स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
12 December 2020
MPSC QUESTIONS SET
प्रश्न क्रमांक 01
खालीलपैकी कोणत्या साली'ऑर्डर ऑफ अब्दुलअझीझ अल सौद' या सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानने मोदींना सन्मानित करण्यात आले.
1 : 2015
2 : 2016🧧
3 : 2017
4 : 2018
5 : यापैकी नाही
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 02
'ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ – – – – –2018' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना मिळाला आहे
1 : पॅलेन्स्टाईन🧧
2 : बहरीन
3 : इटली
4 : फ्रांस
5 : यापैकी नाही
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 03
ऑर्डर ऑफ डिस्टिंग्वुइश रूल ऑफ इझुद्दीन' हा पुरस्कार मोदींना खालीलपैकी कोणत्या देशाकडून देण्यात आला आहे
1 : मालदीव🧧
2 : पॅलेन्स्टाईन
3 : बहरीन
4 : सौदी अरेबिया
5 : यापैकी नाही
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 04
खालील पैकी कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू हा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे
1 : इटली
2 : जर्मनी
3 : रशिया🧧
4 : अमेरिका
5 : यापैकी नाही
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 05
उष्णतेच्या लाटेमुळे होणारी मनुष्य हानी रोखण्यासाठी कुठे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे ?
1) नागपूर🧧
2) नाशिक
3) पुणे
4) मुंबई
5) यांपैकी नाही
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 06
नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते गीता आराधना महोत्सवात भगवत गीतेचे अनावरण करण्यात आले आहे. त्याचे वजन किती किलोग्रॅम आहे ?
1) 800🧧
2) 600
3) 500
4) 700
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 07
आर्थिक साहाय्याकरिता भारत व इटली दरम्यान कितवी संयुक्त परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे ?
1) 18
2) 22
3) 20🧧
4) 19
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 08
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाचा कितवा स्थापना दिवस दिल्लीमध्ये नुकताच आयोजित करण्यात आला ?
1) 35
2) 33🧧
3) 36
4) 34
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 09
गांधी शांतता पुरस्कार प्रदान करतेवेळी कोणते गीत जगातील 150 कलाकारांनी गांधीजींच्या 150 जयंती निमित्त सादर केले ?
1) सारे जहाँ से अच्छा
2) वंदे मातरम
3) विजयी विश्व तिरंगा प्यारा
4) वैष्णव जण तो🧧
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
प्रश्न क्रमांक 10
कुठल्या देशाने RTGS डॉलर ने व्यापार सुरू केलाय ?
1) इंग्लड
2) न्यूझीलंड
3) झिम्बाब्वे🧧
4) ऑस्ट्रेलिया
💠💠💠💠💠💠💠💠💠💠
JP (जॅकपॉट प्रश्न)
'स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अमानुल्लाह खान' या कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते.
*उत्तर : अफगाणिस्तान*
मराठी व्याकरण
१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत ✅
२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर ✅
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे
३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे ✅
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर
४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील ✅
o वा. म. जोशी
५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा
६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ ✅
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू
७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी ✅
o सात सक त्रेचाळीस
८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे ✅
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ
९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन ✅
o मोचनगड
१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया ✅
o स्फोट
o कल्याणी
o झाड
११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे ✅
१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे ✅
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके
१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर ✅
१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे ✅
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर
१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर ✅
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
-----------------------------------------------------
भारताचे परराष्ट्रमंत्री
भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.
परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.
परराष्ट्रमंत्र्यांची यादी
नाव (कार्यकाळ)
▪️जवाहरलाल नेहरू (२ सप्टेंबर १९४६ - २७ मे १९६४)
▪️गलझारीलाल नंदा (२७ मे १९६४- ९ जून १९६४)
▪️लाल बहादूर शास्त्री (९ जून १९६४- १७ जुलै १९६४)
▪️सरदार स्वरणसिंग (१८ जुलै १९६४- १४ नोव्हेंबर १९६६)
▪️एम.सी. छगला (१४ नोव्हेंबर १९६६- ५ सप्टेंबर १९६७)
▪️इदिरा गांधी (६ सप्टेंबर १९६७- १३ फेब्रुवारी १९६९)
▪️दिनेश सिंग (१४ फेब्रुवारी १९६९- २७ जून १९७०)
▪️सरदार स्वरणसिंग (२७ जून १९७०- १० ऑक्टोबर १९७४)
▪️यशवंतराव चव्हाण (१० ऑक्टोबर १९७४- २४ मार्च १९७७)
▪️अटलबिहारी वाजपेयी (२६ मार्च १९७७- २८ जुलै १९७९)
▪️शयाम नंदन प्रसाद मिश्रा (२८ जुलै १९७९- १३ जानेवारी १९८०)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (१४ जानेवारी १९८०- १९ जुलै १९८४)
▪️इदिरा गांधी (१९ जुलै १९८४- ३१ ऑक्टोबर १९८४)
▪️राजीव गांधी (३१ ऑक्टोबर १९८४- २४ सप्टेंबर १९८५)
▪️बलीराम भगत (२५ सप्टेंबर १९८५- १२ मे १९८६)
▪️पी. शिवशंकर (१२ मे १९८६- २२ ऑक्टोबर १९८६)
▪️नारायण दत्त तिवारी (२२ ऑक्टोबर १९८६- २५ जुलै १९८७)
▪️राजीव गांधी (२५ जुलै १९८७- २५ जून १९८८)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (२५ जून १९८८- २ डिसेंबर १९८९)
▪️विश्वनाथ प्रताप सिंग (२ डिसेंबर १९८९- ५ डिसेंबर १९८९)
▪️इदर कुमार गुजराल (५ डिसेंबर १९८९- १० नोव्हेंबर १९९०)
▪️विद्याचरण शुक्ला (२१ नोव्हेंबर १९९०- २० फेब्रुवारी १९९१)
▪️माधवसिंह सोळंकी (२१ जून १९९१- ३१ मार्च १९९२)
▪️पी.व्ही. नरसिंह राव (३१ मार्च १९९२- १८ जानेवारी १९९३)
▪️दिनेश सिंग (१८ जानेवारी १९९३- १० फेब्रुवारी १९९५)
▪️परणव मुखर्जी (१० फेब्रुवारी १९९५- १६ मे १९९६)
▪️सिकंदर बख्त (२१ मे १९९६- १ जून १९९६)
▪️इदर कुमार गुजराल (१ जून १९९६- १८ मार्च १९९८)
▪️अटलबिहारी वाजपेयी (१९ मार्च १९९८- ५ डिसेंबर १९९८)
▪️जसवंत सिंग (५ डिसेंबर १९९८- २३ जून २००२)
▪️यशवंत सिन्हा (१ जुलै २००२- २२ मे २००४)
▪️नटवर सिंग (२२ मे २००४[१]- ६ नोव्हेंबर २००५)
▪️मनमोहन सिंग (६ नोव्हेंबर २००५- २४ ऑक्टोबर २००६)
▪️परणव मुखर्जी (२४ ऑक्टोबर २००६[३]- २२ मे २००९)
▪️एस.एम. कृष्णा (२२ मे २००९- २६ ऑक्टोबर २०१२)
▪️सलमान खुर्शीद (२८ ऑक्टोबर २०१२- २६ मे २०१४)
▪️सषमा स्वराज (२६ मे २०१४- )
भारतातील प्रथम महिला
नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)
अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)
आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)
युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)
न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)
महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)
महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)
बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)
बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)
जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम
ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)
आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)
माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)
आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)
वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)
भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)
भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)
कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)
रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)
पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)
मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)
इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)
पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)
टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)
पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)
भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)
राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)
भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)
भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)
रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)
राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)
मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)
राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)
रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)
मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)
ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)
बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)
साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)
राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)
अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)
परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)
युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)
उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)
वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)
लोकसभा अध्यक्ष (पहिली महिला ) - मीरा कुमार
संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन(दुरुस्ती) विधेयक, 2020
🔰 संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन(दुरुस्ती) विधेयक, 2020 लोकसभेत पास करण्यात आला आहे.
🔰 या विधायकात खासदारांच्या पगारामध्ये 30% कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
🔰 सध्या प्रत्येक खासदाराला महिन्याला एक लाख रुपये वेतन, 70,000 रुपये मतदानसंघ भत्ता, 60,000 रुपये कार्यालय चालवण्यासाठी मिळतात.
🔰 पतप्रधान आणि मंत्री परिषदेसह सर्व खासदारांना 2020 ते 2021 या आर्थिक वर्षासाठी 30% वेतन कपात लागू आहे.
🔰 भारतचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांनी व सर्व राज्यपालांनी त्यांचे वेतन 30% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
🔰या दुरुस्तीमुळे केवळ खासदारांचे वेतन कपात होणार असून माजी खासदारांचे भत्ते किंवा निवृत्तिवेतन कपात होणार नाही.
🔰ह विधयक मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (दुरूस्ती) अध्यादेश, 2020 ची जागा घेईल.
🔰या विधयकावरून संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन कायदा 1954 मध्ये बदल करण्यात येणार आहे.
शरद पवारांना मिळणार यूपीएच अध्यक्षपद.
🔰महाराष्ट्रात महाविकास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.
दरम्यान, शरद पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
🔰रिपब्लिक टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार लवकरच ते यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.तर या प्रकरणी सुरूवातीच्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाल्या असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती.
🔰तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. परंतु राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं अध्यक्षपदही स्वीकारण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सांगितलं.
🔰दशात सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं होतं. 2004 पासून सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
गूगलवर ‘करोना’चा नव्हे; ‘आयपीएल’चा सर्वाधिक शोध.
🔰करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना, गूगल या सर्च इंजिनवर जास्तीतजास्त लोकांनी याच शब्दाचा शोध घेतला असावा असे कुणालाही वाटणे साहजिक आहे. मात्र, शोधविषयाच्या बाबतीत इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) करोना विषाणूवरही मात केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या गूगल इंडियाच्या ‘सर्च इन २०२०’मुळे उघड झाले आहे. यामुळे भारताचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
🔰गल्या वर्षी ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप’ ही गूगल सर्चवरील ‘टॉप ट्रेंडिंग क्वेरी’ होती.
🔰करीडा आणि वृत्त कार्यक्रमांपैकी आयपीएलचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. यानंतर करोना विषाणू, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, बिहार निवडणूक निकाल आणि दिल्ली निवडणूक निकाल याचा गूगलवर सर्वात जास्त शोध घेण्यात आलेल्या विषयांमध्ये समावेश आहे.
🔰कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातींमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा तिच्या प्रेक्षकसंख्येत या वर्षी २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.
आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन
🔰नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना म्हटलं.
🔰‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.
🔰याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली.
🔰ससदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आपली प्रत्येक आव्हानं, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान, आपल्या यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मिती दरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा, हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे. मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढंच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत अनेकदा भिंती तोडण्यात आल्या आहेत, अन्य सुविधांमध्ये बदल केले गेले. सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंती देखील हटवल्या गेल्या आहेत. एवढं सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.
साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्य.
🅾️बिहार ---------------------------------------------- 63.82 टक्के
🅾️तलंगणा ----------------------------------------------- 66.5 टक्के
🅾️अरुणाचल प्रदेश ------------------------------------- 66.95 टक्के
🅾️राजस्थान --------------------------------------------- 67.06 टक्के
🅾️आध्र प्रदेश -------------------------------------------- 67.4 टक्के
🅾️झारखंड ----------------------------------------------- 67.63 टक्के
🅾️जम्मू आणि कश्मीर------------------------------------68.74 टक्के
🅾️उत्तर प्रदेश---------------------------------------------69.72 टक्के
🅾️मध्य प्रदेश --------------------------------------------- 70.63 टक्के
🅾️छत्तीसगड----------------------------------------------71.04 टक्के
साक्षरतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे .
🅾️सराश्चिप (मिझोराम)-------------------------97.91 टक्के
🅾️ऐझवाल (मिझोराम)-------------------------97.89 टक्के
🅾️माहे (पद्दूचेरी )-----------------------------97.87 टक्के
🅾️कोट्टायम (केरळ)----------------------------97.21टक्के
🅾️पठाणमतीता(केरळ)------------------------96.55 टक्के
🅾️चांफाइ(मिझोराम)---------------------------95.91 टक्के
🅾️एरणाकुलम(केरळ)-------------------------95.89 टक्के
🅾️अल्लापुझा(केरळ)---------------------------95.72 टक्के
🅾️कानूर (केरळ)-------------------------------95.10 टक्के
🅾️थरिसुर (केरळ)-------------------------------95.08 टक्के
महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि.
१)मुंबई--------भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची राजधानी
२)रत्नागिरी---देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
३)सोलापूर----ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी
४)कोल्हापुर--कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा
५)रायगड-----तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा
६)सातारा----कुंतल देश व शुरांचा जिल्हा
७)बिड------जुन्या मराठी कविंचा जिल्हा, मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा
८)परभणी---ज्वारीचे कोठार
९)उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा
१०)औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी
११)नांदेड--संस्कृत कवींचा जिल्हा
१२)अमरावती--देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा
१३)बुलढाणा--महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
१४)नागपुर----संत्र्यांचा जिल्हा
१५)भंडारा-----तलावांचा जिल्हा
१६)गडचिरोली--जंगलांचा जिल्हा
१७)चंद्रपुर----गौंड राजांचा जिल्हा
१८)धुळे----सोलर सिटीचा जिल्हा
१९)नंदुरबार-आदिवासी बहुल जिल्हा
२०)यवतमाळ- पांढरे सोने-कापसाचा जिल्हा
२१)जळगाव--कापसाचे शेत, केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
२२)अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा
२३)नाशिक---मुंबईची परसबाग, द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा
२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा
जागतिक आनंद अहवाल
🔰UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो
🔰2020 चा हा आठवा अहवाल आहे.
🔰एकूण 156 देशांची यादी जाहीर केली आहे या अहवालात भारताचा 144 या क्रमांक आहे .
🔰2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता.
🔰2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश पुढीलप्रमाणे .
1. फिनलंड
2. डेन्मार्क
3. स्विझरलँड
4. आइलैंड
5.नार्वे.
अकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते.
1) अंतरासाठीची परिमाणे :
▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर
▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर
▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर
2) वस्तुमानासाठीची परिमाणे :
▪️ 1000 मिलिलिटर = 1 लिटर
▪️ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
▪️ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
▪️ 10 क्विंटल = 1 टन
3) कालमापनासाठीची परिमाणे :
▪️ 60 सेकंद = 1 मिनिट
▪️ 60 मिनिट = 1 तास
▪️ 24 तास = 1 दिवस
4) इतर परिमाणे :
▪️ 24 कागद = 1 दस्ता
▪️ 20 दस्ते = 1 रिम
▪️ 12 नग = 1 डझन
▪️ 12 डझन = 1 ग्रॉस
▪️ 100 नग = 1 शेकडा
▪️ 100 पैसे = 1 रुपया
‘जिनोव्हा’च्या लसीला मानवी चाचण्यांसाठी मान्यत.
♻️पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या ‘एचजीसीओ 19’ या कोरोना लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. ही देशातील पहिली एमआरएनए आधारीत लस आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती.
♻️अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ही लस विकसीत करण्यात आली आहे.तर केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने या लसीच्या विकसनासाठी अर्थसहाय्य केले आहे.
♻️जिनोव्हा कडून काही दिवसांपुर्वीच चाचण्यांसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने काही अटींच्या आधारे चाचण्यांना मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची अंतरिम माहिती समितीकडे सादर केल्याशिवाय चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे.
♻️दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. त्यातच पुण्यातीलच ‘जिनोव्हा’च्या ‘एमआरएनए’ आधारीत लसीचीही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याने संपुर्ण जगाचे लक्ष पुण्याने वेधले आहे.
12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम.
♓️जर तुमचे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला आता हे नवीन नियम माहीत असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये बदल होणार आहेत.तर नव्या नियमानुसार, 11 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये शिल्लक (बॅलन्स) ठेवणे आवश्यक आहे.12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावे लागणार आहे.
♓️इडिया पोस्टने(India Post)ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.
♓️इडिया पोस्टने माहिती देताना म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांचा बॅलन्स निश्चित करा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभालच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के आहे.
♓️वयाज कमीतकमी बॅलन्स रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटी कॅलक्युलेशन केले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते खाते उघडू शकतात.
देशातील सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला
भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीत हिना नागराजन यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत माहिती दिली. सध्या आनंद कृपालू हे या पदावर कार्यरत आहेत.
आता आनंद कृपालू यांची जागा या हिना नागराजन या घेणार आहेत. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
आनंद कृपालू हे २०१४ या कंपनीत रूजू झाले होते. ते युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. हिना नागराजन या १ जुलै २०२१ पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.
हिना नागराजन या सध्या USL ची मूळ कंपनी जियाजिओ मध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे.
लॉर्ड विलिंग्टन (1931-36)
दुसरी गोलमेज परिषद . पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ. 1934 ला आंदोलन मागे.
पंतप्रधान मॅक्डोनाल्डद्वारा कम्युनल अवॉर्डची घोषणा. त्याविरोधात गांधींचे उपोषण येरवडा येथे.
🍀 पणे करार – 1932
1935 चा भारत सरकार अधिनियम
🌸 1935 – आरबीआयची स्थापना
🍀 1935 भारतापासून बर्मा वेगळा
🌸 समाजवादी पक्ष (1934) – आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण
🍀 अखिल भारतीय किसान सभा – 1936
11 December 2020
अर्थव्यवस्था प्रश्नपत्रिका
1) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) ही संस्था पुढीलपैकी कोणते कार्य करते ?
अ)वित्तीय स्थिरता सुरक्षित करणे
ब) जागतिक मौद्रीक सहकार्य
क) अधिक रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे
ड) शाश्वत आर्थिक विकास करणे✅
1) फक्त क 2) क आणि ड
3) अ, ब,क 4 ) वरील सर्व
2) IMF मधील सदस्य देशाची संख्या किती आहे ?
1) 164
2) 176
3) 184
4) 189✅
3) ब्रिटनुउड परिषद अमेरिकेतील पुढीलपैकी कोणत्या राज्यात झाली होती ?
