31 December 2022

प्राचीन भारत इतिहास:



* वेद काल


०१. गुत्समद, विश्वमित्र, वामदेव, भारद्वाज, अत्री आणि वशिष्ट या ऋषींनी सुक्त अथवा मंत्रांची रचना केली आहे. लोपामुद्रा, घोष, शची आणि पौलोमी या प्रमुख ऋष्निया आहेत.

०२. आयुर्वेद हा ऋग्वेदाचा, धनुर्वेद हा यजुर्वेदाचा, गंधर्ववेद हा सामवेदाचा, शिल्पवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. सामवेद कौथुम, रणायानीय आणि जैमिनीय तीन शाखांमध्ये विभागलेला आहे.

०३. आचार्य अश्वनी कुमार, धन्वंतरी, बाणभट्ट, सुश्रुत, माधव, जीवन व लोलींबराज हे आयुर्वेदाचे रचनाकार आहेत.

०४. ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन ब्राह्मण आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा तर शतपथ हा शुक्ल यजुर्वेदाचा ब्राह्मण आहे. तांडव, पंचविश, सद्विश, छांदोग्य हे सामवेदाचे ब्राह्मण आहेत.

०५. आरण्यकामध्ये आत्मा. मृत्यू, जीवन यांचे वर्णन केलेले आहे.  ऐतरेय व कौशित्की हे ऋग्वेदाचे दोन आरण्यक आहेत. ऐतरेय आरण्यकाचे रचनाकार महिदास ऐतरेय आहेत. तैत्तरीय हा कृष्ण यजुर्वेदाचा आरण्यक आहे. सामवेद आणि अथर्ववेदाला आरण्यक नाही.

०६. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, तैत्तरीय, ऐतरेय, छान्दोक्य, वृहदारण्यक, श्वेताश्वतर, कौशित्की, महानारायण इत्यादी प्रमुख उपनिषद आहेत.


* ऋग्वैदिक काळ


०७. ऋगवैदिककाळात गळ्यात 'निष्क', कानात 'कर्णशोभन' आणि कपाळावर 'कुंभ' नावाची आभूषणे परिधान केली जात.

०८. ऋगवैदिककाळात गाय, म्हैस, शेळ्या, घोडा, हत्ती आणि उंट या प्राण्यांचे आर्यांद्वारे पालन केले जात असे.

०९. ऋगवैदिककाळात भीषज चिकित्सेचे कार्य करीत असे.

१०. ऋगवैदिककाळात आर्य सूर्याची उपासना करीत असे. सूर्याला सविता मित्र, पूषण तसेच विष्णूचा अवतार मानले जात असे. सूर्याला देवतेचे नेत्र असे संबोधले जात असे.

११. ऋगवैदिककाळात अग्नीला देवतेचे मुख असे म्हटले जात असे. अग्नीला आर्यांचे पुरोहित असे मानले गेले आहे. आर्यांचा विचार होता कि यज्ञातील आहुती अग्नी देवतेपर्यंत पोहोचवीत असे. त्या काळात वरून देवतेला आकाश देवतेच्या रुपात पुजिले जात असे.

१२. ऋगवैदात उषा, सीता, पृथ्वी, अरण्यांनी, रात्री यांची आराधना देवीच्या रुपात केली गेली आहे. कृषी संबंधित देवी म्हणून सीतेचा उल्लेख गोमील गृह्य सूत्र तसेच परस्पर गृह्य सूत्रांमध्ये झाला आहे.

१३. ऋगवैदिककाळात व्यापाऱ्यांना 'पणि' म्हटले जात असे. हे लोक आर्यांच्या पाळीव पशूंची चोरी करत असत. 'पणि' लोकांपेक्षा जास्त हेटाळनी 'दस्यू' लोकांची होत असे. 'दस्यू' काळ्या रंगाचे, यज्ञ विरोधी व शिश्नदेवाचे पूजक होते.

१४. ऋगवैदिककाळात गाय ही अर्थव्यवस्थेचा कणा होती.

१५. ऋगवैदिककाळात गायीला 'अधन्या', युद्धाला 'गलिन्टी', पाहुण्यांना 'मोहन' आणि पुत्रीला 'दुहीन्ति' असे संबोधले जात असे.

१६. ऋगवैदात 'वशिष्ठ' यांना उर्वशीचा मानसपुत्र तसेच वरुणाच्या वीर्यातून एका मातीच्या घागरीतून जन्मलेला म्हटले जाते. अगस्त्य यांना सुद्धा मातीच्या घागरीतून जन्मलेला असे म्हटले जाते.

१७. बल्बुभ तसेच तरुक्ष द्वास हे सरदार होते. पुरोहितांना दानधर्म करून आर्य समाजात त्यांनी उच्च स्थान प्राप्त केले होते.

