२० जून २०२४

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना


👉 1. महंमद गझनवी :-

अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या करून पंजापर्यंत प्रांत आपल्या राज्याला जोडला होता. 


👉 सन 998 मध्ये त्याचा मुलगा महंमद हा गझनचा सुलतान झाला. 


👉 तयाने सन 1001 ते 1027 पर्यंत भारतावर सतरा स्वार्‍या केल्या. या स्वार्‍या करतांना राज्य स्थापनेऐवजी भारतातील संपत्ती लुटून नेणे हा त्यांचा मुख्य हेतु होता. 


👉 तयाने मथुरा व सोमनाथचे मंदिर लुटून अमाप संपत्ती गझनीला नेली. 


 2. महंमद घुरी 


👉 महंमद घुरी हा अफगाणिस्तानमधील एक सुलतान होता. महंमद गझनवी स्वार्‍यानंतर दीडशे वर्षांनी त्याने भारतावर आक्रमण केले. 


👉 सन 1992 मध्ये तराईनच्या सुद्धा दिल्लीचा राजा पृथ्वीराज चव्हाण याचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली त्यानंतर कनोजचा राजा जयचंदचा पराभव करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घेतले पुढे त्याने बंगाल व बिहारवर आक्रमण करून सत्ता स्थापित केली. 


👉 तयाने जिंकलेल्या प्रदेशाचा राज्यकारभार बघण्याकरिता आपला विश्वासू सरदार कुतूबुद्दीन ऐबकची नियुक्ती केली. 


👉  अशाप्रकारे भारतात मुस्लिम साम्राज्य प्रस्तापित झाले. त्यानंतरच्या काळात दिल्लीच्या गादिवर खालील सत्ताधीश आले.


 3. कुतूबुद्दीन ऐबक (सन 1206 ते 1210) :
 
👉 सन 1206 मध्ये महंमद घुरी मरण पावला. त्यानंतर कुतूबुद्दीन ऐबकने स्वत:ला स्वतंत्र राजा म्हणून घोषित केले. 

👉 याच काळात ऐबकने दिल्लीच्या कुतुबमिनारच्या बांधकामास सुरवात केली. 

👉 सन 1210 मध्ये तो मरण पावला. 

👉 तयाच्या ठिकाणी त्याचा बदायुनचा सुभेदार आणि कुतूबुद्दीन ऐबकचा जावई अल्तमश सत्तेत आला.


👉 4. शमशूद्दीन अल्तमश (सन 1210 ते 1226) :

कुतूबुद्दीन ऐबकच्या मुत्यूनंतर काही सरदारांनी अल्तमशविरुद्ध बंडखोरी केली होती. ती ऐबकने मोडून काढली आणि स्थिरता प्रस्थापित केली. 

👉 बगदादच्या खलीपाने त्यास भारताचा सुलतान म्हणून मान्यता दिली. 

👉 अल्तमश हा दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून ओळखला जातो. 

👉 अल्तमशला सुलतान म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याने टका नावाचे नाणे सुरू केले होते. त्याने आपल्या हयातीमध्ये कुतूबमिनारचे बांधकाम पूर्ण केले.


👉 5. रझिया सुलतान (सन 1226 ते 1240) :

अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रझिया सुलतान दिल्लीच्या राजगादिवर आली. ती प्रजादक्ष आणि कर्तबगार स्त्री होती. 

👉 परंतु, दिल्लीच्या सिंहासनावर एक स्त्री असने हे सरदारांना खपत नव्हते. 

👉 दिल्लीचे सुलतान पद भूषविणारी ती एकमेव पहिली महिला होती. 

👉 सन 1240 मध्ये तिचा वध करण्यात आला.


 6. गियासुद्दून बल्बन (सन 1266 ते 1287) :

👉 रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या गादीवर काही प्रमाणात अस्थिरता आली होती. सन 1266 मध्ये गियासुद्दीन बल्बन हा दिल्लीचा सुलतान झाला. 

👉 तयाने आपल्या विरोधकाचा बंदोबस्त करून आपली सत्ता मजबूत केली. 

👉 तात्काळ युद्ध करता यावे म्हणून त्याने खडे सैन्य ठेवण्याची प्रथा सुरू केली. यामुळे तास वायव्य सीमेवर मंगोलाचा बंदोबस्त करता आला. 

👉 उर्दू भाषेचा रचयिता आणि प्रसिद्ध कवि या राजाचा दरबारी होता.


👉 8. अल्लाऊदीन खिलजी (सन 1296 ते 1316) :


👉 अल्लाऊद्दीन खिलजी हा महत्वाकांक्षी होता. त्याने अल्पावधीतच संपूर्ण भारत आपल्या नियंत्रणाखाली आणला. 

👉 सम्राट अशोकानंतर संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्तापित करणारा अल्लाउद्दीन खिलजी हा दूसरा राजा होय. 

👉 अल्लाउद्दीन खिळजीचा साम्राज्य विस्तार :-

👉 सन 1299 मध्ये त्याने गुजरातवर आक्रमण करून गुजरातवर सत्ता प्रस्तापित केली. 

👉 तयानंतरच्या काळात राजपुताना, मेवाड, माळवा व राजस्थानवर ताबा मिळविला. 

👉 सन 1306 मध्ये त्याचा सेनापती मलिक कफुरने दक्षिणेकडे मोहीम काढून दिवगिरी, तेलंगणा, मुदराईवर ताबा मिळविला. 

👉 अशाप्रकारे अल्पावधीतच संपूर्ण भारत नियंत्रणाखाली आणला. 

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील सुधारणा :-

👉 महसूल व्यवस्थेत सुधारणा :-
अल्लाउद्दीन खिलजीने जमिनीची मोजणी करून जमिनीच्या उत्पादकेनुसार शेतसारा निश्चित केला.

👉बाजार नियंत्रण व्यवस्था :-

👉 सन्यास खाद्यन्न आणि आवश्यक गरजेच्या वस्तु योग्य दरात उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्याने नियंत्रित बाजार व्यवस्था सुरू केली. 

