Monday 25 November 2019

26/11 मुंबई हल्ला; आज 11 वर्षे पूर्ण

बरोबर आजच्याच दिवशी 11 वर्षा पूर्वी मुंबईवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण देश हादरून गेला होता.

स्फोटांचा, गोळीबाराचा आवाज, हल्लेखोरांचा धुमाकूळ, ताज हॉटेल आणि कधी पाहिले नाही असे दृश्य संपूर्ण देश प्रथमच अनुभवत होता.

या हल्ल्यात तब्बल 166 लोक मारले तर 308 लोक गंभीर जखमी झाले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचा समावेश होता.

हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील 14 पोलिस अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते. मात्र, शहीद होता होता मुंबई पोलिस दलाला 9 दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले. आज त्या सर्व कटू आठवणींना उजाळा देऊयात आणि शहिदांना श्रद्धांजली वाहूयात...

या दहशतवादी हल्ल्यात भारताने अनेक शूरवीर अधिकारी गमावले आहेत. भारताचे असली हिरो म्हणून इतिहास त्यांची नक्की नोंद घेईल. त्यांच्या नावावर एक नजर...

*1. हेमंत करकरे (मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख)
*2. तुकाराम अंबोळे (सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलीस)
*3. अशोक कामटे (अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर)
*4. विजय साळस्कर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...