08 August 2020

आजच्याच दिवशी कलकत्त्यातील टाऊन हॉल येथून स्वदेशी आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली होती...

🔸7 जुलै 1905 रोजी सिमला येथून लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली.

🔸19 जुलै- सरकारने अधिकृतरीत्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🔸20 जुलै-बंगालचे विभाजन दोन भागात करण्यात आले.

🔸7 ऑगस्ट-फाळणी अंमलात येण्याच्या आधीच देशभरात वंगभंग व स्वदेशी चळवळ सुरू.

🔸16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली व बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.

🔸बंगाल प्रांताच्या विभाजनाची जबाबदारी ही पूर्णत: कर्झनची असली तरी मूळ कल्पना मात्र त्याची नव्हती.

👉सदरील फाळणीची योजना ही विल्यम वार्ड कल्पनेनुसार बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रयू फ्रेजर (फाळणीच्या योजनेचा जनक) याने आखली होती...

🔸फाळणीचे कारण काय दर्शविले- प्रशासकीय सीमांचे पुननिर्धारण...

🔸 फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुसऱ्या आयर्लंडमध्ये होईल असा इशारा निसंदिग्ध शब्दात कृष्णकुमार मित्रा यांनी 'संजीवनी' मधून दिला.

🔸ही स्वदेशी चळवळ प्रामुख्याने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आली.

🔸जमीनदार,शेतकरी,कामगार,स्त्रिया,विद्यार्थी हा वर्ग या चळवळीत सहभागी झाला परंतु या चळवळीची उणीव म्हणजे यात मुस्लिम गटाचा विशेष करून मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही.

वंगभंग आंदोलन-
🔸16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून पाळला.स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.

🔸बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील 'वंदे मातरम' हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा वर बहिष्कार टाकला.

🔸डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांनी 'बंगाल केमिकल्स' हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

🔸या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी,कृष्णकुमार मित्रा (संजीवनी वृत्तपत्राचे संपादक),आनंद मोहन बोस,गुरुदास बॅनर्जी,रवींद्रनाथ टागोर यांनी केले.

🔸महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेनेही या चळवळीत साथ दिली.
🔸1905 च्या बनारस अधिवेशनात (अध्यक्ष-गोखले) बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध.

🔸1906 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असल्याचे सांगत स्वराज,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यास मंजुरी दिली.
अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी 'चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा' असा संदेश दिला.

👉बंगालची फाळणी रद्द करण्या संबंधीचा ठराव ढाक्याचा नवाब ख्वाजा आतिकुल्ला यांच्याकडून मांडला गेला.

🔸लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुञी कार्यक्रम भारतीयांना दिला.

🔸पुढे वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 (लक्षात ठेवायला सोप्प 😊 12-12-11) रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty)

◾️देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.

🔰 निरपेक्ष दारिद्रय  (Absolute Poverty) :

◾️दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.

🔰 राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.

वारे व त्यांचे प्रकार

🔥दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. 

🔥दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात

🔥भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. 

🔥कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते.

❗️ गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties)

🔥 ४०° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना ‘गरजणारे  चाळीस’ (Roaring Forties) असे म्हणतात. 

❗️ खवळलेले पन्‍नास’ (Furious Fifties)

🔥५०° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना यां ‘खवळलेले
पन्‍नास’ (Furious Fifties) म्हणतात.

❗️किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)

🔥६०°दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना यां ‘किंचाळणारे साठ’ (Screeching Sixties)म्हणतात.

वातावरणाचे थर -


वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते...

👉 वातावरणाचे मुख्य थर (प्रकार)

🔸तपांबर -भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर.याची सरासरी जाडी ११ किमी.या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात.पाऊस,वारे,ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात...

🔸तापस्तधी-तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय.उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते...

🔸स्थितांबर-तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय.या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण नसतात व हवा शुष्क असते...

🔸स्थितस्तब्धी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.या थरातील तापमान स्थिर असते.या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो.हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो...

🔸मध्यांबर-स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय.या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते...

🔸मध्यस्तब्धी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तब्धी होय...

🔸दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय.या थरात उंचीनुसार तापमान वाढते...

