२३ ऑक्टोबर २०२१

महाराष्ट्रातील नद्या

◾️गोदावरी

गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता. 

गोदावरी नदीचा उगम :-

सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी ***** किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

गोदावरीच्या उपनद्या

पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.

गोदावरी नदीच्या काठावरील शहरे

नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

गोदावरी नदीवरील धरणे

गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


◾️भीमा नदी

भीमा नदीचा उमा भीमाशंकर, पुणे येथे होतो. देशातील १२ ज्योर्तीलिंगांपैकी भीमाशंकर हे एक ज्योर्तीलिंग आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ४५१ किमी एवढी आहे. भीमा नदी कर्नाटक राज्यामध्ये रायचुर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद.

भीमा नदीच्या उपनद्या

भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा, भोगावती, सीना, घोड, वेळ, माण इ.

भीमा नदीचा प्रवाह हा सुरुवातीस पुर्वेस व नंतर आग्नेयेस आहे. ही नदी पंढरपुर या तीर्थक्षेञामध्ये आल्यास चंद्रकोरीचा आकार घेते म्हणून तीला पंढरपुर येथे ” चंद्रभागा” या नावाने ओळखले जाते. भीमा नदीची उपनदी “इंद्रायणी” नदीच्या काठावर “देहु व आळंदी” ही तीर्थक्षेञे पुणे जिल्हयात आहेत. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये “उजणी धरण” बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयास “यशवंत सागर” या नावाने ओळखले जाते.

कृष्णा नदी

कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जि. सातारा येथे होतो. कृष्णा नदीच्या प्रवाहाची दिशा सुरुवातीलस पश्चिमेकडुन दक्षिणेस व नंतर पुर्वे व आग्नेय दिशेस आहे. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या ०३ राज्यातुन वाहते. कृष्णा नदीची एकूण लांबी १२८० किमी एवढी व महाराष्ट्रातील लांबी २८२ किमी एवढी आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्हयांतुन वाहते.

कृष्णा नदीच्या उपनद्या

कोयना, वारणा, वेण्णा, येरळा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा व नंदला इ. कोयना नदीस “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी” म्हणून ओळखले जाते. कोयना नदीवर “कोयना धरण” बांधण्यात आले आहे.

कृष्णा नदीच्या काठावरील शहरे

वाई, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाची वाडी, मिरज इ.

तापी नदी

तापी नदी ही पश्चिम वाहीनी नदी आहे. उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा व दक्षिणेस सातमाळा डोंगर याच्या मधुन तापी नदी पुर्वेकडून पश्चिमेस वाहते. या नदीचा उगम मध्यप्रदेश मधील सातपुडा पर्वत रांगेतील “मुलताई” किंवा “बैतुल” येथे होतो. तापी नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतुन वाहते व ती पुढे सुरत, गुजरात येथे अरबी समुद्रास मिळते. तापी नदीची एकूण लांबी ७२० किमी एवढी आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी २०८ किमी एवढी आहे. तापीने उत्तर महाराष्ट्राचा बरासचा भाग व्यापलेला आहे.  तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार इ. जिल्हे येतात. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर खिंडीमधून महाराष्ट्रातील जळााव जिल्हयातील रावेर शहराजवळ तापी नदी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते.

तापी नदीच्या उपनद्या

पुर्णा (प्रमुख उपनदी), गिरणा, पांझरा, भुलेश्वरी, शहानुर, नंदवान, नळगंगा व मोरणा इ.

पुर्णा नदी

पुर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. पुर्णा नदीचा उगम गाविलगडाच्या डोंगरावर होतो. तापी नदी व पुर्णा नदी या जळगाव जिल्हयातील श्रीक्षेञ चांगदेव येथे संगम पावतात. तापी व पुर्णा नदीचा संयुक्त प्रवाह धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयातुन वाहतो.

