12 April 2024

महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

महात्मा जोतिबा फुले

�दि. ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती�


��या महामानवाचा जीवनपट��


इ.स. १८२७ - जन्म कटगुण, सातारा जिल्हा

इ.स. १८३४ ते १८३८ - पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.

इ.स. १८४० - सावित्रीबाईंशी विवाह.

इ.स. १८४१ ते १८४७ - स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.

इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.

इ.स. १८४७ - थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.

इ.स. १८४८ - मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

इ.स. १८४८ - भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

सप्टेंबर ७, इ.स. १८५१ - भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

इ.स. १८५२ - पूना लायब्ररीची स्थापना.

मार्च १५, इ.स. १८५२ - वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

नोहेंबर १६, इ.स. १८५२ - मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

इ.स. १८५३ - 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.

इ.स. १८५४ - स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी

इ.स. १८५५ - रात्रशाळेची सुरुवात केली.

इ.स. १८५६ - जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.

इ.स. १८५८ - शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

इ.स. १८६० - विधवाविवाहास साहाय्य केले.

इ.स. १८६३ - बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .

इ.स. १८६५ - विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

इ.स. १८६४ - गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

इ.स. १८६८ - दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

इ.स. १८७३ - सत्यशोधक समाजची स्थापना केली.

इ.स. १८७५ - शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

इ.स. १८७६ ते १८८२ - पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

इ.स. १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

इ.स. १८८० - नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

इ.स. १८८२ - 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

इ.स. १८८७ - सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

इ.स. १८८८ - मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.

२८ नोव्हेंबर, इ.स. १८९० - पुणे येथे निधन झाले.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली .


भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी


🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी : देश📚


▪️ मलभूत हक्क : अमेरिका

▪️ नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ ससदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ सघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

महाधिवक्ता


भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 165 नुसार the डव्होकेट जनरलची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते . राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी अ‍ॅडव्होकेट जनरल असतात. अ‍ॅडव्होकेट जनरल राज्यपालांची कामे करतात. (राज्यपालांनी त्यांना कोणत्याही वेळी आपल्या पदावरून काढून टाकू शकते) उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश बनण्याची क्षमता त्यांच्यात आहे.


काम


Theडव्होकेट जनरल हे राज्यप्रमुखांना कायदेशीर सल्ला देण्यास जबाबदार असतात.राज्याच्या दोन्ही सभागृहात (विधानसभा आणि विधान परिषद) आणि सभागृहात बोलण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे असते. त्यांना विधिमंडळ सदस्यांना सर्व पगाराचे भत्ते आणि सुविधा मिळतात.उदाहरणार्थ भारतातील सर्व राज्यांमध्ये महाधिवक्ता आहेत. राज्यात समान परिस्थिती केंद्र Attorney टर्नी जनरलमधील महाधिवक्ताची स्थिती (अटर्नी जनरल) आहे. 


अॅटर्नी जनरल भारत 


भारत 's ऍटर्नी जनरल (ऍटर्नी जनरल) सरकार भारतीय s' मुख्य कायदेशीर सल्लागार सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या अग्रगण्य वकील आहे.


Theटर्नी जनरल ऑफ इंडिया (भाग of चे अनुच्छेद)) हे राष्ट्रपती नियुक्त करतात . सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची क्षमता असलेली एखादी व्यक्ती अशा व्यक्तीला राष्ट्रपती Attorneyटर्नी जनरल पदावर नियुक्त करू शकते.


देशाच्या अटर्नी जनरलचे कर्तव्य म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये केंद्र सरकारला सल्ला देणे आणि राष्ट्रपतींकडे त्याला पाठविलेल्या कायदेशीर प्रक्रियेच्या जबाबदा .्या पार पाडणे. या व्यतिरिक्त त्यांना घटना व इतर कोणत्याही कायद्यानुसार विहित केलेले काम पूर्ण करावे लागेल. कर्तव्य बजावताना त्याला देशातील कोणत्याही न्यायालयात हजर राहण्याचा अधिकार आहे. त्यांना कलम to नुसार संसदेच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क आहे, जरी त्यांना मतदानाचा अधिकार नाही. सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल त्यांच्या कामात त्यांना मदत करण्यासाठी आहेत. सॉलिसिटर जनरल हा भारताचा दुसरा कायदा अधिकारी आहे. ज्याप्रमाणे अॅटर्नी जनरल हे पद हे घटनेचे उत्पादन आहे, त्याचप्रमाणे सॉलिसिटरचे पद हे भारत सरकारचे उत्पादन आहे.


🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

तुम्हाला हे माहीत आहे का


● लोकसभा


- 17 वी लोकसभा निवडणूक नुकतीच संपन्न झाली. 

- 4 जून 2014 (पहिले अधिवेशन) ते 3 जून 2019 हा 16 व्या लोकसभेचा कालावधी होता. 


● सदस्य 


- अधिकतम सदस्य संख्या 552 आहे. यामध्ये 530 सदस्य राज्याचे, 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशाचे तर 2 सदस्य ऑंग्लो इंडियन (राष्ट्रपती नियुक्त) नेतृत्व करतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- 2019 मध्ये ऑंग्लो इंडियनच्या लोकसभेतील नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. 

- सध्या सदस्य संख्या 545 आहे, यामध्ये 543 सदस्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाचे नेतृत्व करतात तर दोन सदस्य राष्ट्रपती नियुक्त आहेत. 

- सर्वात शेवटी 1971 च्या जनगणनेनुसार 1977 मध्ये लोकसभेची सदस्य संख्या वाढवण्यात आली होती. आता 2026 नंतर ही संख्या वाढवण्यात येईल.


● संसद भवन


- राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी 6 एकर परीसरात ही ऐतिहासिक वास्तू उभी आहे. 

- 244 खांब आणि तीन मजल्यांची ही इमारत लोकशाहीचं प्रतिक आहे. 

- लवकरच नवी संसद बांधली जाणार आहे.


● सेंट्रल हाॅल


- संसद भवनातील महत्त्वाची जागा.

- संसदेच्या दोन्ही गृहातील संयुक्त बैठकीला राष्ट्रपती येथेच संबोधित करतात. 

- संविधान सभेच्या बैठका याच हाॅलमध्ये पार पडल्या होत्या. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- स्वातंत्र्यानंतर गव्हर्नर जनरलने भारताची सत्ता पंतप्रधानांकडे येथेच सोपवली होती.

- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे पहिले भाषण "Tryst with Destiny" येथेच झाले होते. 


- नव्याने निवडूण आलेल्या लोकसभा सदस्यांना शपथ घेण्याअगोदर आणि घेतल्यानंतर जवळपास 40 प्रकारचे अर्ज सादर करावे लागतात.

- संसद कार्यप्रणालीची माहिती देणारे साहित्य आणि एक पेन ड्राईव्ह प्रथमच यावेळी सदस्यांना देण्यात आला आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

- स्नेहलता श्रीवास्तव (लोकसभा महासचिव)

- सुमित्रा महाजन (16 वी लोकसभा सभापती)

- ओम बिर्ला (17 वी लोकसभा सभापती)


अर्थशास्त्र समित्यांची यादी..............



1) रंगराजन समिती – निर्गुंतवणूक


2) नरसिंहम समिती - आर्थिक क्षेत्रातील सुधारणा


3) केळकर समिती - कर सुधारणा


4) मल्होत्रा   समिती - विमा सुधारणा


5) आबिद हुसेन समिती - लघुउद्योग


6) बेसल समिती - बँकिंग पर्यवेक्षण


7) चक्रवर्ती समिती - आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी चलनविषयक धोरणाची परिणामकारकता सुधारण्यासाठी आर्थिक व्यवस्थेवर काम करणे आणि उपाय सुचवणे.


8) दीपक पारेख समिती - UTI पुनरुज्जीवित करण्यासाठी


9) हनुमंत राव समिती - खत

पारिख समिती पायाभूत सुविधा वित्तपुरवठा


10) राजा चेल्ल्या समिती कर सुधारणा

रेखी समिती अप्रत्यक्ष कर


11) टंडन समिती - बँकांद्वारे कार्यरत भांडवल वित्तपुरवठा प्रणाली


12) तारापूर समिती – भांडवली खाते परिवर्तनीयता


13) वाघुल समिती - भारतातील मुद्रा बाजार


14) वायव्ही रेड्डी - आयकर सवलतींचा आढावा


15) अभिजित सेन समिती - दीर्घकालीन अन्न धोरण


16) अत्रेय समिती - आयडीबीआयची पुनर्रचना


17) भुरेलाल समिती - मोटार वाहन करात वाढ


18) बिमल जुल्का समिती - ATCOs च्या कामकाजाची स्थिती

१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी



आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नमंजुषा


 भारताची राजधाधी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. ?