👉 या मालाचे भाव सरकारमार्फत निश्चित केले जात असे. 

👉 तयाकरिता त्याने स्वतंत्र विभाग सुरू केला होता.


👉 9. गियासुद्दीन तूघलक (सन 1320 ते 1325) :

👉 अल्लाउद्दीन खिलजीच्या मुत्यूनंतर त्याचा मुलगा ख्रुस्त्रो खान सत्तेत आला. 

👉 वायव्य सरहद्द प्रांताचा प्रांधिकारी गियासुद्दीन तुघलकने ख्रुस्त्रोखानचा खून करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली आणि तुघलक वंशाची स्थापना केली.

👉 ह सुख त्याला फार दिवस उपभोगता आले नाही. 

👉 तयाचा मुलगा महंमदबिन तुघलकने कपटाने त्याला ठार करून दिल्लीची सत्ता हस्तगत केली.



👉 10. महंमदबिन तुघलक (सन 1325 ते 1351) :-

👉 महंमदबिन तुघलक हा उतावीळ्या स्वभावाचा आणि व्याहारकी दृष्टीकोणाच्या अभावामुळे त्या राबवितांना त्यास अपयश आले. 

👉 दआबमध्ये करवृद्धी (सन1326) :-
दूआब भारतातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. या प्रांतातील शेतकर्‍यांवर कराची वाढ केली. 

👉 ही योजना लागू करतांना दूआबमध्ये दुष्काळ पडला आणि अधिकार्‍यांनी जबरदस्तीने कराची वसूली केली. यामुळे दूआबमध्ये बंड झाले. 

👉 दवगिरी भारताची राजधानी (1326) :-
दिल्लीचा बादशहा महंमदबिन तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवरती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली.

👉 सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह दिवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. 

👉 परंतु, दौलताबाद येथे साधंनाचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. 

👉 या काळात देवगिरीला भारताच्या राजधानीच सन्मान प्राप्त झाला होता.
चलन व्यवस्थेत सुधारणा (सन 1329) :-
महंमदबिन तुघलकने मुद्रापद्धतीत सुधारणा करून तांब्याची मुद्रा प्रचारात आणली आणि सोन्याच्या मुद्रेच्या मोबदल्यात तांब्याची नाणे चलनात आली. 

👉 लोकांनी घरीच टाकसाळ सुरू केला. 

👉 बाजारात तांब्याच्या चलनाचा सुळसूळाट होवून सोन्याची नाणी गायब झाली.


👉 11. फिरोझशहा तुघलक (सन 1351 ते 1388) :-

👉 महंमदबिन तुघलक नंतर त्याचा मुलगा फिरोझशहा तुघलक सुलतान झाला. हा उत्तमप्रशासक होता. त्याने लोककल्याणाची काम सुरू केली यामुळे तो विशेष प्रसिद्धीला आला होता. 

👉 तयाने लोकांना जाचक असलेले कर रद्द करून फिरोझपूर, जौनपूर, हिस्सार व फिरोझाबाद ही नवीन शहरे बसविली सतलज आणि यमुना नदीवर कालवे काढले. 

👉 फिरोजशहा तुघलक नंतर सत्तेत आलेले तुघलक घराण्याचे वारस कमकुवत निघाले. 

👉 सन 1398 मध्ये मध्य आशियाचा सरदार तैमुलंगने भारतावर स्वारी करून प्रचंड लूट केली. या लुटीमधून दिल्ली महंमदबिन तूघलकने सुद्धा सुटली नाही. 

👉 तयानंतर सन 1414 मध्ये तूघलक घराण्याची सत्ता संपूष्ठात आली. 

खिल्जी घराण्याचा कर्तबगार सुल्तान


🔹अल्लाउद्दीन खिलजी


सुलतान अल्लाउद्दीन खिलजी

अधिकारकाळ- १२९० ते १३१६

राज्याभिषेक- १२९६

राजधानी- दिल्ली

पूर्ण नाव- अल्लाउद्दीन जलालुद्दीन खिलजीलख्नौती (बंगाल)

मृत्यू- १३१६ दिल्ली

पूर्वाधिकारी- जलालुद्दीन फिरोझ खिलजी

उत्तराधिकारी- कुतुबुद्दीन मुबारक शाह

राजघराणे- खिलजी


अल्लाउद्दीन खिलजी (मृत्यू: इ.स. १३१६) इ.स.च्या तेराव्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने इ.स. १२९६ ते इ.स. १३१६ या कालावधीत राज्य केले. तो खिलजी घराण्यातील सर्वात कर्तबगार सुलतान समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर ह्याने कारभार चालवला.


अल्लाउद्दीन खिलजी हा दिल्लीवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातला दुसरा सुलतान होता. पहिला सुलतान त्याचा काका जलालुद्दीन खिलजी. अल्लाउद्दीनने गादीवर येण्यापूर्वी जलालुद्दीनची २२ ऑक्टोबर १२९६ला हत्या केली होती.

इग्रजांचे बंगालवर वर्चस्व

🔹 बगाल हा मोगली साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या काळात ठिकठिकाणी सुभेदार जसे स्वतंत्र बनले होते. तसा बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान हाही स्वतंत्र बनला होता. त्याच्यावर मोगल बादशहाचे नाममात्र वर्चस्व होते. तो १७५६ साली मृत्यू पावल्यावर त्याचा पुत्र सिराजउद्दोला हा बंगालच्या सुभेदारीवर आला. याच्यात कारकिर्दीत बंगालमध्ये इंग्रजांनी बाजी मारून इंग्रजी साम्राज्याचा पाया रचला.


* लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दोला लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. २३ जून १७५७ पुढे मीर जाफरचा पुत्र मिराण याने पकडून ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब केला.


* मीर कासीम हा बंगालचा नाममात्र सुभेदार बनू इच्छीत नव्हता. इंग्रजांना हि न आवडणारी गोष्ट होती. त्यांनी मीर कासीम विरुद्ध युद्ध पुकारून त्याचा अनेक लढायात पराभव केला १७६३ आणि मीर जाफर यास पुन्हा बंगालचा सुभेदार म्हणून जाहीर केले.


