Ads

12 September 2019

चालू घडामोडी वन लाइनर्स, 11 सप्टेंबर 2019

✳ डॅनियल झांग अलीबाबा समूहाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील

✳ एन लिंडे स्वीडनचे नवीन परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त

✳ पॉल लिटल ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष नियुक्त

✳ एस हाशिमोटो यांनी जपानचे ऑलिम्पिक मंत्री म्हणून नियुक्ती केली

✳ टी मेल्सकानु रोमानियन सिनेटचे अध्यक्ष निवडले

✳ केंद्र सरकार दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 462 एकलव्य शाळा सुरू करणार आहे

✳ जीओटीटी प्रकल्प स्थापनेसाठी पंजाब केंद्र सरकारसह सामंजस्य करार करण्यासाठी पहिले राज्य बनले

✳ '10 हफ्ते 10 बाजे 10 मिनिट' दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी डेंग्यूविरूद्ध मोहीम सुरू केली

✳ राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पॅरालंपिक ऑफ इंडियाची निलंबित

✳ पंतप्रधान मथुरामध्ये राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू करणार आहेत

✳ विक्रम नाथ यांनी गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली

✳ भारतीय विद्यार्थ्यांना पदवीनंतर दोन वर्ष यूकेमध्ये राहण्याची मुभा दिली जाईल

✳ नाइट फ्रँक इंडियाने एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांक सोडला

✳ बीजिंग अव्वल स्थानी असलेला एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांक

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात टोकियो दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात शांघाय तिस्या क्रमांकावर आहे

✳ आशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात हाँगकाँगचा चौथा क्रमांक आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात मुंबईचा 5 वा क्रमांक आहे

✳ एशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात नवी दिल्ली 11 व्या स्थानावर आहे

✳ आशिया पॅसिफिक को-लिव्हिंग निर्देशांकात बेंगळुरूचा 19 वा क्रमांक आहे

✳ 2017 मध्ये जागतिक मलेरिया प्रकरणांमध्ये भारताचा चौथा क्रमांक: लँसेट रिपोर्ट

✳ दक्षिण-पूर्व आशियात भारतातील आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहेः डब्ल्यूएचओ

✳ कराची जगातील सर्वात मोठा गांजाचा ग्राहक आहेः अहवाल

✳ दिल्ली हा गांजा जगातील तिसरा सर्वोच्च ग्राहक आहेः अहवाल

✳ मुंबई हा गांजा जगातील सहावा सर्वोच्च ग्राहक आहेः अहवाल

✳ तैवानची हेल्थकेअर सिस्टम जगातील सर्वोत्तम: सीईओवर्ल्ड

✳ दक्षिण कोरियाची हेल्थकेअर सिस्टम जगातील दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ जपानची हेल्थकेअर सिस्टम जगातील तिसर्‍या या क्रमांकावर आहे

✳ ऑस्ट्रियाच्या हेल्थकेअर सिस्टमचा जगातील चौथा क्रमांक आहे

✳ डेन्मार्कची हेल्थकेअर सिस्टम जगातील पाचव्या क्रमांकावर आहे

✳ थायलंडची हेल्थकेअर सिस्टम जगातील सहाव्या क्रमांकावर आहे

✳ स्पेनच्या हेल्थकेअर सिस्टमचा जगातील 7 वा क्रमांक आहे

✳ फ्रान्सची हेल्थकेअर सिस्टम जगातील 8 व्या क्रमांकावर आहे

✳ बेल्जियमची हेल्थकेअर सिस्टम जगातील 9 व्या क्रमांकावर आहे

✳ ऑस्ट्रेलियाची हेल्थकेअर सिस्टम जगातील दहाव्या क्रमांकावर आहे

✳ व्हेनेझुएलाला 2019 मध्ये सर्वात वाईट आरोग्य सेवा प्रणाली म्हणून नाव देण्यात आले

✳ सरकारने शेतकर्‍यांसाठी 'सीएचसी फार्म मशीनरी' मोबाइल अॅप सुरू केले

✳ बेस्टने प्रवाश्यांसाठी ‘बेस्ट प्रवास’ मोबाइल अॅप सुरू केले

✳ यूपी पोलिसांनी एड कम्युनिटी पोलिसिंगसाठी नवीन ‘सी-प्लॅन’ अ‍ॅप लाँच केले

✳ दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांसाठी '70 वाजता संविधान' अभियान राबविले