1) लाँर्ड हार्डिग्ज 📚📚

2) लाँर्ड रिपन 

3) लाँर्ड चेम्सफोर्ड 

4) लाँर्ड लिटन




दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोणात घडले होते ?

 A) पुरोहित व विश्वामित्र 

 B) विश्वामित्र व भरत जमात 📚📚

 C) सुदास व वशिष्ठ 

 D) पुरु व विश्वामित् 



भौगोलिक, राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत कारण * 

 A) संवाद तंत्रज्ञान 

 B) नवी संवाद क्रांती 📚📚

 C) माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 

 D) डिजिटल टूल्स 


 


पहिल्या भारतीय अमेरिकन ज्यांची अमेरिकेच्या सिनेटवर निवड झाली आहे?

  1.कमला शिरीन 

 2. कमला हॅरीस 📚📚

  3.राधा नारायण 

  4.मृणालिनी रॉय




विकासाची क्षमता खालीलपैकी कोणत्या घटकावर अवलंबून असते ?

 A) व्यापाराची दिशा 

 B) आयात व्यापार 

 C) व्यापाराचे आकारमान 📚📚

 D) वरीलपैकी एकही नाही 



संगणक तंत्रज्ञानामुळे लोक याही बाबतीत व्यापार करू लागले

 A) वस्तू व सेवा 

 B) मानवी साधन संपत्ती 

 C) नैसिर्गिक साधन संपत्ती  

 D) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलन 📚




जेव्हा मधमाशी एका फुलानंतर दुस-या फुलास भेट देते, तेव्हा कोणती प्रक्रिया होते ?

 A) परागीकरण 📚📚📚

 B) फलन 

 C) पुनरुत्पादन 

 D) वरीलपैकी सर्व  




परिच्छेदास सुयोग्य नावं निवडा. 

 A) निर्यात प्रोत्साहन 

 B) संवाद तंत्रज्ञान 

 C) संवादक्रांती 

 D) परकीय व्यापार आणि आर्थिक विकास 📚📚




9.भारतातील ताजमहल ह्यावर कशाने परिणाम झाला

 A) तीव्र पर्जन्य 

 B) आम्ल पर्जन्य 📚📚

 C) सतत पर्जन्य 

 D) सूक्ष्म पर्जन्य 




.कार्बन डायऑक्साइडची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन _______ हे बनते

 A) HCO3 (aq) 

 B) H2CO3 (aq) 📚📚

 C) H2CO2 (aq) 

 D) H3CO3 (aq) 




लैंगिक पुनरुत्पादन तेव्हाच यशस्वी झाले असे म्हणता येईल, जेव्हा 

 A) परागकण अचूकपणे कुक्षीवर पडतील 

 B) परागनलिका बीजकोषात पोहचेल 

 C) फळांमध्ये बीजधारणा होईल 📚📚

 D) जैविक घटक परागीकरणात सहभागी असेल 



टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे ___ च्या कार्याशी संबंधित आहेत. 

 A) वारा 

 B) सागरी लाटा 📚📚

 C) हिमनदी  

 D) भूमिगत पाणी

चालू घडामोडी :- 11 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

11 April 2024

मध्ययुगीन भारताचा इतिहास


✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?
► बख्तियार खिलजी

✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?
► इल्तुतमिश

✺ मोर सिंहासन कोणी बांधले?
► शहाजहान

✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?
► बादलखान

✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?
► खुर्रम

✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज

✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?
► ताज बीबी बिल्कीस माकानी

✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?
► अर्जुमंदबानो

✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?
► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.

✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?
► असफ खान

✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?
► कंदहार

✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?
► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)

✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?
► शहाजहान

✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?
► आग्रा

✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?
► ताजमहाल

✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे

✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?
► १६३२ मध्ये

✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?
► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.

✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?
► मकराना (राजस्थान)

✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?
► शहाजहान

✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?
► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर

✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?
► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित

✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?
► रसगंगाधर आणि गंगालहरी

✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?
► दारा शिकोह

✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?
► सर-ए-अकबर!

✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?
► बलबन

✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?
► घियासुद्दीन तुघलक

शेकडेवारी

1) "कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)
125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्या.

