Ads

27 June 2020

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये


◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

भारतीय वित्तीय व्यवस्थेची रचना.


🎯 वित्ताच्या कालावधीनुसार भारतीय वित्तीय व्यवस्थेचे दोन भाग पडतात.

1. भारतीय नाणे बाजार -

🎯वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला नाणे बाजार असे म्हणतात.

🎯 नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी होतात. मात्र, कृषीसाठी हा अल्प कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

🎯भारताच्या नाणे बाजारात असंघटित क्षेत्राचा तसेच, संघटित क्षेत्राचा समावेश होतो.

🎯असंघटित क्षेत्रात सावकार, सराफी पेढीवाले तसेच, बँकेतर वित्तीय संस्थांचा समावेश होतो.

🎯 संघटित क्षेत्रात व्यापारी बँकांचा समावेश होतो. त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील, सहकारी क्षेत्रातील तसेच, परकीय बँकांचा समावेश होतो.

2. भारतीय भांडवल बाजार -

🎯 वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात मध्यम तसेच दीर्घकालीन निधींची देवाण-घेवाण होते, त्याला भांडवल बाजार असे म्हणतात.

🎯 भांडवल बाजारात 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात. साधारणत: 5 वर्षापर्यंतच्या कालावधीला मध्यमकालीन तर त्यापेक्षा जास्त 20-25 वर्षापर्यंतच्या कालावधीला दीर्घ-कालीन समजले जाते.

🎯भारतीय भांडवल बाजारात वित्त पुरवठा करणार्‍या व इतर वित्तीय सेवा प्रदान करणार्‍या संस्थांमध्ये खालील संस्थांचा समावेश होतो.

1. व्यापारी बँका

2. विकास वित्तीय संस्था. उदा. IFCI, IDBI, ICICI, SFCs, SIDCs, इ.

3. विकास कंपन्या - LIC आणि GIC.

4. मर्चंट बँका.

5. म्युचुअल फंड्स - UTI

6. पतदर्जा ठरविणार्‍या संस्था CRISIL, CARE, ICRA

🎯तसेच, भांडवल बाजारात कर्ज घेणार्‍यांना (ऋणको) व कर्ज देणार्‍यांना (धनको) एकत्र आणणारे रोखे बाजार (Stock exchanges) व त्यातील दलाल महत्वाची भूमिका पार पाडतात.

🎯भारतात बँक व्यवसायाचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच असले तरी आधुनिक बँक-व्यवसाय मात्र ब्रिटिश काळापासूनच सुरू झाला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती ( अध्यक्ष विशेष )

1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक

विधानसभा.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना :
170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा :
घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक :
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती :
विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.
___________________________

सार्क संघटना.


🅾2015 मध्ये सार्क संघटनेची 18 वी परिषद नेपाळ मध्ये पार पडली व ती शेवटची ठरली .

🅾त्यानंतर 19 वी परिषद पाकिस्तानमध्ये होणार होती पण ती भारत ,बांगलादेश ,भूतान च्या बहिष्कारामुळे रद्द करावी लागली .

🅾या संघटनेला आता उतरती कळा लागली आहे .निर्धारित केलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यात ही संघटना पूर्णतः अपयशी ठरली आहे .

💠💠सार्क.💠💠

🅾च्या इतर सदस्यांच्या तुलनेत भारत सर्व दृष्टीने मोठा आहे. दक्षिण आशिया उपखंडाच्या एकूण आकारमानापैकी एकट्या भारताचे आकारमान सत्तर टक्के एवढे आहे. स्वाभाविकपणे भारताचा या संघटनेवर प्रभाव आहे.

🅾भारताच्या खालोखाल पाकिस्तानचे आकारमान येते. याचाच अर्थ असा की या दोन राष्ट्रांनी सार्कच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित होते....पण तसे घडले नाही.

💠💠सार्कची संस्थात्मक रचना.💠💠

🅾सार्कच्या संस्थात्मक रचनेत सर्वोच्च स्थानी सदस्य राष्ट्रांच्या द्विवार्षिक बैठकांचा समावेश होतो. त्याखालोखाल सार्कच्या मंत्रिमंडळाचे स्थान आहे.

🅾 मंत्रिमंडळात सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांचा समावेश होतो. तिसऱ्या स्थानावर सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र सचिवांची कार्यकारी समिती आहे. ही समिती वर्षातून दोनदा भेटते.

🅾त्याखालोखाल चौथ्या स्थानावर अनेक विषय व कृती समित्या आहेत. सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे. महासचिव सचिवालयाचा प्रमुख म्हणून काम पाहतात.