१८. ऋग्वेदात इंद्राचा सर्वात जास्त वेळेस उल्लेख केला आहे. त्याच्या खालोखाल वरुणाचा उल्लेख केलेला आहे. प्रजापतीचा उल्लेख आदी पुरुष म्हणून केलेला आहे. देवता हे त्याचेच वंशज होते.

१९. ऋग्वेदात राजाचा उल्लेख 'गोप्ता जनस्य' असा आहे. ऋग्वेदात भूमी अधिकाऱ्याला 'व्राजपति', सैन्य अधिकाऱ्याला 'ग्रामणी' आणि कुटुंबाच्या प्रमुखाला 'कुलूप' असे संबोधले जात असे.

२०. 'सोम' हा वनस्पतींचा देवता होता. सोम हे एक मादक पेयसुद्धा होते. ज्याच्या बनविण्याचा विधी ऋग्वेदात सांगितला आहे.


* उत्तर वैदिककाळ 


२१. उत्तर वैदिक कालीन साहित्य इसवी सन पूर्व ११०० ते ६०० या काळात रचलेले आहे. या काळात मातीचे चित्रित भांडी व लोखंडाच्या औजारांचा वापर केला जात असे. पूर्व वैदिक काळातील मुख्य धान्य बार्ली होते पण उत्तर वैदिक काळात मुख्य धान्य उत्पादन भात व गहू होते.

२२. उत्तर वैदिक काळात राजांनी राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ व वाजपेय यज्ञ करायला सुरुवात केली.

२३. उत्तर वैदिक काळात गोत्र परंपरा तसेच गोत्राच्या बाहेर लग्न करण्याची परंपरा सुरु झाली.

२४. उत्तर वैदिक काळाच्या साहित्यात तीन आश्रमांचा उल्लेख मिळतो. ब्रह्मचर्य, गृहस्थ व वानप्रस्थ. सन्यास आश्रमाचा स्पष्टपणे उल्लेख आढळत नाही.

२५.  उत्तर वैदिक काळात 'सोम' वनस्पती मिळेनासे झाल्याने. दुसऱ्या पेयांचा प्रयोग करण्यास सुरुवात झाली.

२६.  उत्तर वैदिक काळात सोने व चांदीचा उपयोग आभूषणे व भांडी बनविण्यासाठी केला जात असे. तर इतर धातूंचा वापर इतर उपकरणे बनविण्यासाठी केला जात असे.

२७.  उत्तर वैदिक काळात व्यापाऱ्यांनी आपआपले गट तयार केले होते. आर्यांच्याद्वारे समुद्रव्यापार सुद्धा केला जात असे. व्यापारासाठी निष्क, शतमान आणि कृष्णाल या मुद्रांचा वापर केला जात असे.

२८. उत्तर वैदिक काळात ऋग्वैदिक काळाच्या तुलनेत धर्माचे स्वरूप अधिकच जटील होत गेले. यज्ञात बळींचे तसेच पुरोहितांचे महत्व वाढत गेले. या काळात अनेक प्रकारचे यज्ञ केले जाऊ लागले.

वनस्पतीचे वर्गीकरण :




उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी

वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा

· प्रकाश स्वयंपोषी

वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ

· परस्परपूरक सहजीवन

· उदा . उस्निया (दगडफूल)

जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

· निरनिराळ्या पोषण पद्धती.

· प्रजजन साध्या स्वरूपाचे.

विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

· 3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला

वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम

वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.

वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस

वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

विज्ञान प्रश्नसंच


🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान

30 December 2022

भारतातील नागरी सेवांचा विकास



 

✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले

 

✏️वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज

2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)

3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

 

✏️1853- खुली स्पर्धा

 

✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861

 1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}

 {19-1878}

 2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय 

 

✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)

 1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

  

✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop

2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),

-   प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),

-   अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)

3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

 

✏️माँटफोर्ड सुधारणा,1919

 1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

 

✏️ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.

2.लोकसेवा आयोग स्थापन करणे

(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

 

✏️GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

महत्त्वाचे सराव प्रश्न व उत्तरे


1)कोणती भारतीय शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे ठरले?


(A) IIT मुंबई✅✅✅

(B) IIT मद्रास

(C) IIT दिल्ली

(D) IIT मंडी


1)कोणी स्लोव्हाकिया या देशाच्या प्रथम महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली?


(A) मारिया रोको

(B) एड्रियाना कारेमब्यू

(C) डेनिएला हांतुचोवा

(D) जुझाना कापुतोवा✅✅✅


3)कोणती शैक्षणिक संस्था वा विद्यापीठ ‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे?