500 चे 30% = 150     
500 चे 10% = 50   
30% = 10%×3
= 50×3 = 150
500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)
500 ची 1% = 5
:: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

उदा. 368 चे 12.5% = ?
368×12.5/100
= 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

उदा. 465 चे 20% = 93   
 
465×20/100
= 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

उदा. 232 चे 25% = 58
232×25/100
= 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

उदा. 672 चे 37.5% = 252   
 
672×37.5/100
= 672×3/8
= 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

उदा. 70 चे 50% = 35   
 
70×50/100
= 70×1/2
= 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

उदा. 400 चे 62.5% = 250  
   
400×62.5/100
= 400×5/8
= 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

उदा. 188 चे 75% = 141  
   
188×3/4
= 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

उदा. 888 चे 87.5% = 777  
   
888 × 87.5/100
= 888×7/8
= 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह द्या.

उदा. 25 चे 25% = 6.25
25 × 25/100
= 625/100
= 6.25"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रश्नसंच

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे


◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅


◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅


◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅


◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅


◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅


◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅


◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅


◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅


◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅


◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅


◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅


◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅


◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅


◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅


◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅


◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅

पश्चिमी वारे (Westerlies) (ग्रहीय वारे)




◼️ दोन्ही गोलार्धात मध्य अक्षांशीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून (25° ते 35° उ. व द.) दोन्ही गोलार्धात 60° अक्षवृत्ताजवळील कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◻️वैशिष्ट्ये : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◼️पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.


◻️म्हणजेच पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेत पश्चिमी वारे वाहतात.


◼️अश्व अक्षांश (Horse Latitude) : दोन्ही गोलार्धात 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा पट्टा शांत असतो, त्यास अश्व अक्षांश म्हणतात.


◻️गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : वायव्य प्रतिव्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात जलभाग (पाणी) सर्वाधिक तर भूभाग सर्वांत कमी आढळतो. कमी भूभागामुळे पश्चिमी वाऱ्यांना वाहताना कमी अडथळा उत्पन्न होतो, म्हणून 40° दक्षिण अक्षवृनापलीकडे पश्चिमी वारे घोंगावत-रोरावत व वेगाने वाहतात, म्हणून त्यांना 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा Repo Rate 6.5% कायम ठेवला


◾️भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे 

⭐️रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे

⭐️2023 मध्ये

🔥भारत ($125 अब्ज)

🔥मेक्सिको ($67 अब्ज)

🔥चीन ($50 अब्ज)

🔥फिलिपिन्स ($40 अब्ज)


◾️ ग्रीन जीडीपी सध्या चर्चेतील विषय आहे

⭐️ आपल्या जीडीपी मधून पर्यावरणाचे हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ग्रीन GDP

⭐️चीनने 2006 मध्ये ग्रीन जीडीपीच्या आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर पुन्हा जाहीर केले नाही

⭐️भारताने ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी 2013 मध्ये पार्थ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती

⭐️ग्रीन जीडीपीला विरोध होतो कारण विकसनशील देशांना अडथळा देण्यासाठी विकसित देश Green GDP काढयला सांगतात हे एक कारण आहे


◾️लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी शाईचा महापुरवठा करण्यासाठी कर्नाटकच्या बंगलोर मधील "मैसूर पेटंट्स व व्हार्निश" कंपनीला काम देण्यात आलेले आहेत

⭐️हीच कंपनी जगभरातील 25 देशांना मतदानासाठी शाईचा पुरवठा करतो

⭐️कर्नाटक सरकार ही काम 1962 सालापासून करत आहे


◾️एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजी नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो


⭐️पहिला : बांगलादेश 

⭐️दुसरा : पाकिस्तान 

⭐️तिसरा : भारत 

⭐️चौथा : तजाकिस्तान 

⭐️भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता 147 इतकी आहे


◾️भाग्यश्री फंड डबल महाराष्ट्र केसरी

⭐️वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही विजेती ठरली

⭐️भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविला 

⭐️भाग्यश्री ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे


◾️पंतप्रधान सूर्यघर योजना

⭐️सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी

⭐️या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे

⭐️केंद्र सरकारकडून 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

⭐️योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला


◾️आतापर्यंत च्या लोकसभा निवडणुकीत 1984 काँग्रेसच्या 404 जागा निवडणूक आल्या होत्या

