Friday 6 December 2019

गोवा हा भारताचा भाग कशाप्रकारे बनला ?

🍀 स्वातंत्र्यानंतर १९६१ पर्यंत गोवा अधिकृतरीत्या भारताचा भाग नव्हता. कारण यावर पोर्तुगीजांची सत्ता होती.

🍀 जेव्हा की गोव्यात राहणारे बहुसंख्य नागरीक हे भारतीयच होते.

🍀 पोर्तुगीजांनी गोव्यावर ४५० वर्षे राज्य केले.

🍀 स्वातंत्र्याच्या वेळेस ५६२ प्रांत भारतात समाविष्ट झाले.

🍀 भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी अथक प्रयत्नाने हे कार्य मार्गी लावले. म्हणूनच वल्लभभाईंना ‘भारताचे लोहपुरुष’ म्हटल्या जाते.

🍀 याविरोधात तेथील नागरिकांनी १९५५ साली सत्याग्रह केला; मात्र चिडलेल्या पोर्तुगीजांनी क्रूरतेचा अतिरेक करत २२ नागरिकांना गोळ्या घालून ठार केले.

🍀 या घटनेने पंडित जवाहरलाल नेहरु चांगलेच संतापले.

🍀 अखेर नेहरुंनी पोर्तुगीजांच्या विरोधात ‘विजय’ नामक सैन्य ऑपरेशन राबविण्याचा आदेश दिला.

🍀 इतिहासकारांच्या मते, हे ऑपरेशन ३६ तासांपेक्षा जास्त वेळ चालले.

🍀 १९ डिसेंबर, १९६१ रोजी भारतीय सेनेने वीरतेचा परिचय देत गोव्याला भारतीय संघाशी जोडले.

🍀 यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल वसाला-इ-सिल्वा याने पोर्तुगीज सैनिकांसह भारतीय सेना प्रमुख पीएन थापर यांच्यापुढे शरणागती पत्करली होती.

🍀 यानंतर ३० मे, १९८७ साली गोव्याला भारतीय राज्याचा दर्जा मिळाला; मात्र ‘गोवा मुक्ती दिवस’ १९ डिसेंबरलाच साजरा केला जातो.

🍀 आजही भारतात पर्यटनाच्या दृष्टिने गोवा राज्य अग्रेसर आहे.

🍀 पूर्वी ब्रिटिश नागरिक आणि मुगल या भागाकडे आकर्षक झाले होते.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...