1) जॉर्जीया
2) न्यू ह्याम्पशायर✅
3) अलास्का
4) फ्लोरिडा
4) IMF ही संस्था प्रथम 1945 मध्ये जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा एकूण किती देश सदस्य होते ?
1) 29✅
2) 44
3) 49
4) 54
5) आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष या संस्थेच्या चिन्हा मध्ये एकूण किती " पानांचा " समावेश आहे ?
1) 4
2) 5✅
3) 6
4) 7
6) IMF च्या कार्यालयीन भाषांमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश होतो ?
अ)ENGLISH
ब) FRENCH✅
क) ARABIC
ड) SWISS
1) अ आणि ब 2) फक्त अ
3) अ, ब,क 4) वरील सर्व
7) IMF मध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून कोण कार्य करत आहे ?
1) क्रिस्टीलिना जॉर्जिव्हा
2) गीता गोपीनाथ✅
3) रुघुराम राजन
4) क्रिस्टिना लिगार्ड
8) 8 मे 1947 रोजी IMF कडून कर्ज घेणारा पहिला देश कोणता होता ?
1) जर्मनी
2) फ्रान्स✅
3) ब्रिटन
4) ग्रीस
9) UN मध्ये सदस्य असूनही IMF मध्ये सदस्य नसलेले देश कोणते आहेत ?
अ) उत्तर कोरिया
ब) मोन्याको
क) अंडोरा
ड) लाईचटेंस्टन
1)फक्त अ 2) अ आणि क
3) अ, ब, क 4) वरील सर्व✅
10) IMF मध्ये भारताचा " एकूण कोटा " किती प्रमाणात आहे ?
1) 2.76 %✅
2) 2.64 %
3) 17.46 %
4) 16.52 %
सवाऱ्या चंद्रावरच्या
◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत.
◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.
◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका.
◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.
◾️ तयानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं.
◾️तया काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.
◾️ तयानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.
💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢
◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.
◾️ तयापैकी १६ यशस्वी झाल्या.
◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.
💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢
◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या.
◾️यातील १५ यशस्वी झाल्या.
◾️लना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले.
◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.
💢 जपान : १९९० पासून 💢
◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली.
◾️चद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला.
◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.
◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.
💢 चीन : २००७ पासून 💢
◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत.
◾️चग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते.
◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.
💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢
◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता.
◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली.
◾️शरीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले.
◾️चद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.
◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.
लुशाई टेकड्या
लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.
जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.
या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.
या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.
या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.
महेंद्रगिरी
महेंद्र पर्वत दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे. ओरिसा राज्यातील महानदीचे खोरे आणि गंजाम यांदरम्यानच्या पूर्व घाटाच्या टेकड्या अद्यापही ‘महेंद्रमलई’ किंवा महेंद्र टेकड्या या नावाने ओळखल्या जातात. यावरूनच या भागातील पूर्व घाटाच्या सर्वोच्च शिखराला ‘महेंद्रगिरी’ हे नाव दिले असावे.
पुराणांत या पर्वताला ‘महेंद्राचल’, ‘महेंद्राद्रि’ अशीही नावे असल्याचे दिसून येते. अगस्त्य ऋषींनी या पर्वताची सागरात निर्मिती केली, असा रामायणात निर्देश आहे. श्रीरामाकडून पराभूत झाल्यानंतर परशुरामाने या पर्वतावर येऊन वास्तव्य केल्याच्या अनेक पुराणकथा आहेत. कालिदासाच्या रघुवंशात हा पर्वत कलिंग देशात असल्याचा व कलिंग देशाचा राजा महेंद्राधिपती असल्याचा निर्देश आढळतो.
बाणाच्या हर्षचरितात महेंद्र पर्वत मलय पर्वताशी जोडलेला असल्याविषयीचा उल्लेख मिळतो. पार्जिटरच्या मते महानदी, गोदावरी, वैनगंगा या नद्यांदरम्यानचा प्रदेश अथवा विस्तारांने गोदावरीच्या उत्तरेकडील पूर्व घाटाचा प्रदेश म्हणजे प्राचीन महेंद्र पर्वत असावा.
महेंद्रगिरी हे पूर्व घाटातील सर्वोच्च शिखर ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यात १८° ५८′ उ. अक्षांश व ८४°२४ पू. रेखांशावर, सस. पासून १,५०१ मी. उंचीवर आहे. दाट वनश्री आणि समुद्रसान्निध्य (सु. २५ किमी. अंतरावर) यांमुळे याचा परिसर निसर्गरम्य बनला आहे.
ब्रिटिशांच्या काळात महेंद्रगिरी हे कलकत्त्याचे आरोग्यधाम म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु या टेकडीवजा शिखराच्या तीव्र उताराचा माथा आणि पाण्याचा तुटवडा यांमुळे ती योजना मागे पडली. येथून ‘महेंद्रतनय’ नावांचे दोन प्रवाह उगम पावतात. त्यांतील एक दक्षिणेस वंशधारा नदीस मिळतो, तर दुसरा बारूआ गावाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतो.
या शिखरावर प्रचंड शिळांनी रचलेली अकराव्या शतकातील चार मंदिरे असून त्यांतील एक भग्नाचवस्थेत आहे. मंदिरात संस्कृत आणि तमिळ भाषांतील शिलालेख आहेत. ‘चोल वंशीय राजा राजेंद्र याने आपला मेहुणा विमलादित्य याचा पराभव केल्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या जंगलप्रदेशात उभारलेले हे विजयस्तंभ आहेत’, असा उल्लेख त्या शिलालेखांतून आढळतो.
1) मलयगिरि
दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात. भवभूतीच्या महावीरचरितातील उल्लेखावरून हा पर्वत कावेरी नदीच्या दक्षिणेस होता असे दिसून येते.
अग्नि, कूर्म, विष्णु इ. पुराणांतील उल्लेखांवरून सांप्रतच्या कोईमतुर खिंडीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या त्रावणकोर व कार्डमम् टेकड्या म्हणजे मलयगिरी असावा. पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या ताम्रपर्णी व कृतमाला (सांप्रत वैगई) या नद्या मलय पर्वतात उगम पावतात , असा उल्लेख मार्कंडेय, वायु, मत्स्य इ. पुराणांत मिळतो; त्यावरून या घाटाचा दक्षिण भाग म्हणजे मलयगिरी या विधानाला दुजोरा मिळतो.