⭐️राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले

⭐️इंदिरा गांधी हत्येच्या नंतर

⭐️याच निवडणुकीत भाजपा ला 2 जागा भेटल्या होत्या


◾️झारखंड मधील नक्षलग्रस्त जिल्हा सिंह भूम मध्ये पहिल्यांदाच म्हणजे दशकांच्या नंतर मतदान होणार आहे

मतदान साहित्य हेलिकॉप्टरमधून आणले जाणार आहे

⭐️ मतदानासाठी एकूण 118 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे


◾️ऑपरेशन ॲनाकोंडा हे झारखंड मधील नक्षलवाद कमी करण्याचे संबंधित आहे


◾️इक्वेडोरच्या पर्यावरणवादी मूळनिवासी नेमोन्ते नेन्किमो यांना 'टाइम अर्थ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

⭐️2020 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण अभियानात प्रेरणादायी कार्याबद्दल 'चौम्पयन्स आफ द अर्थ' या सन्मानाने गौरविण्यात आले.

त्या स्वयंसेवी संस्था 'सेईबो अलायन्स' आणि 'अॅमेझॉन फ्रंटलाइन्स'च्या संस्थापक आहेत


◾️जागतिक बँक समूहाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

⭐️जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944, ब्रेटन वुड्स, न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेचे अध्यक्ष : अजय बंगा


◾️प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण 

⭐️8 एप्रिल 2015 ला योजनेची सुरवात ( नवी दिल्ली)

⭐️या योजनेंतर्गत बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी, लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.


◾️8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन ' नावाची पहिली त्रि-सेवा सशस्त्र दल नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

⭐️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक

⭐️या बैठकीला 

◾️भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे

◾️ भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 

◾️भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार

हे उपस्थित होते





10 April 2024

आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान


सुरुवात :-

राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.



उद्देश :-


शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.


प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.


या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.


अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.


अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-


सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे

44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.

देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने

🇮🇳 भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती. 

👤 सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते. 

🌼 तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.


🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

पोलीस भरती टेस्ट सिरीज

1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) 369
2) 547
3) 639 ✅
4) 912

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1)  अ 
2) ब ✅
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1)  सायकल 
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅

7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1)  23.52                                       
2) 235.2
3) 230.52
4) 2.352 ✅

8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन 

9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात.
1)  निकेल 
2) रबर
3) रबर
4) सूची✅

10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1)  ऑक्सीजन ✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

पंचायत राज ग्रामप्रशासन


निवडणूक खर्च मर्यादा 


पंचायत समिती सदस्य 

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 


💬 71 ते 75 निवडणूक विभाग 

     असलेला जिल्हा 

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


जिल्हा परिषद सदस्य


💬 71 ते 75 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते 


▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. 


▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. 


▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. 


▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.


▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. 

16 वा केंद्रीय वित्त आयोग


🕒कालावधी - 2026 ते 2031


✅अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  

✅सचिव :- रित्विक रंजन पांडेय 


💌4 सदस्य 


✅1. (निरंजन राजाध्यक्ष )  मनोज पांडा

✅2. अजय नारायण झा

✅3. एनी जॉर्ज

✅4. सौम्य क्रांती घोष



केंद्राने 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती केली


🔸मनोज पांडा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक, 16 व्या वित्त आयोगावर नियुक्त.


🔹पांडा यांनी निरंजन राजाध्यक्ष यांची जागा घेतली, ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि धोरण विश्लेषणात कौशल्य आणले.


🔸CESS हैदराबाद आणि IGIDR मुंबई येथील पार्श्वभूमीसह, पांडाच्या समावेशाचा उद्देश आयोगाच्या आर्थिक मूल्यमापनांना समृद्ध करणे आहे.


🔹16 व्या एफसीचे अध्यक्ष: डॉ. अरविंद पनागरिया


आजच्या दिवशी पोस्ट थोडी बरी नाही ठरणार पण तरीही लिहीत आहे...

MPSC vs विद्यार्थी




मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,

३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...




ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,

१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,

मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,




आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,




मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,

४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,

तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....




काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??




२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,

तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)




माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...

कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,

मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...




तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,

पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...




एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)




बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,




आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),

७००० जण क्लर्क होतील,

बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...




मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???







१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,

तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),

सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,




तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,




आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...

यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?

चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.