🔸आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे.या थरात उंचीनुसार तापमान वाढते.या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात...

🔸बाह्यांबर - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांबर होय.भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे.या थरातील विविध वायूंचे अणू,रेणू,पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात..

चक्रवर्ती समिती (Chakravarty Committee)

🌻भारतीय मौद्रिक प्रणालीच्या कामकाजासंबंधीचा अभ्यास करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती.

☂१९७० ते १९८०च्या दशकात सरकारकडून पैशाची सतत होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक सरकारला जास्तीत जास्त कर्ज देत होती.

☂त्यासाठी लागणाऱ्या चलनाच्या उभारणीसाठी बँकांच्या वैधानिक रोखता गुणोत्तरात (statutary liquidity ratio) सतत वाढ केली जात होती.

☂त्यामुळे ‘राखीव चलनात’ किंवा ‘मूळ चलनात’ वाढ होऊन देशातील चलन पुरवठ्यातही वाढ होत होती. त्याचा परिणाम म्हणजे, महागाईचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता.

☂अशा वेळी चलन पुरवठ्यातील वाढ रोखण्यासाठी रिझर्व बँक ही बँकांच्या ‘आवश्यक रोख राखीव गरजेवर’ (Cash Resrve Requirment) सतत वाढ करत होती.

☂या चक्रातून बाहेर पडून येणाऱ्या काळात महागाईमुक्त नियोजित विकास कसा साध्य करता येईल, हे ठरविण्यासाठी प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ सुखमय चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली.

☂शिफारसी : चक्रवर्ती समितीने मौद्रिक प्रणालीच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व बँक व भारत सरकार यांनी १९८१ पर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांचा व अभ्यासगटांच्या अहवालांचा आधी सखोल अभ्यास केला.

☂त्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये समितीने आपला अहवाल रिझर्व बँकेला  सादर केला

पॅनकार्डच्या 10 अंकांमध्ये बरीच महत्वाची माहिती दडलेली आहे,जाणून घ्या त्याचा अर्थ


📌  _पॅनकार्डमध्ये जन्माच्या तारखेच्या खाली 10-अंकी पॅन लिहिलेले असते. त्याची सुरूवात इंग्रजीतील काही मोठ्या अक्षरे ने केली जाते._

🔅 *पहिल्या तीन अंकी:*
आयकर विभागानुसार कोणत्याही पॅनचे पहिले तीन अंक इंग्रजी वर्णमाला मालिका दाखवतात. या वर्णमाला मालिकेत एएए ते झेडझेडझेड अशी कोणतीही तीन-अक्षरी इंग्रजी मालिका असू शकतात. याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे.

🔅 *पॅनचे चौथे पत्रः पॅनच्या चौथ्या पत्रात*
आयकर भरणाऱ्याची स्थिती दर्शविली जाते. चौथ्या क्रमांकावर पी असेल तर हे पॅन क्रमांक एका व्यक्तीचे वैयक्तिक साधन असल्याचे दर्शवते.

▪️F दर्शविते की संख्या एका फर्मची आहे.
▪️सी कंपनी दाखवते -एआरई
ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन
▪️टी टी-टीआरईएसटी-बडी
ऑफ बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल-
एल लोकलमधून
▪️जे कृत्रिम न्यायिक व्यक्ती-
जी सरकारकडून.

🔅 *पॅनचा पाचवा अंक –* पॅनचा पाचवा अंकही
एक इंग्रजी पत्र आहे.

हे पॅनकार्ड धारकाच्या *आडनावाचे* पहिले अक्षर दर्शविते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे आडनाव जाधव  असेल तर पॅनचा पाचवा अंक जे.

🔅 *सहाव्या ते नवव्या अंकांच्या*
आडनावाचे पहिले अक्षर त्यानंतर चार अंकी असते. या संख्या 00001 ते 9999 दरम्यान कोणतेही चार अंक असू शकतात. या आकडेवारी त्या काळात चालू असलेल्या आयकर विभागाची मालिका दाखवते.

🔅 *दहावा अंक*
पॅनकार्डचा दहावा अंकही  एक इंग्रजी पत्र आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार तो एक अक्षराचा चेक अंक असू शकतो. हे ए ते झेड दरम्यानचे कोणतेही पत्र असू शकते.