(A) मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी✅✅✅

(B) ऑक्सफर्ड विद्यापीठ

(C) मॅक्स प्लांक विद्यापीठ

(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू


4)कोणत्या सालापर्यंत ‘भारतमाला’ प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35000 किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे केले जाणार आहे?


(A) सन 2025

(B) सन 2022✅✅✅

(C) सन 2030

(D) सन 2035



5)राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भारताला 5 भूकंपीय विभागांमध्ये विभागले आहे. कोणता क्षेत्र सर्वात उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जातो जो अतीव तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडतो?


(A) क्षेत्र 5✅✅✅

(B) क्षेत्र 1

(C) क्षेत्र 3

(D) क्षेत्र 2




6)भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत 6 पाणबुडी तयार करण्यासाठी भारत सरकारने जून महिन्यात 45 हजार कोटी रुपयांच्या खर्चाने प्रकल्पाची सुरुवात केली?


(A) प्रोजेक्ट 17A

(B) प्रोजेक्ट 75-I✅✅✅

(C) प्रोजेक्ट 71A

(D) प्रोजेक्ट 79-I


7)भारताने सॉलिड फ्युएल डक्टेड प्रणोदन समर्थित क्षेपणास्त्राचे चाचणी उड्डाण यशस्वीपणे पार पाडले. या क्षेपणास्त्राचे नाव काय आहे?


(A) कर्णजेट

(B) जेटएक्स

(C) जेट-ओ

(D) रामजेट✅✅✅


8) भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (ZSI) आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय सर्वेक्षण (BSI) च्या प्रकाशनानुसार, 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या?


(A) 539✅✅✅

(B) 739

(C) 639

(D) 439


9) कोणते कण हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्‍या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठे घटक आहे?


(A) कार्बन डाय ऑक्साइड

(B) नायट्रोजन✅✅✅

(C) मिथेन

(D) सल्फर डाय ऑक्साईड


10) स्पेनमधील सेव्हिले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शहरी सांडपाण्यामधून बहुतेक प्रदूषके शोषून घेणारा पदार्थ शोधून काढला. त्या पदार्थाचे नाव काय आहे?


(A) Na-माईका-4

(B) CL-माईका-4

(C) N4-माईका-4

(D) C18-माईका-4✅✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागमध्ये येणाऱ्या महानगरपालिका


🎯 कोकण प्रशासकीय विभाग 

1. बृहन्मुंबई महानगरपालिका

2. ठाणे महानगरपालिका

3. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका

4. मीरा - भाईंदर महानगरपालिका

5. भिवंडी - निजामपूर महानगर पालिका

6. नवी मुंबई महानगर पालिका

7. उल्हास नगर महानगरपालिका

8.  पनवेल महानगरपालिका

9.वसई - विरार महानगरपालिका


🎯 पुणे प्रशासकीय विभाग

1. पुणे महानगरपालिका

2. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका

3. सोलापूर महानगरपालिका

4. कोल्हापूर महानगरपालिका 

5. सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका


🎯 नाशिक प्रशासकीय विभाग

1. नाशिक महानगरपालिका

2. मालेगाव महानगरपालिका

3. अहमदनगर महानगरपालिका

4. धुळे महानगरपालिका

5. जळगाव महानगरपालिका


🎯 औरंगाबाद प्रशासकीय विभाग

1. औरंगाबाद महानगरपालिका

2. परभणी महानगरपालिका

3. लातूर महानगरपालिका

4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका 


🎯 अमरावती प्रशासकीय विभाग

1. अमरावती

2. अकोला


  🎯 नागपूर प्रशासकीय विभागात

1. नागपूर

2. चंद्रपूर

राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार..

 राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून यामध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार याची यादी खालीलप्रमाणे..👇🏻


● पुणे विभागात ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे,

● अमरावती विभागात १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे, 

● नागपूर विभागात ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे,

● औरंगाबाद विभागात ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे, 

● नाशिक विभागात ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे, 

● कोकण विभागात ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे..


🧾 जिल्ह्यानुसार तलाठी साझे आणि महसूली मंडळे यांसाठी रिक्त पदांची संख्या अनुक्रमे खालीलप्रमाणे..↓↓