✳ बीसीसीआयचे आकाशवाणीसह भागीदार लाइव्ह रेडिओ कमेंटरी प्रदान करण्यासाठी

✳ फिफा डब्ल्यूसी क्वालिफायरमध्ये ड्रॉ करण्यासाठी एशियन चॅम्पियन्स कतार भारताने धरली

✳ गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. प्रकाश यांनी राजीनामा दिला

✳ पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये भारताच्या दुसर्‍या बहु-मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत

✳ उत्तर प्रदेशाने 2024 पर्यंत शेती निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

✳ राजनाथ सिंह पुढच्या महिन्यात 1 ला राफळे यांचे वितरण घेण्यासाठी फ्रान्सला भेट देतील.

चालू घडामोडी प्रश्नसंच 12/9/2019

📌कोणत्या पुरुष टेनिसपटूने यूएस ओपन 2019 ह्या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले?

(A) रॉजर फेडरर
(B) राफेल नदाल✅✅✅
(C) अँडी मरे
(D) यापैकी कुणीही नाही

📌प्रस्तावित प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) या समूहात किती देशांचा समावेश आहे?

(A) 25
(B) 21
(C) 16✅✅✅
(D) 17

📌कोणत्या देशात सातवी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले?

(A) भारत
(B) थायलंड✅✅✅
(C) दक्षिण कोरिया
(D) सिंगापूर

📌कोणत्या शहरात UNCCD याच्या संबंधित देशांच्या ‘COP-14’ सत्राचे आयोजन करण्यात आले?

(A) जिनेव्हा
(B) क्योटो
(C) ग्रेटर नोएडा✅✅✅
(D) शांघाय

📌सप्टेंबर 2019 या महिन्यात राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक झाली?

(A) कल्याण सिंग
(B) शिवराज पाटील
(C) रघुकुल टिळक
(D) कलराज मिश्रा✅✅✅

📌कोणत्या व्यक्तीला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

(A) विजय कुमार चोपडा✅✅✅
(B) विनीत जैन
(C) रवीश कुमार
(D) विनोद दुआ

ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बडतर्फ

✍अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांची मंगळवारी सकाळी हकालपट्टी केली.

✍त्यांच्या अनेक कल्पना मला अमान्य असल्याने ही कारवाई केल्याचे ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

✍नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची निवड पुढील आठवडय़ात जाहीर होईल, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, मी स्वत: सोमवारी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उद्या पाहू, असे ट्रम्प मला म्हणाले होते. मी वाट पाहून सकाळी त्यांना राजीनामा पाठवला.

✍त्यानंतर त्यांनी माझी बडतर्फी जाहीर केली आहे, असे ट्विट बोल्टन यांनी केले आहे.

✍ट्रम्प यांच्या कारकिर्दीतले बोल्टन हे चौथे आणि सर्वाधिक काळ पदावर राहिलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.पहिले सल्लागार मिशेल फिन फक्त २४ दिवस पदावर होते.

इस्त्रो पुन्हा घेणार चंद्रभरारी

✍चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर आढळले असून त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.

✍लँडर चांद्रभूमीपासून अवघ्या 2.1 कि.मी.वर असताना त्याचा ‘इस्रो’चे मुख्यालय आणि पृथ्वीवरील भूकेंद्रांशी असलेला संपर्क तुटला.

✍तर एकीकडे लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न पुढील 14 दिवसांमध्ये केला जाणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली आहे. एकीकडे चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरची संपर्काचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे इस्त्रो आता पुढच्या चंद्र मोहिमेसाठी तयारी करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

✍इस्त्रोचे ही नवीन चंद्र मोहिम चांद्रयान-2 मोहिमेपेक्षा अधिक अत्याधुनिक असणार आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या ध्रुवीय भागावरील मातीचे नमून गोळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जपान आणि भारताची अवकाश संशोधन संस्था संयुक्तरित्या ही मोहिम राबवणार आहे.