💠💠सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी.💠💠

🅾लोकसंख्या २१.३ टक्के 

🅾सकल गृह उत्पन्न १.३ टक्के 

🅾निर्यात ०.९ टक्के 

🅾आयात १.० टक्के 

🅾अन्नधान्याचे उत्पादन ९.७ टक्के 

🅾आंतरविभागीय व्यापार ३.४ टक्के 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

 

2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

 

3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

 

4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

 

5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

6. संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 

 

7. आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

 

8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

 

9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

 

10. उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे


◾️खासगी कंपन्याही करु शकतात उपग्रहासह रॉकेट बांधणी
इस्रोने अवकाश संशोधन क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले आहे.

◾️ खासगी क्षेत्राला आता
📌उपग्रह निर्मितीसह
📌रॉकेट बांधणी तसेच
📌 उपग्रह लाँचिंगच्या सेवाही सुरु करता येऊ शकतात.

◾️ भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख के.सिवन यांनी आज ही माहिती दिली.

◾️खासगी क्षेत्राला सुद्धा आता इस्रोच्या मोहिमांचा भाग होता येईल असे त्यांनी सांगितले.

📌 अवकाश मोहिमा आणि संशोधनामध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

महत्त्वाचे प्रश्नसंच

🏷 कोणता देश ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020’ याच्या यादीत अग्रस्थानी आहे?
उत्तर : नॉर्वे

🏷 कोणत्या CSIR संस्थेनी कोविड-19 रोगासाठी ‘फेलुदा’ चाचणी विकसित केली?
उत्तर : इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी

🏷 कोणत्या मंत्रालयाने ‘विद्यादान 2.0’ मंच प्रस्तुत केले?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

🏷 कोणत्या राज्य सरकारने ‘आपदामित्र’ मदत क्रमांक कार्यरत केला?
उत्तर : कर्नाटक

🏷 कोणत्या संस्थेनी कोविड-19 संदर्भात ‘लॉकडाऊन लर्नर्स’ मालिका आरंभ केली?
उत्तर : औषधे आणि गुन्हेगारी विषयक संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC)

🏷 भारताच्या ध्वजाने प्रज्वलित केलेले मॅटरहॉर्न पर्वतशिखर कोणत्या देशात आहे?
उत्तर : स्वित्झर्लंड

🏷 सिटी युनियन बँकेचे नवे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ कोण आहेत?
उत्तर : एन. कामाकोडी

🏷 सुधा मुर्ती यांच्या प्रकाशित झालेल्या पहिल्या ऑडियो बूकचे शीर्षक काय आहे?
उत्तर : हाऊ द ओनियॉन गॉट इट्स लेयर्स

🏷 2020 साली जागतिक पृथ्वी दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अॅक्शन

🏷 कोणत्या राज्याने कोविड-19 प्रकरणांच्या जलद तपासणीसाठी 'तिरंगा' नावाचे वाहन सादर केले?
उत्तर : केरळ

1.  मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

 32
 33
 40
 15

उत्तर : 33

 2. मानवी ‘मज्जासंस्थेचा’ अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

 न्यूरॉलॉजी
 नफोललॉजी
 डी.एन.ए.
 यापैकी नाही

उत्तर :न्यूरॉलॉजी

 3. जीवनसत्व ‘क’ कोणत्या फळात सर्वाधिक आढळते?

 आवळा
 गाजर
 केळी
 पेरु

उत्तर :आवळा

 4. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

 क
 अ
 ड
 ई

उत्तर :क

 5. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?


 ब
 क
 ड

उत्तर :ड

 6. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

 डॉ. हॅन्सन
 डॉ. रोनॉल्ड
 डॉ.बेरी
 डॉ. नेकेल्सन

उत्तर :डॉ. हॅन्सन

 7. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

 1975
 1974
 1973
 1972

उत्तर :1974

 8. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

 पायोप्सी
 सर्जरी
 डेप्सोन
 यापैकी नाही

उत्तर :पायोप्सी

 9. खालीलपैकी कोणते औषध ‘क्षयरोगासाठी’ वापरतात?

 स्ट्रेप्टोमायसिन
 पेनिसिलिन
 डेप्सोन
 ग्लोबुळिन

उत्तर :स्ट्रेप्टोमायसिन

 10. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

 हाड
 डोळा
 पाय
 मज्जासंस्था

उत्तर :मज्जासंस्था

 11. ‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

 पोलिओ
 क्षयरोग
 रातअंधळेपणा
 कुष्ठरोग

उत्तर :क्षयरोग

 12. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?