📍 पुणे 

पुणे- ३३१,         ५५

सातारा- ७७,       १२

सांगली- ५२,       ०९

सोलापूर- १११,    १९

कोल्हापूर- ३१,     ०५


📍 अमरावती

अमरावती- ३४,     ०६

अकोला- ०८,        ०१

यवतमाळ- ५४,      ०९

बुलढाणा- १०,       ०२


📍 नागपूर

नागपूर- ९४,          १६

चंद्रपूर- १३३,         २३

वर्धा- ५०,               ०८

गडचिरोली- ११४,   १९

गोंदिया- ४९,           ०८

भंडारा- ३८,            ०६


📍 औरंगाबाद 

औरंगाबाद- ११७,     १९

जालना- ८०,            १३

परभणी- ७६,           १३

हिंगोली- ६१,           १०

बीड- १३८,              २३

नांदेड- ८४,              १४

लातूर- ३९,              ०७

उस्मानाबाद- ९०,      १५


📍 नाशिक

नाशिक- १७५,          २९

धुळे- १६६,               २८

जळगाव- १४६,         २४

अहमदनगर- २०२,     ३४

अलीकडेच घडलेल्या घडामोडी


प्रश्न: समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करण्यासाठी कोणत्या IIT ने अलीकडेच 'Ocean Web Energy Converter' विकसित केले आहे?

उत्तर: IIT मद्रास.


प्रश्न: कोणत्या संस्थेने अलीकडेच जागतिक जल संसाधन अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे?

उत्तर: जागतिक हवामान संघटना.


प्रश्नः नुकतीच 'जे. सी. बोस: एक सत्याग्रही सायंटिस्ट' या विषयावरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

उत्तर : नवी दिल्ली.


प्रश्न: भारतातील पहिले सोन्याचे एटीएम नुकतेच कोठे उघडले गेले?

उत्तर : हैदराबाद.


प्रश्न: कोणता देश अलीकडेच $100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे?

उत्तर भारत.


प्रश्न: अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरित्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे?

उत्तर : नागपूर मेट्रो.


प्रश्‍न: अलीकडे NDDB आणि अमूल दुग्‍ध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी कोणत्या देशाला तांत्रिक सहाय्य करतील?

उत्तर: श्रीलंका.


प्रश्न: भारत आणि कोणत्या देशाने अलीकडे स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे?

उत्तर: जर्मनी.


प्रश्न: अलीकडेच 'फोर्ब्स एशिया हीरोज ऑफ फिलान्थ्रॉपी' यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर: गौतम अदानी.


प्रश्न: अलीकडेच गोव्यात भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलातील 'संगम सराव'ची 7 वी आवृत्ती पार पडली?

उत्तर: अमेरिका. 


Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?

➡️ तामिळनाडू


Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?

➡️ करळ


Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?

➡️ जम्मू आणि काश्मीर


Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.

➡️ सलोचना चव्हाण


Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?

➡️ दव जोशी


Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?

➡️ 08 ते 19 डिसेंबर


Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?

➡️ इशान किशन


Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर


Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?

➡️ 11 डिसेंबर

30 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) नुकतेच अटल सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ प्रभू चंद्र मिश्रा


Q.2) कोणत्या IIT ने Wharton-QS Reimagine Education Awards 2022 जिंकले आहे?

✅ IIT मद्रास


Q.3) अलीकडेच अकरा दिवसीय “धनुजत्रा” महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे?

✅ ओडिसा


Q.4) “हसमुख अधिया” हे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले आहेत?

✅ गुजरात


Q.5) फरहान बेहर’ या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू ने क्रिकेटमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे?

✅ दक्षिण आफ्रिका


Q.6) भारत सरकार कोणत्या देशात “भारतीय मिशन” चालू करणार आहे?

✅ लिथोनिया


Q.7) इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून कोणत्या संघाला ओळखले जाते?

✅ मुंबई इंडियन्स


Q.8) 2022 चा 30वा एकलव्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

✅ स्वस्ति सिंग


Q.9) धर्मदाम हा भारतातील पहिला पूर्ण ग्रंथालय मतदार संघ आहे. ते कोणत्या राज्यात आहे?

✅ केरळ


Q.10) अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे कोणत्या तरुणाला 'Eat Right Campus' टॅग मिळाला आहे?

✅ बुलंदशहर कारागृह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड

Mpsc राज्यसेवा परीक्षा-प्रश्नसराव



1. टी-२० क्रिकेटची सुरुवात कुठे झाली?

1.  ऑस्ट्रेलिया

2.  इंग्लंड

3.  भारत

4.  दक्षिण आफ्रिका

उत्तर:-2


2. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण?

1.  पी. के. सावंत

2.  वसंतदादा पाटील

3.  शरद पवार

4.  देवेंद्र फडणवीस

उत्तर:-3


3. उस्मानिया विद्यापीठ कुठे आहे?

1.  अहमदाबाद

2.  हैद्राबाद

3.  नांदेड

4.  अलीगड

उत्तर:-2


4. उपराष्ट्रातीच्या निवडणुकीत कोणत्य सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

1.  लोकसभा

2.  लोकसभा, राज्यसभा व विधानसभा

3.  लोकसभा व राज्यसभा

4.  राज्यसभा

उत्तर:-3


5. भारतात सर्वात जुने उच्च न्यायालय कुठे आहे?