✍भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो आणि जपानची अवकाश संशोधन संस्था ‘जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ (जेएएक्सए)  एकत्रपणे या मोहिमेत काम करणार आहेत.

✍2024 मध्ये इस्त्रो आणि जाक्सा या मोहिमेवर काम सुरु करणार आहे. याआधी भारत 2022 ला गगनयान मोहिम पूर्ण करणार आहे. या मोहिमेमध्ये इस्त्रो भारताचा पहिला अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहे. या संयुक्त मोहिमेची चर्चा पहिल्यांदा 2017 साली झाली होती.

न्युझीलंड मध्ये जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर


✍  न्युझीलंडचे अर्थमंत्री ग्रांट रॅाबर्टसन यांनी ३० मे २०१९ रोजी गरीबी, मानसिक आरोग्य, घरगुती हिंसा यासारख्या वाईट प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी जगातील पहिला कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केला.

✍ न्युझीलंड सरकाने हा अर्थसंकल्प देशातील असमानता, गरीबी या आव्हांनाचा सामना करण्यासाठी सादर केला आहे.

✍ या अर्थसंकल्पात देशाच्या आर्थिक विकास दराला प्राधान्य न देता जनतेच्या कल्याणासाठी प्रधान्य देण्याचे उद्दिष्टे समोर ठेवले आहे.

✍ आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते न्युझीलंडचा आर्थिक विकास दर २०१९ मध्ये २.५% वरून २०२० मध्ये २.९%पर्यंत वाढू शकेल असा अंदाज आहे

✍ न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मानसिक आरोग्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी १.९ अब्ज न्युझीलंड डॉलर एवढा निधी राखून ठेवण्यात आला.

✍ या अगोदर भूतान या देशाने जगात प्रथमच आनंद निर्देशांक (Happiness Index) ही संकल्पना मांडली होती.

✍ याआधारे देशातील किती लोक समाधानाने आयुष्य जगू शकता याचे मापन करण्याचा प्रयत्न प्रथमच करण्यात आला होता.

✍  यासाठी २००८ मध्ये नागरिकांच्या आनदांचे मापन करण्यासाठी भूतान ने ग्राॅस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

✍  त्यानंतर न्युझीलंडने प्रथमच आपल्या अर्थसंकल्पात मोठा वाटा जनतेच्या आंनद आणि कल्याणकारी साठी राखून ठेवण्यचा निर्णय घेतला आहे.

नासा- इस्रोच्या सौरमाला मोहिमेचा प्रस्ताव

✍चांद्रयान २ मोहिमेतून अमेरिकेच्या नासा या अवकाश संस्थेलाही प्रेरणा मिळाली आहे. यापुढे इस्रोसमवेत सौर मालेचे संशोधन करण्यासाठी संयुक्त संशोधन मोहिमा राबवण्यास आम्ही तयार आहोत, असे नासाने स्पष्ट केले.

✍चांद्रयान २  या मोहिमेत भारताने केलेल्या कामगिरीचे नासाने कौतुक करताना म्हटले आहे,की अवकाश मोहिमा कठीणच असतात. चांद्रयान २ मोहिमेत यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते पण त्यात अपयश आले असले तरी जो टप्पा गाठला गेला तेही काही कमी महत्त्वाचे नाही.

✍ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकारी अलाइस जी वेल्स यांनी  सांगितले, की चांद्रयान २ मोहिमेत इस्रोने केलेले प्रयत्न हे मोलाचे आहेत. त्यासाठी इस्रोचे आम्ही अभिनंदन करतो. भारतासाठी हे मोठे पाऊल आहे. वैज्ञानिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली बरीच माहिती यातून निर्माण होणार आहे. भारत त्याच्या आशाआकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे.

✍नासाचे माजी अवकाशवीर जेरी लिनेन्गर यांनी असे म्हटले आहे, की भारताने चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा होता. त्यात अपयश आले असले तरी या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमात होणार आहे, त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. भारताने अतिशय अवघड अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडर चांद्रभूमीवर उतरत असताना सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित पार पडले पण नंतर ते नियंत्रणाबाहेर गेले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पर्यटकांसाठी कोलंबोत ‘नव्या दुबई’ची उभारणी.