* १ मे मध्ये क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गवर्नर म्हणून आला. त्याने आल्याबरोबर शहा अलम बादशाही व अयोध्येच्या नवाबाशी करार करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. याच वेळी त्याने बादशहापासून बंगालच्या सुभ्याची दिवाणी मिळविली. त्यातूनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली. त्याच्या जागी त्याचा पुत्र नजमुद्दोला याला इंग्रजांनी बसविले. तोही पूर्णपणे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली राहिला.


📚दहेरी राज्यव्यवस्था


* १२ आगष्ट १७६५ रोजी मोगल बादशहा शहा आलम याने कंपनीस बंगालच्या दिवाणीचे फर्मान दिले. या फर्मानानुसार कंपनीस बंगालच्या सुभ्यातील महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु सुभ्याच्या राज्यकारभारातली व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या सुभेदारावारच राहिली. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे सर्वार्धाने वर्चस्व झाले.


* १७६९ - ७० मध्ये या वर्षी दुष्काळात १ कोटी माणसे अन्नान्न करून तडफडून मेली. कंपनीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत शेती बुडाली. शेवटी विलायत सरकारला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग अक्ट [१७६९ - ७० ] पास करावा लागला


महादजी शिंदे



पेशवाईतील मुत्सद्दी. इ.स. १७३०-१२ फेब्रुवारी १७९४ रोजी त्यांचे निधन झाले. पुण्यात शिंदे छत्री नामक त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.


महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जात. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.


सैनिकी कारकीर्द


दक्षिण भारत


महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.


उत्तर भारत


१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपुर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीचा सहभाग होता. यातील महादजीची महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६ बडी साद्री


मल्हाराव होळकरांच्या साथीत शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्ते खाली होते ते मराठा अख्यारीत आणून व येथील काही हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आला व मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र म्हणून शिंद्यांचा अधिपत्याखाली तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाहलेर येथे शिंद्यांचे केंद्र म्हणून बनवले.


ग्वालहेरचे शासक


जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्या कडे शिंदे घराण्याची सुत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्द मराठे असा मोठा सामना तयार झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीब कडून क्रुरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्दच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिररीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखिल लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सुत्रे महादजी कडे आली. मराठे अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा सस्थानिक बनले व ग्वाहलेर हे त्यांचे संस्थान बनले.


पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द


पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठयांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापीत करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगीरी केली.


पहिले इंग्रज-मराठा युद्ध


1७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसास नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले या बारभाई मध्ये महादजी व नाना फडणीसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.


वडगावची लढाई


१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.


१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासुन मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांना युद्दाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखिल वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचा सैन्याला पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्याला सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली


सिप्री येथील हार


ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅम नी ग्वाहलेर काबीज केले. वॉरन हेस्टींग नी महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटीशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखिल महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटीशांना आव्हान दिले. ब्रिटीशांच्या प्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटीशांच्या शिस्तबद्द सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटीशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.


सालबाईचा तह १७ मे १७८२


महादजीच्या इंग्रजांकडून पराभव झाल्या नंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदीने तहची बोलणी केली जो सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला व उज्जैन मध्ये माघार घ्यावी लागली.


इंग्रजाशी तहानंतर इंग्रजांशी असलेल्या शस्त्र संधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.


सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे


🔸काशी ➾ बनारस

🔹कोसल ➾ लखनौ

🔸मल्ल ➾ गोरखपुर

🔹वत्स ➾ अलाहाबाद

🔸चदी ➾ कानपूर

🔹करू ➾ दिल्ली

🔸पांचाल ➾ रोहिलखंड

🔹गांधार ➾ पेशावर

🔸कबोज ➾ गांधारजवळ

🔹मत्स्य ➾ जयपुर

🔸शरसेन ➾ मथुरा

🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र

🔸अवंती➾ उज्जैन

🔹अग ➾  पूर्व-बिहार

🔸मगध ➾ दक्षिण बिहार

🔹वज्जी ➾ उत्तर बिहार


ब्रिटिशांनाही लुटता न आलेले भारतातील रहस्यमयी खजाने



एक काळ होता जेव्हा भारतातुन सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. हा धूर पाहूनच किंवा त्याच्याबद्दल ऐकूनच अनेक परदेशी लोकांनी भारतात येऊन कधी तलवारीच्या तर कधी बंदुकीच्या जोरावर आपले खजिने लुटले.*

 भारतातला खजिना चोरून आपापल्या देशात श्रीमंती आणि प्रतिष्ठा मिळवली. परंतु आजही भारतात असे अनेक खजिने आहेत जे ब्रिटिशांनाही लुटता आले नाहीत.

त्याकाळचे अनेक राजे, संस्थानिक किंवा शासक आपले खजिने वाचवण्यासाठी त्याबद्दलची माहिती गुप्त ठेवत असत किंवा त्यांच्याबद्दल दंतकथा पसरवत असत. पाहूया त्यापैकी काही गुप्त खजिने आणि दंतकथांबद्दल…


◾️ नादीरशहाचा खजिना 


नादिरशाहने १७३९ मध्ये भारतावर आक्रमण करून दिल्लीवर ताबा मिळवला होता त्यावेळी त्याने संपूर्ण दिल्ली लुटली होती. त्या लुटीमध्ये प्रसिद्ध मयूरसिंहासन आणि कोहिनुर हिऱ्यासोबतच मोठ्या प्रमाणावर सोने, नाणी आणि दागिन्यांचा समावेश होता. तेव्हा युद्धपरिस्थी असल्याने नादिरशहा आपल्या खजिन्यावर लक्ष ठेऊ शकला नाही. परत जाताना त्याच्या सैन्यातील मोठ्या सरदार आणि सैनिकांनी त्या लुटीतला मोठा खजिना लपवून ठेवला होता अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. हा खजिना अद्याप कुणाला सापडला नाही.