 विल्यम हार्वे
 डॉ. एडिसन
 ख्रिश्चन बर्नार्ड
 डेव्हिडसन

उत्तर :ख्रिश्चन बर्नार्ड

 13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग संशोधन केंद्र’ आहे?

 पुणे
 वर्धा
 नागपूर
 मुंबई

उत्तर :वर्धा

 14. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले ‘माफीन’ कोणत्या झाडापासून मिळवितात?

 अफू
 गांजा
 उस
 खैर

उत्तर :अफू

 15. खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

 क्षयरोग
 देवी
 पोलिओ
 कावीळ

उत्तर :कावीळ

 16. रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

 क्षयरोग
 मलेरिया
 नारू
 मोतीबिंदु

उत्तर :मलेरिया

 17. मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

 खरूज
 एक्झिमा
 वरील दोन्ही
 यापैकी नाही

उत्तर :वरील दोन्ही

 18. 98 मी. उंचीच्या मनोर्‍यावरुन खाली फेकलेला एक चेंडू किती सेकंदामध्ये खाली पडेल?

 15 सें.
 8 सें.
 10 सें.
 12 सें.

उत्तर :10 सें.

 19. समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

 100° से.
 120° से.
 1000° से.
 90° से.

उत्तर :90° से.

 20. एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

 4.2 कॅलरी
 3.4 कॅलरी
 2.4 कॅलरी
 9.0 कॅलरी

उत्तर : 4.2 कॅलरी

26 June 2020

परिशिष्ट/अनुसूची/ Schedule


1) परिशिष्ट I
राज्य व केंद्र शासित प्रदेश

2) परिशिष्ट II
वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)

3)परिशिष्ट III
पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)

4) परिशिष्ट 4
राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण

5) परिशिष्ट V
भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती

6)परिशिष्ट VI
आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी

7)परिशिष्ट VII
केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.

8) परिशिष्ट VIII
भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.

9) परिशिष्ट IX 
कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

10)परिशिष्ट X
पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.

11)परिशिष्ट XI 
पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.

12)परिशिष्ट XII
  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

चालू घडामोडी प्रश्नसंच


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्यात 'प्रज्ञान भारती' योजना लागू केली गेली आहे?

(A) सिक्किम
(B) आसाम✅✅
(C) अरुणाचल प्रदेश
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणत्या राज्याने ‘एकतू खेलो, एकतू पढो’ नावाचा एक उपक्रम जाहीर केला?

(A) त्रिपुरा✅✅
(B) पश्चिम बंगाल
(C) ओडिशा
(D) आसाम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦कोणती संस्था “डिकार्बनायझिंग ट्रान्सपोर्ट इन इंडिया” प्रकल्प प्रारंभ करण्यासाठआय नीती आयोगाच्या सहकार्याने काम करीत आहे?

(A) आंतरराष्ट्रीय रस्ते परिवहन संघ
(B) जागतिक रस्ते संघ
(C) TIR परिषद
(D) आंतरराष्ट्रीय परिवहन मंच✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणती संस्था ‘जागतिक वर्षावन दिन’ आयोजित करते?

(A) रेनफॉरेस्ट अॅक्शन नेटवर्क
(B) रेनफॉरेस्ट फाउंडेशन फंड
(C) रेनफॉरेस्ट पार्टनरशिप✅
(D) रेनफॉरेस्ट ट्रस्ट

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦 कोणत्या व्यक्तीची भारताकडून ‘वर्ल्ड टेनिस टूर’साठी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (ITF) समितीवर निवड करण्यात आली आहे?

(A) महेश भूपती
(B) निकी कल्यानंद पूनाचा✅✅
(C) रोहन बोपाना
(D) युकी भामंब्री

🛑 कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती मंडळामध्ये अनाधिकृत संचालक या पदावर नेमणूक झाली?

👉नटराजन चंद्रशेखरन✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीला ‘रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद’चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

👉  कोलिन शाह✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर नेमणूक करण्यात आली?

👉  टी. रबी शंकर✅✅

🛑 कोणत्या व्यक्तीची संयुक्त राज्ये अमेरिका देशाच्या ‘नॅशनल सायन्स फाउंडेशन’ या संस्थेचे नवे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली?

👉 डॉ. सेतुरामन पंचनाथन✅✅

🛑 “लिजेन्ड ऑफ सुहेलदेव: द किंग हू सेव्ह्ड इंडिया” हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले आहे?

👉 अमिश त्रिपाठी✅✅