०९ मार्च २०२१

'मैत्री सेतू': भारत आणि बांगलादेश यांना जोडणारा पूल



🌹पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 मार्च 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेश या देशांना जोडणाऱ्या ‘मैत्री सेतु’ नामक पूलाचे उद्घाटन झाले. ‘मैत्री सेतु’ हे नाव भारत आणि बांगलादेशमधील वाढते द्विपक्षीय संबंध आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे.


ठळक बाबी


🌹‘मैत्री सेतु’ हा पूल फेनी नदीवर बांधण्यात आला आहे, जी भारतीय सीमेवर त्रिपुरा राज्य आणि बांगलादेश यांच्या दरम्यान वाहते.


🌹133 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (NHIDC) या सार्वजनिक कंपनीने हा प्रकल्प बांधला आहे.


🌹1.9 किमी लांबीचा हा सेतू भारतातील सबरूम आणि बांगलादेशातील रामगढ यांना जोडतो.


🌹या प्रकल्पामुळे, बांगलादेशाच्या चटगांव बंदरात प्रवेश करण्यासाठी त्रिपुरा हे ‘ईशान्येकडील प्रवेशद्वार' बनणार आहे, जे सबरूमपासून अवघ्या 80 कि.मी. अंतरावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२१ एप्रिल २०२५ टॉप चालू घडामोडी

१. 'एमटी न्यू ड्रीम' जहाज कोणत्या देशाच्या ध्वजाखाली चालत होते? अ. भारत ब. पनामा C. लायबेरिया D. माल्टा उत्तर: C. लायबेरिया २. कोणत्...