◾️ कष्णा नदीचा खजिना 


आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कृष्णा नदीचा किनारी प्रदेश बऱ्याच काळापासून हिऱ्यांसाठी प्रसिद्ध होता. एकेकाळी हा प्रदेश गोवळकोंडा राज्यात समाविष्ट होता. जगप्रसिद्ध कोहिनुर हिरा इथल्याच खाणीतून काढण्यात आला होता.


◾️ बिंबीसारचा खजिना


इ.स.पूर्व पाचव्या शतकातील मगधचा राजा (बिहार) बिंबिसार याला मौर्य साम्राज्याचा जनक मानले जाते. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की बिहारच्या राजगीर येथे बिंबिसाराचा खजिना लपविण्यात आला होता. एकाच दगडात कोरलेल्या सोनभांडार गुहांमध्ये पुरातन लिपीमध्ये लिहलेले शब्द अद्याप कुणाला वाचता आले नाहीत. असे मानले जाते की त्या लिपीतच खजिन्याशी संबंधित नकाशाचे रहस्य लपले आहेत. ब्रिटिशांनी खजिना शोधण्यासाठी तोफा लावल्या परंतु त्यांनाही खजिना सापडला नाही.

आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,


◾️ जहांगीर बादशहाचा खजिना


मुघल बादशाह जहांगीरला सत्तेतून पायउतार केल्यानंतर तो दिल्लीपासून १५० किमी अंतरावर असणाऱ्या राजस्थानमधील अलवर किल्ल्यात आश्रयाला गेला होता. दंतकथेनुसार जहांगीरने अलवरच्या किल्ल्यात राहायला येताना आणलेली प्रचंड संपत्ती त्याने किल्ल्यात लपवली. ही संपत्ती अद्याप कुणाला सापडली नाही.


◾️शरी मोक्काम्बिका मंदिर खजिना 


कर्नाटकच्या पश्चिम घाटात कोलूर येथे श्री मोक्काम्बिका मंदिर आहे. इथल्या पुजाऱ्यांच्या सांगण्यांनुसार मंदिरात सापाचे खास चिन्ह बनवलेले आहे. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,प्राचीन काळापासून नागदेवता लपवलेल्या खजिन्याचे रक्षण करतात असे भारतात मानले जाते. या मंदिराच्या तळघरात प्रचंड संपत्ती असल्याचे बोलले जाते. त्यांच्या रक्षणासाठीच सापाचे चिन्ह तिथे कोरण्यात आले आहे. मात्र या संपत्तीचा शोध किंवा किती संपत्ती आहे याचा कुणालाही अंदाज लागला नाही.


◾️ राजा मानसिंहाचा खजिना


जयपूरचा राजा मानसिंह हा मुघल सम्राट अकबराचा सरसेनापती होता. १५८० मध्ये त्याने अफगाणिस्तानवर विजय मिळवला होता. त्यावेळी त्या विजयानंतर मिळालेली लूट मानसिंहाने सरकारदरबारी जमा न करता गुप्त ठिकाणी लपवली होती अशी दंतकथा आहे. या दंतकथेचा किती तथ्य आहे याचा अंदाज यावरून होतो की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी हा खजिना शोधण्याचे आदेश दिले होते. पण हा खजिना काय सापडला नाही.


◾️ मीर उस्मान अलीचा खजिना 


हैद्राबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली त्याकाळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. १९३७ मध्ये प्रतिष्ठित अशा टाईम मॅगझीनमध्ये त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती सांगितले होते. आपल्या शासनकाळात त्याने भरपूर प्रमाणात संपत्ती गोळा केली होती. अशी दंतकथा प्रसिद्ध आहे की, किंग पॅलेसच्या तळघरात त्याने आपली सगळी संपत्ती लपवली होती. त्यात महागडे हिरे, दागिने, रत्ने समाविष्ट होती. मीर उस्मान अलीच्या मृत्युसोबतच त्याच्या खजिन्याचे रहस्य गडप झाले.

भारतातील महाजनपदे

Mpsc History

भारतातील महाजनपदे:

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संघटीत राज्यव्यवस्थेचा उद्य :

आर्य लोकांनी भारतात टोळ्यांच्या रूपांने प्रवेश केला. कालांतराने त्यांच्या संघर्ष सुरू झाला. प्रराक्रमी टोळ्यांच्या नेत्यांनी राज्यव्यवस्था निर्माण केली. ही राज्ये जनपदे आणि महाजनपदे म्हणून ओळखली जात असे.

भारतीय वेद, पुराण, रामायण, महाभारत जैन आणि बौद्ध ग्रंथाच्या अभ्यासावरून इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात अंग (उत्तर बिहार), मगध (दक्षिण बिहार), कोसी (बनारस), कोसल (आयोध्या), विदेह (उत्तर बिहार), मल्य (गोरखपूर), चेंदी (बुंदेलखंड), वस्त (अलाहाबाद), कुरू (दिल्ली व मीरत), पांचाल (बरेली), मस्त्य (जयपूर), अश्मक (गोदावरीचा भाग), अवंती (माळवा), गांधार (अफगाणिस्थान), सुरसेन (मथुरा), कुंभोज (दक्षिण पश्चिम क्षेत्र) असे एकूण सोळा महाजनपदे होती असा उल्लेख मिळतो.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजपदकालीन राज्यव्यवस्था :

महाजनपदकालीन राज्य व्यवस्था ही राजेशाही पद्धतीची होती. राज्यकारभाराच्या प्रक्रियेत राजा हा सर्वात वरच्या स्थानी असला तरी, बहुतांशी निर्णय खालील संस्थांमार्फत घेतले जात असे.

गणपरिषद – ही राज्यातील ज्येष्ठ लोकांची परिषद असे. राज्यातील सर्वोच्च अधिकार व राज्यकारभाराचे अधिकार गणपरिषदेकडे असे.