1.  चेन्नई

2.  मुंबई

3.  अलाहाबाद

4.  दिल्ली

उत्तर:-3


6. भारतातील रबर उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते?

1.  केरळ

2.  आसाम

3.  तामिळनाडू

4.  हिमाचल प्रदेश

उत्तर:-1


7. जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होता?

1.  लॉर्ड रीडिंग

2.  जनरल डायर

3.  लॉर्ड मॉंटेग्यु

4.  सर मायकेल ओडवायर

उत्तर:-2


8. राज्यात महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम केव्हापासून लागू झाला?

1.  १९६९

2.  १९६५

3.  १९६३

4.  १९५९

उत्तर:-2


9. युरोपचे प्रवेशद्वार म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

1.  लंडन (इंग्लंड)

2.  रोम (इटली)

3.  शिकागो (यूएसए)

4.  अंमस्टरडोम (हॉलंड)

उत्तर:-4

प्राचीन भारताचा इतिहास



 राज्यसेवा परीक्षेसाठी विशेषतः
.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.
०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.
०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.
०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.
०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.
०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.
०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.
०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.
०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.
१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.
११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.
१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.
१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.
१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.
१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.
१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.
१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.
१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

क्रियाशील फ्लोरीन



◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शाश्वत विकासाची संकल्पना



आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो.


○शाश्वत विकास १७ ध्येये 


•सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.


 • भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.


•आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.


• सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.


• लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.


•पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.


•सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.


•शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.


•पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.


•विविध देशांमधील असमानता दूर करणे.


•शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.


• उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.


• हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.


•महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.


•परिस्थितिकीय व्यवस्थांचा शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.


•शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.


•चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

सराव प्रश्नसंच - भूगोल

 ● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा

ब. नाशिक

क. रायगड

ड. पुणे


उत्तर - क. रायगड 


● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा

ब. तापी

क. गोदावरी

ड. कृष्णा


उत्तर - अ. मुळा 


● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ

ब. मुंबई विद्यापीठ

क. शिवाजी विद्यापीठ

ड. नागपूर विद्यापीठ


उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ 


● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713

ब. 407434

क. 503932

ड. 603832


उत्तर - अ. 307713


● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला

ब. दुसरा

क. तिसरा

ड. चौथा


उत्तर - ब. दुसरा 


● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड

ब. ठाणे

क. पालघर

ड. नाशिक


उत्तर - क. पालघर 


● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड

ब. पुणे

क. नागपूर

ड. ठाणे


उत्तर - ड. ठाणे


● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे

ब. नाशिक

क. नागपूर

ड. कोल्हापूर


उत्तर - ब. नाशिक 


● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर

ब. पुणे

क. सोलापूर

ड. रायगड


उत्तर - अ. अहमदनगर 


● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे

ब. सांगली

क. वर्धा

ड. अहमदनगर


उत्तर - क. वर्धा



चालू घडामोडी


प्रश्न: नुकतेच सुखविंदर सिंग सुखू यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?

उत्तर: हिमाचल प्रदेश


प्रश्न: कोणत्या राज्याचा 'शिशुपाल टेकडी' पर्यटन म्हणून विकसित केला जाईल?

उत्तर : छत्तीसगड.


प्रश्न: अलीकडेच 2022 ह्युरॉन ग्लोबल 500 मूल्यवान कंपन्यांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे?

उत्तर: यूएसए.


प्रश्न: कोणत्या राज्यात 13 व्या वर्षाखालील थिएटर फेस्टिव्हलची नुकतीच सुरुवात होणार आहे?

उत्तर : आसाम


प्रश्न: नुकतेच हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे?

उत्तर: तामिळनाडू.


प्रश्नः कोणत्या देशाने अलीकडेच महिलांच्या स्वाक्षरी असलेली पहिली नोट बाजारात आणली?

उत्तर: अमेरिका.


प्रश्न: अलीकडेच 21 निर्जन बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे कुठे दिली जातील?

उत्तर: अंदमान निकोबार.


प्रश्न: आयुष्मान भारत आयडी जनरेशनमध्ये नुकतेच प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले आहे?

उत्तर : जम्मू आणि काश्मीर


प्रश्न: अलीकडेच जानेवारीमध्ये दिव्यांग व्यक्तींचा पहिला महोत्सव कोण आयोजित करणार आहे?

उत्तर : गोवा.


प्रश्न: अलीकडेच कोणत्या राज्याचे बियाणे फार्म देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित करण्यात आले आहे?

उत्तर : केरळ

29 December 2022

29 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड


Q.1) महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे?

