
कृष्णा : कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा.
भिमा : इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा.
पैनगंगा : कन्हान, वर्धा व पैनगंगा.
पुर्णा : काटेपुर्णा व नळगंगा.
सिंधफणा : बिंदुसरा.
मांजरा : तेरणा , कारंजी, घटणी, तेरू.
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन
२२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे. मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.
समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८२ वर्षांचे होते
२२ ऑगस्ट रोजी मुलायम सिंह यादव यांना रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मुलायमसिंह यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशात त्यांना नेताजी या नावानं ओळखले जात असे.
मुलायम सिंह यादव यंनी समाजवादी पार्टीची स्थापना केली होती. २०१९ मध्ये ते मैनपुरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मुलायम सिंह यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचं जुलै महिन्यात निधन झालं होतं. तर, पहिल्या पत्नी मालती देवी यांचं २००३ मध्ये निधन झालं होतं.
मुलायम सिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला होता. मुलायम सिंह हे तरुणपणी कुस्ती खेळायचे. त्यांनी काही काळ कुस्तीचे मैदानही गाजवले. यानंतर मुलायमसिंह यादव यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून काम केले. यानंतर आपले राजकीय गुरू नत्थू सिंह यांच्या सानिध्यात आल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पहिले पाऊल ठेवले.
१९६७ साली ते पहिल्यांदा आमदार झाले. १९८२ ते १९८५ या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
मुलायम सिंह यादव हे लोहिया आंदोलनात हिरीरीने सहभागी झालेल्या तरुण नेत्यांपैकी एक होते.
४ ऑक्टोबर १९९२ रोजी मुलायम सिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.
ते आठवेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते. मुलायम सिंह यादव यांना तीनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला. तसेच त्यांनी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद भुषविले होते.
चालू घडामोडी
भारत सरकार अपंग आश्रितांची उत्पन्न मर्यादा कौटुंबिक पेन्शनसाठी 30% पर्यंत वाढवले.
संरक्षण आणि केंद्र सरकारच्या एम इंस्ट्रीस्ट ने मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांना/भावंडांना कौटुंबिक पेन्शनसाठी अपंग आश्रितांची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कुटुंब/निवृत्तीवेतन व्यतिरिक्त इतर स्त्रोतांमधून त्याचे एकूण उत्पन्न संबंधित सरकारी कर्मचारी/निवृत्तीवेतनधारकाने घेतलेल्या शेवटच्या वेतनाच्या 30% पेक्षा कमी असेल आणि त्यावरील स्वीकार्य महागाईत सवलत असेल तर मुल/भावंड आजीवन कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असेल.अशा प्रकरणांमध्ये आर्थिक लाभ 08 फेब्रुवारी 2021 पासून लागू होईल.
सध्या, अपंग मूल/भावंड कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे जर अपंग मुलाचे/भावाचे एकूण मासिक उत्पन्न कौटुंबिक पेन्शन व्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून रु. 9,000 मिळतील
पंतप्रधान संग्रहालय :-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2022 रोजी दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथे पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन केले.
पूर्वी हे संग्रहालय नेहरू मेमोरियल म्युझियम म्हणून ओळखले जात होते. त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय असे करण्यात आले आहे.
नेहरू मेमोरियल म्युझियमचे पंतप्रधान संग्रहालयात रूपांतर करण्यास केंद्र सरकारने 2018 मध्ये मान्यता दिली होती.
यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्याशी संबंधित आठवणी त्यात ठेवण्यात आल्या होत्या. आता त्यात देशाच्या सर्व 14 पंतप्रधानांची माहिती आहे.
या संग्रहालयासाठी सुमारे 271 कोटी रुपये खर्च आला आहे. संग्रहालयात दोन ब्लॉक आहेत. त्यांचे एकूण क्षेत्रफळ 15,600 चौरस मीटरमध्ये आहे.
निधी 2.0’ योजना
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘निधी 2.0’ योजना सुरू केली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 2021 च्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान NIDHI 2.0 (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा राष्ट्रीय एकात्मिक डेटाबेस) योजनेचे उद्घाटन केले आहे.
NIDHI 2.0 डेटाबेसमध्ये केवळ समावेशक युनिट्सच नव्हे तर ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर आणि इतरांचा समावेश करून अधिक समावेशकता असेल.
NIDHI योजनेबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स :-
पर्यटन मंत्रालयाद्वारे NIDHI योजना पर्यटन क्षेत्राचे डिजिटायझेशन सुलभ करण्यासाठी आणि आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी व्यवसाय करण्यास सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व निवासस्थानाच्या युनिटला आतिथ्य उद्योगाचा भाग बनण्यासाठी व्यासपीठावर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करून सुरू करण्यात आले.
या प्रसंगाचा एक भाग म्हणून, पर्यटन मंत्रालयाने संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि द रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया (RTSOI) यांच्यात एक परस्पर पर्यटन क्षेत्रात ‘टिकाऊपणाच्या उपक्रमांना’ सक्रियपणे प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी सामंजस्य करार केला.
वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
वाटाण्याच्या अक्षता लावणे : स्पष्टपणे नाकारले.
वठणीवर आणणे : ताळ्यावर आणणेे.
वणवण भटकणे : एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे.
वाचा बसणे : एक शब्द येईल बोलता न येणे.
विचलित होणे : मनाची चलबिचल होणे.
विसंवाद असणे : एकमेकांशी न जमणे.
वड्याचे तेल वांग्यावर काढणे : एकाचा राग दुस-यावर काढणे.
विडा उचलणे : निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.
वेड घेऊन पेडगावला जाणे : मुद्दाम ढोंग करणे.
शब्द जमिनीवर पडू न देणे : दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.
शहानिशा करणे : एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.
शिगेला पोचणे : शेवटच्या टोकाला जाणे.
शंभर वर्ष भरणे : नाश होण्याची वेळी घेणे.
श्रीगणेशा करणे : आरंभ करणे.
सहीसलामत सुटणे : दोष न येता सुटका होणे.
दगा देणे : फसवणे.
दाद मागणे : तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.
दात धरणे : वैर बाळगणे.
दाढी धरणे : विनवणी करणे.
दगडावरची रेघ : खोटे न ठरणारे शब्द.
वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
दातांच्या कन्या करणे : अनेक वेळा विनंती करून सांगणे.
दाती तृण धरणे : शरणागती पत्करणे.
दत्त म्हणून उभे राहणे : एकाएकी हजर होणे.
दातखिळी बसणे : बोलणे अवघड होणे.
द्राविडी प्राणायाम करणे : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.
दात ओठ खाणे : द्वेषाची भावना दाखवणे.
दोन हातांचे चार हात होणे : विवाह होणे.
दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे : दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.
दातास दात लावून बसणे : काही न खातो उपाशी राहणे.
दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.
धारातीर्थी पडणे : रणांगणावर मृत्यू येणे.
धाबे दणाणणे : खूप घाबरणेे.
धूम ठोकणे : वेगाने पळून जाणे.
धूळ चारणे : पूर्ण पराभव करणे.
नजरेत भरणे : उठून दिसणे.
नजर करणे : भेटवस्तू देणे.
नाद घासणे : स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्याचे पाय धरणे.
नाक ठेचणे : नक्शा उतरवणे.
नाक मुरडणे : नापसंती दाखवणे.
नाकावर राग असणे : लवकर चिडणे.