Online Test Series

07 August 2020

Daily Questions and answers



१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

महत्त्वाचे प्रश्नसंच

०१] हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२] भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३] कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow’s Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४] कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५]  हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६] फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७] मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८] भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९] नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०] महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११] महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२]  परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३] ‘V’ आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४] दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५] बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६] Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७] हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८] पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९] पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०] गोवरी’ कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१] घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२] ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३] या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४]  कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५]   भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६] जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७] भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८]  इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्‍यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९] पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०] वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्‍ट्र

३१]  लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२] फिग्रीन ऑफ गोरा देव’ (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३] पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४] कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५] झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६] भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७] महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८] कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९] महाराष्ट्रातील कोणता प्रदेश ‘तलावाचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०]  राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१] महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२] ‘श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प’ कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३] महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४] महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला

४५] महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी

४६]  कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा

४७] महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.

४८] महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९] यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?

>>> वणी

५०] मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> अमरावती

विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी 
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी 
८)  संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा  -  प्रत्यय नाही  -  प्रत्यय नाही      
२) द्वितीया  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते   
३) तृतीया  -  ने, ए, शी  -  नी, शी, ही    
४) चतुर्थी  -  स, ला, ते  -  स, ला, ना, ते    
५) पंचमी  -  ऊन, हून  -  ऊन, हून    
६) षष्ठी  -  चा, ची, चे  -  चे, च्या, ची  
७) सप्तमी  -  त, ई, आ  -  त, ई, आ  
८) संबोधन  -  प्रत्यय नाही  -  नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती  -  (एकवचन)  -  (अनेकवचन)

१) प्रथमा -  फूल  -  फुले
२) द्वितीया  -  फुलास, दुलाला  -  फुलांस, फुलांना
३) तृतीया  -  फुलाने, फुलाशी  -  फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी  -  फुलास, फुलाला  -  फुलांस, फुलांना
५) पंचमी  -  फुलातून, फुलाहून  -  फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी  -  फुलाचा, फुलाची, फुलाचे  -  फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी  -  फुलात  -  फुलांत
८) संबोधन  -  फुला  -  फुलांनी

कलम 370 काय आहे ?


.
जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 वरून राजकीय नेते आणि पक्षांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.अनेक दिवसांनी कलम 370 चा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.कलम 370 मध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, त्यांचा संभाव्य फायदा आणि तोटा काय आहे, हे खाली विस्तृतपणे देण्यात आले आहे.
कलम 370 मधील प्रमुख मुद्दे
.
1) कलम 370 लागू झाल्यामुळे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. म्हणजेच हे राज्य विशेष स्वायत्तता असलेले राज्य आहे.
.
2) कलम 370 मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे.
.
3) इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.
.
4) या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.
5) कलम 370 मुळेच जम्मू-काश्मीरवर 1976 चा शहरी भूमी कायदा लागू होत नाही. याचाच अर्थ जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जमीन खरेदी करूशकत नाही.
.
6) एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तर तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.
.
7) याशिवाय ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे ते भारतीय घटनेचे कलम 360 देखील जम्मू-काश्मीरवरलागू होत नाही.
.
8) भारतातील सर्व राज्यांमध्येलागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत.
.
9) जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. तसेच, इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम 370 द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे.
.
10) पाकिस्तानने 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम370 अस्तित्वात आले.
.
11) 50 दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम 370 च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे. जम्मू-काश्मीर पूर्णपणे एकीकृत व्हावे, असे त्यांना वाटते.समर्थनात केले जाणारे तर्क
कलम 370 कायम ठेवण्याच्या बाजूने बोलायचे झाल्यास या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चितकरण्याचा अधिकार मिळतो. केंद्रसरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात.
.
* भारत आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या करारांनुसार या राज्याला भारताशी जोडणारा हा कायदा आहे. याचाच उल्लेख करत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले होते की, कलम 370 ची कायम चुकीचीव्याख्या होत आलेली आहे.
.
* या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते.
.
* जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत. कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो.
.
* जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठीभारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. तथापि, अल्पसंख्याकांच्
या हितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीर सरकारवर लावला जात आहे.