✅ नागपूर


Q.2) मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली?

✅ दक्षिण कोरिया


Q.3) नुकतेच पियुष गोयल यांनी ग्राहकांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?

✅ राईट टू रिपेअर


Q.4) रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ अनिल कुमार लाहोटी


Q.5) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ संतोष कुमार यादव


Q.6) निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?

✅ सुवर्णपदक


Q.7) जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे?

✅ पाचव्या


Q.8) भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितवा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे?

✅ 30 वा


Q.9) जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

✅ 68 वा


Q.10) IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ सॅम कुरन

सराव प्रश्न उत्तरे

Question : 1

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅

(B) जैवतंत्रज्ञान विभाग

(C) गृह मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 2

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅

(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 3

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅

(B) राजस्थान

(C) उत्तरप्रदेश

(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 4

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 5

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस

(B) डी ओप्रेसो लिबर

(C) सेम्पर सुप्रा ✅✅

(D) यापैकी नाही


1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील 

B) दरोगा  ✍️

C) जिल्हाधिकारी 

D) तलाठी   


2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 ) 

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️

B) व्हॉईसरॉय - मिंटो 

C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु 

D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड 


3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 ) 

A)लॉर्ड  लिटन 

B) लॉर्ड  रिपन ✍️

C) लॉर्ड  हेस्टिंग्स 

D) लॉर्ड  इल्बर्ट


4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 ) 

A) लॉर्ड  रिपन  

B) लॉर्ड  लिटन ✍️

C)लॉर्ड  कर्झन 

D) लॉर्ड  डफरीन 


5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 ) 

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन  

B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु  

C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️

D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

_________________________

1) खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.

(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर (b) चुकीचे आहे.

 B. विधान (b) बरोबर (a) चुकीचे आहे.

 C. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 D. दोन्ही विधाने चुकीची आहेत.✍️

____________________________


2) खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

 A. भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी 

 B.  राज्याचा महाधिवक्ता

 C. राज्य लोकसेवा आयोग

 D. राज्य मानवी हक्क आयोग.✍️

____________________________

3) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत✍️

 D. गुरदयालसिंग धिल्लन.

____________________________

4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता✍️

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________________

5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_____ समावेश होतो.

 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा✍️

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.

____________________________

6) भारतीय राज्यघटनेतील ___ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21✍️

 C. कलम 22

 D. कलम 31.


____________________________

7) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा✍️

 C. सात

 D. आठ. 


____________________________


8) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.✍️

____________________________


9) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा✍️

 D. चार.

____________________________


10) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.✍️

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

28 December 2022

हिवताप/ मलेरिया (Malaria)


💉 रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.


🎯परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.


🎯प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.


🎯लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.



🔬 हिवतापाच्या अवस्था

 (Stages Of Malaria):


1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही  अवस्था 2-4 तास आढळते.


2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.


3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही  अवस्था 15-20 मिनिट आढळते.


💉 लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन


🔬 जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही  औषधे सुचविली आहे.

27 December 2022

गोपाल गणेश आगरकर



🔳 जन्म : 14 जुलै 1856, जन्मस्थळ:- टेंभू, ता:- कऱ्हाड, जिल्हा:- सातारा

🔳 मत्यू : 17 जून 1895, पुणे

 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

▪️ 1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

▪️ बद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर.

 संस्थात्मिक योगदान :

 1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

▪️ 15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

▪️ गलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

▪️ सत्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

▪️ अकोल्यातल्या वर्हाड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

▪️ शक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

▪️ ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस‘ हे पुस्तक.

▪️ हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

 वैशिष्ट्ये :