कार्यकारी मंडळ – राज्याचा दैनंदिन कारभार चालविण्याकरिता कार्यकारी मंडळ असे.
सभासद कार्यकारी मंडळामध्ये प्रस्ताव मांडीत आणि त्यावर बहुमताने निर्णय घेतला जात असे.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पराक्रमी राज्ये :

कालांतराने गणपरिषदेचे महत्व कमी होवून राजेशाहीला महत्व प्राप्त झाले.
या राजेलोकांच्या विस्तारवादी धोरणामुळे काही महाजनपदे विशेष प्रसिद्धीला आली. त्यामध्ये कोसल, वत्स, अवंती आणि मगध विशेष नावारूपास आली.
कोशल – हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तरप्रदेश यामधील भाग म्हणजे कोसल होय.
साकेत ही या राज्याची राजधानी होती.

कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाच्या समकालीन होता. या राजाचा मगध साम्राज्याचे पराभव करून कोसल आपल्या राज्यात समाविष्ट केले.
वत्स – अलाहाबाद जवळील प्रदेश हा वत्स राज्याची राजधानी कौशांबी म्हणून ओळखला जात असे. हे शहर त्या काळात तलम रेशमी कापडाकरिता जगप्रसिद्ध होते.

अवंती – आजचे उज्जैन शहर हे अवंतीची राजधानी होती. हे शहर त्या काळात व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्धीला आले होते.
मगध – गंगा व शोण नदीच्या खोर्‍यातील परीसरात मगध राज्य पसरले होते.

बिहारमधील राजगृह हे या राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होवून गेलेल्या पराक्रमी राजे लोकांनी मगध साम्राज्य नावारूपास आणले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बिंबिसार :

बिंबिसार हा मगध राज्याचा पहिला पराक्रमी राजा होवून गेला.
त्याने आपल्या विस्तारवादी धोरणामुळे काशी, अंग, मंद्र, अवंती आणि कोसल राजांचा पराभव करून ती राज्ये मगध साम्राज्यात सामील केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अजातशत्रू :

हा राजा गौतम बुद्धाच्या समकालीन, असून त्याने अनेक गणराज्य आपल्या साम्राज्यात सामील करून घेतली.
या राजाने जैन व बौद्ध धर्माला राजाश्रय दिला.
पहिली धर्मपरिषद अजातशत्रूने राजगृह येथे बोलाविली होती.

शिशुनाग :

या राजाने उत्तर भारतातील सर्व गणराज्ये एकत्र करून समर्थशाली मगध साम्राज्य निर्माण केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नंद राजे (इसवी सनपर्व 364 ते 324) :

या काळात मगध राज्यात पराक्रमी नंद घराने नावारूपास आले. या घराण्यातील राजे लोकांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला ते हिमालय आणि कर्नाटक पर्यंत केला होता.

या काळात मगध साम्राज्य प्राचीन भारताच्या इतिहासातील पहिले साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
या घराण्यातील शेवटचा राजा म्हणजे धनानंद होय.
नंद राजांच्या काळातच भारतात परकीयांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

परकीय आक्रमणे :

भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकूण बर्‍याच परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातील संपत्ती लुटून नेली.

प्राचीन काळापासून संपत्तीच्या परकीय राजांनी भारतावर आक्रमण केले आहे.

भारतात पहीले परकीय आक्रमण मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात झाले.

इराणचा राजा डार्युश राजाचे आक्रमण :

मगध साम्राज्याच्या उदयाच्या काळात इराणचा सम्राट दार्युश ने वायव्यकडील गांधार व सिंध प्रांतावर आक्रमण करून ते प्रदेश जिंकले.

भारतावर आक्रमण करणारा तो पहिला परकीय होता.
या घटनेमुळे भारत व इराण यांच्यात राजनेतिक संबंध प्रस्तापित होवून व्यापर व कलेच्या क्षेत्रात देवाण घेवाण सुरू झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

अलेक्झांडर उर्फ सिकंदरचे आक्रमण (इसवीसन पूर्व 326) :

ग्रीक राजा सिकंदरने इराणच्या राजाचा पराभव केला. त्यानंतर त्याने भारतावर आक्रमण केले.
सिकंदरने सिंधु नदी ओलांडून गांधार प्रांतात प्रवेश केला. त्यांच्या सेनेने रावी नदीच्या तीरावर असलेल्या पुरू राजाचा पराभव केला.

मगध पर्यत मात्र तो येवू शकला नाही.
भारतातून माघारी जात असतांना इसवी सन पूर्व 323 मध्ये बॉबिलान येथे मरण पावला.
सिकंदरच्या स्वारीमुळे भारत व ग्रीक यांच्या राजनैतिक संबंध प्रस्तापित झाले.

ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून त्यामधून गांधार शिल्पकला शैली उदयास आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

महाजनपदे आणि त्यांच्या राजधानीची नगरे :



१. काशी - वाराणसी
२. कोसल - श्रावस्ती
३. अंग - चंपा
४. मगध - गिरीव्रज / राजगृह

५. वृज्जी / वज्जी - वैशाली
६. मल्ल / मालव - कुशिनार / कुशीनगर
७. चेदि - शुक्तिमती / सोध्थिवती
८. वंश / वत्स - कौशांबी

९.  कुरु - इंद्रप्रस्थ / इंद्रपट्टण
१०. उत्तर पांचाल - अहिच्छत्र,
       दक्षिण पांचाल -कांपिल्य
११. मत्स्य - विराटनगर
१२. शूरसेन - मथुरा

१३. अश्मक / अस्सक-पोटली / पोतन / पोदन
१४. अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती
१५.  गांधार - तक्षशिल
१६.  कंबोज - राजपूर

वैदिक काळ आणि महाजनपदे

वैदिक काळ....
वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषतः वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली.

ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारताच्या सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'संहिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.[१७]

आजच्या बिहारमधील नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले बौद्धविद्यापीठ मानले जाते .


__________________________________
महाजनपदे .......

गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना

सोळा प्रमुख महाजनपदे

नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वांत पहिले विद्यापीठ मानले जाते
वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारताच्या राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरीकरण या काळात झाले.