पार्जिटरच्या मते पश्चिम घाटातील निलगिरीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंतची डोंगररांग म्हणजे मलयगिरी होय. माळव्याच्या परमार घराण्यातील राजांच्या कागदपत्रांत भोज राजाचा राज्यविस्तार दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत होता, असा उल्लेख मिळतो.
या पर्वताच्या पावित्र्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. मनूने या पर्वतावर तपश्चर्या केल्याचा उल्लेख मत्स्य पुराणात आहे. या पर्वतावरील पोथिगेई शिखरावर अगस्त्य (स्ती) ऋषींचे वास्तव्य होते. असा चैतन्यचरितामृतात उल्लेख आहे. त्यामुळे याला अगस्ती कूट असेही म्हणतात. पुराणात मलय पर्वत चंदनाने समृद्ध होता असे. उल्लेख आढळतात.
2) भारतातील एक प्राचीन ठिकाण.
याच्या स्थाननिश्चितीविषयी वेगवेगळी मते आहेत. तेलंगांच्या मते हे पश्चिम घाटाच्या दक्षिण टोकाला होते, तर केशवलाल ध्रुव यांच्या मते हे ठिकाणचे नाव नसून ही एक जमात आहे. या जमातीचे लोक हिंदूस्थानाच्या उत्तर सरहद्दीवर राहत असावेत.
रामायण, महाभारत रत्न्कोश इ. संस्कृत ग्रंथाच्या अभ्यासावरून जेम्स बर्जेस यांच्या मते गंडकी व राप्ती नद्यांच्या वरच्या बाजूस असलेला मलयभूमी नावाचा जिल्हा म्हणजेच मलयांचा देश असे दिसून येते.
यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर
1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]
2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]
3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]
4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]
5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]
6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]
7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]
8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]
9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]
10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]
11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]
12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]
13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]
14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]
15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]
16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]
17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]
18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]
19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]
21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]
22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]
23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]
24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]
25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]
26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]
27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]
28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]
29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]
30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]
31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]
32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]
33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]
34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]
35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]
36. पश्चिम घाट [2012]
37. आमेर का किला - राजस्थान [2013]
38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]
39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]
40. सोनार किला - राजस्थान [2013]
41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]
42. गागरोन किला - राजस्थान [2013]
43. रानी का वाव - गुजरात [2014]
44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]
भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प
* मुचकुंदी प्रकल्प
मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
* श्रीशैलम प्रकल्प
आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.
* बियास प्रकल्प
पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.
* भाक्रा-नानगल
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.
* दामोदर खोरे योजना
पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.
* फराक्का योजना
हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.
* हिराकूड
प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४० कि मी आहे.
* चंबळ योजना
हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.
* उकाई प्रकल्प
तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.
* कोसी प्रकल्प
विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.
* नागार्जुनसागर
आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.
वातावरणाचे थर -
वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.
वातावरणाचे मुख्य थर
📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.
📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.
📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.
📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.
📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.
📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.
📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.
📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.
📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.
नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती
♍️जग : वनसंपत्ती♍️
💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.
💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.
💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.
💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.
♍️जग : पशुसंपत्ती ♍️
💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.
💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.
💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.
💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,
💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.
💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत
♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️
💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.
💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.
💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.
💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.
💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी
💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.
💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला
💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.
💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.
💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.
💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश
💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.
💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.
💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.
💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.
💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.
♍️जग : शेती ♍️
💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश
💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश
💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश
💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.
💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.
💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,
💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.
💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.
💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,
💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.
💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.
💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,
💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,
💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,
💠कशर - स्पेन, भारत, इराण.
💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,
💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.
💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.
💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,
💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.
💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.
💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.
सह्याद्री पर्वत
--------------------------------
• सह्याद्रीची निर्मिति प्रस्तरभंगामुळे झाली आहे
• सह्याद्री हा अवशिष्ट पर्वत आहे
• सह्याद्री पर्वतास पश्चिमघाट असेही म्हणतात
• सह्याद्री पर्वत कोकण किनार पट्टीस समांतर आहे
• सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस सातमाळा डोंगरा पासून( तापी नदी) ते दक्षिणेस *कन्याकुमारी* पर्यन्त आहे
• सह्याद्री पर्वताची लांबी १६०० किमी असून, महाराष्ट्रात त्याची ४४० किमी आहे
• सह्याद्री पर्वताने (पश्चिम घाट) दक्खननच्या पठराची पश्चिम सीमा निश्चित केली आहे
• सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्या पासून सरासरी ३० ते ६० किमी अंतरावर आहे
• सह्याद्री पर्वताची उंची ९१५ ते १२२० मीटर आहे
• सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते तर उत्तरेकड़े वाढते
• सह्याद्री पर्वताची रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी आहे
• सह्याद्रीचा पूर्व उतार मंद असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे पश्चिम उतार तीव्र आहे
महाराष्ट्रातील अभयारण्ये
भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती.
महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये.
अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ
०१. धुळे - अनेर धरण - ८३
०२. अमरावती - मेळघाट वाघ संरक्षक अभयारण्य - ११५०
०३. कोल्हापूर - राधानगरी - ३५१
०४. ठाणे - तानसा - ३०५
०५. वर्धा - बोर - ६१
०६. सोलापूर, अहमदनगर - माळढोक पक्षी अभयारण्य - १२२२
०७. जळगांव - यावल अभयारण्य - १७८
०८. रायगड - कर्नाळा पक्षी अभयारण्य - ५
०९. भंडारा - नागझिरा - १५३
१०. नांदेड - किनवट - २१९
११. अहमदनगर - देऊळगांव रेहेकुरी - ३
१२. सातारा - कोयना - ४२४
१३. सांगली - सागरेश्वर - ११
१४. पुणे, ठाणे - भिमाशंकर - १३१
१५. सांगली,कोल्हापूर - चांदोली - ३०९
१६. रायगड - फणसाड - ७०
१७. नाशिक - नांदूर मधमेश्वर - १००
१८. चंद्रपूर - अंधारी - ५०९
१९. अहमदनगर - कळसूबाई हरिश्चंद्र - ३६२
२०. गडचिरोली - चापराला - १३५
२१. औरंगाबाद, जळगांव - गौताळा औट्रमघाट - २६१
२२. यवतमाळ, नांदेड - पैनगंगा - ३२५
२३. सिंधुदुर्ग - मालवण - २९
२४. पुणे - मयुरेश्वर - ५
२५. औरंगाबाद - जायकवाडी - ३४१
२६. बीड - नायगाव मयुर अभयारण्य - ३०
२७. उस्मानाबाद - येडशी - २२
२८. बुलडाणा - आंबा बरवा - १२७
२९. बुलडाणा - ज्ञान गंगा - २०५
३०. अकोला - नरनाळा - १२
३१. अमरावती - वाण - २११
३२. यवतमाळ - टिपेश्वर - १४८
३३. गडचिरोली - भामरागड - १०४
३४. ठाणे - तुम्भारेश्वर - ८६
३५. वाशीम - कारंजा सोहोळ - १८
जगाची संक्षिप्त माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖
( खंडाचे नाव, क्षेत्रफळ ,एकूण जगाच्या क्षेत्रफळाच्या % क्षेत्रफळ, देश/ प्रदेश, या क्रमाने वाचावे)
➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ आशिया
– ४,३९,९९०००चौ .कि. मी.
– २९.५%
– भारत ,इराण ,इराक ,इस्राईल, जॉर्डन, बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया ,मलेशिया, म्यानमार, श्रीलंका ,जपान.
▶️ आफ्रिका
– २९८००००० चौ .कि .मी.
– २० %
– इजिप्त, लिबिया ,अल्जेरिया, मोरोक्को ,सुदान ,इथेपिया, केनिया, सोमालिया ,झांबिया साउथ, आफ्रिका, नायजेरिया ,अंगोला .
▶️ उत्तरअमेरिका
– २४३२०००० चौ. कि. मी
– १६.३ %
– अमेरिका ,कॅनडा, ग्रीनलंड ,वेस्ट इंडिज, मध्य अमेरिका ,मेक्सिको .
▶️ दक्षिण अमेरिका
– १७५९९००० चौ. कि. मी.
– ११.८ %
– अर्जेंटीना ,बोलाव्हिया ,ब्राझिल, चिली ,कोलंबिया ,इक्विनेर ,पेरुग्वे, पेरू ,उरूग्वे ,व्हेनुझुएला, गयाना .
▶️ युरोप
– ९७००००० चौ. कि .मी .
– ६.५ %
– फ्रान्स, झेकोस्लोव्हाकिया ,इंग्लंड, हंगेरी ,नॉर्वे ,स्वीडन, पोर्तुगाल, इटली, स्पेन, स्वित्झरलैंड, रशिया, ऑस्ट्रिया.
▶️ ऑस्ट्रेलिया
– ७६८३३००० चौ. कि .मी
– ५.२ %
– न्यू साऊथ वेल्स क्वीन्स लँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया, तस्मानिया .
▶️ अंटार्किटका
– १४२४५०००चौ.कि.मी
– ९.६ %
– कोणताही देश सहभागी नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेतकरी समुह अर्थ व स्थिती
*🔻- अर्थ-*---
शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे. या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत.
======
*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*
विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.
भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही.
शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.
*शेतकरी संघटना*---
सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.
शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासमोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.
भारतातील महत्वाची शहरे :
🔷अमृतसर - सुवर्ण मंदिर
🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम
🔷आग्रा - लाल किल्ला
🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल
🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु
🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण
🔷कोणार्क - सूर्य मंदिर
🔶गगोत्री - गंगा नदीचा उगम
🔷चदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी
🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा
🔷जोधापूर - मोती महल
🔶डलहौसी - थंड हवेचे ठिकाण
🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर
🔶नागपूर - मध्यवर्ती वसलेले शहर
🔷मबई - नैसर्गिक बंदर
🔶नाशिक - सात टेकड्यांवर वसलेले शहर
🔷पोरबंदर - महात्मा गांधींचे जन्म स्थळ
🔶हदराबाद - चारमिनार
गाल्फ प्रवाह
काय आहे गल्फा प्रवाह
📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*
📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.
📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.
📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो
📌अमेरिकेच्या आग्नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.
📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.
*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*
📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.
📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.
📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.
📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.
📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.
____________________________________
भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
भारतातील महत्वाची सरोवरे
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
____________________________________
नदया व त्यांचे उगमस्थान:-
गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )
यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )
सिंधू => मानसरोवर (तिबेट )
नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )
तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )
महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )
ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )
सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )
व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )
गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक
कृष्णा => महाबळेश्वर
कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )
साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )
रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )
पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )
जगातील सर्वात उंच 10 शिखरे
🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ)
🔹8848 मीटर उंच.
🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8611 मीटर उंच.
🔵(3).... कांचनगंगा (भारत )
🔹8586 मीटर उंच.
🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)
🔹8516 मीटर उंच.
🔵(5)...... मकालू (नेपाळ)
🔹8463 मीटर उंच
🔵(6).......चो ओयू (नेपाळ)
🔹8201 मीटर उंच.
🔵(7).......धौलागिरी (नेपाळ)
🔹8167 मीटर उंच.
🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ)
🔹8163 मीटर उंच
🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8125 मीटर उंच.
🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)
🔹8091 मीटर उंच.
🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)
🔹8068 मीटर उंच.
🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)
🔹8051 मीटर उंच.
🔵(13)...... गशेरब्रूम --2
🔹(हिमालय) 8035 मीटर उंच
🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)
🔹8027 मीटर उंच.
🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
भारतीय रेल्वे विभाग
1) मध्य विभाग - मुंबई - सन 1951
2) पश्चिम विभाग - मुंबई - सन 1951
3) उत्तर विभाग - दिल्ली - सन 1952
4) दक्षिण विभाग - चेन्नई - सन 1951
5) पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
6) दक्षिण पूर्व विभाग - कलकत्ता - सन 1955
7) दक्षिण-मध्य - सिकंदराबाद - सन 1966
8) उत्तर पूर्व विभाग - गोरखपूर - सन 1952
9) सरहद्द रेल्वे - गोहाटी - सन 1958
10) पूर्व किनारपट्टीय विभाग - भुवनेश्वर - सन 1996
11) उत्तर मध्य विभाग - अलाहाबाद - सन 1996
12) पूर्व मध्य विभाग - हाजीपूर - सन 1996
13) उत्तर पश्चिम विभाग - जयपूर - सन 1996
14) पश्चिम मध्य विभाग - जबलपूर - सन 1996
15) दक्षिण पश्चिम विभाग - बंगलोर - सन 1996
16) दक्षिण-पूर्व-मध्य विभाग - बिलासपुर - सन 1998
17) कलकत्ता मेट्रो - कलकत्ता - सन 2010
भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे :
*बंदरे - राज्य*
1) कांडला - गुजरात
2) मुंबई - महाराष्ट्र
3) न्हाव्हाशेवा - महाराष्ट्
4) मार्मागोवा - गोवा
5) कोचीन - केरळ
6) तुतीकोरीन - तमिळनाडू
7) चेन्नई - तामीळनाडू
8) विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश
9) पॅरादीप - ओडिसा
10)न्यू मंगलोर - कर्नाटक
11) एन्नोर - आंध्रप्रदेश
12) कोलकत्ता - पश्चिम बंगाल
13) हल्दिया - पश्चिम बंगाल
जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
भौगोलिक उपनाव - टोपणनाव
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
भारतातील सर्वात लांब
1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)
2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)
3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा
4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा
5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी
6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल
7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु
8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता
9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज
10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल - सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)
महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान
🔹 बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
🔹 महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
🔹 महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
🔹 वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
🔹 नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
🔹 सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
🔹 महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
🔹 कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
🔹 कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
🔹 भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
🔹 सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
🔹 फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
🔹 महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
🔹 माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
फोर्ब्स पावर लिस्ट’2020
● फोर्ब्सने 2020 (Forbes Power Women ) वर्षातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमण, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा यांचा समावेश आहे.
या यादीत सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल अव्वल स्थानी आहेत. न्यूझीलॅंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. ज्यांनी कडक नियमावली करत आपल्या देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवलं.
● 17 व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये 30 देशांमधील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सनं म्हटलं आहे की, यामध्ये दहा देशांच्या प्रमुख, 38 सीईओ आणि पाच मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा समावेश आहे. भलेही त्या वयाने, राष्ट्रीयतेने आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मात्र 2020 सालात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे काम केलं आहे.
● निर्मला सीतारमण या यादीत 41 व्या स्थानी आहेत. नडार मल्होत्रा 55 व्या तर किरण मजूमदार शॉ 68 व्या स्थानी आहेत. लॅंडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत 98व्या स्थानी आहेत. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस तिसऱ्या स्थानी आहेत. तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल सलग दहाव्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत.
10 December 2020
महाराष्ट्रात 'दिशा कायदा' मंजूर
राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे.
यानुसार एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाला तर सीआरपी कलमाच्या बदलासंदर्भात चर्चा करण्यात आली होती.
यानुसार जन्मठेपेची शिक्षा आता मृत्यूदंडात करण्यात आली आहे. या कायद्याला दिशा कायदा शक्ती बिल असं नाव देण्यात येणार आहे.
दरम्यान, या कायद्यानुसार आता फास्ट ट्रॅकवर आरोपींना शिक्षा करण्यात येणार आहे.
📚 काय आहे दिशा कायदा : #Act
बलात्काऱ्याला कठोरात कठोर शिक्षा आणि तीसुद्धा अवघ्या 21 दिवसात देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक 2019 आणलं.
या नव्या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे.
या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.
Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना ४१ वे स्थान.
🏆 फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 १७ व्या वार्षिक 'फोर्ब्स पॉवर लिस्ट'मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
🏆 "फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला.
🏆 या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं,
🏆 किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. एन्जेला मार्केल या युरोपमधील प्रमुख नेत्या आहेत.
🏆 जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करून जर्मनीत दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचं नेतृत्व खंबीर आहे.
🏆 अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे.
🏆 तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी करोना महासाथीदरम्यान देशात कडक लॉकडाउन लागू करून आपल्या देशाला मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे त्यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे
Q1) कोणत्या देशाने 1 नोव्हेंबरपासून जगातल्या सर्वात मोठ्या जनगणना प्रक्रियेचा प्रारंभ केला?
--->>>>> चीन
Q2) कोणत्या राज्याने MSME उद्योगांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशीप या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
--->>>>> पंजाब
Q3) कोण न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री आहेत?
--->>>>> प्रियंका राधाकृष्णन
Q4) कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये 'ट्रान्सजेंडर' हा नवा पर्याय सादर केला गेला आहे?
--->>>>> आसाम
Q5) UNESCO संस्थेच्या ‘मॅन अँड बायोस्फीअर’ कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला ‘पन्ना जीवावरण अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?
--->>>>> मध्यप्रदेश
Q6) कोणत्या शहरात भारतातले पहिले ‘टायर उद्यान’ तयार करण्यात आले आहे?
--->>>>> कोलकत्ता
Q7) कोणत्या दिवशी ‘पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांसाठी माफी देण्याच्या समाप्तीसाठी आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?
--->>>>> 2 नोव्हेंबर
Q8) कोणत्या संस्थेनी हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) सोबत करार केला?
--->>>>> भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
Q9) कोणत्या राज्यात देशातल्या पहिल्या सौर-चालित छोट्या रेलगाडीचे उद्घाटन झाले?
--->>>>> केरळ
Q10) कोणती व्यक्ती विमानचालन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली महिला ठरली?
--->>>>> हरप्रीत ए. डी सिंग
Q1) कोणत्या देशाचे नाव अमेरिकेच्या ‘स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिजम’ याच्या यादीतून वगळण्यात आले?
उत्तर :- सुदान
Q2) कोणत्या जिल्ह्यात ‘डोब्रा चंटी पूल’ उभारण्यात आला?
उत्तर :- टिहरी-गढवाल
Q3) कोणत्या संस्थेनी ‘अग्नीशोधक आणि अग्नीशमन प्रणाली (FDSS)’ तंत्रज्ञान विकसित केले?