▪️ इष्ट असेल ते बोलणार……

▪️ राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

▪️ हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

▪️ बध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

▪️ ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

▪️ जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------


१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ 

__________________________

भारतीय न्यायालयीन प्रणाली

त्यांच्या अधीन असलेल्या जिल्हा न्यायालयांसह उच्च न्यायालय हे राज्य दिवाणी कोर्टाचे प्रमुख आहेत. उच्च न्यायालये केवळ आर्थिक वंचितपणामुळे किंवा क्षेत्रीय कार्यक्षेत्रांच्या कारणामुळेच उच्च न्यायालय अधीनस्थ न्यायालय सक्षम नसतात (कायद्याने अधिकृत नसतात) अशा प्रकरणांमध्ये नागरी आणि फौजदारी कार्यक्षेत्र वापरतात. उच्च न्यायालये विशिष्ट प्रकरणांमध्ये मूलभूत अधिकारदेखील ठेवतात, जी विशेषत: राज्य किंवा फेडरल कायद्यात नियुक्त केली जातात, जसे की - कंपनी कायद्याची प्रकरणे केवळ उच्च न्यायालयात दाखल केली जाऊ शकतात. तथापि, उच्च न्यायालयांची कामे प्रामुख्याने खालच्या न्यायालयांच्या अपील आणि रिट याचिका अंतर्गत आहेत, भारतीय घटनेच्या कलम २२४. रिट याचिका देखील उच्च न्यायालयाचा मूळ अधिकारक्षेत्र आहे. प्रत्येक राज्य न्यायालयीन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे, जिथे 'जिल्हा व सत्र न्यायाधीश' असतात. दिवाणी खटल्याची सुनावणी घेतल्यावर त्याला जिल्हा न्यायाधीश मानले जाते आणि जेव्हा तो फौजदारी खटल्याची सुनावणी घेतो तेव्हा सत्र न्यायाधीश मानले जाते. हायकोर्टाच्या न्यायमूर्ती नंतर त्याच्याकडे सर्वोच्च न्यायिक अधिकार आहेत. त्याखालील विविध नागरी हक्कांची न्यायालये आहेत, जी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत.

🟤 भारतात कोर्टाचा इतिहास 🟤

भारतीय न्यायालयांची सध्याची व्यवस्था कोणत्याही विशिष्ट परंपराशी संबंधित नाही. मोगल काळात दोन प्रमुख न्यायालये नमूद केली जातात: सदर दिवाणी न्यायालय आणि सदर निजाम-ए-अदालत, जेथे अनुक्रमे व्यावहारिकता आणि फौजदारी खटल्यांची सुनावणी होते. 1857 च्या अयशस्वी स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजी न्याय-प्रशासन-प्रणालीच्या आधारे विविध न्यायालये तयार केली गेली. इंग्लंडमधील प्रिव्हि कौन्सिल ही भारतीय सर्वोच्च न्यायालय होती. 1947  मध्ये हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेअंतर्गत पूर्णतः प्रबळ गणराज्य स्थापन झाले. सर्वोच्च न्यायालय (सर्वोच्च न्यायालय) भारताचे सर्वोच्च न्यायालय बनले.

🟤सर्वोच्च न्यायालय🟤

            सर्वोच्च न्यायालय हे अनेक कार्यक्षेत्रांमधील कायदेशीर न्यायालयांच्या पदानुक्रमातील सर्वोच्च न्यायालय आहे. अशा न्यायालयांसाठी शेवटचा उपाय , सर्वोच्च न्यायालय आणि उच्च (किंवा अंतिम) अपील कोर्टासारखे वाक्य देखील बोलले जाते . सर्वत्र सुप्रीम कोर्टाचे निर्णय इतर कोर्टाच्या पुढील पुनरावलोकनास अधीन नसतात. सर्वोच्च न्यायालये सहसा मुख्यत: अपील न्यायालये म्हणून काम करतात किंवा लोअर किंवा इंटरमिजिएट स्तरावरील अपील न्यायालयांच्या निर्णयावरून अपील ऐकतात.

🟤उच्च न्यायालय🟤

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - २१4 मध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल, दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी एकच न्यायालय असू शकेल . भारतात सध्या 25 उच्च न्यायालयाने आहेत, एकूण आंध्र प्रदेश ते अमरावती उच्च न्यायालयाने ओळख निर्माण केली 25 देश. 1 जानेवारी 2019 रोजी या उच्च न्यायालयांचे कार्यक्षेत्र राज्य-विशिष्ट किंवा राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा गट आहे. उदाहरणार्थ, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने , पंजाब आणि हरियाणा राज्य केंद्रशासित प्रदेश चंदीगड आपल्या अधिकार स्थळे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 214, अध्याय 5 भाग 6 अंतर्गत उच्च न्यायालये स्थापन केली आहेत.

न्यायालयीन व्यवस्थेचा एक भाग म्हणून, उच्च न्यायालये राज्य विधिमंडळ आणि अधिकारी यांची संस्था स्वतंत्र आहेत.

🟤जिल्हा न्यायालय (भारत )🟤

  भारत येथे जिल्हा पातळीवर न्याय केली न्यायालयाने जिल्हा न्यायालय म्हणतात. ही न्यायालये जिल्हा किंवा अनेक जिल्ह्यांतील लोकांसाठी आहेत, जी लोकसंख्या आणि खटल्यांच्या संख्येच्या आधारे ठरविली जाते. हे न्यायालय त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करतात. जिल्हा कोर्टाने दिलेल्या निर्णयांना संबंधित उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अनुच्छेद 21 कोणत्याही व्यक्तीस त्याची कारणे न देता अटक करता येणार नाही. अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयीन सल्लामसलत करण्यास परवानगी दिली जाईल आणि 24 तासांच्या आत तो जवळच्या दंडाधिका .-यांसमोर सादर करावा लागेल.