या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.[१८]

वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता,वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते.वैदिक धर्मातूनच पुढे हिंदू धर्माचा उदय झाला. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात.हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात.

गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली.[२०] जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो[२१]

बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?

🎈कल्ले.


💐 आध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?

🎈कचिपुडी.


💐 सत्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈ताराबाई शिंदे.


💐 भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?

🎈मीरा कुमार.


💐 महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?

🎈ओझर मिग.( नाशिक )


💐 महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?

🎈८०० किमी.


💐 चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

🎈ओरिसा.


💐 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?

🎈कोल्हापूर.


💐 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?

🎈बीड.


💐 चदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?

🎈कर्नाटक.



1). नुकतीच बातमीत असलेली "फ्लोर टेस्ट" म्हणजे काय?

उत्तर - विधिमंडळात बहुमत दाखवणे


2). एशियन ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर - जपान


3). दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर - 25 जून


4). भारताने अलीकडेच पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या VL-SRSAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली?

उत्तर - ओडिशा


५). कोणत्या देशाने अलीकडेच फ्रेंच रॉकेटने "GSAT-24" उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

उत्तर भारत


६). कोणत्या देशाच्या सिनेटने नुकतेच बंदूक नियंत्रण विधेयक मंजूर केले आहे?

उत्तर अमेरीका


7) नुकतेच NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे?

उत्तर - परमेश्वरन अय्यर


8). अलीकडे चर्चेत असलेली 'वरदा नदी' ही कोणत्या नदीची उपनदी आहे?

उत्तर - तुंगभद्रा नदी


💐 कजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?

🎈रशिया.


💐 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?

🎈२५ जानेवारी.


💐 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈सोनेगांव. ( नागपूर )


💐 मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?

🎈बहद्रथ.


💐 सयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈नयूयॉर्क.


💐 दौलताबाद किल्ला कोठे आहे ?

🎈औरंगाबाद.


💐 चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?

🎈टबल टेनिस.


💐 विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?

🎈मकुंदराज.


💐 शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?

🎈थर्मामीटर.


💐 आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?

🎈इग्लंड.


💐 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?

🎈जपान.


💐 दिवस व रात्र कोठे समान असतात ?

🎈विषुववृत्त.


💐 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

🎈रोम.


💐अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?

🎈अरिस्टॅटल.


💐 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

🎈सईबाई.


💐 कदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ? 

🎈उत्तराखंड.


💐 'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?

🎈राजीव गांधी.


💐 ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?

🎈१९२९ मध्ये.


💐 नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?

🎈अरबी समुद्र.


💐 'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?

🎈सोडियम हायड्राक्साइड.


महाराष्ट्राचा इतिहास

*⭕️ मौर्य ते यादव ⭕️*


*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*



*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.



*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.



*👉 वाकाटकांचा काळ*


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



*👉 कलाचुरींचा काळ*


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.



*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.



*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.



*👉 यादवांचा काळ*


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

परमुख राजवंश आणि संस्थापक



▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सन वंश                       - सामन्तसेन


▪️ गर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चदेल वंश                    - नन्नुक


▪️ गलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ खिलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मगल वंश                    - बाबर

महत्त्वाचे आहे सर्व वाचून काढा

महत्वाच्या विकास योजना


1. रोजगार हमी योजना :

सुरुवात – 1952

उद्दिष्ट – ग्रामीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वांगीण मदत करणे.

पार्श्वभूमी – श्री.वि.स. पागे यांच्या शिफारशीवरून 1965 मध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही योजना राबविली त्यानंतर 1969 मध्ये काही निवडक भागात प्रयोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली.

26 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी कायदा करून ही योजना सर्व महाराष्ट्रभर लागू केली.

रोजगाराची हमी देणारा भारतातील प्रथम प्रयोग.

‘मागेल त्याला काम’ तत्वावर ही योजना सुरू केली.

योजनेचे स्वरूप :

शक्यतो शारीरिक कष्टाची कामे असतात.

या योजनेसाठी 6 मार्गानी पैसा उपलब्ध होतो.

18 वर्षावरील स्त्री-पुरूषांना कामे दिली जातात.

मजुरी दर आठवड्याला दिली जाते.

कामे कामगाराच्या घरापासून 8 कि.मी. अंतराच्या आत असतात.


2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (I.R.D.P.)

सुरुवात – 1978

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा एकत्रित विकास करणे.

स्वरूप –

जे लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात त्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीत बदल घडवून आणणे.

हा कार्यक्रम चालविण्यासाठी केंद्र – राज्य 50:50 या प्रमाणात खर्च करतात.

महाराष्ट्रात हा कार्यक्रम 2 ऑक्टोंबर 1980 पासून सर्व पंचायत समित्यामध्ये सुरू आहे.


3. अवर्षण प्रवण विभाग कार्यक्रम (D.P.A.P.)

सुरुवात – 1974-75

उद्दिष्ट – राज्यातील दुष्काळी भागातील लोकांना दुष्काळाशी यशस्वीरीत्या मुकाबला करता यावा.


4. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजना (TRYSEM)

सुरुवात – 15 ऑगस्ट 1979

उद्दिष्ट – ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार करता यावा. यासाठी त्यांना शेती व शेती संबंधित व्यवसायाचे प्रशिक्षण देणे.

स्वरूप –

ही योजना IRDP चा विस्तारित भाग आहे.

लाभार्थी हा 15 ते 35 वयोगटातील असावा.

प्रशिक्षण कालावधी 6 महिने असतो.

प्रशिक्षित तरुणांना अर्थसाहाय्य व 10,000 रु. पर्यंत कर्ज मिळू शकते.


5. जवाहर रोजगार योजना (JRY)

सुरुवात – 1 एप्रिल 1989

उद्दिष्ट – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे.

स्वरूप –

या योजनेचे मूळ रोजगार हमी योजनेत आहे.

ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी कार्यक्रम यांचे विलीनीकरण करून तयार केली आहे.

या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील किमान एका व्यक्तीस वर्षातील किमान 100 दिवस रोजगार मिळेल याची हमी दिली जाते.

या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामपंचायत करते.

या योजनेवर होणारा खर्च 80% केंद्र सरकार व 20% राज्य सरकार करते.    


6. नेहरू रोजगार योजना

सुरुवात – 1989-90 शहरी भागाचा विकास

उद्दिष्ट – नागरी भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे.


7. संजय गांधी निराधार योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वत:चा उदरनिर्वाह करू न शकणार्‍या निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे.


8. संजय गांधी स्वावलंबन योजना

सुरुवात – 2 ऑक्टोंबर 1980

उद्दिष्ट – स्वयंरोजगार करण्यासाठी लाभार्थीना कर्ज उपलब्ध करून देणे.


9. श्रमशक्तीतून ग्राम विकास

सुरुवात – 22 जून 1989

उद्दिष्ट – गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणे.

ही योजना हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.


10. फलोत्पादन विकास योजना

सुरुवात – 21 जून 1990

उद्दिष्ट -राज्यात जास्तीत जास्त फळांची लागवड करणे.

ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविली जाते.

ही योजना राबविण्याची अंतिम जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते.


11. श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना

सुरुवात – 1 ऑगस्ट 1982

उद्दिष्ट – अपघातात मृत्यू पावणार्‍या अथवा अपंग होणार्‍या असंरक्षित कुटुंबियांना अर्थसहाय्य करणे.


12. इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध शेतमजूर सहाय्य योजना

सुरुवात – 19 नोव्हेंबर 1991

उद्दिष्ट – 65 वर्षावरील पुरुष व 60 वर्षावरील स्त्रियां की ज्यांना काम होत नाही अशा व्यक्तींना अर्थसहाय्य देणे.


13. पीक विमा योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – शेतकर्‍यांच्या पीकांचा विमा उतरविणे. ज्यामुळे अवर्षण काळात शेतकर्‍यांना आर्थिकसहाय्य मिळते.


14. पंतप्रधान रोजगार योजना

सुरुवात – 1994-95

उद्दिष्ट – बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार करण्याकरिता अर्थसहाय्य करणे.


15. इंदिरा आवास योजना

सुरुवात – 1985

उद्दिष्ट – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना पक्की घरे बाधण्यासाठी आर्थिक मदत करणे.

शेवटचे 12 दिवस 📖 काय करावं ? काय वाचावं ?

जास्त मार्क मिळवून देणारे विषय 👇 करमानुसार 


1) Polity : यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. जे काही वाचलय ते व्यवस्थित revise करा.  राज्यपाल, राज्यसभा, विधानपरिषद, आणिबाणी, राज्य-केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती, नागरिकत्व, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, लोकपाल, विभागीय परिषदा, चर्चेतील कलमे जसे कलम 370, 371A to J, कलम-131, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, हिंदी भाषा , latest घटनादुरुस्त्या, अँग्लो इंडियन, SC-ST आरक्षण असे काही मुद्दे गेली 1-2 वर्ष चर्चेत होते , या घटकांवर प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, विधिमंडळ, पंतप्रधान, मुख्यमंत्री, घटनेची वैशिष्ट्य, घटना समिती, मुलभुत हक्क,  कर्तव्य, तत्त्वे इ यावर जास्त focus करा.


2) भूगोल : आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा. State board ची 6 वी ते 12 वी ची पुस्तकं व्यवस्थित revise करा. 

भूगोल मध्ये असे काही घटक आहेत ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, जसे पृथ्वीची निर्मिती- सिध्दांत, भूकंप, ज्वालामुखी , अक्षवृत्ते, रेखावृत्ते , वारे, भूरूपे, 

भूगोल मध्ये विधान- कारण-स्पष्टीकरण,  जोड्या लावा असे प्रश्न जास्त असतात.


3) अर्थशास्त्र : यामध्ये 6-7 ठराविक टॉपिक आहेत ज्यावर हमखास प्रश्न असतात, जसे दारिद्र्य, बेरोजगारी,  लोकसंख्या, शाश्वत विकास, समावेशक योजना , चलनवाढ,  वेगवेगळे निर्देशांक- MPI, HDI, GHI, GDI इ. अशा गोष्टींवर जास्त focus करा.


4) चालू घडामोडी : फेब्रुवारी 2024 ते एप्रिल 2025 पर्यंतच्या घडामोडींवर जास्त focus करा.

त्यानंतरच्या घडामोडी एकदा नजरेखालून घाला. 

राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय, आर्थिक ,सामाजिक , विज्ञान- पर्यावरण यावर जास्त focus करा. 

Sports घडामोडी आगोदर काही वाचलं नसेल तर आता skip करू शकता .


5) विज्ञान  : या घटकांवर 20 प्रश्न असतात पण दर्जा थोडा अवघड असतो,  त्यामुळे जे वाचलय ते व्यवस्थित revise करा. State board + Ncert वाचलं असेल तर परत तेच करा. यामध्ये 12+ मार्क्स पण चांगले आहेत,  बऱ्याच जणांना एवढेच मार्क्स मिळवणं अवघड जातं.