✍ जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे

✍चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

✍या ठिकाणी देश-विदेशातील कंपन्यांना उद्योग उभारण्यासाठी आमंत्रित करण्यात येत असून त्यांना ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्टय़ाने जमीन दिली जाणार आहे.

✍या प्रकल्पामुळे श्रीलंकेचा भौगोलिक आणि वित्तीय चेहराही बदलणार असून लवकरच जागतिक नकाशावर देशाची नवी ओळख निर्माण होईल, असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला.

✍पुढील २० वर्षांत श्रीलंकेमध्ये कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून

✍दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी विकसित केली जात आहे.

✍ यात जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य, शिक्षणसंस्था, मरिना पार्क, पंचतारांकित हॉटेलसह ११० एकरमध्ये पब्लिक पार्क, ३०० एकरमध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि मनोरंजन पार्क, रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत.

✍या ठिकाणी जगभरातील किमान ५०० कंपन्या येतील आणि त्यातून देशातील लोकांसाठी ८० हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

गोव्याच्या प्रियव्रत पाटीलने रचला इतिहास; सोळाव्या वर्षी 'महापरीक्षा' उत्तीर्ण


🅾पणजी : दक्षिण गोव्यातील रिवण येथील 16 वर्षीय प्रियव्रत पाटीलने सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होत इतिहास रचला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी प्रियव्रतने तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये यश मिळवलं आणि सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं ट्विटरद्वारे अभिनंदन करत पाठ थोपटली आहे.

🅾तेनाली परीक्षेचे 14 स्तर असतात आणि वर्षातून दोन वेळा ही परीक्षा होते. जे विद्यार्थी शास्त्रांचं शिक्षण घेतात त्यांच्यासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण असते. "प्रियव्रतने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं अभिनंदन. त्याने मिळवलेलं यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल", असं ट्वीट करत मोदींनी प्रियव्रतच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

🅾"काल श्रीमती अपर्णा आणि श्री देवदत्ता पाटील यांच्या 16 वर्षांच्या मुलाने इतिहास रचला. आपल्या वडिलांकडून वेद व न्यायाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्याने सर्व व्याकरण महाग्रंथांचं श्री मोहन शर्मा यांच्याकडून शिक्षण घेतलं. यासोबतच तेनाली परीक्षेच्या (महापरीक्षा) विविध 14 स्तरांमध्ये घवघवीत यश मिळवून सर्वात कमी वयात 'महापरीक्षा' उत्तीर्ण होण्याचा मान त्याने मिळवला", असं ट्वीट चामू कृष्णाशास्त्री यांनी करुन पंतप्रधान मोदींना त्यात टॅग केल होतं. त्याला उत्तर देताना पंतप्रधानांनी प्रियव्रत पाटीलचं अभिनंदन केलं.

राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धा - नेमबाज मेहुली घोषला दुहेरी विजेतेपद


✍नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मेहुली घोष हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातही बाजी मारत राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

✍अनहद जावंडा आणि पारुल कुमार यांनी अनुक्रमे पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराचे विजेतेपद मिळवले. डॉ. कर्णी सिंह शूटिंग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत मेहुलीने महिलांच्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवले.

✍तिने १० मीटर एअर रायफलमध्ये मध्य प्रदेशच्या श्रेया अगरवाल हिच्यावर मात करत २५२ गुणांनिशी विजेतेपद संपादन केले. श्रेयाला २५१.२ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली राजस्थानची अपूर्वी चंडेला २२९.३ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली.

✍कनिष्ठ गटात, मेहूलीने पंजाबच्या खुशी सैनी हिचे आव्हान मोडीत काढत २५२.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. खुशीने २४८.८ गुणांसह रौप्यपदक प्राप्त केले. मध्य प्रदेशची मानसी कठैत २२७.५ गुणांसह तिसरी आली. अनहद याने २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात ऑलिम्पियन गुरप्रीत सिंग याला मागे टाकत सुवर्णपदक मिळवले. केरळचा थॉमस जॉर्ज तिसरा आला.

WEFच्या प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या क्रमांकावर


जागतिक आर्थिक मंचाने (WEF) त्याचा ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल’ प्रसिद्ध केला आहे, ज्यात जागतिक पातळीवर पर्यटनासंबंधीची 140 देशांची क्षमता नमूद करण्यात आली आहे.

अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक (TTCI) 2019’ या यादीत भारत आपल्या समृद्ध नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांमुळे सहा जागांची उडी घेत 34 व्या क्रमांकावर आला आहे.

*मुख्य बाबी*

भारत यादीतल्या अव्वल 35 देशांमध्ये असणारा एकमेव अल्प-मध्यम उत्पन्न असलेला देश आहे. हवाई पायाभूत सुविधा (33) आणि भू आणि बंदरे पायाभूत सुविधा (28), आंतरराष्ट्रीय मुक्तता (51), नैसर्गिक (14) आणि सांस्कृतिक संसाधने (8) या घटकांच्या बाबतीत भारताने चांगली प्रगती दर्शविलेली आहे.

यादीत स्पेन हा देश अव्वल स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ फ्रान्स, जर्मनी आणि जापान या देशांचा क्रमांक लागतो आहे.

या वर्षीच्या क्रमवारीत आशिया-प्रशांत क्षेत्र प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता या बाबतीत सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या क्षेत्रापैकी एक होता.

जापान हे देश आशियातली सर्वाधिक स्पर्धात्मक प्रवास व पर्यटन अर्थव्यवस्था ठरली असून त्याचा जगभरात चौथा क्रमांक लागतो आहे.

*WEF बाबत*

जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) हे एक स्विस ना-नफा प्रतिष्ठान आहे.

याचे संस्थापक क्लाउस श्वाब यांनी सन 1971 मध्ये युरोपियन मॅनेजमेंट फोरम या नावाने स्थापना केली.

याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वीत्झर्लंड येथे आहे.

ही सार्वजनिक-खासगी सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून स्विस प्रशासनाकडून मान्य करण्यात आलेली आहे.

ईस्टर संडे’च्या धक्क्यातून सावरत श्रीलंकेची नवी झेप


✍‘ईस्टर संडे’ला म्हणजेच २१ एप्रिल रोजी तीनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली श्रीलंका अवघ्या चार महिन्यांत पूर्वपदावर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘युद्धाचा देश’ अशा प्रतिमेच्या पलीकडे जात जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍दोन ते तीन दशके लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम( एलटीटीई) सोबत चाललेला रक्तरंजित संघर्ष मार्च २००९मध्ये संपुष्टात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेने श्रीलंका पुन्हा हादरून गेला. मात्र या हल्ल्यातून सावरून या देशाने केवळ चार महिन्यांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांना धडा शिकवीत देशातील परिस्थितीही पूर्वपदावर आणली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक पातळीवर देशाला भक्कम करण्यासाठी तेथील सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे. चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) रसगुल्ले    2) माझा      3) भाऊ      4) आनंदाने

उत्तर :- 2

2) ‘राणी प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) प्रधानकर्तृक

उत्तर :- 1

3) ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास ............. म्हणतात.

   1) तत्पुरुष समास  2) अव्ययीभाव समास  3) बहुव्रीही समास    4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

4) संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?

   1) स्वल्पविराम    2) अर्धविराम    3) संयोगचिन्ह    4) अपूर्णविराम

उत्तर :- 1

5) ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा.

   1) अतिशयोक्ती    2) व्यतिरेक    3) श्लेष      4) अन्योक्ती

उत्तर :- 1

6) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?

   1) पद      2) नयन      3) वडवानल    4) डोळा

उत्तर :- 4

7) उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) वाच्यार्थ    2) शब्दार्थ    3) व्यंगार्थ    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

8) ‘अवडंबर’ म्हणजे –

   1) अगडबंब    2) अवघड    3) स्तोम      4) यापैकी नाही

उत्तर :- 3

9) ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुध्दार्थी अर्थ असलेला
     शब्द निवडा.

   1) साधू    2) सन्याशी    3) प्रामाणिक    4) साव

उत्तर :- 4

10) जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो – या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?

   1) तळे राखील तो पाणी चाखीन      2) साखरेचे खाणार, त्याला दैव देणार
   3) पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा      4) हाजिर तो वजीर

उत्तर :- 4