🟤 न्यायाधीशांची नियुक्ती 🟤

मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय राष्ट्रपती करतात . शिवाय, हायकोर्टाचे अध्यक्ष राष्ट्रपतींचा सल्ला घेतल्याशिवाय बदलीच्या अधिकाराचा उपयोग करू शकतात.

26 December 2022

दुसरी गोलमेज परिषद

७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.

ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.

पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.

परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.

गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.

🍃🍃🍃🍃🍀🍀🌸🌸🍃🍃🍃🍃🍃🍀🍀

परिशिष्ट/अनुसूची/ Schedule


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1) परिशिष्ट I 

राज्य व केंद्र शासित प्रदेश


2) परिशिष्ट II

 वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3)परिशिष्ट III

 पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4) परिशिष्ट 4

 राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5) परिशिष्ट V

 भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6)परिशिष्ट VI

 आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7)परिशिष्ट VII 

केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8) परिशिष्ट VIII

 भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9) परिशिष्ट IX  

कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10)परिशिष्ट X

 पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11)परिशिष्ट XI  

पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12)परिशिष्ट XII

  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

25 December 2022

राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

सराव प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================

विधानसभा


विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


ग्रामपंचायत



ग्रामसभा ही एक ग्राम किंवा पंचायत निवडणार्‍या खेड्यांच्या गटांच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींची एक संघटना आहे.


एक गतिशील व प्रबुद्ध ग्रामसभा पंचायतीच्या राजांच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे.


राज्य सरकारांना असे आवाहन करण्यात आले आहे: -


पंचायत (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) अधिनियम 1996 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार ग्रामसभेला अधिकार प्रदान करा.


प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्यदिन आणि गांधी जयंतीनिमित्त देशभरात ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी पंचायती राज कायद्यात अनिवार्य तरतुदींचा समावेश.


पंचायती राज कायद्यात विशेषत: ग्रामसभा सभा, सर्वसाधारण सभा व विशेष सभा आणि कोरमची पूर्तता न झाल्यामुळे सभा घेण्याबाबतच्या कोरमसंबंधी तरतूद जोडणे.


ग्रामसभेच्या सदस्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देणे यासाठी की लोकसहभागाची खात्री करुन घ्यावी आणि विशेषत: उपेक्षित गट जसे की महिला आणि अनुसूचित जाती / जमातीमधील लोक यात सहभागी होऊ शकतात.


ग्रामसभेसाठी कार्यपद्धती तयार करणे ज्याद्वारे ते ग्रामविकास मंत्रालयाच्या लाभार्थीभिमुख विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतात आणि आर्थिक गैरव्यवस्थेची वसुली किंवा शिक्षेचा कायदेशीर हक्क मिळवू शकतात.


ग्रामसभेच्या बैठकीसंदर्भात व्यापक प्रचारासाठी कृती योजना तयार करणे.


ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे / कार्यपद्धती तयार करणे.


नैसर्गिक स्रोतांबाबत ग्रामसभेच्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करणे, भूमी अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे व समस्या सोडवणे.


Rd 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यात ग्रामीण पातळीवर स्वराज्य संस्था म्हणून सक्षम अशा मजबूत पंचायतींची कल्पना केली गेली आहे, जी खालील गोष्टी करण्यास सक्षम आहेत:


गावपातळीवर सार्वजनिक विकास कामे व त्यांची देखभाल नियोजन व पूर्ण करणे.


गाव पातळीवर लोकांचे कल्याण सुनिश्चित करून त्यात आरोग्य, शिक्षण, समुदाय बंधुत्व, सामाजिक न्याय विशेषत: लिंग आणि जाती-आधारित भेदभाव, संघर्ष सोडवणे, मुलांचे खासकरुन मुलींचे कल्याण असे विषय असतील.


Rd 73 व्या घटनादुरुस्तीमध्ये जनसंवाद म्हणून तळागाळातील सशक्त ग्रामसभेची कल्पना आहे, ज्यास ग्रामपंचायत जबाबदार असावी.

--------------------------------------------------

24 December 2022

FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022               महत्वाचे प्रश्न उत्तरे


Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022

Q.3 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर 32

Q.4 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर 64

Q.5 फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर 20 नोव्हेंबर

Q.6 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर La'eeb

Q.7 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.8 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर फ्रान्स

Q.9 याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर 1986

Q.10 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर लियोनेल मेसी.

Q.11 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर किलियन मबापे

Q.12 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर क्रोशिया

Q.13 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर फ्रान्स

Q.14 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.

Q.15 पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर 1930