उत्तर :- अग्नी स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्र (CFEES)
Q4) कोणत्या राज्यात ‘पाक्के व्याघ्र प्रकल्प’ आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश
Q5) 2020 साली ‘शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’चा विषय काय आहे?
उत्तर :- सायन्स फॉर अँड विथ सोसायटी
Q6) कोणत्या व्यक्तीला ‘JCB प्राइज फॉर लिटरेचर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- एस. हरीश
Q7) कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ साजरा करतात?
उत्तर :- नागालँड
Q8) कोण तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर लिहिलेल्या “रासाथी” या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहे?
उत्तर :- ससिंद्रन कल्लीनकील
Q9) कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन’ साजरा करतात?
उत्तर :- 9 नोव्हेंबर
Q10) ___ संस्थेच्यावतीने ‘अॅंटी-सॅटेलाईट (ए-सॅट)’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या एका प्रतिरूपाचे अनावरण करण्यात आले.
उत्तर :- संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO)
Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?
उत्तर :- भूतान
Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?
उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू
Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?
उत्तर :- महाराष्ट्र
Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे
Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?
उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020
Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?
उत्तर :- उत्तराखंड
Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?
उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण
Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?
उत्तर :- स्टुअर्ट डग्लस
Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?
उत्तर :- ताजिकिस्तान
Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव
भारतीय वंशाचे चौहान ब्रिटिश कोलंबिया विधानसभा सभापतिपदी
• कॅनडातील भारतीय वंशाचे राज चौहान यांची ब्रिटिश कोलंबिया विधानसभा विधिमंडळाचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.
• या पदावर निवड झालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
• ते या विधीमंडळात पाच वेळा निवडून आले असून यापूर्वी त्यांनी या विधिमंडळाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.
• चौहान हे मूळ पंजाबचे असून १९७३ ला ते कॅनडाला स्थलांतरित झाले होते.
भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....
1. जवाहरलाल नेहरू
कार्यकाळ:-
15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
16 वर्षे, 286 दिवस
भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान
२. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
27 मे 1964 ते 9 जून 1964
13 दिवस
पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान
3. लाल बहादूर शास्त्री
कार्यकाळ:-
9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
1 वर्ष, 216 दिवस
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.
4. गुलझारी लाल नंदा
कार्यकाळ:-
11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
13 दिवस
5. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977
11 वर्षे, 59 दिवस
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
5. मोरारजी देसाई
कार्यकाळ:-
24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
2 वर्षे, 126 दिवस
सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान
6. चरणसिंग
कार्यकाळ:-
28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
170 दिवस
एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..
7. इंदिरा गांधी
कार्यकाळ:-
14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984
4 वर्षे, 291 दिवस
दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला
8. राजीव गांधी
कार्यकाळ:-
31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989
5 वर्षे, 32 दिवस
सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)
9. विश्वनाथ प्रताप सिंह
कार्यकाळ:-
2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
343 दिवस
अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान
10. चंद्रशेखर
कार्यकाळ:-
10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991
223 दिवस
कार्यकाळ:-
समाजवादी जनता पार्टीशी संबंधित
11. पीव्ही नरसिंहराव
कार्यकाळ:-
21 जून 1991 ते 16 मे 1996
4 वर्षे, 330 दिवस
दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान
12. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
16 मे 1996 ते 1 जून 1996
16 दिवस
सरकार केवळ 1 मताने पडले
13. एचडी देव गौडा
कार्यकाळ:-
1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
324 दिवस
जनता दलाचे पंतप्रधान
14. इंदर कुमार गुजराल
कार्यकाळ:-
21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
332 दिवस
स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान
15. अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ:-
19 मार्च 1998 ते 22 मे 2004
6 वर्षे, 64 दिवस
कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ पूर्ण केलेले पंतप्रधान
16. मनमोहन सिंग
कार्यकाळ:-
22 मे 2004 ते 26 मे 2014
10 वर्षे, 2 दिवस
प्रथम शीख पंतप्रधान
17. नरेंद्र मोदी
कार्यकाळ:-
26 मे 2014 आत्तापर्यंत
करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच-
📚करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे.
📚३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं.
📚अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.
📚दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.
📚EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला.
भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ
भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.
आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.
अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.
तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.
तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.
फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण.
कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे.
तर अमेरिकी अन्न व औषध प्रशासनापुढे या लशीच्या चाचण्यांबाबतची जी कागदपत्रे मांडण्यात आली त्यातून हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेतील लस सल्लागार गटाची जी बैठक झाली, त्यात लशीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत ज्या माहिती अहवालांचे सादरीकरण झाले त्यात 53 पानांच्या मूळ माहिती विश्लेषण पुस्तिकेचा समावेश आले.तसेच गेल्या महिन्यात ही लस दोन मात्रा दिल्यानंतर 95 टक्के प्रभावी ठरली होती. ती 21 दिवसांच्या अंतराने देण्यात आली.
गेल्या महिन्यात बायोएनटेक व फायझर यांनी लशीच्या दोन मात्रानंतर 95 टक्के प्रभावाचा दावा केला असून प्रत्यक्षात फायझरची लस फार लवकर करोनाविरोधात काम करू लागते.
वय, वंश, वजन यापैकी कुठल्याही घटकाचा विचार केला, तरी ही लस जास्त चांगली व वेगाने विषाणूचा प्रतिबंध करणारी असल्याचे दिसून आले आहे. या लशीचे कुठलेही गंभीर गैरपरिणाम दिसून आलेले नाहीत.
अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश.
डेफर्ड अॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.
कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना त्यामुळे दिलासा मिळाला असून त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने डीएसीए कायदा २०१७ मध्ये रद्द केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्येही विरोध केला होता.
शुक्रवारी न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी अंतर्गत सुरक्षा विभागाला असा आदेश दिला,की डीएसीए कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात यावीत. लोकांचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करावी. सोमवारपासून मुदतवाढीचे हे अर्ज स्वीकारण्यात यावेत.
मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात तूर्तास दिलासा नाही, जानेवारीत पुन्हा सुनावणी
आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.