6) इतिहास- प्राचीन- मध्ययुगीन साठी state board वाचा तेच revise करा, हडप्पा, महाजनपदे, बौद्ध-जैन धर्म,  मौर्य, गुप्त, हर्षवर्धन, सातवाहन, राजे- महाराजे- घराणे- उपाध्या, लढाया,  गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, विजयनगर, बहामणी, मुघल, मराठे, ब्रिटिश-सत्ता स्थापना, भारतीय राज्यांबरोबरच्या लढाया व त्यादरम्यान केलेले तह जसे इंग्रज-मराठे, इंग्रज-म्हैसूर, इंग्रज-शीख  इ.  , काँग्रेस, गांधी युग, महत्त्वाच्या चळवळी , महत्त्वाचे समाजसुधारक, उठाव, 

शेवटच्या दिवसात ( इथून पुढे इतिहास विषयाला जास्त वेळ देऊ नये, त्याऐवजी, Polity, अर्थशास्त्र, भूगोल या विषयांना जास्त वेळ द्या) 


7) पर्यावरण  : 5 प्रश्न असतात, 1-2 प्रश्न करार कधी लागू केला- तारीख विचारली जाते, असे facts विचारले जातात,  Ipcc, COP परिषदा, ओझोन , वातावरणातील हरितगृह वायू यावर  बऱ्याचदा प्रश्न असतो,  

यावेळेस रामसर करार- स्थळे  व वाळवंटीकरणाविरूध्द करार UNCCD यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे.


PYQ व विश्लेषण पुस्तक असेल तर ते व्यवस्थित 1-2 वेळेस वाचा यातून चांगल्या पध्दतीने Revision होईल.


आतापर्यंत जे काही वाचलं असेल ते revise करा, नवीन काहीही वाचू नका. 




सर्वाना ALL THE BEST ✌️

पोलीस भरती प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर 

सहावी पंचवार्षिक योजना


☀️कालावधी➖1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985
🔅भर➖दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती
🌀परतिमान➖अलन मान व अशोक रुद्र

🔥कार्यक्रम

⏩1980➖एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम
⏩1980➖राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
⏩1983➖गरामीन भूमिहीन रोजगार हमी योजना

✍️1982➖गरामीण भागातील महिला व मुलाचा विकास(डेन्मार्क च्या मदतीने)

🔥दोन पोलाद प्रकल्प

🔘विशाखापट्टणम
🔘सालेम पोलाद

✍️15 एप्रिल 1980➖6 बँक राष्ट्रीयीकरण

🔘1982➖एक्सझीम बँक
🔘जलै 1982➖नाबार्ड

👉या दरम्यान देशाला अन्नधान्य बाबत स्वयंपूर्ण घोषित करण्यात आले
👉सर्वाधिक यशस्वी योजना मानली जाते

🔥वद्धी दर

👁‍🗨सकल्पित➖5.2 टक्के
👁‍🗨साध्य➖5.54 टक्के
________________________________

१९ जून २०२४

𝐍𝐄𝐖𝐒 𝐁𝐎𝐎𝐒𝐓𝐄𝐑

❇️ भारतीय संघाचे फुटबॉल कोच इगोर स्टिमक यांना पदावरुन हटवण्यात आले

◾️ते क्रोएशियाई देशाचे आहेत
◾️2019 मध्ये त्यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते
◾️कार्यकाळ मागच्यावर्षी एआयएफएफने वाढविला होता
◾️पुरुष संघाच्या निराशादायी कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर सर्वसंमतीने क्रोएशियाचे 56 वर्षांचे स्टिमक यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला

❇️ न्यूझीलँड वेगवान गोलंदाज "लोकी फर्ग्युसनने" 4 षटकांत एकही धाव न देता 3 बळी घेत विक्रम केला.
◾️आंतरराष्ट्रीय टी-२० मॅच मध्ये
◾️4 षटके धाव न देणारा तो दुसरा खेळाडू आहे
◾️पहिला खेळाडू  कॅनडाचा "साद बीन झफर" आहे
◾️मॅच : न्यूझीलँड Vs पापुआ न्यू गिनी

❇️ एस्टोनियाचा फलंदाज " साहिल चौहान" याने टी-२० क्रिकेटमध्ये "सर्वांत वेगवान शतक" ठोकले.
◾️27 चेंडूत 100 धावा
◾️27 चेंडूत 13 षटकार आणि 5 चौकारांसह 100 धावा
◾️ख्रिस गेलं चा 30 बॉल मध्ये 100 धावा रेकॉर्ड त्याने मोडला
◾️आंतरराष्ट्रीय सामन्यातील एका डावात सर्वाधिक 18 षटकार मारण्याचा विक्रम पण साहिल चौहान" त्याच्याच नावावर आहे
◾️भारताच्या ऋषभ पंतने टी-20 क्रिकेटमध्ये  32 चेंडूत शतक ठोकले आहे.

❇️ शिवाजी महाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत.
◾️जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात
◾️सातारा प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये आणणार
◾️सलग 10 महिने पहाण्यास उपलब्ध रहाणार

❇️ सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कारांसाठी 5 भारतीय शाळांची निवड
◾️इंग्लंडमध्ये वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी शाळांची यादी करण्यात आली आहे.
◾️ जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारांसाठी विविध श्रेणींमध्ये 5 भारतीय शाळांची नावे अंतिम 10 मध्ये देण्यात आली आहेत.
⭐️ मध्य प्रदेशातील 2 शाळा
⭐️ दिल्ली 1 शाळा,
⭐️महाराष्ट्र 1 शाळा
⭐️ तामिळनाडूमधील 1 शाळा
◾️मुंबईतील पब्लिक स्कूल एल के वाघजी इंटरनॅशनल (IGCSE) या शाळेचा यात समावेश आहे
◾️शाळांना 50 हजार डॉलर बक्षीस निधी मिळणार आहेत
◾️इंग्लंडमधील T4 Education या संस्थेने कोविड काळात ही संकल्पना पुढे आणली होती

❇️ जगातील सर्वांत उंच पुलावरून ट्रेन धावली
◾️जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हा पूल
◾️चिनाब नदीवर बांधला आहे
◾️सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली चाचणी ट्रेन चालवली
◾️उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला लिंक (USBRL) प्रकल्प 272 किमीचा आहे आणि 209 किमी टप्प्याटप्प्याने कार्यान्ति झाला आहे.
◾️उंची : चिनाब नदीच्या वर 359 मीटर (सुमारे 109 फूट) 
◾️आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
‼️ आजच्या न्यूज पेपर मधील काही महत्वाच्या गोष्टी  दिल्या आहेत एवढ्या वाचून झोपा 😊🎆

-------------------------------------------