पुर्णा नदीच्या उपनद्या

पेढी, नळगंगा, मोरणा व मण

नर्मदा नदी

नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील सातपुडा पर्वरांगेतील “अमरकंटक” येथे होते. नर्मदा नदीची एकूण लांबी १२९० किमी एवढी आहे व तिची महाराष्ट्रातील लांबी ५४ किमी एवढी आहे. नंदुरबार जिल्हयाच्या अती उत्तरेकडून ही नदी वाहते. नर्मदा नदी सातपुडा पर्वत रांगेतील अक्राणी टेकड्यांमुळे तापी नदी पासुन वेगळी झाली आहे. नर्मदा नदी भडोच, गुजरात येथे अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील उपनदी तवा ही आहे. नर्मदा नदीवर “धुवांधार धबधबा” आहे. नर्मदा नदीवरील गुजरात राज्यातील “सरदार सरोवर प्रकल्प” बांधण्यात आला आहे.

कोकणातील महत्वाच्या नद्या

उल्हास नदी

कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून उल्हास नदीस ओळखले जाते. उल्हास नदीची लांबी १३० किमी एवढी आहे. उल्हास नदीचा उगम पुणे ते मुंबई दरम्यान असलेल्या “बोरघाट” येथे होतो.

कोकणातील इतर महत्वाच्या नद्या

साविञी, वशिष्ठी, शास्ञी, सुर्या(ठाणे), वैतरणा, अंबा, काजळी, दमणगंगा, तेरेखोल इ. आहेत.  “दमणगंगा” ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे. “तेरेखोल” ही नदी कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. वैतरणा नदीवरील मोडकसागर या धरणातुन मुंबई शहरास पाणी पुरवठा होतो.

१८५७ चा उठाव - ठिकाण- उठावाचे नेतृत्व - इंग्रजांचे नेतृत्व.

✔️ १. दिल्ली - जनरल बख्त खान - जॉन निकोल्सन, जनरल हडसन.

✔️ २. कानपुर - नानासाहेब - ह्यू व्हीलर, कॉलिन कॅम्पबेल.

✔️ ३. लखनौ - बेगम हजरत महल - हॅवलॉक, नील, कॉलिन कॅम्पबेल.

✔️ ४. बरेली(रोहिलखंड) - खान बहादूर खान.

✔️ ५. बिहार(जगदिशपूर) - कुंवर सिंह - विलियम टेलर.

✔️ ६. ग्वाल्हेर - तात्या टोपे - ह्यू रोज.

✔️ ७. झांसी - राणी लक्ष्मीबाई - ह्यू रोज.

✔️ ८. फैजाबाद(अवध) - मौलवी अहमदुल्ला - जनरल रेनर्ड

वाचा :- महाराष्ट्र इतिहास

● महाराष्ट्रात नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद आदी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

● महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.

● मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.

● जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. ‘सिमुक’ राजा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.

● सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची राणी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.

● राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले.

● शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.

● शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.

● चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली. तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.

● यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.

● महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली. तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.

बहामणी राज्याचे खालील 5 तुकडे झाले.
1. वर्हाडी : इमादशाही
2. अहमदनगर : निजामशाही
3. बिदर : बरीदशाही
4. गोवलकोंडा : कुतुबशाही
5. विजापूर : आदिलशाही

आजची प्रश्नमंजुषा

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
____________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
____________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
____________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
____________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
____________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
____________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
____________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011
____________________________

🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?

    A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24
____________________________

🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21
     B)15
     C)7 ✅✅
     D)14

____________________________

प्रश्न मंजुषा

१. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 

2) कार्यकारी मंडळ   

3) संसद ✓

4) न्यायमंडळ

२.  योग्य विधान ओळखा

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

A)1 बरोबर

B) 2 बरोबर

C) दोनीही बरोबर ✓💐🏅

D) दोनीही चूक

३. ________ याला सहकाराचा जनक मानतात.

रॉबर्ट ओवेन✓
रॉबर्ट हूक
मायकेल ओवेन
यापैकी नाही

४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

हिंद स्वराज संघ

हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

हिंद स्वराज✓.

यापैकी नाही

५. भारतातून ____ हे वृत्त जाते.

कर्कवृत्त✓✓

मकरवृत्त

विषुववृत्त

कोणतेही जात नाही

६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ?

1901

1902✓✓✓

1903

1904

७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ? 

..42...वी घटनादुरुस्ती ✓

८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

औरंगाबाद

नाशिक

पुणे

मुंबई✅✅

९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

नागपूर

आर्वी✅✅

अहमदाबाद

चंद्रपूर

१०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

सरस्वती

यमुना

शरयू✓

घंडक

११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला .

....८६... व्या✅✅

१२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

A. सरदार वल्लभभाई पटेल✓

B. जी. बी. पंत

C. जी. एल. नंदा

D. लाल बहादूर शास्त्री

१३. लोकसभेचे पिता ..... आहे.

A. अनंतसांणम

B. झिकीर हुसैन

C. बासमम

D. मावळणकर✓

१४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?

48✓✓

१५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत

प्रतिभादेवी पाटील✓

१६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे

19✓✓

१७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग

२) राजेन्द्रप्रसाद

३) मेघनाद ✓

४) नरेंद्र मोदी

१८. ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे

CFC✓

१९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते

2015✅✅

२०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


  ब्रिटेन  ✅

〰〰〰〰〰〰〰〰〰

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती


🕹भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे.

🕹भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.

🕹भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.

🕹भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत.
🕹देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.

🕹राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात.
🕹 राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.

🕹राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.


🕹राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.

🕹अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.

🕹भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.

🕹भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.

🕹तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत होते.
🕹 सध्याचे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद आहेत.

🕹 *पात्रता* –
👑भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार-

🕹ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

🕹त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.

🕹त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

🕹ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.

🕹संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.

🕹 *अपात्रता* –
भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

🕹ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.

🕹ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.

🕹ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.

🕹ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.

🕹त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.

🕹 *निवडणूक* :-

🕹राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.

🕹राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.

🕹 *कार्यकाल*
भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.

🕹राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.

🕹याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.

🕹एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.

*🕹वेतन, भत्ते व सुविधा*
🕹राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.

🕹त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.

🕹कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.

🕹एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.

🕹आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.

🕹निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.   

*🎯राष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार:-*

🕹भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात.

🕹भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार दिलेले आहेत.

🕹भारतीय राज्यघटनेत कलम 47 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, मंत्रीमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील साधारणत: राष्ट्रपतीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात.

*🕹कार्यकारी अधिकार* –

राष्ट्रपती पंतप्रधनाची नेमणूक करतो व पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.

🕹संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी

घटना उद्देशपत्रिके बाबत वादविवाद.


🅾उद्देश पत्रिका घटनेचा भाग आहे व नाही याबद्दल वरील प्रमाणे तीन खटले झाले

🅾 केशवानंद भारती खटला 1973 नुसार
प्रस्ताविकेत कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते पण घटनेच्या मौलिक संरचनेला हात न लावता त्यात घटना दुरुस्ती करता येते   

🅾 प्रस्ताविकेत आतापर्यंत एका वेळेसच घटना दुरुस्ती करण्यात आली आहे

🧩 42 वी घटनादुरुस्ती 1976 याद्वारे प्रस्ताविकेमध्ये :-

🅾 समाजवादी
🅾 धर्मनिरपेक्ष
🅾 एकात्मता ही नवीन तत्त्वे समाविष्ट करण्यात आली

🅾प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजे तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे


 *गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.*
 *सिंधू - लेह.*
 *सतलज - फिरोजपुर,लुधियाना.*
 *तापी - भुसावळ,सुरत.*
 *महानदी - कटक,संबलपुर.*
 *कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.*
 *मुसी - हैदराबाद.*
 *यमुना - दिल्ली,आग्रा.*
 *शरयू - अयोध्या.*
 *ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.*
 *झेलम - श्रीनगर.*
 *नर्मदा - जबलपूर, भरुचा.*
 *साबरमती - अहमदाबाद.*
 *गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.*
 *भीमा - पंढरपूर.*
 *कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली*
 *हुगळी- कोलकाता*

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

💐 मोजकेच पण महत्वाचे 💐

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

1) अणू सिध्दांत 1803 - जॉन डॉल्टन

2) उत्क्रांतीचा सिद्धांत 1858 - चार्ल्स डार्विन

3) गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत 1687 - आयझॅक न्यूटन

4) सापेक्षतः सिध्दांत 1905 - अल्बर्ट आईन्स्टाईन

5) भूखंड वाहनाचा सिध्दांत  1912 - आल्फ्रेड वेगणर

6) बिग - बँग सिध्दांत  1927 - जॉर्जेस जोसेफ लेमित्रे

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन II|